Skip to main content

अनुभव नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)

लेखक नाखु यांनी सोमवार, 14/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे. एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत. नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव. खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो. लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११). बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते. शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्‍ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या). आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२. माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण : दाखला क्रं १ : एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का? बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा. एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे. दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई. नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल. बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन. बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते) शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच. थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे) कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.

वाचने 46878
प्रतिक्रिया 218

प्रतिक्रिया

पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! =)) मला कॉसमॉस बॅंकेत पैसे लगेच बदलून मिळले साधारण २० एक मिनिटांत. ही १० किंवा ११ तारखेची गोष्ट आहे. १०० च्या २० नोटा आणि २,००० ची एक. सर्वांना थोडे तरी पैसे मिळावेत ह्या कारणाने केलेली व्यवस्था.

In reply to by यशोधरा

बंगलोरच्या कॉसमॉस बॅंकेत विनासायास पैसे मिळाले . सकाळी गेलो तेव्हा कॅश आलेली नव्हती , चेक लिहून, सही करून बँकेत दिला , बाकीच्या कामाकरता बाहेर पडलो . एक-दीड तासांनी कॅश आल्यावर बँकेने फोन केला , बँकेत परत गेलो ५-१० मिनिटात पैसे मिळाले .

In reply to by यशोधरा

पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! =)) बघा, इतर भाषांच्या शिरकावाने मराठी भाषा समृद्ध होत चालल्याचे नवीन पुरावे मिळले ! कोण रे तो स्वघोषित भाषाशास्त्री उगाच तक्रार करतोय ?! =)) अवांतर : या निमित्ताने माझ्या ऐकीव आवडीचा "वीकनेसपणा" हा शब्द आठवला. :)

काल बॅंकेत गेलो, मोजून सहा सात लोक होते लायनीत, मी आठवा, उभा राहत बरोबर बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी नीट विचारपूस केली, नक्की काय काय करायचं आहे ते विचारलं ते कसं करता येईल ते सांगितलं, सर्व शंकांचे समाधान व उपाययोजना नीट सांगून तो बाजूला झाला, त्याने ओळ्खपत्राची झेरॉक्स लागेल म्हटल्यावर माझ्याकडे नव्हती, तेव्हा म्हणाला काळजी नको, इथे जागेवर मिळेल. बाजूला बॅंकेचे झेरॉक्स मशीन, त्यावर झेरॉक्स काढायला एक जण जात, एक इंटर्न मुलगी सर्व ग्राहकांना झेरॉक्स काढून देत होती, रांग सोडून जायचे कारण नव्हते. तीच आपले ओळखपत्र घेऊन झेरॉक्स काढून योग्य ते डिक्लेरेशन लिहून सही करायला हातात आणून देत होती. मी चेकबुक विसरलो, नोटा बदलून द्यायची वेळ दुपारी तीन नंतर होती, त्यामुळे सर्व नोटा खात्यात भरल्या, नंतर येऊन विड्रॉ करू असे ठरवले, एटीएम सुरु नव्हते, बँकेत फक्त 2000 च्या नोटा होत्या, दहाव्या मिनिटाला मी बँकेबाहेर होतो, माझी बँक हाय प्रोफाइल असल्याने सर्व सुख सुविधा मदत उपलब्ध होती. हाय प्रोफाइल असल्याने फारशी गर्दी नव्हती, ती कधीही नसते. कॅश भरणारे दोन-पाच लाख च्या गड्ड्या घेऊन किमान दोन चार जण होते लायनीत. नंतर वेळेत जायला शक्य झाले नाही, बँक बंद झाली, एटीएम बंद आहे, सर्व पैसे खात्यात, खिशात व घरात मिळून सुटे 500 आहेत. आजही सुटी आहे, एटीएम अजून सुरु झाल्याची काही बातमी नाही,

In reply to by संदीप डांगे

हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर नव्हे? ;) "...आणि मी स्वप्नातून जागा झालो" हे वाक्य टाकायचे विसरलात का?

In reply to by मोदक

दोन दिवस आधी बँकेतून आलेला मेल नावासकट टाकला होता ट्रे मार्क च्या धाग्यावर, त्यातलं बँकेचं नाव संपादकांनी संपादित केलं, त्यामुळे आता नाव टाकलं नाही.. :)) तुम्हाला स्वप्न नगरीतून फिरून यायचं असेल तर या नाशिक ला, हाथ कंगन को आरसी क्या, नै काय कि आजकाल आम्ही गोळ्या देतो अशी आमची बदनामी सुरु आहे! =))

In reply to by संदीप डांगे

खरे आहे कि स्वप्नरन्जन ? अशी ब्यान्क आस्तित्वात असेल यावर विश्वास कसा ठेवावा ?

८ तारखेला साडेदहा वाजता नोटा बद्द्ल बातमी समजली. सवा अकराला ए टी एम वर गेलो . गर्दी थोडी होती. रात्री पावणेबाराला ५०० ५०० असे करून सात वेळा एकून साडेतीन हजा॑र काढले. घरी काटकसर चा फतवा जारी केला. काही किराणा रोख ( १०० चा नोटा) व काही मॉल मधून खरेदी केला. गेले ४ देवस बाहेरून फळे वडापाव मिसळ, शाम्पू ई आणण्यावर वर बंदी आहे . पेट्रोल ७ तारखेलाच भरले होते. जर नसते तर॑ भागीदरीत २५० २५० चे भरले असते. ९ तारखेला. व त्याकडून १ दिसें नंतर २५० घेतले असते. चेकने बॅकेत पैसे काढायला पुरेशी कॅश असेल यावर विश्वास नसल्याने बॅकेत गेलोच नाही. १२ तारखेला लॉकरवाल्या बँकेत गेलो. बायकोचे ग्राचुएटीचे रोख मिळालेले पैसे रिटर्न भरताना कसे दाखवायचे याचा संभम असल्याने ठेवले होते. त्यात सुदैवाने १०० चे ४ हजार सापडले. त्यावेळी त्या॑च बॅकेत २००० देत होते पण पासबुक नसल्याने दुसरे दिवशी गेलो तर रक्क्म १००० झाली होती. तेथील बाईला विचारले मग मंगळावारी प्रत्येकी १० रू ची नोट का? ती हसून म्हणाली मंगळ वारी कॅश अपेक्षित आहे. लोकांमधे उधारीचा मामला जिथे आहे तिथे काही सवाल नाही. वहातुक व वैद्यकीय सेवा यांच्या बाबत खाजगी वर काही नियम ८ लाच जाहीर करून मोदीनी त्यांची उधारी सरकार वसूल करून देईल अशी हमी दिली असती तर या सेवा मस्त चालू राहिल्या असत्या. तिथे मोदी कमी पडले. बाकी चंगळबाजीला उत आला होता त्याला चाप बसलेला पाहून बरे वाटले.

In reply to by निराकार गाढव

कॉमन सेन्स असेल तर हा प्रश्न पडणार नाही. २००० ची रक्कम १००० या हिशेबाने जॉमेट्रिकल प्रोग्रेशन ने १० रू हा अंदाज साधारण बरोबर आहे. त्यात पुणेकर असल्याचा वा नसल्याचा प्रश्न येतो कसा ?

काल बँकेत गेलो. माझ्या आधी ७ - ८ जन होते. आधार कार्ड घेऊन गेलो होत , बँकेतल्या लोकांनीच त्याची फोटो कॉपी काढली , मी सही केली , आणि पैसे भरले. सेल्फ चेक देऊन दहा हजार काढले. सगळे काम १५-२० मिनिटात झाले. बँकेतल्या लोकांचा aatitude खूपच चांगला होता

मी बँकेत पैसे काढायच्या रांगेत गेलो आणि माझा नंबर येताच बाहेर कॅश संपली, असा फलक लागला. हाय रे माझ्या कर्मा..

In reply to by पिंगू

मी पण आज ATM मधुन पैसे काढायच्या रांगेत गेलो ४५ मिनीट उभा होतो आणि माझा नंबर येताच बाहेर कॅश संपली, असा फलक लागला. हाय रे माझ्या कर्मा..

मी स्वतः अजून बँकेत गेलो नाहीये. जिकडे तिकडे कार्ड वापरून खर्च चालूये. हापिसबाहेरचा टपरीवाला पण कार्ड घेतोय. कार सर्व्हिसिंगला टाकली होती ती घ्यायला गेलो तेव्हा तिथले कार्ड मशीन चालत नव्हते. तिथला कॅशियर म्हणाला कि पेटीएम करा, दुसरा पर्याय नव्हता म्हणून करून टाकले. आता त्याचे हे उत्पन्न सरकार कसे ट्रॅक करणार हा प्रश्न आहे.

मी बराच वर्ष शक्य तितके व्यवहार कार्ड वापरून करतो . ( डेबिट आणि क्रेडीट ) . मला त्याचा फायदा मी किती आणि कसे पैसे खर्च करतो हे शोधण्यासाठी होतो , वर बरेच लाभ होतात ते निराळे ( कॅश back मिळते ). क्रेडीट कार्ड वर फुल ऑटो पेमेंट असल्याने आज तागायत कधी व्याज भरावे लागले नाही. नोटा बाद झाल्या तरी अजूनतरी मला काहीच फटका नाही.

गेल्या दोन दिवसात अंदाजे रोज ४-५ तास विविध बॅ़कांच्या रांगेत उभे राहुन तिर्थरुपांबरोबर हा अनुभव घेतला, कुठलाही विशेष त्रास झाला नाही. एक गोष्ट मात्र लक्षात आली की २००५ पुर्वीच्या ५०० आणि १००० च्या २-३ नोटा तिर्थरुपा़कडे होत्या त्या १-२ बॅ़कांनी घेण्यास नकार दिला, पण इतर बँकेत त्याच नोटा घेतल्या गेल्या.माझे बरेचसे काम { पेट्रोल भरणे / बिल भरणे } हे कार्डानीच होत असल्याने मला काही त्रास जाणवला नाही. ५०० च्या २ नोटा होत्या त्या पैकी १ पेट्रेल पंपावर पहिल्या दिवशी खपवण्याचा प्रयत्न केला, पण १०० चे सुटे नसल्याने पेट्रोल भरणे झाले नाही, परंतु २र्‍या पंपावर दुसर्‍या दिवशी ती मो़कळी करण्यास यश मिळाले.उरलेली बँकेत बदलुन काम झाले ! :) वयोवॄद्ध लोकांना मात्र थोड्या फार प्रमाणात त्रास होताना जाणवले, यात स्लीप भरणे /नक्की कुठले डॉक्युमेंट ध्यायचे आहे या बाबतीत संभ्रम होणे इं... पुढील २ आठवड्यात हा ताण बर्‍यापैकी निवळेल असा अंदाजा आहे... कॄपया :- कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवु नका. सरकार / बँंकं आणि एकमेकांना सहकार्य करा... पोटदुखी / मूळव्याध / इं झालेल्या राजकारण्यांची विधाने ऐकुन, कशी यांची चांगली ठासली गेलीय याचा पुरावा आणि आनंद घ्या.गंगेत वाहुन गेलेले / कचराकुंडीत सापडलेले / पोत्यात सापडलेले अश्या अनेक बातम्यांवर नजर ठेवा आणि भ्रष्ट लोकांची कशी दुरावस्था झाली आहे ते आवार्जुन पहा. जनतेला त्रास होतोय असा गळा काढणार्‍या नेते मंडळींना तुम्ही रोजच्या ट्रॅफिक मधे अडकुन / खराब रस्त्यातुन प्रवास करुन / मुंबईतल्या प्रचंड गर्दीतुन रेल्वेने प्रवास करुन आणि इतके वर्ष भ्रष्टाचार आणि बाबु मंडळींच्या माजाला समारे जाउन त्रास भोगलात आणि भोगत आहात त्या बद्धल यांनी काय उपाय केलेत ? याचे उत्तर आधी ध्यावयास सांगा ! मोदींनी खर्‍या अर्थाने "करुन दाखवले" ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Daily currency exchange, ATM withdrawal limits increased as banks start releasing new Rs 500 notes

आइने ४३००० रुपये बँकेत भरले. जेष्ठ नागरीक असल्यामुळे रांगेतील लोकांनी पुढे जाउन दीले. दहा हजार रुपये सेल्फ चेकने तीनेच काढले. काहीही त्रास झाला नाही. नवीन नोटा मिळाल्या. २००० ची नोट खूपच पातळ आहे. आमच्या भागातील एटीएम केंद्रे अजून बंद आहेत. बाजूलाच रीलायन्स मार्केट असल्यामुळे भाजीपासून कपड्यापर्यंत सर्व सामान कार्ड वापरुन घेता येतेय.

मी बातमी आल्यापासून कुठले एटीएम पहिले चालू होईल याचे आडाखे बांधण्यात मग्न होतो. सरकारने वर्दळीच्या ठिकाणची एटीएम्स सर्वप्रथम चालू करावी हे सुचविले पण बँक नेमके उलटे करील असा आडाखा होता. याचे कारण वर्दळीच्या ठिकाणी १०० च्या नोटांनी भरलेले एटीएम रिकामे व्हायला अवघे काही तास लागले असते. अंदाजानुसारच घोडबंदर रोडवर, मेन रोडवर असलेली पण दुकानांच्या गर्दीत पटकन दिसून न येणारी आयसीआय च्या एका एटीएम्समधे पैसे भरणारी व्हॅन येताना दिसली. पटकन बाईक साईडला घेऊन तिथे नंबर लावला. माझ्या अगोदर फक्त २ नंबर होते. अवग्या ५-७ मिनिटात दोन कार्डांवरुन २००० हजार प्रमाणे ४००० रुपये मिळाले. काल आयडीबीआय बँकेत गेलो. बँक नुकतीच उघडली असल्यामुळे अवघ्या ५ मिनिटात पैसे जमा करुन झाले. ५०० च्या दोन नोटा बदलून हजार रुपये घेऊ म्हटले पण बँकवाल्यांकडे फक्त "गुलाबो' च होत्या. त्यामुळे घेता आली नाही. एकंदरीत सुरुवातीच्या २-३ दिवसांपेक्षा कालची पॅनीकता कमी होती. मात्र पहिला धाग्यावर लिहिलेल्या प्रतिसादाप्रमाणे सरकारी बँकांच्या अंग चोरुन काम करण्याचा प्रवृत्तीचा फटका मात्र नक्कीच लोकांना बसतोय. (अपवाद क्षमस्व). आताच्या परिस्थितीत त्यांना जोमाने काम करायचेही असेल पण "पडीले वळण इंद्रिया सकळा" मुळे त्यांचा नाईलाज झालेला असावा. बँकेतील कर्मचारी, मॅनेजर यांची जातीने विचारपूस करुन ते गेले ३-४ दिवस सतत काम करत असल्याबद्द्ल अभिनंदन केले. व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांच्या चेहर्‍यावर एक सुखावणारे हसू आले. ते पाहून बरे वाटले. मात्र ३-४ दिवस मुद्दाम बर्‍याच बँका फिरुन कामकाज बघीतले. गर्दी होती पण लोक बर्‍यापैकी शांत होते (एखाद दुसरा अपवाद असतोच)

http://atmsearch.in/ ही एक वेबसाइट सुरू झाली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात कोणती ATM चालू आहेत हे त्यावर दिसेल. तुम्हाला कुठलं ATM चालू आहे असं दिसलं तर त्यावर प्लीज अपडेट करा.

https://docs.google.com/spreadsheets/d/1BRa8ejPDHkPRscWNjvlKJCW1SU4R35a… ही लिंक कामी यावी, ही एक गूगल डॉक्स स्प्रेडशीट आहे, लोकांनी सुरु केलेला इनिशिएटीव्ह आहे , भारतात कुठल्या बँकेच्या कुठल्या गावच्या कुठल्या शाखेत रांग कमी आहे हे रियल टाईम अपडेट केले जाते ह्यात , ह्याचा थोडाफार लाभ व्हावा, तसेच पैसे जमा करायला सीडीएम सोईचा लाभ घेतला तरी फायदा होईल अन वेळ वाचेल असे सुचवावे वाटते

माझे ओरिएण्टल बँक आणि एस बँक या दोन बँकेत अकाउंट आहे. ओरिएण्टल बँक कार्यालया जवळ असल्यामुळे मी ११ तारखेला साधारण ११.१५ वाजता घरी असलेले पैसे भरण्यासाठी गेलो होतो. बँक पहिल्या मजल्यावर आहे पण रांग पार खाली तिसुध्दा कंपाऊंडच्या बाहेर. पैसे काढण्यासाठी, नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी एकच रांग. बँकेचा कोणी कर्मचारी मार्गदर्शन करण्यासाठी नाही. सर्वत्र सावळा गोंधळ चालू होता. मी पाच मिनिटे रांगेत उभा राहिलो. नंतर माझ्यामागे उभे असणार्‍या एसमाला सांगून वरती बँकेत गेलो. तिथे सुध्दा अशीच परिस्थिती होती. आत मध्ये गेल्यावर पैसे भरण्यासाठी वेगळी रांग आणि नोटा बदलून आणि पैसे काढण्यासाठी वेगळी रांग होती. त्यात सुध्दा पैसे संपल्यामुळे जे चेकने पैसे काढण्यासाठी आले होते त्यांना टोकन देऊन दुसर्‍या दिवशी येण्यासाठी सांगितले गेले. पण कोणीही कर्मचारी बाहेर रांगेत उभे असणार्‍यांना हे सांगत नव्हते. सर्व्हर डाऊन होते त्यामुळे पैसे भरण्यासाठी सुध्दा खुप वेळ लागत होता. मी दिड वाजेपर्यंत उभा राहिलो. तरी त़ळमजल्यापर्यंत पोहचलो नव्हतो. उभे राहून पाय भरून आले होते. मग मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. जेवण उरकून मी दुपारी साधारण ३.०० च्या दरम्यान एस बँकेच्या शाखेत गेलो जी कार्यालयापासून थोडी लांब आहे. तिथे बँकेच्या बाहेर भली मोठी रांग लागली होती ती पाहून पोटात गोळा आला. बँकेच्या गेटवर दोन तीन बँकेचे कर्मचारी उभे होते. त्यांच्याकडे चौकशी करायला गेलो तेव्हा कळले कि ती रांग नोटा बदलून घेण्यासाठी होती. आणि बँकेच्या खातेधारकांना लगेच आत घेत होते. तिथे माझ्यापुढे एकजण पैसे भरण्यासाठी उभा होता. त्याच्यानंतर माझा नंबर होता. पाच मिनिटांमध्ये काम झाले. त्या तिथे नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या माणसांना सुध्दा त्या बँकेचे कर्मचारी सर्व समजावून सांगत होते आणि रांगेत शिस्त ठेवण्याचे काम करत होते. एकाच दिवशी एका सरकारी आणि खाजगी अश्या बॅंकांमध्ये मला दोन वेगवेगळे अनुभव आले.

परवा HDFC बँकेच्या लायनीत दोन तास उभी राहिले.सर्व कामकरी मंडळींना पगार द्यायला हवा होता.त्यामुळे बँकेत जाणे अनिवार्य होते. लाइनीत पेइनस्लिप वाटत होते तसेच नोटबदल फाॅर्म पण. एक बँक अधिकारी लोकांना आत सोडायच्या कामावर होता.मी आरामात उभी होते व्हाॅट्स अॅपवर टिपी करत! पण त्याला आपला प्रिफर्ड कस्टमर असा उभा बघून उगाच गिल्ट येत होता! आत गेल्यावर मात्र माझी सर्व कामे मला बसायला सांगून कर्मचाऱ्यांनी एकत्र करून दिली. चेकने दहा काढले,चार बदली करुन मिळाले आणि काही डिपाॅझिट, पेशंट कडून घेतलेले चेक ही सर्व कामं पटापट करुन दिली.वर पुढच्या वेळेला तीन नंतर या लाइनीत नका उभे राहू सल्ला आणि चहा पण मिळाला! सर्व कर्मचारी लोकांना मदत करत होते.आणि शांतपणे गर्दी हँडल करत होते. काल IDBI बँकेत आधी फोन करुन गेले.तिथे अवघ्या दहा मिनिटात नवर्याचे काम झाले.

मी काल नैनिताल ला ऑडिटर्स लोकांना फिरायला घेऊन गेलो होतो. माझ्या कडे रु. ५०० च्या चार नोटा आणखी शिल्लक होत्या. तेथील एका बँके समोर चहा पीत असताना सहज बँकेत डोकावलं तर गर्दी थोडी कमी होती. मी सहज विचारलं नोटा बदलून मिळतील का? लगेच तेथील व्यवस्थापक पुढे आले आणि त्यांनी स्वतः माझा नोटा बदली करण्याचा फॉर्म भरून दिला. डांगेंजीनी सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे ही ओळखपत्राची xerox नव्हती. तेथील कर्मचाऱ्याने ती पण आणून दिली. १०-१५ मिनिटांमधे मला रु.२००० ची नोट मिळाली आणि मी आनंदाने बाहेर पडलो. नंतर जो पर्यटकांचा लोंढा बँकेमध्ये घुसला ....सांगायला पारावार नाही.... बँकेतील अनुभव चांगला आला, (देशभक्ती सिद्ध करायला २-३ तास उभे राह्यला नाही लागले) पण समस्या एकच आहे--- रु.२००० सुट्टे कसे करू. (घरात माझ्या पिल्लाचा गुल्लक आहे त्यात टाकणार आहे).

लय भारी नाखु ! मोदींच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आम्हीही घरभर धूंडाळुन काही काळा पैसा किंव्वा सावळा पैसा सापडतो का ते पाहिले, पण हा हन्त हन्त , चिक्कार शोधुनही फक्त ५०० च्या ४ नोटा निघाल्या :( बाकी आमच्या सगळा पैसा गोराच ! शिवाय सोडॅक्सोची लख्ख शुब्र चकाकणारी फुड कुपनं पाहुन तर आम्हला आमच्या मध्यमवर्गीय पापभीरुत्वाची अपार कणव दाटुन आली ! आणि ह्याही पुढे जाऊन इन्कम टॅक्स ने नुकतेच पाठवलेल्या इनकम टॅक्स भरल्याबद्दलच्या सर्टिपिकेटची प्रिंट पाहुन तर डोळ्यात टच्चकन पाणीच आले :( असो. त्या चार नोटांपैकी एकाचे पेट्रोल भरले आहे , उरलेल्या तीन नोटा इथेनॉल भरयला वापराव्यात असा मानस आहे, कोणी बारवाला ऑटडेटेड गांधी स्विकारत असल्यास कळवा ! नाहीतर आपले राजवर्धन आहेच ! लवकरच भेटु मग!! चीयर्स !!

आठ तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एसबीआयच्या एटीएमवरून हजार रूपये (५०० च्या दोन नोटा) काढले होते. रात्री मोदींनी त्या नोटा रद्द झाल्याचे जाहिर केले. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ते पैसे एसबीआय बँकेत (डोंबिवली, एमआयडीसी शाखा) जमा करायला, बदलुन घ्यायला नाही, गेलो होतो. माझ्याकडे ५०० च्या दोन नोटा, पॅनकार्ड आणि त्याची झेरॉक्स, स्लिप भरायला खिशात एक पेन होते. बँकेबाहेर १००-१५० लोकांची एकच भलीमोठी रांग होती. बाहेरच्या रांगेत टोकन घेऊन मग आतमध्ये जायचे होते. रांगेत ७०% लोक पैसे बदलुन घ्यायला आणि फक्त ३०% लोक पैसे भरायला आले होते. आतमध्ये दोन वेगळया रांगा होत्या. बाहेरच वेगळया रांगा केल्या असत्या तर पैसे भरायला आलेल्या लोकांना नक्कीच कमी त्रास झाला असता. काम पुर्ण व्हायला किमान दोन-तीन तास लागतील असे समजल्यावर उन्हात ऊभे राहण्यापेक्षा परत मागे फिरलो. १०-१५ दिवसांनी गर्दी कमी झाली कि पुन्हा एकदा प्रयत्न करेन. बाबा जेष्ठ नागरिक असल्याने सुदैवाने त्यांना बँकेतुन (एनकेजीएसबी मुलुंड पुर्व शाखा) पैसे लगेच बदलुन मिळाले पण ५०० रुपयांच्या चार नोटा दिल्यावर दोन हजारांची नोट मिळाली. सुट्टे पैसे नसल्याने ती नोट घ्यायला आता कोणी तयार नाही आहे. १,५ आणि १० ची जमवलेली नाणी मोजल्यावर ४०० रुपये निघाले. घरात अडीअडचणीसाठी एक हजार रुपये (१०० च्या १० नोटा) ठेवले होते ते सध्या वापरतोय. ३० डिसेंबरपर्यंत वेळ असताना सगळेजण जुन्या नोटा बदलुन घ्यायच्या इतके का मागे लागले आहेत ते कळत नाही. नंतर पैसे भरले तर कमी मिळतील किंवा त्या नोटा जवळ बाळगल्यास तुरुंगात टाकतील असे लोकांना वाटते का?

In reply to by भाते

30 डिसेंम्बर पर्यन्त वेळ आहे तरी जुन्या नोटा आता लगेच अवैध झाल्या, त्याच्या जागी नव्या नोटा हव्यात एवढं साधं लॉजिक का कळत नाही हे हि मला कळत नाहीये, गर्दी एक एक माणूस मिळून बनते, सगळेजण हे अशीच पैसे आताच हवी असणारी एक एक व्यक्ती आहे, गर्दी का करतायत हा प्रश्न अगदीच काहींच्या काही वाटतोय! या आधी 2005 च्या आधीच्या नोटा बदलायची सक्ती झाली होती तेव्हा अशी गर्दी का झाली नाही याचं उत्तर आहे का?

In reply to by भाते

समजा, माझ्याकडे ५००० रु आहेत - ५०० व १००० मध्ये. आणि हजार एक रुपये इतर नोटांमध्ये आहेत. आणि जर यात दैनंदिन खानपान भागत असेल तर एटीएम चालू होताच पैसे काढले की काम झाले. दिसणारी घाई उगीचच आहे. जेन्युइन लोक्स सोडले तर बाकी काय आहे? तर ... हा "बस सुटेल, पळा पळा" सिन्ड्रोम (लक्षण) आहे. म्हणजे काय रे भाऊ? आपण जर धावलो नाही, चेंगराचेंगरी केली नाही तर बस सुटेल अशी मानसिकता आणि त्यासाठी पळत सुटणे, मग गर्दी होते, धक्काबुक्की होते. एस टी ष्ट्याण्ड किंवा इतरत्र दिसणारे हे चित्र. आणि हे सगळे कधी? जरी आपले रिझर्वेशन असले तरी जरी ही बस सुटली की दुसरी लगेच ५ मिनिटांत आहे हे ठाऊक असले तरी बसमध्ये ५० एक जागा असतात आणि खाली ३०-४० माणसांचाच घोळका आहे हे दिसत असले तरी ता.क. चुकून खाली टाइपले गेले होते आधी.

कांहीच त्रास झाला नाही. नियम समजून घेऊन रांगेत उभे राहिल्यास त्रास नाही. स्वतः कार्ड पेमेंट करतोय. एक वृद्ध मावशी आहे, तिच्यासाठी प्रत्यक्ष गेलो होतो. गडबड कुठेही नव्हती. लोक्स चर्चा अन एकमेकांचे प्रबोधन करत होते, हा मला यात दिसलेला मोठा फायदा! मी सहा जणांना मजकडच्या शंभरच्या नोटा देऊन चार दिवस धीर धरण्यास सांगितले. माझे कार्ड वापरून सगळे कांही मस्त चाललेय.. एक विदेशी जोडपे उतरताच घेतलेले वीस हजार बदलायला आलेले. पण् त्यांना चारच हजार मिळाले. सर्व ब्यांका जोडल्याने धांदलबाजी चालणार नाही. फावल्या वेळात राजकीय मर्कट. लीला पाहून मनोरंजन होतंय ते वेगळंच.

कॅनरा बँकेत सकाळी आठला रांगेत उभा राहिलो. वडीलांचे खातं होतं, त्यांना ९.५५ ला यायला सांगितलं होतं. बँक दहाला उघडणार होती. पाचवा नंबर होता. दहापर्यंत २०-३० जणच होते रांगेत. उगाच आठला गेलो असं वाटलं. बँक उघडली. पाच मिनिटात भरणा करून बाहेर आलो. दुपारी १२ला बायकोला घेऊन परत गेलो. तिच्या खात्यात भरणा करायला. तेव्हाही २० मिनिटात बाहेर आलो. गोंधळ वगैरे काही नव्हता. ५-१० मिनिटाला व्यवस्थापकीण बाई राउंड मारून जात होत्या. कोणाला काही माहिती देत होत्या, रांग नीट करत होत्या. भरणा करायला मोठी रांग होती(२०-२५ जण). बदलून घ्यायला जरा कमी होती(३-४ जण). एकूण मीडीयावाले पराचा कावळा करतात व पॅनिक जनता वावहत जाते याचा अनुभव आला. (अडचणी नक्कीच आहेत. स्टेट बँकेबाहेर १००-१५०ची रांग होती. पण मी बँकेच्या कर्मचार्‍यांना शून्य दोष देईल. दोष आपल्या समाजातील आर्थिक निरक्षरतेचा आहे. व 'गर्दी' म्हणून 'आपण' सभ्येतेने व सुसंस्कृतपणे वागत नाही, त्याचाही दोष आहे.)

लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
अगदी सहमत

In reply to by पाटीलभाऊ

एकदम सहमत

In reply to by पाटीलभाऊ

एकदम सहमत

एकूण प्रायव्हेट बँकांत लगेच विनासायास काम होतंय तर तुलनेने कैक पटीने जास्त ग्राहक संख्या व निम्नवर्ग असलेल्या बँकांत असुविधा आहेत,

काल (१३ ता.) आय डी बी आय ब्यांकेत ( खारघर ब्रांच) १५ मी. ४००० रु. बदलुन घेतले. १५ जण फक्त लायनीत होते. कर्मचारी लोक चांगली मदत करत होते. माझ्या काकांना ( ७० वर्षे) दु. ३.३० वा. या तुमच्या करता लायनीत उभे राहयची गरज पडणार नाही असे सांगीतले. काही काँग्रेसी कार्यकर्ते लोकांना फुकट पाणी वाटत होते. लायनीतला एक जण म्हणाला की भाजप कार्यकर्ते चहा घेवुनसुद्धा आले होते. एकंदर अनुभव खुपच सकारात्मक होता.

स्थानीक नगरसेवक अनंत कोर्हाळे यांनी पाणी वाटप केले, (सध्या मनसे) नंतर शिवसेनेत जाणार हैत.त्याच बरोबर श्री श्री रविशंकर यांचे अनुयायी आणि प्रांत संघटक यांनी पाणी+राजगिरा लाडू वाटप केले. विशेष म्हणजे स्टेट बँकेत गर्दी होती पण बाजूच्याच सारस्वत मध्ये अगदी तुरळक लोक होते. का ते कळाले नाही . काल नेम्के पैसे काढायचे असल्याने विचारणा करता आली नाही. सरव सहकारी बँकाही नोटा बदलून देतात काय? जाणकारांनी/अनुभवींनी माहीती द्यावी. देशभक्तीचा रांगेशी (बिनबुडाचा)संबध न जोडणारा नाखु

माझा स्वतःचा नोटाबदलीचा अनुभव नाही पण ओळखीतल्या अनेकांशी बोलून कळले की फार कंटाळवाणा किंवा त्रासदायक असा अनुभव कोणालाच आला नाही. बाकी मूळ अनुभवात उल्लेखलेली उदाहरणं वाचून हसावे का रडावे कळेना. बँकेत ५०,००० रुपये अथवा जास्त रक्कम भरायची असल्यास पॅन कार्ड दाखवणे आवश्यक आहे हा नियम येण्यास एक दशक तरी झालेच असावे. तरीही लोक पुन्हा तोच प्रश्न कसा विचारतात? बरं अनेक प्रकारची कागदपत्रे लागतील असे अफवांचे पेव फुटलेले असतांनाही लोक साधे पॅनकार्डही नेत नाही हे ही भारीच!

आताच ICICI ATM मधुन १ तास उभा रहुन २००० काढले.

दुसर्‍या धाग्यावर लिहिले आहे तरी लिहिते. मला खरं तर ८ तारखेला एटीएम वर पैसे काढायचे होते. पण नेहमीच्या एटीएम वर लाईन पाहिली आणि उशीर झालाय उद्या बघू म्हणून घरी आले. रात्री घोषणा झाली तसा अंदाज घेतला. ५०० च्या ६ नोटा होत्या. शंभर एकही नाही. दहाच्या थोड्या चिल्लर. ९ ला सगळेच बंद होत. मात्र दूधवाल्याने ५०० ची एक नोट घेतली आणि आपण बिनधास्त बॅंकेत भरणार सांगून ४०० नीट परत दिले त्यामुळे इमर्जन्सी आली नाही. नेमकी त्याच दिवशी गॅस सिलेंडर आला. मग सासर्‍यांकडून ५०० उसने घेतले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी पैसे मिळवणे भाग होते. एटीएम सगळी बंद. मग मी आणि नवरा बँकेत गेलो. तिथे तोबा गर्दी होती. एक दिवसाची सुटी बघून दोन ऑफिसर्स आणि एक क्लार्क सुटीवर पळाले होते. शिपाई पंढरपूरच्या वारीला. एकटा मॅनेजर आणि एक शिपायाचा प्रमोशन घेऊन क्लार्क झालेला कॅशियर असे दोघेच खिंड लढवत होते. त्या दिवशी मॅनेजरने एकूण तीन वेळा कॅश आणली असे समजले. तीही स्टेट बँक चावटपणा करून दहा आणि वीसची बंडले देत होती. तसली चिल्लर कॅश. त्यातलेच चार हजार रुपये आणले. आता खर्चाला तर पैसे आहेत म्हटल्यावर हुश्श झाले. आम्ही दोघेही माजी स्टाफ असल्याने बँकेत लाईनमधे उभे रहावे लागले नाही. पण नोटा वगैरे मोजायला मदत हवी असेल तर सांगा म्हणून मॅनेजरला सांगितले. त्यावर आपण दोघे मॅनेज करू असे तो म्हणाला. मग संध्याकाळी केश टॅली करायला प्रॉब्लेम झाला तरी फोन कर, मदतीला येऊ असे म्हणून आम्ही बाहेर पडलो. तोपर्यंत दोन हजारच्या नोटा येणार, सुट्यांचा अजून प्रॉब्लेम होईल इत्यादि माहिती कळली होतीच. दुसर्‍या दिवशी १० लाही बहुतेक एटीएम बंद. नवर्‍याला सासू सासर्‍याना घेऊन आता लगेच रत्नागिरी आणि नंतर मुंबई अशा दोन ट्रिप्स करायच्या आहेत. तिकिटे ऑनलाईन काढली असली तरी खर्चाला पैसे हवेत आणि ते दहाचे निरुपयोगी. म्हणून ११ पासून चालू एटीएम च्या शोधात. फक्त आईच्या आईची बँक, ह्द्फ्च, अक्षिस, आणि स्टेट ब्यांक यांची एटीएम शंभरच्या नोटा घालून चालू होते. त्यांच्यासमोर अर्थातच रांगा. ११ तारखेला ह्द्फ्च च्या एटीएम वर नेटवर्क प्रॉब्लेम झाला म्हणून अचानक बरेच लोक रांग सोडून निघून गेले. नशीबाने आम्ही थांबलो आणि एटीएम सुरू झाले. त्यामुळे १५ मिनिटात शंभराच्या थोड्या नोटा हातात आल्या. १२ तारखेला मी एटीएम पर्यंत पोचताक्षणी त्यातले पैसे संपले. काल पुन्हा एस्बीआय च्या एटीएम वर नेटवर्क प्रॉब्लेम आणि लोक निघून जाणे हे होऊन दहा मिनिटात अजून थोड्या नोटा शंभराच्या नोटा मिळाल्या. आता ५०० च्या नोटा आल्याचे कळले की बँकेत जाईन. फक्त मासे सोडून इतर सर्व गोष्टी को ऑप स्टोअरमधे कार्डावर घेता येत आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम असा जाणवला नाही. अमेझॉन आणि स्नॅपडीलने क्रेडिट कार्ड खरेदीवर बरेच मोठे डिस्काउंट दिले आहेत त्याचा फायदा घेऊन बरीच किराणा सामानाची खरेदी उरकून घेतली. आता दोन महिने चिंता नाही. फक्त रोजचे दूध भाजी मासे घ्यावे लागतील आणि डाळ तांदूळ आटा हे पुढच्या महिन्यात. हुश्श्य!

एच डी एफ सी बँकेत खात्यावर पैसे भरायला गेलो होतो , १००-१५० लोकं होती ( १०. ३०, सकाळी ), ही शाखा छोटा असल्याने कर्मचारी वर्ग कमी होता . लोकांचा क्यु बनवायला त्यांना मदत केली . रांगेत उभ्या असलेल्या लोकांचे आयडी प्रूफ व्हेरिफाय रांगेतच करायची आयडिया दिली , ३०-३५ मिनिटे रांगेत थांबायला लागलं , ४० एक मिनिटं मदतीत गेली असतील . पण मजा आली

समजा, माझ्याकडे ५००० रु आहेत - ५०० व १००० मध्ये. आणि हजार एक रुपये इतर नोटांमध्ये आहेत. आणि जर यात दैनंदिन खानपान भागत असेल तर एटीएम चालू होताच पैसे काढले की काम झाले. दिसणारी घाई उगीचच आहे. जेन्युइन लोक्स सोडले तर बाकी काय आहे? तर ... हा "बस सुटेल, पळा पळा" सिन्ड्रोम (लक्षण) आहे. म्हणजे काय रे भाऊ? आपण जर धावलो नाही, चेंगराचेंगरी केली नाही तर बस सुटेल अशी मानसिकता आणि त्यासाठी पळत सुटणे, मग गर्दी होते, धक्काबुक्की होते. एस टी ष्ट्याण्ड किंवा इतरत्र दिसणारे हे चित्र. आणि हे सगळे कधी? जरी आपले रिझर्वेशन असले तरी जरी ही बस सुटली की दुसरी लगेच ५ मिनिटांत आहे हे ठाऊक असले तरी बसमध्ये ५० एक जागा असतात आणि खाली ३०-४० माणसांचाच घोळका आहे हे दिसत असले तरी

मि नेहमि सुटे पैसे घेते बँकेतुन , दिवाळि साठि म्हणुन १०,२०,५० च्या जास्त नोटा घेतल्या होत्या , नाणि घेतलि होती त्यामुळे काहिच प्राअ‍ॅब्लेम आला नाहि,

मध्यंतरी काही दिवस सुट्टीवर असल्याने १० तारखेला लगेचच ऍक्सिस बँकेत (चिंचवड शाखा) कॅश डिपॉझिट करण्याकरिता गेलो. गर्दी प्रचंड होती पण टोकन देत होते. माझा टोकन क्रमांक १७४ होता व ५५ वा क्रमांक तेथे चालू होता. दोन अडीच तास लागतील असे तेथील कर्मचारी म्हणाले. घरी जाऊन निवांत जेवण करून, मॅच बघून दोनेक तासांनी परत बँकेत आलो. अक्षरश: १० मिनिटात रोख भरणा झाला. पैसे मात्र काढले नाहीत, त्याला रांग होती खूप. तदनंतर मात्र हाती शिल्लक असलेले ३०० ₹ पुरवून पुरवून वापरतोय. कार्ड जवळपास सगळीकडे चालत असल्याने रोख पैशांची फारशी गरज अशी भासली नाही.

काल दोन ब्यांकात प्रत्येकी अडीच तास म्हणजे दोन्हींचे मिळून पाच तास रांगेत उभे राहून पैसे काढले स्वनामे धनादेशाने. सार्‍या येटीयमला अक्षरश: टाळे आहे इकडे. दोन्ही ब्यांकेत दोनच्या पाच नोटा मिळाल्या. आता माझ्याकडे दहा नोटांमध्ये वीस हजार आहेत. असो. जीवाच्या भीतीने अधिक काही लिहीत नाही.

In reply to by सतिश गावडे

ते २००० च्या नोटांचा रंग जातो म्हणताहेत ते एक डाव कन्फर्म करुन सांगता का जरा ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

तोच तर मास्टर प्लॅन आहे, सगळं काळं धन 2k च्या नोटात बदलून घेतील लोक्स, मग 50 दिवसात त्याचा रंग थॉककन उडून जाईल, सर्व नोटा प्युअर सफेद कागद राहून जातील, सफेदी कि चमकार एकीच बार, ये है मोदी सरकार! ही खरी नॅनो टेक्नॉलॉजी आहे, लोक नोटा धूत बसलेत! ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

२००० च्या नोटेचा रंग गेला तरच ती खरी आहे असे समजावे असे आज वित्तसचिव सांगत आहेत म्हणे.

दुसर्‍या धाग्यावर माझा अनुभव आधीच लिहिला होता. पण इथे तोच परत थोडक्यात... पैसे बॅंकेत टाकणे, नोटा बदलून घेणे आणि चेकने नकद काढणे या सर्व गोष्टी ११ तारखेला अर्ध्या-पाऊण तासांत केल्या. निवासी व बर्‍याच आयटी कंपन्या असलेल्या भागात असल्यामुळे बँकेत नेहमीच गर्दी असते. त्या दिवशी त्यापेक्षा तीन-चार पट होती. बँकेचा एक माणुस रांगेतून १५-२० जणांना आत सोडत होता. आत बॅंकेचे लोक कारवाईत मदत करत होते, त्यामुळे एकही वाढलेला आवाज ऐकला नाही. चेकने काढलेले पैसे अर्धे १०० च्या व अर्धे २००० च्या नोटांत मिळाले. कार्डने व्यवहार चालू असल्याने ३० डिसेंबरपूर्वी बँकेत जावे लागेल असे वाटत नाही. बँकांचे इतरांचे अनुभव आणि माझा अनुभव पाहता, ज्या बँका मोठ्या आहेत आणि ज्यांचे स्टाफ व व्यवस्थापन चांगले आहे, तेथे चांगले अनुभव आणि इतर ठिकाणी काही समस्या असेच दिसते आहे. म्हणजे समस्या मुख्यतः बँकेतील स्थानिक परिस्थितींवर अवलंबून आहेत.

ग्रामीण भागात सहकारी बँकेचे प्रस्थ आहे. त्यांच्या कडे पैसे नाहीत. पतसंस्था बंद आहेत. शहरात व्यवस्था आहे. पण लोकांनी सहकारी संस्था मध्ये पैसे गुंतवले आहे. राष्ट्रीय बँक तालुक्यातील ठिकाणी. शेत मालाला उठाव नसल्याने तो कुजून गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहेत. लोकांचे हाल कुत्रे पण खात नाही.

थांबवा तर लागलच नाही परत पैसे भरण्यासाठी स्वतःहून फोन करा वेळ निवडा .. एकंदरीत उत्तम अनुभव बाकीच्या २-४ बँकांमध्ये माझे व्यवहार आहेत त्यापेक्षा

In reply to by वरुण मोहिते

हीच माझी बँक आणि हाच अनुभव, :)) बोला, मोहितेसाहेब, आपण स्वप्नरंजन करतो ना, =))

In reply to by टवाळ कार्टा

त्यांच्या नाशकात असेल. :)) बाकी इथे पान नंबर ११३ वर त्यांची वोल्वो ९ नंबरला आहे. यश्टी ३ नंबरला आणि HDFC नामक बँक १ नंबरला आहे. (याहून काही वेगळे पॅरामीटर असतील तर वाचायला नक्की आवडेल.)

In reply to by मोदक

येगझकटली!!! नाशकात ग्राहक कमी आहेत बँकेचे पण सर्व्हिस एकदम हायफाय आहे! असो, आम्हाला स्वप्नवत सर्विस मिळते ती यष्टीत मिळत नाही, जे आहे ते आहे, अनुभव हवा तर घ्या स्वतः! यातही माझी खिल्ली उडवण्याची काय हतबलता आहे ते काही कळत नाही बॉ! ;)

In reply to by संदीप डांगे

तुम्ही जो अनुभव मांडला तो तुम्ही स्वत: अनुभवल्याने त्याच्या सत्यतेविषयी शंका नाही मात्र त्या अनुभवासोबत पुरवलेली अधिक माहिती चुकीची आहे इतकेच. (उदा. हाय प्रोफाईल बँक वगैरे.) मिपाधर्माप्रमाणे टवाळीचा सूर लागल्यास ते खिलाडूवृत्तीने घ्यावे. हतबलता वगैरे गोष्टींना येथे बहुतेक लोक्स फाट्यावर मारतात. (माझ्यासकट..!!)

In reply to by मोदक

जी उत्तम ट्रीटमेंट इथं मिळते इतर बँकांत मिळाली नाही, म्हणून तसे म्हटले, त्यात चुकीचे काय?

In reply to by संदीप डांगे

मग सर्व्हिस हायफाय आहे असे म्हणा...बँक हायफाय नाहीये रच्याकने याला जर मेगाबायटी उपप्रतिसाद आला तर त्यास फाट्यावर मारणेत येइल =))

In reply to by टवाळ कार्टा

बँक आणि सर्व्हिस वेगळं असतं काय? प्लिज एक्स्प्लेन! (आठ शब्द आहेत, किती बाईट्स झाले?)

In reply to by संदीप डांगे

ज्यांना जिथे सर्विस चांगली मिळते ती चांगली बँक . उद्या एसबीआय चांगली म्हणून मी बोलो कि ती चांगली पण तिथे सर्विस चे काही वेळा काय वांदे असतात माहित आहे . माझपण आहे एसबीआय ला अकाउंट माझ्यामते भारतात पूर्वीपासून व्यवहार करणाऱ्या बहुतेकांकडे असाव. बाकी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी ह्यांचे व्यवहार लोकांनी पहिले आहेत त्यात आयसीआयसीआय बरी. माझी स्वतःची बहीण मॅनेजर असून मी एचडीएफसी च्या वाटेला जात नाही . तसं पहिला तर सहकारी बँकांमध्ये भारत बँक खूप चांगली आहे मंगलोर कर्नाटक ची आज खूप मोठी बँक आहे. माझ्या शेट्टी मित्रांची हॉटेल आहेत त्यामुळे मलापण आमच्या इथल्या ब्रान्चला चांगली सर्विस असते पण परत तेच ज्याला जे पटेल ती बँक चांगली. जस्ट प्रोफाइल आणि यावरून पाहण्यापेक्षा अनेक बँक चांगल्या सर्विस देत आहेत . माझ्यामते ऍक्सिस पण तिथे माझा अनुभव नाही ऐकून आहे .असो बाकी हाय प्रोफाइल म्हणजे डॉइशे आणि एचएसबीसी वैग्रे वैग्रे .त्यामुळे कोटक ऍक्सिस ने या वेळी चांगली सर्विस दिली आहे याबद्दल दुमत नसावे .

In reply to by टवाळ कार्टा

मला उलटप्रश्न विचारू नका, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तसेच, डोईश बँकेच्या नाशिक ब्रांचला अगदी घाणेरडी ट्रीटमेंट मिळाली तरी बँकेला हाय प्रोफाइल म्हणायचं का? रच्याकने, प्रत्येक शाखेचे अनुभव सारखेच आहेत माझे. 5 वर्ष अकौंट आहे, अनेक ब्रँच मध्ये गेलोय. जाहिरात नाही, अनुभव आहे.

In reply to by टवाळ कार्टा

बहुतेक मोठ्या बँकांची एक हाय प्रोफाइल बँकिंग डिव्हिजन असते ज्याला प्रायव्हेट बँकिंग म्हणतात. यात खातं उघडण्यासाठी कमीत कमी फक्त ५ मिलियन डॉलर्स लागतात. इथे असे खाते आहे का कोणाचे?

In reply to by ट्रेड मार्क

धन्यवाद ह्या माहितीबद्दल! खरंच ठाऊक नव्हतं! माझ्यासारख्याला हायप्रोफाईल म्हणजे रस्त्यावर उभे राहून वडापाव खाणाऱ्याला मॅकडी मध्ये बर्गर खाणे हायप्रोफाईलच वाटेल, पाच मिल्यां डॉलर म्हणजे रुपयात किती याचा हिशोब करतो आधी...

कॉसमॉस बँकेविषयी माझा १५ वर्षाचा अनुभव उत्तम . आज १ तास रांगेत उभा राहिलो. मध्यम वर्गीय माणूस डाम्बिस नाही याची पुनः खात्री पटली. लोक शिस्तीत होते. बॅक कर्मचारी तर पवित्र कर्म करण्याची संधी आली आहे असे वागत होते. मला वाटते या ऐतिहासिक बदलाचा मी साक्षीदार झालो याचा मला अभिमान वा॑टायला हवा. ५०० च्या नोटा आल्या की सगळी कोंडी फुटेल व उद्धव, मुलायम , मायावती, ममता यांच्या हाती उरेल फत्र्या. असाच अनुभव याच दिवशी एच डी एफ सी त आला. पत्नी सिनियर सिटीझन असल्याने प्रवेश लगेच मिळाला. ५ मिनिटात पैसे मिळाले ,पुन्हा लागले पुढच्या आठवड्यात ही मिळतील असा संदेश अधिकार्‍याने दिला. मी त्याला म्हणालो : आज बॅन्कानी देवालाही मगे टाकले अस्तिक व नास्तिक दोघेही लायनीत उभे आहेत. मोदीनी असाच थेट जनतेशी संपर्क ठेवून उमेदवार ,उपकृत कार्यकर्ते यांच्या मिलीभगत ला विराम देऊन एक नवी लोकशाही उभी करावी. पोलिट्कल कम्युनिटी ला आपण सर्वानी मग तिलांजली देउ. !

पैसे भरायचा फार छान अनुभव कल्याण जनता मध्ये आला.कोणीच नव्हते लाईनीत ठाणे-पाचपाखाडी शाखेत. फक्त भरणा चालु आहे. पैसे मिळत नाहीयेत.

पाच दिवस बँकांमध्ये जाण्याची हिम्मत केलीच नाही, केवळ दोन एटीएम ना भेट दिली तर त्यांचे शटर डाऊन होते. ९ तारखे पासून मेडिकलचे एक बील डॉक्टरांची दोन बिले असा होता होईतो चेकवर निभावण्याचा प्रयत्न केला, एका मेडीकल लॅबला अगदी १४० चा सुद्धा चेक दिला, १० तारखेस अडचण आली ती दूर कोरेगाव पार्क (पुण्यात) जाऊन विकिपीडिया संदर्भाने एक भेट उरकण्यासाठी रिक्षा शिवाय तरणोपाय नव्हता, सुट्यांचा ओळखीतून कुठूनच बंदोबस्त होतनाही म्हटल्यावर मुलींनी हळूच त्यांचा गल्ला मोकळा करून तात्पुरती सोय केली. वापस येतानाच्या रिक्षावाल्याने आमच्या मागच्या सिटवरच्या गप्पा ऐकुन नोटा रद्द केल्याने महागाई आणि भ्रष्टाचार कमी होईल का असे विचारले - त्याने मिटरच्यावर आगाऊ ३० रुपये मागितले होते त्यामुळे त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचा खरपूस समाचार घेतला :) आमचा रिक्षा प्रवास संपेपर्यंत ओशाळून नंतर तो वरचे पैसे नको म्हणाला पण त्याला थोडी फळे विकत घेऊन देऊन उपकृत केले. महिन्याचे सामान दिवाळीमुळे आधीच आले होते, काम करणार्‍यांनाही दिवाळी बोनस दिला असल्यामुळे महिन्याच्या पगारासाठी आजपर्यंत त्यांनी तग धरला, त्यापैकी एक प्रवासास जाणार होत्या त्यांनी ५०० च्या नोटा स्विकारल्या उरलेल्या दोनांसाठी आज महाराष्ट्र बँके शाखेत जाऊन उभा राहीलो तर तेथे बाहेर आधी नावे लिहुन घेऊन नावांचा पुकारा चालू होता आत गेल्यावर पुन्हा लाईन होती, दहा काढावयाचे होते पण पाचा पेक्षा जास्त देत नाही म्हणाले त्यातही प्रत्येकी १०० च्या केवळ दहाच नोटा दिल्या जात होत्या उर्वरीत व्यवहार केवळ २००० च्या दोन नोटांनी ! डिमोनीटायझेशनच्या फायदे आणि मर्यादांची थेअरॉटीकल कल्पना होतीच पण २००० च्या नोटा न टाळता येणे हे एक, दुसरे घरकाम करणार्‍या स्त्रीया साक्षर नसल्यामुळे कोणतीही नकद-पर्यायी व्यवस्था भारतात अमलात येणे किती कठीण असू शकते शिवाय तिसरे ज्यांच्या साठी बँकेत जाऊन पैसे काढले त्या दोन्ही स्त्रीया पैसे नंतर भिशीतच लावणार हे पण नक्की म्हणजे अप्रत्यक्षपणे अधिकृत मार्गातला पैसा अनधिकृत-भिशी मार्गी लागणे अटळ. असो.

विजया बँकेत अगदी १० - १५ मिनीटात पैसे खात्यावर भरण्याचे काम झाले. काहीही त्रास झाला नाही. मी बँकेत पोहोचलो तेंव्हा नेमका लंच टाईम होता. नंतर लगेचच नंबर लागला आणि पैसे भरून घेतले. पैसे खात्यावर दिसल्याचा मेसेज आला, त्यात पॅन नंबर पण दिसत होता. तसेच, मी जाताना मुद्दाम पॅन कार्डची झेरॉक्स नेली होती. ५० हजार पेक्षा कमी रक्कम आहे तर पॅन कार्ड कशाला हवे, केवायसी आहे की वगैरे हुज्जत घालण्यात बँक कर्मचार्‍यांचा वेळ घेणे पटले नाही.

In reply to by मोदक

एसबीआय ला च काय वशाडी आलीय रांग ५ व्या दिवशी पण कायम आहे ,चिंचवड गावात शाखा उघ्डून अजून उणी पुरी ४ वर्षेच झालीले हैत.तरी इतकी गर्दी का तेच कळेना..काही गणंग पुन्हा पुन्हा येतायत का,पैसे बदलून घ्यायला ते शोधायला पाहिजे बँकेनी आणि शाईचं बूच मारायलाच हवे. गेली २५ वर्षे एस्बीयाशी एकनिष्ठ असलेला नाखु

In reply to by नाखु

काही लोक पुन्हा पुन्हा आपले नाही तर दुसर्‍याचे - बोलवित्या धन्याचे पैसे भरायला येत आहेत.पण अशापेक्षा असली ग्राहकांची सम्ख्या जास्त आहे. दरम्यान वाटस अ‍ॅप वर २०१९ पासून आयकर पूर्णपणे बंद तो पर्यंत ५ लाख करमुक्त असा मेसेज फिरू लागला आहे.

सकाळी ११ वा. आमच्या बँकेत गेलो. तिथे नोटा बदलण्यासाठी एक रांग आणि बँक अकाऊंट होल्डर साठी दुसरी अशा दोन रांगा होता. उन्हातान्हात लोक तापत होती. मॅनेजरला विचारले तर तो म्हणाला की शामियाना लावायला सांगितला आहे पण एक दोन दिवस लागतील. मग त्यालाच विचारुन काही मदत हवी आहे काय ते विचारले. सुरुवातीला तो नाही म्हणाला पण मी सांगितले की माझ्याकडे वेळ आहे. हवे तर मी रांगेला मॅनेज करुन देण्याचे काम करु शकतो, तुमची परवानगी असेल तर. मग तो तयार झाला. त्याच्याकडून बेसीक माहिती घेतली. साधारण ११ ते ३ अशी चार तास रांगेतल्या लोकांना फॉर्म वाटणे, त्यावर टोकन नंबर टाकणे, फॉर्म भरायला मदत करणे, मधे घुसणार्‍यांना परत मागे पिटाळणे इत्यादी कामे केली. ४ तासात साधारण १५० (बँकेच्या) ग्राहकांनी पैसे बदलले. ४ तासांतील काही निरीक्षणे : १. मी ठाणे घोडबंदर रोड येथे राहतो. बँक देखील ह्याच भागात. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषेतील मतदान ओळखपत्रे पाहिली. एवढ्या प्रमाणात बंगाली बांधव माझ्या आजुबाजुला राहतात याची मला कल्पनाच नव्हती. एकाकडेही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड नव्हते. ओन्ली निवडणूक आयोगाचे ओळखपत्र ! २. एक गुंठामंत्री : अरे आमच्या जागेवर ही बॅंक उभी आहे तरी तुम्ही आम्हाला लायनीत उभे करता ? असे वारंवार सांगत होता. त्याला नम्र भाषेत सांगीतले की बाबारे, आपल्या कोणाच्याही कपाळावर आपण कोण आहो ते लिहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागामालक आहात हे मला आणि सरकार दोघांनाही माहित नाही. त्यामुळे प्लीज रांगेत उभे राहा. यावर तो धुसपुसत का होईना पण रांगेत उभा राहिला. ३. एक रिक्षावाले यादव काका म्हणाले की सिनिअर सिटीझनला आणि बायकांना वेगळी लाईन का नाहीये ? मी सांगीतले की साहेब, या शाखेत मुळातच एक काऊंटर आहे. त्याला वाढवून सध्या दोन काऊंटर बनविली आहेत. सगळ्यांसाठी वेगळे वेगळे काऊंटर आता बनविणे शक्य नाही. त्यावर तो मला म्हणाला की मी सिनियर सिटीझन आहे मला पुढे सोडा. पुरावा विचारल्यावर त्याने मला त्याचे पांढरे केस दाखविले. उत्तरादाखल मी पण त्याला माझे रंगविलेले आणि त्याखाली लपलेले पांढरे केस दाखविले. आणि पॅनकार्ड बघीतले तर त्याचे वय ५२ होते. त्यामुळे त्याला पुढे सोडले नाही. अजुन काही वर्षांनंतर तुम्ही २००० ची नोट बदलायला याल तेव्हा तुम्ही सिनियर सिटीझन व्हाल तेव्हा नक्की सोडेन असे सांगीतले.. ४. एक युपीवाले काका टोकन देऊनही सावलीत बसायला तयार होईनात. त्यांचा टोकन नंबर ५१. पण अगदी सुरुवातीपासूनच रांगेत उभे राहिले. त्यांना वेळोवेळी समजावले पण त्यांनी ऐकलेच नाही. शेवटी प्रत्येकाने त्यांना आपापले टोकन क्रमांक दाखवत मागे ढकलत ढकलत योग्य क्रमांकावर आणून पैसे घ्यायला लावले. ५. एक शेटीया : हा आपल्या दुकानातील पुर्ण कामगारांची फौज घेऊन आला आणि प्रत्येकाला रांगेत उभे करुन पैसे बदलून घेतले. साधारण ८-१० कामगार. दोन तीन सिनियर आणि एक आजारी महिला यांना रांगेत उभे न राहता पुढे जाता आले. मधेच भाजपावाले येऊन दोन तीन बॉक्स पाण्याच्या बाटल्या वाटून गेले. आता निवडणूकीत पैशाची खोकी नाहित तर पाण्याची खोकी घ्या असे काहीजणांना सांगताच लोकांच्या तोंडावर हसू पसरले. आमच्या बाजुचा हुसेन गादीवाला पैसे काढायला आला तेव्हा त्याला सांगीतले की बाबारे आता तु थोडे दिवस बँकेत पैसे काढायला येऊ नकोस. त्याऐवजी लोकांच्या गाद्या भंगारात विकायला निघतात काय यावर लक्ष ठेव. न जाणे तुला मोठे घबाड सापडेल. एकंदरीत आज २००-३०० लोकांचा जवळून अनुभव घेतला पण कोणीही चुकुन राजकीय चर्चा किंवा ह्या निर्णयावर नाराजगी व्यक्त करणारे स्टेटमेंट केले नाही. शांततेत नोटा बदलून घरी गेले. एकंदरीत आज लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यात मज्जा आली. मी पाहिलेला आकडा कदाचित फारच कमी आहे आणी शहरी विभागातील आहे. ह्या सँपल सेटवरुन "जनता अजिबातच नाराज नाहीच किंवा जनता फारच नाराज आहे" अशा कोठलयाही प्रकारचे निरि़क्षण मी येथे नोंदवत नाहीये याचा राजकीय दृष्टीकोनातून धागे / प्रतिसाद वाचणार्‍यांनी कृपया नोंद घ्यावी.

In reply to by धर्मराजमुटके

एक गुंठामंत्री : अरे आमच्या जागेवर ही बॅंक उभी आहे तरी तुम्ही आम्हाला लायनीत उभे करता ? असे वारंवार सांगत होता. त्याला नम्र भाषेत सांगीतले की बाबारे, आपल्या कोणाच्याही कपाळावर आपण कोण आहो ते लिहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागामालक आहात हे मला आणि सरकार दोघांनाही माहित नाही. त्यामुळे प्लीज रांगेत उभे राहा. यावर तो धुसपुसत का होईना पण रांगेत उभा राहिला.
हे शाब्बास!

In reply to by धर्मराजमुटके

पुरावा विचारल्यावर त्याने मला त्याचे पांढरे केस दाखविले. उत्तरादाखल मी पण त्याला माझे रंगविलेले आणि त्याखाली लपलेले पांढरे केस दाखविले.>>>>> --- वाचून मज्जा आली.

In reply to by धनावडे

पहिल्या पासून शिवसेनेच्या नेत्रुत्वावर "डॉन असल्याचा आरोप फार जुन्या काळापासून आहेच. खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते.

In reply to by चौकटराजा

खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते. +१११

In reply to by धर्मराजमुटके

>>५. एक शेटीया : हा आपल्या दुकानातील पुर्ण कामगारांची फौज घेऊन आला आणि प्रत्येकाला रांगेत उभे करुन पैसे बदलून घेतले. साधारण ८-१० कामगार. विचार करा एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर दहा जणांना घेऊन रोज एका बँकेत जाऊन चार हजारच्या रेटने ४० हजार बदलून घेईल ४५ दिवसात १८,००,००० बदलता येऊ शकतील; पैसे बदलून घेणार्‍यांना निवडणूकवाली शाई लावण्याची गरज प्रथमदर्शनी पटली नव्हती पण आता समजली !

In reply to by संदीप डांगे

>>रोज 4500 बदलायची परवानगी आहे. बहुधा तसे नसावे. ४५०० एकदाच बदलण्याची परवानगी आहे. वेगवेगळ्या ब्रँच/बँकमधून एकाच व्यक्तीने पुन्हा पुन्हा बदलल्यास तसे होऊन नये म्हणून ट्रॅक करण्याची व्यवस्था उपलब्ध नाही म्हणून समस्या आहे. शाई लावलेली असल्यास बँक / पोस्ट कर्मचार्‍याच्या सहकार्या शिवाय उपद्व्याप करणे कठीण होऊ शकते हे खरे. अर्थात सामान्य जनतेची प्रतिक्रीया काय असेल हे सांगणे तुर्तास कठीण वाटते.

In reply to by माहितगार

मला ही शंका निर्णय जाहीर झाला तेव्हाच आली कि एक माणूस वेगवेगळ्या बँकामध्ये जाऊन दोन दोन हजार काढून आणू शकतो. पण मला वाटल कदाचित त्याच्या PAN कार्ड वर ट्रेस करणार असतील. हे शाई लावण आधीच सुचायला हव होत. आज न्यायालयाने ही पैसे काढण्यावर लावलेली लिमिट का आहे असा सरकारला प्रश्न विचारला आहे. न्यायालय कॉमन सेन्स वापरत नाहीत काय?

In reply to by सही रे सई

न्यायालयात जे काही बोललं जातं त्याची नोंद होते. त्यामुळे जरी उत्तर माहित असेल तरी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर दोन्हीची नोंद होते. त्यामुळेअगदी बाळबोध वाटणारे किंवा "काय हे एवढं पण माहित नाही" असं वाटू शकणारे प्रश्न पण विचारले जातात. नंतर कोणी असं पण म्हणू शकतं ना की तुम्ही विचारलं नाही म्हणून मी सांगितलं नाही, त्यामुळे ही अवांतर काळजी घेतली जात असेल.

In reply to by ट्रेड मार्क

नोंद होण्यासाठी असा प्रश्न विचारला असेलही पण नकारघंटा वाजवणारे लोक याचे वेगळेच अर्थ काढून असाही अर्थ काढू शकतील कि बघा हे न्यायालयाला पण हे पसंत नाही किंवा न्यायालयाने पण या वर आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने पण आपल्या वाक्यांचा काय अनर्थ काढला जाईल हे विचार करून काही वेळा बोलावे किंवा प्रश्न विचारावे असे वाटते.

In reply to by सही रे सई

सध्या अश्या नकारात्मक लोकांचं पेव फुटलंय. त्यातले बरेच पत्रकार आणि संपादक म्हणून मिरवत आहेत. पण त्यामुळे न्यायालय आपली प्रथा बदलेल असं वाटत नाही. जर कोणी असा न्यायाधीशाला काही कळतं की नाही किंवा अजून काही उलटसुलट अर्थ काढला तर "अदालत की तौहीन" अंतर्गत शिक्षा सुनावतील. अर्थात त्यावरूनही रान उठेलच. ;)

In reply to by धर्मराजमुटके

सुरुवातीला तो नाही म्हणाला पण मी सांगितले की माझ्याकडे वेळ आहे. हवे तर मी रांगेला मॅनेज करुन देण्याचे काम करु शकतो, तुमची परवानगी असेल तर. मग तो तयार झाला. त्याच्याकडून बेसीक माहिती घेतली. साधारण ११ ते ३ अशी चार तास रांगेतल्या लोकांना फॉर्म वाटणे, त्यावर टोकन नंबर टाकणे, फॉर्म भरायला मदत करणे, मधे घुसणार्‍यांना परत मागे पिटाळणे इत्यादी कामे केली.
हे फार आवडलं. सरकारला आणि बँकांना जसजशा प्रॅक्टिकल अडचणी कळत जातील तसतसे ते मार्ग काढत जातील. तो पर्यंत तुमच्यासारखे लोकं हे सोपं करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करतायेत हे कौतुकास्पद आहे. इथले बरेच प्रतिसाद सकारात्मक आहेत, चांगले अनुभव आल्याचंच सांगतायेत. पण इतर थोडा नाराजीचा सूर लावणारे पण आहेतच. त्यातले राजकारणी सोडले तरी एकुणच मला वाटतं की खास करुन बँक कर्मचार्‍यांना, हे सगळं गणित सोडवायला थोडा तरी वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर पण आपल्याबरोबरच ही बातमी आदळली आणि २ च दिवसांच्या अवधीत त्यांना कार्यवाही पण सुरु करावी लागली आहे. कदाचित त्यांच्याकडे ऐन वेळी स्टाफ नसणे, नोटा कमी पडणे, छोटी ब्रान्च असल्याने मुळातच एवढ्या गर्दीला हाताळण्यासाठी आवश्यक साधनं नसणे हे अगदी स्वाभाविक आहे. आणि कुणी सध्या तक्रार ही करत नाहीये. आज बातमी आलीये की सगळे टोल्स, आणि आंतरराष्ट्र्य विमानतळाची पार्किंग्ज २४ नोव्हेंबरपर्यंत फ्री असणार आहेत, तेवढीच कॅश कमी लागेल. माझ्या तुटपुंज्या का होईना पण एकुण अनुभवावरुन तरी असं माझ्या लक्षात आलंय की व्हॉल्युमला सांभाळायचं जे उपजत कौशल्य आपल्या व्यवस्थेकडे आहे, ते इतर अनेक ठिकाणांपेक्षा खुपच बरंय. आता पुढच्या भारतवारीत घरी येईपर्यंत कदाचित उधारीचं जीवन जगावं लागेल ;) पण हरकत नाही.

विश्वेश्वर बँक नव्यानेच शाखा सुरू झालीय. रविवारी दोनहजार मिळाले (शंभरीचे) अजमेरा, मासूळकर नेहरूनगर कोणतेही एटीएम उघडत नाहीत. आयसीआयसीआयचे रविवारी रात्री उघडले होते एक तास.

In reply to by विनटूविन

लाक्कीया! वापरून टाका सगळे शक्य असेल तिथे, तेवढीच चिल्लर फिरेल

हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सेल्फ चेकने जे पैसे काढलेत त्या नोटा कोणत्या डिनॉमिनेशन मध्ये? अजून आता सेल्फ चेकने इतक्यात पैसे काढले नाहीत, म्हणून विचारत आहे.

In reply to by यशोधरा

पण दोन हजाराच्या अनिवार्य करीत नाहीत्,अगदी दहा हजार काढणार असाल तर एक दोन नोटा दोन हजाराच्या घेतल्या तरी चालतील.मी ७००० काढताना एक २ हजाराची व उर्वरित १०० च्या ५० असे मिळाले. परिचयातील २-३ लोकांना ५०० उधार दिले आहेत. पोष्टात प्रयत्न करून पहा बदलायच्या असतील तर, आणि पैसे काढायचे असतील तर फक्त आपल्याच शाखेतून (जिथे खाते आहे तिथून्च काढता येतील) भरणा रक्कमेसाठी होम ब्रँच मध्ये खाते असेल तर कितीही भरू शकता पण इतरत्र (त्याच बँकेच्या इतर शाखेत खाते) असेल तर मर्यादा २५००० (पंचविस हजार) आहे हा एस्बीआयच नियम आहे बाकी बँकेत काय नियम आहे माहित नाही. खुलासेदार नाखु

In reply to by नाखु

ठीक आहे नाखु, धन्यवाद. पहिल्यांदा ४,००० आणले तेच पुरत आहेत अजून. बघू, पुढील आठवड्याच्या शेवटी वगैरे जावे लागेल.

In reply to by यशोधरा

जर बँकेकडे शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा उपलब्ध असतील तर थोड्या नोटा देतात. मी परवा बावीस हजार काढले मुलाची शाळेची फी भरायची आहे आणि घरखर्चासाठी म्हणून. माझ्या आधी रांगेत उभे होते त्यांना दोन हजाराच्याच नोटा देत होते. पण माझा नंबर येण्याआधी बँकेत नवीन रोख रक्कम आली. त्यात शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा होत्या. मला पाच दोन हजाराच्या नोटा दिल्या आणि पन्नासचे दोन बंडल आणि वीसचे एक असे दिले.

हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.

हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.

मी सुद्धा जवळच्या hdfc बँकेत गेलो. माझ्याकडे ७ हजार होते आणि तेही 100 च्या नोटा.. मला तूर्तास जास्त कॅश ची गरज नसल्याने ४ बँकेत भरले. ना जाणो कोणाला कामास येईल हा हेतू. बाकी उरलेले मित्रांना दिले आणि त्यांच्याकडून बँक ट्रान्सफर करून घेतले..

In reply to by DeepakMali

तुमच्यासारखे दोन पाऊलं जास्त पुढे जाऊन मदत करताहेत... वेल डन.

वाचकां पर्यंत माहिती पोहचावी म्हणुन दुसर्‍या धाग्यात दिलेली लिंक इथे सुद्धा देत आहे... The question that still need to be answered is; are the new Indian currency notes printed with the involvement of blacklisted Crown Agent companies who supplied and were the source of fake notes for Pakistan at the expense of India’s National Security? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- The Secret World Of Indian Currency Printers

व्हाट्सअप वर तर एक बहाद्दराने रु.६०, रु.७५, रु.१०० आणि रु.१५० चे फोटो टाकले आहेत... वर्तमान पत्रे चाळली पण विदा नाही मिळाली... कोणाला अधिक माहिती आहे का?

In reply to by विशुमित

असो..मला विदा मिळाली आहे ...ही स्मृत्यर्थ असलेली नाणी आहेत.. (वरच्या प्रतिसादात "नाणी" टाकण्याचे राहून गेले आहे) http://www.telangananewspaper.com/125-rs-coin-launched-modi/

bom (तेच ते चितळे समोरील) मधून सुदैवाने जास्त लायनीत थांबावे न लागता आणलेली २००० ची नोट बघत निवांत वाट पाहत आहे, बरेच atm बंदच आहेत, Icici मध्ये जास्तीचे असिस्टंट्स नेमले होते, ते सौजन्याने वागत, मदत करत होते, ज्यांचे तिथे अकाउंट्स आहेत त्यांचे काम लगेच होत होते, गर्दी असून मॅनेज होत होतं. रोज बँकांचे मेसेज न चुकता येतायत, असं करा तसं करा, आम्ही सेवेसी तत्पर आहोत :) गेल्या आठ दिवसांत जेमतेम दोन तीनशे रुपये खर्च केले असतील, बाकी लागेल तिथे कार्ड, कामे खोळंबलीयेत पण डोक्याला शांतता तेवढीच.

काल ज्या बँकेत सेवा केली तिथेच आज खात्यावरुन पाच हजार काढले. फार गर्दी नव्हती. १० मिनिटात काम झाले. एक माणूस नव्या २००० च्या नोटा भरणा करण्यासाठी आला तर कॅशीयरने नव्या नोटा आत्ता लगेच डिपॉजिट करता येणार नाही असे सांगीतले. काय कारण असावे बरे ?

In reply to by धर्मराजमुटके

आमच्या दूधवाल्याने पण नवी २००० ची नोट घ्यायला नकार दिला. बँकेत भरणा करून घेतील याची ग्यारंटी नाय, म्हणाला.

In reply to by धर्मराजमुटके

मी आज नव्या नोटा एच डी एफ सी बँकेत भरल्या.रांगेत बसून माझ्या कडे असलेल्या जुन्या नोटा हि भरल्या. दोन्हीला वेगळी स्लिप भरून दिली होती. काहीच प्रश्न नाही उद्भवला.

८ तारखेला ही घोषणा झाल्यापासून बँकेत / एटीएममध्ये गेलोच नव्हतो. हजारेक रुपये जवळ होते, त्यात भागवत होतो. तीन-चार दिवसांत सर्व काही मूळपदावर येईल असं वाटत होतं. मग आम्ही दोघांनी ८ तारखेपासून रवींद्र नाट्य मंदिरमधल्या पु.ल. कला महोत्सवाच्या कार्यक्रमांना शनिवार वगळता रोज हजेरी लावली. मस्त एन्जॉय केलं. पैसे वगैरे शब्दश: विसरून गेलो होतो. बस प्रवासाचा काय तो थोडा खर्च होत होता. पण इतके दिवस झाले, तरी बँका-एटीएमसमोरची गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं दिसत होतं. पैसेही संपत आले. शेवटी आठ दिवसांनी आज सकाळी ९ वाजता बँकेसमोर रांगेत नंबर लावला. सव्वाबारा वाजता नंबर लागला. ५००च्या नोटा खात्यात भरल्या. नोटा बदल होणार नाही, विड्रॉवल स्लिपद्वारे / स्वयंचेकद्वारे फक्त साडेचार हजार रुपये (त्यात २०००च्या दोन आणि शंभराच्या पाच नोटा) काढता येतील, असं ज्ञानामृत मिळालं. मग थोडं डोकं चालवून साडेतीन हजाराची मागणी केली, तेव्हा २०००ची एक, शंभराच्या दहा आणि पन्नासच्या दहा असे साडेतीन हजार मिळाले. बायकोला एका खाजगी बँकेमध्ये ५००च्या नोटा बदलून १००च्या नोटा मिळाल्या. एकूणच खाजगी बँकांमध्ये नम्र सेवा, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये थोडा सरकारी खाक्या, तर सहकारी बँकांमध्ये परिस्थिती मॅनेज करणं अवघड... असं सर्वसाधारण निरीक्षण. या आठ दिवसांमध्ये सामान्य लोकांनी – रोख कमाईवर रोज अवलंबून असलेले दूधवाला, भाजीवाला या लोकांनी उधारी देण्याची तयारी दाखवली. हे लोक खरे असामान्य वाटले. आज एक गंमत – भरघोस वाढलेल्या माझ्या पांढर्‍या दाढीमुळे, पोलिसांनी मला ज्येष्ठ नागरिक समजून आत सोडायची तयारी दाखवली. पण मी ज्येष्ठ नागरिक नाही असं नम्रपणे म्हणून मी रांगेत उभा राहिलो. मग सव्वातीन तासांनी माझा नंबर आल्यावर ज्या आदराने, सन्मानाने पोलिसाने मला आत सोडलं, त्याचं समाधान मला नोटा मिळाल्याच्या समाधानापेक्षा जास्त वाटलं.

नाहितर नस्ते खर्च चालूच रहातात सध्या घरकामाची बाई आणि मालकिण बाई एकाच स्टेट्सला आहेत.. पैसे नाहित पण मस्त चालले आहे. आपल्याकडे बेहिशेबी पैसा नाहि याचा खराखुरा आनन्द होतो आहे. आज नोटा रद्द झाल्यानन्तर पहिल्यन्दी वडिलाना ब्यान्केत नेले. पटापट कामे झालि मुलगा हौस्टेलला मजेत आहे काहि अडत नाहि त्याचे रोख पैसा नसला तरी जनता सहकारी ब्येन्क मधे काम पटकन झाले. सासर्यन्चे अकाउन्ट मदतिला आले. रान्ग नव्हती व कमी का होइना पैसे देत होते. विरोधकान्चि इतकी काय अडचण होते आहे?

जेलरोड, नाशिक येथे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत १०, १३ व १६ तारखेला पैसे भरण्यासाठी गेलो. ४ ते ५ लोकांपेक्षा जास्त मोठी रांग नव्हती. बाकी १०० च्या नोटा मिळत नसून पैसे एकदा काढले तेव्हा फक्त २००० ची नोट मिळाली. अनुभव उत्तम!

In reply to by संदीप डांगे

मला वाटते गर्दीचा आणि बँकेच्या ग्राहकांचा काहीही संबंध नाही. कारण बँकेचे ग्राहक जे पैसे भरण्यासाठी किंवा चेकने काढण्यासाठी जात आहेत त्यांचे काम एक तासाच्या आत होत आहे. (याला स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँका अपवाद असू शकतात. कारण दोन्ही जुन्या सार्वजनिक बॅंका आहेत आणि बहुतेक पेन्शनरांचे खाते हे या दोन बँकात आहेत) ही जी मोठी रांग बहुतेक सर्व बॅंकांच्या बाहेर लागली आहे ती मुख्यत्वे नोटा बदलण्यासाठी आहे. आणि बॅंकेचे खातेदार नसाल तरी बँका नोटा बदलून देत आहेत. आता एका व्यक्तीला एकदाच नोटा बदलून मिळणार अशी सरकारी घोषणा झाल्यावर बहुतेक बॅंकांच्या बाहेरची गर्दी कमी झाली आहे.

३ प्रकारच्या रांगा दिसत आहेत . नोटा बदलण्यासाठी - हि रांग फारशी मोठी नाही . १५ ते २० मिनीटात नोटा बदलुन मिळतात . रक्कम काढण्यासाठी - हि रांग तुलनेने मोठी आहे . तरी ३० ते ४० मिनीटात काम होते . रक्कम जमा करण्यासाठी - हि रांग सगळ्यात मोठी आहे . निदान एक तासाची निश्चिंती बगुनाना .

मागील ८ दिवसात आमची शाखा ( लहान आहे.एकुन ५ कर्मचारी आहेत) रोज सरासरी ३५ लाख जमा करतेय. ९ लाख बदलुन देतेय आणी ३ लाख विड्राल होतात. गावातील बँक ऑफ महाराष्ट्र ची सेवा सर्वात चांगली आहे( मलाच धक्का बसतोय). एसबीआय सर्वात बेक्कार. पणजी (आईची आईची आय) बँकच एटीम सर्वात आधी (११ तारखेला ) चालु झाले. बँक ऑफ महाराष्ट्र चे १२ तारखेला (दुसरा धक्का). एकुणच आमच्या गावात कुठेही गोंधळ नाही.लोक एकमेकांना मदत करत आहेत. बँकवाले पुण्यकर्म असल्यासारखे वागत आहेत. लिहीण्यासरखे बरेच आहे पण वेळेअभावी थांबतो. -: जाता जाता- तुमच्याकडील रोख रक्कम जपुन वापरा.पुढील आठवड्यात रोख रक्कमेची चणचण भासु शकते.

८ नोव्हेंबरला नोटा रद्द करण्याचा निर्णय झाल्यापासून कालपर्यंत पूर्ण थंड होतो. कोणत्याही एटीएम मधून पैसे काढले नव्हते आणि जवळील जुन्या नोटा बदलण्याची घाई करायची नाही असे ठरविले होते. किंबहुना १ डिसेंबर नंतरच मोहीम सुरू करायची असे ठरविले होते. परंतु काल एचडीएफसी बँकेचा लघुसंदेश आला होता. नोटा बदलून घेणे व पैसे काढणे सुलभ होण्यासाठी तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरला कॉल करून वेळ ठरवून बँकेत या. आज सकाळी वृत्तपत्रात वाचले की आजचा दिवस बँका फक्त त्यांच्या खातेदारांनाच सेवा देणार आहेत. बँकेचा इम्पेरिआ ग्राहक असल्याने रिलेशनशिप मॅनेजरला फोन केल्यावर त्याने १२ वाजता शाखेत येण्यास सांगितले. तिथे १२ वाजता पोहोचल्यावर दिसले की बँकेच्या बाहेर अंदाजे २५-३० जणांची रांग आहे. परंतु मॅनेजरने थेट आत घेण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे रांगेत उभे न राहता आत पोहोचलो. इतर जनता रांगेत उभी आहे, परंतु आपण रांगेत न थांबता थेट आत आलो याबद्दल मनातून अपराधी वाटत होते. परंतु बँकेत मी अगदी क्वचितच जातो. बँकेशी संबंधित जवळपास सर्व कामे मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून करतो. ज्या विशिष्ट शाखेत माझे खाते आहे तिथे तर आज मी जवळपास ३-४ वर्षांनी गेलो. आज अनेक वर्षानंतर एका कामासाठी इतर ग्राहकांवर अन्याय करून बँकेने अधिकृतरित्या दिलेल्या सुविधेचा लाभ घेतला असला तरी मी इतर वेळी बँकेत जाऊन इतर ग्राहकांचा वेळ खात नाही व भविष्यात पुन्हा बॅंकेत प्रत्यक्ष कामाला जाऊन इतर ग्राहकांचा वेळ खाण्याची वेळ लवकर येणार नाही असा सोयिस्कर विचार करून मनातील अपराधी भावना झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. मला तीन कामे करायची होती. जवळ असलेल्या ५००/१००० च्या नोटा खात्यात भरणे, स्वतःच्या खात्यातील २४००० रूपये चेक वापरून काढणे व अजून एक चेक खात्यात भरणे. आम्ही दोघे जोडीने आतील दोन वेगवेगळ्या रांगेत उभे राहून तीनही कामे पूर्ण केली. आयडी प्रुफ व्हेरिफिकेशन सुद्धा १० मिनिटांच्या आतच झाले. जुन्या नोटा भरण्याच्या रांगेत बर्‍यापैकी वेळ गेला. एकंदरीत सर्व काम पूर्ण होण्यास अंदाजे ५५ मिनिटे लागली. हातात २४००० रूपये (२००० च्या १० नोटा व १०० च्या ४०) असल्याने उगाचच गारगार वाटत आहे. बॅंकेचा सर्व कर्मचारी वर्ग अत्यंत सौजन्यशील होता. रांगेत उभे असलेले कोणीही तक्रार करीत नव्हते. बँकेच्या आत व बाहेर गर्दी असूनही लोकांना ठराविक वेळाने आत सोडण्यात येत असल्याने चेंगराचेंगरी झाली नाही.

बँक ऑफ महाराष्ट्र च्या रांगेत सुमारे तीन तास उभे राहून चार हजार बदलून घेतले. कमाल मर्यादा रु. साडेचार हजार असूनही फक्त चार हजारच दिले. त्याही दोन हजाराच्या दोन नोटा. त्या घ्यायला कोणी तयार नाहीत. एचडीएफसी बँकेत जवळचे पैसे भरायला गेलो तर बरीच मोठी रांग होती. रांगेत उभे राहिल्यानंतर बऱ्याच वेळाने समजले की पैसे डिपॉजिट करायला डिपॉझिट स्लिप, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक चेक ही लागतो. चेकबुक नेले नसल्याने परत यावे लागले. स्टेट बँकेपुढची रांग पाहून तिथे थांबण्याचे धाडस झाले नाही. एक शेजारी पैसे बदलून घ्यायला बँक ऑफ इंडिया च्या रांगेत सकाळी आठ वाजता थांबले होते. त्यांचा नंबर दुपारी तीन वाजता लागला. आता युनियन बँक ट्राय करणार आहे. पाहूया. आले सरकारच्या मना...