Skip to main content

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शुक्रवार, 21/07/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

वाचने 144225
प्रतिक्रिया 445

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

प्रतिसाद आवडला, बहुतांशी सहमत! साधारणपणे हेच सांगायचं प्रयत्न वर करून पहिला. त्यांच्या बोलण्यामागचा उद्देश बदलल्याने त्यांच्या वाक्याचा अर्थ बदलतोय!
काही मते आत्यंतिक वाटली तरी मतितार्थ लक्षात घेऊन अशी मते दुर्लक्ष करणे मी वैयक्तिकरित्या पसंत करेन!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

जगातल्या प्रत्येक गोष्टीतुन एक चांगला अर्थ काढता येतो. हिटलरच्या वागण्यातुनही जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशीच पाहिली जाऊ शकतेच की. प्रश्न तुम्ही ओव्हरऑल काय सांगताय हा आहे. बाईंचे १००% म्हणणे टाकाऊ आहे असं कुठेय? जगात १००% टाकाऊ काहीच नसते. पण म्हणुन तुम्ही लोक त्या चार दोन मुद्द्यांखाली बाईंचे बाकीचे चुकीचे मुद्दे लपवु नकात ना. अवांतर - जसे टोकाच्या स्त्रीवादाला फेमिनाझी म्हणले जाते, तसे स्त्रियांवर अन्याय झालाच नाही असे म्हणणे. किंवा स्त्रीयांच्या समस्यांबद्दल चर्चा चालु असताना "पण बायका सुद्धा चूक वागतात" असे म्हणुन समस्यांना नाकारण्याचा प्रयत्न करणे, कायद्याचा दुरुपयोग होतो ह्या आरड्या ओरड्याखाली मुदलात कायदा करण्याची वेळ आपल्या देशात आहेच आणि बहुतांश वेळा तो कायदा योग्य कारणासाठी वापरावा लागतोय ह्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करणे हया प्रकाराला काय नाव द्यावे?

In reply to by पिलीयन रायडर

हिटलरच्या वागण्यातुनही जाज्वल्य राष्ट्रभक्ती अशीच पाहिली जाऊ शकतेच की.
तर्कशास्त्राचा प्रथमोल्लेख आपणच केलेलात. हिटलर राष्ट्रवादी होता म्हणून प्रत्येक राष्ट्रवादी हिटलर नसतो असा त्याचा एक नियम आहे. सबब तर्कशास्त्र असे वापरू नये.
यांच्या समस्यांबद्दल चर्चा चालु असताना "पण बायका सुद्धा चूक वागतात" असे म्हणुन समस्यांना नाकारण्याचा प्रयत्न करणे
सॉरी, त्या स्त्रीयांच्या समस्या या विषयाबद्दल बोलतच नाहीत. उलट त्या ज्या विषयावर बोलत आहेत (संस्कृती, कुटुंबव्यवस्था, गृहसौख्य, नाति, इ इ) मधे आपण फुकाच स्त्रीयांच्या समस्या घुसडत आहात.
कायद्याचा दुरुपयोग होतो ह्या आरड्या ओरड्याखाली मुदलात कायदा करण्याची वेळ आपल्या देशात आहेच आणि बहुतांश वेळा तो कायदा योग्य कारणासाठी वापरावा लागतोय
असं अजिबात नाही. कायदा आणि कायद्या दुरुपयोग हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. दोन्हीसाठी लोकांनी बोललं पाहिजे. कायदा निरुपयुक्त आहे असं त्या म्हणत नाहीत. त्यांनी पाहिलेल्या कायद्याच्या दुरुपयोगाच्या केसेस त्या मांडतात आणि अशी दुर्वर्तनं करणार्‍या स्त्रीयांनी ती करू नयेत असं म्हणतात. ==================== आय थिंक पिपल हेअर आर हायली बाय्स्ड इन जजींग हर.

In reply to by arunjoshi123

१. अपर्णाबाईंच्या काही मुद्द्यांमध्ये तथ्य असु शकते, पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक मुद्द्यात तथ्य असेलच असे नाही. हे ही तर्कशास्त्रच सांगते. २. तो मुद्दा अपर्णाबैंना लागु नव्हताच, आपणच अपर्णाबाईंना मध्येच घुसडत आहात. तस्मात घाई करु नकात. नीट वाचा. ३. पुन्हा एकदा, नीट वाचा. ही दोन्ही वाक्ये प्रतिवाद चालु असताना वारंवार दिसणार्‍या वृत्तीला आहेत. अपर्णाबाईंचा त्याच्याशी संबंध नाही. ह्या (किंवा अशा प्रकारच्या) चर्चेतल्या लोकांचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

आपणही नीट वाचा अशी विनंती, ही उपचर्चा थेट अपर्णाताईंच्या स्वतःच्या (मी ऐकलेल्या, इथे यांनी लेखात कोटलेल्या) विधानावरून झाली आहे. मधे अन्य कोणाचाही उल्लेख नाही. ============ मी इथे "सोशल मीडियावरील जनरल कंटेंटचा" डिफेन्स करत नाहीये. लेखिकेने १००% अपर्णाताईंना क्वोट केलेलं आहे. आणि मी फक्त त्याच विधानांबद्दल बोलतोय जि मी स्वतः ऐकली आहेत त्यांच्या भाषणात.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हातोळकरसाहेब, वाक्यातील मर्म जाणून घेऊन बाकीचे दुर्लक्षित करणे योग्य आहे पण त्या बाई जे धडाधड बोलत चालल्यात त्यातून अजूनही जास्त टक्के लोकांना जे समोर बोलतायत तेच खरे वाटायची शक्यता सर्वाधिक आहे. आपलं डोकं लावून त्यातून योग्य अर्थ काढणे, तो आपल्या परिस्थितीला जोडतानाचे बदल करणे वगैरे करत बसत नाहीत. "हां, आता अपर्णाबाई म्हणतायत ना, कर तू भाकरी गोल, नको विंचरूस तू तुझे केस, शिकू नकोस, किंवा शिकलीस तरी घरातच बैस" वगैरे. त्यामुळे वक्त्याने जबाबदारीचे भान ठेवायला हवे. आज आपण बोलतोय ते तसेच्या तसे अप्लाय झाले तर त्यातून त्या कुटुंबाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. एखादे चुकिचे मत घेऊन महिला जर "मी आई आहे, माझे फक्त ऐकायचे" असे सारखे करायला लागली कसे व्हायचे? काही महिन्यांपूर्वी खफवर यांचा विषय निघाला होता. परदेशी राहणार्‍या मुलांवर यांनी असेच तोफगोळे डागले. त्या इतक्या अद्वातद्वा बोलत होत्या की यांच्या भाषणांवर आक्षेप का घेऊ नये? असा प्रश्न पडला.

In reply to by रेवती

चला हे संभव आहे असं मानू. ========================================= पण हे पुरोगाम्यांच्या भडक प्रसारामुळं देखिल होत नाही का? म्हणजे यांच्या प्रसाराचे जे संभाव्य दुस्पपरिणाम अविचारी लोकांत संभव आहेत, तेच कडक स्त्रीवाद्यांच्या विचारांचे अतिविचारी लोकांवर होतात. म्हणून स्त्रीवाद थांबवायचा? १. ४० वर्शांपर्यंत लग्न न करणार्‍या करियर महर्षी बायका. २. मला बंधनं नकोतच म्हणून मुक्त संबंध ठेवणार्‍या बायका. ३. मुलाला पाळणाघरातच सडवणार्‍या बायका ४. मला लग्नच नको, मुलेच नको म्हणणार्‍या बायका ५. समानतेच्या हक्कापोटी सगळे संबंध नासवून बसलेल्या बायका ६. जळि स्थळी काष्ठी पाषाणी पुरूषांचे अन्याय पाहणार्‍या बायका ७. नोकरी सोडावी लागेल म्हणून बदली झालेल्या पतिला डच्चू देणार्‍या किंवा कायमचेच दूर राहणार्‍या बायका ८. प्रॉपर्ती विभागायची म्हणून विकायला लावणार्‍या बायका ९. सासरा, सासू वृद्धाश्रमात पाठवणार्‍या बायका १०. नवर्‍याकडून एक किमान सुखासिनता नाही मिळाली तर त्याचे जीवन त्राही करून सोडणार्‍या बायका ही सगळी उत्पत्ती स्त्रीवादाच्या हिरिरिने केलेल्या प्रचाराची नाही का? ओवरड्राइव म्हणा. पण ज्यांचा सदुद्देश असेल त्यांना स्त्रीवादाच्या मूलभूत प्रसारापासून कसे परावृत्त करता येईल?

In reply to by arunjoshi123

असे जर पुरोगाम्यांकडून होत असेल तर त्याही बाबतीत तोच उपाय लागू आहे. डोके चालवा व आपण कुठे थांबणे आवश्यक आहे हे ओळखा. १. त्यांना चाळीस नै चारशे वर्षांपर्यंत लग्न करायचे नाही तर त्यांचा प्रश्न आहे. २. स्त्रीने मुक्त संबंध ठेवताना पुरुष पार्टनर लागतो हे लक्षात घेणे (किंवा उलटही). आता तो अविवाहित व सज्ञान असेल, करियरमुळे आत्ताच लग्न नको असेल, करायचेच नसेल तर ती त्यांची गरज आहे म्हणून सोडून द्या. जर बाईने विवाहित (व त्या अर्थी सुखी) पुरुषाबरोबर गळेपडूपणा केला तर ते वाईटच की! त्या बुवानेही आपले लग्न वाचवण्यासाठी आटापिटा करायला हवा. आज महिला घराबाहेर पडताना रोज स्वसुरक्षेचा विचार करतात. अगदी रस्त्यावरील सुरक्षिततता ते सार्वजनिक वाहनव्यवस्था, हापिसातील सुरक्षितता. तसा पुरुषांना तितक्या टक्के प्रमाणात करावा लागत नाही म्हणून ते अजूनही बर्‍या अवस्थेत आहेत म्हणायला हवे. (वाईट तर आहेच पण तरी त्यातल्यात्यात) ३. आपल्याकडे वर्क फ्रॉम होमचा पर्याय जेंव्हा आणखी वाढेल तेंव्हा थोडेफार सुसह्य होईल पण एका मुलासाठी निदान ४ चर्षे दोन्हीकडील आजी आजोबा, व मुख्य आईवडील यांना काळजी घ्यावी लागते. तब्येतीच्या तक्रारी किंवा आणखी काही गंभीर कारण सोडता तो प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. जर आर्थिक गरज असेल तर नवरा बायकोला पाळणाघराशिवाय इलाज नाही. त्या चार वर्षांनंतर मात्र महिलांनी अर्थार्जनास इच्छा दाखवली तर तिची दखल घेणे याला उपाय नाही. ४. लग्न व मुले नको असणार्‍यांचा तुम्हाला काय त्रास आहे बुवा? ५. एरवी पंचविशीतल्या सुनेच्या एकखांबी आधारावर संसाराचा डोलारा उभे करू पाहणार्‍यांनी जरा काही वर्षे नातेवाईक सांभाळणे, आर्थिक कसरत, मुलेबाळे संगोपन, एवढेच करून पहावे मग जीव घुसमटेल. असे बोलण्यात कश्याला ठेवायचे. आजपासूनच जिज्ञासुंनी सुरुवात करण्यास हरकत नाही. एकट्यानं सगळं सांभाळायचं. बायको करेल की मदत, नाही कोण म्हणतय. यात तिच्याकडील नातेवाकांची मने साम्भाळणे वगैरे राहू द्या, नवर्‍याने आपल्या आईवडिलांची, भावा बहिणींची, काकाकू, मामा मामी अशांची मने सांभाळून पहावित. ६. तिन्हीत्रिकाळ बायकांना पुरुषांचे अन्याय का दिसतात याची प्रत्येकिची वेगळी कारणे असू शकतील व ती कुटुंबाप्रमाणे बदलतील. उदा. कोण म्हणेल नवरा दा रू पिऊन मारतो (त्यावर दुसरी म्हणेल, अगं मारतो तर मारतो, कुंकवाला धनी तरी आहे) तर कोण म्हणेल मला घरात बसवून दोन पोरे अंगावर टाकून हा नोकरीचा टेंभा मिरवतो (दुसरी म्हणेल मलाही असा नवरा मिळायला पाहिजे होता. हितं आम्हाला नोकरीशिवाय इलाज नाही) किंवा असेच काही. माझेच उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या नवर्‍याला स्वभावत:च कमी बोलायला आवडते. एकटीलाच बडबडत रहावे लागते हा माझ्यावर अन्याय आहे राव! मी म्हणते की! (त्यावर मैत्रिण म्हणते बरय बाबा तुझं, आमच्याकडे हा सारखा बडबडत असतो) ७. नवर्‍याला डच्चू मिळत असेल तर त्यांच्यात संसाराचे नाते तयार झाले नाही असे म्हणावे. मग जे झाले ते बरेच झाले. बायको दूर राहते व त्यात तिला काही अडचण नसेल तर पुन्हा तेच! नवर्‍याची तक्रार आहे ना? त्याचा फायदा आहे बायको जवळ राहण्यात, बायकोलाही नवर्‍याचा फायदा आहे असे वाटले पाहिजे. (फायदा- शारिरिक, मानसिक, आर्थिक गरज याशिवाय सहजीवनातील आनंद, सपोर्ट वगैरे अनेक गोष्ती आहेत)तसे नसेल म्हणून ती रहात नसेल. मुलांच्या शाळांचे प्रश्न असतील. नातेवाईकांचा सपोर्ट लांब राहून पुरेसा मिळणार नसेल. असंख्य कारणे असतात. आपल्याला वरवर काहीतरी दिसते व आपण तेच मनात धरून बसतो. ९. हे हे हे. माझ्या आजेसाबा आहेत वृद्धाश्रमात.. मुलाने, सुनेने पाठवलेले नाही. आग्रहाने व आपणहोवून आनंदाने गेल्यात. तब्येत छान आहे व मनसोक्त जगतायत. संसाराचा एका पॉईंटला कंताळा येतो. अगदी सून गरम पोळी पानात वाढत असली तरी एकूणच संसार बघण्याचा कंताळा येतो. हे एक कारण पण आजकाल जागांचे प्रश्न, देखभाल करणार्‍या मनुष्याचे प्रश्न, विचित्र आजारपणे, आपला संसारावरील हक्क न सोडणे वगैरे कारणाने त्यांना जावे लागत असेल. माहित नाही नक्की कारण! कोणाचे काय तर कोणाचे काय........ ८. प्रॉपर्टी का विभागतायत ते कायदेशीर कारण कोणते हे आपण कसे ठरवणार? जोवर सगळे कायदेशीर आहे, डोकी फोडत नाहीयेत तोवर बरेच आहे. एकदा एक घर बांधले, शेती घेतली अमूक खरेदी केली नि तमूक वाढवले असे असले की त्यात पुढच्या पिढीत, त्याच पिढीत बदल होणे हे निसर्गचक्र आहे. बदल हे होणारच! १०. नवर्‍याकडून मिळणारी किमान सुखासिनता हा मोठा विषय आहे. प्रत्येक जोडप्याचा अत्यंत जवळचा व त्यांचाच असलेला. विश्वासू नातेवाईक असतील तर आणि काऊन्सेलर व आणाखी जबाब्दार व्यक्तिंनी सोडवण्याचा. तो व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने ज्याच्यात्याच्यावर सोडून द्यावा. सरसकटीकरण नकोच. ही आपली मर्यादा जर ओळखली तरी बरेच वाद कमी होतील. उदा. काल आम्ही नातेवाईकांना भेटलो. बोलण्याबोलण्यात, लहानसान चेष्टेतून समोरच्या नवराबायकोत (त्यांच्यातच, आमचा संबंध नाही) एकदम एक सिरियस वाक्य आल्यावर आम्ही दोघे (मी व नवरा) गप्प बसलो. ती अशी गोष्ट होती की यापुढे आमच्या ज्येष्ठतेच्या हक्कापेक्षा गप्प राहणे, आवश्यक होते. आम्ही मध्यस्थीही करायला गेलो नाही. दोन मिनिटात संभाषणाची गाडी पुन्हा रुळावर आली. यात लगेच बायकोला "किती तक्रारी करतेस? मोठी पोझीशन असलेला नवरा हवा मग तो प्रवासाला जाणारच, लांब राहणारच" वगैरे ऐकवण्यात अर्थ नाही. त्या दोघांना एकत्र टाईम स्पेंड करायला मिळत नाही हे सत्य आहे. उगीच त्यात पोझिशन वगैरे आणण्यात हाशील नाही. उलट त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे पण आजकालच्या ताण असलेल्या जीवनशैलीमुळे हे होते. काय करणार? आपली मर्यादा ओळखणे. गप्प बसणे.

In reply to by रेवती

असे जर पुरोगाम्यांकडून होत असेल तर त्याही बाबतीत तोच उपाय लागू आहे.
चला, या संतुलनाबद्दल प्राजंळपणाबद्दल धन्यवाद. ============================ तशी पुढे चर्चेची आवश्यकता नव्हती, पण आपण विस्तारभयापोटी (हा शब्द मी देखिल वापरतो.) एकच उदाहरण घेऊ.
१. त्यांना चाळीस नै चारशे वर्षांपर्यंत लग्न करायचे नाही तर त्यांचा प्रश्न आहे.
कसा काय म्हणे? समजा उद्या त्यांनी चारच वर्षाचे असताना लग्न करायचे ठरवले तर? चाळिस नि ४०० आकडे तितकेच अशास्त्रीय आहेत. मरणोत्तर तसबिरिंच्या (४०० वर्षे वयाच्या कोवळ्या वयात) लग्नाची प्रथा आली तर? भारतीय अर्थव्यवस्थेमधे कोणि ४ रु फक्त दर्वर्षी कमवो वा ४०० लाख कोटी कमवो हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो का? तुम्ही रोज १ मिनिट झोपा नाहीतर २४ तास, तुमच्या मर्जीचा प्रश्न? ======================= ज्या कोण्या महामूर्खाने देशांच्या घटनांमधे महान तत्त्वांच्या यादीत स्वातंत्र्य नावाचे मूल्य सर्वप्रथम म्हणून घातले त्याला आज पश्चात्तापाची पाळी येत असेल. या शब्दाकडे नीट निरखून पाहिल्यास असे लक्षात येते कि, महान असोच, स्वातंत्र्य हे एक मानवी जीबनाचे मूल्य तरी आहे का? ======================== समाजातल्या प्रत्येक व्यक्तिच्या वर्तनाचं सम टोटल समाजवर्तन असतं. प्रत्येकाचंच वर्तन ढळू लागलं तर समाजाचा समतोल बिघडतो.

In reply to by रेवती

घ्यावाच कि आक्षेप, त्यांच्या चुकीच्या गोष्टींवर घ्यावाच आक्षेप! पण त्यांच्या एकूण भाषणातील आपल्याला खटकणाऱ्या वाक्यातून आपल्याला हवी तशी प्रतिमा उभी करणे मला चुकीचे वाटते. त्या मुलींना (फक्त) भाकऱ्याच बडवा असे सांगत आहेत अशी प्रतिमा कशाला? तुम्ही करता ते करून तुम्हाला या गोष्टी यायला पाहिजेत असा त्याचा मतितार्थ नाहीये का? मला वाटते साधारणपणे प्रत्येक स्त्रीला तिच्या आईने हि गोष्ट एकदातरी नक्कीच सांगितली असावी. तेव्हा ती इतकीच खटकणारी वाटली होती का? पुरुषांनाही स्वैपाक यायलाच हवा आणि त्याबद्दल काहीही दुमत नाही. पण पुरुषांना सांगत नाही मग स्त्रीला का सांगता हे मला बायस्ड मत वाटते. बाकी त्या ज्या मुद्द्यांबद्दल सांगत आहेत ते मुद्दे संघर्ष होत असलेल्या कुटुंबाबद्दल आहेत, त्यातून संघर्ष निर्माण होण्याचा मुद्दा गैरलागू वाटतो. कोणत्या मुद्द्यांनी संघर्ष निर्माण होईल असे आपल्याला वाटते? "संसारात जे वाट्याला येईल ते भोग बाई" असे म्हणणारी माता आणि त्यांचे भाषण याची तुलनाच मुळी पटत नाही. त्यांचे सल्ले हे संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही काय भूमिका बजावू शकता या बाबतीत आहेत असे मला वाटते.

नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मला हे कळत नाही लोक सरकारच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या नितीला बळी पडून स्वतःचं डोकं का खराब करून घेतात. मंजे लग्नास सर्वात सुयोग्य वय काय याचं उत्तर काय आहे? १८-२५ वर्षे. आज जे लोक २५ नंतर लग्न करतात ते चूक आहे. चूक म्हणजे १८ ते २५ पेक्षा चूक. सरकारची ही एक्सप्लिसिट निती आहे कि स्त्री असो वा पुरुष , शक्य तितके लग्न उशिरा व्हायच्या फेवरमधे बोलायचे. मंजे लोकसंख्या वाढिचा दर मंदावतो. अजून तरि तिशोत्तरित लग्न करणार्‍या पोरिंची चिंता करणारी डॉक्यूमेंटरी राज्यसभा टिवीवर (त्यांना भारतातले असले सगळे प्रॉब्लेम सर्वात अगोदर कळतात.) नाही पाहिलि. ========================== शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध? मुलगी शिकेल नि मगच लग्न करेल ही भूमिका माजोरडी नाही का? म्हणजे १८- २५ या काळातच लग्न करण्याचा सर्वात सुयोग्य नैसर्गिक काळ असतो, आणि याच काळात तुमचं ग्रॅज्यूएशन आणि पोस्ट ग्रॅज्यूएशन पण करायचं असतं. मग अगोदर शिक्षणच हा अट्टाहास का? लग्नानंतर ८ तासाची (आणि दोन तास प्रवासाची) नोकरी करता येत असेल, तर शिक्षण करता का येत नाही? आजकालचे आधुनिक बाप मुलिंचं ब्रेनवॉश करतात, म्हणून मुली आपल्या तारुण्याच्या पिकला वैवाहीक सुखं घेण्याची इच्छा असलेल्या मुली नंतर १२-ते १८ वर्षे ताटकळत बसू शकतात.

In reply to by arunjoshi123

हा हा हा. बॅक्टेरीया नाही हो. मीच व्हायरस आहे असे एकेकाळी माझ्यावर भडकलेले एक मिपाकरकाका म्हणाले होते. ;)

In reply to by कोंबडी प्रेमी

समजा ड्यू आय डी आहे. पण आपणच म्हणालात नि कि यावर सर्व अंगानी चर्चा व्हावी. ================================================= ऑन ए लायटर नोट - ताईंनी भावांसाठी एवढं करावं आणि भावांनी त्यांना असं वार्‍यावर सोडावं हे पटतं का? तुमी बी ना.

In reply to by arunjoshi123

३-४ लग्न जुळवण्याचा बैठकीत जाण्याचा योग आला. त्यात एक लेटेस्ट ट्रेंड पाहिला मिळाला आणि चर्चिला सुद्धा गेला. . मुलीचे शिक्षण एफ वाय; एस वाय (कला, वाणिज्य,शास्त्र, अभियांत्रिकी, इतर). साधारणता वय १९-२० वर्ष. मुलीचे वडील लग्नाबाबत एक अट टाकताना दिसत होते. मुलीचे राहिलेले शिक्षण मुलाकडच्यांनी पूर्ण करायचं आणि तिला नोकरी करून द्यायची. वधुपित्याच्या बाजूने ह्याचे फायदे असे चर्चिले गेले: (माझी सगळ्याच गोष्टींना सहमती नाही आहे) १) मुलीचे संपूर्ण शिक्षण आणि तिचे लग्न करण्याचा दुहेरी खर्च कमी होतो. २) आताच्या सामाजिक परस्थिती मध्ये वयात आलेली मुलगी सांभाळणे, तिच्यावर देखरेख ठेवणे जिकिरीचे असल्यामुळे लग्न करून जवाबदारी नवरामुलांच्याकडे देणे ३) योग्य वयात लग्न लागते ४) लग्न झाल्या झाल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या लगेच पडत नाहीत. ५) शिक्षणाचे कारण पुढे असल्यामुळे मातृत्वाची घाई सासरचे करत नाहीत.

In reply to by विशुमित

वधुपित्याचं बर्‍यापैकी पटलं. ======================================
शिक्षणाचा आणि लग्नाचा काय संबंध?
यातनं शिक्षण आधीच झालं पाहिजे असं लॉजिक लावायचा संबंध काय असं म्हणायचं होतं. शब्द चूकिचे निवडले वाटतं.

In reply to by arunjoshi123

नोकरी करता येत असेल, तर शिक्षण करता का येत नाही?
कारण नोकरी करणारी स्त्री पैसे घरी आणते तर लग्नानंतर स्त्रीने शिकायचे ठरवले तर तिच्या शिक्षणाचा खर्च काही सन्माननीय अपवाद सोडले तर सासरचे लोक नक्कीच करणार नाहीत.

मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलगी सुंदर हवी का कुरुप, चांगल्या परिस्थितीची का वाईट, कमवती का नाही याबद्दल त्या काही कोणाला रिकमेंड करत नाहीत. मुलांना तसंही उद्देशून त्यांचं बहुतांश बोलणं नसतं. सुनेच्या आईवडिलांना चांगलीच ट्रिटमेंट द्या असे त्या म्हणतात. समाजात मिळत नसेल तर त्यात त्यांचा काय दोष? पुरुषांचं प्रबोधन करायला अनंत स्त्रीवादी आहेत, रिकामटेकडे आहेत, सरकार आहे. त्या युनिक यासाठी आहेत कि त्या स्त्रीयांचं प्रबोधन करतात. पुरुषांनी विषम वागावं असं म्हणत नाहीत. त्यांनी देखिल फक्त पुरुषांना झोडणारांना काही टक्के सामिल झालं पाहिजे आहे विचित्र आग्रह आहे. त्या म्हणतात कि पुरुषांच्या बाजूने त्यांच्यावर स्त्रीयांकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढणे हा माझा पेशा आहे.

In reply to by arunjoshi123

अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. हि पोस्त अपर्णाताई ह्यांची नाही पण सिमिलर मुद्दे होते ...पुढे ....

मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
१. तुम्हाला एक फंडामेंटली रॅडिकल कुटूंबव्यवस्था सुचवायची आहे का? मंजे काय, कि मुलगी मुलाच्या घरी जाते, आणि ते घर आणि तिथली सगळी व्यवस्था तिथल्या अगोदरपासून असलेल्या लोकांच्या मालकिची असते. आता इथे तिथे रेसीडेंट नसलेल्या सुनेच्या आईबापांना देखिल निर्णयन अधिकार दिले, आणि ते इतरांच्या पसंदीच्या विरुद्ध निघाले तर काय मेकॅनिझम? २. ती मुलगी सासरी जाण्यासच प्रचंड अल्टनेटिव्ज आपण बनवू शकतो. म्हणजे खूप तितक्या समाज व्यवस्था बनवू शकतो. तुम्हाला "ह्यूमॅनिटि पुढे चालू ठेऊ देणे" याबद्दल आपणांस आस्था आहे असे समजून (वा अदरवाईज) नक्की कशी समाजव्यवस्था सुचवायची आहे? न्यूक्लिअर फॅमिली पैकी एक. लिव इन दुसरं. पण असेट ओनरशिप अजून पॅट्रीयार्किकल आहे, म्हणून वावर मुलाच्या बाजूचाच जास्त असू शकतो.

समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
आपण समाज म्हणून अत्यंत परिपक्व होतो, आता हळूहळू आपण परिपक्वता म्हणून अपरिपक्वता स्वीकारत आहोत. हे स्वतःस आधुनिक आणि पुरोगामी समजणार्‍या लोकांच्या बाबतीत होत आहे. समाजात कौटुंबिक अन्याय आणि कौटुंबिक कलह यांचा एक समतोल असावा. कौटुंबिक अन्यायाला फुगवून फुगवून सांगून आपण फार मोठा बागलबूवा निर्माण केला आहे. याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण समाजव्यवस्थेचे नियम इतके जास्त बदलले कि सार्वत्रिक कौटुंबिक कलहाचा अजून मोठा राक्षस उभा राहिला आहे. आपण या सुधारांतून कमावलं जास्त का गमावलं जास्त याची प्रामाणिक चिकित्सा करावी. अपर्णाताईंची भाषणं अभ्यासू, तार्किक, चिंतक, विदाधारी, शास्त्रीय इ इ नसली तरी भावनिक, अनुभवातून आलेली, सधेतूप्रेरित, आणि कदाचित मानसशास्त्रीयरित्या उपयुक्त असू शकतात. आणि "भाषण" म्हणून त्यांचा दर्जा आहेच आहे, इंटेरेस्टींग आहे. तुम्ही या सगळ्यापलिकडचे असाल तर भरपूर टीपी आहे.

बरीच चर्चा झाली की! म्हणजे अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला तरीही बरीच चर्चा शिल्लक राहतेय वाचायला. अच्छा है!

In reply to by पिलीयन रायडर

अरुण जोशींचा मोनोलॉग वगळला
अशी फ्रेज वापरण्याचा बदला लवकरच पिरांशी डायलॉग करून घेण्यात येईल. हा हा हा.

बादवे, "भाकरी बडवण्याबद्दलचे" ते सुप्रसिद्ध विधान इथुन पहा - https://youtu.be/_k51WrMVYps?t=1263 त्या चक्क असं म्हणताएत की "अंतराळात जा वा पाताळात, मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मी तर मुलांना सांगतेय, शिकलेली मुलगी घरात आणायची असेल तर पार्सल आणायची तयारी ठेव नाही तर स्वयंपाक शिकुन घे, पर्याय नाही. आज काल पुण्यात स्वयंपाक करतच नाहीत. मी एका ठिकाणी श्राद्धाला गेले होते तर तिथे केटररकडुन स्वयंपाक येणार होता. ह्यांचे पितर केटररच्या हातचं खाऊन मुक्त होणारेत. सुनांना वेळ नाही. आता मी हे भाषण संपवुन घरी गेले आणि हे म्हणाले की जरा काही तरी करुन दे तर पदर खोचुन उभं रहावंच लागतं. असं नाही म्हणतात येत की साप्ताहिक जनहिंदोळा मध्ये उद्या फोटो येणारे. आता भाकरी बिकरी काही करणार नाही. चालत नाही. नवर्‍यासमोर वकिली चालत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीच चालत नाही नवर्‍या समोर." आणि हे बोलताना शिकलेल्या मुली, पुणे आणि केटरर ह्यांच्याबद्दल बोलताना जो टोन आहे ना, माशाल्ला!! खरोखर लोकांना "भाकरी बडवणे" म्हणजे कुटूम्बातला आपला सहभाग विसरु नको वगैरे सल्ले त्या देत आहेत असे वाटतेय?!! =)) त्या ठोक म्हणत आहेत "नवर्‍या समोर चालत नाही" आणि तुम्ही लोक गर्भितार्थ काढताय!

In reply to by पिलीयन रायडर

सुपुत्र रामतीर्थकर काय करतात विवाहित आहेत का किंवा कसे का धसक्यानी त्यांनी लग्न केले नाही वगैरे

In reply to by पिलीयन रायडर

मला एक कळत नाही की जर पार्सलच आणायचं असेल किंवा स्वत: स्वयंपाक करायचा असेल आणि शिवाय मुलीपेक्षा जास्त कमाई करायचंही बंधन असेल तर मुलांना लग्नाचा फायदा नक्की काय? फक्त शरीरसुखासाठी? तेही हक्काचं नाही. स्त्रिया पुरुषांना जे स्थैर्य आणि कम्फर्ट देऊ शकतात त्यासाठी पुरुष लग्न करतात. लग्न करायचं असतं म्हणून नाही.

In reply to by नगरीनिरंजन

ओके. आणि त्याबदल्यात स्त्रियांना ते काय देतात? किंवा स्त्रिया काय मिळवायला लग्न करतात? (जस्ट उत्सुकता!)

In reply to by पिलीयन रायडर

काही देत नसतील तर स्त्रिया का करतात लग्न? एवढंच जर असेल तर अविवाहित स्त्रियांची संख्या वाढायला हवी होती. उलट चांगला मुलगा पाहून लग्न करणे हेच जीवनध्येय असल्यासारख्या बहुसंख्य मुली वागतात.

In reply to by नगरीनिरंजन

मी कुठे म्हणलं की काहीच देत नाहीत? मी तर तुम्हालाच विचारतेय की कशासाठी स्त्रिया लग्न करत असतील? म्हणजे स्थैर्य आणि कम्फर्ट तर स्त्रीयाच देताएत, पैसा आता स्त्रियाही कमावतात, शरीरसुखासाठी लग्न करायची गरज कुणालाच नसते. म्हणजे फक्त मुल का? तर एका मुलापायी जन्मभर पुरुषाला स्थर्य द्यायचे? काय गरज? स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन मुल पैदा करता येईलच. मी सिन्सिअरली विचारतेय. स्त्रियांना पुरुषांकडुन काय मिळतं?
उलट चांगला मुलगा पाहून लग्न करणे हेच जीवनध्येय असल्यासारख्या बहुसंख्य मुली वागतात.
सोशल कंडिशनिंग. लग्न आणि मुल इतिकर्तव्यता असते असे मानणे, समाजाने कानीकपाळी ओरडुन सांगणे, त्यापायी पालकांनीच तसे प्रेशर आणणे, १४ व्या वर्षीच लग्न लावणे, शिक्षण थांबवुन लग्न करणे. इ इ....

In reply to by पिलीयन रायडर

भाकऱ्या थापायचे बघा जरा. अमिरिकेत गेलात म्हणून काय झाले, संस्कृतीची काही चाड आहे कि नाही

In reply to by सामान्य वाचक

अमिरिकेत गेलात म्हणून
हे काय असतं? अमेरिकेत गेलं म्हणून मेंदूतले न्यूरॉन्स वाढतात कि काय? संस्कृतीची चाड वा अक्कल येते? फार तर फार तिथे जाऊन भारताबद्दल गंड उत्पन्न होतो असं मॅक्सिमम केसेसमधे होतं.

In reply to by arunjoshi123

माझे म्हणणे होते कि, अमेरिकेत गेलात तर आपली संस्कृती विसरू नका. भाकऱ्या बडवणे विसरू नका.

In reply to by सामान्य वाचक

परत यायचं असलं तर विसरू नका. यायचं नसलं शक्य तितक्या लवकर विसरा. ===========================================================

In reply to by सामान्य वाचक

हा प्रतिसाद समजला नाही. तुम्हीच नव्हे पण हा प्रतिसाद कोणाकडूनही आला तरी भाकरी थापायची की नाही हे जी ती व्यक्ती ठरवते. घराबाहेरील कोणीही सांगितल्यास का ऐकावे? अमेरिकेत जाण्याचे विशेष काय होते? हां, भाकरीचे चांगले पीठ मिळत नाही. भारतात ते चांगले मिळते पण भारतातल्या मुलींनाच तर अपर्णाबाई सांगतायत की भाकरी गोल थापायला आली पाहिजे. संस्कृतीची चाड म्हणजे काय? ती असणे म्हणजे काय? माझा बेसिकातच घोळ आहे असे दिसते.

In reply to by रुपी

अरेच्च्या! मला खरच समजले नव्हते. चला आता मी तुम्हाला भाकरी व भरल्या वांग्याची भाजी पार्सलाने पाठवते. ;)

In reply to by रेवती

भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखी ह्यात बरेच फाटे फोडता येतील/जाऊ शकतील/जातील (मग आम्ही च फाटे का फोडू नयेत :-D) -हि पौर्णिमा कोण आणि चंद्रा तिची कोण सून मुलगी कि अजून कुणी ? -अष्टमीच्या चंद्रा सारखी भाकरी का नाही ? -अमेरिकेत चंद्र दिसतो का ? का नुसतेच ढग असतात ... -भाकरी त्रिकोणी असते का? आणि तशी ती केली तर संस्कृती जतन होईल कि नष्ट ??

In reply to by पिलीयन रायडर

स्पर्म बँकेतुन स्पर्म घेऊन मुल पैदा करता येईलच.
जाज्वल्य स्त्रीवादाचा हा देखिल घोर अपमान आहे. स्टेम सेल रिसर्च आता कोणत्याही पेशी पासून कोणतीही पेशी बनवायच्या फार जवळ आहे. तेव्हा स्पर्म बँक इ इ घोर पुरुषप्रधानतावादी कंसेप्ट कशाला हवेत?

In reply to by पिलीयन रायडर

तर एका मुलापायी जन्मभर पुरुषाला स्थर्य द्यायचे?
बरोबर आहे. ही वीर्य फॉर स्थैर्य डिल एकदम अनफेअर आहे. सिंगल माता हिच खरी माता. किंबहुना, मुलांना जन्म देऊन ही मानवजात पुढे चालू ठेवायचीच कशाला हाच मूलभूत प्रश्न आहे.

In reply to by arunjoshi123

भारी डायलॉग! वीर्य फॉर स्थैर्य! :P भारी चाललीये चर्चा... लय कंफ्यूस व्हायला होतंय आत पण... च्यामारी मी लग्न का केलं हा प्रश्न इतका अवघड असेल वाटलं नव्हतं! बायकोला विचारला तर मला ताप बीप आलाय का बघेल! :D लग्न करण्याला ते मुलगी/मुलगा एकमेकांना आवडणे वगैरे बंद झालं का सध्या? आता आवडणे म्हणजे नक्की काय हे पण लय अवघडे राव! ते डोपामाईन वगैरे बाद झालं ना यातून... मग नक्की काय, आवडणे = डोपामाईन + संपत्ती + जबाबदारपणा + कुटुंब + शिक्षण..... इ.इ. असे काही असेल का??

In reply to by पिलीयन रायडर

मी स्त्री नसल्याने स्त्रियांना लग्नातून काय मिळतं ते मी सांगू शकत नाही. ते खरं तर तुम्ही सांगायला हवं. बाकी स्त्रियाही पैसे कमवतात, पुरुषांची गरज काय इत्यादी मुद्दे गैरलागू आहेत. पुरुषांनी निर्माण केलेल्या इंडस्ट्रीयल इकॉनॉमीला गृहीत धरुन अशी विधाने करणे सध्या खूप सोपे असल्याने त्याचा प्रतिवाद करण्यात हशील नाही.

In reply to by सुबोध खरे

खिक् :D भाकर्या बडवणे या cheap labour मधूनदेखील उच्च/मध्यमवर्गीय आयुष्य मिळवण्याचा समाजमान्य मार्ग याखेरीज इतर कोणताच नसेल :P

In reply to by पिलीयन रायडर

"अंतराळात जा वा पाताळात, मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. आजकाल शिकलेल्या मुलींना स्वयंपाक येत नाही. मी तर मुलांना सांगतेय, शिकलेली मुलगी घरात आणायची असेल तर पार्सल आणायची तयारी ठेव नाही तर स्वयंपाक शिकुन घे, पर्याय नाही. आज काल पुण्यात स्वयंपाक करतच नाहीत. मी एका ठिकाणी श्राद्धाला गेले होते तर तिथे केटररकडुन स्वयंपाक येणार होता. ह्यांचे पितर केटररच्या हातचं खाऊन मुक्त होणारेत. सुनांना वेळ नाही. आता मी हे भाषण संपवुन घरी गेले आणि हे म्हणाले की जरा काही तरी करुन दे तर पदर खोचुन उभं रहावंच लागतं. असं नाही म्हणतात येत की साप्ताहिक जनहिंदोळा मध्ये उद्या फोटो येणारे. आता भाकरी बिकरी काही करणार नाही. चालत नाही. नवर्‍यासमोर वकिली चालत नाही. हे पक्कं लक्षात ठेवा. काहीच चालत नाही नवर्‍या समोर."
१) त्यांनी केलेली विधानं आणि "भाकर्‍या बडवणे" ही तुम्ही वापरलेली फ्रेज यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्या किमान स्वयंपाक आला पाहिजे म्हणत असतील तर त्यात वावगं काय आहे? त्याला भाकर्‍या बडवणे म्हणून ते फार काही खालच्या दर्जाचं काम असल्यासारखा उल्लेख करु नये. आमच्या घरात एकजात सगळे स्वयंपाक करतात (बाया-बाप्ये सगळे). अशा वेळी येणार्‍या मुलीला किमान वरण भात भाजी पोळी करता यावी अशी अपेक्षा असली तर त्यात चूक काय आहे असं मला वाटत नाही. येत नसेल तर किमान शिकायची तयारी तरी असावी. आम्ही संक्रांतीला गूळपोळ्या नेल्या की "ओह माय ग्गॉड कित्ती पेशन्स" अशा कमेंट ऐकल्या की त्या मुली आणि त्यांच्या माऊल्यांना दंडवत घालावासा वाटतो. तुम्ही शिक्षणाचं म्हणत असाल तर नऊ वर्षाचा असताना मी वरणभाताचा कूकर लावत होतो. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपले जवळपास सगळे पारंपारिक पदार्थ (मला आणि माझ्या भावालाही) एकाहाती जमत होते. ऑफिसचं कवतिक सांगायचं घरी नवरात्रात नवमीला आमच्याकडे पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो. कित्येकदा सकाळी साडेपाचला उठून पुरणपोळ्या करुन त्या हापिसात पण नेलेल्या आहेत. २) काहीच चालत नाही नवर्‍या समोर. त्यांचं त्यांच्या नवर्‍यासमोर काही चालत नसेल तर आपण त्रागा करण्यात काय अर्थ आहे. ३) त्यांचं मुलींनी काय घालावं काय घालू नये याबद्दलचं विधान मला खटकलं होतं. पण मुली मुलांबद्दल विधानं करत असतील तर चालेल का? "ए तू आळस देऊ नकोस, हात वर केलेस की टीशर्ट वर सरकतं आणि पोट वैगरे दिसतं. त्यात तुम्ही लोक कधी लो वेस्ट जीन्स घालता" हे एका मुलीने मला तोंडावर सांगितलेलं आहे. आता हेच मी जर एखाद्या मुलीला सांगितलं तर केवढा गहजब होईल? तात्पर्य: एकांगी विचार नको. आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आपल्या पोटाला लागतं ते करुन खाता येण्यात कमतरता वाटून घेण्यासारखं काही नाहीये. त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद आहेत. पण भाकर्‍या बडवणं भाकर्‍या बडवणं केव्हापासून चाललंय म्हणून बोललो.

In reply to by सूड

त्यांचं मुलींनी काय घालावं काय घालू नये याबद्दलचं विधान मला खटकलं होतं.
मुलींचे, बायकांचे कपडे ( मेकपचा आकर्षकपणा, स्किनचा ओपन सरफेस, प्रॉक्सिमिटि ऑफ ओपन सरफेसेस टू प्रायवेट ऑर सेक्श्यूअल पार्ट्स, टाईटनेस रिविलिंग प्रोफाईल) आणि पुरुषांत्यांच्याबद्दलचे प्रेमजनक आकर्षण, शारिरिक आकर्षण, सेक्स्यूअल अरावजल, नजर खुल्या भागांकडे खुलेपणे वा चोरून नेण्याची प्रवृत्ती, आणि (माझ्या स्वतःच्या मतांप्रमाणे इथून पुढे गुन्हेगारी अशा) उपभोगासाठी फसवेगिरि करण्याच्या प्रवृत्ती वा जबरदस्ती करण्याच्या प्रवृत्ती यांचा संबंधच नाही हा अत्यंतिक मूर्खपणाचा कांगावा आहे. द रिअ‍ॅक्शन इज इजडायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सपोजर. मोअर सो फॉर द पिपल हू हॅव फस्ट टाईम एक्सपोजर टू एक्सपोजर्स इन अ कंट्रि लाईक इंडिया. नामिबियात आदिवास्यांत हा नियम लागू पडत नाही. इथे भारतात पडतो. तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा. ================= कपड्यांच्या बाबतीत अत्यंत प्रतिगामी राहणं ही योग्य आहे आणि संपूर्ण नागडं राहणं ही योग्य आहे. त्यातल्या "कमी कंजर्वेटिव ते कमी लिबरल" अशा ट्रांझिशनमधून भारतीय समाज जात आहे. तेव्हा प्रतिक्रिया अकोमोडेटिव आणि सुधारितच येतील असं नाही, अयोग्य असल्या तरी. हे सामाजिक स्थित्यंतरण आहे कोणता इंद्रियनियमनाचा अध्यात्मिक प्रयोग नाही आपल्या अपेक्षा काहिच्या काही असायला.

In reply to by arunjoshi123

तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा. जोशी सर तुम्ही या धाग्यावर खूप बोअर करताय. ते 'रैना' सारखे लिहा काहीतरी पुन्हा. तुमच्या लिखाणाच्या क्षमता कशाला वाया घालवताय.

In reply to by arunjoshi123

फारच चिडलेले दिसताय मी पाहतोय कि तुम्ही प्रत्येक प्रतिसादकर्त्याला उत्तर देताय आणि तुमच्या चिकाटीचे लोकांनी कौतुक सुद्धा केले आहे. एका प्रतिसादात तुम्हाला नं पटणारे सत्य आले तर लगेच धागा बंद ? तुमचे मुद्दे संपले असतील तर तुम्ही थांबा कि

In reply to by अत्रन्गि पाउस

मी कशाला चिडू? अहो, हे अप्पा जोगळेकर इथले संपादक (का तसले काय तरी) आहेत असं माझं इंप्रेशन आहे. मी कोण टिकोजीराव धागा बंद का चालू ठेवावा ते सांगणारा? पण मागे काही प्रतिसादासाठी बंद धागे पाहिलेत. त्यांना बोर झालं म्हणून उपाय सांगितला. ================ मला एक सांगा चिडलेला माणूस सतत इतका वेळ चीडलेला राहू शकतो का? =========================== शिवाय मी कोणत्याही कौतुकाची दखल घेतलेली नाही. प्रश्न माझ्या लैखनकौशल्याचा नाही.

In reply to by arunjoshi123

तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.
या वाक्यासाठी - +१०००००. मला नेमका हेच खटकतं कि प्रत्येक पुरोगामी सुधारणवाद्याला प्रत्येक सुधारणा हि दुसऱ्या दिवशीपासूनच झाली पाहिजे असे का वाटत असते कोण जाणे? खासकरून धर्म, संस्कृती, समाज याबाबतीतील सुधारणांच्या बाबतीत तर हा अट्टाहास टोकाला पोहोचल्याचे जाणवते. सद्यपरिस्थितीत समाजामध्ये एक जुन्या संकेतांनुसार घडलेली आणि आता सहजासहजी मते बदलू न शकणारी (आपली माणसे असणारी) पिढी आहे, दुसरी आपल्यासारखी मुद्दे समजून मग मते बनवणारी आणि सुधारणांसाठी स्वतःला तयार ठेवणारी पिढी आहे आणि तिसरी आपली पुढची पिढी आहे ज्याला आपल्याला घडवायचे आहे. ह्या सुधारणा आपल्या पुढच्या पुढील लागू करताना आपल्याला अडचण येईल असे वाटते काय? पण आपल्या आधीच्या पिढीचीही जीवन जगण्याची काही पद्धत आहे आणि आपण त्यांचा त्यांच्या पद्धतीने जगण्याचा हक्क त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हिरावून घेतो आहोत याचा विचार करून सध्याची दुसरी पिढी आधीची पिढी होईपर्यंत तरी जरा सबूरीनेच घ्यायला हवे असे वाटते.

In reply to by arunjoshi123

तर ट्रांझिशन करायचं असेल तर सावकाश, दमानं, धीरानं, स्मॉल डोसेजमधे करा.
माझ्या मते कोणतेही सामाजिक बदल जाणूनबुजून + स्टेप-बाय-स्टेप करता येत नाहीत (असल्यास याची उदाहरणे द्यावीत). दोन टाईपचे लोक असतात. एक टाईप - जे नेहमी समाजाचे अनुकरण करतात. दुसरा टाइप - जे स्वत:ला जे चांगलं वाटेल ते करतात - इतर लोकांचा विचार न करता. सामाजिक बदल हे फक्त दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांमुळेच शक्य होतात. समजा एका गावात पुरुशांनी टी-शर्ट घालून हिंडण्याची पद्धत नाही. सगळे फुल शर्ट घालून फिरतात. अशा वेळी एक कोणीतरी माणूस ठरवतो - की आज बनियन घालून बाहेर हिंडायचं. लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघतात. काही काळाने अजून काही लोक गरमीमुळे कंटाळून बनियनवर फिरू लागतात. अशा वेळी - असे म्हणून चालत नाही - की त्या माणसाने आधी टी - शर्ट पासून सुरवात करायला हवी होती. मुळात त्या माणसाने बनियन घालायचा निर्णय फक्त स्वत:चा विचार करून घेतलाय. आणि सामाजिक बदलांची सुरवात स्वत:पासूनच होते.

In reply to by अत्रे

आणि नंतर टी-शर्ट विरुद्ध बनियन असे दोन समाजगट शेकडो वर्षे भांडत राहतात. त्यांच्या अस्मिता बनतात. त्यांच्या सुसंवादाची संभावनाच शून्य होते. मग दोन पैकी काय चांगलं किंवा दोघांचं कोणतं काँबिनेशन चांगलं इ इ ठरवायचा फोरमच शिल्लक राहत नाही. समाजाचा जो संमती द्यायचा मंच आहे, सिस्टिम आहे त्याला टाळून किंवा त्याच्याशी घर्षण करून जाण्यात बर्‍याच सुधारकांना एक प्रकारची मस्ती येते, विकृत आनंद येतो किंवा इगो आडवा येतो. या व्यक्तिगत घमेंडीचा आणि सुधारणेचा काही संबंध नसतो. हे लोक स्वतः सुधारक असले तरी सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था मुद्दाम म्हणून लोकांवर अन्याय करते आणि लोक तो मूर्खासारखा मान्य करतात अशी धारणा बाळगून असतात. व्यवस्थेशी भांडण करणे हा एकमेव पर्याय असतो अशी बुद्धि सुधारकांमधे का असते ईश्वर जाणो. वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक असणे हे एक हळूहळू दिलेल्या डोसाचे उदाहरण म्हणून मी सांगेन (किती बरोबर आहे याची खात्री नाही.) कोण्या सुधारकाने धमाक्याने सुधारणा केली आणि त्या कलहाची बीजे आज नाहीत याची उदाहरणे आपण देऊ शकता का?

In reply to by arunjoshi123

समाजाचा जो संमती द्यायचा मंच आहे, सिस्टिम आहे त्याला टाळून किंवा त्याच्याशी घर्षण करून जाण्यात बर्‍याच सुधारकांना एक प्रकारची मस्ती येते, विकृत आनंद येतो किंवा इगो आडवा येतो
शक्य आहे. पण सुधारक (किंवा पहिल्यांदा बदलाची सुरवात करणारे लोक) यांनी समाजाला समजावून सांगायलाच पाहिजे असे कुठे आहे? ते म्हणतात - समाज गेला खड्यात!
वारकरी संप्रदायात सर्व जातीचे लोक असणे हे एक हळूहळू दिलेल्या डोसाचे उदाहरण म्हणून मी सांगेन (किती बरोबर आहे याची खात्री नाही.)
या बाबतीत माहिती नाही, अजून वाचायला आवडेल.
कोण्या सुधारकाने धमाक्याने सुधारणा केली आणि त्या कलहाची बीजे आज नाहीत याची उदाहरणे आपण देऊ शकता का?
नाही. किंबहुना अशा फार कमी गोष्टी असतील ज्यात समाजातल्या सगळ्या लोकांचे एकमत असेल.

In reply to by सूड

त्या बाई तशाही एरवीच धन्यवाद आहेत.
अभ्याचा प्रतिसाद वाचल्यानंतर हे वाक्य काढून टाकावं ही सा सं ला विनंती त्या खरोखरीच एवढी चांगली कामं करत असतील, तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ठीक.

In reply to by सूड

केवळ तू प्रतिसाद दिलास म्हणुन उत्तर. तू विपर्यास करुन घेतलास हे पाहुन आश्चर्य जास्त वाटलं. एक तर तू व्हिडीओ पाहिला आहेस का हा प्रश्न पडलाय. बहुदा नाही पाहिलास. त्यामुळे त्या "सगळ्यांना स्वयंपाक आलाच पाहिजे" असं म्हणत नाहीयेत हे तुझ्या लक्षात आलेलं नाही. मी काय लिहीलंय ते सोडा, शहाण्या माणसाने त्यांचे व्हिडीओ पाहिले तर त्याला हे उपदेश "सर्वांना" नाहीत हे पहिल्या २-४ मिनिटात कळेल. दुसरं असं की मला स्वयंपाक येतो, ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ५ वर्षाच्या मुलाला स्वयंपाकघरातला लहान कामांमध्ये सोबत घेतलंय आणि नवरा - वडिल - भाऊ - मेव्हणा इ पुरुष सुद्धा घरात बरोबरीने स्वयंपाक करतात. (दोन्ही आजोबा सुद्धा पुरणपोळ्या करायचे. ) तेव्हा स्वयंपाकाला कमी लेखणे किंवा पुरुषांच्या स्वयंपाकाचे कौतुक असणे, ह्या दोन्ही गोष्टींची मला गरज नाही. बळंच नसते अर्थ काढु नये. प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे. आता महत्वाचं, हे काही त्यांच्या एकट्याच्या नवर्‍या बद्दल नाही चालु. "नवर्‍या समोर काहीच चालत न स तं. हे पक्कं लक्षात ठेवा" हा जाहिर सल्ला आहे माऊलींचा. म्हणूनच म्हणते, आधी व्हिडीओ पहा. मग बोला. कपड्याविषयी म्हणशील तर कुणीच कुणाला हे सांगु नये. सोप्पंय. तात्पर्य - व्हिडिओ पहावे आणि मग मत व्यक्त करावे. अवांतर - बाई धन्यवाद आहेत ह्याशी सहमत. त्यांचे गहिवर मला नाटकी वाटतात. ४५८ रोज भाषणं देणार्‍याला रोज गहिवरुन येत नसतं किंवा तो ते आयुष्यात पहिल्यांदा बोलत नसतो की त्याला भरुन यावं. ज्यांना ते बघुन उमाळे येत आहेत, ते नक्की कशामुळे येत आहेत ते ज्याचं त्यानी तपासुन घ्यावं.

In reply to by पिलीयन रायडर

प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.
हे असं त्यांचं म्हणणं असेल तर वरचा अख्खा प्रतिसाद बाद आहे. आपल्याला जे काही लागतं खायला ते त्या त्या व्यक्तीला बनवता यायला हवं. ना पुरषांनी सगळं करायचा पत्कर घेतलाय ना बायकांनी.

In reply to by सूड

बाद बिद कै नै रे सुडक्या. आम्ही स्वतः शिव्या खाल्लेल्या आहेत त्यांच्या. मुलांचा ग्रुप होता. सकाळी लवकर कार्यक्रम अस्ल्याने त्यांनी विचारले नाष्ता कुणीकुणी केलाय. बरेच जण नकार दिले. एकाने घरी बनवला नाही असे उत्तर दिले. सगळ्यांची सामूहिक हजामत झालेली. लाजा वाटत नाहीत का? तुमची आंघोळ करुन भांग पाडून डिओ मारण्याच्या वेळात आई आक्खा स्वयंपाक करते, तिनेच सर्व रोजच्या रोज करायचा पत्कर घेतलेला नाही, तिच्यासारखी चव जमत नसेल तर मदत करा, भाज्या चिरुन द्या, भांडी घासा, झाडून काढा, आठवड्यातला एखादा दिवस स्वतः सर्व घरासाठी सिंपल नाष्टा तयार करा. नुसती अमेरिकेची स्टाईल कपड्यात बोलण्यात करण्यापेक्षा कामात अमेरिकनांचे अनुकरण करा, स्वावलंबी व्हा, खाल्ली ताटे धुवुन ठेवणे, उचलणे, कपडे धुणे हे व्यवस्थित आणि सर्वांनी केलेच पाहिजे हे उपदेश आम्ही स्वतः ऐकलेले आहेत. स्वयंपाक, घरातील लहानसहान कामे आलीच पाहिजे मग कॉलेजचा मुलगा असो की मुलगी ह्यावर त्या ठाम असतात हे निश्चित.

In reply to by अभ्या..

इथे बर्‍याच बायका बाईंच्या जेन्यूइननेसवरच शंका घेत आहेत. तुझा प्रत्यक्ष अनुभव त्यांचे बायस, अर्थाचा अनर्थ करायच्या पद्धती आणि एक वाट चुकलेला स्त्रीवादी आकस इ इ ना उघडा पाडतो. बेसिकली परंपरावादी लोक जेव्हा काही म्हणायला जातात तेव्हा पुरोगाम्यांची इंद्रिये काम करणं बंद करतात असं म्हणावं लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्याराव, सोडाहो! तुमचे अनुभव खरे कशावरून? तुमचे हे त्यांच्याबद्दलची उमाळे खोटेही असू शकतात! ;) मी वर एका प्रतिसादात म्हटले होते की त्यांचे गहिवरनेही काहींना खोटे वाटू शकते आणि त्याला नाईलाज आहे, सिद्ध झाले.

In reply to by पिलीयन रायडर

प्रश्न केवळ आणि केवळ "बायकांनीच" स्वयंपाक केला पाहिजे ह्या वृत्तीचा आहे.
या वाक्यात व्याकरणाच्या जबरदस्त चूका आहेत. १. ते "स्वयंपाक केला पाहिजे" असं नाही - "आला पाहिजे" असं आहे. २. "केवळ आणि केवळ बायकांनीच" असं देखिल बाई अजिबात म्हणालेल्या नाहीत. त्या "सर्व बायकांना" वा "प्रत्येक स्त्रीला" असं म्हणालेल्या आहेत. म्हणून ते सुधारित विधान सर्व स्त्रीयांना स्वयंपाक आलाच पाहिजे असं आहे. मग - १. काही पुरुषांना आला तरी चालेल. २. काही पुरुषांनी केला तरी चालेल. असा अर्थ निघतो. ==================== बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्‍या नवर्‍यांचं कौतुक केलं आहे. पण अशी अपेक्षा प्रत्येकाकडून ठेऊ नका असं म्हटलं आहे. ==================== काही काही व्यक्तिंची अभिव्यक्त होण्याची इडिओसिंक्रसी असते.