बंंगालची झालमूरी अन एका मिपाकराची मनकी बात.
पश्चिम बंगालच्या राजकारणात बदल हा अपवाद नसून परंपराच आहे. या भूमीने नेहमीच सत्तेला प्रश्न विचारले, विचारसरणींना आव्हान दिले आणि आवश्यक वाटल्यास प्रस्थापितांना नाकारण्याचे धाडस दाखवले. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीने हा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. या निकालाकडे केवळ सत्तांतर म्हणून पाहणे म्हणजे बंगालच्या राजकीय मानसशास्त्राचा अपमान ठरेल; कारण इथे मतपेटीतून उमटलेला कौल हा नेहमीच अधिक खोल, अधिक सूक्ष्म आणि अधिक बहुपदरी असतो, असे म्हणता येते.
मिसळपाव