Skip to main content

'कविता'

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 22/05/2018 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
दुःखाच्या डोहामधुनी करुणेची येते गाज कुठलेसे पान तरंगत लहरींना देते व्याज कलतात उन्हे सोनेरी रंगांची उधळत माया डोहावर पसरत जाती वृक्षांच्या काजळ छाया ती काठावरती बसते बुडवून स्वतःचे पाय अन् हा हा म्हणता येते पाण्यावर मोहक साय मी 'कविता',वाचत असता ती शांतच असते बहुधा जणु चंद्रसरींनी भिजते नित-निळी सावळी वसुधा! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 6329
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

सुंदर कविता आणि कच्चामाल ! अवांतर : (सविता) असे अतिषय सुंदर विडंबन तत्काळ सुचले ! लिहायला घेतले होते पण लिहायला घेतल्यावर एस्पिशली ' शेवटच्या कडव्यावरील विडंबीत कडवे' लिहिल्यावर लक्षात आले की कविता ( आणि कदाचित आयडी देखील) संपादित होइल. तस्मात प्रकाशित करायचे टाळले आहे ;) बाकी ह्या निमित्ताने परत सविताची आठवण झाली हे ही नसे थोडके !

In reply to by प्रसाद गोडबोले

मम मी सविताच्या ऐवजी कविथा डोक्यात बनवत होतो =)) बाकी तू लिहिलेली क्विता व्यनीत नाहीतर कायप्पावर पाठव

In reply to by टवाळ कार्टा

हन्त हन्त तुला सविता भाभी सोडुन कविथा आठवावी . छ्या हेच का ते अच्छे दिन ! =))))

कविता छान आहे. 'ग्रेस' ची आठवण आली. फक्त हे कडवं नीटसं समजलं नाही. कुठलेसे पान तरंगत लहरींना देते व्याज हा व्याज शब्द जरासा विसंगत वाटला एकूण कवितेशी. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले. कवीचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

In reply to by एस

तो फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असेल. ;) किंबहुना झाडाने पाणी घेतले कर्जाऊ त्याची परतफेड म्हणून पान दिले असावे. आता ते डुबले तर पाण्याला वाईट वाटेल म्हणून तरंगत राहात व्याज देत असेल.

फार सुंदर रचना.

लिहित राहा. ती काठावरती बसते बुडवून स्वतःचे पाय अन् हा हा म्हणता येते पाण्यावर मोहक साय. लैच आवडल्या चार ओळी. -दिलीप बिरुटे

शेवटच्या चार ओळी खास ! पहिल्या चार ओळी अशा चालतील बहुधा : 'दुःखाच्या दर्यामधुनी करुणेची येते गाज कुठलेसे पान तरंगत लहरींना देते साज'

सहसा ठरवून कविता लिहून होतंच नाही कधी! ती अशीच अवचित सुचून जाते कधीतरी! सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक खूप-खूप धन्यवाद!

मस्तच ,, सुंदर विचारांची सलामी दिलीय काव्यदेवतेला . ह्या अश्या फैरी झडल्या मंचावर , कि सार्थक झाल्यासारखं वाटत . सिद्धेश्वर विलास पाटणकर