परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)
बर्याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये.
माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत.
सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ.
आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही.
इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे.
पण दुसर्या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल.
हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते.
परदेशात असणार्यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
प्रतिक्रिया
वळणाचे पाणी वळणावरच जाते
म्हणजे मी योग्य दीशेने जात आहे.
मला स्वतःला आयुष्यात वारेमाप
पूर्ण सहमत
मी १९९१ ते १९९८ या काळात
साधारण असेच माझेही मत आहे.
+१
हे पण मुद्दे पटले. सहमत आहे.
मुद्दा क्र १ बद्दल शंका :
मुद्दा क्र १ बद्दल शंका :
आता तर नवीन एच-१ घेणे पण
Education option
फारच समर्पक सल्ले ! मिपावर
१. तुम्हाला निर्णय
१. तुम्हाला निर्णय-स्वातंत्र्य आहे, ही फार मोलाची आणि भाग्याची गोष्ट आहे, याची जाणीव असूदे .फार कमी लोकांना अशी संधी मिळते.+ १००० हा निर्णय कायम करण्यासाठीचा पहिला मुद्दा होऊ शकत नाही, पण निर्णयप्रक्रियेत त्याला विसरण्याची चूक करू नये इतका महत्वाचा मुद्दा नक्कीच आहे.रहायला मजा येतेय ना अमेरिकेत.
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?
x=x+1 सिंड्रोम काय आहे ?अहो पुण्यात म्हणतात ना, पुढच्या वेळी आल्यावर जेवायलाच या. त्याचीच आवृत्ती आहे ही. पुढच्या वर्षी भारतात कायमचं परत जाऊ असं दरवर्षी म्हणायचं.हे भारीये !
बरोबर. तसेच बर्याचदा मनात
हे पण बरोबरे !
if ‘X’ is the current year,
पुनश्च आभार्स !
Since ‘X’ is a changing variable, the objective is never reached.पण कोणताही निर्णय घेणं अवघड होण्याचं कारण फार मजेशीर आहे . मनाला निर्णय घेता येत नाही , त्याचं काम फक्त वेगवेगळे विकल्प मांडणं आहे . निर्णय कायम व्यक्तीलाच घ्यावा लागतो पण व्यक्ती मनाकडे कौल मागते . मग मन पुन्हा नवनवे विकल्प देतं त्यानं व्यक्ती आणखी कन्फ्युज होते . खरं तर मेंटल अॅक्टिविटी पूर्ण थांबल्याशिवाय निर्णय असंभव असतो . पण व्यक्ती मनाला कायम टरकून असते, न जाणो एखादा निर्णय चुकला तर मन पुन्हा म्हणणार ' मी त्याच वेळी सांगितलं होतं ! घातला ना घोळ ? आता निस्तरा ! ' त्यामुळे व्यक्तिला वाटतं निर्णयाचं काम बेटर मनावरच सोपवा. मग व्यक्ति मनाकडे पाहाते आणि मन व्यक्तिला पुन्हा स्वतःच्या मेरी गो राऊंड मधे बसवतं ! हा खरा X <-> Y सिंड्रोम आहे ! Where X is mind & Y is you . The dilema is tossing the Ball to each other & the result is an unending game which makes any outcome impossible.हो, होतं असं. खरं तर प्रत्येक
बरोब्बरे !
हो हो, हमारे आहल पर हमे छोड दो.
वरती सगळ्यांनी भरपूर चर्चा घडवलेलीच आहे
शिक्षणाचा मुद्दा निर्विवादपणे
झेंड्याशी निष्ठा?
हे बघा.. त्याचं असंय की देशात
याचे उत्तर तुझ्याकडेच आहे
जसे तू भारतात जास्त राहिलीस
मी अमेरिका सोडून इंग्लंड
सहमत
अजून काही मुद्दे
गुड़
'रोज फ्रोज़न फुड खाणे'या
रोज फ्रोज़न फुड खाणे'या अर्बन मीथ्स वाटतात
सहमत
पिराताई, तुमचा वरचा प्रतिसाद
फार फेच्ड नाही बोलताय तुम्ही.
अमेरिका आणि भारताचे युद्ध
संरक्षण खात्यात जन्माने अमेरिकन नसलेले लोक घेतात का?घेत असावेत. पण अगदी खूप वरच्या हुद्द्यावर जाण्यासाठी वेगळे निकष असतील.शेवटी
फार छान विषय आणि त्यावरची
जपून
अर्थात.. पब्लिक मध्ये नाहीच
विठोबा आणि रखुमाई
चांगली चर्चा!
My article on experience of coming back
सई शी बर्याच अंशी सहमत (
लग्नाचय बाबतीत सहमत. ते काही
Pagination