आनंद यादव हे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टे आहेत.आजवरचे त्यांचे लिखाण हे दुय्यम दर्जाचे व टाकाउ आहे.त्यांचे अध्य़क्षपद हे शरद पवारांच्या ब्रा.विरोधी धोरणाचा भाग आहे.आठवा तो बोकड बळी,अरुण साधुंचे टिळकांबद्द्लचे वक्तव्य,निळु फुलेंचि समाजवाद्यांवर ब्रा. म्हणुन टीका.कमीत कमी ब्रा.तरी अशा लोकांचं उदोउदो करणं थांबवावं.दिपक टिळक फुलेंचा सत्कार काय करतायत,मेधा पाटकर आर.आर.चे गुण काय गातायत,म्हणे ब्रा.द्वेष 'वगेरे वगेरे'.जणु काही ब्रा.चा तिरस्कार ही एक किरकोळ गोष्ट आहे.
आजवरचे त्यांचे लिखाण हे दुय्यम दर्जाचे व टाकाउ आहे.
डॉ. आनंद यादवांचे सर्वच साहित्य आम्ही काय वाचलेले नाही. जे काही वाचले आहे, ते बरेच समिक्षात्मक स्वरुपाचे वाचलेले आहे. पण त्यांचे लेखन दुय्यम दर्जाचे आहे, हा शोध आपण कशावरुन लावला. आणि समजा तसे असलेच तर ते त्यांच्या साहित्य लेखनातील कोणत्या पुस्तकात दुय्यम / टाकाऊ लेखनाचा अनुभव येतो, ते संदर्भासहीत पटवून द्यावे ! उगाच विरोध करायचा म्हणून काहीही लिहू नये असे वाटते.
( असे लिहिण्यामागे आपल्याशी संवाद व्हावा, याच भूमिकेतून लिहिले आहे. हेही नम्रपणे नमूद करतो.)
स्वतःच्या मालकीची शेती नाही. दुसर्याच्या शेतावर कूळ म्हणून राबणार्या कुटूंबात जन्मलेल्या आनंद यादव यांना शिक्षणाचे कोणतेच वातावरण नव्हते. गुरा-ढोरांमागे, शेतीकामेकरुन शिक्षणाची आवड जोपासली. आपला मुलगा शिक्षणाच्या नादी लागला तर आपले पोटाचे हाल होतील असे वाटून शिक्षणाच्या आड येणार्या वडिलांची मर्जी सांभाळली. शेतीची कामे सांभाळून अभ्यास करत राहिले. अशा वेगवेगळ्या अडी-अडचणीतून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी गाव सोडले. थोरामोठ्यांच्या मदतीने एम. ए झाले. पुढे प्राध्यापकही झाले पण शहरात बसून खेडेगावाचे चित्रण करुन शहरी वाचकाला त्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. जे जे अस्सल ग्रामीण होते, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखनामधून व्यक्त केले. त्यामुळे ग्रामीण साहित्यासाठी वाहून घेतलेल्या (या पूर्वी निवडणूकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी काही कडवट भाष्य केल्याचे वाचनात आले, पण ती एक सहज प्रतिक्रिया असते असे वाटते) माणसाचा हा एक मोठा गौरव आहे, असे आम्हाला तरी वाटते !!!
-दिलीप बिरुटे
स्वतःच्या मालकीची शेती नाही. दुसर्याच्या शेतावर कूळ म्हणून राबणार्या कुटूंबात जन्मलेल्या आनंद यादव यांना शिक्षणाचे कोणतेच वातावरण नव्हते. गुरा-ढोरांमागे, शेतीकामेकरुन शिक्षणाची आवड जोपासली. आपला मुलगा शिक्षणाच्या नादी लागला तर आपले पोटाचे हाल होतील असे वाटून शिक्षणाच्या आड येणार्या वडिलांची मर्जी सांभाळली. शेतीची कामे सांभाळून अभ्यास करत राहिले. अशा वेगवेगळ्या अडी-अडचणीतून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी गाव सोडले. थोरामोठ्यांच्या मदतीने एम. ए झाले
हे सर्व 'झोंबी'त आलेले आहे. ह्या प्रसंगानिमीत्त 'झोंबी' चे पुनर्वाचन करून त्यातील अस्सल धगीचा 'आनंद' मी परत एकदा घेईन म्हणतो.
डॉ. यादव व डॉ. पानतवणे ह्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच ह्या निमीत्ताने इथे डॉ. यादवांवर एक छोटेखानी परंतु माहितीपूर्ण लेख लिहील्याबद्दल डॉ. बिरूटेंना धन्यवाद.
प्रदिपराव आपण डॉ. आनंद यादवांचे 'झोंबी' आत्मचरित्र वाचलंय तेव्हा डॉ. आनंद यादव यांना वाचणारा माणूस भेटल्याचा आनंद झाला .
मात्र मी काही 'झोंबी' आत्मचरित्र वाचलं नाही. माझ्यावर संस्कार आहे ते डॉ.रवींद्र ठाकुर यांच्या 'आनंद यादव व्यक्ती आणि वाड;मय' या पूस्तकाचे !!!
-दिलीप बिरुटे
असो या ब्राह्मण विवादात आपण पडायलाच नको
पण एक वाचक म्हणून त्यांचे अभिनंदन
बाकी त्यांचे लिखाण ,काय आम्ही वाचलेले नाही
असो वाचल्यवर चर्चा करु
आपला
(चुकुन माकुन पुस्तके वाचणारा) विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
डॉ. आनंद यादवांचे वैशिष्टे ज्याची नोंद मला महत्वाची वाटते की, त्यांच्या काळातील ग्रामीण कथा वाचतांना पात्रांचे संवाद बोलीतून व्यक्त होत होते, तर निवेदन प्रमाण मराठीतून व्यक्त होत होते, (लेखक निवेदनामधून बोलत होते) तेव्हा आनंद यादवांनी आपल्या ग्रामीण कथेत ग्रामीण माणूसच निवेदनाद्वारे बोलतांना वाचकांसमोर उभा केला.
आनंद यादवांची छान ओळख करुन दिलीत.
यादवांचे अभिनंदन.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
मराठी ललित लेखनात शृंगाराच्या बाबतीत जरा सोवळेपणाच असावा असे वाटते ! त्यामुळे मिळाले तर डॉ. आनंद यादवांचे 'स्पर्शकमळे' वाचावे असे वाटत आहे. त्यांच्या ललित लेखनाबद्दल अधिक माहिती टाकता आली तर टाका राव !
स्त्री-पुरुष आणि त्यांच्या शृंगारिक भावना ललित लेखनाद्वारे कशा व्यक्त केल्या असतील याची अंमळ उत्सुकता लागून राहिली आहे !
-दिलीप बिरुटे
झोंबी, घरभिंती, नांगरणी, काचवेल.. ही पुस्तकं वाचली आणि आवडली आहेत.
आत्मचरित्रपर लेखनाचे हे वेगवेगळे भाग आहेत.
उत्तम आणि वाचनीय साहित्यकृती आहेत. नुकतंच डवरणी वाचलं पण ते तितकं विशेष वाटलं नाही.
झोंबी आणि घरभिंती वाचली आहेत मी. ती वाचल्यावर असं वाटतं की आपण त्यांच्या तुलनेत फारच सोपं आयुष्य जगतोय. लिहिण्यची शैली पण छान आणि त्यांचे अनुभव तर केवळ सुन्न करणारे...
प्रतिक्रिया