Skip to main content

कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा ( chain fiction Story) लिहायला ?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 15/03/2017 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी लिहलेल्या कथांना chain fiction असं म्हणतात. ही कथा कशी लिहली जाते ते सांगतो – एका लेखकाने कथा लिहायला सुरुवात करायची आणि अर्धवट सोडून द्यायची, दुसऱ्याने त्याच्या पुढचा भाग लिहायचा, तिसऱ्याने त्याच्या पुढचा वगैरे वगैरे. परत दुसरा round, तिसरा round. अशापद्धतीने कथा पुर्ण करायची. (थोडक्यात एकमेकांना खो देत पुढे जायचं) कथालिखाण करतांना भिडूंनी एकमेकांशी चर्चा करायची नाही. प्रत्येक पोस्टमध्ये किती शब्द असावेत आणि अंदाजे किती पोस्टमध्ये कथा संपवायची एवढंच फक्त आधी ठरवून ठेवायचं. गेल्यावर्षी मी आणि रविंद्र भयवाल आम्ही दोघांनी मिळून दुहेरी खेळी नावाची विज्ञानकथा लिहली होती. (प्रकाशन: धनंजय २०१६) मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी. मिपा परिवारातील लेखक उत्साही आहेत, नवनवीन आव्हानं पेलायला तयार असतात. म्हणून इथेही लेखकांनी मिळून कथा लिहावी अशी मनापासून इच्छा आहे. पण वरील कथाप्रकार मी अजून थोडा अवघड आणि मजेदार केला आहे. उदाहरणार्थ: समजा खो कथा लिहायला तीन लेखक तयार आहेत (अ, ब, क) कथेची लांबी सहा पोस्ट असावी आणि प्रत्येक पोस्टमध्ये ५०० ते हजार शब्द असावेत हे त्यांनी आधीच ठरवलंय. कथेची सुरुवात अ करतोय. पण तो नेहमीप्रमाणे पहिल्या पोस्टने सुरुवात करणार नाही तर मधूनच कुठूनतरी करेल. समजा अ ने तिसरी पोस्ट लिहली. आता तो पुढच्या भिडूला खो देईल. भिडू ....लिहलेली पोस्ट ....... खो अ ........३ ............ क तू सहावी पोस्ट लिह क ........ ६............ ब तू पाचवी पोस्ट लिह ब ........ ५ ............ क तू पहिली पोस्ट लिह क ........ १ ............ अ तू दुसरी पोस्ट लिह अ ......... २ ............ आता उरला ब. त्याने चौथी पोस्ट लिहून कथा संपवावी challenging प्रकार आहे. डोकं भंजाळून जाईल पण मजा येईल. खात्री बाळगा. सांगा मग. कुणी आहे का तयार ??

वाचने 12250
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

हायला कमाल आहे, माणसं समान परिस्थीतीमधे समान विचार करतात अस म्हणतात ते काय चुक नाही, ते मागं जव्हेरगंज न मोजी ची १ कथा स्वतः परत लिहीली तेव्हा पासुन माझ्याही मनात होतं कि मिसळपाव च्या जबराटकथा लेखकांची १ जुगलबंदी व्हावी, कोणीतरी १ जण सुरुवात करेल अन दुसरे भर घालत जातील, प्रत्येकाची शैली वेगळी आहे, त्यामुळे वाचायला फार मज्जा येईल. सुरेख कल्पना.

आम्ही अनाहितातर्फे हा प्रयोग केला होता. तो सुरू ठेवणे नंतर जमले नाही. पण २०१४ दिवाळी अंकात ऐलमा पैलमा आणि कथा या दोन कथा अशा खो खो प्रकाराने लिहिल्या होत्या आणि त्याना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. नेहमी न लिहिणार्‍यांनाही सवय व्हावी या हेतूने आणि सलग वेळ देणे महिलांना सहसा जमत नाही यामुळे हा प्रयोग तेव्हा आम्ही केला होता. बर्‍याच जणी मिळून बरेच दिवस लिहीत होत्या! आणि अमूक शब्द मर्यादा किंवा असे काही नियम अर्थातच केले नव्हते. तुमच्या प्रयोगाला भरपूर शुभेच्छा! रिझल्ट उत्तमच असणार.

असा कवितेचा प्रयत्न मागे झाला होता. विशेष उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला नाही त्याला. बाकी उत्तम कल्पना.

जानी, जब हम लिखते है, तो खुद लिखते है, जब खुद लिखते है तो बस खुदही लिखते है. ऐसे गर्दीमें टांगा नही चलाया करते है

In reply to by अभ्या..

ये हिकडं तू शेजारी बस बाबा, लगी उठून दांडपट्टा फिरवाय लागतंय, कसं होणार ह्या पोराचं.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आलो, चुनाडबी हाय का बाप्या? बसतो निवांत जरा

In reply to by अभ्या..

. चुना पुडीतच ठिवलाय, मळ जरा डबलिंग मदी

In reply to by अभ्या..

अबे, त्या उसेन बोल्ट्ला पण चार चौघात पळावं लागतंय बे. तेच्या २०-२२ मेडलातले ५-६ असं गर्दित पळापळी करुन मिळलेत तेला.

तर आता मी पकडून नऊजण तयार आहेत. नियम ठरवू आणि सुरू करून देऊ. आता नियम ठरवून घ्यावे लागतील. माझ्या मनातील प्रश्न मांडतो. १. कथा किती पोस्ट्स मध्ये संपवावी ? ही मर्यादा नसेल तर कथा हनुमानाच्या शेपटीसारखी लांबत जाईल. २. प्रत्येक पोस्टची शब्दमर्यादा काय असावी? ३. प्रत्येक पोस्ट लिहण्यासाठी वेळमर्यादा काय ठेवायची? म्हणजे एकाने खो दिल्यानंतर दुसऱ्याने किती वेळेत पुढची पोस्ट टाकायची ? कारण रंगत तेव्हाच वाढते जेव्हा फटाफट पोस्ट टाकल्या जातात. कुणाच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर मांडावेत. उत्तरं शोधू आणि नियम बनवू. कारण एकदा खो कथेचा महासंग्राम सुरू झाला की मग लेखक भिडूंनी आपापसात चर्चा बंद करायची आहे.

In reply to by अॅस्ट्रोनाट विनय

अॅस्ट्रोनाट विनय, पुढची चर्चा व्हॉट्सअ‍ॅप वर ग्रुप करून करता येईल. त्यामुळे वाचकांनाही यप्रोसेस्म्मधून वेगळे ठेवता येईल. तुमच्या प्रश्नांना खाली उत्तरे देत आहे. १. माझ्या मते कथा कधी संपवावी हे लेखकच ठरवतील. उत्तम लेखन जोवर होत आहे तोवर चालू ठेवायला काहीच हरकत नाही. उदा. George R. R. Martin (चा लेखक) याने इतर लेखकांबरोबर लिहिलेली Wild Cards ही सिरीज. तसे वाटल्यास आपापसात ठरवून थांबता येईल. २. जितकी जास्त तितके चांगले हे.मा.वै.म. (पण माझे आधीचे लेखन पाहून हे मत का आले हे तुम्हाला कळेलच) ;) ३. पूर्ण सहमत. लेखकांमध्ये जितके coordination असेल तितके हे सोपे जाईल. " एकदा खो कथेचा महासंग्राम सुरू झाला की मग लेखक भिडूंनी आपापसात चर्चा बंद करायची आहे. " मी याच्याशी अंशतः असहमत आहे. जितकी चर्चा होईल तितके लेखन उत्तम होत जाईल असे मला वाटते.

In reply to by निशदे

संयुक्त व्यनि करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शिळोप्याच्या गप्पा वाढतात.

In reply to by सूड

+१ व्यनि करु. मला वाटतं, की आपापसात न ठरवता गोष्ट लिहीताना खो देऊ / घेऊ. उत्स्फुर्तपणे कुठे जातेय कथा ते बघायला मजा येईल.

@ आदुबाळ तुम्ही असते तर अजून मजा आली असती. पण कामांपुढे कुणाचे न चले. त्यामुळे हरकत नाही. या कथेत प्रतिसाद आणि मार्गदर्शनरूपी सहभाग मात्र जरूर नोंदवावा. पुढच्या खो कथेत तुम्ही भाग घ्यावा अशी इच्छा.

In reply to by अॅस्ट्रोनाट विनय

अहो मला फार इच्छा आहे हो, पण एप्रिलमध्यापर्यंत बराच काळ मी संपर्कातच नसेन बहुतेक. फुडल्या टायमाला नक्की.

हो. खुप लोक असतील तर दोन टिम असाव्यात असे मलाही वाटले. खुप मोठी साखळी नको. खास करुन पहिल्यांदाच तुम्ही असा प्रयोग करताय तर. पहिली ५-६ जणांची कल्पना चांगली आहे. राबवा पटकन. घ्या एकाने पुढाकार आणि मांडा नियमांचा प्रस्ताव. बाकीचे हो किंवा नाही सांगतील. वाचायला अत्यंत उत्सुक!

१. कथा जर नऊ लोक लिहिणार असतील तर, प्रत्येकी एक म्हणजे निदान नऊ पोस्ट झाल्या पाहिजेत. २. शब्द मर्यादा: शंभर ते पाचशे शब्दापर्यंत असावी, वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन पाने ३. वेळ मर्यादा: "खो" दिल्यानंतर तीन दिवस, (बहात्तर तास ), एका महिन्यात कथा पूर्ण होऊ शकते, जितक्या लवकर पोस्ट टाकता येईल तितक्या लवकर टाकावी. जर तीन दिवसात पोस्ट पूर्ण झाली नाही तर, तो लेखक बाद होईल आणि मग पुढच्या कोणत्याही लेखकाला "खो" देता येईल.

In reply to by चॅट्सवूड

वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन पाने >>> एका पेजमधे अंदाजे ४००० शब्द बसतात

In reply to by विनिता००२

४००० शब्द? मी १००० शब्दांची कथा लिहिली होती, संवादांना परिच्छेद देऊन, तेव्हा वर्ड पेजची पाच पाने लागली होती.

In reply to by विनिता००२

कदाचित तुम्ही लहान फॉन्ट साईज वापरात असाल, मी नेहमी फॉन्ट साईज ११ वापरतो

दोन टीम पाडून लिहायचं म्हणजे कसं लिहायचं ? की पाचपाच जणांच्या दोन टीम पाडून दोन्ही टीमने वेगवेगळ्या कथा लिहायच्या ? वाचकांचाही आनंद द्विगुणित होईल

एकच टीम असावी. सगळ्यांना सगळं सुचेल असं थोडीच होणार आहे. पुन्हा वेळेचा प्रश्न आहेच. खो देण्याची पद्धत नसावी. इच्छुकांनी आपणहून खो घ्यावा. म्हणजे चांगलं सुचलं तेच पुढे येईल. पोस्टची शब्दमर्यादा पाच ते दहा ओळी असू द्यात. म्हणजे जास्त वेळ घेतला जाणार नाही!

मला ही वाटत, एकच ग्रुप असावा म्हणजे परत "या टीम ने वेगळी पद्धत वापरली" असे काही होणार नाही, प्रतिसाद जर चांगला मिळाला तर पुढच्या वेळी, दोन टीम्स ठेवता येईल.

लिहिलेला त्याच्या वाट्याचा कथाभाग त्याच धाग्यात अपडेट करणार आहे का संपादक/साहित्य संपादक मंडळी? असल्यास वाचायला मजा येईल, नपेक्षा स्व-खो पद्धतीत मेनबोर्ड फ्लड होऊन जाईल, अशी शक्यता वाटते, जे तितकेसे स्वागतार्ह नसेल, असे माझे वैयक्तिक मत पडते आहे. अर्थात, नाट लावणे हा उद्देश नसून तांत्रिक मुद्दा म्हणून मांडतो आहे, बरंका विनय भाऊ, बाकी होल वावर इज आवर :)

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी काहीही बोल भावड्या तू, पण त्या इन्सेप्शनची आठवण नको करून देऊ बाबा. ;)

एक सूचना. एकच कथा सगळ्यांनी थोडी थोड़ी लिहिन्या पेक्षा सर्वांनी मिळुन एक विषय ठरवा आणि त्याच्या अनुषंगा ने प्रत्येकाने स्वतंत्र कथा लिहावी.

In reply to by मिडास

त्यात काय मजा आहे आणि? मला मूळ कल्पनाच जास्त आवडली आहे. क्ष लेखकांनी एकमेकांशी न बोलता क्ष भागांमध्ये एकच कथा लिहायची. पण वेगवेगळ्या सिक्वेन्सने. अत्यंत चॅलेंजिंग गोष्ट आहे ही.

स्पिन द यार्न. अर्थात लपेट्ते जाओ. मायबोलीवर हा प्रकार गेली कित्येक वर्षे खेळला जातो. अन भन्नाट स्टोर्‍या तयार होतात. मिपावर हा प्रकार नवा दिसतोय हे पाहून आश्चर्य वाटले.

In reply to by आनंदी गोपाळ

हे पहा. किंवा ही कथा : कथा ३. सेव्ह द अर्थ * तिकडची जाहिरात म्हणून कृपया माझ्या पोस्टकडे पाहू नये. हा प्रकार खूप जुना आहे, इतकेच निदर्शनास आणायचे होते.

In reply to by आनंदी गोपाळ

स्पिन दी यार्न हा basic आणि फारसा challenging नसणारा प्रकार वाटला. ज्या लेखकाने पहिली पोस्ट लिहली तो पुढे काय लिहायचं याच्या सगळ्या सुचना स्वतःच देऊन ठेवतोय. यात मजा ती काय. अजिबात चुरस नाही, खेळाच्या व्याख्येत ते बसत नाही. इथे आपण पुढे काय लिहायचं हे पुर्णपणे पुढील लेखकावर सोपवणार आहोत. पुर्ण स्वायत्तता. दुसरी गोष्ट प्रत्येक पोस्ट लिहायला शब्द आणि वेळेची मर्यादा असणार आहे ( जशी खेळात असते.) शिवाय random sequence आहे म्हणजे मजाच मजा. या अर्थाने मिपावरील हा प्रयोग unique आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे, मी काही ठिकाणी असं पाहिलेलं (स्पिन दी यार्नपण यात येतं ) आहे की एकजण एक भाग लिहतो, दुसरा त्याच्या पुढचा वगैरे वगैरे पण... एकच round खेळला जातो. म्हणजे प्रत्येकजण एकच पोस्ट लिहतो. असं केल्याने जास्त मजा येत नाही. आम्ही दोघांनी मिळून जी कथा लिहली होती त्यात आम्ही तब्बल १६ round खेळलो. कधीकधी एकाने लिहलेलं दुसरा पुर्ण पलटायचा, डोकं भंजाळून जायचं. प्रत्येकाला पुन्हा नव्याने विचार करावा लागायचा. पुढेपुढे तर कोण कमी वेळेत पोस्ट टाकतो यावरून चुरस निर्माण झाली होती. एका दिवसात एक मग दोन आणि शेवटी शेवटी तीनतीन पोस्ट पडायला लागल्या. दोनदोन वाजता झोपेतून उठून पोस्ट लिहल्या आहेत. थोडक्यात एखाद्या खेळासारखी चुरस, अनपेक्षित वळणं, challenge आणि थरार असल्यामुळे ही क्ष लोकांनी मिळून लिहलेली समूहकथा बनली नाही, त्यापेक्षा हटके काहीतरी बनलं. याअर्थाने मी आम्ही पहिली खो कथा लिहली असं म्हटलं. तुम्ही म्हणता त्याला खो कथा म्हणता येणार नाही.

फार ताणु नका उत्सुकता. लवकर सुरु करा. मी रोज येऊन बघुन जातेय की काही ठरलं का ते. धागाकर्त्याने झटपट नियम मांडावेत. ज्यांना मान्य असतील त्यांनी सहभाग घ्यावा. पहिला प्रयत्न आहे. ज्या काही सजेशन्स असतील त्या पुढच्या राऊंडमध्ये घ्या. पण सुरुवात तर करा. वर कुणी तरी व्हॉटसॅप ग्रुप बद्दल बोल्लय. त्यात अति चर्चा होईल हो. शिवाय अनेकांना खरे नाव नंबर द्यायचा नसतो. तेव्हा व्यनि मधुन लेखक काय ते बेसिक ठरवुन घेतील. पण पुन्हा त्यांच्यात चर्चा नको!

जास्त उत्सुकता ताणत नाही. उद्या ( दि. १८ ) खो कथेला सुरुवात होईल याची खात्री बाळगावी. कथाप्रकार हटके असणार आहे.