एकाच माळेचे मणी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.
पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.
बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या. पुलंच्या बटाट्यांच्या चाळीतल्या उपवासाचा आणि समाजाच्या भूखेचा संबध जोडला. अरेरे! पुलंचा विनोद त्यांना कळला नसेल असे मी समजून घेतले. पुढे बाई “हिरवेहिरवे गार गालिच्यावर घसरल्या ”, बालकवींची लायकी काढली, ही कविता शालेय अभ्यासक्रमात असू नये असे त्यांचे म्हणणे ; कारण मराठवाड्यात दुष्काळ आहे तर कोठून येणार हिरवे हिरवे गार गालिचे? अरे बाई मराठवाड्यातल्या लोकांना कमीत कमी कवितेत तरी गार गालिचे बघू देत कि असे मला म्हणावे वाटले. पुढे हे सर्व नको तर काय शिकवायला हवे ? नारायण सुर्वेंची, “भाकारीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली”, ही कविता शिकवायला हवी असे त्या म्हणाल्या . पण ती तर आधीच अभ्यासक्रमात आहे हे बहुधा त्या विसरल्यात.
पुढे १०+२ +३ वर आल्या.. नंतर बाई इतिहास, साहित्यावरून गणितावर आल्या... कशाला हवे म्हणे कॉस थीटा मायनस साईन थीटा... आता मात्र माझे टाळके सटकले , बाईंना काय माहित कॉस थीटा मायनस साईन थीटा कशाला वापरतात... बाईना काय माहित कोणता इंजिनिअर हे सर्व वापरतो, बाईना काय माहित मंगळावर यान कसे पोहचले, किती गणिते करावी लागली? अजून बाईना काय माहित कि मोठ्या मोठ्या मशीन्स कशा बनतात , त्यात ह्या कॉस साईन Tan चा काय उपयोग, कसा माहित असेल? बाई कायद्याच्या पदवीधर होत्या, एखादी सायन्स रिलेटेड केस बाई कशा काय सोडवणार, ते जावूदे पण ज्या समाजाला त्या उद्देशून बोलत होत्या त्या समाजाने फक्त कामगार म्हणूनच जगावे आणि भाकरी मिळवावी अशी त्यांची भाषा होती, इंजिनिअर वैगेरे असली स्वप्ने पहा, किंवा साहित्यातले दर्दी व्हा असे सांगत नव्हत्या.
असो, सांगण्याचा मुद्दा हा कि प्रत्यकाने अभ्यासून प्रकट व्हायला पाहिजे, जोरजोरात चुकीचे सांगू नये. समाज चुकीच्या दिशेला भरकटू शकतो. त्या रामतीर्थकर बाई काय किंवा ह्या बाई काय किंवा ते फक्त ईश्वर भक्तीत विलीन व्हा असे सांगणारे बुवा काय किंवा हाच एक पंथ बरोबर असे सांगणारे काय, किंवा आता श्रमदानावर टीका करणारे काय किंवा मोदी भक्त काय...सारेच एका माळेचे मणी.
आपल्याला एवढे लोक फोलो करतात तर किमान त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नये इतकाही विवेक लोक ठेवत नाहीत.
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
प्रतिक्रिया
एक्झॅटली पर्फेक्ट!!
सारेच एका माळेचे मणी
ही घ्या लिंक
विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही
परफेक्ट रे मारक्या.
खतरनाकच !
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन
पशूवत वर्तन
मुद्दा त्यांनी काय सांगावे हा
खरयं, भक्त कुठल्या थराला
काय बोलायचं?
काहीच नाही
हॉरिबल बोलतात त्या बाई !
लोकांनी अक्कल गहाण ठेवलीय....
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला
त्या फक्त >>>"शाळांमधून
वक्त्याच्या सगळ्या गोष्टी
लोकं लय ७२ खोडींची असतात.
ऐकताना संताप येतो पण जयंत सर
म्हणजे 'गोड बोलून गळा कापायचा
रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण
अजून एक...
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त
ओके
फक्त वाद घालायचा म्हणुन
फक्त वादच घालायसाठी धागेही
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला
मी अशी चार लोकांसमोर माझे
रामतीर्थकर बाईंबद्दल खालील
रा.ती. बाई
नवरा हेच आपले आयुष्य मानावे :
कुणी लग्न करू नये?
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा
लग्न झाल्यावर मुलीने आईशी
आई नावाची मैत्रीण
माझे मत
खरंय..पण
त्या बाई जे काय म्हणतात ते
तुमचं बरोबरे
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे
दुर्लक्षमं अतिप्रभावशालीम्
वरच्या लिंक मधला विडिओ अपर्णा
मी माझ्या लेखात रामतीर्थकर
अंधारे बाई इतक्या टाकाऊ
शिक्षणाचं औचित्य
मला त्या बाईंचं समर्थन अजिबात
रचनात्मक टीका
रचनात्मक हवी हे मान्यच. पण
वंचित म्हणजे काय?
Pagination