मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुण्या गावचा कोण?

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे. तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं. कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात! मी ही त्याच्याच सारखा 'सहज' .., म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात. एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? " मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे." गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? " मग म्हटलं सांगावच याला सर्व, "अरे गावा... " तू ज्या गोष्टिंना 'तुझ्या गावातल्याच' समजतो आहेस.. त्या सावल्यांना, चांदण्याला, उन्हाला.. विचारून तर बघ एकदा.. ते 'तुझ्या गावचे' आहेत तरी काय? " गाव खट्याळपणे हसले.., म्हणाले, " पक्का लबाड हं तु.. तू बाहेरचा म्हणून फक्त तुझाच! .. ते सगळ्यांचेच.. म्हणून कुणाचेच नाहीत.. अता उमगले मला.. माझिही अवस्था बरिचशी तुमच्यासारखीच आहे! " ----------------------------------- अतृप्त...

वाचने 7763 वाचनखूण प्रतिक्रिया 30

In reply to by कवि मानव

तुम्ही एकदा फक्त कवी होऊन आणी एकदा फक्त मानव होऊन वाचून पहा.. . नक्की कळेल.. काय कळलय ते. ;)

In reply to by चांदणे संदीप

@'अता' उमगले मला... असं म्हणणारं गाव विरळाच पण, नाही का? ››› सही पयचान्या. .. ते सर.. मात्र लोकांना ह्या अवस्थेत "जा" .. असं स्वत: जणू त्यातलेच असल्याचा आव आणत सांगत असतात.

चौकटराजा 25/11/2016 - 06:13
काही कल्ला नाही यातच याकवितेचे यश आहे. बुवांच्या आयुष्यात एक नवीन गाव आले अतः त्यांंच्या कवितेने एक वळण घेतलेय. ती आता मुक्त होउ लागली आहे अता " बद्ध" कविताना रामराम केलेला दिसत्योय.म्हंजे पहा कवि " बद्ध" झालाआहे पण कविता मुक्त ! असेच असते. कविचे खाजगी आयुष्य व कविता याम्चा सम्बंध असतोच असे नाही ! ( इति पाडगावकर ).

सिरुसेरि 26/11/2016 - 15:21
सुरेख आत्मकथन . कुठेतरी या गाण्याच्या अर्थाशी साधर्म्य जाणवले . " रंगुनी रंगात सा-या , रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सा-या , पाय माझा मोकळा "