Skip to main content

एवढीशी गोष्ट

लेखक abhajoshi14 यांनी शुक्रवार, 20/05/2016 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला. सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने. पण माझ्या दोन च साध्या अपेक्षा आहेत कि माझ्या हि आवडीच्या भाज्या केल्या जाव्या. महत्वाचे म्हणजे पहाटे चे जे १-२ तास असतात त्यात घरात शांतता असावी कारण मला शांत झोप फार प्रिय आहे. पण नेमके सकाळी ५:३० झाले रे झाले कि ह्यांचे किचेन मध्ये खुडबुड चालू होते आणि स्पष्ट च सांगायचे तर आदाळ आपाट चालू. मुद्दाम करतात म्हणावे तर तसा त्यांचा स्वभाव नाही. एक दोन वेळा सांगून पण बघितले कि सकाळी नको किचेन मध्ये आवाज पण काही फरक नाही. सात ला स्वयपाक वाली बाई येते ती करेल सगळे. पण एक नाही आणि दोन नाही. म्हणून आज जर माझे जरा डोके सटकले. नवर्याला सांगितले आहे कि मला इअर प्लग आणून दे नाहीतर मी वेडी होईन हो. दिवस भर ऑफिस मध्ये काम करायचे आणि रात्री जरा शांत झोप लागावी तर आवाज चालू. मला नाही हे सहन होत. साधा उपमा करायला घेतात आणि चमचा किव्वा झारा एक २० वेळा तरी कढाई वर आपटतात. सकाळ च्या वेळेस ह्याचा फार त्रास होतो. ओवन चे दार पण धण धण आपाटतात. मग माझा अक्खा दिवस खराब जातो हो. कामा वर पण परिणाम होतो." वीकेंड ला आमची ही आणि त्या सासूबाई गीता वाचनाला भेटतात म्हणून त्यांची पण बाजू कळली सासू ची बाजू - "एकही गोष्टी ची मदत म्हणून नाही. मी आहे म्हणून ह्यांचे घर चालते आहे. मग ठरवली मी रोज ची भाजी तर काय हरकत आहे. मला आज काल लवकर जाग येते. पूर्वी स्वयपाक मी करायची पण हिने बाई लावून टाकली का तर आवाज येतो पहाटे पहाटे फार. मग आता मी त्या बाई साठी कणिक काढून ठेवते, ह्यांना नाश्ता बनवते तर आवाज होणार च न. मला मान्य आहे कि तिला ऑफिस आहे आणि मला दुपारी एक डुलकी काढता येते घरी असल्या मुळे. पण मग सकाळी उठल्यावर काय नुसती हाताची घडी घालून बसून राहायचे? हे सगळे ऐकून प्रथम तर मला हुश्श झाले कि काही मेजर भांडण नाही आहे. मग मी विचार करू लागलो. एक माजी जेलर असल्यामुळे मला माहिती आहे कि माणसाला झोप किती महत्वाची आहे. कैद्यांकडून कबुली घ्यायची असल्यास सोपी पद्धत म्हणजे त्याला झोपून च द्यायचे नाही. पूर्ण पणे मान्य केले जातात गुन्हे लगेच. आणि हि तर साधी सरळ सामान्य बाई. मग माझ्या बायको ने एकदा गीता वाचन करताना एक कल्पना काढली कि आपण सगळ्यांनी सकाळचा हास्य क्लब चालू करू या. सासू बाई त्या निमित्ताने सकाळी सकाळी खाली जावू लागल्या आणि सुने ला तिचा महत्वाचा एक तास झोप मिळू लागली. आणि थोडे च दिवसात ते घर पुन्हा हसू खेळू लागले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6041
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

शेवट सोडून सगळा लेख पटला ! कितीही गोग्गोड शेवट वाटला तरीही तो असाच झाला असेल असे वाटत नाही ! बादवे, मला त्या सासुबैचा राग आलाय !

In reply to by जव्हेरगंज

तुमचापण पैलाच लेख आहे असं दिसतंय ! ढिगभर लिहण्यापेक्षा मोजकं लिहणारे लेखक मला फार आवडतात ! शुभेच्छा!

In reply to by सिरुसेरि

एक माजी जेलर असल्यामुळे----- तुमचे जेलर पदावरील अनुभव वाचायला आवडतील .हेच म्हणायचे आहे.

हास्य क्लब हा तात्पुरता इलाज आहे. नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर जर हास्य क्लब बंद झाला तर?

In reply to by सतिश गावडे

हेच म्हणायचे होते.. परस्पर संवादाने कितीहि जटिल समस्या सुटतात..

In reply to by संजय पाटिल

परस्पर संवादाने कितीहि जटिल समस्या सुटतात..
होय. मात्र समोरच्या व्यक्तीच्या मनाची कवाडे संवादासाठी खुली असतीलच असे नाही.

In reply to by सतिश गावडे

दवणीय साहित्यिक प्रतिसादाचे उदाहरण म्हणावे का?

In reply to by रमेश भिडे

नाही. व्यक्तिमत्व मानसशास्त्र समजून घेतलेला असल्याने दिलेला प्रतिसाद आहे हा.

अनुभव चांगला. आणि पर्यायही छानच पण, पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरुच होणार. खरंय आजच्या सासवा पूर्वीप्रमाणे त्रास देत नाही, छळ करीत नाही, खुप भांडनही करत नाहीत, पण, हा छळाचा नवा प्रकार नव्वदच्या दशकात आला असं वाटतं. सुनेला ऑफीसला जायचं असतं आणि या किचनमधे खुडबुड खुडबुड करतात. खरकटी भांडी गॅसच्या ओट्यावर ठेवतात, गॅसचा ओटा खराब करुन ठेवतात. चहाचे कप, इडल्या वगैरेचे भांडे सुद्धा उचलून ठेवत नाहीत. सासर्‍यांना चहा करुन देत नाहीत, स्वतःच सकाळी सकाळी भरपेट ताव मारतात. स्वतःपूरतेच करतात. नातवांवर तर अजिबात प्रेम नाही. स्वतःच्या मुली आल्या की सुनबै ऑफीसला गेल्या की काय काय करुन भरवतात विचारु नका. महिनाभरातलं सर्व सामानाची वाट आठ पंधरा दिवसात लागून जाते. बरं, मुलाला सांगांवं तर तू त्यांना समजून घेत जा. कधी चिडून बोलले तर डोळे मोठे करुन बोलतात, आपला दिवस खराब त्याचा दिवस खराब, ऑफीस मधून घरी आलो की दारात हे उदास चेहरे स्वागताला हजर, पुन्हा गॅसच्या ओट्यावर भांडी खरखटी पडलेली. घरात जायला नको वाटतं. कंटाळा आला या संसाराचा. अशा कथा हल्ली खुप ऐकायला मिळत आहेत. उपाय सांगूच शकत नै आपण. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय आजच्या सासवा पूर्वीप्रमाणे त्रास देत नाही,.... ... कंटाळा आला या संसाराचा.
नक्की हे श्री.बिरुटेंनी लिहिले आहे कि सौ.बिरूटेंनी लिहुन घेतले आहे.! ;)

पुर्वी दुरदर्शनवर 'मिट्टी के रंग' (?) सिरीअलमध्ये बघितलेली अशीच एक कथा आठवली - एक प्रथितयश लेखक पुढील लिखाणासाठी एका गावातील घरी जाउन राहतो . त्याला शेजारच्या घरातुन सासुचा सुनेवर सतत चालणारा आरडा ओरडा ऐकु येत असतो. तो लेखक त्या गरीब ,अभागी सुनेवर , तिच्या छळावर आपली पुढील कथा लिहितो. त्या गावातुन निघण्यापुर्वी तो सहज अंगणात जाउन शेजारील घराकडे बघतो , तेव्हा त्याला सासुच्या सुनेवर सतत रागावण्याचा उलगडा होतो . कारण ती सुन सतत सासुला वेडावुन दाखवत असते .त्यामुळे चिडुन सासु तिच्यावर सारखी ओरडत असते .

चारठाव आयते खायला मिळते आहे, निवांत लोळत बसता येते आहे, चहा नाष्टा दुसरेच कोणी करते शिवाय स्वयंपाकाला बाई. एवढी ऐष असुनही एवढ्या फालतू कारणांसाठी तोंड वाकडे असणार्‍या लोकांचा (बायकांचाच असे नाही. एकुणच सगळ्यांचा) खुप त्रास होतो. बॅडरुममच्येच गॅस ठेवला आहे का सकाळी सकाळी त्या बाईला इतका त्रास होतो ते. बिचारी सासू नाष्ट करते लव्कर उठुन आणि यांना आयता गिळायला मिळते आहे तर त्यातही रडतात लोक च्यायला.

डबल ढोलकी असा प्रकार (बहुतेक वेळा) असतो (काही स्न्माननीय अपवाद असतीलही) सा.बा.१: स्वयंपाक घरात येऊ दिले नाही की सगळीकडे तक्रार मला अजिबात स्वयंपाक्घरात मनासार्खे (राज्य) नाही सा.बा.शेजारीण तीही सा.बा.च: मला मेलीला स्वतःचा चहा, यांचा चहा स्वतः करून घ्यायला लागतो (खरी मेख अशी की कसाही केला तरी सुनेने केलाय म्हणून सतत नाव ठेवत असल्याने तिनेच साम्गीतलेले असे अस्ते किंवा यांनीच कधी तोर्यात माझा मी करून घेते असे म्हटलेले असते.) परिणाम दोन्ही सा.बा. दु:खी. सुर्दैवाने पुरुष संसार निव्रुत्तीनंतर वाचन-फिरणे (पक्षी चकाट्या),गेला बाजार बँक बाजार हाट यात मन रमवतात असलीच ईच्छा/ऐपत तर व्य्ख्यानमाला/कारेक्रमांना जातात, आणि त्यावेळेला घरी साबांच्या मैतरेणी येवून आप्लया घर्ची धुणी धूत असतात.त्याने कुणाचेच कपडे कधीही साफ रहात नाहीत हेच खरे. उमेदीच्या काळात आवडीने आणि सव्डीने एखादा छंद्/कला लावून घेत्ल्या स्त्रीयांना संसार निव्रुत्ती फार क्लेशदायक होत नाही. हे अनुमान नव्हे आणि फक्त मत आहे आणि लगेच भांडायला येऊ नये. सन्मानीय अप्वादींनी हलके घेणे. वाचक नाखु

पार्ट्या आपापल्या जागी योग्य आहेत.पण........... पुर्वापार चालत आलेले हे सख्य असेच चालु रहावे व यांच्यात नेहमी कडाक्याचे प्रेमळ बोलचाल होत रहावी हीच इच्छा (तप्पु पण)

आयतं खायला मिळालं तर मी सगळे आवाज कानाआड करायला तयार आहे.इकडे या हो साबा ;)