कातरवेळी अस्वस्थ मनाला
दुरच्या दिव्यांची वाटे आस
स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा
कितीक स्मरती हळवे भास
उगाच ओठी शब्द अडकती
दूर कोणी कोकिळ बोलतो
तुडुंब मनाचे आगर भरतां
उद्रेकाला मग वाट शोधतो
नाद खगांचे, स्वर समीराचा
कातळडोही अनाम खळबळ
विजनवास व्रतस्थ मनाचा
गर्द सावल्या सावळ सावळ
पैलतीरी उभे दुत प्रकाशी
कुणी छेडले सनईचे सूर
अहेवपण सजले सरणावर
प्रिया मनी हे कसले काहूर?
© विशाल कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4815
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख!
+1
In reply to अतिशय सुरेख! by पद्मावति
+१ . येकच नंबर.
In reply to +1 by प्राची अश्विनी
छान लिहिले आहेस विशाल...
अजुन काय हवं माझ्यासारख्या
In reply to छान लिहिले आहेस विशाल... by ज्ञानोबाचे पैजार
आह!
सुंदर.
मस्त
धन्यवाद देवानु !
In reply to मस्त by नाखु
सुरेख लिहिलंय !
अतिशय तरल कविता. यानिमित्ताने
बरोबर. मलाही ती आठवत होती पण
In reply to अतिशय तरल कविता. यानिमित्ताने by एस
सुंदर
_/\_ विशालदा अप्रतिम आहे
मनःपूर्वक आभार मंडळी !