आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे
ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली
अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल
ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे
वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात .
त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत
तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ?
१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ?
आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये
नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ?
साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे
अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ?
सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही .
तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ?
आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ?
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
तुम्हाला काय वाटते ?
वाचने
38109
वाचनखूण
प्रतिक्रिया
166
In reply to श्रीगुरुजी एका पर्सोनल प्रश्न by अभिजित - १
>>> "पर्सोनल" प्रश्न
In reply to >>> "पर्सोनल" प्रश्न by श्रीगुरुजी
ते "पर्सोनेल" असं असेल तर ते
हा बाबा काय म्हंतो बगा जरा.
In reply to हा बाबा काय म्हंतो बगा जरा. by संदीप डांगे
भारी व्हिडीओ आहे... कोणीतरी
In reply to भारी व्हिडीओ आहे... कोणीतरी by डॉ सुहास म्हात्रे
सहमत
सोत्रीजी
उत्तम प्रतिसाद
सॉफ्टवेअर चे ज्ञान शिकुन
.
बिझनेस प्रोसेस जर आस्तित्वातच
In reply to बिझनेस प्रोसेस जर आस्तित्वातच by विजुभाऊ
.
In reply to . by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
पटतंय....
In reply to बिझनेस प्रोसेस जर आस्तित्वातच by विजुभाऊ
माझ्यामते कोअर बिझनेस म्हणजे
आयटीवाल्यांसाठी बातमी...IT
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatheringsIn reply to आयटीवाल्यांसाठी बातमी...IT by मदनबाण
आयटी अपडेट्स :-
In reply to आयटी अपडेट्स :- by मदनबाण
आता भारतात पण मोठ्या प्रमाणात