Skip to main content

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 15/02/2017 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.

वाचने 119771
प्रतिक्रिया 340

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

if ‘X’ is the current year, then the objective is to return in the ‘X + 1’ year. Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached. chained to his cultural moorings and haunted by an abject fear of giving up an accustomed standard of living, the Non-Resident Indian vacillates and oscillates between two worlds --- आंजावरून साभार

In reply to by पुष्करिणी

Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached. पण कोणताही निर्णय घेणं अवघड होण्याचं कारण फार मजेशीर आहे . मनाला निर्णय घेता येत नाही , त्याचं काम फक्त वेगवेगळे विकल्प मांडणं आहे . निर्णय कायम व्यक्तीलाच घ्यावा लागतो पण व्यक्ती मनाकडे कौल मागते . मग मन पुन्हा नवनवे विकल्प देतं त्यानं व्यक्ती आणखी कन्फ्युज होते . खरं तर मेंटल अॅक्टिविटी पूर्ण थांबल्याशिवाय निर्णय असंभव असतो . पण व्यक्ती मनाला कायम टरकून असते, न जाणो एखादा निर्णय चुकला तर मन पुन्हा म्हणणार ' मी त्याच वेळी सांगितलं होतं ! घातला ना घोळ ? आता निस्तरा ! ' त्यामुळे व्यक्तिला वाटतं निर्णयाचं काम बेटर मनावरच सोपवा. मग व्यक्ति मनाकडे पाहाते आणि मन व्यक्तिला पुन्हा स्वतःच्या मेरी गो राऊंड मधे बसवतं ! हा खरा X -> Y सिंड्रोम आहे ! Where X is mind & Y is you . The dilema is tossing the Ball to each other & the result is an unending game which makes any outcome impossible.

In reply to by संजय क्षीरसागर

हो, होतं असं. खरं तर प्रत्येक निर्णय घेताना होतं. पण जेंव्हा एखदा निर्णय चुकण्याची किंमत बरीच मोठी असायची शक्यता असते /बॅकट्रॅक करणं सोपं नसतं किंवा सगळेच पॅरमिटर्स 'लॉजिकल' नसतात, काही 'भावनिक' सुद्धा असतात तेंव्हा मनाकडे कंट्रोल जातो. प्रत्येकाच्या सद्य परिस्थितीवर ते अवलंबून असेल.

In reply to by पुष्करिणी

भावना म्हणजे विचारामुळे हृदयात निर्माण झालेला हलकासा ट्रेमर . सुरुवातीला विचार फक्त मेंदूत असतो पण मनाला फुल थ्रॉटल जायचं असेल तेव्हा मन एखादा हृदयस्पर्शी विचार निर्माण करतं . इथे व्यक्ति फुल गर्तेत जाते आणि भावनेला शरण जाऊन निर्णय घेते . निर्णय विचारांनी घेतला काय की भावनेनी, शेवटी तो मनानंच घेतलेला असतो . निर्णय यशस्वी झाला तर क्रेडीट मनाकडे जातं पण फसला तर खापर तुमच्यावर येतं ! सो मेंटल अॅक्टिविटीकडे एकदाच बघायचं, काय वॅलीड आहे ते ठरवायचं आणि मग मनानं कितीही बोंबाबोंब केली तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून स्वतः निर्णय घेणं ही सगळयात सोपी, जलद आणि निर्णायक प्रकिया आहे.

In reply to by गवि

रहायला मजा येतेय ना अमेरिकेत. बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. शिक्षणपद्धती वगैरे जस्टिफिकेशन शोधू नका. कोणी मागितलंय?
प्लस. १०००. आणि हजारवेळा सहमत. माझ्यादृष्टीने चर्चा इथेच संपली आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

त्यामुळे पुन्हा तेच मुद्दे मांडण्यात हशील नाही. मुलांच्या बाबतीत काय करायचे याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा मला सावरकर आजोबांचा संदेश आठवतो -
माझं लोकांना एकच सांगणं आहे की मुलांवर असे प्रेम करा की ती आपण होऊन तुमच्याजवळ येतील. अपेक्षा ठेवू नका. त्यांना आयुष्याचा आनंद घेऊ देत.
प्रत्येक आईबापाने आपल्या मुलांना असे प्रेम द्यायला हवे की मुलाला बापाबद्दल द्वेष वाटता कामा नये.
आणि सरतेशेवटी मी तरी खलील जिब्रानची ही कविता डोळ्यांसमोर ठेवायचा शक्य तेवढा प्रयत्न करतो. तुम्हाला निर्णय घेता येण्यासाठी शुभेच्छा! :)

शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे सगळ्यांनीच मान्य केलाय. अमेरिकेत ते अधिक चांगल्या दर्जाचे आहे. पण त्यानिमित्ताने पुण्यातल्या चांगल्या शाळांची नावं मिळाली. परतल्यास भारतातही उत्तम पर्याय आहेत हा एक दिलासा आहे. प्रतिसाद वाचुन किमान एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. ती म्हणजे माझी मूळ भीती ही आपला मुलगा आपल्यापेक्षा काही तरी भलत्याच वेगळ्या संस्कॄतीची पताका पुढे नेणारे. आणि ही गोष्ट चांगली अथवा वाईट असण्यापेक्षाही माझ्यासाठी नवीन आहे. तेव्हा पालक म्हणुन मी ते हाताळु शकेन का अशी एक भीती मला वाटतेय. भारतातही हे होईलच पण अमेरिकेत मला ते तीव्रतेने जाणवतं इतकंच. शिवाय भारतासाठी डोळ्यात पाणी न येणे एकवेळ मी समजु शकते. पण त्याने अमेरिकेच्या झेंड्याशी जास्त इमान राखलं तर मला धक्का बसेल हे नक्की आहे. पद्मावती आणि वैषाली म्हणाल्या तसं ते पुन्हा एकदा आमच्याच हातातही आहे. आम्ही आमची संस्कॄती किती जोपासतोय ह्यावर मुलापर्यंत काय पोहचेल हे अवलंबुन आहे. खरं तर मी भारतातही निवडक सण सोडुन फार काही करत नाही, इथे तर आनंदच आहे. मला त्या अर्थाने त्याला भारतीय बनवायचे नाही. मला माझ्या मुलाच्या निष्ठा दुसर्‍या देशासाठी समर्पित असु शकतील हे पचायला अवघड जातंय. त्याने कोणतेही सणवार नाही केले तरी मला तसा काहीच फरक पडत नाही. पण भारताच्या झेंड्याचा अभिमान त्याला असावा असं मला वाटतं. देशाभिमान हा फक्त भारतात राहिल्याने व्यक्त होतो असं काही माझं आत्यंतिक मत नाही. आयुष्यात परसेशात रहाण्याचा अनुभव फार मोठे बदल करतो, तुमच्या जाणीवांना प्रलग्भ करतो हे मला दिसतंचे. पण माझं घर हे अखेर भारतात आहे, इथे मी पाहुणी... ही भावना मला अजुन तरी काढुन टाकता येत नाही. इथुन कुणीही मला निघुन जा म्हणुन शकतं, ह्या देशाच्या नियमांवर माझे आयुष्य फार जास्त अवलंबुन आहे ह्या ही जरा बोचणार्‍या गोष्टी आहेत. पण मी ह्या गोष्टींवर चिडचिड करत असताना, अनेक लोक ही भावना दूर करुन इथे रहातात, मुलांना उत्तम शिक्षण देतात. तेव्हा मला वाटतं की मी जास्त हळवी होतेय का? ह्या सगळ्या भावना मी नुकतीच इथे आल्याने आणि अजुन इथे कमवत नसल्याने* अत्यंत तीव्र आहेत. देशभक्तीच्या ह्या कल्पना बोथट होतील का? किंवा चक्क उद्या मुर्खपणाच्याच वाटतील का? *(हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, स्रुजा म्हणते तसं माझ्या नवर्‍याचंही मत आहे. अमेरिकेत काम केल्यावर अमेरिका जास्त आवडायला लागते. मी भारतात एका अमेरिकन बेस्ड कंपनीसाठीच काम केलेले आहे. आणि सगळी सुत्र अमेरिकेतुन हलतात ह्याचा अनुभव आहे. तेव्हा खरंच दर्जा काम करायचं असेल तर ते इथे करायला मिळेल असं मलाही वाटतं.) प्रतिसाद आणि व्यनि मधुन इतकी चांगली चर्चा चालु आहे. अवांतर :- मला फक्त अमेरिकेचा अनुभव आहे. पण इतर देशांमध्ये शिक्षण आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे अनुभव कसे आहेत?

In reply to by पिलीयन रायडर

देशाभिमान आणि झेंड्याशी निष्ठा वगैरे समजले नाही. नक्की काय म्हणायचंय? अमेरिकेत कायमचं राहण्याचा निर्णय घेणारे भारताचा देशाभिमान वगैरे तर लोलियतच वाटतं. (तुम्हाला उद्देशून नाही. इन जनरल इथल्या पॉटलक मित्रांशी बोलतो तेव्हा जे वाटतं ते) एक जुनं कार्टून आठवलं. कार्टून

In reply to by आजानुकर्ण

हे बघा.. त्याचं असंय की देशात राहिलं की च आपण देशप्रेमी असतो असं मला वाटत नाही. समजा मी माझ्या देशासाठी वेळ नाही देऊ शकत, पण पैसे देऊ शकते. तर मी ते कुठेही राहिले तरी देऊच शकते. आपण कुठेही राहुन देशासाठी योगदान देऊ शकतो असं मला वाटतं. बाकी झेंडा आणि राष्ट्रगीत ह्यांच्यासाठी मी जरा सेंटी आहे. म्हणून मुलाला जेव्हा शाळेत अमेरिकेच्या झेंड्यासमोर प्रतिज्ञा म्हणताना पाहिलं तेव्हा फार त्रास झाला. आज तो पोपटपंची करतोय, उद्या मनापासुन अमेरिकेला त्याचा देश मानेल. ज्याचा एक सेंटी माणुस म्हणुन मला त्रास होईल. बाकी तुम्ही म्हणताय तसे लोक मला नाही भेटले अजुन. सुदैवाने सगळे भारताच्या प्रेमातलेच आजुबाजुला आहेत. ते लोक भारत वाईट आहे म्हणुन इथे नसून, इथे जास्त चांगल्या संधी आहेत म्हणुन आहेत. ह्यात भारतासाठी द्वेष वगैरे नसून, प्रॅक्टिकली जे आवश्यक आहे तो पर्याय निवडला असं असण्याची शक्यता जास्त आहे. मग असं असताना त्यांनी इथे राहुन भारताविषयी प्रेम व्यक्त केलं तर हरकत नसावी. मागे एकदा इंडीया डे परेडच्या फोटोंवर कुणी तरी भारतातल्या मित्राने असाच ह्या लोकांच्या राष्ट्रभक्तिवर सवाल केला होता. ते ही चूकच वाटले होते. भारतात बसलाय म्हणुन हा फार मोठा देशभक्त आहे आणि इंडीया डे परेडमध्ये सगळे एकजात दांभिक आहेत हा अ‍ॅप्रोच चुकीचा आहे. बादवे.. तुमचा वरचा प्रतिसाद खूप आवडलाय. मुद्द्यांमध्ये दम आहे. ट्रंप आल्यानंतर विचार झपाट्याने बदलले हे नक्की. ह्या माणसाच्या आमदनीत रहावं का असं दिवसातुन चारदा तरी वाटायला लावतोय तो आजकाल.

In reply to by पिलीयन रायडर

तु म्हणालीस की तुझे वडील मराठवाड्यातून पुण्यात आले. तुझे प्रेम मराठवाड्यावर जास्त आहे की पुण्यावर? जिथे आपण रुजतो तिथलेच प्रेम वाटणार . त्यामुळे आपल्या मुलांना भारत आवडेल पण ते God bless America!! म्हणणारच. १५ आॅगस्ट ऐवजी ४ जुलै जास्त प्रिय असणार . याचा आपल्याला त्रास होतो पण इथे राहून या देशावर प्रेम न करता भारतावर कर हे जरा अवघडच?

In reply to by पिलीयन रायडर

जसे तू भारतात जास्त राहिलीस आणि तुला भारताबद्दल जास्त प्रेम वाटते तसे त्याला त्याचे बालपण usa मध्ये गेले म्हणून usa च्या झेंडयाबद्द्ल जास्त प्रेम वाटलं तर चूक काय?. आपण ज्या शहरात / राज्यात राहतो त्याबाबतीत पण तर आपण असेच वागतो ना? एका ठिकाणी तू लिहिलेस कि '' पण आम्ही त्याला क्षणभरही विसरु देत नाही की भारत आपला देश आहे '' . हे त्याला सांगता सांगत तु तुला स्वतःलाही सतत सांगते आहेस का? इथे मी उलट विचार करून बघतेय, असे बिंबवण्यापेक्षा आणि मग नंतर confuse होण्यापेक्षा आपण दोन्ही देशांवर डोळसपणे प्रेम करावे असे मला वाटते.

In reply to by पिलीयन रायडर

मी अमेरिका सोडून इंग्लंड मध्ये राहिलो आहे. शिक्षणाचे काही माहीत नाही पण अमेरिके इतकेच किंवा काकणभर सरस वाटले इंग्लंड मधील इन्फ्रास्ट्रक्चर. तसेच भारतातून आलोय म्हणून कधी कुठेही हीन वागणूक मिळाली नाही. उलट लोक ज्या प्रेमळपणे बोलत, आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते माझ्यासाठी नवीन होते. इंग्लंड मला अमेरिकेपेक्षाही आवडला होता.

In reply to by पिलीयन रायडर

आपण खालील मुद्दे देखील विचारात घ्यावेत : १. खाण्या पिण्याच्या सवयी : जर अमेरिकेत अधिक काळ राहणार असाल तर पुढे मागे तुमचीही नोकरी सुरु होईल. आणि जेव्हा दोघेही काम करत तेंव्हा २-३ दिवसांचे जेवण एकदम करून ठेवले जाते. बऱ्याचदा फ्रोझन फूडचा पर्याय देखील वापरला जातो. रोज फ्रिज मधून अन्न काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे ती खूप कॉमन गोष्ट आहे. सांगण्यासाठीचे कारण असते कि वेळ आणि पैसा वाचतो परंतु ताजे बनवलेले अन्न आणि फ्रोझन फूड यातील फरक नव्याने सांगायला नको. असे फ्रोझन अन्न खाल्यान्ने अनेक विकारांना आमंत्रण मिळते. अमेरिकेतील सर्वच भारतीय असे करतात असे नाही परंतु बरेचसे करतात त्यामुळे आपल्या बाबतीत देखील हि शक्यता ध्यानात घ्या. २. पैसा आणि पैसा : आपण दोघेही जरी नोकरी करत असाल तरी देखील भारतातल्यासारखे घरकामासाठी माणूस ठेवणे परवडत नाही. त्यामुळे नवरा बायकोला नोकरी करून वर घरातीलदेखील कामे करावी लागतात. वीकएंड हे ग्रोसरी आणणे , घर vacuum करणे , मुलांना वेगवेगळ्या क्लासना सोडणे , आणणे , कपडे धुणे, इस्त्री करणे, भांडी घासणे, मोठे घर असल्यास गवत कापणे, बागेची निगा राखणे इ. अनेक कामे करण्यात जातात. बरेचसे लोक त्यामुळे आयुष्य किती busy आहे हे भारतातल्या लोकांना सांगतात असतात. हे सर्व करून मुलांसाठी, आपल्या स्वतःसाठी (छंद इ.) किती वेळ आणि energy शिल्लक राहील ह्याचाही विचार करावा. ३. मुले : मुले थोडी मोठी (टिन एज ) झाल्यावर आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा: - That’s my life, that is none of your business - मुलीकडून : Joe is black guy, so what ? Look at his body, he looks like your “Salman Khan”, I would love to go out with him. - You are asking too many personal questions. - “I don’t get any clue what they are saying in that Pooja Ceremony and still you want me to seat 2 hours there. This is a torture. - You asked me to come with you at the temple, when I asked significance of the murti , clothing on Murti etc.. even you were at loss of words. I am not convinced, sorry I would stay at home, you guys go to the temple , Satnarayan Puja whatever.. आर्थिक स्वास्थ्य आहे पण मानसिक नाही अशी अवस्था अनेकांची होते. अशी अनेक उदाहरण बघितली आहेत जिथे पैसा आहे पण आपली वाटावीत , ज्यांच्या बरोबर आपले यश , प्रगती शेअर करावी अशी आपली माणसे जवळ नाहीत. ज्या मुलांसाठी आपण इतके कष्ट केले ती मुले मोठी (टिन एज ) झाल्यावर बऱ्याचदा पैसा किंवा तत्सम आर्थिक आधार हवा तेंव्हाच जवळ येतात , इतर वेळी आपल्या स्वतःच्या जगात अशी परिस्थिती. काही बोलताही येत नाही कारण आपणच आपल्या भारतातल्या मित्र , नातेवाईक ह्यांच्या समोर इथे आपण किती भारी आयुष्य जगतोय ह्याचे सुंदर चित्र रंगवलेले असते. प्रत्येक भारतीयाला असाच अनुभव येईलच असे नाही पण बरयाचदा वर सांगितलेले देखील होणारच नाही ह्याची खात्री कोण देईल ?

In reply to by Jack_Bauer

'रोज फ्रोज़न फुड खाणे'या अर्बन मीथ्स वाटतात मला तरी. अगदी साठीच्या दशकात, सत्तरिच्या दशकात जे लोक अमेरिकेत आले त्यांना भारतीय ग्रोसरी मिळायची नाही सहजासहजी. तेव्हा असे तुम्ही म्हणताय तसे व्हायचे हे खरंय. पण जे नव्वदीचे दशक आणि पुढे अमेरिकेत आले त्यांच्या घरात अस फ्रोज़न फुड (फ्रोज़न मटार, फ्रोज़न बीन्स किंवा फ्रोज़न कॉर्न ठीक आहे) खाणे नाही दिसणार. मी स्वत: त्या देशात पंधरा वर्षे राहीले आहे. अगदी ओहायो मधल्या खेडेगावापासून महानगरापर्यंत. फ्रोज़न फुड खाणे हा प्रकार मी तरी कधी माझ्या घरात किंवा आमच्या नातेवाईक, मित्र परिवारामधे ( भारतीय) बघितला नाहीये. सगळ्या घरांमधून व्यवस्थीत भाजी पोळी, वरण भात, चटणी, कोशिंबिरीचा स्वयंपाक असतो. जॉब करणार्‍या स्त्रिया सुद्धा रोज छान साधा का होईना स्वयंपाक करतात. जास्तीत जास्तं पोळ्या बाहेरून आणतात. घर कामासाठी माणुस बळ नसते हे मात्र खरंय. पण थोडं फार.. उदा. गवत कापण्यासाठी, घराच्या क्लीनिंग साठी लोकांना हायर करता येतं ते केलं की आपला वेळ वाचतो. बाकी मुलांचं म्हणाल तर ' नन ऑफ युवर बिज़्नेस' , ' यू आर आस्किंग टू मेनी क्वेस्चन्स' असे टीनएज टॅंट्रम्स जर कधी त्यांनी केलेच तर देसी आई वडिलांना मुलांना योग्य वळणावर कसे आणायचे ते बरोबर कळते. पूजेला, मंदिरात ही मुलं त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की येतात. आधी मे बी बोर होत असतीलही. पण म्हणतात नं '' अच्छी आदतें हमेही तो लगानी हैं' हे आई वडीलांनी पक्कं ध्यानात ठेवलं की सोपं होतं सगळं मग. मुलांच्याही ते अन्ग्वळणी पडतं. मग एकदा त्या टीनएज ' ओह नो' फेज़ मधून बाहेर आले आणि संसाराला लागले की तेही आपले संस्कार, चालीरीती त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचाव्या याची निश्चित पणे काळजी घेतात यात काहीही शंकाच नको. फक्त आई वडीलांनी गोडी गुलाबीने आणि प्रसंगी स्ट्रिक्ट्ली या सवयी मुलांना लावायला हव्यात आणि ते करतातही.

In reply to by पद्मावति

फ्रोज़न फुड म्हणजे फक्त पटेल ब्रदर्समध्ये मिळणारे असे नसून आपण बनवलेले आणि फ्रिजमध्ये ठेवून ३ दिवसांनी खाल्लेले हे देखील येते. घरातील स्त्री हि जर रोज ८ तास नोकरी , साधारण १ ते दीड तासाचा रोजचा घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा प्रवास , किमान रोजची ७ तास झोप हे करून आपल्या म्हणण्यानुसार जर रोज व्यवस्थीत भाजी पोळी, वरण भात, चटणी, कोशिंबिरीचा स्वयंपाक करून, भांडी घासून (कारण इथे भांडी घासायला बाई नसते ) , किचन आवरून वर कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देत असेल तर खरंच कौतुकास्पद आहे. कदाचित आपल्याला अशी उदाहरणे दिसली असतील पण माझ्या पाहण्यात तरी जितके परिवार आले त्यांच्या फ्रिजमध्ये फ्रोझन फूड हे असतेच असते. काही कामाकरिता लोकांना हायर करता येतं हे आपला म्हणणं खरं आहे. परंतु गवत कापायला जेव्हा सरासरी $१२० आणि घराच्या साफ सफाईला जेव्हा सरासरी $११५ म्हणजे एका वेळेसाठी साधारण $३०० (+टीप पकडून ) द्यायची वेळ येते तेव्हा किती जण हा मार्ग निवडतील आणि किती वेळा निवडतील हा प्रश्नच आहे. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर पालकांनी काय करावे काय करू नये हे न सांगता मी एवढाच म्हटलं आहे :
आपल्या मुलाकडून अगर मुलीकडून समजा पुढील प्रश्न विचारले गेले तर कसे उत्तर द्यायचे ह्याची तयारी ठेवा:
ह्या उपर आपले मूल कसे हाताळायचे हा प्रत्येक पालकाने घ्यायचा निर्यय आहे.

In reply to by पद्मावति

तुमच्या निरिक्षणाशी सहमत आहे. अमेरिकेत रहायचं तर अमेरिकेतली लाईफ स्टाईल अंगिकारावी लागते. आणी ती जर अंगिकारली, तर असा काही त्रास वगैरे होत नाही. उगाच बाऊ करावी ईतकी परिस्थिती वाईट अजिबात नाहीये.

पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मुलाने भारताच्य झंड्याशी इमान राखावं, अमेरिकेच्या जास्त नको हे विचार जरा विचित्र आहेत बघा... वरिल सर्वांच्या प्रतिसादात कुणी आयडेन्टीटी क्रायसिसचा उल्लेख किंवा त्यानुषंगाने चर्चा केली आहे काय? पिरातैच्या वरच्या प्रतिसादात व्यक्त झालेल्या मतांमध्ये मला त्यांच्या मुलाला टीनेजपासूनपुढे आयडेन्टीटी क्रायसिस ला सामोरे जावे लागू शकते असे पोटेन्शियल दिसत आहे. उद्या त्याने एफबीआयमध्ये, सीआयए मध्ये नोकरी केली आणि भारताविरुद्ध गुप्त कट रचण्याची त्याच्यावर जबाबदारी आली तर हे आयडेन्टीटी क्रायसिस त्याला त्रास देऊ शकतं असं वाटतं.... अर्थात ही एकदम फारफेच्ड सिचुएशन मांडली आहे. तरीही...

In reply to by संदीप डांगे

फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही. अगदी रास्त मुद्दा आहे. मी स्वतः इतका ताणुन विचार केलाय एकदा. उद्या अमेरिका आणि भारताचे युद्ध झाले तर? पार इथवर... माझा मुलगा किती प्रॅक्टीकल निघेल ह्यावरही बरेच अवलंबुन आहे. पण आम्ही त्याला क्षणभरही विसरु देत नाही की भारत आपला देश आहे. समजा मी हा अतिरेकीपणा थांबवला तरी त्याची नाळ जुळलेली रहाणारच आहे भारताशी. उद्या हा मुलगा अमेरिकेचा नागरिक झाला तरी अमेरिकेसाठी आणि खास करुन भारताविरुद्ध काम करु शकेल का? त्याला हे प्रश्न पडतील असं वाटतंय.. (मुळात असे संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?)

In reply to by पिलीयन रायडर

असे युद्ध ही गोष्ट फार लांबची आहे पण आपल्या इतिहासात पण भारतात राहून इंग्रजांच्या बाजूने आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध लढलेल्या भारतीयांची संख्या काही कमी नाहीये. अजूनही भारतात राहून भ्रष्टाचार करणारे, नियम व कायदे न पाळणारे, अतिरेक्यांना व भारतविरोधी कारवाया करणाऱ्यांना वैचारिक का होईना पण पाठबळ देणारे हे पण भारताविरोधात अप्रत्यक्षपणे लढतच आहेत. संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का? घेत असावेत. पण अगदी खूप वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी वेगळे निकष असतील.

शेवटी आयुष्य तुमचे आहे आहे आणि मुलाबाळांचे आयुष्य तुमच्या आयुष्याशी बांधलेले आहे. जसे तुमचे माझे आणि सगळ्यांचे त्यांच्या त्यांच्या पालकांशी होते. त्यांनी त्याकाळात केलेले भारतातल्या भारतात केलेले स्थलांतर, खेड्यातून शहरात किंवा लहान शहरातून मोठ्या शहरात, त्यांच्या आयुष्यात प्रगतीच्या संधी, कंपॅरिटिव्हली सुखकर आयुष्य घेऊन आले. तसेच वाईट हवा, ताजा भाजीपाला, एकत्र कुटुंब, शेतीविषयक जीवनशैलीशी ताटातूट, सणवार प्रथांमध्ये काटछाट, कुटुंबाला एकत्र कमी वेळ असे काही दुष्परिणामही घेऊन आले असेलच. त्यांचे पाल्य म्हणून ते आपल्या वाटेलही आलेच. सध्याचे आयुष्य तुमचे आहे, मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला जसे जगायला आवडेल तसे त्याला जगता आले पाहिजे याला सक्षम बनवणे एवढेच आपले कर्तव्य, असे वाटते. त्यासाठी तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या संधींशी किंवा आवडीनिवडींशी 'त्यागाच्या' लेव्हलवर तडजोड करावी लागू नये असेही वाटते. भारतातली आणि इथली टोकाची यशस्वी आणि टोकाची अयशस्वी उदाहरणे ना घेता पहिले तर, इथे शिकणाऱ्या मुलांना बेटर ह्युमन बनवायचा शाळांचा प्रयत्न असतो असे वाटते. कचरा ना करणे वैगेरे क्लिशे उदाहरणांपुढे जाऊन एक उदाहरण घ्यायचे झाले तर collaboration over competition सारखे मूल्य मुलांमध्ये अधिक रुजलेले दिसते. अजानुकर्णाच्या प्रतिसादतल्या मुद्दा १ आणि ३ शी सहमत आहे.

फार छान विषय आणि त्यावरची चर्चा आहे सुरु. मी पण याच दोलायमान स्थिती मध्ये असते कधी कधी. म्हणजे मला माहिती आहे कि कायमस्वरूपी मी इथेच नाही राहू शकणार. पण मग किती वर्ष राहायचं हा एक प्रश्न असतो माझ्या साठी. तुझ्या प्रश्नाबद्दल माझे काही विचार : बऱ्याच जणांनी म्हणल आहे त्या प्रमाणेच मी म्हणेन कि फक्त मुलाच शिक्षण किंवा नवर्याच्या ऑफिस मधल वातावरण या गोष्टींचा विचार करून इथेच राहायचा निर्णय घेऊ नये. तुला आणि नवर्याला इथे कायम राहायला आवडेल का हा विचार महत्वाचा आहे. प्रत्येकाची प्रकृती आणि मानसिकता वेगळी असते. त्यामुळे एखाद्याला भारतात जास्त आवडेल कारण तिथे आपली माणसं, आपले सणवार, खाण पिण यात मन जास्त गुंतलं असेल. तर दुसर्याला या गोष्टींपेक्षा जास्त चांगल्या सोयी सुविधा, स्वतः साठी मिळणारा वेळ , मुलांसाठी आणि स्वतः साठी चांगल्या संधी यात जास्त रस असेल. जस इथे राहून तू मुलाला भारतीय संस्कृती बद्दल शिकवू शकतेस त्याचप्रकारे भारतात राहून मुलाला वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे, सार्वजनिक ठीकाणी वर्तन कसे असावे हे सगळ घरातल्या घरात पण शिकवू शकतेस च. भारतात राहून तो एक उत्तम नागरिक बनवायची जबाबदारी तू आणि तुझा नवरा मिळून पार पडू शकता. माझ्या मते (हे फक्त माझ्या पुरत मर्यादित आहे) मला ३-४ वर्ष इथे राहून परत भारतात जावस वाटतंय. याला माझी वैयक्तिक कारण पण आहेत. जस कि इथे मी माझी नोकरी बदलू नाही शकत (एल १ मुळे). त्या उलट पुण्यासारख्या ठिकाणी मी हव तिथे काम करू शकते (काही वर्षांनी ग्रीन कार्ड च्या इ.ए.डी. वर बदलू शकेन. पण तो पर्यंत बंधन आहेच) पण त्या व्यतिरिक्त कारण म्हणजे मी माझ्या नातेवाईकांशी जास्त अॅटॅच आहे. मला लग्न, मुंज, बारशी, डी जे या साऱ्यामध्ये खूप मजा येते. नातेवाईकांच घरी येण जाण, कधीही कोणालाही गरज पडली कि पटकन धावून जाणं आणि तेव्हढ्याच हक्काने त्यांना पण माझ्या मदतीला बोलावण. शेजारणी बरोबरचे माझे संबंध, कार्यक्रम, त्यांना पण हक्काने मदत मागण आणि मदत करण (लोक म्हणतील अमेरिकेत पण हेच करा सगळ. पण इथे शेजारणी कडे जायचं झाल तरी फोन करून मग जाते. आणि तेव्हढा हक्क जवळीक नाही जाणवत इथे. तुझ्या इथे जर्सी सिटी मधलं वातावरण बरच वेगळ असेल. पण जिथे भारतीय लोक खूप नाहीत तिथे राहाण थोड वेगळ आहे) माझे पालक जरी आज धडधाकट असले तरी उद्या कधी तरी वृद्धापकाळी जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी त्यांच्याजवळ असण माझ्या साठी गरजेच आहे. ते तिकडे बिछान्याला टेकलेत आणि मी माझ्या नोकरी मुळे त्यांच्याजवळ महिनाभराच्या वर जाऊन राहू शकणार नाहीये ही परिस्थिती मला फारच क्लेशदायक असेल. माझे वडील काही वर्षापूर्वी गेले तेव्हा नेमकी मी अमेरिकेला होते (दोन महिन्याच्या बिझिनेस टूर वर) आणि अगदी तातडीने विमान पकडून भारतात जाऊनही मी त्याचं शेवटच दर्शन नाही घेऊ शकले. या गोष्टीच शल्य आयुष्यभर वेळोवेळी मला त्रास देणार आहे. दुसरी भीती ही पण आहे कि माझी मुलगी अमेरिकन संस्कारात वाढायला लागली कि छोट्या छोट्या गोष्टींचे मला नक्कीच त्रास होतील. माझ्या शेजारची ७-८ वर्षाची मराठी मुलगी जेव्हा मी बघते तेव्हा ते जास्त जाणवत. तिला दसरा दिवाळी पेक्षा हेलोवीन आणि ख्रिसमस च महत्व, अपूर्वाई जास्त वाटते. एखाद्या वेळी पंजाबी ड्रेस घाल अस तिची आई म्हणाली कि ती फार चटकन तयार होत नाही. कोणी मोठ्ठ घरी आल कि आपण जसे चटकन त्यांच्या पाया पडायचो तसे या मुलीला तिच्या आईने वेळोवेळी सांगूनही वाटत नाही किंवा करायला सांगितला नमस्कार तर ती थोडे आढेवेढेच घेत कसतरी मान्य करते. कायमस्वरूपी इथे राहायचं ठरवल्यावर जर उद्या माझ्या मुलीने एखादा गोरा किंवा निग्रो कोणाशीही लग्न करायचं म्हणल किंवा तसच राहायचं म्हणल तरी ते मी मान्य करेनही पण त्यात काही तरी मनासारख झाल नसल्याची भावना असेलच. तू म्हणतेस तस देशप्रेम वगैरे तर फार दूरचीच गोष्ट आहे. पण जर इथे राहून खरच तुमच मन रमलं असेल आणि वरच्या सगळ्या गोष्टी फारश्या महत्वाच्या नसतील तर नक्कीच इथेच राहण्याचा निर्णय योग्य राहील.

In reply to by सही रे सई

निग्रो
हा शब्द अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या भावना दुखावणारा आहे. कृपया अमेरिकेत पब्लिकमध्ये हा शब्द वापरू नका.

In reply to by अनरँडम

अर्थात.. पब्लिक मध्ये नाहीच वापरत. पण भारतात आपण हाच शब्द वापरतो म्हणून इथे वापरला आहे. तरी हरकत असेल तर सा. सं., तो शब्द काढून टाका किंवा बदला अशी विनंती. कोणालाही दुखावयाच्च्या हेतूने तो लिहिला नाही . सहज ओघात लिहिताना वापरला गेला आहे.

In reply to by सही रे सई

विठोबा आणि रखुमाई कृष्णवर्णीयांना विठोबा आणि रखुमाई म्हणा, कोणाला काही कळत तर नाहीच परंतु ईश्वर नामाचे पुण्य देखील गाठीस लागते.

इमिग्रेशनचा मुद्दा आता अगदी ठळक झाला आहे. कारण की अमेरिकेत भारतातून येणार लोकांचा प्रचंड रेटा. त्यामुळे ग्रीन कार्ड मिळण्यासाठी लागलेली भली मोठी रांग या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. सध्या देशागणिक प्रति वर्षी फक्त ७% टक्के लोकांना ग्रीन कार्ड मिळत आहेत. ही परिस्थिती इमिग्रेशन रिफॉर्म झाल्याशिवाय बदलणार नाही. इमिग्रेशनसाठी इतर देशांमध्ये कदाचित इतकी अवघड परिस्थिती नसावी. मी अमेरिकेत आयटीत सुमारे ५ वर्ष काम केले आहे. शिवाय मध्यंतरी परत भारतात जाऊन १ वर्ष काम केले आहे.भारतात परत गेल्यावर आयटीत काम करणे खूप त्रासदायक वाटते. इथेही शक्यतो भारतीय मूळ असलेले वरिष्ठ टाळावेत असे वाटत राहते.जे अवघड आहे कारण आयटी मध्ये काम करणार्‍या अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या जास्त आहे. शिवाय खूप जास्त विचार केला की प्रश्न जास्त जटिल होतात.

सई शी बर्‍याच अंशी सहमत ( मुलांचं लग्न हा विषय सोडून) माझ्या मामेभावाने , जो आमच्यासारखाच इथेच वाढला, एका स्कॉटीश - अमेरिकन मुलीशी लग्न केलंय. माझ्या एक दोन कलिग्ज्स पण भारतात वाढल्या, नोकरी केली आणि ब्रिटीश लोकांशी लग्न केलं म्हणुन नंतर लंडन ला स्थायिक झाल्या आहेत. या तिघांनी ज्यांच्याशी लग्नं केली म्हणजे स्कॉटीश मुलगी आणि ब्रिटीश मुलं, ती आपापल्या संस्कृतीत आपापल्या आईवडीलांबरोबर वाढली तरी परदेशी नवरा/ बायको निवडला. आता त्यांच्या आईबाबांच्या अँगल ने पण पाहा. त्यामुळे या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत. त्यात आतापासून डोकं शिणवण्यात काही अर्थ नाही. आणि मी आधीच म्हणलं त्याप्रमाणे कुठल्याही फॅमिलीमध्ये लोकांशी वाईट वागा, जोडीदाराशी प्रामाणिक राहू नका वगैरे सांगत नाहीत. कॅनडामध्ये अमेरिकेपेक्षा कौटुंबिक व्यवस्था जास्त मजबूत आहे म्हणुन असेल पण मला आजुबाजुची कुटुंबं, नवरा बायको , लिव्ह इन पार्टनर्स आमच्यासारखेच दिसतात. उन्नीस बीस चा फरक. एक बाप मुलीच्या जुनिअर प्रॉमला निघाला होता, सुपरव्हाईज्ड प्रॉम होता, पालकांना निमंत्रण होतं पण त्याच्या मुलीचा बॉ फे येणार म्हणुन जरा धास्तावला होता. आपल्याकडच्या सर्वसामान्य वडीलांसारखाच ! फक्त इथल्या समाजात हे सकारात्मक स्विकारण्याइतका प्रगल्भपणा आहे, तो आपल्याकडे अजुन हळु हळु विकसित होतोय. अशा बर्‍याच गोष्टी आपल्याकडे परस्पर निभतात कारण सोशल स्टिगमा खुप आहे. त्यामुळे त्या गोष्टींना सामोरं जाण्याची वेळच येत नाही आपल्यावर. पण, इथे ती वेळ आली तर होणारा त्रास, वाटणारी काळजी सगळं सारखंच असतं फक्त सोशल स्टिग्मा नसतो. व्हायचा त्रास कुणालाच चुकत नाही. माणसासारखी माणसं सगळीकडे असतात. आपली संस्कृती किती चांगली आहे किंवा आहे की नाही पेक्षा ही मला हा मुद्दा महत्त्चाचा वाटतो. हे एकदा डोक्यात बसवलं की मग अनोळखी किंवा परकीय संस्कृतीची निदान भीती तरी वाटत नाही. इथे माझ्या ओळखीत, अगदी वर म्हणलं तस जवळच्या नात्यात मिक्स्ड रेस लग्नं आहेत आणि खुश आहेत सगळे. मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती म्हणा, रिती रिवाज म्हणा अगदी जेवण म्हणा मुळातच रंगीबेरंगी, व्हायब्रंट आहे, सगळ्या गोष्टी साजर्‍या करायचा आपला मुळ स्वभाव आहे - इथे ते चटकन उठुन दिसतं आणि अशा लग्नांमध्ये भारतीय पद्धती अगदी कौतुकाने स्विकारतात, नव्हे त्यांना त्या जास्त आवडतात. एक मुद्दा वर जो मांडलाय आजानुकर्ण यांनी - तरुण भारताचा, तो मला अगदी मनापासून पटतो. खरं तर २ महिन्यांपूर्वी मी भारतात जाऊन आल्यापासून मला जाणवतोय, त्यांनी तो अगदी नेमका पकडलाय. सध्या भारतात खुप मजा मजा चालू आहेत. गोष्टी फटाफट बदलतायेत, नव-नवीन गोष्टींचा सतत ओघ चालू आहे, सुधारणा होण्यास भरपूर वाव असल्याने आणि सध्या कमावता वर्ग तरुण असल्याने नवलाईच्या गोष्टी येत राहतात आणि लवकर प्रचलित पण होतात. विकसित देशांमध्ये हे अगदी उलट चित्र आहे. इथे गरजेच्या म्हणजे "मस्ट हॅव" वर्गातल्या सगळ्या गोष्टी आधीपासून्च आहेत. त्यामुळे इथुन पुढच्या प्रत्येक गोष्टीला " नाईस टु हॅव" ला जो प्राधान्यक्रम मिळतो तोच मिळणार. शिवाय कमावता वर्ग हा आता ४०शी च्या पुढचा आहे, याच वर्गाला नवीन गोष्टी परवडतील अशा असतात पण तो वयाने मोठा असल्याने त्या गोष्टी लगेच उचलण्याइतकी गरज किंवा ओपननेस दोन्ही कमी असतं. भारतात मात्र जीवन वाहतं राहतं - अगदी दैनंदीन जीवन पण काही तरी नवीन गोष्टी ऑफर करू शकतं. आणि कुणी सांगावं , आज आपण म्हणतोय मुलांसाठी परदेश बरा, २५ वर्षांनंतर तेच इथे नोकर्‍या - व्यवसाय करायला आले, संधी जास्त आहेत म्हणुन, तर काय घ्या. टाईड कॅन चेन्ज ईदर वे ! प्रत्येकाचे आपापले प्राधान्यक्रम हा एक मुद्दा आहेच. कौटुंबिक स्थिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यात आता असलेली सांपत्तिक स्थिती पासून ते आईवडिलांच्या तब्येती सगळं येतं. पण इथे समजा सगळं जुळून आलं आणि राहायचं ठरलं तर इथली जीवनशैली जुळवून घेणं किंवा ती मनापासून आवडणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात एखाद्या पार्क मध्ये जाऊन कुटुंबाने बार्बेक्यु करण्यापासून ते दैनंदिन जीवनात प्रचंड अ‍ॅक्टीव राहणं, हे सगळं इथे राहताना मनापासून आवडयला हवं. जायचं की राहायचं पेक्षा ही राहयचं ठरवल्यावर काय आणि जायचं झालं तर वर नोकरी मधल्या वातावरणासारख्या टाळता न येणार्‍या गोष्टींचं काय हे समजायला हवं. पैकी नोकरीच्या जागी कामाचं सुख मिळणे ही एक च गोष्ट माझ्यासाठी सध्या अन-नोन व्हेरीएबल आहे. त्याचं काय होतंय ते ऐन वेळीच कळेल.

In reply to by स्रुजा

लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही आपल्या हातातच नाही. काय होईल ते होवो. पण परकीय संस्कॄतीची भीती वाटते हे खरंय. माझ्या मैत्रिणीने अमेरिकन मुलाशी लग्न केलं तर मला तब्बल १ वर्षभर वाटायचं की त्यांच्यात लवकर डिव्होर्स होतात, हीच कसं होईल!?! पण काही नाही, उत्तम चाललं आहे. राहता राहिलं नोकरीच्या जागी सुख! हा मुद्दा मात्र फिरुन फिरुन अमेरिकेच्याच बाजुने येतो. बाकी सगळ्यात भारतात उत्तम पर्याय आहेत. पण नोकरीत डोक्याला असणारी शांतता आणि घरच्यांना देता येणारा वेळ हे दोन ठसठशीत मुद्दे इथे दिसतात. इथेच माझ्या विचारांचं घोडंही अडलंय.

In reply to by पिलीयन रायडर

अमेरिकेत नोकरीच्या जागी सुख हे इतकं सरसकटीकरण करता येणार नाही. २००८-२००९ च्या मंदीनंतर अमेरिकेतली परिस्थिती बरीच बदलली आहे. कामाचे प्रेशर अनेकदा भारतात असते तितकेच असते. बे-एरियातले माझे दोन मित्र रोज रात्री आठ-साडेआठपर्यंत ऑफिसात असतात. मागच्याच वर्षी अॅमेझॉनच्या वर्ककल्चरची धुणी पब्लिकमध्ये धुतली होती https://www.nytimes.com/2015/08/16/technology/inside-amazon-wrestling-b… भारतात निदान सकाळी चहानाष्ट्याचा तासभर ब्रेक, लंचचा तासभर ब्रेक, दुपारी गप्पाटप्पा आणि स्नॅक्स, अधूनमधून सुट्टा ब्रेक असं निवांत चालतं. इथं तसं करता येत नाही. नवराबायको दोघेही काम करणारे असतील तर घरातील कामासकट सगळंच अंगावर पडतं. भारतात निदान मोलकरीण वगैरे पर्याय उपलब्ध आहेत.

बऱ्याच लोकांनी बरीच मते दिली आहेत.. काहींनी चांगला विचार करून मुद्दे दिलेत पण काहींच्या मुद्द्यात भारतात सगळे खराबच आहे जणू असा रोख वाटला... ज्याचे त्याचे मत शेवटी! भारतात शिक्षण पद्धत खूप खराब आहे म्हणावं तर याच पद्धतीत शिकलेले लोकच आत्ता चांगल्या हुद्द्यांवर आणि उत्तम आर्थिक परिस्थितीत देखील आहेत. राहिला विषय खेळांचा तर मला वाटत भारतात लोकांना पहिल्यांदा आर्थिक दृष्ट्या स्थैर्य असणे महत्वाचे वाटते (त्यामुळेच आपल्याकडे सेविंग करण्याचे प्रमाणही पुष्कळ आहे मध्यमवर्गीयात) त्यामुळे अभ्यास करून मुले स्थिरस्थावर व्हावीत हा सगळ्यांचा खटाटोप असतो. जर कुटुंब उत्तम आर्थिक परिस्थितीत असेल तर बहुधा मुलांना खेळ वगैरे वर लक्ष देण्याचं स्वातंत्र्य मिळते... पण हा तरीही एक जनरल मुद्दा झाला! अनेक प्रकारच्या शाळा अनेक शहरात मिळतील भारतात, पण मग मुलांच्या शिक्षणासाठी शहरे बदलणार तरी किती ना.. कुठे राहावे, हा प्रश्न जितका जास्त विचार करू तितका कठीण होत जातो असं मला वाटत.. मी जर्मनीमध्ये असताना तिथे सेटल होण्याचा ऑप्शन होता अजूनही आहे. तसा चांगला देश आहे खूप गर्दी नाही शिस्त वगैरे सगळं नीटनेटकं! पण मला तिथे स्वतंत्र वाटत नाही. सतत हे जाणवत राहत कि आपण इथले नाही. न्यूनगंड वगैरे नाही हा! तिकडचे काही लोक चांगले ओळखीचे झाले, बराच फिरलो पण... तरीही मनातून ती भावना जात नाही. मग उगाच चांगली लाईफ स्टाईल असावी म्हणून तिकडे राहावे वाटत नाही. इथे भ्रष्टाचार आहे, धूळ आहे, गर्दी आहे पण म्हणून मला तरी देश सोडून बाहेर जावे आणि मग माझ्या देशाची आठवण काढत बसावी हे पटत नाही. बहुतांश लोक देश सोडत नाहीत तर शहर सोडतात असे मला वाटत... आपल्यापैकी किती लोक "भारत" फिरून इकडे तिकडे नोकरीसाठी राहतात? मी स्वतः आत्ता बंगलोर मध्ये राहतोय ३-४ वर्ष झाली. भाषा, खाणे पिणे याची संस्कृती इथेही वेगळी आहे. फक्त हे भारतात आहे. तरीही कधी कधी वाटत सेटल कुठं व्हायचं? पण जोपर्यंत इथून निघायची इच्छा होत नाही तोपर्यंत राहावं म्हणतोय इकडेच... :) तुम्ही पण बघा तुम्हाला नक्की 'वाटतंय' काय ते... बाकी फेसबुक वगैरे वर देशाचा झेंडा ठेऊन आय लव्ह माय इंडिया लिहून US मध्ये ३-३ वर्ष राहणारे आणि भांडून भांडून स्टे वाढवून घेणारे लोक पण पाहिले आहेतच. जर खरंच देशप्रेम वगैरे असेल तर मग इथे राहून आपल्याला शक्य असणाऱ्या गोष्टी कराव्यात माणसाने! भारतात अगदीच राहणे शक्य नाही इतकीही काही खराब परिस्थिती नाहीये... चांगल्या राहणीमानासाठी बाहेर राहून आम्ही परकीय गंगाजळी भारतात पाठवतो म्हणून भारताचा फायदा आहे असे सांगून समाधान करून घेण्यापेक्षा जर खरंच "देशप्रेम" असेल तर इथेच राहून छोट्या छोट्या गोष्टी तरी कराव्यात असे मला वाटते. हि माझी वैयक्तिक मते आहेत पटली पाहिजेत असे काही नाही! :) मुद्देसूद लिहायला जमले नाही जसे सुचले तसे लिहलंय... यावर्षी ऊसगावाला जायची ऑफर आहे बघूया कसे आहे...

In reply to by शब्दबम्बाळ

माझ्या मनातले मांडले अगदी! दुबई मलेशियाच्या ऑफर सोडण्यामागे असाच विचार होता. मला नवीन ठिकाणी जाऊन नवीन लोकांशी जुळवून घेण्यात काही दिव्य वाटत नाही, मी जिथे जिथे राहिलोय, अकोला, मुंबई, ठाणे, वाशी, नाशिक, ग्रामीण पुणे अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं कल्चर आहे पण आपण वेगळे आहोत ही जाणीव नसते. अगदी कोलकाता, गुजरात, राजस्थान, भारताच्या कोणत्याही भागात फिरलं तरी माणसं आपली आहेत हे जाणवतं. संधींची उपलब्धता हे एक रडके कारण आहे असं वाटतं, अनेक आयआयटीयन्स लोकांनी इथेच साम्राज्ये उभी केलीत, अजून खूप स्कोप आहे. येत्या पंचवीस वर्षात खूप सकारात्मक बदल होणार आहेत भारतात, लायक व्यक्तींसाठी इथे संधींची कोणतीच कमतरता नाही. दोन चार वर्षे परदेशी जाऊन राहणे ठीकच, पण तीकडे राहून येऊन इकडच्या समस्यांचा पाढा वाचणे नै पटत. कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता कभी जमी तो कभी आसमाँ नही मिलता

In reply to by शब्दबम्बाळ

अगदी हेच लिहायला आलो होतो. पीरबाई , तुम्हाला अमेरिकेत राहायचे असेल तर उगाच त्याला मुलाच्या शिक्षणासाठी वगैरे कशाला बोलताय. तुम्ही मान्य करा ना मला इकडे आवडलाय म्हणून मी राहतिये, उगाच लंगडी कारण देऊ नका. ज्या शिक्षण पद्धतीवर तुम्ही टीका करताय त्याच पद्धतीतून लाखो लोक परदेशी गेलेत , मोठ्या पदावर पोचलेत, अगदी तुम्ही आणि तुमचे यजमानसुद्धा.

In reply to by अभिदेश

थोडं जास्त नाही का झालं हे? माझ्याविषयी धाग्यातल्या पन्नास ओळींपेक्षा जास्त माहिती नसताना ही अशी विधानं केलेली मला तरी आवडत नाहीत. तेव्हा वैयक्तिक न होता चर्चा करावी. बाकी तुमच्या शिक्षणाविषयीच्या विधानाला व्यवस्थित उत्तर आहे माझ्याकडे. पण मी ह्या टोन मध्ये दिलेल्या कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देत नसते.

In reply to by पिलीयन रायडर

कसं काय झालं ? आता तुम्ही मांडलेला विचार हा वैयक्तिकच आहे ना ? मग त्याला आलेलं उत्तर हे वैयक्तिक नको हे कसं काय?

In reply to by अभिदेश

तुम्ही कोण मला सांगणारे की माझी कारणं लंगडी आहेत? किंवा मला हे ऐकवणारे की मला इथे रहायचंय पण मी उगाच कारणं शोधत फिरतेय? मला कुणाची फिकीर आहे इथे की मी लंगडी कारणं शोधत फिरु? मी इथे मला अजिबात माहिती नसलेल्या लोकांचं अप्रुव्हल घ्यायला धागा काढलाय असं तुम्हाला वाटतंय का? मी माझ्या आयुष्यातला एक विचार मांडलाय. शिक्षण पद्धतीविषयी आणि भारतीय संस्कॄतीविषयी.. बास.. तुम्हाला इतकंच माहिती आहे ह्या प्रश्नाबद्दल. आणि मी सुद्धा तेवढीच चर्चा करतेय. ह्यावरुन मला हे ऐकवण्याचा संबंध काय की मी कारणं शोधत फिरतेय? आणि मी एक माझा प्रश्न मांडला तर मी हे ऐकुन घ्यावं? मी सुद्धा भारतातच शिकलेय आणि त्यात काय तृटी आहेत हे मला १००% माहिती आहे. तुम्ही ते सांगण्याची गरज मला वाटत नाही. हाच मुद्दा तुम्हाला सभ्य भाषेत मांडता आला असता. तर मी सुद्धा सभ्यपणे त्याचा प्रतिवाद केला असता. पण ज्या माणसाचे मत हे मुळात मी हे जे लिहीतेय ते खरं नाही, दिखावा आहे असं असेल, त्याला कोणतंही उत्तर देणं मी लागत नाही. तुम्ही विचारलं ना कसं झालं? तर हे असं झालं. (संपादित)

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिसादातला काही भाग संपादित करुन दिल्याबद्दल म्हात्रे काकांचे आभार!

In reply to by पिलीयन रायडर

मला जे म्हणायचे आहे , ते मांडणारे अनेक प्रतिसादांत आलेले असल्यामुळे पुन्हा तेच लिहीत नाही. मुद्दा हाच आहे कि अमेरिकेत राहायचे असेल तर राहा पण जस्टिफिकेशन नका देऊ. तूर्तास एवढेच.

अत्यंत उद्बोधक धागा आणि चर्चा. 'हे विश्वचि माझे घर' असे मानून कुठेही आनंदाने, बिनधास्त रहावे. आपल्या स्वतःच्या निर्णयाप्रमाणे आयुष्यातील सर्व घटना घडून येतात वा येणार आहेत, असे वाटत राहण्याचे वय वा स्थिती उलटून गेली, नियतीच्या योजनेप्रमाणे सर्व घडत असते याची स्वानुभवाने खात्री पटली, की मग तुम्ही कुठेही असलात तरी 'आनंदाचे डोही आनंद तरंग' .

1)वर बहुतेकांनी भारतातही अमेरिकेच्या तोडीचे किंवा चांगले शिक्षण मिळते असे लिहिले आहे. पण हे खरे नाही. 'चांगले शिक्षण' देणाऱ्या शाळा फार तुरळक आहेत. राहत्या घरापासूनच्या अंतराच्या दृष्टीने अशा शाळा सोयीस्कर नसतात. फारच थोड्या भाग्यवंतांना अशा 'चांगल्या' शाळा मिळू शकतात. 2) काही परदेशस्थांनी भारतातली परिस्थिती सुधारेल असा आशावाद व्यक्त केला आहे. एका स्तराची (आय टी वगैरे)आर्थिक परिस्थिती सुधारेलही कदाचित. पण सध्या विषमता इतकी टोकाची आहे की समृद्धीचे फायदे सार्वत्रिक दिसू लागायला अथवा तळागाळात झिरपायला कमीतकमी तीन पिढ्या जाव्या लागतील. तोपर्यंत दारिद्र्य, बकालपण आणि भणंग-गणंगांचा सुळसुळाट इथे ठायी ठायी दिसतच राहणार. ३)इथल्या सामाजिक जाणीवा प्रचंड मागासलेल्या आहेत. वर्कमनशिप अगदी तळाच्या पातळीवर आहे. स्वत: लक्ष्य दिले नाही तर कुठलेही मामुली कामसुद्धा सुघडपणे होणे कठीण. ४)भारतात याविषयी चिडचिड, संताप, असहायतेची भावना जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात खदखदत असते. इथे राहाण्यातल्या असंतुष्टतेचे कारण प्रामुख्याने हेच असते. आणि इतर कोणतेही 'कलरफुल' सोहळे, नातेवाईकांचा गोतावळा, लग्न-मुंजी, ढोल, ताशे, उत्सव, आवाज ही ठसठस दूर करू शकत नाहीत. अर्थात 'आपुलकी' ही भावना या सर्वांहून वेगळी आणि वरचढ असते. निर्णयावर या भावनेचा अधिक पगडा असणे साहजिक आहे.

वाचतोय. उगाचच मनाला लावून न घेता प्राप्त परिस्थितीचा उत्तम उपयोग करावा अशा मताचा मी आहे. जीवन जगताना आणि इतिहास शिकताना अस्मिता बाजूला ठेवावी लागते.

तुम्हाला जर मनातून वाटत असेल की तिथेच रहावं (शिर्षक वाचून तसं वाटलं) तर निर्णय घेऊन टाका. ह्या बाबतीत गविंच्या मताशी सहमत - बिंधास्त रहा आणि एंजॉय करा. इतर कुठलंही जस्टिफिकेशन शोधायची गरज नाही.

जर मुलासाठीच निर्णय घ्यायचा असेल तर त्यालाच विचारा कि त्याला काय आवडतंय , इथे राहणे कि भारतात जाऊन राहणे. :) अमेरिकेतली शिक्षणपद्धती ही भारतातल्यापेक्षा कैक पटींनी चांगली आहे हा मुद्दाच आपल्याला पटत नसल्याने त्या मुद्द्यावर पास.

परदेशात कधीही न गेलेला असलो ( आणि जाण्याची शक्यता हि दिसत नाही ) तरीही लिहितोय . तुम्हाला वागण्या बोलण्यातील फरक जाणवतो असं म्हणताय . पण तो फक्त पुणे आणि अमेरिकेत आहे का ? तुम्ही आणि तुमचे आई वडिल तुमच्या वयात असताना किंवा लहानपणी च्या वागण्यात फरक नाहीये का ? आज मी बिनधास्त माझ्या आई वडिलांना त्यांच्या पूर्ण आदर राखून हे म्हणू शकतो . कि बाबा तुम्ही बोलताय ते चूक आहे, हे असं नसतं. ते त्यांच्या लहानपणी त्यांनी आपल्या पालकांना म्हणणं अशक्य होतं . किती मोठी चूक असली . तरी फक्त ते "मोठे आहेत" या कारणा साठी गप्प बसावं लागत होतं माझ्या आधीच्या पिढीला . हा फरक नाहीये का ? बाकी . पुस्तकी घोकंपट्टी पेक्षा , दगड आणि फुलं बघायचं शिकतोय हि माझ्यासाठी तरी खूप चांगली गोष्ट आहे. आणि "आपले संस्कार " म्हणालात . तर मग त्याच्यासाठी घरी आहातच तुम्ही पालक म्हणून . बाहेर तिथल्या गोष्टी शिकेल , घरी आल्यावर तुम्हा दोघांकडून भारतातल्या सारख्या गोष्टी शिकेल . त्या कश्या सांगायच्या ते तुम्हीच ठरवाल . जेणेकरून त्याला त्याचा भार वाटणार नाही.. उलट दोन्ही कडे चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतो हा फायदा मिळेल

अमेरीकेतली नोकरी भारतातल्या नोकरीपेक्षा चांगली असते. (बॉसींग वगैरे वगैरे ). तिकडचा कोणी मराठी उद्योजक वगैरे नाही का मिपावर ? धंदा करण्यासाठी भारतापेक्षा चांगली परिस्थिती आहे काय ? इझ ऑफ डुईंग बिजनेस ? भारतापेक्षा जास्त नफा कमविण्याच्या संधी ? बहुतेक अमेरीका रिटर्न गुजराती / पंजाबी यांच्याकडूनच माहिती घ्यावी लागणार. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी नोकरीच्याच दृष्टीकोनातून आयुष्याकडे बघतो काय ?

In reply to by धर्मराजमुटके

मराठी माणसाचं इन जनरल माहिती नाही, पण मला स्वतःला कैकदा वाटलंय की कुठेही स्वतःचा काही व्यवसाय करावा. पण माझ्यात ती धडाडी नाही. जो व्यवसाय करायचा आहे निव्वळ तेवढेच स्किल्स असून फायदा नाही तर अर्थशास्त्रही समजायला हवं. मला एकंदरितच फायदा-तोटा, पैसा खेळवणे, वाढवणे, फिरवणे इ कोणत्याही गोष्टीत गतिच नाहीये. म्हणून माझे विचार नोकरी पर्यंतच. पण तुमचा मुद्दा रास्त आहे. मला स्वतःला तरी कल्पना नाही इथेल्या मराठी उद्योजकांबद्दल. खरंच शोधायला हवं.

In reply to by पिलीयन रायडर

स्वतःचा स्टार्टअप असणार्‍यांना उद्योजक म्हणू शकतो का? मिपाकर नाटक्या यांनी रंगमंचबद्दलच्या मुलाखतीत सांगितलंय ना ते. बे एरियामध्ये माझे कित्येक जण ओळखीतले आहेत - मराठी लोक आहेत - स्वतःची कंपनी सुरु करणारे- अगदीच एकटे नाही केली तर २-३ जणांत मिळून करतात. त्या सर्वांना मिपावर यायला वेळ मिळत नसावा कदाचित. बाकी चर्चा खूप उपयुक्त आहे. मला काही नवीन मुद्दे मिळाले तर लिहीन.

In reply to by रुपी

प्रतिसाद लिहीताना माझ्या डोक्यात अगदी तेच आले होते. पण मला नक्की कल्पना नाहीये त्यांच्या स्टार्टप बद्दल म्हणून लिहीलं नाही. २-३ जणांचा मिळून आहे इतकंच माहिती आहे.

मी मिपाची नवीन सदस्य... ही चर्चा वाचली आणि खूप आवडली...तुमच्यासारखंच भारतात परत जायचं की अमेरिकेत राहायचं, ही चर्चा आमच्या घरातही नित्यनेमाने घडते, पण फरक इतकाच की अजून मुले, शिक्षण या दिशेने विचार करायची गरज पडत नाहीये. एच १ विसा आणि इमिग्रेशन रीफोर्म यावर सतत चालणाऱ्या चर्चा ऐकून आम्ही दोघेही आता विसा संपला की परत जायचं या विचारापर्यंत आलो आहोत. प्रत्यक्ष कृतीत आणायला अजून वेळ आहे. पण काहीही झालं तरी हा परका देश आहे आणि अगदी कायम रहिवासी स्टेटस मिळालं तरी आपल्या देशात राहिल्याचं फिलिंग येईल असं वाटत नाही आणि तोपर्यंत एक अनिश्चितता सतत वाटत राहील. आपली मुळे एका मातीतून काढून दुसऱ्यात रुजवणं इतकं सोपं नसतं. इथे सगळ्या सोयी-सुविधा असल्या तरी आपलं असं काही वाटत नाही. आम्ही दोघेही माणसांमध्ये रमणारे आहोत त्यामुळे एकटेपणा जाणवतोच. इथेही मित्रपरिवार आहे, पण भारतात संबंधांमध्ये जी सहजता आणि मोकळीक असते, ती इथे जाणवत नाही. घरी आणि मराठी मंडळात सगळे सण साजरे होतात पण आपली नाती इथे नसल्यामुळे काहीतरी उणीव भासतच असते. मराठी मंडळात मी बरीच मुले बघते ज्यांचे आईवडील आपल्या संस्कृतीबद्दल मुलांना आपलेपणा वाटावा म्हणून प्रयत्नशील आणि आग्रही आहेत; प्रत्यक्षात मात्र मुलांना त्यात फारसा रस नसतो. ते तेवढ्यापुरतं काहीतरी करतात, पण ज्या गावाला जायचंच नाही, त्याचा पत्ता कशाला विचारा, असा गोंधळ त्यांचाही कधीतरी होतच असणार... अशी पण काही घरं आहेत, जिथे मुले कॉलेजमध्ये आहेत, इतके वर्षं इथे राहिल्याने त्यांच्यावर इथल्या विचारसरणीचा प्रभाव जास्त आहे, खूप प्रक्टिकल आहेत. त्यांच्याशी जुळवून घेताना भारतीय मनाच्या आईबापांना थोडा त्रास होतोय. पण परत जावं म्हटलं तर आता मुले भारतात जुळवून घेऊ शकणार नाहीत. स्वत: जायचं तर आईवडीलाना गरज असताना वेळ देऊ शकलो नाही आणि आता मुलांच्या गरजेच्या वेळेस त्यांना कसं सोडून जावं, अशा मन:स्थितीत आहेत. थोडक्यात, प्रत्येक टप्प्यावरच्या भारतात वाढलेल्या पती-पत्नींना प्रश्न थोड्याफार प्रमाणात सारखेच पडले आहेत. शिक्षणाचं म्हणलं तर इथलं निश्चित थोडं सरस आहे, पण भारतातली मुलंही प्रगती करतातच...कोणाशी कसं वागायचं, बोलायचं ते आपल्या अनुकरणातून शिकतच असतात. भारतातली परिस्थितीही बदलतेय. तुलना दोन्ही देशांची होऊच शकत नाही कारण त्यासाठी काहीतरी कॉमन ग्राउंड पाहिजे, दोन्ही देश सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या फारच वेगळे आहेत. सतत इमिग्रेशन रिलेटेड प्रश्न, अनिश्चितता, भिन्न संस्कृतींचा गोंधळ आणि आपली माणसं सोबत नसणं या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता तरी २ वर्षांनी परत जायचं, हे ठरलंय...सध्या इथलं लाईफ एन्जॉय करतेय...पुढे काय होईल ते पुढचं पुढे बघूया...

In reply to by Snow White

कोणताही अ‍ॅटीट्यूड न ठेवता अगदी मनापासून लिहिलेला प्रतिसाद आवडला. -दिलीप बिरुटे

पिलियन रायडरजींना व्यनितून लिहिली होती पण त्यांनी सांगितले म्हणून चर्चेत जोडत आहे... जिथे कुठे असाल तिथे आपली मूल्ये टिकविण्याचा व संक्रमित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चित करावा. "आपली संस्कृती" याचा अगदी सखोल विचार होऊ दे. पूजा पद्धती, उपास-तापास, सण-उत्सव हे सगळे त्याचा भाग आहेत पण अगदीच वरवर, ते सतत बदलतच आले आहेत आणि राहणार आहेत. त्या पलीकडे भारतीयत्व कशात आहे असा शोध घेतला तर ते जिथे असाल तिथे ते जपण्यास भक्कम हिम्मत येईल. भारतात ते शोधणे नाही साधले तरी जपणे सहज होते कारण समाजाचे-नात्यांचे जाड आवरण नेहमी भोवती असते. इथे ती उब आपल्याला एक एक माणूस जोडून तयार करून घ्यावी लागते. खऱ्या नात्याची भरपाई करू शकेल अशी नाती इथे निर्माण करून मुलांना तो जिव्हाळा उपलब्ध करून देणे हे आपल्या पिढीचं दायित्व आहे. त्यानुसार आपल्या विचारात व वर्तनात खूप बदल करावा लागेल हे लक्षात येईल. शुद्ध आणि सात्विक प्रेम निर्माण होणे व त्यानुसार वर्तन घडणे झाले कि बऱ्याच गोष्टी परदेशात असूनही सोप्या होतात व तेव्हा "वसुधैव कुटुंबकम् जगणारी संस्कृती" काय आहे हे समजण्याचा प्रवास कदाचित सुरु होतो... भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ वगैरे तुलनाच का व्हावी हा प्रश्न पडतो. आई चे स्थान हे अढळ असते. ती दुसऱ्याच्या आईपेक्षा सुंदर आहे का श्रीमंत आहे हे सर्व अर्थहीन आहे असे मला वाटते. असो... चर्चेचा परीघ थोडा रुंदावला तर अजून काही गोष्टींकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहू शकतो. थोड्या पलीकडल्या काळात स्थलांतरित झालेल्या भारतीयांची आजची पिढी कशी आहे हे पहिले तर ४-५ पिढयांपूर्वी स्थलांतरित झालेले भारतीय (फिजी, त्रिनिदाद, सुरिनाम - त्यातले काही आपल्याप्रमाणे तिथून अमेरिकेत आले त्यामुळे अधिक माहिती मिळू शकते आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये उत्तरेकडे त्यांची संख्या बरीच आहे) २-३ पिढ्यांपूर्वी संधीच्या शोधात स्थलांतरित झालेले भारतीय (इथे यातले भरपूर आहेत, तसेच इंग्लंड दुबई सिंगापुरातही बरेच असतील) आणि पहिल्या पिढीचे स्थलांतरित झालेले आपल्यासारखे , यात काय काय फरक आहेत हे संधी मिळाली तर जरूर पहा. त्यांचे आजचे वंशज कसे आहेत हे हि पहा. फार काही शिकावयास मिळू शकेल... तुमच्या तिथे भरपूर आहे अशांची लोकसंख्या. त्यांची भारत हि ना जन्मभूमी ना कर्मभूमी, पण धर्मभूमी जरूर आहे... हि नाळ जागरूक राहून जपली पाहिजे (अर्थात त्याचे महत्व असेल तर) आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..." पण त्याविरुद्ध भारतीय म्हणून आपल्याला "मेल्टिंग पॉट" पेक्षा "टॅको-सॅलड" प्रकारची संस्कृती हवी आहे, म्हणजेच, सर्व जण एकत्र राहू पण आपापले रंग, चव, गंध याचे वेगळेपण जपून राहू. मार्गदर्शनाचा अधिकारी मी नाही, कदाचित मी लहानच असेन आपल्यापेक्षा. पण येथील काही द्रष्ट्या संस्था-व्यक्तींच्या कार्याने प्रभावित होऊन काही सांगावेसे वाटले ते हे... कुठे राहतो याला आजच्या युगात खरेच काही महत्व नाही... अमेरिकेला आणि भारतालाही ढीगभर नावं ठेवायला काही कष्ट लागणार नाहीयेत.. त्यानी कोरडे समर्थन होईलही कदाचित, पण खरा प्रश्न अमेरिकेत आत्ता आहोत, व पुढे राहिलो तर आपले एक भारतीय म्हणून सामाजिक दायित्व काय आहे हे ओळखून तसे होण्याचा प्रयत्न ठेवणे व आपल्या परीने मुले तशी घडविणे हा नक्की आहे. आणि तो भारतात व बाहेर दोन्हीकडे सारखाच चॅलेंजिंग आहे. (आणि त्यासाठी "एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे...)

In reply to by समर्पक

वाह, काय विचार आहेत या विषयावर. खूप भावले. या धाग्यासाठी धागाकर्तीचे अन एकाहून एक प्रतिसादांसाठी सर्व प्रतिसादकांचे आभार. मी अमेरिकेत येऊन अनेक वर्षे लोटली. माझ्यासाठी शांतता, (बर्‍यापैकी) शुद्ध हवा, ट्रॅफिकमध्ये रोजचा अमुल्य वेळ न जाऊ देणे असे घटक जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. या कारणांमुळे इथे राहू लागल्यावर मी माझ्यातर्फे येथे स्थायिक होण्याचा निर्णय नैसर्गिक होते. आता अमेरिकन प्रशासनाने धोरण बदलल्यास अथवा माझ्या बाबतीत नकार दिल्यास माझ्या स्वतःच्या निर्णयाला काहीच अर्थ राहणार नाही ही गोष्ट वेगळी :-). एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते. बहुतांश वेळी आपण परिस्थितीशी जुळवून घेत असतो. जुजबी विचार करुन निर्णय घ्यावा व भविष्यात जे घडेल त्याचा सामना करण्याची तयारी ठेवावी हेच उत्तम.

In reply to by समर्पक

हा एक नितांत सुंदर व्यनि प्रतिसाद म्हणुन इथे दिल्याबद्दल आभारी आहे!

In reply to by समर्पक

आणि हि जागरूकता नसेल तर माझ्या एका अमेरिकन मित्राचे वाक्य जसेच्या तसे भाषांतरित : "अरे असाल तुम्ही पी. आय. ओ. आज, आणि बाळगता भारतीयत्वाच्या खुणा, पण लिहून घे, आज पासून जास्तीत जास्त तिसरी पिढी... त्याच्या आधीच हे सर्व स्वतःच्या हाताने पुसून टाकाल... कारण तो ताण सहन होणार नाही. हा मेल्टिंग पॉट आहे आणि येथे आज ना उद्या सर्व इंटिग्रेट होणारच..."
एका समाजशास्त्रज्ञाने लिहिलेल्या लेखात मी हेच वाचले होते. स्थलांतरितांची पहिली पिढी आपली मूळ संस्कृती जास्तीत जास्त ६०% टिकवून धरू शकते. दुसरी पिढी जेमतेम १०% मूळ संस्कृती टिकवू शकते. तिसर्‍या पिढीपासून हे प्रमाण जवळपास शून्य होते म्हणजेच तिसरी पिढी ही सर्वार्थाने नवीन देशाच्या संस्कृतीशी एकरूप झालेली असते. अमेरिकेत माझ्या ओळखीचा एक ज्यू होता. त्याचे मूळ रशिया होते. सर्वात पहिल्यांदा त्याचा पणजोबा अमेरिकेत आला होता. हा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी. तो आयुष्यात कधीही रशियाला गेलेला नाही व कधी जाण्याची इच्छा देखील नाही. आपले मूळ काय होते हे शोधण्याची, समजून घेण्याची त्याला कणभरही उत्सुकता नव्हती. तो सिनेगॉगमध्ये सुद्धा कधी जात नव्हता. असाच दुसरा एक रूमेनियन होता. तो देखील तिसर्‍या किंवा चौथ्या पिढीचा प्रतिनिधी होता. तू कधी रूमेनियाला गेला होतास का असे विचारल्यावर तो कुत्सित हसून म्हणाला कशाकरता मी जाऊ तिथे? माझा रूमेनियाचा काय संबंध? कोणी कितीही प्रयत्न केले तरी पुढच्या पिढीत आपली मूळ संस्कृती रुजवून टिकवून ठेवणे जवळपास अशक्य आहे.

In reply to by समर्पक

अप्रतिम प्रतिसाद आहे ! हॅट्स ऑफ .. !!!
"एक भारतीय म्हणून..." असे जेव्हा उल्लेखतो तेव्हा "पासपोर्ट सरेंडर केल्यानंतरही जे जात नाही ते" - 'भारतीयत्व' नेमके काय आहे याचा शोध घेत राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे व तो प्रवास आपल्याला सतत नवे शिकवत राहणार आहे.
याचा विचार खरंच करायला हवा. प्रयत्न करुन ही अजुन हे पकडीत सापडलेलं नाही. सापडलं म्हणता म्हणता निसटुन जातं. कुठे एका ठिकाणी राहणं किंवा एकिकडे च राहणं हे आजच्या काळात शक्य नाही - निदान विकसनशील देशांत आणि त्या ही तुम्ही भारतीय असाल तर मुळीच नाही. अशा वेळी हे " भारतीयत्व" काय हे मनाशी पक्कं बिंबवून घेऊन जगभर फिरणं सोपं होईल पण ते काय हे मात्र सुस्पष्ट व्हायला हवं. तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर अजुन एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट - जी वर स्नेहा ताईने पण अधोरेखित केली - ती म्हणजे हा निर्णय घेण्याचा चॉईस आहे आज आपल्याकडे ! भारतीय म्हणुन आपल्याला या बाबतीत कृतज्ञता वाटायला हवी. आज सिरियन्स कडे बघा, इराकी लोकांकडे बघा - बिचार्‍यांनी त्यांचं घरदार , देश, मुळं सोडली की हयातीत परत तिकडे जाण्याचा पर्याय त्यांना नाहीये. निदान कायमचं जाण्याचा तर नाहीच नाही. काही जणांची माणसं पण तिकडे आहेत. माझा ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर एक गणिताचा प्राध्यापक होता इराक मध्ये. सगळं सोडून इकडे आला, पिझा प्लेस मध्ये काम केलं अजुन काही केलं आणि फायनली ड्रायव्हिंग शिकवायला लागला. तो ही एकदा जुन्या आठवणींनी हळवा झाला होता, तुम्ही लोकं लकी आहात म्हणे आधीच ईंग्रजी शिकुन येता, चांगल्या पगाराचे जॉब्ज मिळवता, हवं तर परत जाता. आम्हाला तो पर्याय च नाहीये म्हणे. परत एकदा, नितांत सुंदर आणि " समर्पक" प्रतिसाद :)

एकंदरित फार जास्त विचार करुन निर्णय घेण्याचे धोरण राबवू नये असे मला वाटते कारण फार कमी वेळा आपल्या भोवतालची परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते.
असेच म्हणतो.

मस्त चालू आहे चर्चा. ( पिरातै चे कौतुक नवनवीन विषयावर चर्चात्मक धागे काढत आहे.) माझ्या मते सध्या अमेरिकेत किंवा पुण्यात घर घेतले कि पुढील ५ वर्षे कुठे राहायचे हा प्रश्न निकाली निघतो ( EMI ) त्यामुळे ५ वर्षांनी बघू .... आजचे समीकरण x = x +५

आमचा निर्णय २४ वर्षांपूर्वी असा ठरला की अमेरिकेत रहायचे. लग्न नुकतेच झाले होते. आम्ही दोघेही नागपूरचे. नोकरी पुण्यात लागली होती. घराची चणचण तेव्हाही होतीच. एका मित्राकडून कळले की अमेरिकेत बे-एरियाला जाण्याची संधी आहे. ओळखीचे कोणीच नव्हते. आम्ही तेव्हा विचार केला की जाऊन तर पाहू. भारतीय लोक हळूहळू येत होते. सुरुवातीलाच समानवयी मित्र मिळाले आणि आम्ही एकमेकांना मदत करत राहीलो. एकदा भारतात - नागपूर आणि पुणे जाऊन आल्यावर इथे राहण्याचा बेत पक्काच केला. त्यानंतर ज्या अडचणी आल्या - घर, नोकरी, संस्कृती-मेळ त्या सगळ्यातून मार्ग काढला. आमच्या दोघांच्या घरून या निर्णयाचं स्वागतच झालं. आमच्या दोघांचेही आई-वडील आमच्याकडे बरेच वेळा राहून गेलेत. पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हाला आमच्या आयुष्याचा मार्ग शोधण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं आणि आहे. आम्हा दोघांचंही एकमत होतं की परत जायचं झालं तर नागपुरातच जायचं अन्यथा नाही. पुणं छान आहे - पण त्याच्या जागी. बर्याच लोकांनी या चर्चेत नोकरी / धंद्याबद्दल सांगितले आहेच. त्यात नवीन काही सांगण्यासारखे नाही मला. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते मला की आम्ही कुटुंब म्हणून बर्याच गोष्टींचा बरोबर मिळून आनंद घेतला - ते मला असं वाटतं की भारतात कदाचित जमलं नसतं. पण भारतात राहणारे माझे मित्र, नातेवाईक हे त्यांच्या तऱ्हेने एंजॉय करतातच की. इथे आम्हाला आमच्या आई-वडिलांबरोबर छानच वेळ घालवता आला - त्यांना बऱ्याच ठिकाणी नेता आलं - त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस साजरे करता आले. अर्थात हे सगळेही भारतात होतेच.. मला वाटतं आम्ही त्यांना वेगळं काही दिलं. शाळांबद्दल म्हणाल तर आम्ही शिक्षकांबरोबर नेहमीच संपर्क ठेवला. जिथे मुली कमी पडतात असे वाटले तिथे त्यांना मदत केली - माझे इतर मित्रही करतातच. आता मुख्य विषय - संस्कृती - आपण आपल्या आई-वडिलाच्या वेळची संस्कृती पाळतो ? माझ्या आजोळी औदुंबराचं, वडाचं झाड होतं. तेव्हा आजोळी वेगळे उत्सव व्हायचे. माझ्या लहानपणी, आई-वडिलांकडे वेगळे उत्सव व्हायचे. त्यांनी आपल्या सोयीनुसार आमच्यावर संस्कार केले. काही संस्कार संघात जाऊन, गणपतीउत्सवात, वेगवेगळ्या देवळात जाऊन आम्ही उचलले. काही वाचनातून, टीव्ही, सिनेमे बघून झाले. मला आश्चर्य वाटतंय की आजकालच्या काळात - जेव्हा इतक्या सोयी आहेत - तेव्हा नातेवाईक / संस्कृती हे मुलांपासून दूर जातील असं वाटावं ? माझी मोठी मुलगी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकते. ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात मराठी गाणी गाते तेव्हा ऐकून कुणी म्हणणार नाही की ही मुलगी मराठी नाही किंवा जन्मापासून परदेशात राहिलेली आहे. संस्कार ही पालकांची जबाबदारी आहे. याच गोष्टी आम्ही इतर भारतीय कुटुंबातूनही पाहतो. शिख समुदायाकडून आपल्याला शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यांनी त्यांची संस्कृती जपलेली आहे. दुसऱ्या, तिसऱ्या पिढीपर्यंतही जपलेली आहे. उलट मलातर म्हणायचे आहे की भारतात राहून मराठी संस्कृती जपली जातेय ? टीव्ही वरचे कार्यक्रम पहा .. किती इंग्रजी शब्द वापरले जातात .. तेव्हा संस्कृतीचा काही प्रश्न नसतो का ? मराठी शाळांत मुले जातात ? मराठी वाचतात ? भारतीय संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. महाराष्ट्रीय .. काही शे वर्षे - ती आपल्या गतीने पुढे सरकेलच. माझं असं मत आहे की आम्ही भारतीय, मराठी - अमेरिकन संस्कृतीत काही योगदान देतो आहोत - जे पुढच्या काही पिढीनंतर मान्यता पावेल. इथला इतिहास जेव्हा भविष्यात लिहिला जाईल तेव्हा या योगदानाला मान्यता द्यावीच लागेल.

अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत ! तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे ! उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील? सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही ! सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा. बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या. थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.

अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत ! तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे ! उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील? सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही ! सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा. बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या. थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.

अजून दोर पूर्णपणे कापलेले नाहीत तो पर्यंत या परत ! तिथे राहण्यासाठी जी कोडगी मानसिकता लागते ती नाही तुमच्याकडे ! उगाच जीवाची दैना करून घेण्यात काय हशील? सारे जहां से अच्छा , हिंदोस्ता हामारा , ही काही भंपक बॉलिवूडी मेलडी नाही ! सोपाय, सुख पाहिजे असेल तर भारतात या, यश पैस्से , साधन सम्पत्ती हवी असेल तर तिथेच राहा. बाकी मुले वगैरे मुद्दा गौण आहे, आपण मुलांचे भविष्य घडवतो वगैरे या गैरसमजुतीतून लौकर बाहेर या. थोडे कडक लिहिले , पण उपमर्द करण्याचा हेतू नाही.

In reply to by विटेकर

कुडन्ट अॅग्री मोअर. माहीत असलेले सर्व अमेरिकावासी अशीच कारणं शोधताना दिसतात. स्वतःचीच समजूत काढायला. ते परत येण्याची काडीची शक्यता नसते. फक्त एकीकडे परत न येण्याचं काहीतरी कारण शोधत राहतात. आत्ता तर आलोय. क्ष इतके डॉलर शिलकीस टाकून परत जाऊ. उफ्.. मुलांची शाळा स्थिरस्थावर, शिक्षणपद्धती चांगली.. त्यांचं शिक्षण होईस्तो राहू. भारतात करप्शन, धूळ इ.इ आहे हे अॅडिशनल एव्हरग्रीन कारण. ते कधीच परत येत नाहीत. फक्त दिल के बहेलाने के लिए गालिब, ये खयाल अच्छा है, म्हणत अक्षरशः उगीच जस्टिफिकेशन शोधतात. मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग. ३०-४० उदाहरणं पाहिलीत. टिपिकल गिल्ट आणि कन्फ्युजन. असो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+10000 गवि, अगदी अचूक निरीक्षण आणि थेट शब्दात मांडल्याचे आवडले.

In reply to by गवि

>>मुलगी अपत्य असली की काही काळात बडगा दिसतो. पण उशीर झालेला असतो. मुलगा अपत्य कॅन गेट अवे विथ एव्हरीथिंग. मुलगा अपत्य असेल तर काळ का म्हणे नाही बडगा दाखवत? किंवा पालक 'गेट अवे विथ एव्हरीथिंग' करू शकतात?