✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.

स
सुभाष यांनी
गुरुवार, 03/05/2009 - 03:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4899 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

छान लेख !!!

शेन्डेफळ
गुरुवार, 03/05/2009 - 06:37 नवीन
जावळीच्या खोर्यात भोरप्याचा डोंगर होता,त्यावर किल्ला बांधला...प्रतापगड प्रतापगड नाहि राजगड.. शेन्डेफळ
  • Log in or register to post comments

राजगड

भडकमकर मास्तर
गुरुवार, 03/05/2009 - 09:24 नवीन
राजगड मुरुंबदेवाच्या डोंगरावर बांधला... राजगड माझ्या माहितीप्रमाणे जावळीत येत नाही.... की येतो? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेन्डेफळ

जावळीच्या खोर्यात प्रतापगडच बांधला

सुभाष
Fri, 03/06/2009 - 01:10 नवीन
जावळीच्या खोर्यात भोरप्याच्या डोंगरावर प्रतापगड बांधला.राजगड मुरुमदेवाच्या डोंगरावर बांधला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेन्डेफळ

चांगला

सखाराम_गटणे™
गुरुवार, 03/05/2009 - 07:35 नवीन
चांगला लेख ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments

फालतू लेख!!!!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/05/2009 - 09:35 नवीन
शिवाजी महाराजांनी केलेल्या लूटीबद्दल कधीच कुणा मराठी माणसांनं आजवर तक्रार केलेली वाचनात नाही......... जर शत्रूने तक्रार केलेली असेल तर "टू बॅड!!!!!!!!!" शत्रूला लुटून पूर्ण नागवायचंच असतं........ हा तर खास मराठी बाणा आहे....... मग या लेखाचे प्रयोजन ते काय? कॄपया शिवाजी महाराजांना गांधीवादात बसवू नका!!!! ते गांधीवादापेक्षा कितीतरी पटीने थोर आहेत!!!!!!
  • Log in or register to post comments

+१

विकास
गुरुवार, 03/05/2009 - 18:17 नवीन
एकदम मान्य. लेखाचा उद्देश कळला नाही पण उगाच गरज नसताना "जस्टीफाय" अथवा "बचावात्मक" पवित्रा घेण्याची गरज नाही. इतर कोणी काही म्हणले (असले भारतीय महाभाग मला माहीत आहेत पण तो वेगळा विषय...) टू बॅड...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

लुट

सुभाष
Fri, 03/06/2009 - 02:19 नवीन
श्री.विकास. कोणाचीहि लुट ही कांही आनंदाची गोष्ट नसते.महाराजांनाहि नाइलाजाने लुट करवी लागत होती......स्वराज्याच्या संरक्षणाकरिता,स्वराज्य वाढविण्यासाठी.इस्लामी अक्रमकांच्या लुटी मध्ये अन महाराजांच्या लुटीमध्ये काय फरक होता हे समजण्यासाठीच आणि महाराज न समजलेल्या मराठी आणि अमराठी लोकांना ते समजावेत इतकाच या लेखाचा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

धन्यवाद

विकास
Fri, 03/06/2009 - 07:03 नवीन
नमस्कार सुभाष, खुलाशाबद्दल धन्यवाद. मात्र वर आधी म्हणल्याप्रमाणे शिवाजी संदर्भात बचावात्मक होण्याचे काहीच कारण नाही. अगदी त्याच्या विरोधात पण बोलणारे आले तरी. समाजाला खरा परतंत्र कधी होतो? जेंव्हा त्याला स्वत:च्या इतिहासाबद्दल हकनाक लाज बाळगायला लावणारे यशस्वी होतात तेंव्हा. शिवाजी हे असे एक ऐतिहासीक महत्व आहे ज्याला धक्का लागला तर त्याचे निगेटीव्ह पडसाद हे समाजमनावर मोठ्याप्रमाणावर अगदी "सटली" पडू शकतात. आज अनेक "बुद्धीवंत" तसा प्रयत्न करत आहेत. त्यांना उत्तरे देयची ती "तुका म्हणे ऐशा नरा..." सारखीच. शिवाजीने स्वतःसाठी लूट केली नाही, शिवाजीने आधी अफझलखानाला मारले नाही तर अफझलखानाने त्यावर वार केला म्हणून शिवाजीने वार केला वगैरे म्हणणे याला काही अर्थ नाही. शिवाजी हा परकीय सत्तेच्या, ती ही अमानुष सत्ता, विळख्यातून स्वजननांना सोडवण्यासाठि ३ तपे झटला. युद्धातील सर्व कूटनिती त्याने वापरली. मला वाटते सावरकरांच्या या संदर्भात ओळी आहेत ज्या त्यांनी शिवाजी कसा वागला हे सांगताना लिहील्या आहेत, त्या लक्षात ठेवा आणि असला बचावात्मक पवित्रा विसरून जा... साप विखारी देशजननीचा ये घेया चावा, अवचीत गाठूनी ठकवूनी भुलवुनी, कसाही ठेचावा. अर्थात याचा अर्थ शिवाजीच्या नावाने आज लूट करावी अथवा (जसे असेल तसे पण) स्वराज्यात कायदा हातात घ्यावा असा मात्र याचा अर्थ नाही! त्याचा आदर्श आणि त्याचे "ऍप्लिकेशन" आता वेगळ्या पद्धतीने करावे लागेल. आशा करतो की माझी भुमिका समजली असेल. बाकी आपले शिवाजी आणि इतर विषयांवरील लिखाण अवश्य चालू ठेवा ही विनंती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुभाष

माफ करा...आपल्याला महाराज समजलेच नाहीत.

सुभाष
Fri, 03/06/2009 - 02:10 नवीन
श्री.पिवळा डांबिस यांस शत्रूला लुटून पूर्ण नागवायचंच असतं........ हा तर खास मराठी बाणा आहे....... असं आपले म्हणणे दिसते....पण महाराजांचे म्हणणे/वागणे आपल्या म्हणण्याच्या अगदी उलट आहे.शत्रुप्रदेशातसुद्धा लुट करताना स्त्रिया,धार्मिक स्थळे,गरिब प्रजाजन यांना लुटीमधुन वगळण्याच्या महाराजांच्याच आज्ञा होत्या हे आपल्याला माहिती दिसत नाही.शत्रुला पूर्ण लुटून नागवायचं असते असे शिवाजी महाराजांचे धोरण होते की हे आपले मत आहे कां ?आपण म्हणता त्याप्रमाणे महाराजांचे धोरण असले तर त्यांनी सुरत लुटीच्या वेळी डच विधवा श्रीमंत स्त्रीच्या संपत्तीला हातहि लाऊ नका अशा आपल्या सैन्याला आज्ञा होती आणि ती सैन्याने पाळली होती हे कसे? शत्रूला लुटून पूर्ण नागवायचंच असतं........ हा तर खास मराठी बाणा आहे....... माफ करा.. हा बाणा मराठी नाही.... हा औरंगजेबी बाणा आहे.मुस्लिमांनी लुटालुट करताना शत्रुला पूर्ण लुटायचे...धन्,जवाहिर्,धान्य,बायका,जनावरे...घरेदारे उध्वस्थ करायचे.इतकेच नाही तर निरापराध नागरिकांची कत्तल व्हायची. हाच खरा मराठी बाणा आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? शत्रु प्रदेशामधिल सर्वसामन्य नागरिकांना...प्रजेला महाराजांच्या सैन्याने कधीच नागवले नाही,पण शरण आलेल्या सत्रुच्या सैनिकांचीहि महाराजांनी कत्तल केली नाही.त्याना कैद केले,जे आपल्याकडे येण्यास तयार असतील त्यांना आपल्या नोकरीत ठेवले ज्यांना महाराजांकडे नोकरी करयची नाही त्याना त्यांच्या इच्छेप्रमाणे जाऊ दिले जायचे...कदाचित ही आपल्याला गांधीगिरी वाटेल पण हे सत्य आहे.महाराज अतिशय नितिमान,चारित्रवान,सुसंस्कृत होते...शत्रुला लुटून पुर्ण नागवायला ते इस्लमी अक्रमकांसारखे असंकृत नव्हते.माफ करा...आपल्याला महाराज समजलेच नाहीत. कोणाचीहि लुट ही कांही आनंदाची गोष्ट नसते.महाराजांनाहि नाइलाजाने लुट करवी लागत होती......स्वराज्याच्या संरक्षणाकरिता,स्वराज्य वाढविण्यासाठी.इस्लामी अक्रमकांच्या लुटी मध्ये अन महाराजांच्या लुटीमध्ये काय फरक होता हे समजण्यासाठीच आणि महाराज न समजलेल्या मराठी आणि अमराठी लोकांना ते समजावेत इतकाच या लेखाचा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

शिवाजी महाराजांबद्द्ल कोणताही वाद टाळा

पाषाणभेद
गुरुवार, 03/05/2009 - 12:18 नवीन
शिवाजी महाराज खरोखरच महान होते. अजूनही आपण सामान्य माणूस त्यांची महती ओळखू शकत नाही. त्यांच्याकडे सर्व धर्माचे लोक नोकरीस होते. परस्त्री बद्द्ल आदर, माणुस ओळखणे, मॅनेजरेकल स्किल्स, युध्दनिती आदी. गुण तर वाखाणण्याजोगे होते. (हे दाखवणे हेच लेखकाचे प्रयत्न असावे.) दुसर्‍याचा हिरमोड करू नये. असले वाद घालु नका. लेख चांगलाच आहे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

+१

दशानन
गुरुवार, 03/05/2009 - 12:23 नवीन
शिवाजी महाराज .. ह्या शब्दा पलीकडे मला काहीच माहीत नाही व माहीती करुन घ्यायची ही नाही आहे, एकदा देव मानला की देवच... शंका कुशंका... आम्ही मनात घेतच नाही. ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

+१०००१%सहमत

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 03/09/2009 - 13:59 नवीन
एकदा देव मानला की देवच... शंका कुशंका... आम्ही मनात घेतच नाही. राजेंशी सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

फक्त याच गुणांचा अभ्यास व्हावा असा आपला अट्टाहास कां?

सुभाष
Fri, 03/06/2009 - 02:35 नवीन
श्री.पाषाणभेद यांस, परस्त्री बद्द्ल आदर, माणुस ओळखणे, मॅनेजरेकल स्किल्स, युध्दनिती आदी. गुण तर वाखाणण्याजोगे होते. (हे दाखवणे हेच लेखकाचे प्रयत्न असावे.)असे आपण म्हणता.मी आपल्या मतांशी ५०% सहमत आहे.फक्त याच गुणांचा अभ्यास व्हावा असा आपला अट्टाहास कां? महाराजांचा गनिमी कावा,नुतन आरमार उभारणे,राज्याभिषेक,गडकोटकिल्ल्यांबद्दलची त्यांची आस्था..काळजी अशा महाराजांच्या अनेक अंगांवर अभ्यास झाला पाहिजे.तत्कालीन राज्यकर्ते अन शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारपद्धतीमधील फरक्..उदा.वतनदारी पद्धती संपविणे...यावरहि अभ्यास झाला पाहीजे असे मला वाटते.इतर इस्लमिक राज्यकर्ते अन शिवाजी महाराजांच्या लुटी मधील फरक लक्षात यावा या उद्देशाने हा लेख लिहीला आहे सुभाष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

तेच म्हणतो

पाषाणभेद
गुरुवार, 03/05/2009 - 12:24 नवीन
तेच म्हणतो -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

ले़ख आवडला

चिरोटा
गुरुवार, 03/05/2009 - 16:09 नवीन
एकच गोष्ट नमुद कराविशि वाटते-इतिहास्कालिन राजे/महाराजे/बादशहा ह्यान्चे राज्य चालवणे आणि त्याचा विस्तार हे प्रमुख धोरण असे.खुद्द शहाजि राजे अदिल्शाहाकडे सरदार होते.आणि औरन्ग्झेबाकडे तर रजपुत,ब्राम्हण सेवेस होतेच. शिवाजि महराजान्चा मोठेपणा ह्यात की स्वराज्यच्या कारभारात कधि धर्म आणला नाहि. अनेकानि धर्म फायद्यासाठि वापरला.
  • Log in or register to post comments

http://www.orkut.co.in/Main#C

शैलेन्द्र
गुरुवार, 03/05/2009 - 17:27 नवीन
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=21177&tid=2507303423813126815&kw=maratha+robbers&na=4&nst=11&nid=21177-2507303423813126815-2507459900244427668 हे वाचा, फार मजेदार आहे... शेवटुन सुरवात केलीत तरी चालेल... मग हेहि वाचा.. http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=21177&tid=2541434779463605912&kw=shivaji-+an+analysis&na=1&nst=1
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा