Skip to main content

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 02/01/2018 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash… आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?

वाचने 43176
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

+१ हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(

In reply to by एमी

हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-( हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?

In reply to by एमी

हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-( हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?

हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर सणसवाडी दगडफेकीप्रकरणी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

भीमराव आंबेडकरांना त्याचे शिक्षक केळुस्कर ( ब्राह्मण ) बडोद्याचे महाराज सयाजीराव ( मराठा ) यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितले की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, त्याला तुम्ही उच्च शिक्षणासाठी मदत करा. सयाजीराव यांनी दिलेल्या मदतीमुळे आंबेडकर इंग्लडला उच्च शिक्षणासाठी गेले.

काल बातम्या पहिल्या त्याप्रमाणे चॅनेल १-- भिमा कोरेगाव ला स्मारकाचे दर्शन घेण्यास आलेल्या मागास्वर्गीयांवर हल्ला झाला पृथ्वीराज चव्हाण आणि बारामती च्या साहेबांच्या मते एव्हढी गर्दी होणार माहित असून सरकारने काही उपाय योजना केली नाही आणि सरकार अपयशी ठरले आहे. चॅनेल २ - दोन जमावामध्ये हाणामारी झाली, फडणवीस साहेबांच्या मते दरवर्षी १५ हजार लोक येतात पण ह्यावेळी ३ लाख लोक आले , हे लोक मुद्दामहुन जमा केले गेले जेणेकरून सरकार अडचणीत येयील पण पोलिसांच्या तुकड्या आधीच मागवून ठेवल्या होत्या त्यामुळे ज्यास्त इशू झाला नाही खर खोटं देव आणि दंगल करणारेच जाणोत

टिव्ही 9 मराठी चानेलवर जिग्नेश मेवानि सभेमध्ये काय बोलत होता ते काल दाखवत होते.त्यानंतर काही राडा झाला. नंतर प्रतीराडा. हे रेकॉर्डिंग करायला रिमोटचे बटण दाबले तर रेकॉर्डिंग सुरू होईना. परंतू चानेलवाल्यांनी ती क्लिप दाखवणे योग्य नाही समजून बंद केली ते बरे केले. परंतू लोकांनी जरा समजूतदारपणा आणि संयम बाळगायला हवा. एसटी बसेस जाळणाय्रांना गरिबांचे वाली कोण म्हणेल? सरकार कुणाचेही असले तरी जनतेला पोहोचवणारी बस तीच असते ना?

In reply to by कंजूस

दलित आंदोलनामध्ये नेहमी st बस , बेस्ट , ट्रेन यांच्या काचा फोडणे जाळपोळ असे प्रकार होतात व खूप नुकसान होते , यावर एक उपाय सुचला आहे तो असा आहे st, बेस्ट ,रेल्वे यांनी आपल्या ताफ्यातील २५ टक्के गाड्या या फक्त दलित आंदोलकांना तोडफोड करण्यासाठी स्वखुशीने उपलब्ध करून द्याव्यात व त्यासाठी वेगळ्या बजेट ची योजना करावी , तसेच या गाड्यावर तसी सुचना असलेला बोर्ड लावावा . यामुळे तोडफोड केल्याबद्दल खटला दाखल करून कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही , व कुणाला तक्रार ही करता येणार नाही , तसेच आंदोलकांना निर्भयपणे मनसोक्त तोडफोड करता येईल , त्यांचा मान राखला जाईल

In reply to by ओम शतानन्द

हो का? २३ वर्षाचा पोरगा मेला ,तेव्हा सांगायच असत .ब्राम्हणासाठी वेगळी व्यवस्था करु

आपल्या वरकरणी एकसंध दिसणार्‍या समाजातल्या फॉल्टलाईन्स उघड्या पडल्या. दुसरं काय? असे प्रसंग फार दुखःद आहेत. इतिहास उगाळून नक्की कोणता फायदा आपल्या समाजाचा, देशाचा झालाय, होतोय काय माहित? निव्वळ माथेफिरू, हुल्लडांच्या हातात कोलित मिळते. आजच्या प्रश्नांना भिडण्यापेक्षा शेकडो वर्षापुर्वीच्या घटना चिवडत बसणार्‍या समाजाची प्रगती कशी होणार असा खिन्न प्रश्न समोर येतो.

आंबेडकरांसंबंधी काही वादग्रस्त घडले की दलित अत्यंत संतप्त होतात असे माझे निरीक्षण आहे. किंबहुना ते संतप्त होतात हे ओळखून त्यांना जास्त भडकावले जाते. १९८७ मध्ये महाराष्ट्र सरकार आंबेडकरांनी लिहिलेल्या "रिडल्स ऑफ हिंदुइझम" हे पुस्तक प्रकाशित करणार होते. त्या पुस्तकातील "रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण" हे अत्यंत वादग्रस्त प्रकरण सरकारने वगळायचा निर्णय घेतल्यानंतर असेच वातावरण पेटविले गेले. पुस्तकातील प्रकरणांना शिवसेनेचा कट्टर विरोध होता. परंतु प्रकरणे वगळल्याचे जाहीर झाल्यानंतर दलितांना भडकावून मुंबईत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्च्याला प्रत्त्यूत्तर म्हणून त्याच वेळी शिवसेनेने तितकाच मोठा मोर्चा काढला. दोन्ही मोर्चे समोरासमोर आल्यानंतर मुंबईत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी काहीतरी घडले असे अंधुकसे आठवते. नंतर १९९७ मध्ये घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला रातोरात चपलांचा हार घातल्याचे आढळल्यावर त्या भागातील दलित प्रचंड संतप्त झाले होते. त्यावेळी जमावावर पोलिसांकडून गोळीबार होऊन १० जणांचा मृत्यु झाला होता. हे प्रकरण त्यावेळी इतके पेटले होते ही तत्कालीन मनोहर जोषी सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार होती. काँग्रेसने हे प्रकरण खूप पेटविले होते. या प्रकरणाची भाजप-शिवसेना युती सरकारला मोठी किंमत चुकवायला लागली होती. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. परंतु १९९८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत युतीला जेमतेम १० जागा मिळाल्या. त्या निवडणुकीत प्रमोद महाजन पराभूत झाले होते. नंतर १९९९ मधील विधानसभा निवडणुकीतही युतीला १२५ जागांवर समाधान मानून सत्ता गमवाव लागली होती. २०१८ मध्ये झालेली घटना त्याच परंपरेतील आहे. आंबेडकरांनी कोरेगाव येथील स्तंभाला अभिवादन करण्याची प्रथा सुरू केली. त्या अभिवादन कार्यक्रमात दगडफेक झाल्याने पुन्हा एकदा मागचीच पुनरावृत्ती झाली. पुन्हा एकदा असंतुष्ट पुढार्‍यांनी हे प्रकरण पेटविले. एक समाज म्हणून आपण आजही खूपच अप्रगल्भ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ३०-३१ वर्षानंतर सुद्धा आपण अजूनही प्रतिकांमध्येच अडकून पडलो आहोत. वैयक्तिक प्रगतीपेक्षा इतिहासालाच सर्वस्व मानणे, इतिहासातच अडकून पडणे आणि प्रतिकांच्या मानसन्मालाच अवाजवी महत्त्व देणे यातून अजूनही सुटका नाही. जातीयवाद कमी झाल्यासारखा वाटला, शहरात जातीयवादाची तीव्रता कमी भासली, भारत आधुनिक मार्गावर गेल्यासारखा वाटला तरीसुद्धा अशा घटना घडल्यानंतर असे दिसते की आपण अजूनही प्रतिके आणि इतिहासातच गुंतुन गेलो आहोत ज्याचा व्यावहारिक जीवनात फारसा उपयोग नाही.

shiv कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्यांची आणि शहानिशा न करता तो दाखल करून घेणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी आज प्रसिद्घी पत्रकाद्वारे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भिडे गुरूजींवर आरोप केले होते. तसेच याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिंदुत्ववादी शक्ती या दंगलीमागे असल्याचा आरोप केला होता.पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे कार्य राज्यात जोमाने वाढत आहे. ते काही असंतुष्ट, देशविघातक शक्तींना बघवत नसल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक श्री. भिडे यांचे नाव यात गोवले आहे. कोरेगाव भीमा येथे दुर्दैवी प्रकार जेव्हा घडला तेव्हा श्री. भिडे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी इस्लामपूर येथे गेले होते. त्यानंतर भोर येथे सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. तरीही फिर्यादींनी श्री. भिडे यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यापूर्वीही फुटकळ संघटनांनी त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले होते. त्यामुळे या प्रकरणातही खोलवर जाऊन चौकशी करावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे.

शिवाजी पार्क ला दरवर्षी लाखो दलित बाबासाहेबांना अभिवादन करायला जातात तसेच हे भिमा कोरेगाव. जसे तिथेही स्थनिक लोक समजुन मदत करतात किवा गर्दी टाळतात तसेच इथेही दरवर्षी होते. पण विशिष्ट राजकिय लोकांनी येणार्या निवडणुकांकडे लक्ष ठेउन हे प्रकरण घडवले आणि तापवले आहे असे बातम्यांवरुन वाटते. बाकी दगड्फेक करायला काय? पैसे देउन कितीही लोक मिळतात. त्यांचा कुठल्याही विचारसरणीशी काय संबंध नसतो. जाता जाता- या सगळ्यामुळे जे आर्थिक नुकसान झाले आणि व्यवहार ठ्प्प झाले ते कोण भरुन देणार?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

>> येणार्या निवडणुकांकडे लक्ष ठेउन नजीकच्या भविष्यकाळात (मे २०१९ पूर्वी) कोणत्या निवडणुका येऊ घातल्या आहेत हो?

३१ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर, कोळसेपाटील, जिग्नेश मेवाणी, उमर खालिद इ.नी मुद्दाम शनिवारवाड्यावर सभा घेऊन भाषणे ठोकली होती. अर्वाच्य वक्तव्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या मेवाणीने "मोदींच्या डोक्याची सफाई करण्याची आवश्यकता आहे" अशी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. जनेवित "भारतके टुकडे करेंगे"च्या घोषणा देणारा व देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेला उमर खालिद, अत्यंत वाचाळ व सातत्याने जातीयवादी वक्तव्ये करणारे कोळसेपाटील, राजकारणातून पूर्णतः हद्दपार झालेले व भविष्यात कोणतेही राजकीय भवितव्य नसलेले आणि सातत्याने संघ-भाजप विरूद्ध गरळ ओकणारे प्रकाश आंबेडकर असे नमुने तिथे मांडीला मांडी लावून बसले होते. शनिवारवाड्यासमोर मुद्दाम सभा घेण्यामागे जातीयवादी उद्देश होता. या सर्वांनी तिथे ३१ डिसेंबरला भाषणे ठोकली व १ जानेवारीला दगडफेक झाली हा योगायोग नव्हे.

In reply to by श्रीगुरुजी

राजकारणाशी संबंध असणार तर बोला , मी तुम्हाला ओळखत नाही पण . तूम्ही आंबेडकर साहेबांना असे बोलु शकत नाही . तूम्ही तूमची तीथच झ**डा निवडणूक लढा मग पाहू

In reply to by अतूल २०१५

अहो, बाबासाहेबांना कुठं नावं ठेवलीयेत? बाबासाहेब वेगळे आणि प्रकाश आंबेडकर वेगळे. आ.न., -गा.पै.

कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीही ७ जणांसह इतर २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रमाकांत विठ्ठल शिवले (वय ४०, रा. वढू बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २९) सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी कोणीतरी संभाजीमहाराज यांच्याविषयी लिहिलेला फ्लेक्स चिकटवला होता. हा फलक गावातील काही व्यक्तींनी वाचल्यानंतर काढून टाकला. या कारणावरून संदीप शंकर गायकवाड, सनी कांबळे, अशोक ऊर्फ पांडा बाळू गायकवाड, बळीराम गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, संदीप शंकर गायकवाड, शैलेश शंकर गायकवाड (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) व इतर १० ते १५ महिलांनी बेकायदा जमाव गोळा करून फिर्यादीसह सरपंच व इतर ग्रामस्थांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करत आहेत. दरम्यान, पोलीस हवालदार पुनाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वढू बुद्रुक येथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री संभाजीमहाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेल्या मोकळ्या जागेत दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांची सरकारी गाडी उभी केली होती. या वेळी स्वप्निल गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, सनी कांबळे, शैलेश गायकवाड व इतर १५ ते २० जणांनी जमाव जमा करीत आरडाओरडा केला. तसेच पोलीस पथकाच्या दिशेने स्वप्निल गायकवाड याने दगड फेकला. यामध्ये उपविभागीय अधिकाºयांच्या गाडीची काच फुटली. आरोपींनी घोषणाबाजी करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला व गाडी फोडली, म्हणून पोलिसांनी वरील आरोपींच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंदगोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत व माहितीफलक काढल्याप्रकरणी शुक्रवारी दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील ४९ पैकी ९ जणांना अटक करण्यात आली. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे यांनी केले. दरम्यान, वढू बुद्रुक येथे शिक्रापूर, शिरूर व रांजणगाव पोलिसांसह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथक गावामध्ये तैनात करण्यात आले आहे.

अस्पृश्यता ज्या प्रकारच्या धार्मिक अंधश्रद्धेमुळे समाजात फोफावली होती अगदी त्याच प्रकारची अतिअंध श्रद्धा तथाकथित दलित लोक त्याचे तथाकथित दैवत "आंबेडकर" ह्यांच्या बद्दल दाखवत आहेत. आंबेडकर आणि तथाकथित आंबेड्करवादाचा ठाव घेणारे अरुण शौरी ह्यांचे "Worshiping False Gods" हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ह्या पुस्तकाच्या नावानेच काही जणांना फिट्स येतात. महत्वाकांक्षा आणि परिश्रम ह्याचे ज्या समाजात स्थान असते त्यामुळे त्या समाजाची प्रगती होत असते. ज्यू लोकांना काय काय त्रास सहन करावे लागले हे सर्वानाच ठाऊक आहे पण आज सुद्धा ज्यू लोक जगातील अत्याधिक श्रीमंत समाजापैकी एक आहेत. ह्या उलट कृष्णवर्णीय लोक आणि रेड इंडियन लोक ह्यांना आयते फुकट सरकारी लोणी मिळत असल्याने त्यांची वाताहत तर झाली आहेच पण वरून आपल्या अपयशासाठी ते इतरांना आणि निरर्थक ऐतिहासिक घटनांना जबाबदार धरत आहेत. दलित लोकांनी ब्रिटिशांची गुलामी एवढी अभिमानाने सांगावी ह्या इतका मूर्खपणा दुसरा काहीही नाही. ब्रिटिश लोकांनी काय कुणालाही युद्धांत cannon fodder म्हणून वापरले असते. महारांची तलवारबाजीने अतिशय भारावून जाऊन राणीने त्यांना युद्धांत पुढे पाठवायचा निर्णय वगैरे घेतला नव्हता. ब्रिटिशांनी भारतांत सुमारे २० लक्ष ते १ कोटी लोकांना निव्वळ दुष्काळजन्य परिस्थिती करून मारले. अश्या आर्थिंक कोंडीत दलित लोकांचे सर्वाधिक बळी गेले. अश्या ब्रिटिशाना उगाच समता, दलितांचा पुळका इत्यादी शब्द लावून डोक्यावर चढवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. पेशवे काही रेड क्रॉस स्वयंसेवक नव्हते त्यामुळे त्यांनी दलितांवर अन्याय केलाच नाही असे आम्ही म्हणू शकत नाही पण एकही भारतीय राजाने दलितांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि शोषण घडवून आणल्याचे एकही उदाहरण नाही. नको ते विषय काढून दलित लोकांना रस्त्यावर आणून काही लोक दलित समाजाला टोटल मूर्ख बनवत आहेत आणि दलित समाज बनत सुद्धा आहे आणि ज्या प्रकारे एकूणच दलित समाजाची वाटचाल आहे त्यावरून ते असेच मूर्ख बनत राहणार असे वाटते. मडगांव गोवा मध्ये एका सारस्वत ब्रह्माणाने, सारस्वतांना सुद्धा राखीव जागा मिळाव्या म्हणून भव्य मोर्चा काढायचे ठरवले. गावागावातून बसेस वगैरे ठेवल्या आणि मोर्चाचे स्थान लोहिया मैदान ठरवले. लोक आले सुद्धा पण मडगांवांत उतरताच त्यांनी सरळ मत्स्यमार्केटचा रास्ता धरला आणि इसवण, पापलेट वगैरे घेऊन परतीची बस घेऊन सर्वजण घरी गेले. विनोद असला तरी जो समाज राजकीय दृष्ट्या एक "ग्रुप" म्हणून विशेष मूल्य ठेवत नाही तो समाज अत्यंत वेगाने प्रगती करतो असे दिसून येते कारण सरकारने हे द्यावे आणि ते द्यावे अश्या मागण्या करण्यात त्यांचा वेळ जात नाही. अमेरिकेत राजकीय दृष्टया सर्वाधिक प्रभावी आयरिश अमेरिकन सर्वाधिक गरीब गोऱ्या व्यक्ती पैकी आहेत. अमेरिकन भारतीय आणि अमेरिकन जपानीस सर्वाधिक श्रीमंत लोकांपैकी आहेत. तेच नाही तर अगदी नायजेरियन आणि सोमालियन अमेरिकन सुद्धा स्थानिक काळ्या लोकांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत. दलितांनी आंबेडकरांचे पुतळे आणि स्मारक इत्यादींचा नाद सोडून त्यांच्या प्रमाणे चांगले शिक्षण घेतले आणि उद्योग धंदे केले तरच त्यांना काही भवितव्य आहे नाही तर कोरेगाव मध्ये ब्रिटिशांनी त्यांना cannon fodder म्हणून वापरले तिथे इस्लामिक, कांग्रेसी, भाजपायी इत्यादी वापरतील.

In reply to by साहना

ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. भारतीय लोक खास करून महाराष्ट्रीयन जरा जास्तच परधार्जिणे होते आणि अजूनही आहेत. आपापसात भांडायला काही कारण लागत नाही त्यामुळे मेवानी, खालिद सारख्या लोकांचं फावतं. मेवानीने तर दलितांचा लढा लोकशाही मार्गाने न लढता रस्त्यावर लढून मिळवा असं एका सभेत जाहीर आवाहन केलं होतं. त्यावर कोणी आक्षेप घेताना दिसत नाही. असल्या भाषणांमुळे लोकांच्या भावना भडकून पुढे सगळं घडलं.

In reply to by साहना

पेशवे काही रेड क्रॉस स्वयंसेवक नव्हते त्यामुळे त्यांनी दलितांवर अन्याय केलाच नाही असे आम्ही म्हणू शकत नाही >> याबद्दल थोडं अधिक लिहा की म्हणजे "ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची शेखी मिरवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे." असले (कदाचीत) गैरसमज होणार नाहीत! === कारण सरकारने हे द्यावे आणि ते द्यावे अश्या मागण्या करण्यात त्यांचा वेळ जात नाही. >> 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??

In reply to by एमी

'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं?? कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.

In reply to by एमी

अॅमीजी, मराठी सेनेला हरवण्यासाठी महार लोक ब्रिटिशांना जाऊन मिळाले यात भूषण मानण्यासारखं काय आहे? बरं ते एवढेच जर शूर होते की ३०००० मावळ्यांना हरवायला ३०० महार सैनिक पुरेसे होते तर मग ब्रिटिशांची गरज कशाला पडावी? ३००० महारांनी एकत्र येऊन इतर सगळ्या राजवटी उलथून टाकायच्या आणि आपलं राज्य स्थापन करायचं होतं ना. ब्रिटिशांनी कधी कुठल्या भारतीयाला नीट वागवलं होतं का, की या महारांना वाटलं त्यांना नीट वागवतील! २०० वर्षांपूर्वी जे घडलं ते घडलं पण मग आता त्याचा सोहळा करायची गरज आहे का? त्यापेक्षाही काही शे वर्षांपूर्वी जर दलितांना नीट वागवलं गेलं नसेल तर त्याचा बदला आत्ता कशाला घ्यायचा? एकीकडे गांधीजींची आणि गौतम बुद्धांची तत्व पाळतो म्हणायचं आणि दुसरीकडे द्वेष करायचा, हिंसा आणि नासधूस करायची. याला काय म्हणावं? ब्राह्मणांचा एवढा द्वेष करता, सध्याच्या काळात कुठल्या ब्राह्मणांनी दलितांना किंवा अगदी इतर कुठल्याही जातीतील लोकांना त्रास दिलाय ते उदाहरणासहित सांगा. या उलट ब्राह्मणांच्या मुलांना अगदी शाळेत असल्यापासून बामन आणो डाळभात खाणारा म्हणून चिडवलं जातं. त्या शाळकरी मुलांमध्ये कुठून हा द्वेष येतो? कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना, नोकरी मिळवताना आरक्षण असूनही कुठल्या ब्राह्मणांच्या गटाने मोर्चे काढलेत किंवा राजकीय खेळ्या खेळल्यात? माझ्या मते तर लोकसंख्येच्या प्रमाणात सगळ्या मुख्य जातींमध्ये अल्पसंख्यांक ब्राह्मणच असतील. तरी अल्पसंख्यांक आहोत असा टाहो फोडून फायदे लाटायचा कधी प्रयत्न केलाय का? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं?? आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळवून, त्यात भरपूर वरकमाई करून गडगंज झालेले कित्येक लोक मी बघितलेले आहेत. कॉलेजची फी सहज भरू शकत असताना परत कमी मार्क मिळवलेल्या स्वतःच्या मुलासाठी आरक्षित सीट मिळवून दुसऱ्या एखाद्या हुशार पण गरीब मुलाची संधी हिरावून घेतात, त्याचं फक्त वाईट वाटतं. मुद्देसूद उत्तर देणार असाल तर द्या, उगाच व्हिक्टीम कार्ड खेळत बसू नका.

In reply to by एमी

मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसला की असे प्रतिसाद येणारच. दलितांनी आपली अस्मिता सवर्णांपासून शाबूत राहावी म्हणून इंग्रजांशी हातमिळवणी केली. मग त्यातून त्यांची अस्मिता शाबूत राहिली का? इथे अस्मिता हे मुलीचं नाव नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. इथे म्हणताय "जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय" कुठली आणि कसली प्रगती झालीये? आणि झाली आहे तर चांगलंच आहे की, मग आरक्षण काढून टाकायला हरकत नसावी. हिंदू धर्मात कोणालाही कुठलाही पंथ स्वीकारायची आणि दुसऱ्या धर्मात जायची परवानगी आहे. कोणी अडवलं नाहीये. इथे "मला इतिहासात रुची नाही". म्हणजेच स्वतः काही अभ्यास केला नाही, तर कोणीतरी काहीतरी सांगितलेलं ऐकून असली विखारी मतं बनवताय. जर खरंच पात्रता असेल तर चहुबाजूने अभ्यास करून स्वतःच मत बनवा, सोशल मेडिया आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या (एकतरफी) बातम्या वाचून मतं बनवू नका. मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते आणि मग एका ८५ वर्षांच्या वृद्धावर आरोप करण्यात धन्यता मानताय? मेवानीने भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे आहेत, भिडे गुरुजींनी दगडफेक केल्याचे पुरावे दाखवा. मुळात भिडे गुरुजी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते आडनावावरून तरी ब्राम्हण वाटतात, त्यांनी कधी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मराठा होते म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार करणार नाही असं म्हणलं नाही. असो, तुम्ही काही मुद्देसूद प्रतिवाद करू शकणार नाही त्यामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडून काय उपयोग!

आपल्या राजकारण्यांचे उपद्व्याप पाहिले की भारताला खाली खेचायला पाकीस्तान आणि चीनची गरज नाही असेच वाटते. सगळा प्रकार शिसारी आणणारा आहे. :( The less said the better. आपण इतिहासातिल अनुभवावरून काहीच शिकू शकत नाही हे गेल्या २,००० वर्षांच्या घटनांवरून सतत दिसत आहे.

मी कालपासून मला आलेला एक कायप्पा संदेश ईथे डकवण्याचा प्रयत्न करते आहे. ______________________________ भिमा कोरेगांव का घडले ?? प्रत्येक मराठा बांघवांनी त्या ५०० महार वीरांना का वंदन करावं ?? खरा ईतिहास काय आहे ? आपले खरे शत्रू कोन ? खोटा ईतिहास खुप वाचलात आता........ सत्य वाचा अणि विचार करा .. नगर रोड वरील भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर " वढु " गांव आहे....... ____________________________________________________ येथेच "छ.संभाजी महाराज" यांचा कपटनितीने खुन झाला व त्यांच्या देहाचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले गेले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल...... भयानक, थरकाप ऊडवणारी स्मशान शांतता....... आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही """मराठा"""" पुढे आला नाही. पण एका ""पहिलवानाला"" 'ही बातमी समजली आभाळ फाटलं होतं! त्यातही तो धाडस करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंप्याला" हातपाय पडुन ते जोडण्यासाठी तयार करतो, आपला राजा आहे त्यास असं....... नाही सोडू शकत आपण..... तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाचं धाडस पाहुन त्याचे " नातलग " ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात.... आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्निदान स्वत: तो पहिलवान देतो....." त्या पहिलवानाचे नाव होते "'""' गणपत महार """" """" जय भिमवाला """" '''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली. आज ही संभाजी राजेंची "समाधी" ही """ महार वाडयात """ आहे.... ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....." "कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले. इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं. तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!! "आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या """५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले...... तो दिवस होता """१जानेवारी म्हणुन हा "शौर्य दिन म्हणून "" पाळला जातो, साजरा करण्यात येतो.... """आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे... - यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा. ____________________________________________________ हा इतिहास अत्ता का बाहेर आला याआधी का नाही?

In reply to by सुखीमाणूस

"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या
पेशव्यांविरुद्ध लढताना बदला घेणं म्हणायला, राजांचा खून पेशव्यांनी केला होता??

In reply to by सुखीमाणूस

ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत " महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....." "कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली. पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या """""गणपत"""" ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले. त्या काळात म्हणजे १६८० मध्ये महार किंवा इतरांना शिक्षा देण्याचे अधिकार भटांना होते का? संभाजी महाराजांनंतर सन १७०० पर्यंत राजाराम महाराज राजे होते व त्यांच्यानंतर १७०७ पर्यंत म्हणजे औरंग्या मरेपर्यंत भोसले घराण्याचीच सत्ता होती. पेशव्यांना अधिकार मिळाले ते १७०८ मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी. म्हणजे महाराष्ट्रात भट व मोगल सत्तेवर नसताना ते महारांना शिक्षा कोणत्या अधिकाराने देणार? समजा अशी शिक्षा दिली असेल तर राजाराम महाराज व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या ताराबाई व नंतर आलेले शाहू महाराज यांनी ही शिक्षा कशी पुढे सुरू ठेवली? एकंदरीत वरील दावे ही शुद्ध जातीयवादी थापेबाजी आहे. इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं. तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या . इंग्रज त्याची अट मान्य करतात. हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!! "आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद आणि जातीयवादी दावे! शिस्तबद्ध सैन्य व तत्कालीन आधुनिक शस्त्रे हाताशी असलेले इंग्रज एका व्यक्तीशी करार करतात ही शुद्ध थापेबाजी आहे. सन १८०० मध्येच जनरल वेलस्लीने खंडाळ्याच्या घाटात महादजी शिंदेंच्या मोठ्या सैन्याला पराभूत केले होते. असे असताना त्यांना पुण्यात शिरणे शक्य नव्हते यावर फक्त मूर्खच विश्वास ठेवू शकतील. दुसरं म्हणजे संभाजी राजेंच्या खुनाचा बदला पेशव्यांविरूद्ध लढाई करून कसा घेता येईल? संभाजी राजांना औरंग्याने हालहाल करून मारले होते. बदलाच घ्यायचा होता तर एखाद्या मुस्लिम राजाचा घेता आला असता. संभाजी राजेच्या १६९० मधील खुनाचा १७०८ मध्ये जन्माला आलेल्या पेशवाईशी काहीतरी संबंध होता का? संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असा नवा विकृत इतिहास ब्रिगेडींनी लिहिला आहे. आता बहुतेक त्याच धर्तीवर संभाजी राजेंना (त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या) पेशव्यांनी मारले असा नवा इतिहास इतिहासाचार्य प्रकाश आंबेडकर आणि कंपनी लिहिणार असं दिसतंय. """५०० महारांनी""" """२५००० पेशव्यांना""" संपवून टाकले...... २५००० पेशवे? अगदी २०१८ अध्ये सुद्धा सौदी राजघराण्यात सुद्धा २५००० माणसे नाहीत. मग २०० वर्षांपूर्वी २५००० पेशवे कोठून आले? त्याकाळी पुण्याची एकूण लोकसंख्या तरी २५००० असेल का? पेशवे एकच होते व उर्वरीत त्यांची सेना होती आणि त्यांच्या सेनेत सर्व जातींचे सैनिक होते. ५०० जणांनी २५००० जणांना संपविणे म्हणजे प्रत्येकाने किमान ५० जणांना संपविणे. आज भारतात एकच रजनीकांत आहे. परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतंय. """आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे""" हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे... इतिहासातच रममाण होणे आणि चुकीचा, विकृत आणि जातीयवादी इतिहास शिकणे हीच मुख्य समस्या आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काही दिवस थांबा कुणी दलिताने युरोप मध्ये जाऊन वास्को द गामा ला भारतांत समतेची गुढी उभारायला बोलावले होते असे ऐकू येईल. (औरंगझेब चे अत्याचार फक्त ब्राह्मणांविरुद्ध असून जातिव्यवस्थेला नष्ट करणे त्याचा उद्देश होता असे मार्क्सिस्ट लोक आधीपासून शिकवत आहेत)

एवढा मोठा विनोद गेल्या हजार वर्षात झाला नसेल. २५,००० म्हणजे किती हे समजण्या इतकी अक्कल हे लिहिणार्‍याला आहे की नाही ? पण ठीक आहे. त्या ठिकाणी खरेच काय झाले याबद्दल आता एकदा लिहावे लागेल. पण नको. हे काम अगोदरच कोणीतरी केलेले आहे. या त्याच्या लिन्क्स. इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग १ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग २ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ३ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ४ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ५ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ६ इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ७ वरील लेखांमधे काही त्रुटी आहेत पण त्या एवढ्या महत्वाच्या नाहीत व त्याने मुळ घटनाक्रमाला कुठेही धक्का पोहोचत नाही. मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले. आपले संपत आलेले अस्तित्व टिकविण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. आज प्रकाश आंबेडकरांनी पळ काढलाच. "इतर संघटनांवर माझा ताबा नाही असे म्हणाले. पण मग मेवाणी आणि उमरला कशाला व्यासपिठावर बोलावलेस बाबा ? बर तुम्ही नव्हते बोलवले तर त्या व्यासपिठावरुन निघून जायचे ना ! पण मिळणार्‍या प्रसिद्धीचा लोभ नडला असावा. कालही एका चर्चेत त्यांना हा प्रश्र्न विचारल्यावर त्यांनी चक्क पळ काढला. असो.... या येथे हे असेच चालणार... यांना तरुण पिढीने घरीच बसवले पाहिजे तरच त्यांना येथे सुखाने नांदता येईल. मला सगळ्यात वाईट वाटले ते याचे की टिव्ही वर दिसत होते की लहान लहान मुलेही या मोर्च्यात सामील होती. यांना वेठीला धरताना यांना शरम कशी वाटत नाही?

In reply to by जयंत कुलकर्णी

या लेखांचे दुवे इथे दिल्याबद्दल धन्यवाद ! आजपर्यंत, या संबंधात पुरेशी माहिती नसल्याने बोलायचे टाळले होते. "युद्धाशी" आणि "त्यात मृत अथवा जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधल्या गेलेल्या या स्तंभाशी" अधिकृत संबंध असलेल्या व्यक्तींचे लेखी अहवाल व ब्रिटिश संसदेसह इतर सरकारी कागदपत्रांच्या संदर्भांच्या बळावर लिहिलेले हे लेख नक्कीच विश्वासू आणि माहितीपूर्ण आहेत. या संदर्भांत दिसणारे या युद्धाबाबतचे सत्य, त्याबाबत केल्या जाणार्‍या राजकारणाच्या विपरीत आहे, हेच दिसून येत आहे. आपल्याच देशवासियांमध्ये दुही माजवून आपली पोळी भाजण्याच्या कलेत आजचे भारतिय राजकारणी इतके तरबेज आहेत की ते तेव्हाच्या लबाड इंग्रजांना लाजवतील, यात वाद नाही. स्वार्थाने अंध झालेल्या राजकारण्यांना, आपण जनतेत फूट पाडून देशाचे अपरिमित नुकसान करत आहोत, याचे भान रहात नाही... किंबहुना, आपण जनता आणि देश यांचे अपरिमित नुकसान करत आहोत याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे, पण त्यांना त्याची अजिबात फिकिर कराविशी वाटत नाही. :( :( :( हा सगळा प्रकार इतका किळसवाणा आहे की त्याबद्दल काही बोलायचाही तिरस्कार वाटावा !! The less said the better. :(

In reply to by जयंत कुलकर्णी

मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले. थोरल्या आंबेडकरांनीच १९२७ मध्ये या युद्धाला ब्राह्मण वि. महार युद्धात महारांचा विजय असे जातीय स्वरूप देऊन विजय साजरा करण्याची परंपरा सुरू केली. प्रकाश आंबेडकर आता फक्त आपल्या आजोबांचा कित्ता गिरवीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

थोरल्या आंबेडकरांनी असं काही केलं असेल असं वाटत नाही. https://www.quora.com/What-was-the-contribution-of-B-R-Ambedkar-in-the-… इथली उत्तरं वाचली तर कळतं की स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता असं म्हणणं चूक आहे. ते त्यांचं कॉज नव्हतं. त्यांचं प्राधान्य नव्हतं. त्यांचं जे प्राधान्य होतं ते असण्यासाठी तशी परिस्थिती पण होती. तो काळ वेगळा होता. -------------------------- आंबेडकरांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला असं काही उदाहरण नाही. ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य हे प्राधान्य नसलेले अनेक सवर्ण नेते पण होते. त्यांची आपापली कॉजेस होती. आणि ते तेव्हाच्या सरकारची बाजू घेत. जेव्हा ही परंपरा चालू झाली तेव्हा ते सत्तेत असलेल्या सरकारच्या बाजूने, आणि त्यांच्या कॉजच्या बाजूने होती. दलितांना सैन्यात घेणे, न घेणे अश्या उलटसुलट पॉलिसिंपासून सुटका मिळावी असा देखिल त्यांचा परंपरेमागे उद्देश असू शकतो. आणि समजा "जातीय स्वरुप" दिलं असं क्षणभर मानायला जावं तरी का दिलं? तेव्हा सर्वणांची सत्ता नव्हती आणि त्यांना स्वतःला आपल्या जातीच्या लोकांच्या बळावर काही सत्ता मिळवायचा स्कोप नव्हता (ते त्यांना स्वातंत्र्यानंतर पण जमलं नाही)! ========================== बाकी आंबेडकरांवर टिका करायला ना नाही, पण आजच्या स्वार्थी नेत्यांशी त्यांची तुलना करणं ही टिका ठरणार नाही, त्यापेक्षा काहीतरी दु:खजन्य ठरेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

दुव्यांबद्दल धनयवाद जयंतकाका ! अतिशय वास्तवदर्शी माहिती ! तिचा विपर्यास करून राजकारण्यांनी केलेला खेळ पाहून वडाची साल पिंपळाला या म्हणीचा प्रत्यय आला.

In reply to by एमी

या https://rightangles.in मध्ये एक से एक भारी लेख आहेत. मस्त मनोरंजन झालं. मुद्देसूद प्रतिसाद तुम्हाला फालतू बडबड का वाटते ते आता समजलं.

In reply to by ट्रेड मार्क

सहमत दुस-यांची रेघ छोटी करायचा प्रयत्न करून किंवा त्यांच्यावर खार खाऊन आपली रेघ मोठी होत नाही हे अजून ब-याच लोकांना समजलेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

दुस-यांची रेघ छोटी करायचा प्रयत्न करून किंवा त्यांच्यावर खार खाऊन आपली रेघ मोठी होत नाही हे अजून ब-याच लोकांना समजलेले नाही. >> हॉ हॉ हॉ तुमच्याकडून असली वाक्य फेकली जावीत हे फारच विनोदी आहे =))