मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७

गॅरी ट्रुमन · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे. खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत. Gujarat (संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg) खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः Regions खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल. 1 २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच. या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः १. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्‍यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्‍याच जागा जास्त जिंकल्या होत्या. २. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्‍यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते. ३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत. गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्‍यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे. 1 यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल. गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो. २०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्‍यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः १. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते. २०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही. २. नोटबंदी आणि जी.एस.टी नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः २अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते. २बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे. ३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्‍या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच. सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्‍या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्‍या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते. भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त. ४. काँग्रेसमधील लाथाळ्या गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही. काँग्रेस बर्‍यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल. राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger” १४ डिसेंबरला दुसर्‍या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.

वाचने 83855 वाचनखूण प्रतिक्रिया 310

गॅरी ट्रुमन Fri, 12/01/2017 - 11:42
मी राजकीय परिस्थितीवर भाष्य करायला https://www.facebook.com/indian.political.observer/ हे फेसबुक पेज सुरू केले आहे. या लेखातील बरेचसे मुद्दे त्या पेजवर आधीच मांडले आहेत. आपली इच्छा असल्यास ते पेज लाईक/ फॉलो करावे ही विनंती.

पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 12:04
खरं म्हणजे, मीडियातील बातम्या वाचून माझं असं मत झालंय .... निवडणूक तशी बी जे पी जिंकेल, पण लीड बराचसा कमी असेल.... परंतु त्यामुळे (म्हणजे जिंकूनही) देशाचा मूड बदलत (विरोधात जायला सुरुवात) आहे असा मेसेज जाईल... फक्त बी जे पी ने स्वीपिंग विजय मिळवल्यावरच, अमित शहा / मोदी जोडगळीच्या चेहेऱ्यावर खरे हास्य फुलेल... नाहीतर बीजेपी अंतर्गत लाथाळ्या लवकरच दिसू शकतात.. राहुल गांधी सर्वात सेफ पोजिशन मध्ये आहे, अपयश आले तर नावे ठेवायला काही जास्त स्कोप नाही, अलरेडी खूपच हेटाळणीला तोंड दिलंय, मात्र यदाकदाचित जर ... टफ फाईट दिली जातेय किंवा निसटते बहुमत जरी जवळपास आले, तर पप्पू पप्पू म्हणून इतकी संभावना केलेल्या व्यक्तीकडूनही मोदी सारख्या राजकीय शक्तिशाली व्यक्तीला टफ फाईट मिळाली तर, भक्तांना 'फूट इन माऊथ' स्थितीचा सामना करावा लागू शकतो ... बघूया काय होतंय ! सध्याला सट्टेबाजांकडून बीजेपी फेवरीट आहे ....

In reply to by पगला गजोधर

mayu4u Fri, 12/01/2017 - 12:18
फक्त बी जे पी ने स्वीपिंग विजय मिळवल्यावरच, अमित शहा / मोदी जोडगळीच्या चेहेऱ्यावर खरे हास्य फुलेल...
म्हणजे किती? १५०? माझा (बातम्या बघून/वाचून बनलेला) अंदाज: भाजप १२०. काँग्रेस ५०.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Mon, 12/04/2017 - 09:57
सेफ पोजिशनमध्ये
अहिल्याबाई होळकर यांचे राज्य जप्त करण्याच्या इराद्याने, जेव्हा रघुनाथ पेशवे मोहिमेचा विचार करू लागले, तेव्हा अहिल्याबाईनें रघुनाथ पेशव्यांना पत्र धाडले, लिहिले, तुम्ही युद्ध करून, मला पराजित केले, तर जग म्हणेल, त्यात काय विशेष, एका स्त्रीला युद्धात हरवले तर काय मोठा पुरुषार्थ तो ??? बाईसाहेब दुर्बलच आहेत, हरणारच होत्या.... परंतु यदाकदाचित जर, माझ्यासारख्या एका स्त्रीकडून पराभव स्वीकारावा लागला, तर आपल्या पुरुषार्थाची किती नाचक्की होईल ??? हा मुत्सद्दी विचार करूनच आपण, नर्मदेच्या पैलतीरी पाय ठेवाल....मग रघुनाथ पेशव्यांनी प्लॅन कॅन्सल केला

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Fri, 12/01/2017 - 14:36
इथे EVM ने पारदर्शक काम केले पाहिजे फक्त. बाकी जनतेच्या कौलाचा आदर आहे. शक्यता क्र. १) भाजपचा विजय निष्कर्ष - EVM मध्ये गडबड शक्यता क्र. २) भाजपचा पराभव निष्कर्ष - EVM मध्ये गडबड नाही यापूर्वी झालेल्या निवडणुकांवरून निघालेले निष्कर्ष - पंजाब, बिहार, दिल्ली, नांदेड महापालिका, मालेगाव महापालिका, भिवंडी महापालिका - EVM मध्ये गडबड नाही महाराष्ट्र, हरयाना, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, पुणे व इतर ११ महापालिका - EVM मध्ये गडबड

In reply to by विशुमित

सुबोध खरे Fri, 12/01/2017 - 18:49
इथे EVM ने पारदर्शक काम केले पाहिजे फक्त अपयशाची कारणे शोधण्यापेक्षा "कशावर तरी खापर" फोडण्यातच जर विरोधकांना रस असेल तर २०१९ च काय २०२४ ला पण पराभव निश्चित असेल.

In reply to by babu b

भाषणामध्ये दहा मिनिटं पणजोबा, खापरपणजोबा, राजकीय टीका नाही केली तर विकास होतो आणि टीका केली तर खुंटतो असं काही आहे का?

In reply to by विशुमित

विशुमित गुरुवार, 12/07/2017 - 15:08
काँग्रेस अशा प्रकारे दक्षता घेत आहे हे चांगलेच आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-give-training-to-candidates-for-investigation-of-evm-in-gujarat-election-1597194/

mayu4u Fri, 12/01/2017 - 14:47
गुरुजींशी सहमत. कम्पूबाजीची बोंब मारणाऱ्या वेडगळ लोकांना फाट्यावर.

गामा पैलवान Fri, 12/01/2017 - 18:44
गॅरी ट्रुमन, धाग्याबद्दल आभार. भाऊ तोरसेकरांच्या अनुदिनीवरून एक चित्रं उचलंत आहे : https://2.bp.blogspot.com/-XAPg5NVRThE/WhOpPxwl8-I/AAAAAAAADco/h2lA9uPeufAb8MCimDZH1Xbb77iK7hSfACLcBGAs/s1600/received_1566735436698591.jpeg यांतून भाजपची (म्हणजे मोदीशहांची) निवडणूकींची व्यूहनीती स्पष्ट होते. आजवर जो उदासीन मतदार होता त्याला घराबाहेर काढून मतदानकेंद्रापर्यंत घेऊन जाणे, असं तिचं थोडक्यात वर्णन करता येईल. असा आग्रहाने घराबाहेर काढला गेलेला मतदार साधारणत: घराबाहेर काढणाऱ्या पक्षालाच मत देतो. मोदीशहांचं उद्दिष्ट १५०+ जागा आहे. त्यासाठी ७६ % मतदान व्हायला हवं. मोदीशहा मतदारऔदासिन्य किती घटवतात यावर जागांचा निश्चित आकडा ठरेल. मतदान टक्केवारी कितीपर्यंत जाईल याचा काही अंदाज कोणी बांधलाय काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

खेडूत Fri, 12/01/2017 - 21:02
70% पेक्षा जास्त होईल असे वाटते. गेल्या काही निवडणुकीत ते प्रमाण वाढले आहे. तरीही अन्य काही घटक विरोधात गेले तरी १३० कुठे जात नाहीत.

In reply to by खेडूत

पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 21:21
माझ्या मते मतदानाची जास्त टक्केवारी, इज डायरेकट्ट्ली रिलेटेड टू अँटीइनकंबन्सी .. त्यामुळे जेवढे जास्त मतदान तेव्हडे बिजेपीला धोकादायक... इथं तर उलटी गंगा वाहतिये....

In reply to by पगला गजोधर

खेडूत Fri, 12/01/2017 - 22:23
उलटी गंगा वाहते कारण नवीन १८ वर्ष पूर्ण झालेले तरूण स्वत: विचार करून मतं देत असणार. पूर्वी ट्रक भरून माणसं आणायचे तेव्हा एकगठ्ठा मतदान होत असे. फुकट वाटप, उसन्या अस्मिता, पूर्वजांची पुण्याई, जातीचा उमेदवार, असे दहा-बारा घाणेरडे निकष मतदान करताना लावणे बंद झाले तरच भारतीय लोकशाहीला भवितव्य असेल!

In reply to by खेडूत

पगला गजोधर Fri, 12/01/2017 - 23:32
वॉव... वरील चार्ट मधील खालची पातळी 64 % ते वरची पातळी 76%, असं 12% टोटल मतदानाचें स्विंग फक्त, "नवीन १८ वर्ष पूर्ण झालेले स्वत: विचार करून मतं देत असलेले नवतरुण" करू शकतील, असा आपला आत्मविश्वास, काबिल ए तारीफ आहे.... काय बोलणार..._/\_ बा द वे हार्दिक पटेल वय फक्त 23 वर्षे... जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर.... तरुण आहेत....

In reply to by ट्रेड मार्क

पगला गजोधर Sat, 12/02/2017 - 06:06
ठरलं बिरल नाही काही, आणि माझ्या खुश होणे न होणें याचा इथं संबंध नाही.... तुम्हाला वैयक्तिक कॉमेंट करायचे आहे का , या धाग्यावर?? का चर्चा करायची आहे ???... उगाच आपलं ...

In reply to by गामा पैलवान

babu b Sat, 12/02/2017 - 08:52
मतदार उदासीन होता म्हणे. मागची २० वर्षे भाजपाचेच सरकार , अन मतदारांची उदासीनता आता म्हणे भाजपाच दूर करणार !

In reply to by babu b

मार्मिक गोडसे Sat, 12/02/2017 - 09:44
मागची २० वर्षे भाजपाचेच सरकार , अन मतदारांची उदासीनता आता म्हणे भाजपाच दूर करणार ! अखेर इतकी वर्षे उदासीन मतदारांकडे उदासीनपणे पाहणारे सत्ताधारी विरोधी पक्षाच्या प्रचाराला घाबरून का होईना जागे झाले म्हणायचे.

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन Sat, 12/02/2017 - 10:18
हो हा तक्ता भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवर मी बघितला होता. याविषयी मतमोजणीपूर्व धाग्यात लिहायचे ठरविले होते. पण आता तुम्ही तो विषय काढलाच आहे म्हणून लिहितो. इतकी वर्षे जास्त मतदानाची टक्केवारी म्हणजे सत्ताधारी पक्षाचा हमखास पराभव असे गृहित धरले जायचे. पण मोदी आणि शहांनी निवडणुकीच्या खेळाचे आयाम बदललेले दिसत आहेत. आता जास्त टक्के मतदान होणे म्हणजे सत्ताधारी पक्षाचा अधिक मोठा विजय होणे असाही अर्थ त्यातून निघू शकेल अशी परिस्थिती मोदी-शहांनी तयार केली आहे. जर सत्ताधारी पक्षाविरूध्द राग असेल तर तो व्यक्त करायला आणि सत्ताधारी पक्षाला हरवायला मतदार मुद्दामून मतदान करायला जातोच. पण सत्ताधारी पक्षाविरूध्द विशेष राग नसेल किंवा काही अंशी समाधान असेल तर बरेच मतदार मुद्दामून घराबाहेर पडून मतदान करायला जातीलच असे नाही. अशा उदासीन मतदारांना घराबाहेर काढून मतदान करायला लावणे हा या डावपेचाचा भाग आहे. आणि अशा मतदारांना जर सत्ताधारी पक्षाच्या कारभाराविषयी समाधान असेल तर ते सत्ताधारी पक्षालाच मत देतील ही शक्यता जास्त. अमित शहांनी 'पत्रा प्रमुख' ही कल्पना सुरू केली आहे. 'पत्रा प्रमुख' म्हणजे मतदारयादीच्या एका पानावरील मतदारांपैकी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करायला घराबाहेर काढायची जबाबदारी असलेला कार्यकर्ता. मतदारयादीच्या एका पानावर ५०/१०० नावे जरी असतील तरी त्या ५०/१०० मतदारांसाठी एक कार्यकर्त्याला जबाबदारी देण्यात आली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण गुजरातमध्ये भाजप संघटनेचे जाळे आहे त्यामुळे असे कार्यकर्ते सगळीकडे मिळण्यात काहीही अडचण आली नाही. भाजपचे बूथ लेव्हल मॅनेजमेन्ट खूपच चांगले आणि शिस्तबध्द आहे. उत्तर प्रदेशात सव्वा तीनशे जागा जिंकल्या त्यात या बूथ लेव्हल मॅनेजमेन्टचा वाटा बराच मोठा आहे. इतर पक्षांना या बाबतीत अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तेव्हा १९९० किंवा २००० च्या दशकातले आयाम लावून गुजरात निवडणुकांकडे बघता येणार नाही. कारण मोदी-शहांनी ते आयाम पूर्ण बदलून टाकले आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

पगला गजोधर Sat, 12/02/2017 - 12:01
कारण मोदी-शहांनी ते आयाम पूर्ण बदलून टाकले आहेत.
सहमत, अलिकडच्या दशकात, भारतीय निवडणुकीत मोदींनी, प्रचारतंत्र प्रभावीपणे वापरून, अनेक जुनाट आयाम परिमाणे संपूर्णपणे बदलली आहेत. आजचा भाजप हा भाजप (एम) आहे. ब्लिट्झक्रिट्झ पद्धतीचा झंझावाती प्रचार हे आजच्या बिजेपीचा युएसपी निश्चितच म्हणता येईल.

babu b Fri, 12/01/2017 - 22:00
भाजपा बिलो १०० काँग्रेस अबाव १००

babu b Sat, 12/02/2017 - 08:42
तेवढ्या शिटा तरी असायला हव्यात .

सचिन Sat, 12/02/2017 - 23:42
पण यावेळी नक्कीच टफ दिसतय.... घरच्या निवडणुकीला सुद्धा सगळी फौज कामाला लावावी लागलीये म्हणजे ....

In reply to by सचिन

गॅरी ट्रुमन Sun, 12/03/2017 - 07:44
पण यावेळी नक्कीच टफ दिसतय.... घरच्या निवडणुकीला सुद्धा सगळी फौज कामाला लावावी लागलीये म्हणजे ....
गुजरातमध्ये निवडणुकांच्या वेळी असे वातावरण निर्माण करायची मिडियावाल्यांना सवय आहे. २००२ मध्ये दंगलींमुळे मोदींचा पराभव होणार असे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न झाला होता.प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. २००७ मध्ये गोवर्धन झाडपियांसारख्या नेत्यांच्या बंडामुळे सौराष्ट्रात भाजप मार खाणार असेही वातावरण निर्माण केले गेले होते. पण कुठचे काय.२००२ पेक्षा २००७ मधे सौराष्ट्रमध्ये एक जागा जास्तच मिळाली. २०१२ मध्येही केशुभाई पटेल यांच्या बंडामुळे भाजप मार खाणार असे वातावरण निर्माण केले गेले होते. अर्थात तसे काहीही झाले नाही. आतापर्यंत 'अ ब्लो टू मोदी' या बातम्या किती वेळा आल्या असतील याची गणतीच नाही. Modi is one person media loves to hate. त्यामुळे प्रत्येकवेळी असे वातावरण निर्माण केले जाते. दुसरे म्हणजे सहज जिंकायची खात्री असलेल्या निवडणुकीत मोदी-शहांनी प्रचार का करावा असे म्हणणे आणि सचिनने केनियाविरूध्दच्या मॅचमध्ये का खेळावे असे म्हणणे यात फार फरक नाही. असे प्रश्न उभे करणार्‍यांना मोदी-शहांची रणनिती समजलेलीच नाही असे दिसते. विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून त्यातून राज्यसभेत लवकरात लवकर बहुमत मिळायचा मार्ग खुला करणे ही ती रणनिती असावी असे मला वाटते. उत्तर प्रदेशात शेवटी मोदी वाराणशीमध्ये २-३ दिवस तळ ठोकून होते त्यावेळी मिडियामध्ये असे वातावरण निर्माण केले गेले होते की शेवटचा पुश मारून हातातून निसटून चालणारे बहुमत मिळवायचा मोदींचा प्रयत्न होता. पण मोदींचा प्रयत्न निसटून चाललेले बहुमत मिळवायचा नव्हे तर ३०० च्या पलीकडे झेप घ्यायचा होता. असो. प्रत्यक्षात काय होते ते १८ डिसेंबरला समजेलच.

गॅरी ट्रुमन Sun, 12/03/2017 - 07:46
विधानसभेत जास्तीत जास्त जागा जिंकून त्यातून राज्यसभेत लवकरात लवकर बहुमत मिळायचा मार्ग खुला करणे ही ती रणनिती असावी असे मला वाटते.
असे मला वाटते याऐवजी भाऊ तोरसेकरांचे हे मत मला पटते असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.

सचिन Mon, 12/04/2017 - 01:33
सोपे नाही यावेळी हे निश्चित !! २००२ पासून प्रत्येक वेळी भा ज प च्या सीट्स कमी झालेल्या आहेत. (१२७--११७--११५). आता अमित शहा १५० म्हणतायत ! फील्डमधल्या काही भा ज प कार्यकर्ते मित्रांच्या (जे आत्ता गुजरातमधे कामावर आहेत) मते वेळ आणीबाणीची आहे. जिंकण्याचा विश्वास आहे, पण सीट अजून कमी झाल्या तर त्या जिंकण्याला मजा नाही. २-३ मित्र आहेत तिथे कार्यरत. १५० वगैरे शक्य नाही असे खात्रीशीरपणे वाटतय. overconfidence नडणार आहे. अर्थात माझा काही अभ्यास बिभ्यास नाही .. फक्त common sense.

In reply to by सचिन

शाम भागवत Mon, 12/04/2017 - 19:31
२००२ पासून प्रत्येक वेळी भा ज प च्या सीट्स कमी झालेल्या आहेत. (१२७--११७--११५) ट्रेंडचा हा मुद्दा बरोबर आहे. पण २००७ व २०१२ साली दोन्हीवेळेस भाजपमधे फुट पडली होती व त्यामुळे भाजप हरणार असे म्हटले जात होते. त्याऐवजी फक्त जागा कमी झाल्या. यावेळी तरी अजून पर्यंत कोणी फुटुन बाहेर पडलेले नाही त्यामुळे हा ट्रेंड तसाच चालू राहिल का पूर्णपणे उलटा होईल ते पहावे लागेल.

babu b Mon, 12/04/2017 - 19:40
ओखी वादळही गुजरातकडेच चालले आहे.

babu b Mon, 12/04/2017 - 19:40
ओखी वादळही गुजरातकडेच चालले आहे.

In reply to by सचिन

गॅरी ट्रुमन Mon, 12/04/2017 - 20:46
त्यातल्या त्यात सध्या केवळ अ‍ॅक्सिस आणि चाणक्यचे एक्झिट पोल्स विश्वासार्ह आहेत. बाकी सगळ्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांमधल्या एक्ज्झिट पोल्सच्या आकड्यांवरून मला काय म्हणायचे आहे ते समजून येईलच. UP यात एबीपीचे आकडे किती गंडलेले होते हे दिसेलच. दिल्लीमध्ये केवळ अ‍ॅक्सिसने आपला ६० जागा दिल्या होत्या. बिहारमधील अ‍ॅक्सिसचे भाकित अगदी पूर्ण बरोबर आले होते. पंजाब आणि गोव्यामध्ये कोणाचेच भाकित प्रत्यक्ष निकालाच्या जवळपासही आले नव्हते. तेव्हा या आकड्यांना नक्की किती महत्व द्यावे हे आपणच ठरवायचे.

In reply to by सचिन

गॅरी ट्रुमन Tue, 12/05/2017 - 12:53
जर का ट्रेंड बघितला तर गुजरातच्या मतदारांनी प्रत्येकवेळी एका पक्षाच्या बाजूने स्पष्ट कल दिलेला आहे. १९८० मध्ये काँग्रेसने १८२ पैकी १४१ १९८५ मध्ये काँग्रेसने १८२ पैकी १४९ १९९० मध्ये जनता दल-भाजपने १५० जागांवर युती केली होती आणि उरलेल्या ३२ जागांवर मैरीपूर्ण लढती होत्या. त्यावेळी जनता दल-भाजपने १३७ १९९५ मध्ये भाजपने १२१ १९९८ मध्ये भाजपने ११५ २००२ मध्ये भाजपने १२७ २००७ मध्ये भाजपने ११७ २०१२ मध्ये भाजपने ११५ तेव्हा १८२ पैकी ९५ म्हणजे अगदी काठावरचे बहुमत देणे गुजरातच्या मतदारांना भावत नाही असे दिसते.

In reply to by सचिन

श्रीगुरुजी Tue, 12/05/2017 - 15:10
एबीपीने यापूर्वी ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या सर्वेक्षणाचे आकडे असे होते. - संभाव्य मतांची टक्केवारी १) सौराष्ट्र: भाजप ४२, कॉंग्रेस ४२ २) उ. गुजरात: भाजप ४४, कॉंग्रेस ४९ ३) मध्य गुजरात: भाजप ५४, कॉंग्रेस ३८ ४) द. गुजरात: भाजप ५१, कॉंग्रेस ३३ एका मोठ्या भागात दोन्ही पक्ष बरोबरीने आहेत, तर दुसऱ्या मोठ्या भागात कॉंग्रेस पुढे आहे (एकूण १०७ जागा). भाजप तुलनेने दोन लहान भागात (एकूण ७५ जागा) पुढे आहे. भाजपला राज्यात सरासरी ४७% (११३-१२१ जागा) व कॉंग्रेसला सरासरी ४१% (५८-६४ जागा) मतांचा अंदाज आहे. _______________________________________________________________________ त्यानंतर बरोबर २६ दिवसांनी काल नवीन सर्वक्षणाचे आकडे जाहीर झाले. त्यानुसार, - संभाव्य मतांची टक्केवारी १) सौराष्ट्र: भाजप ४५, कॉंग्रेस ३९ २) उ. गुजरात: भाजप ४५, कॉंग्रेस ४९ ३) मध्य गुजरात: भाजप ४१, कॉंग्रेस ४० ४) द. गुजरात: भाजप ४१, कॉंग्रेस ४२ भाजपला राज्यात सरासरी ४३% (९१-९९ जागा) व कॉंग्रेसला सरासरी ४३% (७८-८६ जागा) मतांचा अंदाज आहे. ______________________________________________________________________ केवळ २६ दिवसांच्या अंतराने जाहीर झालेल्या दोन्ही सर्वेक्षणातील आकड्यांची तुलना केली तर असे लक्षात येते, - सौराष्ट्रात भाजपच्या मतांमध्ये ३% ची वाढ झाली आहे व काँग्रेसच्या मतांमध्ये तितकीच घट झाली आहे. सौराष्ट्र हा पटेलबहुल भाग मानला जातो व माध्यमातून असे चित्र दाखवित आहेत की पटेल मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात आहेत. असे असताना केवळ २६ दिवसांत ३% मते वाढण्यासारखे भाजपने नक्की काय केले व तितकीच घट होण्यासारखे काँग्रेसने नक्की काय केले हे उलगडत नाही. दोघांमध्ये ६% मतांचा फरक हा बर्‍यापैकी मोठा फरक आहे. - उत्तर गुजरातमध्ये २६ दिवसात दोन्ही पक्षांच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. - केवळ २६ दिवसात मध्य गुजरातमध्ये भाजपची मते तब्बल १३% इतक्या फरकाने कमी झाली असे हे सर्वेक्षण सांगते, परंतु काँग्रेसच्या मतांमध्ये फक्त २% वाढ झाली आहे. मधली ११% मते कोठे गेली असावीत? गुजरातची निवडणुक ही बहुतांशी द्विपक्षी निवडणुक आहे. त्यामुळे या उर्वरीत ११% मतांचे गूढ आहे. भाजपने जेमतेम २६ दिवसात तब्बल १३% मते गमाविण्याइतके नक्की काय वाईट केले असावे हे समजण्यापलिकडचे आहे. - द. गुजरातमध्ये २६ दिवसांंमध्ये भाजपने तब्बल १०% मते गमाविली व यातील बहुसंख्य मते ९% काँग्रेसकडे वळली असे हे सर्वेक्षण सांगते. पुन्हा एकदा हाच प्रश्न उद्भवतो की भाजपने जेमतेम २६ दिवसात तब्बल १०% मते गमाविण्याइतके नक्की काय वाईट केले असावे हे समजण्यापलिकडचे आहे. - २६ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण राज्यात भाजपच्या मतांमध्ये ४% इतकी घट झाली असून काँग्रेसच्या मतांमध्ये २% इतकी वाढ झाली आहे. ________________________________________________________________________

In reply to by श्रीगुरुजी

babu b Tue, 12/05/2017 - 15:34
भाजपला राज्यात सरासरी ४३% (९१-९९ जागा) व कॉंग्रेसला सरासरी ४३% (७८-८६ जागा) मतांचा अंदाज आहे. ह्यांचे ४३ % म्हणजे ९०-९९ आणि त्यांचे ४३ % म्हणजे मात्र ७८ - ८६ ?

In reply to by श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन Tue, 12/05/2017 - 19:49
या मतांच्या टक्केवारीचे अंदाज बरोबर आहेत असे गृहित धरू. तसे असेल आणि जर दोन्ही पक्षांना साधारण सारखीच मतांची टक्केवारी (४३%) मिळणार असेल तर काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील. त्या परिस्थितीत काँग्रेस १०० पण ओलांडू शकेल. याचे कारण भाजपचे काहीकाही बालेकिल्ले आहेत. त्या बालेकिल्ल्यांमधून भाजपला जोरदार यश मिळते. उदाहरणार्थ अहमदाबाद शहर आणि परिसरात एलिसब्रिज, घाटलोडिया, मणीनगर, नारणपुरा (पूर्वीचा सरखेज) असे काही मतदारसंघ आहेत त्यात भाजप प्रचंड बलिष्ठ आहे. २०१२ मध्ये घाटलोडियामधून आनंदीबेन पटेल ५३% मताधिक्याने तर एलिसब्रीजमधून भाजप उमेदवार अतुल शाह ५०% मताधिक्याने निवडून गेले होते. देशातील कित्येक मतदारसंघात विजयी उमेदवाराला ५०% मते नसतात. आपण इथे ५०-५३% मते नाही तर मताधिक्याविषयी बोलत आहोत. अहमदाबादमध्ये आणि वडोदरा, सुरतमध्ये भाजप उमेदवाराने ३०% पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला असे अनेक मतदारसंघ आहेत. यावेळीही भाजपचे हे बालेकिल्ले ढासळतील याची शक्यता फारच थोडी. त्यामुळे भाजप अशा बालेकिल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मते घेईल आणि काँग्रेसला या भागात बरीच कमी मते मिळतील. जर दोन्ही पक्षांना सारखीच मतांची टक्केवारी असेल तर राज्याच्या इतर भागात काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त मते मिळतील आणि अर्थातच त्यामुळे जागाही जास्त मिळतील. याविषयी सर्वात उत्तम उदाहरण २००४ च्या लोकसभा निवडणुकांचे आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला ४७.४% आणि काँग्रेसला ४३.९% मते होती. पण १८२ पैकी ९० मतदारसंघात भाजपला तर ९२ मतदारसंघात काँग्रेसला आघाडी होती. भाजपला काँग्रेसपेक्षा ४ लाख ३३ हजार मते जास्त मिळूनही दोन कमी मतदारसंघात आघाडी मिळाली होती. हे का झाले? सरखेज आणि एलिसब्रीज हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ अडवाणींच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात होते. त्यापैकी सरखेजमध्ये अडवाणींना १ लाख २६ हजार मतांची तर एलिसब्रीजमध्ये ४८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्याचप्रमाणे सुरत लोकसभा मतदारसंघात येणार्‍या चोरासी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या काशीराम राणांना सुमारे ९० हजार मतांची आघाडी मिळाली होती. पूर्ण राज्यात भाजपला काँग्रेसपेक्षा ४ लाख ३३ हजार मते जास्त होती त्यापैकी २ लाख ६४ हजार मतांची आघाडी केवळ या तीन मतदारसंघांमधून होती. त्याउलट काँग्रेसची मते बर्‍यापैकी विखुरलेली होती. त्यामुळे राज्याच्या इतर भागातून काँग्रेसला जास्त मतदारसंघांमध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले. गुजरात निवडणुकांमध्ये अंदाज बांधताना हे गणित लक्षात ठेवलेच पाहिजे. २००४ मध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा ३.५% मते जास्त होती तरीही आघाडी दोन कमी मतदारसंघात मिळाली होती. यावरून भाजपला गुजरातमध्ये काठावरचे बहुमत हवे असेल तरी काँग्रेसपेक्षा किमान ४.५% मते जास्त हवीत असे मला वाटते. आणि जर भाजपला आरामात विजय मिळवायचा असेल तर काँग्रेसपेक्षा किमान १०% मते जास्त हवीत. या लेखात मी भाजपला १३०-१३५ जागांचा अंदाज बांधला आहे त्यात भाजपला ५०% तर काँग्रेसला ४०% मते मिळतील हे गृहितक आहे. २०१२ मध्ये भाजपला ४७.९% तर केशुभाई पटेलांच्या गुपपला ३.६% मते होती. म्हणजे या दोन पक्षांच्या मतांची बेरीज ५१.५% होती. तर काँग्रेसला ३८.९% मते मिळाली होती. नुसत्या भाजपला काँग्रेसपेक्षा ९% (आणि गुपपची मते विचारात घेतली तर १२.६%) मते जास्त होती. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ६०.१% तर काँग्रेसला ३४.४% मते होती. राष्ट्रीय पक्षांना विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी टक्के मते मिळतात तेव्हा २०१४ च्या त्सुमानीपासून भाजपची १०% मते कमी झाली त्यापैकी ५.५% काँग्रेसला तर ४.५% अपक्ष आणि इतरांना मिळतील हे गृहितक आहे. त्यातून भाजप १३०-१३५ जागा मिळवू शकेल. पण भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने आणखी ३% चा स्विंग असेल तर मात्र या सर्वेक्षणात दिल्याप्रमाणे अटीतटीची लढत होईल. आणि दोन्ही पक्षांना ४३% मते मिळाल्यास काँग्रेस शंभरी पण ओलांडेल. मला वाटते की या सर्वेक्षण करणार्‍यांनी हा महत्वाचा मुद्दा लक्षात न घेता धोपट मार्गाने जागांचे अंदाज बांधले आहेत. तसेच श्रीगुरूजींनी वर म्हटल्याप्रमाणे पटेल समाज जर भाजपपासून दुरावलेला असेल तर पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्रमध्ये भाजपची मते ३% नी कशी वाढली, दक्षिण गुजरातमध्ये इतकी कमी कशी झाली या प्रश्नांबरोबरच हा प्रश्नही महत्वाचा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

अनुप ढेरे Wed, 12/06/2017 - 09:17
२०१४ नंतर आत्तापर्यंत झालेल्या राज्य निवडणूकांमध्ये भाजपाने आपला व्होटशेअर २०१४ लोकसभा निवडणूकांइतकाच राखला आहे. उ.प्र., उत्तराखंडमध्ये. बिहार, दिल्लीमध्येपण. (पंजाबात काय झालं आठवत नाही) सो इथे भाजपा ६० वरून डायरेक ४९-५०वर येईल असं वाटत नाही.

In reply to by अनुप ढेरे

गॅरी ट्रुमन Wed, 12/06/2017 - 10:12
भाजपा ६० वरून डायरेक ४९-५०वर येईल असं वाटत नाही.
गुजरातमध्ये कोणत्याही पक्षाला ६०% मते मिळाली तर तो पक्ष १८२ पैकी १६५-१७० जागा सहज जिंकेल. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला १८२ पैकी १६५ मतदारसंघांमध्ये आघाडी होती. २०१४ मध्ये निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये दिल्लीमध्ये भाजपने सुमारे १२% मते गमावली होती. भाजपला लोकसभेत ४६% तर विधानसभेत ३४% मते होती. राष्ट्रीय पक्षांना लोकसभा निवडणुकांपेक्षा विधानसभा निवडणुकांमध्ये कमी मते मिळतात हा नेहमीचा अनुभव आहे. या न्यायाने भाजपने इतर राज्यांमध्ये विधानसभेत काही प्रमाणात मते जरूर गमावली होती पण दिल्लीमध्ये गमावली तितक्या प्रमाणावर नाही. उत्तर प्रदेशात मात्र भाजपने आपली मतांची टक्केवारी जवळपास सारखी ठेवली होती. दिल्लीमध्ये भाजपने इतकी मते गमावली याचे कारण (मला वाटते) दिल्ली भाजप हे गेल्या कित्येक वर्षांपासून दुभंगलेले घर होते. लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्ली शहरात भाजप अशा स्थितीत असतानाही मोदींच्या नावावर लोकांनी मते दिली पण विधानसभेत मात्र हा विकनेस झाकता आला नाही. त्यातच केजरीवाल हा लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी प्रतिस्पर्ध्याकडून होता. गुजरातमध्ये हे दोन्ही घटक महत्वाचे नाहीत. तरीही २०१४ मध्ये मुळात ६०% मते हा आकडाच खूप मोठा होता आणि मोदीलाटेत भाजपने अभूतपूर्व इतकी मते घेतली होती. तितकी मते ही भाजपची 'नॅचरल स्टेट' आहेत असे याक्षणी तरी वाटत नाही. त्यामुळे त्यात घट होईल असे वाटते आणि मुळातला ६०% हा बेस मोठा असल्यामुळे त्यात १०% घट होऊ शकेल असे गृहित धरून मी आकडेमोड केली आहे. खरोखर काय होते ते १८ डिसेंबरला कळेलच. पण भाजपने १०% नाही तर ५% च मते गमावली तर १५०-१५५ आणि १५% मते गमावली तर ९५-१०० च्या आसपास जागा मिळतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

रामदास२९ Wed, 12/06/2017 - 12:47
पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या सौराष्ट्रमध्ये भाजपची मते ३% नी कशी वाढली
बरोबर.. मला वाटत नाही.. हार्दिक पटेल चा एव्हढा प्रभाव पडेल.. कारण त्यामध्ये पण दोन गट आहेत.. त्यातले लेउवा पटेल हार्दिक बरोबर जायला तयार नाहीत तर कडवा काहीप्रमाणात त्याच्याबरोबर जातील .. कोन्ग्रेस कडे भा.ज.पा विषयीच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी सन्घटना उरलेली नाही म्हणून तर हार्दिक,अल्पेश आणि जिग्नेश यान्च्यावर अवलम्बून राहावे लागत आहे..त्यात हे तिघे त्यान्च्या जातीचे नेते आहेत, पूर्ण राज्याचे आणि सर्वसमावेशक नाहीत. अल्पेश आणि जिग्नेश त्यान्च्या मतदारसन्घात अडकून बसले आहेत. CD प्रकरणामुळे आणि कोन्ग्रेसशी युती मुळे PAAS आणि त्याच्या समाजातील लोक नाराज आहेत, अल्पेशनी स्वस्तात(फक्त स्वतःचा फायदा बघून) कोन्ग्रेसशी युती केल्यामुळे आणि जिग्नेश ला निवडणूकीला अरुन्धती रोय अशा देशद्रोही ब्रिगेडने मदत केल्याने सर्वसामान्य लोका नाराज आहेत. राहूल यान्ची घोडदौड सोमनाथ, शहजाद यासारख्या सेल्फ गोल मुळे मन्दावली आहे. त्यातच मोदी आणि शहा उशिरा पण बरोबर आगेकुच करत आहेत.. कोन्ग्रेस चा सोफ्ट हिन्दुत्व, महन्त 'कपिल'नाथ वक्फ बोर्डाचे वकिलपत्र घेऊन मातीत मिळवत आहेत .. म्हणजे एकिकडे मन्दिरात जायचा आणि दुसरीकडे अयोध्येतल्या मन्दिराला खोडा घालायचा.. वाह रे भय्या तेरी चाल .. जनता करेगी बुरा हाल..

In reply to by रामदास२९

babu b Wed, 12/06/2017 - 14:42
एकिकडे मन्दिरात जायचा आणि दुसरीकडे अयोध्येतल्या मन्दिराला खोडा म्हणजे एकीकडे आम जनतेला टॅक्सच्या कायद्याची भीती दाखवायची अन व्होडाफोणची वकिली करुन त्यांची व्याजे माफ करायची !

In reply to by रामदास२९

राघव Wed, 12/06/2017 - 16:42
मला एकदम कोणतातरी हिंदी न्यूज चॅनल लावल्यासारखं वाटलं..!! ;-) पण विरोधी मतांची विभागणी होऊ नये यासाठी केलेली ही [बळजबरीची] युती किती टिकेल याबद्दल आत्ताच शंका वाटते आहे. आता बिहार मधे जेव्हा नितिश + लालू + काँग्रेस झाले तेव्हा सुद्धा असेच वाटले होते.. मला एक समजत नाही.. अशा कोलांटउड्या मारतांना या पक्षांचे कार्यकर्ते कसे काय त्यांच्या लोकांना पटवून देत असतील? म्हणजे कालपर्यंत ज्यांना बेंबीच्या देठापासून बोंबलून शिव्या घातल्या त्यांचीच गळाभेट घ्यायची, तेही स्वतःचे पाठिराखे हातचे न जाऊ देता, तेही निवडणुकीच्या ऐन तोंडावर.. काय चेष्टा आहे? याला खरंच हिंमत लागते राव.. आपण तर कोपरापासून दंडवत घालतो अशांना..! [पाताळयंत्री]

babu b Tue, 12/05/2017 - 01:52
विविध वेबसाइट्स , फेबु, व्हाट्सपवर गंमत सुरु आहे. सुरुवातीच्या सर्वेचे आकडे दाखवून भाजपा येणार म्हणून सांगणारे लोक , आता नवीन आकडे बघितल्यावर , ' ह्या ! ह्ये सर्वे म्हणजे थोतांड असतात , ह्यांचे काही खरे नसते , ' असे सांगू लागले आहेत !

In reply to by सुबोध खरे

त्यांचं नाव सगळ्यांना माहीत आहे.ते प्रसिद्ध "जामोप्या" आहेत.खरे नाव गजानन कागलकर आहे.त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला उत्तर नसले की मग हे असले डु आयडी वगैरे फाटे फोडायचं चालू आहे.

In reply to by सिंथेटिक जिनियस

श्रीगुरुजी Wed, 12/06/2017 - 08:42
त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला उत्तर नसले की मग हे असले डु आयडी वगैरे फाटे फोडायचं चालू आहे. उष्ट्रानाम् लग्नवेलायाम् गर्दभा: मंत्रपाठका: परस्परम् प्रशंसन्ते 'अहो रूपम् अहो ध्वनीम्'|

In reply to by श्रीगुरुजी

रमेश आठवले Fri, 12/08/2017 - 11:28
माझ्या समरणात असलेला पाठभेद असा आहे. उष्ट्रांनां विवाहेषु गीतं गायन्ती गर्दभ:। परस्परं प्रशनसन्ति अहो रुपम अहो ध्वनिम ।।

जानु Tue, 12/05/2017 - 23:06
तस राहुल बाबाने सुरुवात चांगली केली होती, लोक ते काय म्हणतात याकडे लक्ष ठेवायला लागले होते, पण सोमनाथ आणि राम मंदीर सुनावणीत सिब्बल यांची मागणी यामुळे सगळे मुसळ केरात जाईल, मुख्य्हतः हे दोन्ही सेल्फ गोल होते. त्यात भाजपाचा काहीच हात नव्हता.

कंजूस Wed, 12/06/2017 - 06:20
राहुलने काल 'आम्ही आलो तर कर्जमाफी देऊ' हे आता दुष्टचक्र वाढत गेले तर सरकारने शेतकय्रांना फुकट पोसायचं आणि जनतेने भाजी धान्य विकत घ्यायचं असं होईल.

In reply to by babu b

mayu4u Fri, 12/08/2017 - 11:25
फडणवीसांनी 'आम्ही आलो तर कर्जमाफी देऊ' असं आश्वासन दिलं नव्हतं.

In reply to by mayu4u

सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 12:01
आपल्याकडे "बारा" गावच्या साहेबानी नाही का मराठा आरक्षणाचे गाजर दाखवलं होतं. कर्ज माफी निदान देता तरी येईल. ते राज्य सरकारच्या हातात तरी असतं. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाला "वळसा" घालून कसे देणार होते? पाटीदारांना काँग्रेस आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे ते पोकळ आहे हे पाटीदार लोकांच्या सहा संघटनांनी पूर्व महाधिवक्ता श्री हरीश साळवे यांचे कायदेशीर मत मागवले असता स्पष्ट झाले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/congresss-quota-promise-not-feasible-say-six-patidar-outfits/articleshow/61939775.cms

रमेश आठवले Wed, 12/06/2017 - 08:19
काँग्रेस राहुल गांधी यांचा पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक तारीख ११ डिसेम्बरलाच उरकून घेत आहेत. १८ डिसेंबर च्या हिमाचल आणि गुजरात यांच्या निकालाच्या आधी असे करण्याचे कारण, हार झाल्या नन्तर राहुलची बढती अप्रशस्त भासेल असे सोनियाजी आणि इतर पक्ष नेत्यांना वाटत असावे.

In reply to by रमेश आठवले

गामा पैलवान Wed, 12/06/2017 - 13:24
रमेश आठवले, मला वाटतं की दोन्ही विधानसभांत काँग्रेस आधीपेक्षा चांगली कामगिरी करेल असा अंदाज नेतृत्वाला आला आहे. पप्पूच्या बढतीमुले नवचैतन्य वगैरे मथळे गाजवायला वाट मोकळी करायचा हेतू दिसतो आहे. आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी गुरुवार, 12/07/2017 - 14:29
एबीपी च्या ४ डिसेंबरला प्रसिद्ध झालेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणानंतर काल टाइम्स नाऊ आणि इंडिया टीव्ही या दोन वाहिन्यांनी आपल्या सर्वेक्षणाचे आकडे प्रसिद्ध केले. या तीनही सर्वेक्षणांचे एकत्रित अंदाज -

इरसाल गुरुवार, 12/07/2017 - 21:49
काँग्रेसला बुडवण्याचे श्रेय राहुल गांधींना एकट्याला मिळु नये, म्हणुन त्यांचे ईतर नेते जबरदस्त मोर्चे बांधणी करत आहेत. जसे की कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर.

सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 10:29
काँग्रेसला बुडवण्याचे श्रेय राहुल गांधींना एकट्याला मिळु नये, म्हणुन त्यांचे ईतर नेते जबरदस्त मोर्चे बांधणी करत आहेत. जसे की कपिल सिब्बल, मणिशंकर अय्यर. +१०० सेल्फ गोल करण्याची तर काँग्रेस मध्ये स्पर्धा लागली आहे. कालच श्री मणिशंकर अय्यर यांनी श्री मोदींना "नीच" म्हणून घेतले. त्यामुळे श्री मोदींच्या "जातीवर" (इतर मागासवर्ग) टीका केल्यामुळे काँग्रेसची गोची झाली आहे. (आज जरी त्यांना काँग्रेस मधून निलंबित केले तरी) त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी "आपलेच" नाक कापून काँग्रेसला जो अपशकुन केला आहे त्याची तोड नाही.

In reply to by सुबोध खरे

गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 11:04
मोदींना नीच म्हणणार्‍याला पक्षातून निलंबित केले. पण मौत का सौदागर म्हणणार्‍यांना मात्र पक्षाध्यक्षपद दिले. अर्जुन मोढवाडीयांनी मोदींना माकड, पिसाळलेला कुत्रा चावलेला इत्यादी म्हटले तरी त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. दिग्गिराजांनी म्हटले: मोदींचे यश म्हणजे चु** भक्त बनविले आणि भक्तांना चु** बनविले. तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही. बी.के.हरीप्रसाद यांनी मोदींना 'गंदी नालीका किडा' म्हटले. तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही. काँग्रेस नेते रिझवान उस्मानींनी मोदींचा बाप कोण असा प्रश्न विचारला तरी त्यांच्यावर काही कारवाई नाही. सलमान खुर्शीद यांनी मोदींना माकड आणि बेडूक म्हटले तरी त्यांना तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळातील टॉप चार पैकी एक पद दिले गेले. गुलाम नबी आझाद यांनी मोदींना गंगू तेली म्हटले तर बेनीप्रसाद वर्मांनी मोदींना नरभक्षक म्हटले. अर्जुन मोढवाडीयांनी मोदींना मंदबुध्दी असेही म्हटले होते. (या परीच्छेदातील वक्तव्यांचा संदर्भः http://deshgujarat.com/2013/04/06/a-list-of-how-congress-leaders-define-narendra-modi/). या सगळ्यांवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. पण मणीशंकर अय्यरने मोदींना 'नीच' म्हणजे त्यामानाने बर्‍याच सुसंस्कृत शब्दात शिव्या घातल्या तरी त्यांच्यावर कारवाई. बहोत ही नाइन्साफी है.

In reply to by गॅरी ट्रुमन

समाधान राऊत Sat, 12/09/2017 - 02:35
नेमक्या हव्या असलेल्या प्रचाराच्या वेळी दिगीभावने माती खाल्ली आहे आणि याच संधीचा फायदा घेत त्यांच्यासोबत कांग्रेसच्या धा पाच जागांना धुळ चारली आहे(असे माझे मत). एरवी गरळ ओकणार्याची आज ना उद्या सुद्धा नंबर लागतील, जसा दिगीभावचा पाकदौरा हिशोबात लावला तसा, पण असाच कावळा बनवुन..

सुबोध खरे Fri, 12/08/2017 - 11:16
या निमित्ताने केजरीवाल साहेबानी श्री मोदींना भ्याड आणि मनोरूग्ण( coward and psychopath) म्हटल्याचे आठवते. आजकाल दिल्लीच्या प्रदूषणामुळे त्यांचा आवाज बसला आहे असे आपटार्ड कडून ऐकले.

डँबिस००७ Fri, 12/08/2017 - 13:16
गुजरातमधील ४७ मतदारसंघांत मुंबईकर शिवसैनिकांचा तळ !! गुजरात मध्ये कित्येक शतक रहाणार्या मराठी भाषिक नागरीकावर भरोसा ठेवुन भाजपाला धडा शिकवण्यासाठी शिवसेना आपले उमेदवार रिगणात उतरवणार आहे ! स्वतच नाक कापुन दुसर्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की तोडावर पडणार !

In reply to by डँबिस००७

गॅरी ट्रुमन Fri, 12/08/2017 - 13:28
स्वतच नाक कापुन दुसर्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की तोडावर पडणार !
हे गुजरातमध्ये जाऊन नक्की काय प्रचार करणार? हा की मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत? हा की मोदी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये हलवत आहेत? हा की मोदी नेहमी गुजरातला झुकते माप देतात? यांना महाराष्ट्रातही कधी २२-२३% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. गुजरातमध्ये यांची संघटना अस्तित्वात नाही. आणि निघालेत मराठी मराठी करत मते मागायला.

In reply to by विशुमित

मोदक Fri, 12/08/2017 - 14:18
शिवसेनेच्या कुठल्या मराठ्यांनी तोडफोड करून तुम्हा बिग्रेडींना प्रत्युत्तर दिले.. त्याचा संदर्भ सापडला का..? का तुम्ही नेहमीप्रमाणे आधी टेपा लावून नंतर शेपूट घातली..?

In reply to by मोदक

विशुमित Fri, 12/08/2017 - 17:50
मोदक राव जरा अदबीने घ्या. ज्या त्या धाग्यावर जाऊन त्या खाली प्रतिसाद द्या. माझी काही तक्रार नाही. ... शेपूट बिपुट घालणे असली भाषा वापरणे सोडा एवढे सुचवू इच्छितो. मी काही तुमचा बांध रेटलेला नाही. मागे तुम्हाला व्यक्तिगत निरोप देऊन सांगितले सुद्धा आहे. तुम्हाला माझ्याशी काही दुश्मनी वगैरे आहे का? जिथे तिथे जाऊन तुम्ही आणि मयूर माझ्या प्रतिसादाखाली कब्बडीत करतात तशी साखळी करून इतर धाग्यांचे प्रश्न विचारात राहत आहात. एवढे वयक्तिक होण्याचे काही कारण समजले नाही. सायकलचा संदर्भ मी कुठे वापरला असेल तर ते फक्त रूपक होते जे तुम्ही इतरांना ट्रक घेऊन फिरता असे विचारत असता म्हणून. त्या बद्दल तुम्हाला आक्षेप असेल तर मी सायकल स्टॅन्ड वर लावून कुलूप लावून ठेवतो. .... आता राहिला प्रश्न कोणते मराठे ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांशी भिडले त्याचे उत्तर माझ्या कडे आहे फक्त तुम्हाला ते सप्रमाण पाहिजे असणार म्हणून प्रयत्न चालू आहेत. आता माझा सगळा काम धंदा सोडून तुमच्या "काळू बाळू"ची उत्तरे शोधत बसायचे म्हंटल्यावर मग काय बोलायलाच नकोच. तूर्तास तुम्हीच बरोबर हा ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध आहे. --- @संपादक मंडळाने यांना मिपाच्या मार्गदर्शक तत्व नुसार समज द्यावी. माझे काय चुकत असेल तर मला पण त्या संबंधात माहिती द्यावी.

In reply to by विशुमित

मोदक Fri, 12/08/2017 - 22:48
आदब...? तुमच्यासोबत..?? आपण आदबीने वागतो असलो तर समोरच्याकडून अपेक्षा करावी साहेब. तुम्ही घाणेरड्या भाषेत मनाला येईल ते खोटेनाटे प्रछन्न आरोप करणार आणि समोरच्याने फक्त ऐकून घ्यावे किंवा आदबीने प्रतिवाद करावा ही भाबडी अपेक्षा सोडा. विनाकारण सायकलचा संदर्भ आणून खोड्या काढायला तुम्ही सुरूवात केली आणि आता झेपत नाही म्हणून सज्जनपणाचा आव आणून कुलूप बिलूप भाषा बोलत आहात. ट्रकचे संदर्भ मी माझ्या जबाबदारीवर वापरले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर द्यायला मी समर्थ आहे. तुम्हाला झेपणार असेल तर अजूनही सायकलचे संदर्भ वापरा मात्र प्रत्युत्तर मिळेलच याची खात्री बाळगा. बाकी माझीही तुमच्याशी दुश्मनी नाही. विनाकारण वाद उत्पन्न करणे - संदर्भ - मैत्रचा शिवकालीन चित्रांचा धागा जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान असणार्‍या महापुरूषांबद्दल गलिच्छ आणि एकेरी भाषा वापरणे - संदर्भ - मैत्रचा शिवकालीन चित्रांचा धागा अकारण सायकल वगैरे संदर्भ आणून शिरसंधान करणे - तुम्ही मान्य केले आहेच. खोटे बोलणे - संदर्भ - शिवसेनेच्या मराठ्यांनी बिग्रेडी मराठ्यांना प्रत्युत्तर दिले दडपशाहीची भाषा वापरणे - तुम्ही श्रीगुरूजींना दिलेल्या धमक्या असे प्रकार तुम्ही टाळलेत तर तुम्हालाही इतरांप्रमाणे सन्मानाचीच वागणूक मिळेल.

In reply to by मोदक

विशुमित Sat, 12/09/2017 - 12:38
तुम्ही घाणेरड्या भाषेत मनाला येईल ते खोटेनाटे प्रछन्न आरोप करणार आणि समोरच्याने फक्त ऐकून घ्यावे किंवा आदबीने प्रतिवाद करावा ही भाबडी अपेक्षा सोडा.>>> ==>> धरण, धोतर, पिलावळ, शेपूट , बूड हे तुमच्या लेखी सुसंस्कृत शब्द? तशी तुमच्या कडून अपेक्षा ठेवून उपयोगाचे नाही. मुद्दा खोदून काढायचा असेल तर फक्त अदबीने वयक्तिक हल्ले करा. खरे -कि खोटे ठरवणारे तुम्ही काय मिपाचे न्यायधीश नाही आहात. तुम्हाला झेपणार असेल तर अजूनही सायकलचे संदर्भ वापरा मात्र प्रत्युत्तर मिळेलच याची खात्री बाळगा.>>> ==>> धरण सारखे कुठून येत आहे. धोतराचा बराच वेळा खुलासा करून देखील कशाला वापरत होतात? विनाकारण वाद उत्पन्न करणे - संदर्भ - मैत्रचा शिवकालीन चित्रांचा धागा>>> ==>> कोपर्डी निकालाच्या वेळेस तुमचा तटस्थ पण कुठे गेला होता, ज्या वेळेस मराठा आणि दलित यांच्यात वाद निर्माण केला जात होता. अकारण सायकल वगैरे संदर्भ आणून शिरसंधान करणे - तुम्ही मान्य केले आहेच.>>> ==>> अकारण धरण, शेतकरी कर्जमाफी, डांगे बरोबरची कंपूबाजी हे कुठून उपजत होते? खोटे बोलणे - संदर्भ - शिवसेनेच्या मराठ्यांनी बिग्रेडी मराठ्यांना प्रत्युत्तर दिले>> ==>> हे खरे कि खोटे याचा निवडा करणारे तुम्ही कोण? मुद्दा खोडून दाखवा शिवेसेनेतले मराठे नव्हते ब्रिगेडला विरोध करायला. दडपशाहीची भाषा वापरणे - तुम्ही श्रीगुरूजींना दिलेल्या धमक्या>>> ==>> तुम्ही काय चौकीदार आहात मिपाचे? गुरुजी आणि मी बघून घेईन. एक शरद पवार आणि ब्राह्मण्यवाद हा विषय सोडला तर माझे त्यांच्या बरोबर सलोख्याचे संबंध आहेत. ते सुद्धा हे मान्य करतील. ब्राह्मण्यवादाचा माझा मुद्दा असला तरी श्री गुरुजी, नाखु जी, पैसे ताई, डांगे अण्णा, अजो, अत्रे, पीर ताई, सुबोध जी असे अजून असंख्य लोक आहेत जे माझ्या माहिती प्रमाणे ब्राह्मण आहेत ज्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. जातीच्या चौकटी मिपावर आल्यावर कधीच सोडून दिल्या आहेत. असे प्रकार तुम्ही टाळलेत तर तुम्हालाही इतरांप्रमाणे सन्मानाचीच वागणूक मिळेल.>>> ==>> मिपावर आवार्ड वाटपाचे काम मालकांनी तुम्हाला दिले कि काय ?? तुमच्या कडून मिळणार असेल घायचा आधीच आवार्ड वापसी करतो मी. (एवढे तुम्हाला स्पष्टीकरण देऊन मिपावरचे तुमचे महत्व मला खरे वाढवायचे नव्हते, पण नाईलाज झाला) असो पुढील वाटचाली करता शुभेच्छा..!!

In reply to by विशुमित

मोदक Sat, 12/09/2017 - 21:36
बाकीचे मुद्दे चर्चा करूच. तोपर्यंत हे मुद्दे सांगा. >>> मुद्दा खोदून काढायचा असेल तर फक्त अदबीने वयक्तिक हल्ले करा. कसे असते विशुमीत, इथे आपण चार नवीन गोष्टी वाचायला, नवीन माणसे जोडायला येतो. आपले मतभेद असतानाही तुमच्या शेतीच्या ज्ञानाबद्दल मी स्वत: कौतुक केले आहे आणि तुम्हीही माझ्या शंकाना उत्तरे दिली आहेत. या संवादात मी किंवा तुम्ही लै काही ग्रेट काम केले नसले तरी "योग्य विषया संबंधीत संवाद अशक्य नाही" इतकेच. चुकते कुठे.. तर वैयक्तीत हल्ल्यांना सुरूवात तुम्ही केलीत. ट्रकच्या आणि सायकलच्या रेफरन्सने प्रतिसाद दिले. खोटेपणा आणि बिग्रेडी अजेंडा रेटायला सुरूवात केली. तुम्हाला असले घाणेरडे लिखाण करताना आदब, संकेत वगैरे गोष्टी आठवल्या होत्या का..? नाही. या गोष्टी तुमच्यावर उलटल्यावर हे सगळे आठवत आहे. तुम्ही खोटेपणाची सुरूवात केली नसती तर तुमच्याकडे संदर्भ मागितले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. इथे लिहा की तुम्ही खोटेपणा केला आणि समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी केलेली विधाने बिनशर्त मागे घेत आहे. मी ही विषय संपवेन. >>> तुम्ही काय चौकीदार आहात मिपाचे? गुरुजी आणि मी बघून घेईन मग याच न्यायाने ट्रक आणि डांगेंसोबत काय बोलायचे ते मी बघून घेतो की, तुम्हाला डांगेंनी वकीलपत्र दिले आहे का..? >>> मुद्दा खोडून दाखवा शिवेसेनेतले मराठे नव्हते ब्रिगेडला विरोध करायला. भांडारकर हल्ल्या प्रकरणात असणाऱ्या ब्रिगेडच्या मराठ्यांना शिवसेना आणि भाजप मध्ये असणाऱ्या मराठ्यांनी तोडफोड करून प्रतिउत्तर दिले. हे तुमचेच वाक्य आहे. वरच्या दोन वाक्यात विसंगती वगैरे आहे याची जाणीव होते आहे का..? तसेच जातीच्या चौकटी सोडल्या होत्या ना..? मग शिवसेनेत आणि भाजपमध्ये किती कोण मराठे होते ते तुम्हाला कुठून कळाले..? >>> जातीच्या चौकटी मिपावर आल्यावर कधीच सोडून दिल्या आहेत मग माझ्यावर व्यनीतून जातीवाचक आरोप करणे, कोणते मिपाकर ब्राह्मण आहेत आणि कोणते नाही याचेही रेकॉर्ड ठेवणे. हे काय आहे..? नक्की काय ते एक ठरवा की. शेतकरी कर्जमाफीबद्दल मी कुणाला उद्देशून काय बोललो आहे त्याचा संदर्भ द्या. हवेत आरोप करून सहानुभूती गोळा करू नका. मलाही तुमच्याकडे उत्तर मागण्याचे काहीच कारण नाही. ..पण किमान जे लिहित आहात त्याला संदर्भ बाळगा इतकेच. संदर्भ नसतील तर विधाने मागे घेणे सोपे आहे. मी चुकून असे कधी केले तर मला विधान मागे घ्यायला कधीही कमीपणा वाटणार नाही. माझ्याकडून पूर्णविराम - तुम्हाला तुमची विधाने मागे घेऊन व सामाजिक संकेत पाळून चर्चा करावयाची असल्यास तुमचे केंव्हाही स्वागत आहे.

In reply to by मोदक

विशुमित Sun, 12/10/2017 - 00:50
माझी कोणतीच विधाने मी मागे घेणार नाही. अन मला तुमच्याशी कोणतीच चर्चा करायची ही नाही आहे. भविष्यात कधी तूम्हाला माझ्या प्रतिसादला वैयक्तिक प्रतिक्रिया द्यायची असेल तर जरा अदबीने. खुळचटपणा खपवून घेणार नाही. सामाजिक संकेत कसे पाळतात याची मला चांगली जाण आहे. तुमच्या मार्गदर्शनाची गरज नाही. आता अवांतर बंद करा आणि चांगल्या धाग्याला वाट मोकळी करा. !!राम राम !!

In reply to by विशुमित

मोदक Sun, 12/10/2017 - 02:05
तुमच्यासारख्या फालतू बिग्रेडी लोकांशी सरळ संवाद शक्य नाही हा अंदाज खरा ठरला. राजकारण्यांच्या कच्छपी लागून इतिहासाचे विकृतीकरण आणि महापुरूषांवर बिनबुडाचे आरोप करून तुम्हाला नक्की काय काय मिळते ते तुम्हालाच माहिती, तुमची जी कांही गरज / मजबुरी असेल ती असेल.. मात्र असल्या हीन मनोवृत्तीचा इथे विरोधच होईल याची खात्री बाळगा. तुमच्या बोलवित्या धन्याच्या पिंका झेलून ते सगळे इथे ओतण्यापेक्षा संदर्भासह लिहिणे सोपे आहे, मात्र ते सोयीचे नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे रेटणे सुरू आहे हे उघड आहे. तुम्हाला बालदिनाच्या शुभेच्छा. शक्य झाल्यास मोठे व्हा.

In reply to by मोदक

विशुमित Sun, 12/10/2017 - 11:21
उगी उगी रडू नका... सर्टिफिकेट्स वाटण्याखेरीज काहीच काम उरलेले दिसत नाही. ... तेवढे फक्त ब्रिगेडी, फालतू, पिंका झेलणे हे शब्द टाळा. तुमच्या सारख्या २ दमडीच्या माणसाचे असले शब्द ऐकून घायला तुम्ही काय माझे कोणी लागत नाही आहात. बाकी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा फक्त ते संबंधित धाग्याच्या संबंधित प्रतिसादावर जाऊन विचारा? कोणाला उत्तरे द्याची आणि कोणाला नाही ते मी ठरवीन. आणि हो संवाद साधण्यासाठी सामाजिक संकेत कसे पाळले जातात याचा जवळ पास कुठे क्लास आहे का ते शोधा. उपयोगी पडेल. .... ( रात्रभर झोपले होते कि नाही ? मी रात्री पाणसिंग तोमर बघून झाल्यावर पण तुम्ही जागेच. शक्य असल्यास एक काम करा मस्त झोप काढा दुपारी ३ वाजे पर्यंत. झोप उडून देऊ नका आरोग्याची काळजी घ्या)

In reply to by विशुमित

arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 16:16
ब्राह्मण्यवादाचा माझा मुद्दा असला तरी श्री गुरुजी, नाखु जी, पैसे ताई, डांगे अण्णा, अजो, अत्रे, पीर ताई, सुबोध जी असे अजून असंख्य लोक आहेत जे माझ्या माहिती प्रमाणे ब्राह्मण आहेत ज्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत.
अहो, संबंध चांगले असण्याचा आणि कोण कोण्या जातीचा असण्याचा संबंध काय? तुमचे ब्राह्मणांशी संबंध चांगले नसले तरी माझे तुमच्याशी चांगलेच संबंध असतील. चांगले संबंध हे व्यक्तिगत असतात. कोणत्या का निमित्ताने असेना, आपण माझ्याशी संबंध चांगले आहेत असे म्हणाला आहात त्याबद्दल आनंद आहे. ============================= तुम्ही रामदासांना स्वराज्याच्या शत्रूचे हेर म्हटले तरी, आणि माझे त्यांच्याबद्दल आदराचे मत असले तरी, आपले व्यक्तिगत संबंध चांगले असू शकतात. प्रत्येकाचं तसं नसतं. म्हणून तुम्ही मोदक यांना पुरावा आहे कि नाही हे सांगा. ============================== भांडारकर केसमधे मी संभाजी ब्रिगेडला पाठींबा दिला (मंजे मी एक छोटाच माणूस आहे, पण मी फक्त ब्रिगेडचा राग समर्थनीय आहे असं म्हणालो कोणत्यातरी धाग्यावर.) तेव्हा माझे काही मित्र नाराज झाले. पण बिनबुडाच्या गोष्टींमधून भारताच्या महान राष्ट्रपुरुषाचा बाप काढणे हि डोके फिरवणारीच गोष्ट आहे. लोकशाहीमधे हिंसेचे समर्थन करता येत नाही, करयचेही नाही, तो भाग वेगळा. पण तो राग, विरोध किमान मलातरी नैसर्गिक / समजण्यासारखा आहे. तो राग फक्त ब्रिगेडलाच यावा हे अजूनच दुर्दैवी वाटले. ============================================ रामदास हेर होते हे तुम्हाला १००% वाटते कि काही तुमच्या नावडत्या वा भांडारकरी वृत्तीच्या म्हणू ब्राह्मणांना असे म्हटल्याने दु:ख होते म्हणून बोल्लून टाकायचा आनंद घ्यायचा? नै मन्जे तुमची बॉलिंग दुसरीकडे असली तर आम्ही का विकेट पाडून घ्यायची? ===================== मी देखील अनेक राष्ट्रपुरुषांचे दुर्गूण पाहतो, त्यातली त्यात नेहरू गांधी मला कमी आवडतात, रादर नकोसे वाटतात, पण हे सगळं त्यांच्या अधिकृत भूमिकेवर आधारित आहे. गॉसिपवर नाही. मला एक ब्राह्मण म्हणून जगाकडे पहायचं नाही (सवय पण कमी आहे.) प्पण जंड्रली थोर पुरुषांबद्दल जेव्हा असं काही लिहिलं बोललं जातं तेव्हा ते सत्य मानायचं आहे का, असत्य मानायचं आहे का, का ही ब्रिगेड वि. भांडारकर मॅच आपल्यासाठी नाही म्हणून सर्वांना महान मानत वा विसरत पुढे जायचं हे कळण्यासाठी तुमची मदत हवी आहे.

In reply to by विशुमित

arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 17:20
चालेल. पण चर्चा व्यनित नसलेली बरी. कारण व्यक्तिशः मला या कोणत्याच विषयात रस नाही. नाही मंजे इतका नाही कि वैचारिक मतभेदांची पार्श्वभूमी मला एकट्यालाच माहित असावी. बाकी थोडा थोडा इंटरेस्ट असतोच.

In reply to by arunjoshi123

विशुमित Mon, 12/11/2017 - 18:20
तुमचा आधीचा प्रतिसाद आवडला आणि पटला देखील. संबंधित धाग्यावर मी माझी भूमिका मांडण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. धन्यवाद...!!

In reply to by विशुमित

mayu4u Fri, 12/08/2017 - 22:50
मी ज्याविषयी बोलतोय, तो धागा वाचनमात्र झालाय. आणि केवळ त्याकरता जुना धागा वर आणण्यापेक्षा, इथं तुम्ही सक्रिय आहातच, तस्मात इथं बोलू. कसंय, विषयाला धरून चर्चा वगैरे मान्य असल्यानं शेतीविषयक धाग्यावर अवांतर टाळलेलं. पण तुमच्याकडनं एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा आहे, हे तुमच्यापर्यन्त पोचवायचं पण असतं ना!

In reply to by mayu4u

विशुमित Sat, 12/09/2017 - 12:49
केवळ त्याकरता जुना धागा वर आणण्यापेक्षा>>> ==>> त्याने काय फरक पडतो? मार्गदर्शक तत्व वाचा आधी. इथं तुम्ही सक्रिय आहातच, तस्मात इथं बोलू.>>> ==>> तुम्हीच तर लोकांना सांगताय इथे इथे हागणदारी करू नका? कसंय, विषयाला धरून चर्चा वगैरे मान्य असल्यानं शेतीविषयक धाग्यावर अवांतर टाळलेलं.>> ==>>> "" विशुमित यांचे मुद्देसूद प्रतिसाद वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला"" हा शहाणपणा तुम्ही केलात. पुढे चर्चा थांबलीच. पण तुमच्याकडनं एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा आहे, हे तुमच्यापर्यन्त पोचवायचं पण असतं ना!>>> ==>> मिपा ने नवीन टपाल खाते चालू केले आहे का?

In reply to by विशुमित

mayu4u Sat, 12/09/2017 - 19:08
मार्गदर्शक तत्व वाचा आधी.
वाचनमात्र झालेल्या धाग्यांविषयी काही दिसलं नाही. अशा धाग्यांविषयी काही मार्गदर्शक तत्व असल्यास वाचायला आवडेल.
इथे हागणदारी करू नका?
हो, हाXXदारी नकोच. स्पष्ट मुद्देच मांडा. हे मी आधीही बोललोय.
हा शहाणपणा तुम्ही केलात.
वैयक्तिक. त्यामुळे पास.
पुढे चर्चा थांबलीच.
त्याविषयी मी काय करणार? असंबद्ध.
मिपा ने नवीन टपाल खाते चालू केले आहे का?
हे असे फाटे फोडण्यापेक्षा तुम्ही केलेल्या विधानाचे पुरावे द्या. किंवा विधान मागे घ्या.

In reply to by विशुमित

एमी Sat, 12/09/2017 - 05:50
मिपावरचे सगळे धागे मी वाचत नाही त्यामुळे कोण कुठे काय बोललं माहित नाही, माहित करून घ्यायचीइच्छादेखील नाही पण मोदक आणि mayu4u ला खरंच आवरा. त्या डांगेना पण असच ट्रोल करून करून जेरीस आणलं होतं मोदकने! संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून फेवर चालुय का?

In reply to by एमी

पगला गजोधर Sat, 12/09/2017 - 07:30
विशुमित /अँमिजी, सोडून द्या ! इग्नोर देम... कंपू आहे तो एक.... मागे मी लिहिलंय... बोवा, झारीबहाद्दर, महालोलखान, अजून बरेच...आहे या कंपूमध्ये

In reply to by पगला गजोधर

एमी Sat, 12/09/2017 - 07:48
सोडून द्यायला इग्नोर करायला काही हरकत नाही हो पण ते डांगेअण्णा शेतीबद्दल चांगले प्रतिसाद होते! आता गेले कि ते निघून...

In reply to by एमी

पगला गजोधर Sat, 12/09/2017 - 08:51
बरोबर आहे, केवळ शेतीविषयक नाही, तर प्रचारकी प्रतिसाद/लेखा च्या पेक्षा वेगळा पेरस्पेक्टिव्ह त्यांच्या मुळे कळायचा... जाऊ द्या, मिपा चा लॉस आहे हा....

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Sat, 12/09/2017 - 10:07
अँमिजी, कसय न, कुठे काय चाललंय, याची इत्यंभूत माहिती व ज्ञान, इथे फक्त काही जनांनाच आहे, ....तुम्ही मी विशुमित वै लोकं यांना ते नाही... दुसरी बाजू समजून घेण्याचं औदार्य सुद्धा ह्यांच लोकांना, आपल्या सारख्या कडे नाही.... समोईच्याला देशद्रोही धर्मद्वेषी खांग्रेसी आप्तांर्ड ब्रिगेडी वैगरे हे लोकं कधीच ठरवत नाही, पण आपल्या प्रतिक्रियेतून लगेचच ह्यांना भक्त ठरवलेच असा दुर्बोध यांचा लगेचच.... त्यामुळे म्हटलं, इग्नोर देम....

In reply to by पगला गजोधर

mayu4u Sun, 12/10/2017 - 08:29
प्रत्येकजण समविचारी आयडींना समर्थन देतो. पण त्याला कम्पूबाजीचं नाव देऊन काही ठराविक आयडी रडत असतात. मी तुमच्या आणि विशुमितच्या काही विचारांशी सहमती दर्शवलीये. असो.
डांगेअण्णा शेतीबद्दल चांगले प्रतिसाद होते! आता गेले कि ते निघून...
बोकाशेठ आणि गवि यांनी गेल्या काही महिन्यात मिपा वर लिहिलं नाहीये. त्यांना कुणी जेरीस आणलेलं का? एखादा आयडी लिहीत नसेल तर उगा त्याचा बादरायण संबंध इतर गोष्टींशी जोडू नका. डांगेंच्या काही विधानांचे पुरावे त्यांच्याकडे मागितले होते. जर ती विधानं खरी असती, तर पुरावे देऊन प्रश्नकर्त्यांना गप्प करता आलं असतं. पण मुळात हवेतल्या बाता मारल्याने काही पुरावे नव्हते म्हणून डांगे गायबलेत. उगा मिपा चा लॉस म्हणून गळे काढू नका. एवढंच वाटतंय तर सांगा त्यांना परत मिपा वर यायला. हेच विशुमित ना पण सांगतोय. त्यांनी केलेल्या विधानांचे सबळ पुरावे/विश्वसनीय स्रोत देऊन मला गप्प करावं. किंवा ते विधान मागं घ्यावं. पण ते यापैकी काहीही करणार नाहीत, असं म्हणतायत. हे तुम्हाला आणि अॅमी ताईंना मेनी असावं.

In reply to by एमी

मोदक Sat, 12/09/2017 - 08:50
मोदक आणि mayu4u ला खरंच आवरा. त्या डांगेना पण असच ट्रोल करून करून जेरीस आणलं होतं मोदकने! संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून फेवर चालुय का? मी संदर्भासहित बोलतो. मालकांच्या ओळखीचा काय प्रश्न आहे..? विशुमीत आणि डांगे खोटे बोलत आहेत / होते याकडे सोयीस्करपणे का दुर्लक्ष करत आहात..? तसेच, जे काय आपले म्हणणे आहे ते संदर्भासहित असावे आणि त्यामध्ये खोटेपणा नसावा ही साधी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का..? अ‍ॅमीजी - तुमच्या सोयीचे आयडी खोटे बोलतात ते बाकीच्यांनी चालवून घ्यावे मात्र त्यांना आजिबात त्रास दिला जाऊ नये ही अजब सोयीस्कर अपेक्षा आहे. २०१४ पासून सातत्याने गरळ ओकणार्‍या आयडींकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले होतेच. नंतर त्यांचा खोटेपणा उघडा पडू लागल्याने तुमची तडफड होत असेल तर मूळ खोटेपणा जिथे होत आहे तिथे उपदेशाचे डोस पाजा. रिअ‍ॅक्टिव्ह अर्ग्युमेंट्सना थांबवण्याऐवजी सुरूवात कुठे होत आहे ते थांबवणे (कितीही गैरसोयीचे असले तरी) आवश्यक असते.

In reply to by एमी

कुठे काय चाललंय हे माहित नसताना आणि माहित करून घ्यायची इच्छा नसताना देखील तुम्ही एका बाजूवर आरोप/टीका करत आहात. कदाचित तुमच्या नकळत तुम्ही दुसऱ्या कंपू मध्ये सहभागी तर होत नाही आहात हे तपासून पहा असा सल्ला देतो. नाही दुसऱ्यांच्या मतांना सरसकट भक्त प्रकारात टाकणाऱ्यांची बाजू घेऊन हे असे मत मांडताय म्हणून म्हणतोय.

In reply to by एमी

mayu4u Sat, 12/09/2017 - 11:49
अॅमी ताई, मिपा चे संपादक आणि मालक कोण आहेत, याची मला स्पष्ट कल्पना नाही. आणि त्यांना मी (किंवा मला ते) ओळखत देखील नाही. उगा फेवर चालूये वगैरे बिनबुडाचे आरोप करू नका.
मिपावरचे सगळे धागे मी वाचत नाही त्यामुळे कोण कुठे काय बोललं माहित नाही, माहित करून घ्यायचीइच्छादेखील नाही
नाही, जुने धागे वाचाच तुम्ही. "समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते" असं विधान विशुमित यांनी केलेलं. त्याचा पुरावा मागणं चुकीचं आहे का? अभ्यास वाढवा, एवढंच सुचवेन.

In reply to by mayu4u

arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 15:37
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते"
मी उगीचच नोकरीचं टेशन्स घेत होतो. मुस्लिम सत्तांकडून ब्राह्मण हेरांची इतकी मागणी असताना टेन्शन कायकू लेने का?

In reply to by एमी

शब्दबम्बाळ Tue, 12/12/2017 - 09:04
त्यांच्याकडे जगातले सगळे ज्ञान आहे! ४-५ च लोक आहेत ज्ञानी मिपावर, त्यांना सर्टिफिकेट वाटणे, लायकी काढणे, पगार काढणे अशी अत्यंत महत्वाची काम करावी लागतात. हि सगळी काम सुसंस्कृत लोकच करू शकतात त्यामुळे इतर लोक फालतू असतात. हल्लीच गोडसेंना ट्रोलिंग करू लागले होते पण चुकून जरा विरोध झाला कि "त्यांना सांगा, आम्ही तर आधीपासूनच शहाणे आहोत" टाईप चा शहाजोगपणा करणे पण यांनाच जमते. आम्ही जातीभेद करत नाही म्हणायचं आणि ब्राह्मणेतर आयडी ने चुकून "कुठल्याही" ब्राम्हण व्यक्तीला(मुख्यमंत्री असले तरी) नाव ठेवली कि लगेच त्याला बिग्रेडी वगैरे विशेषण बहाल करायची. इथे जात बघत नाहीत बर का हे लोक! जणू कुठल्या व्यक्तीला तिचे स्वतःचे असे विचारच नसतात, सगळे विचार फक्त जात आणि संघटनांचेच असतात... पार वाट लावलीये मिपाची त्यामुळे यावंसं वाटत नाही आता, पण काही लोकांचे लेखन वाचनीय असते अजूनही... माफ करा ट्रुमन भाऊ, अजून एक बिन कामाचा प्रतिसाद आला धाग्यावर...

In reply to by शब्दबम्बाळ

थॉर माणूस Wed, 12/13/2017 - 00:17
हा गाळ उपसत बसायचा कंटाळा येतो म्हणूनच मग इकडे फिरकणं कमी होतं. तरीपण ब्राऊजर मधे कायम टॅबमधे असतो म्हणून कधीतरी चक्कर मारून काही वाचण्यासारखं आहे का ते पहातो आता. एकूणच आपण सर्वज्ञानी आणि समविचारी नसाल तर यांच्यावर वेळ न घालवलेला बरा अशी एकंदरीत मानसिकता माझीही झालेली आहे.

In reply to by विशुमित

मोदक Fri, 12/08/2017 - 14:23
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधले वाक्य.. "भाजपमध्ये कोणाला तिकीट दिले जावे किंवा नाही याबद्दल राहुल गांधींनी आक्षेप घेतला का ? " आणि हा दिग्गीराजाचा आक्षेप.
आता दिग्गीराजाचा आणि राहुल गांधीचा संबंध नाही अशा पळवाटा असल्या तर सांगा.

In reply to by मोदक

विशुमित Fri, 12/08/2017 - 17:53
आता दिग्गीराजाचा आणि राहुल गांधीचा संबंध नाही अशा पळवाटा असल्या तर सांगा.>>> ==>> मी कशाला सांगू? मी पार्टी विद डिफरेन्स बद्दल बोलत आहे. काँग्रेसबद्दल नाही.

In reply to by विशुमित

मोदक Fri, 12/08/2017 - 18:14
तुम्ही लिंक दिली आहे म्हणजे त्यातल्या विचारांशी सहमत आहात. वर तुम्ही पार्टी विथ डिफरन्स अशी मखलाशीही केली आहे. मी फक्त त्या लिंकमधली विसंगती दाखवली आहे. "संदर्भ आणि पुराव्यांसह" काँग्रेसबद्दलही बोला कधीतरी. सोयीस्कर लिंका चिकटवून एकाच पार्टीची काळी बाजू काळी बाजू असा कांगावा करण्याऐवजी निष्पक्षपणाने दोन्ही बाजू मान्य करणे फार अवघड नाहीये.

In reply to by मोदक

विशुमित Fri, 12/08/2017 - 18:37
काँग्रेसबद्दलही बोला कधीतरी.>>> ==>> अच्छा हा प्रॉब्लेम आहे तर. ओके नोटेड. पण वारे (सरकार) भाजपचे वाहत आहे ना ! असो...

babu b Fri, 12/08/2017 - 14:26
अग्गोबै , भाजपाने जाहिरनामाच काढला नाही म्हणे

In reply to by babu b

हितेस भाय केम छो. अबि हितेस बोलो कि दादा दरेकर बात तो एक हि है नो. वो मांजर के जंत बैठ गये क्या ?

In reply to by श्रिपाद पणशिकर

बाबुस मियॉं ईधर कु कायकु अपनि पंचर कि दुकान फिरसे खोलरा रे बावा, वो क्या एड्स के लेबॉरेटरी मे कंपाउडरा था ना रे तु, उधर भि जुते चप्पला, सँडला जम के पडि लगता. ऐक टंगडि पैलेच तोडके बैठा था. अबि तु एक्किच काम कर वो तेरा खलेरा भाई चाउस हा हा वैच्च रे हाफिज वो अगले साल पॉटिस्ताना मे ईंतेखाबा मे शरीक होरेला है. तु अपना सब टिन टप्पर, जंत वाला मांजर लेकर बस निकल्लै चाऊस के पास.

In reply to by श्रिपाद पणशिकर

babu b Sat, 12/09/2017 - 18:59
मेरा नाम डुप्लिकेट ? तेरा भी डुप्लिक्ट लग रहा है ! श्री पाद पण शी कर !

डँबिस००७ Fri, 12/08/2017 - 14:48
काँग्रेस समर्थकांची काँग्रेस सारखीच केविलवाणी परिस्थीती झालेली आहे. बुडत्यालाही आता कोणत्याही काडीचा आधार वाटायला लागलेला आहे !!

गॅरी ट्रुमन Sat, 12/09/2017 - 17:35
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठी मतदान पार पडले. एकूण ६९% मतदान झाले अशा बातम्या आल्या आहेत. चार वाजेपर्यंत ६०% मतदान झाले होते. ते पुढीलप्रमाणे: 1 वरकरणी हा आकडा २०१२ मध्ये झालेल्या मतदानापेक्षा थोडा कमी वाटत आहे.

७०% मतदान झाले याचा अर्थ ॲन्टीइन्कंम्बसी फॅक्टर असावा,गुजरातमध्ये मोदी/भाजप पडले तर मला व्यक्तीशः फार आनंद होईल. सातारी कंदी पेढे वाटेन म्हणतो!

In reply to by सिंथेटिक जिनियस

mayu4u Sat, 12/09/2017 - 20:51
नरेंद्र मोदींविषयी म्हणत असाल तर ते तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, कारण ते निवडणूक लढवत नाहीयेत. भाजप चा पराभव हा मात्र नरेंद्र मोदींसाठी प्रचंड मोठा धक्का ठरेल.

In reply to by सिंथेटिक जिनियस

गामा पैलवान Sat, 12/09/2017 - 23:03
सिंजि, गुजरातेत नेमकं उलटं चित्रं आहे. मोदीशहां उदासीन मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाताहेत. त्यामुळे जी मतांची टक्केवारी वाढते ती सगळी भाजपच्या घशात जाते. त्यामुळे जास्त मतदान भाजपच्या पथ्यावर पडणारं आहे. आ.न., -गा.पै.

डँबिस००७ Sun, 12/10/2017 - 00:49
गा पै तुमच म्हणण सिं जि ला पचणार नाही ! ते सातारी कंदी पेढ्याची मोठी आॅर्डर देऊन बसलेत ! भाजप जर निवडणुक जिंकली तर मोठी गोची होईल! पंजाब मध्ये निवडणुक जिंकण्याची खात्री बाळगुन केजरीवाल साहेबानीं विजय साजरा करण्याची जय्यद तयारी ठेवली होती त्याची आठवण ह्या निमित्त्याने झाली !!

एमी Sun, 12/10/2017 - 08:50
संपादक, आवरा खरंच लोकांना! धाग्याचा विषय काय आणि काहीही असंबंध प्रतिसाद काय देत सुटलेत! अवांतर करायचंच असेल तर काही उपयोगी, माहितीपूर्ण असलेलं तरी करा.... त्या दुसऱ्या एका धाग्यावरपण असंच गेल्या आठवड्यापासून फालतुगिरी करत सुटलेत....

In reply to by एमी

मोदक Sun, 12/10/2017 - 09:05
तुम्हाला खरेच मुद्दे समजत नाहीयेत की सोयीचे नाहीयेत म्हणून समजून घ्यायचे नाहीयेत..? डाव्या लोकांचे अनेक गैरसोयीच्या गोष्टींबद्दल सोयीस्कर आक्षेप असतात, हे पूर्वी तुमच्याबाबतच बघितले होते. तुमचा बाएस आणि कंपुगिरी पुन्हापुन्हा कशाला दाखवून देत आहात..?

babu b Sun, 12/10/2017 - 09:25
इंदिराजी जब मोरबी आयी थी तब उनके नाक पे रुमाल था. ( सांगणारे हे सांगायचे विसरले की तेंव्हा तिथे प्रेते हलवायचे काम सुरु होते, त्यामुळे तिथे उपस्थीत असलेल्या सर्वच लोकानी नाकावर रुमाल , मास्क लावले होते. ) http://indiatoday.intoday.in/story/yes-indira-gandhi-covered-her-nose-in-morbi-but-she-had-a-reason-a-tragedy/1/1099560.html त्याच मोरबी जिल्ह्यात एका गावात भाषणबाजीचा काहीही उपयोग झाला नाही. पाणीप्रश्न न सोडवल्याबद्दल मोरबी मतदारसंघातील एका गावात एकाही व्यक्तीने मतदान केले नाही. अधिकार्यांच्या मनधरणीलाही लोकानी भीक घातली नाही. https://www.prabhatkhabar.com/news/other-state/gujarat-a-village-zero-polling-1000-voters-election-boycott/1095978.html

पगला गजोधर Sun, 12/10/2017 - 10:28
विशुमित / अँमिजी, तुम्हाला विनंती, तुमचे काही लेख/प्रतिक्रिया, खूप छान वाटल्या, आवडल्या, म्हणून तुमच्या बाद्दल एक प्रकारचा आदर व मैत्रभाव वाटतो, आणि त्या आत्मीयतेतून, तुम्हाला विनंती करतो... या अश्या ट्रोलिंग्ज च्याबाबतीत, "इग्नोरम सर्वार्थ साधनम", हीच पॉलिसी ठेवा. माझ्याही प्रतिक्रियेवर काहीबाही लिहून, मला प्रतिक्रिया देण्यासाठी उकसवत आहे, असे वाटल्यास, मी हेच धोरण ठेवतो... मोडस ऑपरेंडी ऑफ टिपिकल भक्त व्हाईल इंटरअँकटिंग ऑन सोशल मीडिया या संदर्भातील एक लिंक व्यनि करेन, सध्या नेमकी सापडत नाहीये...

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Mon, 12/11/2017 - 16:27
तुम्हाला विनंती, तुमचे काही लेख/प्रतिक्रिया, खूप छान वाटल्या, आवडल्या, म्हणून तुमच्या बाद्दल एक प्रकारचा आदर व मैत्रभाव वाटतो, आणि त्या आत्मीयतेतून, तुम्हाला विनंती करतो...
वाईट दिस सरेपातूर असे हात हातात घिउन एकत्र राहायचेच दिस हैत हे.

mayu4u Sun, 12/10/2017 - 10:52
आधी धादांत खोटं लिहायचं, आणि पुरावे मागितले की दुर्लक्ष करून नव्या जोमानं नवं खोटं बोलायचं... कधी सुधारणार हे लोक कोण जाणे!