Skip to main content

राष्ट्रभक्त हिटलरला

लेखक अनिकेतदळवी यांनी गुरुवार, 21/02/2013 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!

वाचने 67342
प्रतिक्रिया 213

प्रतिक्रिया

टाळ्या!! जोर्दार टाळ्या!! मिपावर बाकीचे लोक जरा मूर्खच आहेत, असले लेख वारंवार वाचल्यास सिलेक्टिव्ह रीडिंगचे उत्तम शिक्षण मिळेल त्यांना, च्यायला कोणी ऐकतच नै.

In reply to by बॅटमॅन

बॅट्याला जोरदार अनुमोदन. राष्ट्रभक्तीने थबथबून ओथंबणारा धबाबा प्रेरणेचा धबधबा लिहिणार्‍यांनी इतक्यातच थांबू नये. ज्ञानाचे तुषारकण असेच मिपावर उडवित रहावेत.

In reply to by मन१

कॉफि संपल्यावर धागा लेखकाला हॉटेलात एक मिसळपावही देण्यात येइल...

रक्ताचा एक थेंब न गाळता, न सांडता कार्य करणार्‍या लोकांचे कौतुक वाटते. लोक कायमच नावे ठेवतातच म्हणे गळा दाबुन , विषारी गॅस देउन, आगीत जाळून, विरोधात गेलेल्या सगळ्यांना तुरुंगात डांबून, सुप्रीम आर्यन रेस करायच्या नादात जिप्सी, ज्यु, अन्य वंशीय यांना विशिष्ट वैद्यकीय सेवा देउन, व नंतर तुरुंगात, छावण्यात विल्हेवाट लावून इ मार्गाने पण जमवले बॉ हिटलरने. मान्य केलेच पाहीजे ह्या हिटलरने स्वताचे व करोडो लोकांचे रक्त आट्वले. आता संचारबंदी तोडून बेकायदा गोळा होणार्‍या बेशीस्त लोकांना धडा शिकवणार्‍या कार्यक्षम सरकारी अधिकार्यावर म्हणजे आपले जनरल डायर हो, एक फर्मास लेख येउ द्या!

कोणत्याही माणसाच्या दोन बाजू असतात. काळी आणि पांढरी... आणि माणूस कधीच फक्त काळा किंवा फक्त पांढरा नसतो. तो नेहमीच राखाडी असतो. फिकट किंवा काळपट एवढाच काय तो फरक. हे सगळे मान्य असल्यामुळे, किंबहुना हे माझेच मत असल्यामुळे, हिटलरमधेही काही चांगल्या गोष्टी होत्या याबद्दल मला संशय नाहीच. मात्र वर उल्लेखिलेल्या कोणत्याही 'अचिव्हमेंट्स' या केवळ त्याच्यामुळे होऊ शकल्या नाहीत तर त्यात अजूनही काही लोकांचा हातभार लागला होता. तसा तो प्रत्येकच नायकाच्या बाबतीत असतो. त्यामुळे कोणत्याही अचिव्हमेंट्सचं श्रेय सर्वस्वी एकाच माणसाला जात नाही... ते टीमला जातं. दुसरा मुद्दा असा की, वर उल्लेखिलेल्या सगळ्या गोष्टी खरंच अचिव्हमेंट होत्या का? उदा. तीन आठवड्यात पाडलेला पोलंडचा 'फडशा'! ही सरळ सरळ युद्धखोरी होती. Lebensraum अथवा Ostsiedlung वगैरे संकल्पनांचा तो वास्तवात आणलेला नंगानाच होता. याला तुम्ही अचिव्हमेंट म्हणत असाल तर म्हणा बापडे! अजून एक उदाहरण बघू... शारिरीक शिक्षण सक्तीचे केले वगैरे... जर्मन समाजाचे सरळ सरळ रेजिमेंटेशन केले गेले. ही पण बहुधा 'अचिव्हमेंट'च. असेल बापडी.. असं बरंच काही बोलता येईल... बरं हे ही जौद्या... एखाद्या माणसाला माणूस म्हणून स्वीकारणं आणि मग तो सलाम करण्याजोगा आहे की नाही हे ठरवणं... यासाठी त्या माणसाचा संपूर्णत्वाने विचार केला पाहिजे. चांगल्या आणि वाईट बाजू बघताना, जर का चांगल्या बाजू जास्त असतील तर मग सलाम वगैरे म्हणण्यात अर्थ आहे... अन्यथा, नुसत्या चांगल्या बाजूंपुरतंच ते कौतुक सिमित रहावं... हिटलरने जे काही केलं त्याचा साकल्याने विचार करता, 'माणसा'ला सलाम करण्याचं धार्ष्ट्य माझ्यात नाही. *** जाता जाता : मी सातवीत असताना, पहिल्यांदा, 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वाचलं. त्यानंतर अजून काही वाचलं. त्या वयात मी प्रचंड हिटलर फॅन होतो. नंतर जसजसा मोठा होत गेलो तसतशी क्षितिजं विस्तारली, वाचन वाढलं.. आणि पुढे तर काही युरोपिअन लोकांशी चर्चा होऊ शकली. आणि मग पूर्ण भान आल्यावर माझी मतं बदलली. तुम्हालाही शुभेच्छा! (अजून काही मांडावंसं वाटलं तर नंतर सवडीने!) *** बादवे, तुम्हाला नरेंद्र मोदींनाही सलाम करावासा वाटतो का? जाणून घेण्यास उत्सुक आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

त्यात तुमची चूक नाही व प्रस्तूत लेखकाचीही नाही. पूर्वीची अनेक पुस्तके (मराठी) वाचली की हिटलर हा हिरोच वाटतो. मी लिहिलेले पुस्तक अजून तीन चार महिन्यात प्रकाशीत होईल त्यात हिटलर हा सर्व आघाड्यांवर शेवटी कसा पराभूत झाला हे कळेल व त्याला कारणीभूत तो नाझी होता हेच कारण कसे होते हे कळेल..............

In reply to by जयंत कुलकर्णी

मी लिहिलेले पुस्तक अजून तीन चार महिन्यात प्रकाशीत होईल त्यात हिटलर हा सर्व आघाड्यांवर शेवटी कसा पराभूत झाला हे कळेल व त्याला कारणीभूत तो नाझी होता हेच कारण कसे होते हे कळेल..............
म्हणजे इतक्या वर्षांनी का होईना पण जगासमोर सत्य काय ते येणार म्हणा की.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा सत्य सगळ्यांनाच माहीत आहे. फक्त नव नवीन माहिती प्रकाशात येत असते व त्यानुसार काही अनुमाने समोर ठेवावे लागतात. ती या पुस्तकात ठेवली आहेत. तसेच सगळ्या माहितीचा स्त्रोतही लिहिला आहे जेणे करुन वाचकाला पाहिजे असल्यास तेही वाचता येईल.....

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिपीनदाशी सहमत आहे. आपण कुठल्याही मानसाला आपल्याला हवा तसा रंगवाता येतो. आणि आपल्या देशात तर याची चढाओढच आहे. एखादा मानुस चांगला मानला की त्याचं सगळं अगदी १००% चांगलं आणि एखादा माणुस वाईट म्हणजे त्याचं सर्वच वाईट असं आपण मानतो. जे की १००% खरं नाही. प्रत्येक मानसात चांगल्यावाईटाची सरमिसळ असते. त्यात जो गुण एकूणात चांगला त्याला आपण चांगला म्हणतो आणि असंच उलट सुध्दा. तर आपण किंवा जग हिटलरला युध्दपिपासू मानतो. त्याने जर्मणीच्या मानभंगाचा सूड वगैरे घेतला असेल आणि जर्मणीचा प्रचंड विकास केला असेल मात्र तो अत्यंत क्रुर होता आणि वंशद्वेशी सुध्दा होता. त्याने केलेले हत्याकांड आज सुध्दा लोकांना तेवढ्याच तिव्रतेने आठवतात. यातनातळाच्या कथा आज सुद्धा चर्चील्या जातात. त्यामुळे एकूणात हिटलर म्हटल्यास मला तरी हेकेखोर, पाशवी, युध्दपिपासू, वंशद्वेष्टा व हिंसक असेच रंग ठळक होताना दिसतात. त्यामुळे हिटलरचे समर्थन नाही करू शकत. एकंदरीत तुमचा प्रयत्न छान आहे. लेखन करताना आत्मविश्वास दिसतोय. आपल्याला सकारात्मक व आवश्यक तेवढाच संदर्भ घ्यावा व मुद्दा सिध्दं झाल्यासारखा लिहावा असा दिसतो. (मी चुकत असेन कदाचित.) या प्रकारे लिहीतो म्हटल्यावर रावण, अनेक असूर, भारतावरील परकिय आक्रमक सुध्दा असेच गौरविता येतील. मला तरी हे पटत नाही. - नीलकांत

In reply to by नीलकांत

तुमंच म्ह्णनं बरोबर आहे थोडंस. पण आपण त्याच्या वाईट बाजुच जास्त ऐकुन आहोत. पण त्याला अशी नांव ठेवण्यापुर्वी त्याची चांगली बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे ना

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हिटलर आणि मोदींची तुलना ??? हिटलर आणि जनरल डायरची तुलना नाही. हिटलर आणि दिल्लीमधील शीख दंगलीतील आरोपींची तुलना नाही. हिटलर आणि काश्मीर मध्ये हिंदुंना ठार मारणा-या दहशतवाद्यांची तुलना नाही. हिटलर आणि तालिबानी लोकांची तुलना नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पुर्वीचे बॅलन्स्ड बिका कोणी परत आणु शकेल का ?

In reply to by अमोल खरे

माओवाद्यांना नि:शस्त्र गांधीवादी म्हणवणार्‍या लोकांच्या कळपात वावरणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हिटलर आणी मोदींची तुलना खूप म्हणजे खूपच अती झाली. एक तर तुम्हाला मोदींची माहिती नाही अथवा हिटलरची माहिती नाही. अर्थात प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य असल्याने कुणीही कसाही विचार करावा. मला मात्र मोदींन सलाम करावासा नक्कीच वाटतो. आणि भारताचे पंतप्रधान म्हणूनही त्यांना बघायला आवडेल. आजच हैदराबाद मधे झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर तर गां*त दम असलेला (सगळ्याच बाबतीत) मोदींसारखाच पंतप्रधान भारताला हवा हे माझं मत आहे.

In reply to by आदिजोशी

+१ मोदी दुरद्रुष्टी असणारे नेते आहेत. प्रधानमंत्री म्हणुन त्यांना पहायला नक्कीच आवडेल. मोदी आणि हिटलर ची तुलना होऊ शकत नाही. राष्ट्र्भक्ती हा हिटलर चा गुण चांगला होता. तसेच तो एक उत्क्रुष्ट सेनानी होता. पण तरीही ज्युंच्या हत्याकांडाचं समर्थन करता येऊ शकत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग लोकांना मारण्यासाठी करण्याचा निकष लावला तर तुलना होऊ शकते. पण तुल्यबळ नाही.

In reply to by हारुन शेख

एक हिटलर मुळात होऊन गेल्यानंतर पुन्हा तसाच राक्षस उभा रहाणं आणखी कठीण होतं. लोकं थोडे अधिक हुशार होतात. हिटलरला त्या काळच्या जर्मन विचारवंतांनी पाठींबा दिला होता. अनेक हुशार, श्रीमंत, प्रभावशाली जर्मन ज्यू लोकांनीही सुरूवातीला हिटलरकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली होतीच. आता वेगवेगळ्या देशातल्या हिटलर बनू पहाणार्‍या लोकांना एवढं सपाट मैदान मिळत नाही. विचारवंत आरडाओरडा सुरू करतात. (याचं समांतर उदाहरण शेअर बाजारातल्या घोटाळ्यांकडे पहाता येईल. एकदा घोटाळा झाल्यावर सेबी वगैरे प्रकार झाले, घोटाळे करणं आणखी कठीण झालं.) तत्त्व म्हणून (ज्यात आकडे वगळता येतात) "आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग वेगळ्या धर्माच्या लोकांना मारण्यासाठी" केला यात दोघांमधे साधर्म्य आहेच. (तिरका ठसा माझा.) हे एक झालं. आता दुसरं पहा: इथे हे सापडलं:
To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic races—the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindustan to learn and profit by"[34][35] — M. S. Golwalkar
ज्या संघात मोदींच्या भाजपची मुळं शोधता येतात, त्यांच्या माजी प्रमुखांचं जर्मनीच्या वांशिक अशुद्धता हटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल उच्च मत होतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे तुमच्या मताशी. तुमचा प्रतिसाद वाचून खालील अवतरण आठवले. First they came for the Socialists, and I did not speak out-- Because I was not a Socialist. Then they came for the Trade Unionists, and I did not speak out-- Because I was not a Trade Unionist. Then they came for the Jews, and I did not speak out-- Because I was not a Jew. Then they came for me--and there was no one left to speak for me. -- Martin Niemöller

In reply to by हारुन शेख

हेच आता पाकीस्तान आणि दहशतावादी म्हणजे काय हे समजल्यावर काश्मीरींमधे होत आहे असे वाटते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तत्त्व म्हणून (ज्यात आकडे वगळता येतात) "आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग वेगळ्या धर्माच्या लोकांना मारण्यासाठी" केला यात दोघांमधे साधर्म्य आहेच.
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एस.आय.टी नेच मोदींविरूध्द खटला भरण्याइतका पुरावा नाही असे म्हटले आहे त्याचे काय? म्हणजे मोदींनी दुसर्‍या धर्माच्या लोकांना मारायला सरकारी यंत्रणेचा वापर केला असे तुम्हाला वाटत असले तरी ती सत्य परिस्थिती नाही हे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या यंत्रणेनेच म्हटले आहे. तेव्हा हिटलरबरोबर मोदींचे नाव घ्यायचे कारण समजले नाही. विषय काहीही असला तरी बादरायण संबंध लावून त्यात संघ इत्यादींवर गरळ ओकण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच. माननीय वाजपेयी साहेबांनी दिलेले 'राजधर्माचे पालन करा' वैगेरे घरचे अहेर कसे विसरता. वाजपेयींसारखे नेते भाजपला परत घडविता येतील अशी अपेक्षा आहे त्या पक्षाकडून. कारण कॉंग्रेसचा अतिशय कंटाळा आला आहे आता.

In reply to by हारुन शेख

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच
यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा गैरवापरच. या धाग्यावर हा प्रमुख विषय आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

Any publicity is good publicity. तेव्हा माझं महत्त्व वाढवण्याबद्दल अनेक आभार. हे तर होत राहिलच. असो. माया कोदनानी, अमित (शहा बहुदा) हे मोदींच्या मंत्रीमंडळातले तेव्हाचे मंत्री, बाबू बजरंगी वगैरेंवर अंमळ गूगल करणार का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माया कोदनानी, अमित (शहा बहुदा) हे मोदींच्या मंत्रीमंडळातले तेव्हाचे मंत्री, बाबू बजरंगी वगैरेंवर अंमळ गूगल करणार का?
अमित शहांचा गुजरात २००२ दंगलींमध्ये काहीही हात नव्हता.आणि त्यांच्यावर जो काही आरोप आहे तो नंतरचा (सोहराबुद्दिन एनकाऊंटर) आणि तो ही सिध्द व्हायचा आहे. गुन्हा सिध्द व्हायचा आहे तोपर्यंत कोणाला मंत्रीमंडळात ठेवायचे हा मोदींचा प्रश्न आहे. तुमच्यासारख्या विचारवंतांनी काही बोलले तरी त्यावर त्याप्रमाणे कृती करायला मोदी अजिबात बांधिल नाहीत. राहिली गोष्ट माया कोडनानींची. आणि राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात हरकिशनलाल भगत होते, जगदिश टायटलर अगदी २००५ पर्यंत मंत्री होते, सज्जन कुमार अगदी अलीकडच्या काळापर्यंत खासदार होते हे प्रश्न तुमच्यासारखे विचारवंत का विचारायला जात नाहीत?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हल्ली "विचारवंत" हा शब्द वाचला की "विचारजंत" हाच शब्द जास्त योग्य वाटायला लागतो... असो

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आदिती देवीं नंतर ते ठराविक लोक नाही आले

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे हे सापडलं:
तुम्हाला ते वाक्य जिथे सापडले तेथेच "The neutrality of this article is disputed." असे देखील लिहीलेले आहे. असो. त्या व्यतिरीक्त असल्या (तुम्ही वर उर्धृत केलेल्या) कोटेशन्सना Contextomy - Fallacy of quoting out of context म्हणतात. ती डाव्या/कम्युनिस्टांमधे जास्त आढळणारी पद्धत आहे. गोबेल्सच्या तंत्रासारखेच काहीतरी. गोळवलकरांचे ते विधान ज्या वर्षातले आहे, त्याच सुमारास (किंचित आधीच) जेंव्हा टाईम मॅगझिनने हिटलरला पर्सन ऑफ दी इयर म्हणलेले होते. त्याच वर्षात हिटलरला नोबेल शांतता पुरस्कारासाठी देखील विचारात घेतले होते. विकीवर गोळवलकरांची अजूनही दोन नंतरची विधाने सापडली: "The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians." आणि "The Jews had maintained their race, religion, culture and language; and all they wanted was their natural territory to complete their Nationality" अजून बरेच काही लिहीता येईल.

In reply to by हारुन शेख

@अदिती : हो... हारून शेख म्हणतात त्याप्रमाणे तत्त्वतः सारखेच. (मात्र अजूनही मोदींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेतच.) तुझ्याशी सहमत आहे. मात्र स्केलचा फरक असल्याने तुल्यबळ नाही. बाकी माझ्या मूळ प्रतिसादात मी फक्त प्रश्न विचारला होता, त्याला तुलना समजणार्‍यांबद्दल काय बोलावे! :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>>हो... हारून शेख म्हणतात त्याप्रमाणे तत्त्वतः सारखेच. (मात्र अजूनही मोदींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेतच.) तुझ्याशी सहमत आहे. मात्र स्केलचा फरक असल्याने तुल्यबळ नाही. आरोप सिद्ध झाले नसतील तर तत्वतः सारखे कसे म्हणता येईल? तत्वतः सारखे म्हणण्यासाठी कृतीतील साधर्म्य सिद्ध व्हायला हवे, तुल्यबळता त्यानंतर विचारात घेता येईल. आरोप सिद्ध होण्यापूर्वी साधर्म्य आहे असे मानणे / लिहिणे / प्रतिपादन करणे याचा अर्थ आरोप सिद्ध होवो न होवो साधर्म्य मानले आहे असे दिसते. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास वक्तव्याला पुष्टी मिळेल परंतु न्यायालयात आरोप सिद्ध न झाल्यास वक्तव्य मागे घ्यावे लागेल. न घेतल्यास न्यायालयीन प्रक्रियेला किंमत देत नाही असे होते, आणि असे वक्तव्य मागे घेतल्यास न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापुर्वीच निष्कर्ष तो सुद्धा सोईस्कर काढून मोकळे झाले होते असे सिद्ध होईल. एकंदरीत केवळ विचारवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेला आटापीटा एवढंच ह्या वक्तव्याचा अर्थ. बिका, माफ करा पण इतके हास्यास्पद विचार कधीच नव्हते तुमचे. वाईट वाटले.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

माया कोदनानी, अमित .... (आडनाव विसरले, शहा बहुतेक) या मोदींच्या मंत्रीमंडळातल्या लोकांवरचे आरोप आधीच सिद्ध झालेले आहेत. लिंका शोधून आणू का स्वतःच्या स्वतः शोधणार? त्यातून कोदनानी सिंधी म्हणून मोदींनी त्यांना पाठीशी घातलं नाही, गुजराथी मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला वगैरेंच्या लिंकाही स्वतःच शोधून घेतल्यात तर बरं. (मला व्यक्तिशः) "तत्त्वतः सारखेच" याचा (सध्याचा) अर्थ वाचायला आवडेल.

In reply to by हारुन शेख

हे तुम्ही काश्मीरमध्ये जे ९० सालापासून चालू आहे त्याबद्दल म्हणत आहात का?

In reply to by हारुन शेख

तशी सिद्ध झालेली अनेक एकजाम्पलस इतिहासात आणि आतासुद्धा आहेतच की, हिटलरपरयन्त जायची पन गरज नाय... फक्त डोळे उघडून आजूबाजुला बघायला शिकले पाहिजे आणि खरे स्विकारण्याची हिम्मत असायला पाहिजे, बस. मात्र सिद्ध न झालेल्या गोष्टी सतत उगाळत राहण्याला आणि सिद्ध झालेल्या गोष्टींकडे ब्लाइंड आय करण्याला हायपोक्रसी म्हणतात असे वाचले आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

फक्त ज्युची ह्त्या केली एवढ्याच गोष्टी जास्त पुढारपणाने सांगितल्या जातात. पण का केली ह्या मागे हिट्लरची भावना काय होती. जर्मनीचा पहिल्या महायुद्धात झालेला पराभव हा ज्यु मुळे झाला म्ह्णुन त्याने त्यांचीच कत्तल केली. आणि आपल्या राष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा हिटलरने सुड उगवला. ज्या प्रकारे स्व:ता च्या राष्ट्राला पुन्हा जो मान मिळ्वुन दिला. हिटलर मध्ल्या त्या राष्ट्र्भक्ताला सलाम. आणि आता राहिलं मोदीं च्या सलामाचं तर असे बरेच राजकारणी आपल्या देशात आहेत. पण ते फक्त खाण्यातच व्यस्त.खाण्याबद्द्ल माझ काही म्ह्णणे नाही. पण ते फक्त लोकांना दिसेल असा पैसाच खात आहेत. त्यांना दिसतील अशी काम करण्याच्या नावाने मात्र बोंब आहे

वी हाय्झन झी? कस्काय चाल्लंय?रुडी हाय ना?

चंगेजखान, नादिरशाह, महम्मद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी वगैरे इतिहासातले अनेक दाखले आहेत. या सगळ्या क्रूरकर्म्यांनी त्यांच्या तथाकथित 'राष्ट्रां'चा भरपूर विस्तार केला होता. पुराणकालात तर वृत्रासुरापासून भस्मासुरापर्यंत अनेक असुरांनी माणसांचा संहार करून त्यांच्या लोकसंख्येला आळा घातला होता आणि त्यांना दानवांच्या अधिपत्याखाली आणले होते. त्या लोकांच्या दृष्टीने ते सगळे हिटलर इतकेच महान होते असे म्हणावे लागेल. त्या सर्वांचा जयजयकार करणारे त्यांचे चाहते त्यांच्या काळात उदंड होतेच, पण आता नव्याने त्यांचे गुणगान करणारे तयार झाले आहेत वाटते!

In reply to by आनंद घारे

चंगेझ खान ह्या व्यक्तीला आख्खे मंगोलिया राष्ट्र खरोखरच मंगोलियाचा संस्थापक मानते. तिथे त्याला जबरादस्त मान आहे. जो मान फ्रान्स मध्ये नेपोलियनला; महाराष्ट्रात शिवाजींना त्याच धर्तीवरचा संस्थापकाचा मान खरोखरच त्याला तिकडे दिला जातो. बाकी तुम्ही जी नावे घेतली त्यातले कुणी एकदम देशाचे कायमचे आयकॉन अजून बनलेले नाहित. पण नादिरशहाचा आधीचा सरदार आणि नंतर त्याच्या बहुतांश साम्राज्याचा वरसदार अहमदशाह अब्दाली/दुर्रानी ह्याला मात्र अफगाणिस्तानात तोच मान आहे. त्याला जणू राष्ट्रनिर्माता मान्तात.

In reply to by मन१

चंगिझ मंगोलियाच काय ८% आशियाचा आद्य पितामह आणि म्हणूनच सर्वात 'सक्सेसफुल' अल्फा मेल आहे. ;) बाकी कोणाचे तसे कर्तृत्त्व कुठे? :P बाकी घारे सरांशी सहमत आहेच.. फक्त हे सम्यक मत इथे- या धाग्यावर - अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता अधिक

In reply to by बाळ सप्रे

त्यांच्या देशाच्या संविधानाशी आपल्याला काय देणे घेणे ? तसे आपल्या देशाच्या संविधानाशी पण कुठे आहे म्हणा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तसे आपल्या देशाच्या संविधानाशी पण कुठे आहे म्हणा.
सहमत...

In reply to by बाळ सप्रे

"राष्ट्रभक्त" ?? संविधानिक आहे का आधी पाहून घ्या !! >>>वाह बाळ साहेब !! आजि म्या धन्य जाहलो ! --------------------------------------------------- धन्योSहं धन्योSहं कर्तव्यं मे न विद्यते क्वचित् ||

हिटलर हा राष्ट्रभक्त होता.. आणि त्याने जो नरसंहार केला तो त्याच्या राष्ट्रप्रेमामुळे हे अजिबात सत्य नाहीये. त्याने सुरूवातीचे जे विजय मिळवले ते धक्का तंत्राचा वापर करून. सारे जण बेसावध होते. जर्मनीने केलेल्या प्रचंड युद्ध तयारीची कानोकान खबर कुणाला नव्हती. इतके की इंग्लंडचे पंतप्रधान चेंबर्लेन हे जर्मन भेटीवर आले असताना त्याना जराही संशय आला नाही. पण सुरूवातीच्या काही नेत्रदीपक विजयां नंतर पराभवांची मालीका सुरू झाली. विशेषतः रशिया आणि अफ्रिका मधे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या त्याच्या अचिव्हमेंटस काही काळापुरत्याच होत्या. १९३९ मधे युद्ध सुरू झाले, आणि साधारण १९४२ नंतर त्याला कुठल्याच आघाडीवर विजय मिळवता आला नाही. ( काही जण म्हणतात हिटलर चे जे युद्धखोर साथी होते जोडल, कायटेल वगैरे त्यांनी बर्‍याच बाबतीत त्याला अंधारातच ठेवले होते.) पहिल्या महायुद्धात तो एक मेसेंजर म्हणून सैन्यात काम करीत होता . पण त्याला एक कलाकार व्हायचे होते. व्हिएना च्या प्रसिद्ध आर्ट्स्कूल ची प्रवेश परीक्षा त्याने दिली त्यात त्याची निवड झाली नाही. त्याच्याकडे काम नव्हते, हाती पैसा नव्हता. त्यावेळी त्याच्या वाचनात ज्यु धर्मियांच्या विरोधातील काही पत्रकं लागली. ती वाचून त्याने त्या लेखकाचे (आत्ता नाव आठवत नाहीये ) सर्वं साहित्य वाचले. ही त्याच्या ज्यु द्वेषाची सुरूवात होती. त्याच्या मागे कसलीही वैचारीक बैठक अथवा अनुभव नाही. त्या काळात जर्मनीतच नाही तर युरोप मधील अनेक देशात ज्यु द्वेष होता कारण ज्यु लोकं हे सावकारी करीत. आणि त्या जोरावर देशातील आर्थिक व्यवस्थेत त्यांचा वरचष्मा असे. तसेच ते ऑर्थोडॉक्स आणि समाजापासून काहीसे वेगळे रहाणारे असे होते. त्यामुळे ज्यु द्वेष पसरवणे अथवा त्याबद्दल भाषण करणे हे लोकमत आपल्याकडे वळवण्याचे आमिष होते. हिटलर ने त्याचा पुरेपुर वापर केला. त्याने सत्ता मिळवण्यासाठी अनेक बर्‍यावाईट तंत्रांचा वापर केला, प्रसंगी आपल्या निष्ठावान मित्रांचा विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहिले नाही. एक म्हणता येईल की जो नरसंहार झाला त्यात अनेक जण सहभागी होते. म्हणजे या पापात बरेच वाटेकरी होते (ज्यांनी शरणागती पत्करल्यावर ही जबाबदारी नाकारली आणि सर्व दोष हिटलरच्या माथी मारले ) पण म्हणून या पापाची तिव्रता कमी होत नाही. हिटलर बद्दल त्याच्या पितृभूमितच तिरस्काराची भावना आहे. आज तेथे कुणीही हिटलर हे अडनाव लावित नाही. त्याच्या नातेवाईकांनी देखिल युद्धानंतर ते नाव सोडून हाईडलर किंवा असेच दूसरे नाव स्विकारले. हेन्री शिरेर हा त्या काळात युद्धवार्ताहार म्हणून काम करीत होता. त्याने लिहिलेले ' राईज अ‍ॅण्ड फॉल ऑफ थर्ड राईश' हे पुस्तक जरूर वाचा. मग हिटलर स्तुतीचा लेख तुम्हाला परत लिहावासा वाटणार नाही.

In reply to by मनीषा

तुम्ही स्वतः The Rise and Fall of the Third Reich हे पुस्तक वाचले आहे का? तसे वाटत नाही. कारण १. मूळातच या पुस्तकावर हिटलरच्या उदात्तीकरणाचा उदंड आरोप होतो. मी स्वत: ते वाचलेले आहे आणि मलाही तसेच वाटले. २. पुस्तकाचे लेखक हेन्री शिरर नव्हे तर विल्यम एल शिरर आहेत.

त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने
धमकी न्व्हे कपटाच्या जोरावर मिळवले असेच मी म्हणेन!

हिटलर राष्ट्रभक्त असेलही पण प्रखर राष्ट्रवादाचे स्तोम माजवून त्याने मानवतेला काळिमा फासणारी जी अघोर कृत्ये केली ती समर्थनीय ठरू नयेत. एका ज्यू छळछावणीतल्या निष्पाप लहान मुलांनी गॅसचेंबरच्या भिंतींवर मरण्यापूर्वी फुलपाखरे काढली होती त्याची छायाचित्रे holocaust संग्रहालयात बघितलेली आहेत. डोळ्यात पाणी आले होते. आणि आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या क्रूर कृत्यात जर्मन समाज उस्फुर्तपणे सहभागी होता. शिक्षित असूनही, आधुनिक मुल्ये मानणारा असुनही, विज्ञाननिष्ठ असुनही हा समाज आंधळेपणाने हिटलरच्या मागे गेला. प्रखर राष्ट्रवाद हि फार भयाण मोहिनी आहे. शिक्षण, विज्ञान, माणुसकी यांना ती पुरून उरते आणि रक्तरंजित इतिहास लिहिला जातो. राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.

In reply to by हारुन शेख

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.
या वाक्याशी संपूर्ण सहमत. कुठ्ल्याही गोष्टीचे आंधळे समर्थन व आंधळा विरोध हे चूकीचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंगजी मी तुमच्या मताशी पुर्ण सहमत आहे. आज अमेरिकेला सर्व बलाढ्य,प्रगत राष्ट्र म्हणतात. पण त्यांनी ही दोन अणुसंहारक ह्ल्ले केले. त्यात निष्पाप लोक नव्ह्ती का मेली? तरी गाता ना अमेरिकेचे गोडवे

जहा सच ना चले वहा झुठ सही, जहा हक ना मिले वहा लुट सही


In reply to by अनिकेतदळवी

अनिकेतभाऊ - मी कधीही कुठेही कुणाच्याही युद्धखेरीचे समर्थन केलेले नाहीये. एखाद्या व्यक्तिच्या अथवा देशाच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणे म्हणजे त्यांच्या वाईट कृत्यांचे समर्थन करणे नव्हे.

In reply to by श्रीरंग_जोशी

exactly श्रीरंग दादा माझं देखील हेच म्हणणं आहे मी हिटलरच्या चांगल्या गुणाचं कौतूक केले आहे त्याच्या वाईट गोष्टींच समर्थन नाही, (काही वाक्ंयातून असा आशय निघत असल्यास क्षमस्व)

In reply to by अनिकेतदळवी

लेखामध्ये माहितीचे संकलन नक्कीच चांगले आहे. परंतु जी सुरूवात आहे त्यात "हिटलरची अमानवी कार्ये काही वेळाकरिता बाजूला ठेवल्यास त्याचे जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न मी करतोय" असे काहीसे लिहिले असते तर थोडे अधिक संतुलन साधले गेले असते. माणसाची थोडी वाईट कामेही त्याच्या चांगल्या कामांवर पांघरूण घालतात अन इथे तर वाईटपणाचा काही अंतच नाही. एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन. अशाच विषयांवर अधिक वाचायला आवडेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

हिटलरची अमानवी कार्ये काही वेळाकरिता बाजूला ठेवल्यास त्याचे जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न मी करतोय
बात हजम नही होती है. त्याची अमानवी कार्ये सोडल्यास खाली शून्य उरते, हे कृपया ध्यानी घ्या. पण तुम्ही चांगली बाजू पहातच आहात, तर वीरप्पन, ओसामा बिन लादेन, सद्दाम हुसेन, जनरल डायर, गझनीचा मोहम्मद, झालेच तर परवाच्या दिल्ली केस मधले आरोपी, यांच्या चांगल्या बाजूंवर लेख येऊ द्या. वाचनोत्सुक आनंदी (गोपाळ)

In reply to by श्रीरंग_जोशी

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी. या वाक्याशी संपूर्ण सहमत. कुठ्ल्याही गोष्टीचे आंधळे समर्थन व आंधळा विरोध हे चूकीचेच. या वाक्याशी संपूर्ण सहमत. - अगदी प्रत्येक वेळी बोटचेप्या मांणुसकीचेही आंधळे समर्थन चुकीचेच.

In reply to by ५० फक्त

अक्षय खन्ना म्हणतो, "तो पाकिस्तानी सैनिक माझ्यासारखा माणूस आहे, मी त्याला का गोळ्या घालू?" त्यावर सन्नी म्हणतो, "जर तू त्याला गोळ्या घातल्या नाहीस तर तो तुला गोळ्या घालेल."

In reply to by पैसा

+१ >> राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी >> ह्म्म्म.. depends.. case to case basis.. माणुसकीची व्याख्या काय? कसाब आणी अफजल ला फाशी द्याल का माणुसकी म्हणुन सोडाल? --------------------- १ म्हणः- ओल्याबरोबर सुकं पण जळतं.. ---------------------