नशीब...
जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर
काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर
आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर
आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर
राजेंद्र देवी
खूप छान आशय आहे कवितेचा .... तुमच्या कवितेने ४ ओळी सुचल्या,
हयात असता अंतर ठेवती,
गर्जे मध्ये दुर सारिती,
जिथे माणूस होतो "देव" मेल्यावर,
काय तरी उपयोग अश्या जाण्यावर !!
ह्म्म...
धन्यवाद...
खूप छान आशय आहे कवितेचा ....
कमा
धन्यवाद...
:))) _/\_
किमान शब्द कमाल आशय.... छान..
धन्यवाद...शार्दुलजी...