Skip to main content

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 24/03/2016 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62702
प्रतिक्रिया 482

प्रतिक्रिया

In reply to by DEADPOOL

ठीक आहे। मुद्दा असा आहे कि एखादा समाज असहिष्णू आहे कि नाही, हे दुसर्या समाजाशी तुलना करून सांगता येत नाही। तसे करत बसलो तर सगळेच समाज आपापली सहिष्णुता (जी काही बाकी उरलीये) गमावून बसतील। आपल्याला "ideal society" कडे जायचे आहे का "not worse than X" याचा विचार केला पाहीजे, असं मला वाटतं।

In reply to by DEADPOOL

जर-तर चा मुद्दा कामाचा नाही।
हल्ले झालेत हे मान्य आहे, पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे.
१. म्हणजे असहिष्णुता बाळगणारे हिंदू अस्तित्वात आहेत। याचा अर्थ काही प्रमाणात असहिष्णुता आहे। 2. भारतात धार्मिक कारणामुळे अनेक दंगली झाल्या आहेत। त्यामुळे कावळ्याच्या उदाहरणात सांगितल्या प्रमाणे अमुक प्रसंगी दंगल झाली नाही याने काहीच सिद्ध होत नाही। २. असहिष्णुतेचा थ्रेशोल्ड काय असायला पाहिजे? लोकसंख्येच्या किती प्रमाणात लोक हिंसक असले म्हणजे समाज असहिष्णू असतो। माझ्या मते थ्रेशोल्ड ०.०००००१% असला पाहिजे। ३. फक्त शारीरिक हिंसा म्हणजे असहिष्णुता का? जर कोणी धमक्या देत असेल (डायरेक्ट किंवा ऑनलाइन - उदा. "याला मारले पाहिजे"), तर त्याचा समावेश असहिष्णुतेमध्ये करावा का? उदाहरण म्हणून लोकसत्ता च्या फेसबुक पेज वरच्या कंमेंट वाचा https://m.facebook.com/story.php?story_fbid=1089392237780072&id=3018043…

In reply to by अत्रे

म्हणजे कोटीमध्ये १ समाजातील माथेफिरुची संख्या यापेक्षा जास्त असेल. आणि त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु! वा रे वा! लोकसत्तेचे उदाहरण घेतले तर कुबेरानी हिंदूंविषयी अग्रलेख अनेकदा लिहिले तेव्हा माफी मागितली नाही व एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळे!

In reply to by DEADPOOL

त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु!
नाही. एवढेच म्हणता येइल की या धर्मातील लोकात "काही प्रमाणात" असहिष्णुता आहे. त्याचबरोबर हल्य्यास किती लोकांचे जाहीर्/खासगी समर्थन आहे ते पहावे लागेल.
एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळे
याचा मी निषेध करतो. लेख मागे घेण्याची काहीच गरज नव्ह्ती.

विषय चघळला जाऊन चर्चा क्षीण होत असताना, धागा लेखकाने धागा लेख का टाकला ? असहिष्णूतेवर चर्चा खिळवून ठेवणे हा राजकीय ट्रॅप आहे हे मोदींनी त्यांच्या अलिकडील भाषणातून स्पष्ट केले, कदाचित हेच लक्षात घेऊन अडवाणींनी 'भारत माता की जय' घोषणाचा विषय 'नॉन इश्यू' आहे असे दोनच शब्दात सांगत बातमीदारांना पिटाळले. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला भाजपा सरकारचे समर्थन करावयाचे असेल तर भाजपा सरकारांच्या स्तुत्य उपक्रमांना अधिकाधीक प्रसिद्धी देणे मार्केटींग पॉईट व्ह्यू अधिक यश देऊ शकते. एनी वे तुम्ही धागा टाकलाच आहे तर कोणतीही एक बाजू घेण्याचे आश्वासन न देता उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो पण क्रम उलटा असेल.
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
माझ्या माहितीनुसार हिंदू धर्मात धर्मचिकित्सा आणि टिका यांना फारमोठे स्थान आहे. -विरोधकांनी केलेल्या टिकेला पुर्वपक्ष संबोधून टिकेला उत्तरपक्षात उत्तर देऊन मुद्दे खोडून काढणे याला शास्त्रार्थ म्हणतता - उलट ते हिंदू धर्माचे बलस्थान आहे. तुमचे धर्म अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कच्चे आहेत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात पक्के आहोत हि अभिमानाने सांगावयाची गोष्ट असावी. १) विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे. २) धागालेखकाने स्वतःच्या भूमिकेवर आतापर्यंत किती टिका केली आहे ? टिकाकारांना तुम्ही स्वतःवर टिकाकरुन घ्या अथवा अमुक गोष्टीवर टिकाकरा असे प्रत्यक्षात म्हणणे कठीण असावे. केवळ दुसर्‍यांनी टिकाकेली म्हणून न रडता दुसर्‍या धर्मांची समतोल चिकित्सा करत टिका करणे हि तुमची स्वतःची जबाबदारी आहे हे लक्षात घेण्याची जरुरी असावी का ?

In reply to by माहितगार

सर्वप्रथम मी विचारवंत नाही अथवा धर्मचिकित्सक नाही. माझा धर्माचा तेवढा अभ्यासही नाही. आपण स्वतः मान्य केलेत की हिंदू धर्मात व्यक्तिस्वातंत्र्याला फार स्थान आहे. पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे. मिपावर असलेली उदाहरणे म्हणजे १. चिमणा आणि विविध अवतार २. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?

In reply to by DEADPOOL

टीका करत नसतील, पण समर्थन तरी कुठे करतात. आणि कोणी टीका कटात नसेल तर दुसऱया लोकांना टीका करायला बंदी आहे का? कोणी कशावर टीका करावी हा व्यक्तिगत प्रश्न आहे, जी कि तीच व्यक्ती सांगू शकते. जर आजूबाजूला बहुसंख्य हिंदू दिसत असतील, तर साहजिक आहे कि त्यांच्या "चुका" जास्त दिसणार.

In reply to by DEADPOOL

पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे.
तुम्ही "शुभंकरोती कल्याणम,... शत्रुबुद्धी विनाशाय..." कधी ऐकले आहेत हिंदू धर्मात द्वेषाला कुठे स्थान आहे ? द्वेष करताना तुम्ही हिंदू धर्माच्या मुलभूत तत्वांपासून भटकत नाही आहात का ?
२. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?
हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. हिंदू धर्मीय परंपरा विरोधी बाजू मुद्देसुद पणे दाखवण्याची आहे. यनावालांनी बाकी धर्मांची चिकित्सा केली नसेल तर ते एकांगी ठरते यात अंशतः तथ्य आहे म्हणून तुम्ही स्वतः पर धर्मांचा अभ्यासकरून अभ्यासपूर्ण अशा (अक्रस्ताळ्या नव्हे ) काय टिका केल्या हा प्रश्न उरतोच ? ठरवले तर करता येते की मीही पक्क्या हिंदूत्ववाद्यांमध्ये मोडत नाही तरीही जिथे तर्कसुसंगत आहे तिथे परधर्मीय भूमिकांची चिकित्साही केली हिंदू धर्मीय बाजूही मांडली आहेत. पण माझ्या या आणि या धाग्यांवर किती जण आले ? तुम्हालाही यनावालाच दिसतात केवळ यनावालाच दिसणे आणि इतर काही न दिसणे याला काय म्हणावे ? टिकाकारांशी अभ्यासपुर्ण शास्त्रार्थ करा आक्रस्ताळ्या विरोधाने तुमच्या स्वतःच्या भूमिकेचे नुकसान होते, तुमच्या स्वतःच्या मुलभूत भूमिकांना बाधा पोहोचते. आणि तुमच्या विरोधकांना तेच हवे असते. हा विरोधकांचा ट्रॅप असतो या ट्रॅप मधून जेवढ्या लवकर बाहेर पडाल तेवढी तुमची भूमिका सशक्त होईल असे माझे यक्तिगत मत आहे.

In reply to by माहितगार

पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो.>>>>>>> इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

In reply to by DEADPOOL

इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.
इथे कार्य-कारण संबंधाची गल्लत होते आहे. द्वेषाची निर्मिती त्यांनी काढलेल्या अबकड निष्कर्षामुळे होत असू शकते. त्यासाठी त्यांनी काढलेल्या निष्कर्षातील तार्कीक उणीवांकडे बोट दाखवावयास हवे त्यांचे मुद्दे खोडावयास हवेत. व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन घालणे हा उपाय नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावरच्या बंधनांची मागणी वाढवली की तुम्ही असहिष्णूतेच्या आरोपास पात्र होण्याची शक्यता निर्माण होते हा एक भाग झाला. त्याही पेक्षा हिंदू धर्माची सगळी दारोमदारच व्यक्तिस्वातंत्र्यावर आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यास ठेच पोहोचवली की तुमच्या स्वतःच्या धार्मीक स्वातंत्र्याच्या तत्वास आधी ठेच पोहोचते त्यामुळे हिदूत्ववाद्यांनी कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर टिका करण्यापुर्वी किमान दहा वेळा तरी विचार करणे हिंदूंच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.

In reply to by माहितगार

चिमणा , यनावाला किंवा कुणीही काय म्हणावे, त्यांची मते काय असावी हे तुमच्या, माझ्या किंवा कुणाच्या हातात नाही. तुम्हाला जर त्यांची मते चुकीची वाटतात तर तुम्हाला ती खोडुन काढण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्यांनी इतर धर्मांची पण चिकित्सा करावी आमचीच का वगैरे म्हणण्यात काय अर्थ ? वर माहीतगार पण हेच म्हणत आहेत माझ्या मते.
विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे

सगळीकडे जर विद्वानच असले तर ते विद्वान आहेत हे कसे सिद्ध होणार मग त्यासाठी स्टँडर्ड म्हणुन एक तरी चिमणीरुपी मुर्ख हवाच ना (काय पण ते ध्यान दिसतं, थो. पाहिलय काय कधी आरशात म्हणा)

९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१) यात हिंदू असण्याचा काय संबंध ? आमेरीकेचे अथवा फिजीचे नागरीक असलेल्या हिंदूं "भारत माताकी जय" का म्हणतील ते "माता आमेरीका की जय" म्हणतील आणि कदाचित "बाबा आमेरीका की जय " म्हणणार नाहीत. "बाबा आमेरीका की जय " न म्हणता "माता आमेरीका की जय" म्हटल्याने त्यांचे आमेरीका प्रेम कमी होईल का अशा पद्धतीचा युक्तीवाद केला जातो आहे आणि केवळ "बाबा आमेरीका की जय " असेच म्हणा म्हणण्याचा आग्रह त्यांच्या लेखी असहिष्णूता असेल. अशा युक्तीवादास तुमचे उत्तर काय असेल ? बेसिकली चर्चा चघळत ठेवण्याचा ट्रॅप आहे का ? बाबा म्हणा की माता म्हणा की गुलशन म्हणा तुमची तुम्ही नागरीक असलेल्या देशाशी बेसीक लेव्हलची काही रचनात्मक केले नाहीतरी किमान डिस्ट्रक्टीव्ह काही न करण्याची आणि डिस्ट्रक्टीव्ह टेंडंन्सीचे समर्थन न करण्याची कमिटमेंट आहे का ? हा आणि एवढाच प्रश्न असावयास हवा आहे का ? २) "भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनैय्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. तुमचे वाक्य "आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न बहुसंख्य भारतीयांना का पडला नाही? " असे लिहिल्यास विरुद्ध बाजू डिफेन्सीव्हवर जाते पण जिथेतिथे हिंदूत्व सिद्धकरण्याच्या घाईत घोटाळा होत असेल का. ३) वंदे मातरम अथवा भारत माता की जय यांचा हिंदूत्ववादाशी संबंध लावण्याच्या आग्रहातली अथवा शिर्क ठरवण्याच्या तर्कातली (दुसर्‍या बाजूची) तर्कविसंगती मी दुसर्‍या धागा लेखातील या प्रतिसादां मधून खोडून काढली आहे. तेव्हा त्याची या प्रतिसादात पुर्नौक्ती करणे तुर्तास टाळतो.

In reply to by माहितगार

"भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनै य्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. >>>>>>>> कण्हैयाने आपण हिंदू अथवा हिंदुत्ववादी असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही! तो डाव्या विचारांचा आहे! मात्र ओवेसी गावभर आपण मुस्लिम असल्याचा प्रचार करत हिंडत असतो!

In reply to by DEADPOOL

इथे विरुद्ध बाजूच्या भुमिकेचा आपला अभ्यास कमी पडत असण्याची शक्यता असू शकते का ? त्या शिवाय आमेरीका आणि फिजीची केलेली काल्पनीक तुलनाही आपल्याला लक्षात येणार नाही.

उद्या उठून भारतातील यमुना गंगा या हिंदूंच्या पवित्र नद्या आहेत असे म्हणून कुणी मी राष्ट्रगित म्हणणार नाही हे चालेल का?

In reply to by DEADPOOL

:) हा कसा तर्कसुसंगत मुद्दा आला याला जरा अजून एक्स्टेंड करुन तुमच्या इश्वराचे नाव हिंदूसाठीही पवित्र असेल तर तुम्ही तुमच्या इश्वराच्या नावाचा जयजयकार करणे सोडाल का ? एखादी गोष्ट हिंदूंसाठी पवित्र आहे म्हणून नाकारणे हा नकारात्म्क भाग झाला हिंदू हाताला पवित्र मानतात म्हणून तुम्ही तुमचे हात वापरणार नाही का ? हिंदू कपडे घालण्यास पवित्र मनतात पुढे ..?

In reply to by DEADPOOL

हे चालेल का?
कोणाला राष्ट्रगीत म्हणायचे नसेल तर ते खेदजनकच आहे . पण आपल्याला तसे करायचेही स्वातंत्र्य आहे, त्यामुळे चालेल का याचं उत्तर "हो" असं द्यावं लगेल. फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे . समजा तुम्ही फेसबुक वर स्टेटस टाकला - सगळ्यांनी माझ्या status वर "भारतमाता की जय" अशी comment करा. आणि फक्त १० लोकांनी ती केली, तर बाकीच्या लोकांना तुम्ही काय कराल?

In reply to by अत्रे

फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे .
चर्चा शब्दाच्या आधी 'तर्कसुसंगत' हा शब्द तेवढा जोडण्याचे सुचवतो

हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. उद्या कोणी चर्चमधून मेन्बत्ती लावण्यावर तोंडसुख घेतले त्याचेही समर्थन कराल कारण मेन्बत्ती लावण्यावर तोंडसूख घेऊ नये अशी ख्रिस्ती धर्माची परंपरा नाही. परवा कुराणातील पाने फाड़ली तर त्याचे समर्थन कारण पाने फाड़न्यावर तोंडसूख घेऊ नये अशी इस्लामिक धर्माची परंपरा नाही.

In reply to by DEADPOOL

कोणत्याही म्हणजे अगदी कोणत्याही तोंडसुखाला तर्कसुसंगत उत्तरपक्ष मांडणे हाच उपाय असू शकतो व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी नव्हेच आणि खासकरुन व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीत हिंदूधर्मीयाम्चेच अधिक नुकसान असल्यामुळे त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपी करण्याच्या मागण्या टाळणे उलटपक्षी व्यक्तिस्वातंत्र्याचा डांगोरा पिटणे हे हिंदू धर्मीयांच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.

प्रश्न थेट आहेत अन त्याला काही थेट उत्तरे प्रतिप्रश्न सुद्धा आहेत (आमच्या डोक्यात) फ़क्त धागा लेखक मुद्द्यावर बोलतील ह्याची गारंटी असली तर बोलून उपयोग! नाहीतर ज़रा अपचन झाले की समोरच्या आयडी च ओरिजिनालिटी ते अस्तित्व खंगाळत बसणे होणार असेल तर बोलून उपयोग नाही!!. अशी हमी अन निकोप चर्चेचा विश्वास मिळाला तर बरेच काही बोलता येईल!! तोवर आमचा पास! :)

In reply to by DEADPOOL

आम्ही ओरिजिनलच आहोत हो! फ़क्त मुद्दे सोडुन दरवेळी तेच ते तुम्ही कोण कुठले काय नाव गाव वस्तु प्राणी खेळायला नकोसे होते म्हणूनच तर आधी विचारले! चर्चा उपयुक्त मेंदूस खाद्य अन व्यायाम असणार असेल तर आम्हाला आवडेल चर्चा! बघा काय ठरते ते तसे सांगा! :) -शुभेच्छा.

In reply to by DEADPOOL

तुमचे काम प्रतिपक्षाचा मुद्दा खोडण्याचे आहे, आयडी कुणाचा आहे आणि कुणाचा नाही याच्याशी सहसा देणेघेणे असण्याचे कारण असावयास नको. अमुक तमुक आयडीने मुद्दा मांडला म्हणून बरोबर होतो असे नसावे. प्रतिपक्षाचे मुद्दे व्यक्तिगत टिका न करता खोडता येणे शक्य नसेल तर अशा चर्चा चालू करणे आणि/अथ्वा सहभाग स्पृहणीय असतील का ? व्यक्तिगत टिका अथवा आक्रस्ताळेपणा करुन स्वपक्षीयांचीच बाजू दुबळी करण्यात कुणालाही हशील नसावे. हे लिहिण्याचे कारण मोदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाचाळविरता करुन ट्रॅप मध्ये न जाण्याचे सुचवले आहे याचे स्मरण.

७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
नग्नता हे हिंदू धर्मातील कुणाच्याही पावित्र्याच्या मोजणीचे माप नसावे. हिंदू धर्म तुम्हाला तुमचे मन पवित्र ठेवण्यास सांगतो. त्यामुळे या बाबतीत आक्षेप घेणार्‍यांनी स्वतःचे मन शुद्ध करुन मग आक्षेप नोंदवणे श्रेयस्कर असावे किंवा कसे. एम.एफ. हुसैन एकांगी वागला हे नक्की म्हणून त्याला शिक्षा देण्याची भूमिका मनात येणे स्पृहणीय ठरत नसावे उलटपक्षी बघा तुम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे आता तुमच्या धर्माबद्दल तेच काम करुन दाखवा तसे स्वातंत्र्य तुम्हाला इतर धर्मात मिळत नाही तेव्हा अधिकत्म स्वातंत्र्य देणारा आमचा धर्म श्रेष्ठ ठरतो अशा प्रकारच्या भूमिकेची मांडणी यावयास हवी पण अशी मांडणी करण्यात हिंदू धर्मीय कमी पडतात कारण स्वधर्माच्या अभ्यासातच ते कमी पडतात असे असेल का ? तुम्हाला सरळ आवाहन घ्यायचे नसले तरी प्रेषित अशाच वाळवंटात फिरला असू शकतो म्हणून वाळवंटातील मार्गांची चित्रे काढा आणि उपलब्ध कक्षेत आवाहन द्या. हाकानाका

In reply to by माहितगार

हुसैनने हिन्दू देवतांची नग्न चित्रे काढली याला आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो या देवतांची आक्षेपार्ह चित्रे काढली याला! यातील एक हनुमान व् सितेचे चित्र जे अत्यंत हिडिस् स्वरुपात हुसैननें ( या हरामखोरचा उल्लेख एकेरी करत आहे कोणाला आक्षेप असल्यास गेले उड़त) दाखवले होते यासाठी त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते. आमच्या सेकुलरवाद्यानि काय केले,जे हिडिस् दाखवले होते त्याला कलाकृति म्हणुन संबोधले व् सैटनिक व्हर्सेस(सलमान रश्दी) जे भारतात वाचले देखिल गेले नव्हते त्यावर बंदी आणली. आता या लेखकाचे काही साहित्य वाचनात आले होते,माझे प्रांजल मत असे आहे की एका टुकार लेखकाला ब्रिटिशानि आश्रय देऊन सेलेब्रिटी बनवले.

In reply to by भंकस बाबा

त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते.
ही "आवडलं नाही की मार त्याला" ची व्रुत्ती माणसात कशी निर्माण होत असेल? शाळेत/घरी झालेल्या "संस्कारांचा" हा परिणाम असेल का?

In reply to by अत्रे

नाही आवडलं की वहानेने मारणं परवडलं हो कुठेतरी तर म्हणे नाही आवडलं की कॉलश्निकोव्हने (तिच ती AK-47) मारतात म्हणे. रच्याकने तोंड फोडायची नुसती धमकी की AK-47 काय परवडते पहा.

In reply to by तर्राट जोकर

ओक्के टीजे ! आमच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल... (फक्त उदाहरण म्हणून देतोय हघ्या) म्हणजे मी तुम्हाला वहानाने मारलं अन् तुम्ही मला AK -47 ने मारलं तर तुमच्या लेखी हिशेब बरोबर ना ?

In reply to by उगा काहितरीच

हा प्रतिसाद असा हवा... ओक्के टीजे , धन्यवाद !आमच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल... (फक्त उदाहरण म्हणून देतोय हघ्या) म्हणजे मी तुम्हाला वहानाने मारलं अन् तुम्ही मला AK -47 ने मारलं तर तुमच्या लेखी हिशेब बरोबर ना ?

In reply to by उगा काहितरीच

अस्सं नाही मांडाय्चं दादा. दोघांकडेही एक-४७ आणि वहाणा दोन्ही आहेत, कोण कशाने कशासाठी मारतो हे बघून हिशोब करायचे की नाही? शार्ली हेब्दो आणि दादरी दोन घटना ठेवा उदाहरण म्हणून समोर. मारण्याच्या उर्मीला साधनांची आवश्यकता नसते. मूळ प्रश्न हुसैनचा. तो हुसैन आहे म्हणुन सगळा तळतळाट. अन्यथा नग्न देवी देवता चितारनारे हिंदुस्थानात लै होऊन गेलेत.

In reply to by उगा काहितरीच

कशाने मारतो ते त्या साधनाच्या उपलब्धतेवर अवलंबून असावे. AK 47 असली असती तर ती वापरली नसती कशावरुन?

In reply to by अत्रे

अहो साहेब , AK-47 हे उदाहरण आहे. थोडं समजून घ्याना . नसेल AK उपलब्ध मग काय घरातील चाकू, सुरी, वगैरे वगैरे बरेचसे जबरदस्त आघात करणारे शस्त्र उपलब्ध असतातच की! उपयोग केला का कुणी त्यांचा त्या चित्रकार महोदयाविरूद्ध. ते महोदय वयाच्या ९५ व्या वर्षी वारले नैसर्गिक कारणांमुळे . पण चार्ली हेब्दो चे चित्रकार अनैसर्गिक रित्या मारल्या गेले. असो , डोळे बंद करून रात्रच आहे असा विश्वास बाळगणार्यांना मी बापूडा काय समजावणार ? या विषयावर , या लेखावर हा माझा शेवटचा प्रतिसाद .

In reply to by उगा काहितरीच

मी शार्ली हेब्दोचे अजिबात समर्थन करत नाही पण तुम्ही तेच उदाहरण वापरुन हिंदु कसे सहिस्नु आहेत ह्याची मांडणी करत आहात. दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे दोन घटनेत. तेवढ्यावरुन तुम्ही स्वर्ग गाठत आहात. शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.

In reply to by तर्राट जोकर

शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.
हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला ही एक लोणकढी अफवा निधर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली आहे. हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने हुसेनने देश सोडला असे ही मंडळी वारंवार सांगून हिंदुत्ववाद्यांची बदमानी करीत आहेत. हुसेनच्या चित्रांविरूद्ध न्यायालयात खटले दाखल होण्यापूर्वीच व वादंग निर्माण होण्यापूर्वीच हुसेनने भारत सोडला होता. दस्तुरखुद्द हुसेननेच आपल्या मुलाखतीत काय सांगितले आहे ते वाचा. I have not fled India, said MF Husain in his last interview _________________________________________________ In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. "I am not in self-exile", the artist, who was one of the pioneers of modern art in India, had said firmly. He said: "I left India in 2005; then nothing of this (protests by Hindu activists) had happened. I wanted to do three major projects that I could not do in India, because I needed sponsors. I still deny it, I am not in exile". http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-not-fled-India-said-MF-…

In reply to by श्रीगुरुजी

हुसेनची एनडीटीव्ही च्या बरखा दत्त ने घेतलेली अजून एक मुलाखत - http://www.ndtv.com/india-news/full-transcript-of-mf-husains-interview-… या मुलाखतीत हुसेन वारंवार सांगतो आहे की मला ३ वेगळे प्रोजेक्ट्स करायचे होते व त्याला भारतात स्पॉन्सर नव्हता. त्याला भारताबाहेर स्पॉन्सर मिळाल्यामुळे त्याने भारत सोडला. परंतु बरखा दत्त त्याला वारंवार हेच विचारत आहे की त्याच्या चित्रांमुळे झालेल्या वादंगामुळे देश सोडला का. किंबहुना याच चुकीच्या गृहितकावर विसंबून वारंवार त्याच संबंधी प्रश्न विचारले गेले. बरखा दत्त च्या दुर्दैवाने हुसेनने एकदाही तिला पाहिजे तसे उत्तर दिले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एम एफ हुसैन प्रकरणाची टाइमलाईन काय आहे हो गुरुजी? त्याने भारत सोडल्यानंतर प्रोटेस्ट सुरु झालेत का? पेंटींग्स तर १९७० पासून बनवलेली आहेत. http://www.frontline.in/static/html/fl1510/15100210.htm ही बातमी १९९८ ची आहे. His paintings allegedly hurt the religious sentiments of Hindu nationalist groups, which beginning in the 1990s mounted a campaign of protest against him. The paintings in question were created in 1970, but did not become an issue until 1996, when they were printed in Vichar Mimansa, a Hindi monthly magazine, which published them in an article headlined "M.F. Husain: A Painter or Butcher". In response, eight criminal complaints were filed against him. In 2004, Delhi High Court dismissed these complaints of "promoting enmity between different groups ... by painting Hindu goddesses – Durga and Sarswati, that was later compromised by Hindu fundamentalist groups." In 1998 Husain's house was attacked by Hindu fundamentalist groups like Bajrang Dal and art works were vandalised. The leadership of another fundamentalist political party Shiv Sena endorsed the attack. Twenty-six Bajrang Dal activists were arrested by the police. Protests against Husain also led to the closure of an exhibition in England. आता तो म्हणतोय २००५ ला भारत सोडला तेव्हा काही वादग्रस्त नव्हते. पण फॅक्ट्स तर फॅक्ट्स आहेत. त्या काय वेगळंच सांगत आहेत.

In reply to by तर्राट जोकर

फ्रंटलाईन हे कोणत्या विचारसरणीच्या लोकांचे प्रकाशन आहे हे माहित असले तर असले प्रश्न पडणार नाहीत. दस्तुरखुद्द हुसेनने दोन वेगवेगळ्या मुलाखतीत (एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये व दुसरी एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत व या दोन्ही वृत्तसंस्था कोणत्या विचारसरणीच्या आहेत हे माहित असेलच) एकच गोष्ट सांगितली आहे. बरखा दत्तने वारंवार हुसेनच्या तोंडून हे वदवायचा प्रयत्न केला की हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने त्याने देश सोडला. परंतु हुसेनने एकदाही तसे सूचित न करता त्याला जे पाहिजे आहे तेच सांगितले. इथे दसुरखुद्द हुसेन कतारमध्ये बसून वस्तुस्थिती सांगतो आहे आणि ते सोडून फ्रंटलाईनवर विश्वास ठेवायचा?

In reply to by श्रीगुरुजी

साहेब, हुसैन काय बोलला, का बोलला ते नंतर पाहु. आधी एवढंच सांगा, हुसैनच्या पेंटींगबद्दलचा वाद त्याने भारत सोडल्यावर सुरु झाला का? २००५ च्या नंतर सुरु झाला काय? आणि बजरंग दल च्या हुसैनच्या घरावरिल हल्ल्याची बातमी खोटी आहे काय? पोलिसांनी सव्वीस कार्यकर्त्यांना अटक केली ते खोटे आहे काय? १९९६ मधे ही पेंटींग्स विचार मिमांसामधे M.F. Husain: A Painter or Butcher ह्या टायटलसह छापुन आली ते खोटे आहे काय? तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली. http://www.ndtv.com/india-news/interesting-trivia-on-m-f-husain-411618?…

In reply to by तर्राट जोकर

हुसेनच्या चित्रांबद्दलचा वाद त्याने २००५ मध्ये भारत सोडण्यापूर्वी बरीच वर्षे म्हणजे १९९६ मध्ये सुरू झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करून काही चित्रांची नासधूस केली होती. परंतु हा हल्ला हुसेनवर नसून त्या चित्रांवर होता. या हल्ल्यानंतरही अनेक वर्षे हुसेन भारतात होता. २००५ मध्ये भारत सोडण्याचे कारण दस्तुरखुद्द हुसेनने २ वेगवेगळ्या मुलाखतीत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. १९९६ मधील घरावरील हल्ला किंवा सुरू असलेले खटले हे त्यामागचे कारण नव्हतेच. तुमचा मूळ मुद्दा "हुसेनचे जीवाच्या भीतिने देश सोडला" हा पूर्ण चुकीचा होता. दस्तुरखुद्द हुसेननेच हे स्पष्ट केले आहे. बरखा दत्तने अनेकवेळा खोदूनखोदून एकसारखे प्रश्न विचारून त्याच्या तोंडून हे वदवून घ्यायचा प्रयत्न केला की देश सोडण्यामागे हिंदुत्ववादी हे कारण होते. परंतु हुसेनने आपली भूमिका सोडली नाही की देश सोडण्यामागे पूर्ण वेगळे कारण होते. बरखा दत्त ने घेतलेली मुलाखत वाचून मला समझोता एक्स्प्रेस बाँबस्फोटाची आठवण झाली. बाँबस्फोटानंतर पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली होती. प्रत्यक्ष पाकिस्तानच्या एका मंत्र्याने त्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानमधील संघटना आहे असे अधिकृत निवेदन केले होते. पण युपीएवाले म्हणत राहिले की बॉम्बस्फोट तुम्ही नाही केला. तुम्ही निर्दोष आहात. तो आमच्याच देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी केला. अशी भूमिका घेऊन पाकिस्तानला क्लीन चिट देऊन विनाकारण काही हिंदुत्ववाद्यांना त्या खटल्यात युपीए सरकारने अडकविले. या अत्यंत चुकीच्या भूमिकेचे परीणाम भारत आजही भोगत आहे. गंमत अशी की हुसेनच्या मुलाखतीत हुसेनने अनेकवेळा स्पष्ट करूनसुद्धा बरखा दत्त चा गोबेल्सरूपी प्रचार कायम राहिला. हुसेनच्या मृत्युनंतर केलेल्या ट्वीटमध्ये तिने खालील वाक्ये लिहिली होती. Such shame that an artist who put India on the global stage spent his last years in exile. Atleast in his death give Husain a sense of home, tweeted NDTV editor Barkha Dutt. हुसेनच्या बाबतीत असेच घडले. दस्तुरखुद्द हुसेन सांगतोय की मी माझ्या प्रोजे़क्टसाठी व स्पॉन्सर मिळविण्यासाठी भारत सोडला. देश सोडण्यामागे हिंदुत्ववाद्यांचा काहीही संबंध नव्हता. पण निधर्मांध मात्र हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करताहेत की देश सोडला तो हिंदुत्ववाद्यांमुळे.

In reply to by श्रीगुरुजी

काय तुम्ही बरखा दत्तला घेउन बसता होत सारखे सारखे. हुसैन ला जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळाल्या नव्हत्या का?

In reply to by तर्राट जोकर

हुसेनला जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळालेल्या नव्हत्या. तुमचा मूळ मुद्दा - "हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला", पूर्णपणे असत्य आहे हे दस्तुरखुद्द हुसेनच्या २ मुलाखतीतून केव्हाच स्पष्ट झाले आहे.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली.
एनडीटीव्ही च्या बातम्या अत्यंत पक्षपाती असतात. मी दोन लिंक्स दिल्या आहेत. एक टाईम्सची व दुसरी एनडीटीव्हीची. दोन्हीमध्ये बातमी नसून हुसेनच्या मुलाखती आहेत. हुसेनने आपण २००५ मध्ये भारत का सोडला हे अत्यंत स्पष्टपणे व वारंवार सांगूनसुद्धा हुसेनने जीवाच्या भीतिने भारत सोडला हे असत्य एनडीटीव्ही गोबेल्स तंत्राने वारंवार सांगत आहे. शक्य असतं तर एनडीटीव्ही ने हुसेनची मुलाखत सुद्धा एडीट करून त्यात आपल्याला हवी ती वाक्ये टाकली असती.

In reply to by श्रीगुरुजी

His detractors questioned whether he would ever paint his own mother in the nude as he had painted India. “Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded. Later, they became more violent, and that led me to move to the United Arab Emirates, but I continue making my work.” http://artasiapacific.com/Magazine/70/MFHusainFacedWithPromiseAndProtest

In reply to by तर्राट जोकर

"artasiapacific" हे चित्रकलेला वाहिलेले मासिक दिसते. संपूर्ण लेखात हुसेनचे कौतुक आहे व ज्या चित्रांमुळे वाद निर्माण झाले त्यावर हिंदू संघटनाच दोषी आहेत असा लेखात कल दिसतो. मी वर दिलेल्या टाइम्स ऑफ ईंडिया च्या मुलाखतीत हुसेनचे स्पष्टपणे खालील वाक्ये सांगितली आहेत. In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. या मुलाखतीची चित्रफीत सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे हुसेन जे बोलला ते ऐकता व बघता येते. वरील मासिकात तपशीलाच्या चुका आहेत. हुसेनने २००६ मध्ये भारत सोडला असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात आपण २००५ मध्येच भारत सोडला असे हुसेन स्वतःच सांगतो. वरील मासिक आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी चालविलेले दिसते. भारतात कशी असहिष्णुता आहे हे सांगण्यात ही मंडळी पुढे असतातच. हुसेनच्या वरील मुलाखतीचे संपूर्ण टेक्स्ट दिलेले नाही. मुलाखतीची चित्रफीतही दिलेली नाही. यात हुसेनच्या तोंडात टाकलेल्या वाक्यांवर कितपत विश्वास ठेवायचा ? याउलट टाईम्सच्या मुलाखतीचे संपूर्ण टेक्स्ट व चित्रफीत उपलब्ध आहे व त्यात त्याने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की माझ्या चित्रांवर झालेल्या वादामुळे मी भारत सोडलेला नसून माझ्या प्रोजेक्टसाठी भारत सोडलेला आहे. याचाच पुनरूच्चार त्याने एनडीटीव्ही ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत केलेला आहे. जर या मासिकात हुसेनने सांगितलेले खरे असेल तर तो बाकीच्या दोन सविस्तर मुलाखतीत खोटे बोलला असे दिसते.

In reply to by तर्राट जोकर

“Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded.
"I never responded" हे देखील खरे नाही. हुसेनने नंतर भारतमातेचे नग्न चित्र काढल्याबद्दल माफी मागून चित्र मागे घेतले होते. कतार, लंडन व दुबईत रहात असताना व भारतात परतण्याची अजिबात शक्यता नसताना व त्यामुळे हिंदू संघटनांच्या तथाकथित धमक्यांची अजिबात भीति नसताना हुसेनने हे चित्र मागे का घेतले? एकंदरीत या मासिकात हुसेनच्या तोंडात ही टाकलेली वाक्ये खरी दिसत नाहीत. हुसेन जे बोललाच नाही ते त्याच्या तोंडी टाकलेले दिसते.

In reply to by तर्राट जोकर

टाइमलाइन ला महत्व प्रत्येक वेळी असतेच असे नाही. समजा तुम्ही घरात २५ वर्षापासून बेकायदेशीर बंदुका लपवून ठेवल्या आहेत आणि जर त्या आज सापडल्या तर तोंड वर करून न्यायालयात 'जरा टाइमलाइन बघा की' असं म्हणणार का?

In reply to by DEADPOOL

टाइमलाईन बघणे आपल्या सोयीनुसार नसते. तुमच्या प्रतिसादात तुम्ही इतके लाचार दिसत आहात त्यावरुन स्पष्ट आहे की तुम्हाला तुमचे मत हेच तुम्हाला सत्य मानायचे आहे. टाइमलाईनला महत्त्व प्रत्येकवेळी असतेच असे नाही असं म्हणताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा महत्त्व, तुमचे मुद्दे फसत असतील तेव्हा नाही. गुड. मग गुजरात दंगलीला गोध्रा हे कारण का दिले जाते, साहेब? जावा, काहीतरी चांगले पाइंट घेउन यावा.

In reply to by तर्राट जोकर

प्रतिसादात तुम्ही इतके लाचार दिसत आहात >>>>>>> जेव्हा आपल्या मनाविरुद्ध प्रतिसाद येतो तेव्हा ही भाषा वापरली जाते.!

In reply to by DEADPOOL

तुमच्या प्रतिसादात भुमिका तशीच दिसते आहे. की बॉ, 'मी काहीच्या काही लिहिन तुम्ही असं सम्जुन घ्या की मुद्दा खोडला गेलाय'. ह्याला तुमच्याकडे दुसरा काही शब्द असेल तर तो वापरा.

In reply to by DEADPOOL

समजा तुम्ही घरात २५ वर्षापासून बेकायदेशीर बंदुका लपवून ठेवल्या आहेत आणि जर त्या आज सापडल्या तर तोंड वर करून न्यायालयात 'जरा टाइमलाइन बघा की' असं म्हणणार का? ही काय भाषा आहे? ह्यात मुद्दा तरी काय आहे? मी कोणता वैयक्तिक हल्ला केला? असो.

In reply to by तर्राट जोकर

दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>>> म्हणजे तुम्हाला कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे

In reply to by तर्राट जोकर

दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>>> म्हणजे तुम्हाला समजा कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे