Skip to main content

राष्ट्रभक्त हिटलरला

लेखक अनिकेतदळवी यांनी गुरुवार, 21/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!

वाचने 67301
प्रतिक्रिया 213

प्रतिक्रिया

टाळ्या!! जोर्दार टाळ्या!! मिपावर बाकीचे लोक जरा मूर्खच आहेत, असले लेख वारंवार वाचल्यास सिलेक्टिव्ह रीडिंगचे उत्तम शिक्षण मिळेल त्यांना, च्यायला कोणी ऐकतच नै.

In reply to by बॅटमॅन

बॅट्याला जोरदार अनुमोदन. राष्ट्रभक्तीने थबथबून ओथंबणारा धबाबा प्रेरणेचा धबधबा लिहिणार्‍यांनी इतक्यातच थांबू नये. ज्ञानाचे तुषारकण असेच मिपावर उडवित रहावेत.

In reply to by मन१

कॉफि संपल्यावर धागा लेखकाला हॉटेलात एक मिसळपावही देण्यात येइल...

रक्ताचा एक थेंब न गाळता, न सांडता कार्य करणार्‍या लोकांचे कौतुक वाटते. लोक कायमच नावे ठेवतातच म्हणे गळा दाबुन , विषारी गॅस देउन, आगीत जाळून, विरोधात गेलेल्या सगळ्यांना तुरुंगात डांबून, सुप्रीम आर्यन रेस करायच्या नादात जिप्सी, ज्यु, अन्य वंशीय यांना विशिष्ट वैद्यकीय सेवा देउन, व नंतर तुरुंगात, छावण्यात विल्हेवाट लावून इ मार्गाने पण जमवले बॉ हिटलरने. मान्य केलेच पाहीजे ह्या हिटलरने स्वताचे व करोडो लोकांचे रक्त आट्वले. आता संचारबंदी तोडून बेकायदा गोळा होणार्‍या बेशीस्त लोकांना धडा शिकवणार्‍या कार्यक्षम सरकारी अधिकार्यावर म्हणजे आपले जनरल डायर हो, एक फर्मास लेख येउ द्या!

कोणत्याही माणसाच्या दोन बाजू असतात. काळी आणि पांढरी... आणि माणूस कधीच फक्त काळा किंवा फक्त पांढरा नसतो. तो नेहमीच राखाडी असतो. फिकट किंवा काळपट एवढाच काय तो फरक. हे सगळे मान्य असल्यामुळे, किंबहुना हे माझेच मत असल्यामुळे, हिटलरमधेही काही चांगल्या गोष्टी होत्या याबद्दल मला संशय नाहीच. मात्र वर उल्लेखिलेल्या कोणत्याही 'अचिव्हमेंट्स' या केवळ त्याच्यामुळे होऊ शकल्या नाहीत तर त्यात अजूनही काही लोकांचा हातभार लागला होता. तसा तो प्रत्येकच नायकाच्या बाबतीत असतो. त्यामुळे कोणत्याही अचिव्हमेंट्सचं श्रेय सर्वस्वी एकाच माणसाला जात नाही... ते टीमला जातं. दुसरा मुद्दा असा की, वर उल्लेखिलेल्या सगळ्या गोष्टी खरंच अचिव्हमेंट होत्या का? उदा. तीन आठवड्यात पाडलेला पोलंडचा 'फडशा'! ही सरळ सरळ युद्धखोरी होती. Lebensraum अथवा Ostsiedlung वगैरे संकल्पनांचा तो वास्तवात आणलेला नंगानाच होता. याला तुम्ही अचिव्हमेंट म्हणत असाल तर म्हणा बापडे! अजून एक उदाहरण बघू... शारिरीक शिक्षण सक्तीचे केले वगैरे... जर्मन समाजाचे सरळ सरळ रेजिमेंटेशन केले गेले. ही पण बहुधा 'अचिव्हमेंट'च. असेल बापडी.. असं बरंच काही बोलता येईल... बरं हे ही जौद्या... एखाद्या माणसाला माणूस म्हणून स्वीकारणं आणि मग तो सलाम करण्याजोगा आहे की नाही हे ठरवणं... यासाठी त्या माणसाचा संपूर्णत्वाने विचार केला पाहिजे. चांगल्या आणि वाईट बाजू बघताना, जर का चांगल्या बाजू जास्त असतील तर मग सलाम वगैरे म्हणण्यात अर्थ आहे... अन्यथा, नुसत्या चांगल्या बाजूंपुरतंच ते कौतुक सिमित रहावं... हिटलरने जे काही केलं त्याचा साकल्याने विचार करता, 'माणसा'ला सलाम करण्याचं धार्ष्ट्य माझ्यात नाही. *** जाता जाता : मी सातवीत असताना, पहिल्यांदा, 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वाचलं. त्यानंतर अजून काही वाचलं. त्या वयात मी प्रचंड हिटलर फॅन होतो. नंतर जसजसा मोठा होत गेलो तसतशी क्षितिजं विस्तारली, वाचन वाढलं.. आणि पुढे तर काही युरोपिअन लोकांशी चर्चा होऊ शकली. आणि मग पूर्ण भान आल्यावर माझी मतं बदलली. तुम्हालाही शुभेच्छा! (अजून काही मांडावंसं वाटलं तर नंतर सवडीने!) *** बादवे, तुम्हाला नरेंद्र मोदींनाही सलाम करावासा वाटतो का? जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

त्यात तुमची चूक नाही व प्रस्तूत लेखकाचीही नाही. पूर्वीची अनेक पुस्तके (मराठी) वाचली की हिटलर हा हिरोच वाटतो. मी लिहिलेले पुस्तक अजून तीन चार महिन्यात प्रकाशीत होईल त्यात हिटलर हा सर्व आघाड्यांवर शेवटी कसा पराभूत झाला हे कळेल व त्याला कारणीभूत तो नाझी होता हेच कारण कसे होते हे कळेल..............

In reply to by जयंत कुलकर्णी

मी लिहिलेले पुस्तक अजून तीन चार महिन्यात प्रकाशीत होईल त्यात हिटलर हा सर्व आघाड्यांवर शेवटी कसा पराभूत झाला हे कळेल व त्याला कारणीभूत तो नाझी होता हेच कारण कसे होते हे कळेल..............
म्हणजे इतक्या वर्षांनी का होईना पण जगासमोर सत्य काय ते येणार म्हणा की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा सत्य सगळ्यांनाच माहीत आहे. फक्त नव नवीन माहिती प्रकाशात येत असते व त्यानुसार काही अनुमाने समोर ठेवावे लागतात. ती या पुस्तकात ठेवली आहेत. तसेच सगळ्या माहितीचा स्त्रोतही लिहिला आहे जेणे करुन वाचकाला पाहिजे असल्यास तेही वाचता येईल.....

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपीनदाशी सहमत आहे. आपण कुठल्याही मानसाला आपल्याला हवा तसा रंगवाता येतो. आणि आपल्या देशात तर याची चढाओढच आहे. एखादा मानुस चांगला मानला की त्याचं सगळं अगदी १००% चांगलं आणि एखादा माणुस वाईट म्हणजे त्याचं सर्वच वाईट असं आपण मानतो. जे की १००% खरं नाही. प्रत्येक मानसात चांगल्यावाईटाची सरमिसळ असते. त्यात जो गुण एकूणात चांगला त्याला आपण चांगला म्हणतो आणि असंच उलट सुध्दा. तर आपण किंवा जग हिटलरला युध्दपिपासू मानतो. त्याने जर्मणीच्या मानभंगाचा सूड वगैरे घेतला असेल आणि जर्मणीचा प्रचंड विकास केला असेल मात्र तो अत्यंत क्रुर होता आणि वंशद्वेशी सुध्दा होता. त्याने केलेले हत्याकांड आज सुध्दा लोकांना तेवढ्याच तिव्रतेने आठवतात. यातनातळाच्या कथा आज सुद्धा चर्चील्या जातात. त्यामुळे एकूणात हिटलर म्हटल्यास मला तरी हेकेखोर, पाशवी, युध्दपिपासू, वंशद्वेष्टा व हिंसक असेच रंग ठळक होताना दिसतात. त्यामुळे हिटलरचे समर्थन नाही करू शकत. एकंदरीत तुमचा प्रयत्न छान आहे. लेखन करताना आत्मविश्वास दिसतोय. आपल्याला सकारात्मक व आवश्यक तेवढाच संदर्भ घ्यावा व मुद्दा सिध्दं झाल्यासारखा लिहावा असा दिसतो. (मी चुकत असेन कदाचित.) या प्रकारे लिहीतो म्हटल्यावर रावण, अनेक असूर, भारतावरील परकिय आक्रमक सुध्दा असेच गौरविता येतील. मला तरी हे पटत नाही. - नीलकांत

In reply to by नीलकांत

तुमंच म्ह्णनं बरोबर आहे थोडंस. पण आपण त्याच्या वाईट बाजुच जास्त ऐकुन आहोत. पण त्याला अशी नांव ठेवण्यापुर्वी त्याची चांगली बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे ना

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हिटलर आणि मोदींची तुलना ??? हिटलर आणि जनरल डायरची तुलना नाही. हिटलर आणि दिल्लीमधील शीख दंगलीतील आरोपींची तुलना नाही. हिटलर आणि काश्मीर मध्ये हिंदुंना ठार मारणा-या दहशतवाद्यांची तुलना नाही. हिटलर आणि तालिबानी लोकांची तुलना नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पुर्वीचे बॅलन्स्ड बिका कोणी परत आणु शकेल का ?

In reply to by अमोल खरे

माओवाद्यांना नि:शस्त्र गांधीवादी म्हणवणार्‍या लोकांच्या कळपात वावरणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हिटलर आणी मोदींची तुलना खूप म्हणजे खूपच अती झाली. एक तर तुम्हाला मोदींची माहिती नाही अथवा हिटलरची माहिती नाही. अर्थात प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य असल्याने कुणीही कसाही विचार करावा. मला मात्र मोदींन सलाम करावासा नक्कीच वाटतो. आणि भारताचे पंतप्रधान म्हणूनही त्यांना बघायला आवडेल. आजच हैदराबाद मधे झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर तर गां*त दम असलेला (सगळ्याच बाबतीत) मोदींसारखाच पंतप्रधान भारताला हवा हे माझं मत आहे.

In reply to by आदिजोशी

+१ मोदी दुरद्रुष्टी असणारे नेते आहेत. प्रधानमंत्री म्हणुन त्यांना पहायला नक्कीच आवडेल. मोदी आणि हिटलर ची तुलना होऊ शकत नाही. राष्ट्र्भक्ती हा हिटलर चा गुण चांगला होता. तसेच तो एक उत्क्रुष्ट सेनानी होता. पण तरीही ज्युंच्या हत्याकांडाचं समर्थन करता येऊ शकत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग लोकांना मारण्यासाठी करण्याचा निकष लावला तर तुलना होऊ शकते. पण तुल्यबळ नाही.

In reply to by हारुन शेख

एक हिटलर मुळात होऊन गेल्यानंतर पुन्हा तसाच राक्षस उभा रहाणं आणखी कठीण होतं. लोकं थोडे अधिक हुशार होतात. हिटलरला त्या काळच्या जर्मन विचारवंतांनी पाठींबा दिला होता. अनेक हुशार, श्रीमंत, प्रभावशाली जर्मन ज्यू लोकांनीही सुरूवातीला हिटलरकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली होतीच. आता वेगवेगळ्या देशातल्या हिटलर बनू पहाणार्‍या लोकांना एवढं सपाट मैदान मिळत नाही. विचारवंत आरडाओरडा सुरू करतात. (याचं समांतर उदाहरण शेअर बाजारातल्या घोटाळ्यांकडे पहाता येईल. एकदा घोटाळा झाल्यावर सेबी वगैरे प्रकार झाले, घोटाळे करणं आणखी कठीण झालं.) तत्त्व म्हणून (ज्यात आकडे वगळता येतात) "आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग वेगळ्या धर्माच्या लोकांना मारण्यासाठी" केला यात दोघांमधे साधर्म्य आहेच. (तिरका ठसा माझा.) हे एक झालं. आता दुसरं पहा: इथे हे सापडलं:
To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic races—the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindustan to learn and profit by"[34][35] — M. S. Golwalkar
ज्या संघात मोदींच्या भाजपची मुळं शोधता येतात, त्यांच्या माजी प्रमुखांचं जर्मनीच्या वांशिक अशुद्धता हटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल उच्च मत होतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे तुमच्या मताशी. तुमचा प्रतिसाद वाचून खालील अवतरण आठवले. First they came for the Socialists, and I did not speak out-- Because I was not a Socialist. Then they came for the Trade Unionists, and I did not speak out-- Because I was not a Trade Unionist. Then they came for the Jews, and I did not speak out-- Because I was not a Jew. Then they came for me--and there was no one left to speak for me. -- Martin Niemöller

In reply to by हारुन शेख

हेच आता पाकीस्तान आणि दहशतावादी म्हणजे काय हे समजल्यावर काश्मीरींमधे होत आहे असे वाटते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तत्त्व म्हणून (ज्यात आकडे वगळता येतात) "आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग वेगळ्या धर्माच्या लोकांना मारण्यासाठी" केला यात दोघांमधे साधर्म्य आहेच.
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एस.आय.टी नेच मोदींविरूध्द खटला भरण्याइतका पुरावा नाही असे म्हटले आहे त्याचे काय? म्हणजे मोदींनी दुसर्‍या धर्माच्या लोकांना मारायला सरकारी यंत्रणेचा वापर केला असे तुम्हाला वाटत असले तरी ती सत्य परिस्थिती नाही हे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या यंत्रणेनेच म्हटले आहे. तेव्हा हिटलरबरोबर मोदींचे नाव घ्यायचे कारण समजले नाही. विषय काहीही असला तरी बादरायण संबंध लावून त्यात संघ इत्यादींवर गरळ ओकण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच. माननीय वाजपेयी साहेबांनी दिलेले 'राजधर्माचे पालन करा' वैगेरे घरचे अहेर कसे विसरता. वाजपेयींसारखे नेते भाजपला परत घडविता येतील अशी अपेक्षा आहे त्या पक्षाकडून. कारण कॉंग्रेसचा अतिशय कंटाळा आला आहे आता.

In reply to by हारुन शेख

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच
यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा गैरवापरच. या धाग्यावर हा प्रमुख विषय आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

Any publicity is good publicity. तेव्हा माझं महत्त्व वाढवण्याबद्दल अनेक आभार. हे तर होत राहिलच. असो. माया कोदनानी, अमित (शहा बहुदा) हे मोदींच्या मंत्रीमंडळातले तेव्हाचे मंत्री, बाबू बजरंगी वगैरेंवर अंमळ गूगल करणार का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माया कोदनानी, अमित (शहा बहुदा) हे मोदींच्या मंत्रीमंडळातले तेव्हाचे मंत्री, बाबू बजरंगी वगैरेंवर अंमळ गूगल करणार का?
अमित शहांचा गुजरात २००२ दंगलींमध्ये काहीही हात नव्हता.आणि त्यांच्यावर जो काही आरोप आहे तो नंतरचा (सोहराबुद्दिन एनकाऊंटर) आणि तो ही सिध्द व्हायचा आहे. गुन्हा सिध्द व्हायचा आहे तोपर्यंत कोणाला मंत्रीमंडळात ठेवायचे हा मोदींचा प्रश्न आहे. तुमच्यासारख्या विचारवंतांनी काही बोलले तरी त्यावर त्याप्रमाणे कृती करायला मोदी अजिबात बांधिल नाहीत. राहिली गोष्ट माया कोडनानींची. आणि राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात हरकिशनलाल भगत होते, जगदिश टायटलर अगदी २००५ पर्यंत मंत्री होते, सज्जन कुमार अगदी अलीकडच्या काळापर्यंत खासदार होते हे प्रश्न तुमच्यासारखे विचारवंत का विचारायला जात नाहीत?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हल्ली "विचारवंत" हा शब्द वाचला की "विचारजंत" हाच शब्द जास्त योग्य वाटायला लागतो... असो

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती देवीं नंतर ते ठराविक लोक नाही आले

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे हे सापडलं:
तुम्हाला ते वाक्य जिथे सापडले तेथेच "The neutrality of this article is disputed." असे देखील लिहीलेले आहे. असो. त्या व्यतिरीक्त असल्या (तुम्ही वर उर्धृत केलेल्या) कोटेशन्सना Contextomy - Fallacy of quoting out of context म्हणतात. ती डाव्या/कम्युनिस्टांमधे जास्त आढळणारी पद्धत आहे. गोबेल्सच्या तंत्रासारखेच काहीतरी. गोळवलकरांचे ते विधान ज्या वर्षातले आहे, त्याच सुमारास (किंचित आधीच) जेंव्हा टाईम मॅगझिनने हिटलरला पर्सन ऑफ दी इयर म्हणलेले होते. त्याच वर्षात हिटलरला नोबेल शांतता पुरस्कारासाठी देखील विचारात घेतले होते. विकीवर गोळवलकरांची अजूनही दोन नंतरची विधाने सापडली: "The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians." आणि "The Jews had maintained their race, religion, culture and language; and all they wanted was their natural territory to complete their Nationality" अजून बरेच काही लिहीता येईल.

In reply to by हारुन शेख

@अदिती : हो... हारून शेख म्हणतात त्याप्रमाणे तत्त्वतः सारखेच. (मात्र अजूनही मोदींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेतच.) तुझ्याशी सहमत आहे. मात्र स्केलचा फरक असल्याने तुल्यबळ नाही. बाकी माझ्या मूळ प्रतिसादात मी फक्त प्रश्न विचारला होता, त्याला तुलना समजणार्‍यांबद्दल काय बोलावे! :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>हो... हारून शेख म्हणतात त्याप्रमाणे तत्त्वतः सारखेच. (मात्र अजूनही मोदींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेतच.) तुझ्याशी सहमत आहे. मात्र स्केलचा फरक असल्याने तुल्यबळ नाही. आरोप सिद्ध झाले नसतील तर तत्वतः सारखे कसे म्हणता येईल? तत्वतः सारखे म्हणण्यासाठी कृतीतील साधर्म्य सिद्ध व्हायला हवे, तुल्यबळता त्यानंतर विचारात घेता येईल. आरोप सिद्ध होण्यापूर्वी साधर्म्य आहे असे मानणे / लिहिणे / प्रतिपादन करणे याचा अर्थ आरोप सिद्ध होवो न होवो साधर्म्य मानले आहे असे दिसते. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास वक्तव्याला पुष्टी मिळेल परंतु न्यायालयात आरोप सिद्ध न झाल्यास वक्तव्य मागे घ्यावे लागेल. न घेतल्यास न्यायालयीन प्रक्रियेला किंमत देत नाही असे होते, आणि असे वक्तव्य मागे घेतल्यास न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापुर्वीच निष्कर्ष तो सुद्धा सोईस्कर काढून मोकळे झाले होते असे सिद्ध होईल. एकंदरीत केवळ विचारवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेला आटापीटा एवढंच ह्या वक्तव्याचा अर्थ. बिका, माफ करा पण इतके हास्यास्पद विचार कधीच नव्हते तुमचे. वाईट वाटले.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

माया कोदनानी, अमित .... (आडनाव विसरले, शहा बहुतेक) या मोदींच्या मंत्रीमंडळातल्या लोकांवरचे आरोप आधीच सिद्ध झालेले आहेत. लिंका शोधून आणू का स्वतःच्या स्वतः शोधणार? त्यातून कोदनानी सिंधी म्हणून मोदींनी त्यांना पाठीशी घातलं नाही, गुजराथी मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला वगैरेंच्या लिंकाही स्वतःच शोधून घेतल्यात तर बरं. (मला व्यक्तिशः) "तत्त्वतः सारखेच" याचा (सध्याचा) अर्थ वाचायला आवडेल.

In reply to by हारुन शेख

हे तुम्ही काश्मीरमध्ये जे ९० सालापासून चालू आहे त्याबद्दल म्हणत आहात का?

In reply to by हारुन शेख

तशी सिद्ध झालेली अनेक एकजाम्पलस इतिहासात आणि आतासुद्धा आहेतच की, हिटलरपरयन्त जायची पन गरज नाय... फक्त डोळे उघडून आजूबाजुला बघायला शिकले पाहिजे आणि खरे स्विकारण्याची हिम्मत असायला पाहिजे, बस. मात्र सिद्ध न झालेल्या गोष्टी सतत उगाळत राहण्याला आणि सिद्ध झालेल्या गोष्टींकडे ब्लाइंड आय करण्याला हायपोक्रसी म्हणतात असे वाचले आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

फक्त ज्युची ह्त्या केली एवढ्याच गोष्टी जास्त पुढारपणाने सांगितल्या जातात. पण का केली ह्या मागे हिट्लरची भावना काय होती. जर्मनीचा पहिल्या महायुद्धात झालेला पराभव हा ज्यु मुळे झाला म्ह्णुन त्याने त्यांचीच कत्तल केली. आणि आपल्या राष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा हिटलरने सुड उगवला. ज्या प्रकारे स्व:ता च्या राष्ट्राला पुन्हा जो मान मिळ्वुन दिला. हिटलर मध्ल्या त्या राष्ट्र्भक्ताला सलाम. आणि आता राहिलं मोदीं च्या सलामाचं तर असे बरेच राजकारणी आपल्या देशात आहेत. पण ते फक्त खाण्यातच व्यस्त.खाण्याबद्द्ल माझ काही म्ह्णणे नाही. पण ते फक्त लोकांना दिसेल असा पैसाच खात आहेत. त्यांना दिसतील अशी काम करण्याच्या नावाने मात्र बोंब आहे

वी हाय्झन झी? कस्काय चाल्लंय?रुडी हाय ना?

चंगेजखान, नादिरशाह, महम्मद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी वगैरे इतिहासातले अनेक दाखले आहेत. या सगळ्या क्रूरकर्म्यांनी त्यांच्या तथाकथित 'राष्ट्रां'चा भरपूर विस्तार केला होता. पुराणकालात तर वृत्रासुरापासून भस्मासुरापर्यंत अनेक असुरांनी माणसांचा संहार करून त्यांच्या लोकसंख्येला आळा घातला होता आणि त्यांना दानवांच्या अधिपत्याखाली आणले होते. त्या लोकांच्या दृष्टीने ते सगळे हिटलर इतकेच महान होते असे म्हणावे लागेल. त्या सर्वांचा जयजयकार करणारे त्यांचे चाहते त्यांच्या काळात उदंड होतेच, पण आता नव्याने त्यांचे गुणगान करणारे तयार झाले आहेत वाटते!

In reply to by आनंद घारे

चंगेझ खान ह्या व्यक्तीला आख्खे मंगोलिया राष्ट्र खरोखरच मंगोलियाचा संस्थापक मानते. तिथे त्याला जबरादस्त मान आहे. जो मान फ्रान्स मध्ये नेपोलियनला; महाराष्ट्रात शिवाजींना त्याच धर्तीवरचा संस्थापकाचा मान खरोखरच त्याला तिकडे दिला जातो. बाकी तुम्ही जी नावे घेतली त्यातले कुणी एकदम देशाचे कायमचे आयकॉन अजून बनलेले नाहित. पण नादिरशहाचा आधीचा सरदार आणि नंतर त्याच्या बहुतांश साम्राज्याचा वरसदार अहमदशाह अब्दाली/दुर्रानी ह्याला मात्र अफगाणिस्तानात तोच मान आहे. त्याला जणू राष्ट्रनिर्माता मान्तात.

In reply to by मन१

चंगिझ मंगोलियाच काय ८% आशियाचा आद्य पितामह आणि म्हणूनच सर्वात 'सक्सेसफुल' अल्फा मेल आहे. ;) बाकी कोणाचे तसे कर्तृत्त्व कुठे? :P बाकी घारे सरांशी सहमत आहेच.. फक्त हे सम्यक मत इथे- या धाग्यावर - अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता अधिक

In reply to by बाळ सप्रे

त्यांच्या देशाच्या संविधानाशी आपल्याला काय देणे घेणे ? तसे आपल्या देशाच्या संविधानाशी पण कुठे आहे म्हणा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तसे आपल्या देशाच्या संविधानाशी पण कुठे आहे म्हणा.
सहमत...

In reply to by बाळ सप्रे

"राष्ट्रभक्त" ?? संविधानिक आहे का आधी पाहून घ्या !! >>>वाह बाळ साहेब !! आजि म्या धन्य जाहलो ! --------------------------------------------------- धन्योSहं धन्योSहं कर्तव्यं मे न विद्यते क्वचित् ||

हिटलर हा राष्ट्रभक्त होता.. आणि त्याने जो नरसंहार केला तो त्याच्या राष्ट्रप्रेमामुळे हे अजिबात सत्य नाहीये. त्याने सुरूवातीचे जे विजय मिळवले ते धक्का तंत्राचा वापर करून. सारे जण बेसावध होते. जर्मनीने केलेल्या प्रचंड युद्ध तयारीची कानोकान खबर कुणाला नव्हती. इतके की इंग्लंडचे पंतप्रधान चेंबर्लेन हे जर्मन भेटीवर आले असताना त्याना जराही संशय आला नाही. पण सुरूवातीच्या काही नेत्रदीपक विजयां नंतर पराभवांची मालीका सुरू झाली. विशेषतः रशिया आणि अफ्रिका मधे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या त्याच्या अचिव्हमेंटस काही काळापुरत्याच होत्या. १९३९ मधे युद्ध सुरू झाले, आणि साधारण १९४२ नंतर त्याला कुठल्याच आघाडीवर विजय मिळवता आला नाही. ( काही जण म्हणतात हिटलर चे जे युद्धखोर साथी होते जोडल, कायटेल वगैरे त्यांनी बर्‍याच बाबतीत त्याला अंधारातच ठेवले होते.) पहिल्या महायुद्धात तो एक मेसेंजर म्हणून सैन्यात काम करीत होता . पण त्याला एक कलाकार व्हायचे होते. व्हिएना च्या प्रसिद्ध आर्ट्स्कूल ची प्रवेश परीक्षा त्याने दिली त्यात त्याची निवड झाली नाही. त्याच्याकडे काम नव्हते, हाती पैसा नव्हता. त्यावेळी त्याच्या वाचनात ज्यु धर्मियांच्या विरोधातील काही पत्रकं लागली. ती वाचून त्याने त्या लेखकाचे (आत्ता नाव आठवत नाहीये ) सर्वं साहित्य वाचले. ही त्याच्या ज्यु द्वेषाची सुरूवात होती. त्याच्या मागे कसलीही वैचारीक बैठक अथवा अनुभव नाही. त्या काळात जर्मनीतच नाही तर युरोप मधील अनेक देशात ज्यु द्वेष होता कारण ज्यु लोकं हे सावकारी करीत. आणि त्या जोरावर देशातील आर्थिक व्यवस्थेत त्यांचा वरचष्मा असे. तसेच ते ऑर्थोडॉक्स आणि समाजापासून काहीसे वेगळे रहाणारे असे होते. त्यामुळे ज्यु द्वेष पसरवणे अथवा त्याबद्दल भाषण करणे हे लोकमत आपल्याकडे वळवण्याचे आमिष होते. हिटलर ने त्याचा पुरेपुर वापर केला. त्याने सत्ता मिळवण्यासाठी अनेक बर्‍यावाईट तंत्रांचा वापर केला, प्रसंगी आपल्या निष्ठावान मित्रांचा विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहिले नाही. एक म्हणता येईल की जो नरसंहार झाला त्यात अनेक जण सहभागी होते. म्हणजे या पापात बरेच वाटेकरी होते (ज्यांनी शरणागती पत्करल्यावर ही जबाबदारी नाकारली आणि सर्व दोष हिटलरच्या माथी मारले ) पण म्हणून या पापाची तिव्रता कमी होत नाही. हिटलर बद्दल त्याच्या पितृभूमितच तिरस्काराची भावना आहे. आज तेथे कुणीही हिटलर हे अडनाव लावित नाही. त्याच्या नातेवाईकांनी देखिल युद्धानंतर ते नाव सोडून हाईडलर किंवा असेच दूसरे नाव स्विकारले. हेन्री शिरेर हा त्या काळात युद्धवार्ताहार म्हणून काम करीत होता. त्याने लिहिलेले ' राईज अ‍ॅण्ड फॉल ऑफ थर्ड राईश' हे पुस्तक जरूर वाचा. मग हिटलर स्तुतीचा लेख तुम्हाला परत लिहावासा वाटणार नाही.

In reply to by मनीषा

तुम्ही स्वतः The Rise and Fall of the Third Reich हे पुस्तक वाचले आहे का? तसे वाटत नाही. कारण १. मूळातच या पुस्तकावर हिटलरच्या उदात्तीकरणाचा उदंड आरोप होतो. मी स्वत: ते वाचलेले आहे आणि मलाही तसेच वाटले. २. पुस्तकाचे लेखक हेन्री शिरर नव्हे तर विल्यम एल शिरर आहेत.

त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने
धमकी न्व्हे कपटाच्या जोरावर मिळवले असेच मी म्हणेन!

हिटलर राष्ट्रभक्त असेलही पण प्रखर राष्ट्रवादाचे स्तोम माजवून त्याने मानवतेला काळिमा फासणारी जी अघोर कृत्ये केली ती समर्थनीय ठरू नयेत. एका ज्यू छळछावणीतल्या निष्पाप लहान मुलांनी गॅसचेंबरच्या भिंतींवर मरण्यापूर्वी फुलपाखरे काढली होती त्याची छायाचित्रे holocaust संग्रहालयात बघितलेली आहेत. डोळ्यात पाणी आले होते. आणि आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या क्रूर कृत्यात जर्मन समाज उस्फुर्तपणे सहभागी होता. शिक्षित असूनही, आधुनिक मुल्ये मानणारा असुनही, विज्ञाननिष्ठ असुनही हा समाज आंधळेपणाने हिटलरच्या मागे गेला. प्रखर राष्ट्रवाद हि फार भयाण मोहिनी आहे. शिक्षण, विज्ञान, माणुसकी यांना ती पुरून उरते आणि रक्तरंजित इतिहास लिहिला जातो. राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.

In reply to by हारुन शेख

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.
या वाक्याशी संपूर्ण सहमत. कुठ्ल्याही गोष्टीचे आंधळे समर्थन व आंधळा विरोध हे चूकीचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंगजी मी तुमच्या मताशी पुर्ण सहमत आहे. आज अमेरिकेला सर्व बलाढ्य,प्रगत राष्ट्र म्हणतात. पण त्यांनी ही दोन अणुसंहारक ह्ल्ले केले. त्यात निष्पाप लोक नव्ह्ती का मेली? तरी गाता ना अमेरिकेचे गोडवे

जहा सच ना चले वहा झुठ सही, जहा हक ना मिले वहा लुट सही


In reply to by अनिकेतदळवी

अनिकेतभाऊ - मी कधीही कुठेही कुणाच्याही युद्धखेरीचे समर्थन केलेले नाहीये. एखाद्या व्यक्तिच्या अथवा देशाच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणे म्हणजे त्यांच्या वाईट कृत्यांचे समर्थन करणे नव्हे.

In reply to by श्रीरंग_जोशी

exactly श्रीरंग दादा माझं देखील हेच म्हणणं आहे मी हिटलरच्या चांगल्या गुणाचं कौतूक केले आहे त्याच्या वाईट गोष्टींच समर्थन नाही, (काही वाक्ंयातून असा आशय निघत असल्यास क्षमस्व)

In reply to by अनिकेतदळवी

लेखामध्ये माहितीचे संकलन नक्कीच चांगले आहे. परंतु जी सुरूवात आहे त्यात "हिटलरची अमानवी कार्ये काही वेळाकरिता बाजूला ठेवल्यास त्याचे जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न मी करतोय" असे काहीसे लिहिले असते तर थोडे अधिक संतुलन साधले गेले असते. माणसाची थोडी वाईट कामेही त्याच्या चांगल्या कामांवर पांघरूण घालतात अन इथे तर वाईटपणाचा काही अंतच नाही. एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन. अशाच विषयांवर अधिक वाचायला आवडेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

हिटलरची अमानवी कार्ये काही वेळाकरिता बाजूला ठेवल्यास त्याचे जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न मी करतोय
बात हजम नही होती है. त्याची अमानवी कार्ये सोडल्यास खाली शून्य उरते, हे कृपया ध्यानी घ्या. पण तुम्ही चांगली बाजू पहातच आहात, तर वीरप्पन, ओसामा बिन लादेन, सद्दाम हुसेन, जनरल डायर, गझनीचा मोहम्मद, झालेच तर परवाच्या दिल्ली केस मधले आरोपी, यांच्या चांगल्या बाजूंवर लेख येऊ द्या. वाचनोत्सुक आनंदी (गोपाळ)

In reply to by श्रीरंग_जोशी

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी. या वाक्याशी संपूर्ण सहमत. कुठ्ल्याही गोष्टीचे आंधळे समर्थन व आंधळा विरोध हे चूकीचेच. या वाक्याशी संपूर्ण सहमत. - अगदी प्रत्येक वेळी बोटचेप्या मांणुसकीचेही आंधळे समर्थन चुकीचेच.

In reply to by ५० फक्त

अक्षय खन्ना म्हणतो, "तो पाकिस्तानी सैनिक माझ्यासारखा माणूस आहे, मी त्याला का गोळ्या घालू?" त्यावर सन्नी म्हणतो, "जर तू त्याला गोळ्या घातल्या नाहीस तर तो तुला गोळ्या घालेल."

In reply to by पैसा

+१ >> राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी >> ह्म्म्म.. depends.. case to case basis.. माणुसकीची व्याख्या काय? कसाब आणी अफजल ला फाशी द्याल का माणुसकी म्हणुन सोडाल? --------------------- १ म्हणः- ओल्याबरोबर सुकं पण जळतं.. ---------------------

In reply to by यसवायजी

जयंत कुलकर्णी यांच्या जुन्या लेखांमध्ये एक खूपच महत्वाचे ऐतिहासिक उदाहरण आहे. बहुधा रोमेल बाबत. द्वितीय महायुद्धातला जर्मनीचा शूर सेनानी हिटलरच्या विरुद्ध गेल्यावर हिटलरचे दूत त्याच्याकडे जातात व म्हणतात की तू राष्ट्रद्रोह केला आहेस, त्यावर त्याचे उत्तर होते, मी राष्ट्रद्रोह नव्हे हिटलरद्रोह केला आहे केवळ हिटलर (तत्कालिन राष्ट्रप्रमुख असल्याने) म्हणतो तेच राष्ट्रहित हे मी मानत नाही अन हाच माझा गुन्हा... आणखी एक उदाहरण म्हणजे, ग्वांटानामो बे येथील तुरूंगात अमेरिकेने पकडून आणलेल्या संशयितांना ठेवले जाते व अमानवी अत्याचार केले जातात तेही राष्ट्रहिताच्या नावाखाली. इथे माणूसकी महत्वाची. कदाचित साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पूरोहित यांच्यावरचा खटला पूर्णत्वाला पोचला अन ते निर्दोष सिद्ध झाले तर तथाकथित राष्ट्रवादासाठी माणूसकीचा बळी दिला गेला असे खेदाने म्हणावे लागेल. सीमेवर सीमेपलिकडून घुसखोरी करणार्‍यां सशस्त्र अतिरेक्यांना यमसदनी धाडणे हे राष्ट्रहिताचे व वाट चुकून सीमेपलिकडला एखादा मेंढपाळ आल्यास त्याला जीवे न मारता संपूर्ण चौकशीअंती परत पाठवणे हे माणूसकीचे. सीमेवर असे प्रसंग नक्कीच येतात जेव्हा या दोहोंमध्ये नेमका निर्णय (बरोबर वा चूकीचा) न केल्यास उशीर होऊन निर्णय न घेणार्‍याचा जीवही जाऊ शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

सगळी उदाहरणे पटली. काही निर्णय डिप्लोमॅटिक असावेत. बांग्लादेशातल्या बर्‍याच जणांना माणुसकीच्या नावावर बॉर्डर क्रॉस करु दिली जाते. मी त्यासाठीच case to case basis म्हणालो.

In reply to by यसवायजी

बांग्लादेशी निर्वासितांना ७१ युद्दापूर्वी शरणागती दिली गेली ते माणसकीच्या नावावर होते. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांना येऊ दिले गेले किंवा जात आहे तिथे माणूसकीचा मुद्दा कुणी वापरला? ते लोक अवैधरित्या येतात अन सीमेवरील अन मग सीमेअलिकडील भ्रष्ट व्यवस्थेमूळे त्यांना निवांतपणे राहणे शक्य होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी ७१ पुर्वीचं नाही, सध्याचं सांगतोय. (माफ करा आता लिंक उपलब्ध नाही). पण अजुनही कुणाची दादीमां शेवटच्या घटका मोजतिये असं थोडा रड्वेला चेहरा करुन सांगीतलं, की सोडलं जातय. (अर्थातच पैसे घेउन.. पण सॉफ्ट कॉर्नर दाखवतात.) कारण बर्‍याच जणांचे नातेवाईक बॉर्डरच्या आस्-पास राहतात.

In reply to by श्रीरंग_जोशी

हे पेड प्रतीसाद आहेत काय्?म्हणजे तुम्हाला संस्थळावर पैसे देउन वावरायला सांगीतले गेले आहे काय? साध्वीला तुम्ही दोषी मानता काय?वरच्या तुमच्या उल्लेखात तस मला तरी वाटतय. मालेगावात जेथे बाँबस्फोट झालेत त्या (इस्तेमाच्या)ठिकाणी चुकुनही दुसर्या समाजाचा माणुस जाउच शकत नाही.मालेगावात बहुत ऐसे जागा आहेत तिथे पोलीससुद्धा जायला घाबरतात.

In reply to by हारुन शेख

हिटलरचे उदात्तीकरण नकोच
१००% सहमत. हिटलर हा विकृत नेता होता. साठ लाख निष्पाप ज्यूंना, सत्तर लाख निष्पाप जिप्सींना ज्याने मारले त्याची कुठलिही गोष्ट अगदी राष्ट्रभक्ती देखील आदर्श नाही असेच म्हणेन.
राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.
प्रसंगानुसार ठरते असे वाटते. एक उदाहरण म्हणून... ज्या अफझल गुरूने स्वतः मरताना देखील शेवटी लिहीलेल्या पत्रात "I request my family that they should not feel any remorse for me rather they should respect this honor," असे म्हणतो, त्याबाबतीत माणूसकी वगैरे काही दाखवायचा संबंध येत नाही.

माझं निरीक्षण - तरूण वयात बर्‍याचशा लोकांना हिटलर हा देवसमान किंवा हिरो वाटतो.. पण नंतर विचारांच्या कक्षा रूंदावल्या की वास्तवाचं भान येतं. काही वर्षांपूर्वी मी अ‍ॅडॉल्फ आईशमान वरचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात असा उल्लेख आढळला की ज्यूंच्या बाबतीत सगळे अधिकार हिटलरने आईशमानला दिले होते. म्हणजे रूढार्थाने त्यांना मारावं की जिवंत ठेवावं, आणि मारायचं असल्यास कोणत्या पद्धतीने मारावं हे सगळे निर्णय आईशमान घ्यायचा म्हणे. कोणी याबद्दल जास्त माहिती देऊ शकेल काय?

राष्ट्र म्हणजे काय ? कशापासून बनतं राष्ट्र ? नागरिक हे राष्ट्राचा भाग असतात का, की राष्ट्र म्हणजे फक्त दगड धोंडे आणि झाडं एवढंच? स्वतःच्याच देशाचे दोन अडिच लाख* लोक फक्त वर्णवर्चस्वाच्या मूर्ख मुद्द्यापाई मारून टाकणारा माणूस राष्ट्रभक्त कसा काय असू शकेल ?! (* ही दोन अडीच लाख संख्या फक्त जर्मनी मधली आहे जगभरामध्ये केलेल्या ज्यूंच्या हत्यांची संख्या ६ मिलियनच्या आसपास जाते, असो)

In reply to by कवितानागेश

+२

अर्ध्या हळकुंडान्नी हल्ली मिपा पिवळे पडायला लागले आहे. अक्कल आम्हाला फार आहे असे म्हणणे नाही पण ती नाही म्हणून आमचे 'म्हणणे' हि फार नसतेच.

काही लोकांना असे लेखन झेपत नाही. का ते कळत नाही. पहिलीत शिकलेल्यापेक्षा वेगळे काही ऐकले की बुद्धिला अपचन होते त्यांच्या असो धागा माहीतीपूर्ण आहे खूप नवी माहीती मिळाली ४ आणि ५ वा मुद्दा पटला आज जर्मनीच्या प्रगतीचे एक कारण हिटलरचे योगदान हे आहे. --

करण्यार्‍याचे हात दिसतात, सपोर्टर्स नामानिराळे राहातात. हिटलरने नृशंस हत्याकांड करवले (त्याला झोप कशी येत असेल कोण जाणे) म्हणुन त्याच्यावर इतकी आगपाखड. त्याच हिटलरच्या गळ्यात गळे घालुन छळछावण्यांना मनोरंजनांचे अड्डे समजणार्‍या मुस्लीम कट्टरपंथी वहाबी धर्मगुरु/राजकारण्यांना मात्र वेगळा न्याय. तोच हिटलर युद्ध सुरु होण्यापुर्वी अगदी जवळचा मित्र होऊ शकतो का हे चाचपडणारे चर्चील व इतर युरोपीय नेते तर जगभरात गौरवलेले. साठ लाख निष्पाप लोकांच्या मृत्युला (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष )जबाबदार हिटलर राक्षसी, पण करोडो लोकांचे प्राण घेणारे पहिले महायुद्ध पेटवणारे ज्यु बँकर्स मात्र कोणाच्या गावीही नाहि. हिटलर काजळापेक्षाही काळा. त्याचे रक्तलांछीत हात कधीच धुवुन निघणार नाहि. इतर कृरकर्मे, जे कदाचीत हिटलरच्या बरोबरीने/हिटलरपेक्षा जास्त ओंगळवाणे वागले त्यांना अंधारात गुडुप होण्याचा फायदा. हिटलर आणि मोदींची तुलना करणे हे बौद्धीक दिवाळखोरीचे आणखी एक अघोरी लक्षण. धन्य आहेत विचारवंत. अर्धवटाराव

In reply to by अर्धवटराव

१० मे १९४० ला चर्चिल ब्रिटीश पंतप्रधान झाला तेव्हा दुसरं महायुद्ध आधीच पेटलं होतं. तिशीच्या दशकातच चर्चिलने 'Mein Kampf' वाचलं होतं आणि हिटलर भयंकर असू शकतो याची कल्पना आली होती. ऑस्ट्रीया, चेकचा जर्मन भाग वगैरे चेंबरलेनच्या (तत्कालिन, चर्चिलच्या आधीचे ब्रिटीश पंतप्रधान) नाकाखालून हिटलरने गिळला तेव्हा चेंबरलेनच्या पॉलिश्यांवर टीका करण्यात चर्चिल फार पुढे होता. चेंबरलेननाही युद्ध टाळायचं होतं म्हणून त्यांची सामोपचाराची भूमिका होती. ब्रिटन विरूद्ध जर्मनी अशी युद्धाची वेळ आली तेव्हा चेंबरलेन आणि चर्चिल दोघांनी एकमेकांना सहकार्य केलंच, पण चर्चिल सुरूवातीपासूनच हिटलर आणि नात्झींवर टीका करत असे. रश्यन स्तालिनचा पाठींबा मिळवण्यासाठी चेंबरलेन, फ्रेंच आणि हिटलर फार उत्सुक होते. तिघंही कम्युनिझमला नावं ठेवणारे! त्या स्तालिननेही पुढे उजेड पाडलाच. महायुद्ध सुरू असतानाच स्तालिनने पोलंडमधेही दिवे लावलेच. कातिनचं हत्याकांडही पुरेसं कुप्रसिद्ध आहे. गांधी आणि भारतातल्या तत्कालिन दुष्काळाबद्दल चर्चिलचे अनुदार उद्गारही कुप्रसिद्ध आहेत, पण त्याबद्दल स्तालिन, चर्चिल किंवा (फॉर द्याट म्याटर) वहाबी धर्मगुरूंचंही कोणी कौतुक केल्याचं माझ्या वाचनात नाही. हिटलरवर टीका करण्यात "मजा" येते कारण त्याला आदर्श मानणारे, आणि त्याला आदर्श मानणार्‍यांना आदर्श मानणारे आजूबाजूला चिक्कार सापडतात. कोणी कम्युनिष्ठ सापडला तर स्तालिन, लेनिन किंवा गेलाबाजार केजीबीने पूर्व केजीबी हेरांना मारण्याची यादी काढता येतेच. बाकी चालू राहिलच. मी तसं वेगळं म्हणायची आवश्यकता नाही.

In reply to by अर्धवटराव

हिट्लर् च्या मैत्रीसाठी चर्चिल अजिबात आसुसलेले किंवा चाचपदत वगैरे नव्हते. हिट्लर च्या अतिरेकी विस्तारवादी राष्ट्रवादाचे भविष्यातील विनाशकारी परिणाम सर्वांत आधी चर्चिल च्याच लक्षात आले.आणि त्यांनी चेंबर्लेन च्या मवाळ धोरणाचा कडाडून विरोध-अगदी एकांड्या शिलेदाराप्रमाणे विरोध-केला. चेंबर्लेन एक लांब दांड्याची छत्री बरोबर बाळगत.आपल्या इंदिरा गांधींच्या नाकाप्रमाणे ही छत्री हा तत्कालीन व्यंगचित्रकारांचा एक आवडता विषय बनला होता.छत्रीधारी चेंबर्लेन व त्यासोबत चर्चिलची एखादी टोकदार टिपणी अशी व्यंगचित्रे त्या काली प्रसिद्ध होत.चेम्बर्लेनची रेवडी उडवण्यामागे त्याला हिटलरचा न कळलेला धोका हेच मुख्य कारण चर्चिल च्या दृष्टीने होते. आता धागालेखकासाठी: मुख्य लेखातले आणखी एक वाक्य खटकले. 'हिट्लरची चांगली बाजू लोकांसमोर यावी म्हणून'...वगैरे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाची बीजे,हिट्लर चा आक्रमक राष्ट्रवाद,नात्सि तत्त्वज्ञानाचा उदय,ऑ‍ॅटोबान,क्रप कंपनीला दिलेला जित राष्ट्रांमध्ये मुक्तहस्ते लुटीचा (तिथल्या कंपन्या सक्तीने ताब्यात घेण्याचा)परवाना- यात स्कोडाही लुटली गेली- ,आपल्याच वेषांतरित सैनिकांकडून लुटुपुटीच्या लढाईत आपलेच सीमेवरचे ठाणे शत्रूराष्ट्राने ताब्यात घेतल्याची आवई उठवून दुसर्‍या महायुद्धाची केलेली सुरुवात ह्या सर्व बाजू लोकांना माहीत नाहीत असे आपण समजता की काय? दुसरे महायुद्ध,हिट्लर चा उदय,त्याची कार्यपद्धती इतकेच नव्हे तर त्याचे मनोवैज्ञानिक विश्लेषण याविषयी भरपूर लिहिले गेले आहे.हिट्लर हे जगाला पडलेले एक भयानक दु:स्वप्न होते. ते दु:स्वप्नवत यातनाकांड अल्पकाळात संपले आणि अतिरेकी राष्ट्रवादाची गुंगी उतरून पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास झाला याबद्दल नियतीचे आभारी राहिले पाहिजे.

In reply to by राही

हिट्लर हे जगाला पडलेले एक भयानक दु:स्वप्न होते.
सहमत
आणि अतिरेकी राष्ट्रवादाची गुंगी उतरून पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास झाला
याबद्दल साशंक आहे.

In reply to by राही

"हिट्लर् च्या मैत्रीसाठी..कारण चर्चिल च्या दृष्टीने होते" >> जर्मन आणि ब्रीटीश शक्ती, खास करुन आरमार, एकत्र आले तर जगात त्याला प्रत्युत्तर नसेल हा चर्चीलचा होरा होता व त्यासाठी शक्यतोवर हिटलरशी जुळवुन घ्यायचं अशा मताचे चर्चील होते, असं मी नक्की वाचलय. शिवाय तुम्ही म्हणता तसं चर्चीलला हिटलरच्या साम्राज्य विस्ताराची भिती होती त्याच्या अमानुष ज्यु द्वेषाची नाहि. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

... चर्चीलला हिटलरच्या साम्राज्य विस्ताराची भिती होती त्याच्या अमानुष ज्यु द्वेषाची नाहि.
म्हणजे यातून नक्की काय सिद्ध होतं? १. चर्चिल आणि हिटलर यांच्यात मित्रवत संबंध होते. २. चर्चिलकडून प्रेमभावना होते, हिटलरकडून वैर होतं. ३. चर्चिलकडून वैरभावना होती, हिटलर चर्चिलच्या प्रेमात होता. ४. चर्चिल आणि हिटलर दोघांनाही एकमेकांबद्दल वैरभावनाच होती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

५)यापैकी काहिच नाहि. क्रौर्याच्या बाबतीत हिटलर आणि वर मेन्शन केलेली महामंडळी यात फार डावं-उजवं करता येत नाहि हा सिंपल मुद्दा. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

पहिल्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात जर्मनीविरुद्ध तिरस्काराची भावना ब्रिटिशांमध्ये इतकी तीव्र होती की खुद्द ब्रिटिश राजघराण्याने आपला प्रकर्षाने जर्मन वारसा दर्शवणारे झाक्से-कोबर्ग नाव झिडकारून वुइंड्सर हे नाव धारण केले.बॅटनबर्ग सारखे मातबर सरदारही त्यांचे अनुकरण करीत माउंट्बॅटन बनले. अशा परिस्थितीत राजनिष्ठ चर्चिल जर्मनांशी हातमिळवणी करण्याची स्वप्ने पाहील हे खरे वाटत नाही. एखाद्या इतिहासकाराने तसे लिहिले असेलही पण बहुसंख्य इतिहासकार काय म्हणतात ते पाहिले पाहिजे. एखाद्या स्टॅन्ली वॉल्पर्ट्ला नेहरूंमध्ये समलिंगी स्वभाव जाणवला तरी इतर तसे मानत नाहीत. उलट नेहरू-एडविना संबंधांतील तथ्य बहुतेकांनी मान्य केले आहे. गांधी जवळच्यांना 'काय,आज तुझा कोठा कसा काय आहे?(हाउ आर योर बॉवेल्स टुडे)'असे विचारीत यावरून गांधींना विकृत मनोवृत्तीचे ठरवण्याचे धाडसही (बहुधा) याच इतिहासकाराने केलेले आहे. कोठा साफ राखणे या क्रियेला भारतीय लोक परंपरेने फार महत्त्व देतात हे मलावरोधाची संस्कृती असणार्‍या त्या पाश्चिमात्य गृहस्थाला ठाऊक असणे शक्य नाही. सरस्वती नदीच्या बाबतीतही एक अल्पमतातील इतिहासतज्ज्ञ गट हेलमंड नदी हीच वेदकालीन सरस्वती असे मानतो. अशी मतमतांतरे असायचीच. सध्या मान्य असलेले मतही पुढे जाऊन अमान्य होणारच नाही असे नाही. सध्याचा सर्वसाधारण मतप्रवाह लक्षात घेतला पाहिजे.

In reply to by राही

महायुद्धाच्या अखेरी किंवा त्यानंतर शत्रुराष्ट्रांप्रती उफाळुन आलेली घृणा राजकीय/आर्थीक फायद्या-तोट्यांवर आधारलेली आहे, माणुसकीच्या/करुणेच्या पोटी नाहि. साम्राज्य(आर्थीक, सामरीक, राजकीय)हितासाठी प्रसंगी जागतीक शांतता धोक्यात घालण्याची, महायुद्धे लढण्याची महासत्तांची वृत्ती हिटलरच्या वंशद्वेषापेक्षा फारशी धवल नाहि. (त्या वृत्तीत आजही बदल झालेला नाहि) अर्धवटाराव

In reply to by अर्धवटराव

मुद्दा चर्चिलने हिट्लरशी हातमिळवणीची इच्छा धरली असावी की नसावी हा होता. राजनिष्ठ चर्चिल कडून तसे घडणे शक्य नव्हते असे सांगण्याचा आणि त्याचे कारण देण्याचा प्रयत्न प्रतिसादात केला होता.

In reply to by राही

साम्राज्यवादी ब्रीटीश राजनेता चर्चील हिटलरशी देखील हात मिळवणी करु बघत होता हा माझा स्टँड अजुनही कायम आहे. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

अमुक एका धर्माचा द्वेष करणे = फॅसिझम. मोदी = फॅसिस्ट. अर्धवटराव, तुम्ही जर कुणा धर्माचा द्वेष करता, तर तुम्हीदेखिल फॅसिस्टच. अन फॅसिझमचा अतिरेक हा फक्त जिनोसाईड अन कत्तलींत होतो. मोदी नामक एका मनुष्यावर 'आजपर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही' म्हणून तो 'क्लीन' असे बोलताना, भारतातल्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर देखिल गुन्हे 'सिद्ध' झालेले नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरता का तुम्ही?
हिटलर आणि मोदींची तुलना करणे हे बौद्धीक दिवाळखोरीचे आणखी एक अघोरी लक्षण. धन्य आहेत विचारवंत.
अजिब्बात नाही. ते विचार करून बोलतात म्हणूनच त्यांना विचारवंत तुम्ही देखिल म्हणता. तुम्हाला ती दिवाळखोरी वाटते हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांवर बांधून घेतलेल्या झापडांचे ढळढळीत लक्षण आहे. अन अशीच झापडे बहुसंख्य जर्मन लोकांनी अन सुरुवातीच्या काळात अगदी ब्रिटीशांनीही बांधून घेतली होती, हा इतिहास आहे. असो.

In reply to by आनंदी गोपाळ

हिटलर आणि मोदींची तुलना करणे हे बौद्धीक दिवाळखोरीचे आणखी एक अघोरी लक्षण. धन्य आहेत विचारवंत. अर्धवटाराव -रेडि टु थिंक
हे कोट कसे काय आले नाही ते नकळे.

In reply to by आनंदी गोपाळ

अमुक एका धर्माचा द्वेष करणे = फॅसिझम.
तर मग डावे विचारवंत, कम्युनिस्ट आणि त्यांच्या सारखाच विचार करणारे स्युडोसेक्यूलर्स हे सर्व फॅसिस्ट आहेत. शिवाय तुमच्या व्याख्येप्रमाणे मोदी हे द्वेष करतात असे कुठे दिसलेले नाहीत.
मोदी नामक एका मनुष्यावर 'आजपर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही' म्हणून तो 'क्लीन' असे बोलताना, भारतातल्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर देखिल गुन्हे 'सिद्ध' झालेले नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरता का तुम्ही?
ज्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर गुन्हे सिद्ध झालेले नाहीत त्यांच्या त्याच (कोर्टात असलेल्या) गुन्ह्यांना माध्यमे आणि स्युडोसेक्यूलर्स रोज उगाळत बसत नाहीत. पण मोदींच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या टीस्टा सेटलवाडने ह्यात स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली, त्या टीस्टा सेटलवाडने अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या हे नंतर जगजाहीर झाले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत हा येथे प्रश्न नाही, ते जर दोषी असले तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळूंदेत पण कोण खोटे बोलून विचहंट करणारे सर्व अतिरेक करत आहेत हा मुद्दा आहे.

In reply to by आनंदी गोपाळ

>>अमुक एका धर्माचा द्वेष करणे = फॅसिझम. -- चूक. या न्यायाने ९०% मुस्लीम जगत फॅसीस्ट होते.. ते ही कुराण सर्टीफाईड फॅसीस्ट (ही थोडी अतीशयोक्ती आहे, मान्य). मला तुमची फॅसीझमची व्याख्या क्ळु देत. >>मोदी = फॅसिस्ट. -- परत चुक. भारतात (जागतीक पातळीवर देखील म्हणता येईल... पण सध्या भारताबद्दल मर्यादीत ठेवतो) धार्मीक द्वेष का आणि कसे आलेत याचा अर्थ-राज्य-न्याय-समाज शास्त्राने एकदा अभ्यास करुन बघा...अशी फॅसीस्ट लेबलं कुणाला लावण्याआधी शंभरदा विचार कराल. मोदीं आगमनापुर्वी धार्मीक सलोख्याच्या वातावरणात नांदणारं गुजरात एक मोदी आल्यावर अचानक धार्मीक कत्तलींचं केंद्र बनलं, असं काहिसा विचार करत असाल तर तुम्ही गुजराथी लोकांवर अत्यंत अन्याय करत आहात. (तसंही असा अन्याय टीस्टा मॅडम सारख्या मंडळी जाणुन बुजुन, चवीने करतात म्हणा) >>अर्धवटराव, तुम्ही जर कुणा धर्माचा द्वेष करता, तर तुम्हीदेखिल फॅसिस्टच. -- नो कमेण्ट्स. >>अन फॅसिझमचा अतिरेक हा फक्त जिनोसाईड अन कत्तलींत होतो. -- हिरोशीमा, नागासाकी, इराक, अफगाणीस्तान... जिनोसाईडची किती रुपं वर्णावी? >>मोदी नामक एका मनुष्यावर 'आजपर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही' म्हणून तो 'क्लीन' असे बोलताना, भारतातल्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर देखिल गुन्हे 'सिद्ध' झालेले नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरता का तुम्ही? -- तसं असेल तर मग भारतातले भ्रष्ट राजकारणी मोदी नामक मनुष्यापेक्षा कितीतरी जास्त घातक, गलीच्छ आणि राक्षसी वृत्तीचे झाले. गुजरात दंगलींमध्ये हजारोंच्या कत्तली झाल्या, पण या भ्रष्ट राजकारण्यंनी करोडो लोकांना हालहाल होऊन मरायची परिस्थीती निर्माण केली, त्यांच्या शरीराचीच नव्हे तर अक्ख्या भविष्याची नरकमय वाट लावली. मोदींवर फॅसीझमचे आरोप करणारी लेखणी जर प्रामाणीक असेल तर त्या लेखणीला धारण करणारे हात भ्रष्ट राजकारण्यांचा गळा दाबायला चिडुन उठले पाहिजेत. पण तसं दिसत नाहि. हि हिपॉक्रसी आहे डॉक्टर. >>तुम्हाला ती दिवाळखोरी वाटते हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांवर बांधून घेतलेल्या झापडांचे ढळढळीत लक्षण आहे. -- अर्थात ती बौद्धीक दिवाळखोरी आहे. मोदी नामक कावीळ झाल्याचा तो परिणाम आहे, म्हणुन सर्व पिवळे दिसते आहे. अन्यथा भविष्यात भारताला काय दिवस बघावे लागणार आहेत याची झलक मुंबईच्या एका मैदानावर काहि महिन्यांपूर्वी रझा अ‍ॅकॅडमीने दाखवली आहे. अफझल गुरुच्या फाशी नंतर भारत मुर्दाबादच्या घोषणा अलीगड विद्यापीठावर निघालेल्या मोर्च्याने दिल्या, त्याही अजुन ताज्या आहेत. त्याकडे संपूर्ण दूर्लक्ष्य करण्याची झापडबंद दुर्बुद्धी विचारवंत दाखवतेच ना. भारतातले धार्मीक अंतर्प्रवाह कसे आहेत, त्यांचा इतीहास काय, राजकारणावर त्याचा कसा प्रभाव पडला, सध्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिमाणांवरुन त्यात भविष्यात काय फरक पडेल... याचा कुठलाही विचार न करता मोदीला हिटलरच्या वळाचणीला उभा करणे हे अक्षरशः बौद्धीक दिवाळाखोरीचे लक्षण आहे (ही दिवाळाखोरी जाहीर करायला देखील फार विचार करावा लागतो, हाच काय तो विचारवंतपणा) >>अन अशीच झापडे बहुसंख्य जर्मन लोकांनी अन सुरुवातीच्या काळात अगदी ब्रिटीशांनीही बांधून घेतली होती, हा इतिहास आहे. -- प्रथम विश्वयुद्धानंतर गाळात गेलेली जर्मन जनता आणि अत्यंत व्यवहारी ब्रीटीश व इतर तत्कालीन साम्राज्यशासकांना मोदी समर्थकांच्या लायनीत उभं केलेलं बघुन फेफरं भरलं मला. तत्कालीन युरोप-अमेरीका साम्राज्यशाही व सद्यस्थीतीतली भारतीय राज्यव्यवस्था (लोकशाही, व समाज व्यवस्था सुद्धा) यांचा तौलनीक अभ्यास करा एव्हढं सुचवावसं वाटतं. असो. मुस्लीमांना सतत मायनॉरीटी म्हणुन भिती दाखवत व्हॉटबँकेचं गलिच्छ राजकारण अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासुन चालु आहे. भविष्यात देखील त्यात बदल व्हायचे चान्सेस नाहित. ओढुन ताणुन केलेली मोदी-हिटलर समानता देखील त्याच राजकारणाचा भाग. त्याला इलाज नाहि. अर्धवटराव

>>"१० मे १९४० ... नात्झींवर टीका करत असे" फॉर दॅट मॅटर एक हर मॅजिस्टी आणि दुसरे आपण स्वतः सोडुन चर्चील कोणावर टीका करत नव्हता?? कॅमरून साहेब आता आता जालियनवाला बाग हत्याकांडावर हळहळ वगैरे व्यक्त करताहेत, पण असल्या (याच म्हणुन नाहि) घटनांचे पडासाद राणिच्या देशात उमटत असताना चर्चील साहेबांनी चकार शब्द काढल्याचे माझ्या तरी वाचनात नाहि. राजकीय, आर्थीक हितसंबंध दिसत असताना टीकापात्र हिटलर तेव्हढा काहि कोणाला झोंबला नाहि. स्तालीन, चर्चील, वहाबींच्या कृष्ण्कृत्यांचं कौतुक तसंही डायरेक्ट वाचायला मिळणार नाहिच. या लेखात देखील हिटलरच्या देशप्रेमाचं कौतुक केलं आहे, ज्यु हत्याकांडाचं नाहि. बाकी स्तालीन आणि इतर रशीयन नेत्यांबद्दल कौतुक ऐकले नाहि म्हणाल तर तुमचा कम्युनीस्टांशी फारसा संवाद झालेला दिसत नाहि असं म्हणावं लागेल. वेळीच अमेरीकेची मदत मिळवुन हिटलरला रोखणारा हिरो चर्चील स्वतंत्र भारताच्या फुटीर भविष्याबद्दल कसं पर्फेक्ट आकलन करायचा याच्या चर्चा याची देही याची डोळा भरपूर ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत. वहाबींचं कौतुक सभ्य युरोपीय, अमेरीकन माध्यमांमधुन दिसुन येणार नाहि... त्याकरता भारताच्या थोडं अंतरंगात डोकाऊन बघावं लागेल... किर्तनकारांची मांदीयाळी दिसेल. अमानुषतेची शंभरी गाठणारा हिटलर टिकाकारांच्या पायताणाखाली आला पण याच परिक्षेत शंभर नाहि पण ८५, ९० मार्कं मिळवणारे तत्कालीन (आणि नंतरचेही) राज्यकर्ते आपापले भाटांचे कंपू अगदी व्यवस्थीत सांभाळुन राखु शकले हे वास्तव आहे. अवांतरः गोळवलकर गुरुजींना (आणि सो कॉल्ड पाठीराख्यांना) हिटलरच्या ज्यु हत्याकांडाचे कौतुक होते, आदर्श होते, अशा आशयाचे विधानं वाचुन पहिले खुप हसलो... चश्म्यांचं दुकान १२ महिने २४ तास खुलं असतं याची खात्री पटली. असो. चालायचच. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

+१००००० याला,-- अमानुषतेची शंभरी गाठणारा हिटलर टिकाकारांच्या पायताणाखाली आला पण याच परिक्षेत शंभर नाहि पण ८५, ९० मार्कं मिळवणारे तत्कालीन (आणि नंतरचेही) राज्यकर्ते आपापले भाटांचे कंपू अगदी व्यवस्थीत सांभाळुन राखु शकले हे वास्तव आहे.

In reply to by अर्धवटराव

एक प्रयत्न करते, तुमच्या तर्काप्रमाणे विचार करण्याचा. काही दिवसांपूर्वीच मिपावर अरूंधती रॉयवर आगपाखड करणारा लेख आला होता. तिथे तुमचा रॉयबाईंवर टीका करणारा प्रतिसाद दिसला नाही. म्हणजे तुम्ही नक्कीच रॉयबाईंचे भाट असणार. (मी रॉयबाईंवर अन्य धाग्यात दोनेक दिवस आधीच टीका केली होती, माझे हात स्वच्छ आहेत.) ---- आता पुन्हा माझ्या पद्धतीनेच विचार.
वेळीच अमेरीकेची मदत मिळवुन हिटलरला रोखणारा हिरो चर्चील स्वतंत्र भारताच्या फुटीर भविष्याबद्दल कसं पर्फेक्ट आकलन करायचा याच्या चर्चा याची देही याची डोळा भरपूर ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत. वहाबींचं कौतुक सभ्य युरोपीय, अमेरीकन माध्यमांमधुन दिसुन येणार नाहि... त्याकरता भारताच्या थोडं अंतरंगात डोकाऊन बघावं लागेल... किर्तनकारांची मांदीयाळी दिसेल.
संबंध काय? हिटलर वाईट होता म्हणजेच बाय डीफॉल्ट चर्चिल, चेंबरलेन, स्तालिन, वहाबी, जॉर्ज बुश, टोनी ब्लेअर, डेव्हीड कॅमरून, अरूंधती रॉय, अफजल गुरूला घाईघाईत फाशी देणारे, अरिंदम चौधरी, राम जेठमलानी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात असं कोणीही म्हटल्याचं मला तरी दिसलेलं नाही. अमका-फलाणा तस्संच करतो म्हणून त्याचा जाब मला किंवा इथल्या अन्य प्रतिसादकांना विचारण्यामागचा किंवा त्याबद्दल जबाबदार मानण्यामागचा तर्क, विचार इ. काय ते समजेल का? हे सगळं त्या कीर्तनकारांना सांगा; इथे कोणी काही असं बोललंय का? (अरूंधती रॉय किंवा दिग्विजय सिंग काही बरळले तर त्याचा जाब काय आशिष नंदी किंवा योगेंद्र यादवांना विचारणार का?) धागा हिटलरबद्दल आहे, तर लगे हाथ हिटलरच्या शत्रूंचीही पापं मोजा असं होईलच असं नाही. आणि हिटलरच्या शत्रूंची पापं मोजली नाहीत म्हणून लगेच हिटलर गरीब-बिचारा वगैरे होत नाही. "जो दुसर्‍यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला". तेव्हा दुसर्‍यांवर विसंबण्यापेक्षा तुम्हीही त्याबद्दल धागा, प्रतिसाद लिहा. यथामती बाकीचे वाचक, प्रतिसादक लिहीतीलच.
हिटलरच्या देशप्रेमाचं कौतुक केलं आहे, ज्यु हत्याकांडाचं नाहि.
पहिले सहा मुद्दे तर चक्क आक्रमक युद्धखोरी आहे. याला राष्ट्रप्रेम म्हणत असाल तर आपल्या व्याख्या फारच वेगवेगळ्या आहेत. या लेखात सक्तीच्या लष्करभरती/शारीरिक शिक्षणाचंही कौतुक केलेलं आहे. अशी सक्ती माझ्या मते टीकार्हच आहे. (नशीब भारतात असलं काही होत नाही.) आणि बरंच काही अपूर्ण माहितीवर आधारितही आहे. पण ज्यू, पोलिश, जिप्सीं, समलैंगिकांचं हत्याकांड या सगळ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाईट आहे म्हणून त्याच्या नावाने प्रचंड शंख होतो. (त्यातही पोलिश आम जनता, ख्रिश्चनही, जिप्सी आणि समलैंगिकांवर त्याने केलेले अत्याचार एवढ्या उच्चरवात आळवले जात नाहीत.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"काही दिवसांपूर्वीच...हात स्वच्छ आहेत.)" >> याचा माझ्या विचारसरणीशी काय संबंध? तुम्हाला काय विचारसरणी दिसली मला अजीबात कळलं नाहि. "अमका-फलाणा तस्संच करतो म्हणून त्याचा जाब मला किंवा इथल्या अन्य प्रतिसादकांना विचारण्यामागचा किंवा त्याबद्दल जबाबदार मानण्यामागचा तर्क, विचार इ. काय ते समजेल का? हे सगळं त्या कीर्तनकारांना सांगा; इथे कोणी काही असं बोललंय का?" -- तुम्ही हे वैयक्तीक का घेताय? तुम्हाला कोणी भाट म्हटलं? हिटलर व तत्कालीन राजकीय नेत्यांसंदर्भात मी जी काहि वाचलं, ऐकलं, त्याचा गोषवारा म्हणुन मी सगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. हिटलरशिवाय इतर कुठल्या युरोपीय नेत्याचा उल्लेख या चर्चेत आलेला नाहि हे मलाही स्वच्छ दिसतय. >>पहिले सहा मुद्दे तर चक्क आक्रमक युद्धखोरी आहे. याला राष्ट्रप्रेम म्हणत असाल तर आपल्या व्याख्या फारच वेगवेगळ्या आहेत. -- हिटलरच्या देशप्रेमाचा दावा धागाकर्त्याने केला आहे, मी नाहि. आता इथे म्हणुन सांगतो, कि हिटलर फक्त महत्वाकांक्षी होता, त्याला देशाप्रती प्रेम बीम काहि नव्हतं असं मला तरी वाटत नाहि. असो. चर्चा उगाच वैयक्तीक वळण घेत आहे. मी इथेच थांबतो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुम्ही हे वैयक्तीक का घेताय? तुम्हाला कोणी भाट म्हटलं?
स्वारी. एस डबल ओ आर ई. वैयक्तिक अजिबात घेतलेलं नाही. (अगदी माझं नाव घेऊन किंवा माझ्या प्रतिक्रियेला प्रतिप्रतिक्रिया लिहीताना लोकांनी व्यक्तिगत आरोप केले तरी मला फक्त लोकांचं माझ्यावर असणारं प्रेमच दिसतं.) माझ्या प्रतिसादातली वाक्य उद्धृत करून पुढे भाट, कीर्तनकार अशा संज्ञा आल्यामुळे "संबंध काय?" असा प्रश्न विचारला. (त्याचं उत्तर मिळालेलं नाही.) माझं वाक्य उद्धृत न करता लिहीलं असतंत तर संबंध लावण्यासाठी दुसरी बाजूच नसती. किंवा तुम्ही अरुंधती रॉय यांच्यावर टीका न करण्याचा विषयही मी काढला नसता. --- स्वगतः अमक्यावर टीका केलीत तर तमक्यावरही करा अशा प्रकारचे प्रतिसाद देऊन नक्की काय साधतं कोण जाणे? अभिव्यक्तीस्वातंत्र्यात एखाद्यावर टीका न करण्याचंही स्वातंत्र्य आहे. माहिती नाही किंवा अन्य काही कारणांसाठीही गप्प बसण्याचं स्वातंत्र्य सामान्यांना आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यातली माणसं मरत असताना काहीही न करण्याचं स्वातंत्र्य नसतं, पण सामान्य असण्याच्या पावरमुळे हे स्वातंत्र्य मिळतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडं विषयांतर होईल, पण डीटेलमध्ये सांगतो. विज्ञानाने पारंपारीक समजुतींचा पर्दाफाश करत ज्ञानाची अजस्त्र कवाडे खुली केली ति बघुन दिपून जायल होते. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात वैज्ञानीक प्रगतीने प्रचंड स्पीड पकडली होती. मनुष्यकल्याणाचा राजमार्ग दिसत असताना त्याच विज्ञानाचा आधार घेऊन माणासाने अत्यंत विनाशक अशी महायुद्धे का लढली हा प्रश्न मला फार सतवायचा. थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आलं कि विज्ञानाची गोडी तत्कालीन राज्यकर्त्यांना त्यांच्या पारंपारीक साम्राज्यवादी भुमीकेपासुन हटवु शकली नाहि. त्याकाळात असा एकही लीडर झाला नाहि ज्याने विश्वशांती करता आपल्या राजकीय महत्वकांक्षेला मुरड घातली. किंबहुना आहे त्या शक्तीला आणखी अफाट वाढवुन जगावर राज्य करायचीच स्वप्न सगळी बघत होती. हिटलरने वंशद्वेषाचा कळस गाठला. पण त्याची चुक उघड आहे व आज जर कोणि त्यामार्गे जातो म्हटलं तर त्याचा विरोध करण्याची जगाची मानसीकता आहे. त्याच्या अगदी विरुद्ध, अजस्त्र शक्ती संपादन करुन जगाला वेठीला धरण्याची वृत्ती आजही व्हाईट कॉलर धारण करुन राजरोसपणे वावरते आहे व माझ्या मते हे जास्त खतरनाक आहे. अशा वृत्तींना विरोध तर सोडाच, पण त्यांचं कौतुक करणारे लोक त्याकाळीही होते व आजही आहेत (त्यांनाच मी भाट, किर्तनकार वगैरे म्हटलं) चर्चा हिटलरवर चालली आहे, पण त्या हिटलरी वृत्तीपेक्षा जास्त घातक अशा वृत्ती हिटलरच्या कृष्ण्कृत्यांच्या कळोखात लपुन बसु नयेत म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. असो. अर्धवटराव

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणतीतरी असंबद्ध वाक्ये निवडून हिटलरचा संघाशी संबंध जोडणे आणि त्याच प्रकारे चर्चिलचा हिटलरशी संबंध जोडणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली चालते दुसरी चालत नाही.

आपला पराभव समोर दिसत असताना, बर्लीनची भूमिगत रेल्वे पाण्याने भरून टाकण्याचे आदेश देऊन आपल्याच (बहुतांश जर्मन ख्रिस्ती) नागरीकांची हत्या करणार्‍या हिटलरच्या "देशप्रेमा"ची जातकुळी कुठली हो? त्याने मारलेले जर्मन ज्यू त्याचे नागरीक नव्हते, असे तूर्तास समजून चालू!

In reply to by सुनील

हिटलर मानसीक दृष्ट्या फार आधीच कमकुवत झाला होता. अन्यथा त्याने बरच अगोदर शरणागती पत्करून देशाची हानी टाळली असती. संपन्न जर्मनी उभी करण्याचा अजेंडा कधी विरुन गेला आणि जगावर राज्य करण्याची हुकुमशाही कधी अंगात भिनली हे हिटलरला कळलच नाहि. हे डोईजड स्वप्न भंग होताना दिसत असुन देखील हिटलर ते मान्य करायला तयार नव्हता. अशा अवस्थेत एक पागल व्यक्ती जसं वागेल तसच तोही वागला. अशा खुज्यांनी भरलेल्या जगाच्या इतीहासात एक शिवछत्रपतीच काय ते उत्तुंग दिसुन येतात (छत्रपतींची ऊंची त्यांच्याच वारसदारांना पेलली नाहि, आजही उमगली नाहि हे दुर्दैव देखील ठळ्क आहेच) अर्धवटराव

पुरोगाम्यांना रा. स्व. संघाविषयी वाईट बोलायला काहीही सबब पुरते. त्याकरता दुसर्‍या कुठल्यातरी तशाच प्रकारची कावीळ असणार्‍याची साक्ष काढायची आणि आपली थियरी सिद्ध झाल्याबद्दल पाठ थोपटून घ्यायची. दुसरे महायुद्ध चालू असताना भारतीय लोकांना हिटलरविषयी कौतुक असण्याचे एकमेव कारण म्हणजे तो शत्रूचा (पक्षी ब्रिटनचा) शत्रू होता हेच. त्याचे ज्यू लोकांचे हत्याकांड हा कौतुकाचा विषय नव्हता. खुद्द भारतात छोट्या संख्येने ज्यू होते/आहेत. कोकणात ज्यू लोक आढळतात. किती ज्यू लोकांना भारतीय लोकांनी छळले आहे? उलट भारत हा एकमेव देश आहे जिथे ज्यूंना वर्णद्वेष्टेपणाचा त्रास झालेला नाही. असे असताना गोळवलकरांविरुद्ध नसते गरळ का ओकले जाते आहे? हिटलरच्या छळछावण्या, त्यातील क्रूर अत्याचार हे अगदी शेवटी शेवटी उघडकीस आले. असे नृशंस अत्याचार चालू आहेत हे माहित असताना किंबहुना माहित होते म्हणूनच गोळवलकर हिटलरवर खूश होते हा अपप्रचार अस्सल पुरोगामीच करु जाणे! पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत मोहनदास गांधींनी ज्यू लोकांना काय उपदेश केला होता? नाझी लोक लुटतायत? त्यांना लुटू द्या. तुम्हाला ठार मारत आहेत? शांतपणे मारले जा. कुठलाही प्रतिकार करु नका. यथावकाश नाझी लोकांना पश्चाताप होईल आणि मग ते आपोआपच सुधारतील! तुमचा देवही तुमच्याचर खूश होईल! वा! किती शुद्ध अहिंसक उपदेश आहे!

In reply to by हुप्प्या

पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत मोहनदास गांधींनी
गांधींना ताईत बनवणार्‍यांना पुरोगामी म्हटलेत.. चला हे ही नसे थोडके!

In reply to by हुप्प्या

हुप्प्या दादा : विचारवंताचे "विचारधन" (ज्ञानामृत) जसेच्या तसे डकवत आहे जे एखद्या संघटनेला लागु पडते: बरं हे ही जौद्या... एखाद्या माणसाला माणूस म्हणून स्वीकारणं आणि मग तो सलाम करण्याजोगा आहे की नाही हे ठरवणं... यासाठी त्या माणसाचा संपूर्णत्वाने विचार केला पाहिजे. चांगल्या आणि वाईट बाजू बघताना, जर का चांगल्या बाजू जास्त असतील तर मग सलाम वगैरे म्हणण्यात अर्थ आहे... अन्यथा, नुसत्या चांगल्या बाजूंपुरतंच ते कौतुक सिमित रहावं... आनि याव्रून असे लक्शात येते कि : .संघात फक्त आणी फक्त वाईट कामेच चाल्तात. .दुसरी बाजू बघण्याची आम्ही तसदी घीत नाही ( छ्या त्याकडे बघायचे पण नाही) .एखादी चुकिची बाजू दिसली रे दिसली कि त्याने "जीवन समर्पीत केलेल्या संघसेवकांवर गरळ ॒ओकायचीच ( ते थोडेच प्रतीवाद करायला येणारेत मि.पा.वर? .बाकि चालू द्या... .बाजारात फक्त "किडकी" भाजी शोधणार्या मि.पा.करांबद्दल अनुकंपा असलेला (खुळा) नाद

In reply to by हुप्प्या

उलट भारत हा एकमेव देश आहे जिथे ज्यूंना वर्णद्वेष्टेपणाचा त्रास झालेला नाही. असे असताना गोळवलकरांविरुद्ध नसते गरळ का ओकले जाते आहे?
भारतात ज्यू लोकांना त्रास झालेला नाही याचा गोळवलकरांशी काय संबंध आहे? गोळवलकरांना अपेक्षित असलेले भारतातील ज्यू हे हिरवे. हिटलरला अपेक्षित असलेले ज्यू नव्हेत! प्रतिसाद शेवटी गांधींवर घसरल्याचे पाहून संतोष झाला.

In reply to by आजानुकर्ण

तुमच्याकडून अधिक अपेक्षा होत्या, आजानुकर्ण. "भारत सोडून यू.एस आणि इस्रायल या देशांमधेही ज्यूद्वेषाचा इतिहास नाही." अशा अर्थाचं वाक्यही इथे अपेक्षित होतं. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"भारत सोडून यू.एस आणि इस्रायल या देशांमधेही ज्यूद्वेषाचा इतिहास नाही."
भारतात १००/१५०० वर्षे ज्यू रहात आहेत. अमेरीका तेंव्हा जन्माला देखील आली नव्हती. त्यावेळेस ज्यूंना सगळीकडून सापत्न वागणू़क मिळत होती. त्याचे प्रमुख कारण त्यांच्या असलेल्या वेगळ्या श्रद्धा. त्यावेळेस एक भारत होता जेथे त्यांना त्यांच्या श्रद्धा, आचार-विचार, भाषा, वगैरे वेगळे असूनही द्वेष केला नाही. तीच गोष्ट भारतात मला वाटते, सिरीयातून आलेल्या मुस्लीमांच्या संबंधात देखील वाचल्याची आठवते. त्यांना कुणी हाकलले म्हणून येथे आले नव्हते, पण व्यापारी म्हणून येथे आले होते पण द्वेष केला गेला नाही. पारशांचे उदाहरण तर प्रसिद्धच आहे. असो.

In reply to by विकास

याचा अर्थ यू.एस. आणि इस्रायल या देशांमधे ज्यूद्वेषाचा इतिहास आहे असा होतो का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इस्त्रायल मधे ऑलमोस्ट २००० वर्षे (१९४८ पर्यंत) ज्यूंना रहाण्यास त्रास होत होता. हिटलर काय आहे, ह्याची पूर्ण कल्पना आल्यावर देखील अमेरीकेने त्याविरोधात तात्काळ पाऊले उचलली नाहीत या बद्दलचे अनेक संदर्भ जालावर आणि पुस्तकात आहेत. तरी देखील एक म्हणता येईल की अमेरीकेने जशी कृष्णवर्णीयांच्या बाबतीत सापत्नता दाखवली तशी ज्यूंच्या बाबतीत कायद्याने दाखवली नाही. तशी भावना "स्वातंत्र्य, समता, बंधूता" याचा जगाला आदर्श देणार्‍या फ्रेंचांनी दाखवली आणि त्यासंदर्भात एमॅन्सिपेशन हे १७९१ ला जाहीर करून समान हक्क दिले. ग्रीसने १८३० तर ब्रिटन ने १८५८, इटली १८७० तर जर्मनी १८७१...

In reply to by आजानुकर्ण

गोळवलकरांना अपेक्षित असलेले भारतातील ज्यू हे हिरवे.
काही ऐतिहासीक पुरावा नसताना केलेले हे विधान आक्षेपार्ह आहे.

In reply to by विकास

संघाचे प्रचारक दामुअण्णा दाते यांच्या स्मरणशिल्पे या पुस्तकातील पान क्र. १६७ व १६८ पाहा. तुमच्या माहितीकरिता जसाच्या तसा येथे देतो. जे मला हिटलरसाऱखे धोरण वाटते ते ठळक करत आहे. "गुरुजी लालबहादूर शास्त्रींना म्हणाले 'बाहेरून आलेले मुसलमान हे अराष्ट्रीय आहेत व अशा अराष्ट्रीय मुसलमानांना जे सामावून घेतात ते राष्ट्रद्रोही आहेत. एक उपाय करा सर्वांनाच बाहेर घालवा. पण तुम्ही हे करणार नाही कारण तुम्हाला पोलिटिकल कंपल्शन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला मुसलमानांची मते मिळणार नाहीत. सध्या जगात सर्वमान्य असलेला उपाय सांगतो. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका आहेत त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करा. ते या राष्ट्राचे नाहीत आणि त्यांना मत नाही हे प्रस्थापित करा' या पुस्तकात अशी अनेक मौक्तिके सापडतील. संघसंस्थापकांचे एका पत्रातील मत वाचायला मिळेल जे असे "मुसलमान मनोवृत्ती नेहमी सत्कार्यात विघ्न आणणारी असते'. असो.

In reply to by आजानुकर्ण

दिल्लीत १९७० साली पत्रकारांशी झालेल्या प्रश्नोत्तरातील...त्यातील उत्तरामधील ठळक केलेल्या भागात तुम्हाला गुरूजींना काय म्हणायचे होते ते समजेल. Obviously, you want the ascendancy of the Hindus. Do you want to demand amendment of the Constitution for the purpose? A : There is no question of the ascendancy of any one. What we want is a healthy society. Ours is a Constitution which gives equal rights to all and there is no need to amend the Constitution. The Hindu is born secular. He accepts the truth that there are different paths to God realization. त्या व्यतिरीक्त मी काही दामुअण्णा दात्यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण संदर्भ माहीत नाही. तरी देखील जे काही तुम्ही दिलेले आहे त्यातून काय समजते? तर "बाहेरून आलेले..." ह शब्द प्रयोग. आता हा शब्दप्रयोग कधी, कोणत्या संदर्भात केला आहे वगैरे बघितले पाहीजेच, पण त्यांनी या देशातील (अर्थात भारतातील) कुणाबद्दलच म्हणलेले दिसत नाही. संदर्भाशिवाय कुणाचीही वक्तव्ये देणे हे अगदी टिपिकल दिशाभूल करण्याचे लक्षण आहे.

In reply to by विकास

"संदर्भाशिवाय कुणाचीही वक्तव्ये देणे हे अगदी टिपिकल दिशाभूल करण्याचे लक्षण आहे." ही वॄत्ती फारच बोकाळत चालली आहे.

In reply to by रामपुरी

तुमचे कोणत्याही चर्चेमध्ये बरेवाईट काहीच कॉँट्रिब्युशन दिसत नाही. असे प्रतिसाद विनाकारण थुंकत बसल्याने फक्त परिसर घाण होतो.

In reply to by आजानुकर्ण

तुमच्यासारख्या विशिष्ट प्रकारच्या थुंक्या उडवत राहण्यापेक्षा बरं आहे की. तुमच्या थुंका/पिंका परीसर जास्त घाण करत आहेत. बाकी तुमच्या प्रतिसादावरून पातळी लक्षात आली. एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची आमची योग्यता नाही. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या दर्जाच्या प्रतिसादांना आमच्याजवळ उत्तर नाही.

In reply to by रामपुरी

तुम्ही कोणत्याही चर्चेत विश्लेषणात्मक, सोदाहरण आणि विस्तृत असे बरेवाईट काही स्पष्टीकरण दिल्याचे दाखवून माझे दात माझ्याच घशात घालावेत.

In reply to by आजानुकर्ण

तुमच्यासारख्याला उदाहरणं देण्याची गरज वाटत नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. बाकी दात घशात घालून घ्यायचे असल्यास संपर्क साधावा. ते काम विनाविलंब मोफत केल्या जाईल. ईत्यलम! (दात घशात घालायचा विषय काढला म्हणून एवढा प्रतिसाद प्रपंच अन्यथा तुमच्या पातळीवर उतरून प्रतिसाद द्यायची इच्छा नाही हे पूर्वी स्पष्ट केलेच आहे. बाकी चालू द्यावे हि विनंती)

In reply to by विकास

गोळवलकर यांचे आणखी काही विचार. येथून साभार http://www.golwalkarguruji.org/shri-guruji/interviews/shri-gurujis-inte… तिथे सर्व संदर्भही सापडतील. हे विचार आणि हिटलरचे विचार यामध्ये काडीमात्र फरक दिसत नाही. १. The main reason for Hindu-Muslim tension is that the Indian Muslim is yet to identify himself fully with India, its people and its culture. Let the Indian Muslim feel and say that this is his country and these are his people, and the problem will cease. It is a matter of changing his psychology २. The Muslims are already consolidated. They think separately, act separately and plan separately. It is the Muslim who think that all non-Muslims will go to hell after death. ३. And how many Muslims bothered to follow Azad? The secular Hindu is the rule; the communal Hindu is the exception. But among Muslims, the communal Muslim is the rule and the secular Muslims the exception. That is the difference. ४. The Muslim looks upon Partition only as a springboard for further aggression. ५. This outlook of showing special consideration and of praising and publicizing predominantly the Muslim goodness is dangerous. The name of Abdul Hameed is publicized too much, but others who displayed equal valor are not much in the news. Our leaders are suffering from a peculiar Muslim-infatuation! ६. Q : Muslims and Christians belong to this land. Why do you not consider them as one of your own? A : Suppose one of our countrymen goes to America, settles there and wants to become a citizen of America, but refuses to accept Lincoln, Washington, Jefferson and others as his national heroes. Do you then call him a national of America? Tell me frankly. Q : Of course, no. A : Why should not the same criterion be applied to our country also? How can you say that we should call such people nationals who, while living here, work against the honor and traditions of the country, and insult our national heroes and objects of national veneration? (आणि गोळवलकर यांचे नॅशनल हीरोज कोण तर उदा. श्री. राम ) Some Muslims say that Rustom is their national hero. But Rustom was a Persian hero. He has nothing to do with them. He was born long before Islam. If he could be considered a hero by the Muslims, why not Sri Rama? I say, why don't you accept this history ? ७. Many persons came to this country from various parts of the world. They have chosen to stay here, live here. They have adapted themselves to the life here, the ideology and the philosophy here. Some have even made their own contribution towards enriching this mainstream. The Muslims, unfortunately, stayed apart. ८. We do not regard them separate. It is they who regard themselves as separate. मुळात हिंदू विचारसरणी ही सर्वसमावेशक आणि सबगोलंकार आहे. हिंदूंना कोणताही देव चालतो किंवा देव नसला तरी चालतो. मात्र इतर धर्मीयांनीही याच विचारसरणीचे अनुसरण करावे अन्यथा तुम्ही राष्ट्रद्रोही ठरण्याची शक्यता असते.

In reply to by आजानुकर्ण

गोळवलकर हे खरेच असे बोलले होते का की आमचे राष्ट्रीय हिरो राम आहेत, व्यवस्थीत वाचुन घ्या एकवार

In reply to by श्री गावसेना प्रमुख

Some Muslims say that Rustom is their national hero. But Rustom was a Persian hero. He has nothing to do with them. He was born long before Islam. If he could be considered a hero by the Muslims, why not Sri Rama? I say, why don't you accept this history ? ह्या गोळवलकरांच्या वाक्याचा कसा अर्थ लावायचा तो तुम्ही लावा. रामकथा हा इतिहास आहे की हिंदूंचे पुराण? मग हिंदूंची मायथॉलॉजी इतर धर्मीयांनी स्वीकारावी का? शंबूक वध प्रकरणानंतर हिंदूंमधीलच दलित आता रामाची परंपरा सांगण्याचे टाळतात हेही नमूद करावेसे वाटते. शिवाय रामदेखील पर्शियन होता असे काही लोक म्हणतात. मग पर्शियन रुस्तम चालत नाही मात्र पर्शियन राम गोळवकरांना का चालतो? http://khattamitha.blogspot.com/2008/03/1.html

In reply to by आजानुकर्ण

एक अवांतरः तुम्ही दिलेला लेख निव्वळ त्या प्रवादांचा उल्लेख करून थांबतो, बाकी काही बोलत नाही. तसेही रामकथा प्रत्यक्ष घडली असो किंवा नसो, वाल्मिकीरामायणातले उल्लेख तरी आजच्या भारतातलेच आहेत. बाकी गोळवलकरांचे विचाराबद्दल बोलायचं झालं तर, त्यातला अतिरेक बाजूला ठेवला तरी बरेच मुसलमान विचारजंत या देशाशी स्वतःला नीट आयडेंटिफाय करत नाहीत हे सत्यच आहे. त्यांना रेमेडोके अनुयायी मिळतात, आणि ते इस्लामच्या नावाखाली झपाट्याने डी-नॅशनलाईझ होतात. झकिर नाईकासारखे विचारजंत या कामात विशेष आघाडीवर आहेत. मुसलमान विचारजंतांचा सेन्स ऑफ एन्टायटलमेंट हा फार उद्धट आणि चिंताजनक वाटतो. हे जर चूक म्हणायचे असेल तर तुमच्या स्वाक्षरीप्रमाणेच मीही म्हणेन, "बाकी चालू द्या". :)

In reply to by बॅटमॅन

माफ करा पण हे जरा सरसकटीकरण होत नाहीए का? हा देश एवढा मोठा आहे आआणी परस्पर अंतरविरोधानी भरला आहे की इथे तोगडिया ना पण अनुयायी मिळतात आणि ओवैसी सारख्याना पण. त्यामुळे फक़त मुस्लिम याना हा वेगळा न्याय लावणे योग्य आहे का? मुस्लिम जर एवढे धर्मांधले असते तर ते आज मुलायम सिंग सारख्या हिंदू पुढार्याणा का मत देत बसते. आजही राष्ट्रीय स्तरावर मुस्लिमांचा म्हणून असा एक पक्ष नाही हे कशाचे लक्षण आहे?

In reply to by पिंपातला उंदीर

हिंदू पुढार्‍यांना मुसलमान मते मिळतात याचे कारण म्हंजे त्यांची अपीजमेंट होईल असेच निर्णय कायम घेतले जातात. मोदीचा अपवाद सोडून. ओवेसी अन तोगडिया या दोघांनाही अनुयायी मिळतातच की, कोण नाही म्हणतो. पण मुख्यतः मुस्लिम विचारजंत आणि मीडियाबद्दल म्हणतोय. देशाऐवजी इस्लामचे ढोल बडवण्याइतके त्यांचे धैर्य पाहून आश्चर्य वाटते. संघवाले किमान असे तरी करत नाहीत. राष्ट्रीय स्तरावर मुस्लिम पाठिंबा देतात असा एक पक्ष आहे ना-काँग्रेस!! त्याने आणि इतरांनी इतकी अपीजमेंट ऑलरेडी केलीय की गरजच काय? माझा मुद्दा इतकाच आहे की देश, त्याच्या परंपरा, संस्कृती, सहिष्णुता, सहजीवन, इ. सोडून कडवा इस्लाम हेच होल अँड सोल ध्येय असे मानणार्‍यांचे काय करावे. हे लोक एकदा मेजॉरिटी झाले की तिथे मायनॉरिटीची काय हालत होते हे बघायला पाकिस्तान किंवा इजिप्त किंवा अजून कुठलीही उदाहरणे बघावीत. यांना जाऊ तिथे इतरांनी आपल्या धर्मासाठी वेगळ्या सोयीसुविधा सरकारने द्याव्यात अशी अपेक्षा असते पण इतरांच्या धर्म-परंपरांना कवडीची किंमत हे लोक देत नाहीत. युरोपात यांनी सध्या किती उच्छाद मांडलाय ते बघा. युरोपमधले मुस्लिम हा असला उच्छाद भारतात हे मांडत नाहीत कारण आधीपासून राहतात. पण इस्लामचे अरबीकरण सध्या इतक्या झपाट्याने सुरू आहे की हे असले भारतात झाले तर काय होईल त्याची कल्पनाच करवत नाही. असो. या विषयाबद्दल बोलावे तितके कमीच आहे. यांचा कडवेपणा इतर कुणापेक्षाही जास्त आहे. येत्या काही वर्षांत युरोपात याचे प्रत्यंतर वाईट रूपाने येईल हे नक्कीच. असो. बाकी चालू द्या. सरसकटीकरण मी करत नाहीये. कॉमन मुसलमान माणसाला हे लागू नाही. विचारजंतांना लागू आहे. शिवाय मुसलमान समाजात मतभिन्नता नामक प्रकार इतका टॉलरेट होत नसल्याने विशिष्ट विचारसरणी रुजवण्यासाठी हा वर्ग अतिशय जास्त ससेप्टिबल आहे. त्यामुळे हे विचारजंत दाबात ठेवलेच पाहिजेत या मताचा मी आहे.

In reply to by बॅटमॅन

भारतात समजा २५ टक्के मुस्लिम आहेत असे गृहित धरु. या २५ टक्के मतांसाठी त्यांचे सो कॉल्ड अपीजमेंट करुन त्यावर कोणत्याही पक्षाचे सरकार कसे काय येऊ शकते? मुस्लिम अपीजमेंटचे काही ठोस परिणामही दिसले आहेत असे नाही. सरकारी किंवा खाजगी नोकऱ्यामधील प्रतिनिधित्व किंवा आर्थिक उन्नयन वगैरे कोणत्याही निर्देशांकावर या अपीजमेंटचे काही प्रतिबिंब दिसते का? मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही. गोळवलकर यांचे मत उच्चशिक्षित मुसलमान विचारवंतांबाबत आहे की एकंदर मुस्लिम समाजाबाबत हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. कुरुंदकरांचा लेख आता माझ्याजवळ नाही पण मला आठवते त्यानुसार त्यांचे विश्लेषण हे अलीगढ विद्यापीठ टाईप मुसलमानांबाबत होते ज्यात त्यांना सर सय्यद अहमदखान यांच्या उदाहरणावरुन ते स्पष्ट केले होते. (चू.भू.द्या.घ्या.) शिवाय एका त्रयस्थ अभ्यासकाचे मत आणि एका धर्माधारित हिंसक संघटनेच्या प्रमुखाचे मत यामागचा कार्यकारणभाव वेगळा असण्याची जास्त शक्यता आहे. हिटलरने घटनादुरुस्ती करुन ज्यूंची कत्तल केली की काय याबाबतचा थोडा शोध घेऊन गोळवलकरांच्या घटनादुरुस्तीबाबत मत व्यक्त करता येईल.

In reply to by आजानुकर्ण

>>शिवाय एका त्रयस्थ अभ्यासकाचे मत आणि एका धर्माधारित हिंसक संघटनेच्या प्रमुखाचे मत यामागचा कार्यकारणभाव वेगळा असण्याची जास्त शक्यता आहे. -- संघाला धर्माधारीत हिंसक संघटना म्हणणं पूर्वग्रहदुषीत परिणामांतुन आलं असेल, दिग्वीजयसींग साहेबांसारखे काहि बोलायचे असेल, किंवा आपल्या भुमीकेला सपोर्टींग काहितरी लिहायचं म्हणुन लिहीलं असेल तर एक वेळ समजु शकतो (समाजहिताला अशी वृत्ती फार घातक असते हे मात्र निश्चीत). अदरवाईज तुमची मते अगदी मुळापासुन तपासुन बघा, तेव्हढा स्वतःला वेळ द्या, असा सल्ला मित्रत्वाच्या नात्याने, एक हितचिंतक म्हणुन देतो. देव करो, आणि तुमाला धर्माधारीत हिंसक संघटनेचा कधि वैयक्तीत अनुभव न येवो. असो. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

माफ करा मला धर्माधारित अहिंसक संघटना म्हणायचे होते. तेवढा अ राहिला. क्षमस्व. रंगूनी रंगात साऱ्या, संघ माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय त्याचा मोकळा!

In reply to by आजानुकर्ण

हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही.
हज यात्रेला जी सबसिडी मिळते, ती हवी असल्यास मुंबई (किंवा भारत) - सौदी अरेबिया हा प्रवास एअर इंडीयानेच करावा लागतो. एअर इंडीयाची ही तिकीटं हजच्या यात्रेच्या काळात सौदीया आणि कदाचित अन्य काही परदेशी विमान कंपन्यांच्या तुलनेत बरीच अधिक महाग असतात. सरकारी सबसिडी घेऊन भाविकांचे पैसे फार वाचत नाहीतच. त्यामुळे काही मुस्लिम विचारवंतांची मागणी आहे ही सबसिडी रद्द करण्याची. त्याची दोन कारणं ते सहसा देतात. १. एअर इंडीयातली बेबंदशाही. नफा कमावण्याऐवजी अनुत्पादक नोकर्‍या वाढवणार्‍या कंपनीला करदात्यांचे पैसे कशाला द्यायचे? २. सबसिडीचा फायदा खरोखर गरीब यात्रिकाला होत नाही तर सबसिडी घेऊन संपूर्ण मुस्लिम समाजाचं नाव बदनाम कशाला? (व्हायचंच असेल तर एअर इंडीयाचं होऊ देत.) २०११ साली जनगणना झाली. त्यात जात नोंदवावी का नोंदवू नये याबद्दल भारी चर्चा झाल्या. या जनगणनेनुसार हिंदू आणि मुस्लिम समाजाचं दरडोई उत्पन्न, शिक्षण, बेरोजगारी अशी वेगवेगळी मानकं कुठे सापडतील? (चटकन गूगलून सापडलं नाही.) मुस्लिमांचं तुष्टीकरण म्हणजे नक्की काय याचे आकडेही त्यातून समजतील.

In reply to by आजानुकर्ण

मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही.
इतकेच नव्हते... तुम्हाला माहीत आहे का कल्पना नाही, मला दुवा मिळायची शक्यता आत्ता तरी नाही, त्यामुळे विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा... पण ठाणे-भिवंडी मध्ये शिवजयंतीस परवानगी नव्हती. (आणि हो यात शिवसेनेचा काहीच संबंध नव्हता. ) ती ज्या वर्षी दिली गेली, मला वाटते १९८२-८३ साली, त्यावर्षी तेथे प्रचंड दंगली झाल्या होत्या. (ज्यात अर्थात शिवसैनिक देखील असू शकतात). सलमान रश्दीचे लेखन अयातुल्ला खोमेनीला खूप आवडायचे. आपल्याकडे सेटानेकी वर्सेसवर बंदी येई पर्यंत मुस्लीम जगाला कल्पना देखील नव्हती... आणि नंतर त्याला फतव्याला तोंड द्यावे लागले. असे अनेक प्रकार हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते १९९० च्या दशकापर्यंत चालले होते. अजूनही चालू आहे हे गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी ज्या पद्धतीने अफझल गुरूच्या फाशीच्या आधी उगाच "हिंदू दहशतवाद" शब्द आणला त्यातून दिसून येते. शहाबानो निकालानंतरचा राजीव गांधीचा अप्रत्यक्ष घटना दुरूस्ती करून सुप्रिम कोर्टाचा निकालच रदबादल करण्याचा प्रकार हा या सर्व प्रकारातील निचांक (अँटीक्लायमॅक्स) होता. त्याशिवाय त्या नंतर ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये दहशतवाद चालू झाला त्याला वेळीच उखडायच्या ऐवजी खतपाणी घातले गेले असे म्हणावेसे वाटते...
गोळवलकर यांचे मत उच्चशिक्षित मुसलमान विचारवंतांबाबत आहे की एकंदर मुस्लिम समाजाबाबत हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
तुम्हीच दिलेल्या इतर वाक्यांप्रमाणे त्याच दुव्यात गोळवलकरांनी म्हणलेले तुम्ही वाचलेले दिसत नाही: According to our ways of religious belief and philosophy, a Muslim is as good as a Hindu. It is not the Hindu alone who will reach the ultimate Godhead. Everyone has the right to follow his path according to his own persuasion. त्या व्यतिरीक्त मदरलँड आणि मला वाटते ऑरगानाजरमध्ये देखील आलेल्या १९७२ च्या त्यांच्या मुलाखतीतले वाचण्यासारखे आहे: “I think uniformity is the death knell of nations. Nature abhors uniformity. I am all for the protection of various ways of life. However all the variety must supplement the unity of the nation and not range itself against it” When Guruji was asked, “does he not think that the common civil code is necessary for promoting the feeling of nationalism” he gave a straight answer in a very unambiguous term “ I don’t”. He was aware of the superficial debate on this issue. He did not forget to add, “this may surprise you or many others. But this is my opinion .I must speak the truth as I see it”
कुरुंदकरांचा लेख आता माझ्याजवळ नाही पण मला आठवते त्यानुसार त्यांचे विश्लेषण हे अलीगढ विद्यापीठ टाईप मुसलमानांबाबत होते ज्यात त्यांना सर सय्यद अहमदखान यांच्या उदाहरणावरुन ते स्पष्ट केले होते.
तसे नाही. ,त्यांनी अलिगढचा उल्लेख केला असेलही, पण त्यांचा मूळ मुद्दा हा दारूल उलूम देवबंद संस्थेवर होता जिथून फतवे निघतात आणि जी संस्था भारतीय उपखंडातील + अफगाणिस्तानातील मुस्लीमांच्या मनावर प्रभाव ठेवून आहे. त्यातूनच सामाजीक प्रश्न या समाजात तयार झाले आहेत. कुरंदकरांच्या मते या संस्थेने कधी फाळणीस पाठींबा दिला नाही, कारण त्यांना संपुर्ण भारतालाच इस्लाम करायचे होते, वगैरे... बाकी तुम्ही ज्या "उच्च शिक्षित विचारवंतांबद्दल" बोलत आहात, तेच समाजाला घडवण्यासाठी जबाबदार असतात. पण बर्‍याचदा ते घडवण्याऐवजी, भेद करून बिघडवण्यातच जास्त रस घेताना दिसतात. आणि हे काही मी कुठल्याही धार्मिक संदर्भाने म्हणत नाही - हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि निधर्मी सगळेच त्यात आले.
शिवाय एका त्रयस्थ अभ्यासकाचे मत आणि एका धर्माधारित हिंसक संघटनेच्या प्रमुखाचे मत यामागचा कार्यकारणभाव वेगळा असण्याची जास्त शक्यता आहे.
रा.स्व. संघ ही धर्माधारीत हिंसक संघटना नाही. आपल्यास ठोस पुरावे माहीत असल्यास येथे लिहावेत. नाहीतर फुकटचे लिहीणे आहे. कुरंदकर हे डावे विचारवंत आहेत, जरी त्यांचे लेखन हे बहुतांशी समतोल आहे असे म्हणता येत असले तरी. पण त्यांच्या लेखनास (मी त्यांच्या लेखनाच पंखा आहे तरी देखील) तटस्थ म्हणणार नाही. हा विषय वेगळा असल्याने तुर्तास इतकेच.
हिटलरने घटनादुरुस्ती करुन ज्यूंची कत्तल केली की काय याबाबतचा थोडा शोध घेऊन गोळवलकरांच्या घटनादुरुस्तीबाबत मत व्यक्त करता येईल.
याला बादरायण संबंध लावत वाटेल ते लिहीणे असे म्हणता येईल. जे केवळ आत्यंतिक स्वार्थ अथवा द्वेषापोटी होऊ शकते. मला कल्पना नाही आपण यात कुठे बसता का आपल्यावर असा कुणाचा प्रभाव आहे. असो...

In reply to by आजानुकर्ण

>>> मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही. हे लांगूलचालन फक्त हज किंवा शहाबानोपुरते मर्यादित नाही. त्यात अनेक गोष्टी येतात. काही गोष्टी येणेप्रमाणे, (१) मुस्लिम मौलवींना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते. हे वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून दिले जाते. वफ्फ बोर्डाला थेट केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देते. इतर कोणत्या धर्मातील पुजारी, फादर, ग्रंथी इ. ना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते? (२) मुस्लिम पुरूषांना घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागत नाही. ३ वेळा तलाक म्हटले की (किंवा तसा एसेमेस पाठविला) तरी त्याच क्षणी घटस्फोट होतो. इतर कोणत्या धर्मातील पुरूषांचे असे लाड होतात? (३) मुस्लिम पुरूषाला पत्नीला घटस्फोट न देता तब्बल ४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे. या अत्यंत पक्षपाती व अन्यायी कायद्याचा अनेकांनी गैरफायदा घेतलेला आहे. उदा. दिलीपकुमार, सलीम्-जावेद जोडीतील सलीम व जावेद हे दोघेही, महेश भट व इतर अनेक जण इतर कोणत्या धर्मातील पुरूषांना घटस्फोट न देता ४-४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे? (४) शहाबानो प्रकरणात अशी कायदादुरुस्ती करण्यात आली आहे की, मुस्लिम पुरूषाने ३ वेळा तलाक म्हणून बायकोला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्याकडून तिला पोटगी मिळत नाही व जास्तीत जास्त ३ महिन्यांचा देखभाल खर्च मिळतो. त्यानंतर तिच्या माहेरच्या माणसांनी तिची देखभाल करणे आवश्यक आहे. जर तिच्या माहेरच्या माणसांनी देखील तिचा खर्च उचलण्यास नकार दिला तर तिचा खर्च वफ्फ बोर्डाने करायचा आहे (म्हणजे केंद्र सरकारने). इतर कोणत्या धर्मातील पुरूषांचे आपल्या बायकोला घटस्फोट दिल्यावर इतके लाड होतात? >>> मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही. हे लांगूलचालन फक्त हज किंवा शहाबानोपुरते मर्यादित नाही. त्यात अनेक गोष्टी येतात. काही गोष्टी येणेप्रमाणे, (१) मुस्लिम मौलवींना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते. हे वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून दिले जाते. वफ्फ बोर्डाला थेट केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देते. इतर कोणत्या धर्मातील पुजारी, फादर, ग्रंथी इ. ना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते? (२) मुस्लिम पुरूषांना घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागत नाही. ३ वेळा तलाक म्हटले की (किंवा तसा एसेमेस पाठविला) तरी त्याच क्षणी घटस्फोट होतो. इतर कोणत्या धर्मातील पुरूषांचे असे लाड होतात? (३) मुस्लिम पुरूषाला पत्नीला घटस्फोट न देता तब्बल ४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे. या अत्यंत पक्षपाती व अन्यायी कायद्याचा अनेकांनी गैरफायदा घेतलेला आहे. उदा. दिलीपकुमार, सलीम्-जावेद जोडीतील सलीम व जावेद हे दोघेही, महेश भट व इतर अनेक जण इतर कोणत्या धर्मातील पुरूषांना घटस्फोट न देता ४-४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे? (३) शहाबानो प्रकरणात अशी कायदादुरुस्ती करण्यात आली आहे की, मुस्लिम पुरूषाने ३ वेळा तलाक म्हणून बायकोला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्याकडून तिला पोटगी मिळत नाही व जास्तीत जास्त ३ महिन्यांचा देखभाल खर्च मिळतो. त्यानंतर तिच्या माहेरच्या माणसांनी तिची देखभाल करणे आवश्यक आहे. जर तिच्या माहेरच्या माणसांनी देखील तिचा खर्च उचलण्यास नकार दिला तर तिचा खर्च वफ्फ बोर्डाने करायचा आहे (म्हणजे केंद्र सरकारने). इतर कोणत्या धर्मातील बायकांची घटस्फोटानंतरची आर्थिक जबाबदारी सरकार घेते? (५) कायद्यानुसार घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मुस्लिम पुरूषाकडेच असतो. जर त्याने ताबा घ्यायचा नाकारला तरच घटस्फोटित बायकोला मुलांचा ताबा मिळतो. इतर कोणत्या धर्मातील पुरूषांना हा हक्क आहे? (६) कायद्यानुसार मुस्लिमांमध्ये दत्तक घेण्यास परवानगी नाही. इतर कोणत्या धर्मातील नागरिकांना हा हक्क आहे? (७) मुस्लिम स्त्रीला मतदान करताना बुरखा काढायची व स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करण्याची सक्ती नाही. इतर कोणत्या धर्मातील स्त्रियांना हा हक्क आहे? (८) मक्कायात्रेसाठी मुस्लिमांना सवलतीच्या दरात विमानप्रवास करता येतो. इतर कोणत्या धर्मातील नागरिकांना ही सवलत आहे? (९) भारतातील एकमेव मुस्लिमबहुल राज्य जम्मू-काश्मिरला विशिष्ट दर्जा देऊन त्या राज्यात स्थायिक होण्यास इतरांना कायद्यानुसार परवानगी नाकारली आहे. मात्र त्या राज्यातील नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होता येते. भारताच्या संसदेने मंजूर केलेले बहुसंख्य कायदे जर जम्मू-काश्मिरच्या विधानसभेने मंजूर केले तरच तिथे लागू होतात, अन्यथा नाही. इतर कोणत्या राज्यावर अशी कायदेशीर खैरात केली आहे? (१०) संसदेचे अधिवेशन सुरू असताना दर शुक्रवारी दुपारी २ तास नमाजासाठी अधिवेशनाला सुट्टी असते. इतर कोणत्या धर्मियांच्या प्रार्थनेसाठी संसद नियमित बंद ठेवली जाते? आपल्याला माहित नसलेल्या अजूनही बर्‍याच गोष्टी आहेत ज्यात मुस्लिमांचे लांगूलचालन उघडउघड दिसून येते. त्या जशा आठवतील/सापडतील तशा मी टाकीन. मुस्लिम लांगूलचालन हे फक्त हज किंवा वेगळा वैयक्तिक कायद्यापुरते मर्यादित नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. दुर्दैवाने या गोष्टी माध्यमातून फारशा चर्चिल्या जात नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

वरील प्रतिसादात थोडी कॉपी-पेस्टची सरमिसळ झाली आहे. मला हा प्रतिसाद एडीट करता येत नसल्याने अनावश्यक भाग काढता येत नाही. मी एकूण (१) ते (१०) असे १० मुद्दे मांडले आहेत. ते त्या क्रमाने वाचावे.

In reply to by बॅटमॅन

ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा पटत नाही. कुठल्याही सरकारने मुस्लिमांसाठी काहीही भरीव केलेले नाही. सचर आयोगाचा रिपोर्ट काय सांगतो बघा http://en.wikipedia.org/wiki/Sachar_Committee_Report