लैच रंजक बातमी हो.... खुप दिवसानी संध्यानंद वाचल्याचा आनंद मिळाला.
अवांतरः नशीब ती बाई जय गणेशची मैत्रीण नाही. नाहितर फ/ठ्/भ/ध वरुन ८ जणाची नावे सुचवा म्हणून नविन धागा पडायचा .
तात्याच्या डोक्याला नवी कल्हई!!!
कवटी
सहजराव, व्हीडीओ पाहिला. या बाईला काही कल्पना आहे का, या "आठळ्यां"ना जन्म देताना ही मेली असती तर आहेत त्या मुलांना कोणी जवळ घेतलं असतं, कोणी त्यांचे लाड केले असते?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
युके मधे १३ वर्षाचं पोरट बाप झाल !!! आणि त्याच्या मुलाची आय १५ वर्षाची हाय !!
हे वाचा :--
http://www.telegraph.co.uk/news/newstopics/howaboutthat/4617299/13-year-old-father-vows-to-become-good-parent.html
http://www.thesun.co.uk/sol/homepage/news/article2233878.ece
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
तिचे वडील नक्की कसला व्यवसाय करतात आणि कुटुंबाला किती सहाय्य करतात हे गुलदस्त्यात आहे, पण ते धनाढ्य तरी नसावेत असेच दिसते.
धनाड्य लांब राहिलं भाऊ. त्यांच्या घराच्या कर्जाचे हप्ते थकले आहेत गेल्या काही महिन्यांपासून.
जर बँकेने जप्ती आणली घरावर तर ह्या १४ बालकांना घेऊन राहायचं कुठे हा प्रश्न आहे त्या आजीपुढे (मुलांच्या आई पुढे अर्थातच कसलेही प्रश्न असायचे कारण नाही. ती आपल्याला ही मुलं झाली ह्याच आनंदात मश्गुल आहे.)
दुर्दैव असं की जरी मुलांच्या आईला निर्णय घ्यायची क्षमता नव्हती तरीही तिला सल्ला देणार्या डॉक्टरची नितीमत्ता (वैद्यकीय) आणि योग्यता कोठे गेली होती हे तपासून पाहण्याकडे सर्वांचे सोयिस्कर दुर्लक्ष झालेले आहे.
मी मुद्दामच दिले नव्हते. नावात काय आहे? इति शेक्स्पीअर
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
>> तिच्या मनात मातृत्वाची इच्छा किशोरावस्थेतच निर्माण झाली होती, पण सात आठ वर्षे प्रयत्न (?) करूनही ती फलद्रूप न झाल्यानंतर तिने कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग निवडला म्हणे. त्याचाही तिला एक प्रकारचा छंदच लागला असावा. तिने सहा मुलांना जन्म तर दिलाच, शिवाय कृत्रिम गर्भधारणा करून निर्माण केलेले अनेक भ्रूण साठवून ठेवले होते. त्यांचे एकसाथ आरोपण केल्यामुळे ही आठ जुळी मुले एकत्र जन्माला आली असावीत असा तर्क व्यक्त केला जात आहे. ही एक कायदेशीर बाब असल्यामुळे कोणीही त्याबद्दल स्पष्ट वक्तव्य करत नाही.
आरोपण केल्या गेलेल्या भ्रोणांतून एकापेक्षा अनेक जन्म होणं हा धोका कृत्रिम गर्भधारणेमधे नेहमी सांगितला जातो पण त्याचबरोबर हे ही सांगितले जाते की समजा ३ भ्रूणांचे आरोपण केले गेले तर त्यातून एकही जन्म होऊ शकणार नाही. (अजूनही 'जन्म देणं / घेणं' माणसाच्या हातात नाही !!)
या महिलेच्याबाबत miltiple births हा धोका खरा ठरलेला दिसतोय !
कृत्रीम गर्भधारणेमध्ये, भृणनाशाची शक्यता गृहित धरून एकाचवेळी अनेक गर्भ गर्भाशयात सोडले जातात. बर्याच वेळा हा भृणनाश होतोही. कोल्हापुरातल्या पत्की हॉस्पीटल मध्ये एका महिलेवर असेच ५ भृणांचे रोपण करण्यात आले. पण योगायोगाने एकाही भृणाचा नाश न झाल्याने पाचही गर्भ वाढीला लागले. म्हणून मग महिलेच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी Selective Embryo Reduction तंत्राने दोन गर्भांचा नाश घडवून आणला.
सहजरावांनी दिलेल्या लिंकमधला व्हीडीओ पहा. त्या महान स्त्रीला भृणनाश करण्याचा सल्ला दिला गेला होता; पण तिने तो मानला नाही.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
आधी तिला देव पावला आणि त्याने भ्रूणांचे विभाजन करून जीवांची संख्या वाढवली. नंतर हत्या नको असे म्हणून तिने सिलेक्टिव्ह रिडक्शनला नकार दिला.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
रंजक बातमी
हा दुवा घ्या
धन्याचे
लैच रंजक
नादया सुलेमान
सहजराव,
१३ वर्षाचा बाप !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सर
कर्जबाजारी
हो ही बातमी पाहिली होती टिव्ही वर..
नावगाव
बातमी बरोबर आहे पण
बरोबर आहे.
+१
देव पावला