गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७
नमस्कार मंडळी,
गुजरात विधानसभा निवडणुकांसाठीचे पडघम वाजू लागले आहेतच. राज्यात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे तर मतमोजणी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. नेहमीप्रमाणे १८ डिसेंबरला सकाळपासूनच मिपावर ऑनलाईन असणारच आहे. या लेखातून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याविषयीचे माझे मत मांडणार आहे.
खालील नकाशात दाखविल्याप्रमाणे गुजरात राज्यात कच्छ, सौराष्ट्र, मध्य गुजरात, उत्तर गुजरात आणि दक्षिण गुजरात असे पाच विभाग आहेत.
(संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg)
खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः
खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल.
२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच.
या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः
१. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्याच जागा जास्त जिंकल्या होत्या.
२. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते.
३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत.
गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे.
यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल.
गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो.
२०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत
राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः
१. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार
काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते.
२०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही.
२. नोटबंदी आणि जी.एस.टी
नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः
२अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते.
२बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे.
३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट
हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच.
सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते.
भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त.
४. काँग्रेसमधील लाथाळ्या
गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही.
काँग्रेस बर्यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत
या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल.
राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger”
१४ डिसेंबरला दुसर्या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन.
(संदर्भः http://www.gujaratindia.com/images/guj-map-divied.jpg)
खालील तक्त्यात या विभागांमध्ये येणारे जिल्हे आणि एकूण विधानसभा मतदारसंघ दाखविले आहेतः
खालील तक्त्यात या विभागांमध्ये गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये निकाल कसे लागले हे बघता येईल.
२००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यामुळे २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील विभागांमधील मतदारसंघांच्या संख्येत फरक होता हे या तक्त्याच्या शेवटच्या दोन कॉलमवरून कळेलच.
या तक्त्यावरून आपल्याला पुढील निष्कर्ष काढता येतातः
१. राज्यात भाजप सर्व विभागांमध्ये बर्यापैकी शक्तीशाली आहे. अनेकदा राज्यात सत्तेत असले तरी राज्याच्या सर्व विभागांमध्ये एखाद्या पक्षाची ताकद असतेच असे नाही. गुजरातमध्ये भाजपची अशी स्थिती नाही. २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्येच भाजपने काँग्रेसपेक्षा दोन जागा कमी जिंकल्या होत्या. इतर सर्व विभागांमध्ये भाजपने काँग्रेसपेक्षा बर्याच जागा जास्त जिंकल्या होत्या.
२. एकेकाळी दक्षिण गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष बर्यापैकी ताकद राखून होता. पण हळूहळू भाजपने काँग्रेसला तिथूनही हुसकावून लावले असे दिसते.
३. तक्त्यावरून कळेलच की मध्य गुजरातमध्ये २०१२ मध्ये २००७ च्या तुलनेत ४ विधानसभा जागा जास्त होत्या तर दक्षिण गुजरातमध्ये ३. सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातमधील जागांची संख्या अनुक्रमे ४ आणि ३ ने कमी झाली. यातही अजून महत्वाचे म्हणजे मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागातील विधानसभा जागांची संख्या वाढली आहे तर ग्रामीण भागातील जागांची संख्या कमी झाली आहे. राज्यातील तीन सर्वात मोठी शहरे आहेत अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा. त्यापैकी दोन, अहमदाबाद आणि वडोदरा मध्य गुजरातमध्ये आहेत तर सुरत दक्षिण गुजरातमध्ये आहे. २००७ मध्ये अहमदाबाद शहरामध्ये १२, सुरत शहरामध्ये ७ तर वडोदरा शहरामध्ये ३ जागा होत्या. त्या २०१२ मध्ये वाढल्या आणि अहमदाबादमध्ये आता १७, सुरतमध्ये ९ आणि वडोदरामध्ये ५ जागा झाल्या आहेत.
गुजरात हे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे त्या राज्यात शहरी भागातील विधानसभेच्या जागांची संख्या वाढणे क्रमप्राप्त होते. भाजप शहरी भागांमध्ये बर्यापैकी बलिष्ठ आहे. त्यामुळे शहरी भागामधील विधानसभेच्या जागांची संख्या वाढल्याचा फायदा २०१२ मध्ये भाजपलाच झाला होता. मी म्हणत आहे की भाजप शहरी भागांमध्ये बलिष्ठ आहे. वर दिलेल्या तक्त्यावरून ते कळणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यातील शहरांमध्ये २०१२ च्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी कशी होती हे बघायला लागेल. ते खालील तक्त्यात दिले आहे.
यावरून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते. २०१२ मध्ये भाजपने या शहरांमधील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या म्हणजे या शहरांमध्ये भाजपचा 'स्ट्राईक रेट' जवळपास ९०% होता. २०१२ मध्ये भाजपने पूर्ण गुजरातमध्ये १८२ पैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. याचाच अर्थ ही शहरे सोडून राज्याच्या इतर भागांमधून भाजपने १४१ पैकी ७८ जागा जिंकल्या होत्या म्हणजेच ही शहरे वगळता भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५५% म्हणजे त्या मानाने बराच कमी होता. उरलेल्या १४१ जागांपैकी अनेक जागा निमशहरी भागातील आहेत. या जागांवर भाजपचा स्ट्राईक रेट ९०% नसला तरी ५०% पेक्षा नक्कीच बराच जास्त होता. म्हणजेच ग्रामीण भागातील विधानसभा जागांवर भाजपचा 'स्ट्राईक रेट' ५०% पेक्षा थोडा कमीच होता. मतदारसंघांच्या पुनर्रचनेमुळे शहरी भागांमधील जागा वाढल्याचा भाजपला कसा फायदा झाला हे त्यातून समजू शकेल.
गुजरात निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर २०१७ मध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता लिहितो.
२०१७ च्या परिस्थितीविषयीचे माझे मत
राज्यात भाजप मार्च १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीतला खंड वगळता) सतत सत्तेवर आहे. इतकी वर्षे सत्तेत असल्यामुळे भाजपला प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसणे अपेक्षित आहे. त्यातच हार्दिक पटेलच्या आंदोलनामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे केले होते. २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शहरी भागात भाजपने आपला बालेकिल्ला राखला पण ग्रामीण भागात मात्र बर्यापैकी पिछेहाट झाली होती. अशावेळी भाजपला या निवडणुका जड जाणार का या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा तौलनात्मक अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही. याविषयी मला पुढील मुद्दे मांडायचे आहेतः
१. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार
काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा लोकप्रिय स्थानिक चेहरा नाही हा पक्षापुढे असलेला मोठा अडसर आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केलाच पाहिजे ही गरज आता राहिलेली नाही. कारण नरेंद्र मोदींचे स्थान आता इतके मोठे झाले आहे की मोदी राज्यांमध्ये मुख्यमंत्री व्हायला जाणार नसले तरी विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप मोदींच्या नावावर मते मागू शकतो. उत्तर प्रदेशात त्यातून मोठे यश पक्षाने मिळवले होते. पण जर विरोधी पक्षांनी स्थानिक लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर मात्र भाजपचा पराभव होऊ शकतो हे दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालातून कळतेच. गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा चेहरा मुळातच नाही याचा त्रास काँग्रेसला होईल असे मला वाटते.
२०१२ मध्ये मी गुजरात विधानसभा निवडणुकांचा बराच अभ्यास केला होता.तेव्हा जाणवले होते की स्थानिक उमेदवार कोणीही असला तरी मतदारांपुढे मोदींचा चेहरा आणि त्यांची लोकप्रियता हे मुद्दे महत्वाचे होते म्हणजे एका अर्थी सर्व १८२ जागांवर भाजपकडून नरेंद्र मोदीच निवडणुक लढवत आहेत अशी परिस्थिती होती. आज मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून पंतप्रधानपदावर गेले असले तरी या परिस्थितीत फार फरक पडलेला दिसत नाही.
२. नोटबंदी आणि जी.एस.टी
नोटबंदी आणि जी.एस.टी चा भाजपला त्रास होईल का? हे दोन्ही निर्णय घेताना मोदींनी मोठी राजकीय जोखिम उचलली होती. व्यापारी आणि छोटेमोठे व्यावसायिक हा जनसंघाच्या दिवसांपासून पक्षाचा पाठिराखा होता. गुजरातमध्ये या वर्गाचे प्रमाण बरेच मोठे आहे.या वर्गातून करचुकवेपणाचे प्रमाण मोठे होते हे अगदी उघडे गुपित आहे. पण जी.एस.टी मुळे यांनाही कर भरणे सक्तीचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यात भाजपविरोधी असंतोष असणे अपेक्षित आहे. तरीही याविषयी मला दोन गोष्टी लिहाव्याशा वाटतातः
२अ: नोटबंदीमुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे आणि त्याचे प्रतिबिंब उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये उमटणार असे चित्र उभे केले गेले होते. तसे काहीही झाले नाही. याचे कारण काय असावे? माझ्या मते नोटबंदीनंतर प्रथमच श्रीमंतांची तारांबळ उडत आहे, त्यांना बँकेपुढे रांगा लावाव्या लागत आहेत असे चित्र उभे राहिले. नाही म्हटले तरी गरीब वर्गात श्रीमंतांना असा त्रास द्यायचा निर्णय मोदींनी घेतला याचे समाधान वाटले असेल तरी आश्चर्य वाटायला नको. त्यातूनच पूर्वी भाजपला कधीही मत न दिलेल्या वर्गानेही भाजपला मते दिली. म्हणजे नोटबंदी आणि जी.एस.टी मुळे भाजपचा पारंपारिक समर्थक वर्ग जरी दुखावला गेला असला तरी त्याची भरपाई भाजपला पूर्वी कधीही मत न दिलेल्या वर्गाच्या समर्थनातून होऊ शकेल असे मला वाटते.
२बः दुसरे म्हणजे जरी नोटबंदी आणि जी.एस.टी हे निर्णय आवडले नसले तरी दुखावल्या गेलेल्या वर्गापुढे दुसरा कोणता समर्थ पर्याय आहे का? राहुल गांधींनी कितीही राणा भिमदेवी थाट आणला असला तरी त्यांच्या मर्यादा सर्वांनाच माहित आहेत. याविषयी भाऊ तोरसेकरांनी एका लेखात म्हटले आहे की ऐन दिवाळीत महाराष्ट्रात एस.टी चा संप झाला त्यावेळेनंतर टमटम, खटारा इत्यादी स्थानिक वाहतुक सेवांना पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त बरकत आली का? तर तसे होऊ शकले नाही कारण शेवटी गावांमध्ये सेवा पुरविण्यात एस.टीचा हात कोणी धरू शकत नाही.त्यामुळे लोकांना एस.टी शिवाय पर्याय नव्हता. भाजपची गुजरातमधील स्थिती काहीशी तशीच आहे.
३. हार्दिक-अल्पेश-जिग्नेश त्रिकूट
हार्दिक पटेलने भाजपपुढे सुरवातीला मोठे आव्हान उभे केले ही गोष्ट खरी आहे. पण काँग्रेसने त्याचा योग्य फायदा उचलला नाही असे म्हणावेसे वाटते. हार्दिक पटेलची मागणी आहे पाटिदार समाजाला आरक्षण द्यावे. आणि असे आरक्षण दिल्यास मुळात आरक्षण मिळणार्या ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी एक वाटेकरी येणार म्हणून ओबीसींचा या पाटीदार आरक्षणाला विरोध आहे. ओबीसी नेता अल्पेश ठाकोरचे म्हणणे तेच आहे. म्हणजे हार्दिक आणि अल्पेश यांच्या मागण्या परस्परविरोधी आहेत. या दोघांनाही काँग्रेसने एकाच वेळी एकत्र आणले असले तरी त्यामुळे त्यांचे समर्थक मात्र दुखावले गेले आहेत हे नक्कीच.
सुरवातीला आपले आंदोलन गैरराजकीय असेल असे जाहिर करणार्या हार्दिकने नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली हे न आवडल्यामुळे हार्दिकच्या अनेक समर्थकांनी त्याच्या आंदोलनाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
त्याचप्रमाणे सुरवातीला हार्दिक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्याही बातम्या होत्या. तसेच नंतर हार्दिक समर्थकांना उमेदवारी द्यावी लागल्यामुळे काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये आधी जाहिर केलेले उमेदवार बदलले. काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाबरोबर युती करताना जी चूक केली त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे. जो काही निर्णय असेल तो पडद्याआड घेऊन मग जाहिर करणे श्रेयस्कर ठरले असते पण काँग्रेसने घाईघाईत निर्णय घेतला हे जाहिर केले आणि दुसर्या पक्षाच्या हातात जास्त बार्गेनिंग पॉवर आपण होऊन दिली. आता दलित नेता जिग्नेश मेवानीने काँग्रेसबरोबर निवडणुक न लढवता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवायचे ठरवले आहे. इतके दिवस या त्रिकूटाचा पाठिंबा आपल्याला असणार असे चित्र काँग्रेसने उभे केले होते.
भाऊ तोरसेकरांनी हार्दिक पटेलविषयी एक म्हणणे मांडले आहे. ते म्हणतात की २०१२ मध्ये पाटीदार समाजाचे सर्वात ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून मोदींना आव्हान उभे करायचा प्रयत्न केला होता. त्याचे काय झाले? केशुभाईंच्या पक्षाला ३% मतेही मिळू शकली नव्हती. हार्दिक हा केशुभाईंपेक्षा जास्त लोकप्रिय आहे का? भाऊ तोरसेकरांनी आणखी एक मुद्दा मांडला होता. १९७० च्या दशकात गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन झाले होते त्यावेळच्या विद्यार्थी नेत्यांची नावेही आपल्या आता लक्षात आहेत का? असे नेते येतात आणि जातात. विशेषत: धरसोडपणा केल्यास अशा नेत्यांची विस्मृतीत अस्तंगत व्हायची शक्यताच सर्वात जास्त.
४. काँग्रेसमधील लाथाळ्या
गुजरात निवडणुकांपूर्वी काही महिनेच शंकरसिंग वाघेला पक्षातून बाहेर पडले. वर दिलेल्या तक्त्यातून समजते की २०१२ मध्ये उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या होत्या. त्याच भागात-- पंचमहल, दाहोद, गोध्रा शंकरसिंग वाघेलांना काही प्रमाणावर जनाधार आहे. वाघेलांनंतर काँग्रेसचे अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिक पटेलच्या समर्थकांना उमेदवारी द्यायला लागली म्हणून काँग्रेसने आधी उमेदवारी जाहिर केलेल्या काहींचे तिकिट कापले. हे सगळे प्रकार काँग्रेससाठी नक्कीच चांगले नाहीत. विशेषतः २२ वर्षांनंतर भाजपला हरवायची संधी प्रथमच चालून आलेली असताना एकदिलाने आणि व्यवस्थित आखणी करून निवडणुकांना सामोरे जायला पाहिजे होते. तसे होताना मात्र दिसत नाही.
काँग्रेस बर्यापैकी सुस्थितीत असलेल्या उत्तर गुजरातमध्ये (पाटण, बनासकांठा जिल्ह्यात) पूर आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार बंगलोरला जाऊन बसले होते हे चित्र उभे करण्यात भाजप बर्यापैकी यशस्वी झाला. जर पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आले असेल तर त्याचा दोष राज्य सरकारला जायला हवा. पण नेमक्या त्याचवेळी काँग्रेस आमदार बंगलोरला जाऊन बसल्यामुळे राज्य सरकारला 'तुम्ही काय केलेत' हा प्रश्नही काँग्रेसला विचारायची कोंडी झाली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकांविषयीचे माझे मत
या सगळ्या परिस्थितीत मला वाटत आहे की भाजपला या विधानसभा निवडणुका जिंकायची चांगली संधी आहे. सुरवातीला अनुकूल परिस्थिती असूनही काँग्रेसने नेहमीप्रमाणे सगळ्याचा विचका केलेला दिसत आहे. मला वाटते की भाजप १८२ पैकी १३० ते १३५ जागा जिंकेल. प्रत्यक्षात काय होईल हे १८ डिसेंबरलाच समजेल.
राजदीप सरदेसाईंचे गुजरातमधील राजकीय परिस्थितीविषयी एक विधान देऊन हा लेख संपवतो. राजदीप सरदेसाई म्हणतातः “Only anger can unseat BJP in Gujarat. At the moment, there is disappointment with BJP but not outright anger”
१४ डिसेंबरला दुसर्या फेरीतील मतदान झाले की नंतर एक्झिट पोल्सचे निकाल येतील. शक्य झाल्यास त्यापूर्वी मतमोजणीपूर्व धागा काढून कसेही निकाल लागल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी माझे मत मांडेन. वर्गीकरण
वाचने
83854
वाचनखूण
प्रतिक्रिया
310
राजकीय परिस्थितीवर माझे फेसबुक पेज
खरं म्हणजे, मीडियातील बातम्या
In reply to खरं म्हणजे, मीडियातील बातम्या by पगला गजोधर
बव्हंशी सहमत.
In reply to खरं म्हणजे, मीडियातील बातम्या by पगला गजोधर
सेफ पोजिशनमध्ये
इथे EVM ने पारदर्शक काम केले
In reply to इथे EVM ने पारदर्शक काम केले by विशुमित
पंजाब मध्ये...
In reply to पंजाब मध्ये... by mayu4u
निवडणुकीचा निकाल काय लागतो
In reply to इथे EVM ने पारदर्शक काम केले by विशुमित
इथे EVM ने पारदर्शक काम केले
इथे EVM ने पारदर्शक काम केले पाहिजे फक्त. बाकी जनतेच्या कौलाचा आदर आहे.शक्यता क्र. १) भाजपचा विजय निष्कर्ष - EVM मध्ये गडबड शक्यता क्र. २) भाजपचा पराभव निष्कर्ष - EVM मध्ये गडबड नाही यापूर्वी झालेल्या निवडणुकांवरून निघालेले निष्कर्ष - पंजाब, बिहार, दिल्ली, नांदेड महापालिका, मालेगाव महापालिका, भिवंडी महापालिका - EVM मध्ये गडबड नाही महाराष्ट्र, हरयाना, झारखंड, उत्तर प्रदेश, आसाम, उत्तराखंड, पुणे व इतर ११ महापालिका - EVM मध्ये गडबडIn reply to इथे EVM ने पारदर्शक काम केले by विशुमित
इथे EVM ने पारदर्शक काम केले
In reply to इथे EVM ने पारदर्शक काम केले by सुबोध खरे
...
In reply to ... by babu b
भाषणामध्ये दहा मिनिटं पणजोबा,
In reply to इथे EVM ने पारदर्शक काम केले by विशुमित
काँग्रेस अशा प्रकारे दक्षता
+1
In reply to +1 by mayu4u
...किंवा धरणात.
UP Civic Polls चा रिझल्ट आला
निवडणुकीची व्यूहरचना व मतदान टक्केवारी
In reply to निवडणुकीची व्यूहरचना व मतदान टक्केवारी by गामा पैलवान
70% पेक्षा जास्त होईल असे
In reply to 70% पेक्षा जास्त होईल असे by खेडूत
माझ्या मते मतदानाची जास्त
In reply to माझ्या मते मतदानाची जास्त by पगला गजोधर
उलटी गंगा वाहते कारण नवीन १८
In reply to उलटी गंगा वाहते कारण नवीन १८ by खेडूत
वॉव...
In reply to वॉव... by पगला गजोधर
ठीक है गजोधर भैया
In reply to ठीक है गजोधर भैया by ट्रेड मार्क
ठरलं बिरल नाही काही, आणि
In reply to निवडणुकीची व्यूहरचना व मतदान टक्केवारी by गामा पैलवान
....
In reply to .... by babu b
मागची २० वर्षे भाजपाचेच सरकार
In reply to निवडणुकीची व्यूहरचना व मतदान टक्केवारी by गामा पैलवान
बदललेले आयाम
In reply to बदललेले आयाम by गॅरी ट्रुमन
कारण मोदी-शहांनी ते आयाम
आयामपरिमाणे संपूर्णपणे बदलली आहेत. आजचा भाजप हा भाजप (एम) आहे. ब्लिट्झक्रिट्झ पद्धतीचा झंझावाती प्रचार हे आजच्या बिजेपीचा युएसपी निश्चितच म्हणता येईल.एक अंदाज
...
In reply to ... by babu b
भाजप ९९ आणि काँग्रेस १०१ असं
....
In reply to .... by babu b
हाहाहा...चला म्हणजे समजले तरी
टफ दिसतय...
In reply to टफ दिसतय... by सचिन
मिडियाची सवय
In reply to मिडियाची सवय by गॅरी ट्रुमन
सहमत..
सुधारणा
सोपे नाही यावेळी
In reply to सोपे नाही यावेळी by सचिन
२००२ पासून प्रत्येक वेळी भा ज
माझा अंदाज भाजप- १००-११०
मला वाटतं १२८ येतील. नक्की
.
.
In reply to . by babu b
बरं मग
फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी
In reply to फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी by सचिन
विश्वासार्हता
In reply to फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी by सचिन
हेच लिहिणार होतो.
In reply to फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी by सचिन
ट्रेंड
In reply to फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी by सचिन
एबीपीने यापूर्वी ८
In reply to एबीपीने यापूर्वी ८ by श्रीगुरुजी
हे कसले अजब गणित ?
In reply to एबीपीने यापूर्वी ८ by श्रीगुरुजी
आणखी काही आकडे
In reply to आणखी काही आकडे by गॅरी ट्रुमन
२०१४ नंतर आत्तापर्यंत
In reply to २०१४ नंतर आत्तापर्यंत by अनुप ढेरे
मते
In reply to मते by गॅरी ट्रुमन
येस येस, दिल्ली २०१५ मध्ये
In reply to आणखी काही आकडे by गॅरी ट्रुमन
पटेल समाजाचे प्राबल्य
In reply to पटेल समाजाचे प्राबल्य by रामदास२९
एकिकडे मन्दिरात जायचा आणि दुसरीकडे अयोध्येतल्या मन्दिराला खोडा
In reply to पटेल समाजाचे प्राबल्य by रामदास२९
हा हा हा!
In reply to फायनल ओपिनिअन पोल - ए बी पी by सचिन
आयला! एबीपीचे अंदाज बर्
....
In reply to .... by babu b
नवीन एक्सिट पोल घ्यायचाय...
In reply to नवीन एक्सिट पोल घ्यायचाय... by mayu4u
....
In reply to .... by babu b
तुम्ही कधी आणि कुठल्याही
In reply to तुम्ही कधी आणि कुठल्याही by सुबोध खरे
त्यांचं नाव सगळ्यांना माहीत
In reply to त्यांचं नाव सगळ्यांना माहीत by सिंथेटिक जिनियस
त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला
त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला उत्तर नसले की मग हे असले डु आयडी वगैरे फाटे फोडायचं चालू आहे.उष्ट्रानाम् लग्नवेलायाम् गर्दभा: मंत्रपाठका: परस्परम् प्रशंसन्ते 'अहो रूपम् अहो ध्वनीम्'|In reply to त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला by श्रीगुरुजी
गुर्जींचा निषेध!
In reply to गुर्जींचा निषेध! by mayu4u
हा हा हा हा हा पु वा
In reply to त्यांच्या बिनतोड प्रतिवादाला by श्रीगुरुजी
उंट आणि गाढव
एक्झिट पोल निकाल दाखवायला
In reply to एक्झिट पोल निकाल दाखवायला by llपुण्याचे पेशवेll
ओ काका, ओपिनियन पोल, बद्दल
तस राहुल बाबाने सुरुवात
राहुलने काल 'आम्ही आलो तर
In reply to राहुलने काल 'आम्ही आलो तर by कंजूस
..
In reply to .. by babu b
फक्त योगी ने...
In reply to फक्त योगी ने... by mayu4u
आपल्याकडे "बारा" गावच्या
In reply to आपल्याकडे "बारा" गावच्या by सुबोध खरे
आरक्षणाचा गाजर दाखविणा सोपा
काँग्रेस चा अंदाज
In reply to काँग्रेस चा अंदाज by रमेश आठवले
मला वाटतं की ....
In reply to मला वाटतं की .... by गामा पैलवान
+1
एबीपी च्या ४ डिसेंबरला
काँग्रेस !!!!!
काँग्रेसला बुडवण्याचे श्रेय
In reply to काँग्रेसला बुडवण्याचे श्रेय by सुबोध खरे
नाइन्साफी
In reply to नाइन्साफी by गॅरी ट्रुमन
कावळा बसायची वाटच बघत होते.
या निमित्ताने
गुजरातमधील ४७ मतदारसंघांत
In reply to गुजरातमधील ४७ मतदारसंघांत by डँबिस००७
नक्की प्रचार काय करणार?
घराणेशाही वर घरचा आहेर . रोचक
In reply to घराणेशाही वर घरचा आहेर . रोचक by विशुमित
शिवसेनेच्या कुठल्या
In reply to शिवसेनेच्या कुठल्या by मोदक
त्या आधी...
In reply to शिवसेनेच्या कुठल्या by मोदक
मोदक राव जरा अदबीने घ्या.
In reply to मोदक राव जरा अदबीने घ्या. by विशुमित
आदब...? तुमच्यासोबत..?? आपण
In reply to आदब...? तुमच्यासोबत..?? आपण by मोदक
<<<<तुम्ही घाणेरड्या भाषेत
In reply to <<<<तुम्ही घाणेरड्या भाषेत by विशुमित
गा पै पण एडवा... माझे
In reply to <<<<तुम्ही घाणेरड्या भाषेत by विशुमित
बाकीचे मुद्दे चर्चा करूच.
In reply to बाकीचे मुद्दे चर्चा करूच. by मोदक
माझी कोणतीच विधाने मी मागे
In reply to माझी कोणतीच विधाने मी मागे by विशुमित
तुमच्यासारख्या फालतू बिग्रेडी
In reply to तुमच्यासारख्या फालतू बिग्रेडी by मोदक
उगी उगी रडू नका...
In reply to उगी उगी रडू नका... by विशुमित
मिरच्या झोंबल्या का? असो,
In reply to मिरच्या झोंबल्या का? असो, by मोदक
तुम्ही एक झोप काढा, फ्रेश
In reply to <<<<तुम्ही घाणेरड्या भाषेत by विशुमित
ब्राह्मण्यवादाचा माझा मुद्दा
In reply to ब्राह्मण्यवादाचा माझा मुद्दा by arunjoshi123
कृपया या धाग्यावर मला हि
In reply to कृपया या धाग्यावर मला हि by विशुमित
चालेल. पण चर्चा व्यनित नसलेली
In reply to चालेल. पण चर्चा व्यनित नसलेली by arunjoshi123
तुमचा आधीचा प्रतिसाद आवडला
In reply to मोदक राव जरा अदबीने घ्या. by विशुमित
ज्या त्या धाग्यावर जाऊन त्या खाली प्रतिसाद द्या.
In reply to ज्या त्या धाग्यावर जाऊन त्या खाली प्रतिसाद द्या. by mayu4u
<<<केवळ त्याकरता जुना धागा वर
In reply to <<<केवळ त्याकरता जुना धागा वर by विशुमित
विशुमित,
In reply to मोदक राव जरा अदबीने घ्या. by विशुमित
मिपावरचे सगळे धागे मी वाचत
In reply to मिपावरचे सगळे धागे मी वाचत by एमी
विशुमित /अँमिजी, सोडून द्या !
In reply to विशुमित /अँमिजी, सोडून द्या ! by पगला गजोधर
सोडून द्यायला इग्नोर करायला
In reply to सोडून द्यायला इग्नोर करायला by एमी
बरोबर आहे, केवळ शेतीविषयक
In reply to बरोबर आहे, केवळ शेतीविषयक by पगला गजोधर
अँमिजी, कसय न,
In reply to अँमिजी, कसय न, by पगला गजोधर
गजोधर,
In reply to गजोधर, by mayu4u
हे तुम्हाला आणि अॅमी ताईंना मेनी असावं.
In reply to मिपावरचे सगळे धागे मी वाचत by एमी
मोदक आणि mayu4u ला खरंच आवरा.
मोदक आणि mayu4u ला खरंच आवरा. त्या डांगेना पण असच ट्रोल करून करून जेरीस आणलं होतं मोदकने! संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून फेवर चालुय का?मी संदर्भासहित बोलतो. मालकांच्या ओळखीचा काय प्रश्न आहे..? विशुमीत आणि डांगे खोटे बोलत आहेत / होते याकडे सोयीस्करपणे का दुर्लक्ष करत आहात..? तसेच, जे काय आपले म्हणणे आहे ते संदर्भासहित असावे आणि त्यामध्ये खोटेपणा नसावा ही साधी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का..? अॅमीजी - तुमच्या सोयीचे आयडी खोटे बोलतात ते बाकीच्यांनी चालवून घ्यावे मात्र त्यांना आजिबात त्रास दिला जाऊ नये ही अजब सोयीस्कर अपेक्षा आहे. २०१४ पासून सातत्याने गरळ ओकणार्या आयडींकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले होतेच. नंतर त्यांचा खोटेपणा उघडा पडू लागल्याने तुमची तडफड होत असेल तर मूळ खोटेपणा जिथे होत आहे तिथे उपदेशाचे डोस पाजा. रिअॅक्टिव्ह अर्ग्युमेंट्सना थांबवण्याऐवजी सुरूवात कुठे होत आहे ते थांबवणे (कितीही गैरसोयीचे असले तरी) आवश्यक असते.In reply to मिपावरचे सगळे धागे मी वाचत by एमी
कुठे काय चाललंय हे माहित
In reply to मिपावरचे सगळे धागे मी वाचत by एमी
संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून...
In reply to संपादकांच्या आणि मालकांच्या ओळखीचे म्हणून... by mayu4u
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर
In reply to मिपावरचे सगळे धागे मी वाचत by एमी
त्यांच्याकडे जगातले सगळे
In reply to त्यांच्याकडे जगातले सगळे by शब्दबम्बाळ
हा गाळ उपसत बसायचा कंटाळा
In reply to घराणेशाही वर घरचा आहेर . रोचक by विशुमित
हे तुम्ही दिलेल्या लिंकमधले
In reply to हे तुम्ही दिलेल्या लिंकमधले by मोदक
<<आता दिग्गीराजाचा आणि राहुल
In reply to <<आता दिग्गीराजाचा आणि राहुल by विशुमित
तुम्ही लिंक दिली आहे म्हणजे
In reply to तुम्ही लिंक दिली आहे म्हणजे by मोदक
<<<काँग्रेसबद्दलही बोला
In reply to <<<काँग्रेसबद्दलही बोला by विशुमित
फक्त तेवढं नोटाबंदी आणि
In reply to फक्त तेवढं नोटाबंदी आणि by मार्मिक गोडसे
कृपया लकवा वगैरे शब्द वापरू
In reply to कृपया लकवा वगैरे शब्द वापरू by विशुमित
मी दाखवलेली विसंगती दिसली ना.
In reply to फक्त तेवढं नोटाबंदी आणि by मार्मिक गोडसे
पावनं कुंकडलं मनायचं?
...
In reply to ... by babu b
babu b
In reply to babu b by श्रिपाद पणशिकर
हितेस बाटगेकर
In reply to हितेस बाटगेकर by श्रिपाद पणशिकर
....
गुजरात.. भाजपच्या पराभवाकडे?
काँग्रेस समर्थकांची काँग्रेस
पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान
७०% मतदान झाले याचा अर्थ
In reply to ७०% मतदान झाले याचा अर्थ by सिंथेटिक जिनियस
गुजरातमध्ये मोदी/भाजप पडले तर...
In reply to ७०% मतदान झाले याचा अर्थ by सिंथेटिक जिनियस
जास्त मतदान = इन्कम्बसी फॅक्टर
In reply to ७०% मतदान झाले याचा अर्थ by सिंथेटिक जिनियस
व्यक्तिशः? तो कशाला?
गा पै
विरोध आहे पण शेवटी आपरो
संपादक, आवरा खरंच लोकांना!
In reply to संपादक, आवरा खरंच लोकांना! by एमी
तुम्हाला खरेच मुद्दे समजत
In reply to संपादक, आवरा खरंच लोकांना! by एमी
अवांतर करायचंच असेल तर काही उपयोगी, माहितीपूर्ण असलेलं तरी करा..
In reply to अवांतर करायचंच असेल तर काही उपयोगी, माहितीपूर्ण असलेलं तरी करा.. by mayu4u
त्यांच्या सोयीचे नसल्याने ते
शून्य मतदान
एका गावात एकाही व्यक्तीने मतदान केले नाही.
विशुमित / अँमिजी,
In reply to विशुमित / अँमिजी, by पगला गजोधर
तुम्हाला विनंती, तुमचे काही
इग्नोरम सर्वार्थ साधनम
भक्त आणि द्वेष्टे दोघांनाही
In reply to भक्त आणि द्वेष्टे दोघांनाही by प्रचेतस
फालतू खोटेपणा वाढत जातो रे,
अशीच जर घाण या धाग्यात आणखी