Skip to main content

मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 23/11/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे. मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत. माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही. आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता. सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो. तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत. १. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का? २. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.? ३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे? ४. बिंडोक असणे गुन्हा आहे का? ५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26632
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

धागाकर्त्याचे प्रांजळ निवेदन आणि प्रगल्भ प्रतिसाद सर्वच मननीय वाटले. मित्र आणि आईवडील यांचेबद्दल फारसे कुणी लिहीलेले दिसले नाही. तुम्हाला अगदी खास, लहानपणापासूनचे मित्र आहेत का ? त्यांचेशी वारंवार भेटी, गप्पा, चर्चा होतात का ? आणि आईवडिलांशी कितपत आणि कसे संबंध आहेत ? तुमच्या शेतावर एक झकास मिपाकट्टा करा आणि नवीन मित्र मिळवा, असेही सांगावेसे वाटते. बाकी तथाकथित व्यवहारज्ञान नसलेले लोकच जास्त सुखी आणि समाधानी जीवन जगत असतात, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. बाह्यतः सुखात असलेल्यांची अंदरकी बात इतरांना कळत नसते, त्यांचेशी स्वतःची तुलना करण्याची काहीच गरज नाही.

तू चाल पुढं ... तुला रं गड्या भिती कशाची... पर्वा ती कोणाची... मस्त रहा तुमच्या टेन्शन घेण्याने कोणाला काही फरक पडत नाही.

नानासाहेब, इथल्या सदस्यांना काय ** समजता का? 'स्त्रिया पुरूषांचे अनुकरण का करतात', 'antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका', 'मुक्त लैंगिक व्यवहार स्वीकारल्यास बलात्कार थांबतील का' असले धागे काढताना भरपूर डोके चालते, असंख्य डुआय तयार करताना भरपूर अक्कल वापरता, गोंदवल्याला जेवताना जानवे बघतात असले खोडसाळ आरोप करताना उकळ्या फुटतात आणि आता "मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????" असले फालतू धागे काढून गंमत बघता काय?

In reply to by श्रीगुरुजी

विचारच करु शकत नाही असं आहे का? मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो. हे तर त्यांनी स्वतः कबूल केलंय. त्यावर "असंख्य डुआय तयार करताना भरपूर अक्कल वापरता " हा व्यक्तिगत आकसातून आलेला शेरा वाटतो. दोन गोष्टी प्रकर्शानं जाणवल्या. मागे सोन्याबापूनी म्हटलं होतं की इथे काही आयडी अमरपट्टा घेऊन आलेत. आणि सोत्री म्हणाला होता की, इथे `काय लिहीलंय' याच्याऐवजी `कुणी लिहीलंय' हे पाहिलं जातं.

In reply to by संजय क्षीरसागर

त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या अवतारात निर्माण केलेले धागे व त्यांचे वेगवेगळ्या धाग्यांवरील प्रतिसाद बघा. त्यातून त्यांचे व्यवहार ज्ञान व तिरपागडे चालणारे डोके दिसून येते. माईसाहेब या अवतारातून दिलेले सभ्य प्रतिसाद बघा. त्यांचे धागे व प्रतिसाद हे अजिबात बिनडोक माणसाचे धागे व प्रतिसाद नाहीत. त्यांच्या जातीयवादी व शिवराळ भाषेमुळेच त्यांचे अनेक आयडी बॅन झाले आहेत. आपण बावळट असल्याचा आव आणून ते मिपा सदस्यांची फक्त मजा पहात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला तुम्ही पण धागा एन्जॉय करा आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला तुम्ही पण धागा एन्जॉय करा आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही चिडलात तर त्यांचा हेतू साध्य झाला तुम्ही पण धागा एन्जॉय करा आणि लोकांचे जे चांगले प्रतिसाद आहेत, ते सगळ्यांनाच उपयोगी आहेत ना, फक्त धागाकरत्याला नाही

In reply to by श्रीगुरुजी

आपण बावळट असल्याचा आव आणून ते मिपा सदस्यांची फक्त मजा पहात आहेत. तसं संपादकांना वाटलं तर ते धागा डिलीट करतील . अर्थात काही सदस्यांच्या कितीही व्यक्तिगत कमेंटस इथे कशा चालतात हे आश्चर्य आहे .

मानस यांची मुलाखात वाचा... , ते व्यसनाच्या मगरमिठीतून कसे सुटले ..हे वाचले कि आपले अपयश तुच्छ वाटून जगण्याचा अर्थ काढण्यास मदत होईल

५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा? do it. असे म्हणालो असतो, पण ते करण्याआधी काही गोष्टीचा विचार नक्की करा. आपण म्हणजे आपले जग नाही आहे, आपण ज्यांच्यासोबत आहोत, जे आपले आहेत त्या सर्वांचा एकदा विचार करा व मग वाटलेच तर.. पण मला खात्री आहे, असा मुर्खपणा एखादा विचारी व्यक्ती नक्कीच करु शकत नाही. अडचणी कोणाला येत नाहीत? अगदी गरिबातील गरिब आणि टाटा यांना देखील. बातम्या वाचत आहात ना? थोडा धीर धरा. एवढे म्हणावे म्हणतो आहे, कारण प्रत्येक प्रश्नावर उत्तर हे काळ आहे.

बहुदा तुमच्या आजुबाजुला असे कोणीतरी आहे की जे तुम्हाला हा न्युनगंड आणते आहे. तेव्हा संगत बदला! जे कोणी लोक सल्ले देताना 'तुम्ही किती मुर्ख आहात' असा आव आणत असतील त्यांना टाळा. 'कुणी, किती, कसा सहज पैसा कमावला' वगैरे चर्चा चालल्या असतील तर त्यापासून चार हात दूर रहा! फक्त आनंदी आणि पॉझिटिव्ह विचारांचे लोक शोधा. त्याच लोकांमध्ये जाणीवपुर्वक मिसळा. (कितीही आमंदी असले तरी व्यसनी मात्र नकोत.) नाही मिळाले तर तर आपणच आनंदी कसे राहता येईल याचा विचार करा. रोज किमान दोन चांगल्या झालेल्या गोष्टी झोपताना आठवा. शेती आहेच तर त्यात लक्ष घाला ते आनंददायी कार्य आहे. स्वत:च्या खाण्यासाठी सेंद्रिय भाजीपाल्याची बाग बनवा. त्यातून स्वतः (मजूर न लावता) भाजीपाला काढा. त्यात केव्हढा आनंद आहे!

In reply to by निनाद

आणि दीर्घ कालीन उपाय योजना म्हणून, कोणत्याही एका साध्या - अगदी साध्या - गोष्टीत जाणीवपुर्वक तज्ञता (एक्स्पर्टाईज) आणा.

बाकी माहीत नाही, पण डांगेअण्णांकडे पहा एकद.. ते देखील अश्याच वाईट परिस्थितीतून गेले आहेत एकदा..

In reply to by आनन्दा

आनन्दा!!!!!! असं काय इज्जतीचं धिरडं करता राव...!!!!!! आत्महत्येचा विचार सोडला तर बाकी काय कॉमन दिसतंय दादा????

In reply to by संदीप डांगे

>>>मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत). तसा मी बक्कळ शिकलो आहे. या गोष्टींमध्ये साम्य असावे. :)) (आनंदा यांचा प्रतिसाद अस्थानी वाटला.)

In reply to by संदीप डांगे

असं काय इज्जतीचं धिरडं करता राव...!!!!!!
=)) का टफिला लोक मनावर घेताहेत काय कळत नाही. पण तुम्हाला त्या रांगेत अनावधानाने का होईना बसवलेलं पाहिलं, धन्य झाले मी!

चार्ज संपला काय? एखादा काथ्याकूट काढा. तुमचे सगळे प्रॉब्लेम नाहिसे होतात का नाही बघा!