मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

DEADPOOL · · काथ्याकूट
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62611 वाचनखूण प्रतिक्रिया 482

उगा काहितरीच 24/03/2016 - 19:31
इतका स्फोटक लेख अन् आत्तापर्यंत एकही प्रतिक्रिया नाही ? ये तो बहोत नाइन्साफी हुई ।
असे डायरेक्ट प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देतात ते बघू. अजून एक प्रश्न - २००२ सालची गुजराथमधील फक्त दंगल आणि मारले गेलेले मुसलमान आठवतात पण त्या आधी जाळलेला रेल्वेचा डबा आणि त्यातील हिंदू नाही आठवत.

गरिब चिमणा 24/03/2016 - 20:24
उत्तरे क्रमानुसार..... इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे. ओवेसीवर हिंदूंनी हल्ला केला नाही याचा अर्थ जनाब अकब्रुद्दीन ओवैसी यांनि असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. हिंदूनी कायदा का हातात घ्यावा ! हा प्रश्न मोदीकाकांना विचारा ,कलम ३७० रद्द करायचे धाडस का दाखवले नाही त्यांनी अजुन? PDP शी युती का करत आहेत! मुंबैइची दंगल का आठवावी ! त्यात काय आहे आठवण्यासारखे!! काय माहीत नाय ब्वा,तुमचे नागपुरचे केंद्र विदा ठेवत नाही काय ! हुसैन साहेबांनी हिंदू देवतेचे नग्न चित्र काढले,तर एकाही हिंदू चित्रकाराला आपल्या ब्रशने त्याला उत्तर द्यायचे धाड्स् का झाले नसावे बरे!!!!!! एका विख्यात चित्रकाराला देश सोडावा लागला या सारखी मोठी शिक्षा कोणती! अनेक हिंदूंना हा प्रश्न पडतो, बाबासाहेब आंबेडकरांनाही हा प्रश्न पडला होता,I have no homeland असे ते म्हणायचे. अनेक खुळचट समजूती हिंदू धर्मात असल्याने विचारवंत हिंदू धर्माची चिकीत्सा करतात.

In reply to by गरिब चिमणा

इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे.

हा घ्या विदा

Menara Kudus Mosque Masjid Menara Kudus in Indonesia, with its original tower. One of Indonesia's most famous mosques, Menara Kudus has retained much of its former Hindu character. Although the main building has been reconstructed, its iconic minaret and front gates are believed to be relics of a Hindu site.https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/8/85/Masjid_Menara_Kudus.jpg/800px-Masjid_Menara_Kudus.jpg Quwwat Al-Islam MosqueThis Jamii Masjid built in the months of the year 587 (hijri) by the Amir, the great, the glorious commander of the Army, Qutb-ud-daula wad-din, the amir-ul-umara Aibeg, the slave of the Sultan, may God strengthen his helpers! The materials of 27 idol temples, on each of which 2,000,000 Deliwal coins had been spent were used in the (construction of) this mosque.https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/66/Intricate_stone_carvings_in_the_cloister_of_Quwwat_ul-Islam_mosque%2C_near_Qutub_Minar.jpg/450px-Intricate_stone_carvings_in_the_cloister_of_Quwwat_ul-Islam_mosque%2C_near_Qutub_Minar.jpgअशी अजून शेकडो उदाहरणे आहेत मी फक्त झलक दाखवली आहे. मला इथे कोणत्याही वादाला तोंड फोडायचे नाहीये फक्त आपली माहिती चुकीची आहेत एवढेच सांगायचे आहे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

hmangeshrao 26/03/2016 - 01:43
देवळापेक्षा मशीदच जास्त देखणी व मस्त वाटतेय. .... इस्लामी राजानी युद्धात ते प्रदेश जिंकून मग तिथे हे उद्योग केले ना ? युद्धात जिंकलेल्या प्रदेशाचं काय करायचं हे जेताच ठरवणार ना ? हरलेले राजे का हरले म्हणे ? ग्लानिर्भवती होऊन पडले होते की काय ?

In reply to by hmangeshrao

कशाला नव्या आइडिचीही इज्जत काढ्तायेत. आधी उत्तर द्या खाली विचारलेल्या प्रश्नांची. आणि पेशवे, विजयनगरचे राजे आणि छत्रपतीनी का मशिदी पडल्या नाहीत!

In reply to by hmangeshrao

भंकस बाबा 26/03/2016 - 15:17
भेंडीबाजार, बेहरामपाड़ा भागात मुस्लिम महिला जेव्हा कपडे घ्यायला जातात तेव्हा कपडा कसाहि असुदे फ़क्त तो चमकीला असला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असते. असे कपड़े घरी आणून त्याला चमकणारे आरसे, खड़े लावले की खाला , आपा, मौतर्मा याना जन्नत मिळाल्याचे सुख मिळते, तुम्ही पण त्यातले काय हो? नाय ते चमकीले मीनार बघुन चेकाळलात म्हणुन विचारले.

In reply to by hmangeshrao

भंकस बाबा 26/03/2016 - 15:19
भेंडीबाजार, बेहरामपाड़ा भागात मुस्लिम महिला जेव्हा कपडे घ्यायला जातात तेव्हा कपडा कसाहि असुदे फ़क्त तो चमकीला असला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असते. असे कपड़े घरी आणून त्याला चमकणारे आरसे, खड़े लावले की खाला , आपा, मौतर्मा याना जन्नत मिळाल्याचे सुख मिळते, तुम्ही पण त्यातले काय हो? नाय ते चमकीले मीनार बघुन चेकाळलात म्हणुन विचारले.

In reply to by गरिब चिमणा

१.इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप ----१. सोमनाथ मंदिर २. राम मंदिर ३. मूर्तिभंजक तैमूर अजून बरेच आहेत हो, किती विदा द्यावा! २. लिंक घ्या! vnd.youtube:7ukTXuzXb2o?vndclient=mv-google&vndel=watch&vndapp=youtube_mobile ३. हा प्रश्न मोदीकाकांना विचारा ,कलम ३७० रद्द करायचे धाडस का दाखवले नाही त्यांनी अजुन? PDP शी युती का करत आहेत! कारण त्यांना कश्मिरात अस्थिरता ठेवायची नाहीये, तुमच्या भाऊबंदकीच्या लोकांना घुसखोरी करण्यासाठी! ४. मुंबैइची दंगल का आठवावी ! त्यात काय आहे आठवण्यासारखे!!>>>>>>> अशावेळी आपला नेहमीच गजनी होतो. ५.नागपूरच्या केंद्राने का विदा ठेवावा? त्यानी देश सोडून जायला सांगितले नाही! ६. हुसैन साहेबांनी हिंदू देवतेचे नग्न चित्र काढले,तर एकाही हिंदू चित्रकाराला आपल्या ब्रशने त्याला उत्तर द्यायचे धाड्स् का झाले नसावे बरे!!!!!!>>>>>>>>कारण आम्ही सर्व धर्मांचा मान ठेवतो, जे तुमच्या धर्माला अमान्य आहे! यालाच सहिष्णुता म्हणतात. ७. एका विख्यात चित्रकाराला देश सोडावा लागला या सारखी मोठी शिक्षा कोणती!>>>>>>चार्ली हेब्दो वरील हल्यात तर लोकांना जग सोडावे लागले ही मोठी शिक्षा नाही का? आणि हा हुसैन या उपद्व्यापामुळेच विख्यात (कु) झाला. ८.आम्बेड्कर हिंदू होते? ९. अनेक खुळचट समजूती हिंदू धर्मात असल्याने विचारवंत हिंदू धर्माची चिकीत्सा करतात. >>>>>> का तुमच्या धर्माची चिकित्सा केल्यावर डोके उडवले जाईल अशी भीती असते?

श्री गावसेना प्रमुख 24/03/2016 - 20:38
इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे. सिरिया मध्ये यजदि महिलांची विक्री हे कुराणाचा आदर्श ठेवणारे का करीत असावे।

गरिब चिमणा 24/03/2016 - 20:48
सिरिया मध्ये यजदि महिलांची विक्री हे कुराणाचा आदर्श ठेवणारे का करीत असावे।>>>>>..>> ते पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क 24/03/2016 - 20:59
एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग?

In reply to by ट्रेड मार्क

विकीपिडीयाची आर्टीकल कुणीही एडीट करु शकतो,हे ईस्लाम व पवित्र कुराण ए शरीफला बदनाम कराय्चे कारस्थान आहे हे सम्जून घ्या.

In reply to by गरिब चिमणा

गणेश उमाजी पाजवे 24/03/2016 - 22:00
विकिपीडिया ची आर्टिकल्स राहूद्यात पण तुम्हाला इसीस आणि इस्लाम बद्दल एवढा विश्वास ?कुरानातच लिहिले आहे कि या पृथ्वीवर इस्लाम शिवाय कोणताच धर्म नाही आणि इस्लामेतर व्यक्ती हे सगळे काफिर असून आपण जिहाद करून त्यांचा नाश केला पाहिजे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

गरिब चिमणा 24/03/2016 - 23:12
कुरानातच लिहिले आहे कि या पृथ्वीवर इस्लाम शिवाय कोणताच धर्म नाही आणि इस्लामेतर व्यक्ती हे सगळे काफिर असून आपण जिहाद करून त्यांचा नाश केला पाहिजे.>>>>>>>>>कुराण ए शरीफमध्ये इस्लामची व्याख्या दिली आहे ,जो सज्जन आहे ,सचोटीने वागतो ,अन्यायाविरोधात पेटून उठतो तो खरा मुसलमान आहे.जो दुष्ट आहे अन्यायी आहे त्याला काफीर संबोधले आहे.सचोटीने वागणारा प्रत्येकजण मुस्लिमच आहे,आपणही या व्याख्येत बसत असाल तर आपण काफीर नसून सच्चे मुस्लिमच आहात.

In reply to by गरिब चिमणा

भंकस बाबा 24/03/2016 - 23:19
ते बाकीच्या धर्माचे पाठिराखे काय भजि तळत बसणार काय? काय पण!☺ कुराणातल्या अनेक गोष्टि आता कालबाह्य झाल्या आहेत. पण मुस्लिम तेच जर घेऊन जगणार असतील तर अल्ला मालिक!

In reply to by गरिब चिमणा

मिपावर हे प्रबोधन करण्यापेक्षा तुम्ही या दहशतवाद्यांचे प्रबोधन का करत नाही? गरीब बिचारे असंच मानून चाललेत की ते कुराणात सांगितल्याप्रमाणे वागत आहेत. या बदल्यात तुम्हाला जन्नत हासिल होऊन ७२ हूर प्राप्त होतील.

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क 24/03/2016 - 22:26
आहे हे असे आपले मत आहे? विकी इसिस किंवा बाकी कोणाही मुस्लिमांना वापरायला बंदी आहे का? जर एवढेच चुकीचे आहे तर कोणी जाउन बदल का केला नाही. असो. विकी सोडून द्या, जालावर कुठेही इसिस , LeT व बाकी समस्त दहशतवादी संघटना आणि त्याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. तुनळी वर videos आहेत ते बघा. तुमच्याकडे प्रत्यक्ष अनुभवाची काही क्षणचित्रे, चलतचित्रे असतील तर ती पण दाखवा. आणि मग हे लोक्स कुराण नाही तर काय मानतात ते सांगा.

In reply to by DEADPOOL

ग चि , त जो आणि सर्व तथाकथित सेकुलर मंडळी , कधीतरी उत्तर द्या कि. कि मिपावर फक्त दुसर्यांना विदा आणि संदर्भ मागण्याचा धंदा करता तुम्ही ? तुमची काही ठेवणीतली उत्तरे जी प्रत्येक वेळी देऊन तुम्ही निसटून जाता. "ते" पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत. "ते" भरकटलेले मुस्लिम आहेत "ते" खरा इस्लाम जाणत नाहीत "त्यांनी" जे केले ती फक्त एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती . इस्लाम मध्ये असे काहीच नहिये. इस्लाम हा शांती चा धर्म आहे. हे ईस्लाम व पवित्र कुराण ए शरीफला बदनाम कराय्चे कारस्थान आहे सगळी चूक अमेरिकेची आहे. अशी ठेवणीतली उत्तरे आता बस करा आणि मुद्द्याचे काय ते बोला. आणि एवढेच जर तत्वज्ञानी असाल तर इथे जसा आम्हाला शिकवता तसे शिकवण्यासाठी , "खरा इस्लाम" नावा ने क्लासेस काढा, आणि पहिल्यांदा आपण ज्यांची वकिली करता ( दहशतवादि ) त्यांना शिकवा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या फी चे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. :)

In reply to by बाप्पू

तर्राट जोकर 25/03/2016 - 19:26
इथे मला उद्देशून प्रतिसाद द्यायचे कारण कळले नाही. गरिब चिमणा ह्यांचे वक्तव्य माझ्या नावावर लावण्याचे कारण कळले नाही. वरील आठ वाक्यांपैकी एकही वाक्य मी कधीच कुठेच वापरलेले नाही. नको ते आरोप करण्याची गरज नाही.

श्री गावसेना प्रमुख 24/03/2016 - 21:18
मला कधी कधी असे वाटते कि गरीब चिमणा हे झाकीर नाईक असावेत किंवा नाईकांनी परकाया प्रवेश केला असावा।

मम्बाजी सर्वज्ञ 24/03/2016 - 21:31
"इस्लामी शासकांनी कीती मंदिरे पाडली याचा विदा द्यावा.पवित्र कुराण ए शरीफ ईतर धर्मांचा आदर करायला शिकवते, त्यामुळे इस्लामि शासकांनी मंदीरे पाडली हा खोटा आरोप आहे." @गरीब चिमणा : 'हैबत झरा बघ' च्या तालावर 'चिमण्या डोळे आणि कान उघड आणि आजू बाजूला काय चालले आहे ते पहा.' माझी प्रतिक्रिया जर अपमानकारक वाटत असेल तर.......हेतू तोच होता :-). ज्या विषयावर हा धागा काढलाय त्याचे जिवंत उदाहरण तुम्ही देताय. हिंदू रयतेने वेगवेगळी आक्रमणे सहन केली आणि मान खाली घालून काम(!) करत राहिली. शिवाजी आणि पेश्व्यान्सारखे अपवाद सोडले तर यवनांनी या देशात जो धुमाकूळ घातला तो साहेबाच्या कारामातीन्पेक्षा जास्त आहे हे इतिहासाची २-३ पुस्तके वाचलेले शेंबडे पोर देखील सांगेल. साहेबांनी रस्ते आणि दळणवळण सुरळीत करून देशाला एक दिशा तरी दिली. यवनांची देणगी म्हणजे जमिनीत गाडलेले भग्नावशेष आणि पळवून नेलेले गुलाम. वाईट गोष्ट हि आहे कि हे सगळे ज्ञात असूनही याला प्रतिप्रश्न करणारे लोक (आपल्यासारखे)! युरोपात 'होलोकस्ट डिनायाल' वर एक कायदा आहे (खोलात जात नाही, जमले तर शोधून पहा), तसे काही कायदे तुमच्यासारख्या 'ज्ञानी' लोकांसाठी या देशात असायला हवेत असे वाटायला लागले आहे आता.

In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

मम्बाजी सर्वज्ञ 24/03/2016 - 21:43
तळटीप : मला स्वतःला हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि काही विचित्र प्रथांबद्दल चीड आहे पण म्हणून सगळ्या पंथाला लाथा मारणे योग्य वाटत नाही. जर हा निकष बाकीच्या धर्मांना लावला तर पृथ्वीवर बोटांवर मोजण्या इतके धर्म सुधा शिल्लक राहणार नाहीत. दोन गोष्टींची तुलना करताना पहिली दुसर्यापेक्षा काही बाबतीत कमी दर्जाची असेल तर 'ती फेकून द्या, वापरायच्या लायकीची नाही' हे म्हणणे जितके बालिश पणाचे आहे तितकेच 'हिंदू धर्मात सगळ्या अंधश्रद्धा भरल्या आहेत' हे वाक्य हे देखील बालिश पणाचे आहे. आजकाल हे सगळीकडे वाचायला मिळते कारण छापणार्यांना चर्चे पेक्षा पोटशूळ काढण्यात जास्त इंटरेस्ट असतो हे चांगलेच समजले आहे.....म्हणूनच पेकाटात एक लाथ घालण्यात अतीव आनंद मिळतो.

In reply to by DEADPOOL

मितभाषी 24/03/2016 - 22:10
https://mr.m.wikipedia.org/wiki/
वरच्या लिंकवर क्लिक केल्यावर हे दिसले. काय टिंगल्या करता पूलशेठ. आजच्या आशयाचे आकर्षण २०१५ क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची ११वी आवृत्ती १४ फेब्रुवारी ते २९ मार्च, इ.स. २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँड देशांमध्ये खेळवली गेली. मेलबर्न येथे आय.सी.सी.ने ३० जुलै २०१३ रोजी आयोजित केलेल्या सोहळ्यात २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरीत्या आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एकूण ४४ दिवस चालणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये १४ देशांचे राष्ट्रीय संघ सहभागी होणार असून १४ वेगवेगळ्या मैदानांवर हे सामने रंगणार आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ४९ सामने खेळविले जातील. त्यामधील २६ सामने ऑस्ट्रेलियातील ॲडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ व सिडनी या ठिकाणी तर उर्वरित २३ सामने न्यूझीलंडमधील ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, नेपियर, नेल्सन आणि वेलिंग्टन येथे खेळविण्यात येतील. साखळी फेरीसाठी १४ देशांना अ आणि ब गटामध्ये विभागण्यात आले. अ गटामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यू झीलँड, पात्रता फेरीतील संघ २, पात्रता फेरीतील संघ ३ चा समावेश होता. तर ब गटामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, आयर्लण्ड आणि पात्रता फेरीतील संघ ४ चा समावेश होता. साखळी फेरीमध्ये प्रत्येक संघाचे सहा सामने झाले. विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ७ गडी राखून विजय मिळवित पाचव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. पुढे वाचा... मागील अंक - नोव्हेंबर २०१५ - जुलै २०१५ - मे २०१५ - एप्रिल २०१५ - मार्च २०१५ - ऑक्टोबर २०१४ - ऑगस्ट २०१३ - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.

In reply to by मितभाषी

मम्बाजी सर्वज्ञ 24/03/2016 - 22:21
भारत सोडून बाकी अजून कुठल्या देशात मराठी बोलतात कि काय? नाही म्हणजे भारतात राहून 'हिंदू म्हणजे काय' असा प्रश्न विचारताय ते बघून राहवले नाही....आणि इतकी वर्षे तिथे राहून जर तुम्हाला समजले नसेल तर विकिपीडिया काय समजावणार!

In reply to by मितभाषी

रमेश आठवले 25/03/2016 - 05:36
मनोहर जोशी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदू धर्माचा उल्लेख मते मिळवण्यासाठी केला आणि म्हणून त्यांची निवडणूक रद्द व्हावी अशी फिर्याद झाली होती . प्रकरण सर्वोच न्यायालया पर्यंत गेले. तेथे जोशींच्या वकिलाने ते हिंदुत्वावर बोलले हिंदू धर्मावर नाही आणि हिंदुत्व ही एक जीवन पद्धति आहे असा युक्तिवाद केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करून जोशींची निवडणूक रद्द करण्यास नकार दिला.

In reply to by रमेश आठवले

नायालयात काहीही खेळ चालतात हो! आणि एक भिकारडी निवडणुक वाचवण्यासाठी जोशींनी पूर्ण हिंदू धर्माचीच बदनामी केली!

In reply to by टवाळ कार्टा

मितभाषी 24/03/2016 - 23:04
मला एखादा 'मांत्रिक' असेल तर सांगा. ;) मन्त्र पाहीजे आहे.

In reply to by मितभाषी

मिभा ही तुमची नेहमीची सवय आहे! आपल्या मतानुसार धागा नसला की काहीही प्रतिसाद देऊन धाग्याची गंभीरता घालवायची! असो आपण परत या धाग्यावर आला नाहीत तरी चालेल!

भंकस बाबा 24/03/2016 - 22:41
फल्यान्दा ते सुद्द लिवायला सिका, मन्तर कसा वाचनार तुम्ही , ओरंगजेबाची दाढी रजिया सुल्तानला डकवनार तुम्ही! ते गरीब चिमणा वांटेड झालं की राव! आता काय येत नाय ते.

उगा काहितरीच 25/03/2016 - 00:50
गरीब चिमणाजी , ABP माझा बघता का तुम्ही ? त्यांचे ब्रिद का काय म्हणतात ते माहीत आहे का ? "उघडा डोळे बघा नीट" आपल्याही तेच म्हणावेसे वाटतेय. पुढे आपली मर्जी !

कापूसकोन्ड्या 25/03/2016 - 08:55
माननिय मिपाकर, सर्वांनी मुस्लिम धर्म स्विकारावा, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. अत्यंत प्रगत धर्म असलेला तो धर्म आहे.
पार खिचडी करून टाकली आहे मुद्द्यांची। whatapp फॉरवर्ड होता का? मूळ प्रश्न काय होता? असहिष्णुता वाढत आहे कि नाही याबद्दल, बरोबर? यावर कोणते लेख वाचले आहेत आपण, आणि कोणत्या context मध्ये अशी विधाने केली गेली याची माहिती द्यावी। बाकी प्रश्न निरर्थक आहेत।
पहिल्या दोन वाक्यातच तर्कदोष आहे। १. असहिष्णुता वाढणे २. असहिष्णुता "असणे" यात फरक आहे। आधी तुमचे मत सांगा - १. भारतात काही प्रमाणात असहिष्णुता आहे की नाही? २. ज्या लोकांचं असं म्हणणं आहे, कि असहिष्णुता वाढलीये, त्यांनी पुरावे काय दिले आहेत (तुमच्या वाचनात आलेले)? ३. या पुराव्यांचे खंडन करा. मग चर्चा करता येईल सविस्तर।

In reply to by अत्रे

भारतात असहिष्णुता नाही!!!!! आणि पुरावा हवा असेल तर अजूनही पाकिस्तानी हिंदू आणि भारतीय मुस्लिम यांची तुलना करून बघा!

In reply to by DEADPOOL

एखादी गोष्ट आहे कि नाही यासाठी तुलना करणे हा मार्ग योग्य नाही। "तुमच्या कडे आंबे आहेत का" याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असतं। शेजाऱ्याकडे आमराई आहे म्हणून comparatively आमच्याकडे आंबेच नाहीत , असे म्हणण्याला काय अर्थ आहे।

In reply to by अत्रे

पण काही गोष्टीत तुलना होऊ शकते. उदा हिंदूंवर भारतात झालेले हल्ले व मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले! मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले व पाकिस्तानात हिंदूंवर झालेले हल्ले!

In reply to by अत्रे

पण काही गोष्टीत तुलना होऊ शकते. उदा हिंदूंवर भारतात झालेले हल्ले व मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले! मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले व पाकिस्तानात हिंदूंवर झालेले हल्ले!

अत्रे 25/03/2016 - 09:31
अजून एक - एक विधान घ्या. मुंबईत कावळे आहेत. याला disprove करण्यासाठी असे म्हणून चालेल का, कि आमच्या गल्लीत एक पण कावळा मी पाहिला नाही? हे वाक्य सिद्ध करण्यासाठी एक कावळा कुठेही पाहिला तरी sufficient आहे। पण disprove करण्यासाठी पूर्ण मुंबईत कुठेच कावळे नाहीत असे दाखवावे लागेल। तुम्ही असे सांगितले कि ओवेसी वर कोणी हल्ला केला नाही. याने हे सिद्ध होत नाही कि असहिष्णुता नाहीए। त्यासाठी तुम्हाला असे दाखवावे लागेल, कि कोणाही नेत्यावर त्याच्या विधानामुळे आजपर्यंत हल्ला झालेला नाही।

In reply to by अत्रे

कोणत्याही नेत्यांवर ही सार्वत्रिकरण झालं. माझा उल्लेख हिंदू धर्माची बदनामी करणाऱ्या ओवेसीवर होता! आणि जर सर्वच नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर धागा कुठल्याकुठे वाहत जाईल! जे तुम्हाला अमान्य आहे!

In reply to by DEADPOOL

ठीक आहे, मग तुमचं असं म्हणणं आहे का, कि हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्या एकाही नेत्यावर (किंवा माणसावर), त्यांच्या बोलण्यामुळे एकही हल्ला झाला नाही?

In reply to by अत्रे

माझा मुद्दा ओवेसिंचा आहे. आणि हल्ले झालेत हे मान्य आहे. पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे. कीम्बहुना अशा वाक्यांमुळे हिंदूंनी लगेच दंगली केल्या नाहीत. असेच पकिस्तानात कोणी हिंदू इस्लामविरोधात बोलला असता तर?

In reply to by DEADPOOL

आणि हिंदूंविरोधात बोलनार्यावरील हल्ले व इस्लामविरोधात बोलणार्यावरील हल्ले याची तुलना करून बघा! मग सांगा कोण सहिष्णु व कोण असहिष्णु!

In reply to by DEADPOOL

तुम्हाला असे सिद्ध करायचे असेल, कि मुस्लिम लोक जास्त असहिष्णू आहेत, तर ते एखाद्यावेळेस सिद्ध करता येईल. त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल। उगाच आपल्याला वाटत आहे म्हणून खरे असलेच पाहिजे असेही नाही. आणि जरी सिद्ध केले, याचा अर्थ असा होत नाही कि १. हिंदू समाजात असहिष्णुता नाही २. भारतीय समाजात असहिष्णुता वाढत आहे ३. हिंदू समाजात असहिष्णुता वाढत आहे

In reply to by अत्रे

माहितगार 25/03/2016 - 11:20
बदल करुन वाचल्यास आपलेच "त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल। उगाच आपल्याला वाटत आहे म्हणून खरे असलेच पाहिजे असेही नाही." स्टेटमेंट आपल्याही वाक्यांना लागू होईल हेवेसांनल.

In reply to by अत्रे

तुम्हाला असे सिद्ध करायचे असेल, कि मुस्लिम लोक जास्त असहिष्णू आहेत, तर ते एखाद्यावेळेस सिद्ध करता येईल. त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल>>>>>>>>>>>>>>>>> त्याचीही गरज नाही, भारताचा इतिहास बघीतल्यावर आपोआप उत्तर मिळेल.

In reply to by DEADPOOL

अत्रे 25/03/2016 - 11:16
ठीक आहे। मुद्दा असा आहे कि एखादा समाज असहिष्णू आहे कि नाही, हे दुसर्या समाजाशी तुलना करून सांगता येत नाही। तसे करत बसलो तर सगळेच समाज आपापली सहिष्णुता (जी काही बाकी उरलीये) गमावून बसतील। आपल्याला "ideal society" कडे जायचे आहे का "not worse than X" याचा विचार केला पाहीजे, असं मला वाटतं।

In reply to by DEADPOOL

जर-तर चा मुद्दा कामाचा नाही।
हल्ले झालेत हे मान्य आहे, पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे.
१. म्हणजे असहिष्णुता बाळगणारे हिंदू अस्तित्वात आहेत। याचा अर्थ काही प्रमाणात असहिष्णुता आहे। 2. भारतात धार्मिक कारणामुळे अनेक दंगली झाल्या आहेत। त्यामुळे कावळ्याच्या उदाहरणात सांगितल्या प्रमाणे अमुक प्रसंगी दंगल झाली नाही याने काहीच सिद्ध होत नाही। २. असहिष्णुतेचा थ्रेशोल्ड काय असायला पाहिजे? लोकसंख्येच्या किती प्रमाणात लोक हिंसक असले म्हणजे समाज असहिष्णू असतो। माझ्या मते थ्रेशोल्ड ०.०००००१% असला पाहिजे। ३. फक्त शारीरिक हिंसा म्हणजे असहिष्णुता का? जर कोणी धमक्या देत असेल (डायरेक्ट किंवा ऑनलाइन - उदा. "याला मारले पाहिजे"), तर त्याचा समावेश असहिष्णुतेमध्ये करावा का? उदाहरण म्हणून लोकसत्ता च्या फेसबुक पेज वरच्या कंमेंट वाचा https://m.facebook.com/story.php?story_fbid=1089392237780072&id=301804346538869

In reply to by अत्रे

म्हणजे कोटीमध्ये १ समाजातील माथेफिरुची संख्या यापेक्षा जास्त असेल. आणि त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु! वा रे वा! लोकसत्तेचे उदाहरण घेतले तर कुबेरानी हिंदूंविषयी अग्रलेख अनेकदा लिहिले तेव्हा माफी मागितली नाही व एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळे!

In reply to by DEADPOOL

त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु!
नाही. एवढेच म्हणता येइल की या धर्मातील लोकात "काही प्रमाणात" असहिष्णुता आहे. त्याचबरोबर हल्य्यास किती लोकांचे जाहीर्/खासगी समर्थन आहे ते पहावे लागेल.
एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळे
याचा मी निषेध करतो. लेख मागे घेण्याची काहीच गरज नव्ह्ती.

माहितगार 25/03/2016 - 09:53
विषय चघळला जाऊन चर्चा क्षीण होत असताना, धागा लेखकाने धागा लेख का टाकला ? असहिष्णूतेवर चर्चा खिळवून ठेवणे हा राजकीय ट्रॅप आहे हे मोदींनी त्यांच्या अलिकडील भाषणातून स्पष्ट केले, कदाचित हेच लक्षात घेऊन अडवाणींनी 'भारत माता की जय' घोषणाचा विषय 'नॉन इश्यू' आहे असे दोनच शब्दात सांगत बातमीदारांना पिटाळले. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला भाजपा सरकारचे समर्थन करावयाचे असेल तर भाजपा सरकारांच्या स्तुत्य उपक्रमांना अधिकाधीक प्रसिद्धी देणे मार्केटींग पॉईट व्ह्यू अधिक यश देऊ शकते. एनी वे तुम्ही धागा टाकलाच आहे तर कोणतीही एक बाजू घेण्याचे आश्वासन न देता उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो पण क्रम उलटा असेल.
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
माझ्या माहितीनुसार हिंदू धर्मात धर्मचिकित्सा आणि टिका यांना फारमोठे स्थान आहे. -विरोधकांनी केलेल्या टिकेला पुर्वपक्ष संबोधून टिकेला उत्तरपक्षात उत्तर देऊन मुद्दे खोडून काढणे याला शास्त्रार्थ म्हणतता - उलट ते हिंदू धर्माचे बलस्थान आहे. तुमचे धर्म अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कच्चे आहेत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात पक्के आहोत हि अभिमानाने सांगावयाची गोष्ट असावी. १) विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे. २) धागालेखकाने स्वतःच्या भूमिकेवर आतापर्यंत किती टिका केली आहे ? टिकाकारांना तुम्ही स्वतःवर टिकाकरुन घ्या अथवा अमुक गोष्टीवर टिकाकरा असे प्रत्यक्षात म्हणणे कठीण असावे. केवळ दुसर्‍यांनी टिकाकेली म्हणून न रडता दुसर्‍या धर्मांची समतोल चिकित्सा करत टिका करणे हि तुमची स्वतःची जबाबदारी आहे हे लक्षात घेण्याची जरुरी असावी का ?

In reply to by माहितगार

सर्वप्रथम मी विचारवंत नाही अथवा धर्मचिकित्सक नाही. माझा धर्माचा तेवढा अभ्यासही नाही. आपण स्वतः मान्य केलेत की हिंदू धर्मात व्यक्तिस्वातंत्र्याला फार स्थान आहे. पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे. मिपावर असलेली उदाहरणे म्हणजे १. चिमणा आणि विविध अवतार २. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?

In reply to by DEADPOOL

टीका करत नसतील, पण समर्थन तरी कुठे करतात. आणि कोणी टीका कटात नसेल तर दुसऱया लोकांना टीका करायला बंदी आहे का? कोणी कशावर टीका करावी हा व्यक्तिगत प्रश्न आहे, जी कि तीच व्यक्ती सांगू शकते. जर आजूबाजूला बहुसंख्य हिंदू दिसत असतील, तर साहजिक आहे कि त्यांच्या "चुका" जास्त दिसणार.

In reply to by DEADPOOL

माहितगार 25/03/2016 - 11:01
पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे.
तुम्ही "शुभंकरोती कल्याणम,... शत्रुबुद्धी विनाशाय..." कधी ऐकले आहेत हिंदू धर्मात द्वेषाला कुठे स्थान आहे ? द्वेष करताना तुम्ही हिंदू धर्माच्या मुलभूत तत्वांपासून भटकत नाही आहात का ?
२. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?
हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. हिंदू धर्मीय परंपरा विरोधी बाजू मुद्देसुद पणे दाखवण्याची आहे. यनावालांनी बाकी धर्मांची चिकित्सा केली नसेल तर ते एकांगी ठरते यात अंशतः तथ्य आहे म्हणून तुम्ही स्वतः पर धर्मांचा अभ्यासकरून अभ्यासपूर्ण अशा (अक्रस्ताळ्या नव्हे ) काय टिका केल्या हा प्रश्न उरतोच ? ठरवले तर करता येते की मीही पक्क्या हिंदूत्ववाद्यांमध्ये मोडत नाही तरीही जिथे तर्कसुसंगत आहे तिथे परधर्मीय भूमिकांची चिकित्साही केली हिंदू धर्मीय बाजूही मांडली आहेत. पण माझ्या या आणि या धाग्यांवर किती जण आले ? तुम्हालाही यनावालाच दिसतात केवळ यनावालाच दिसणे आणि इतर काही न दिसणे याला काय म्हणावे ? टिकाकारांशी अभ्यासपुर्ण शास्त्रार्थ करा आक्रस्ताळ्या विरोधाने तुमच्या स्वतःच्या भूमिकेचे नुकसान होते, तुमच्या स्वतःच्या मुलभूत भूमिकांना बाधा पोहोचते. आणि तुमच्या विरोधकांना तेच हवे असते. हा विरोधकांचा ट्रॅप असतो या ट्रॅप मधून जेवढ्या लवकर बाहेर पडाल तेवढी तुमची भूमिका सशक्त होईल असे माझे यक्तिगत मत आहे.

In reply to by माहितगार

DEADPOOL 25/03/2016 - 11:28
पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो.>>>>>>> इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

In reply to by DEADPOOL

इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.
इथे कार्य-कारण संबंधाची गल्लत होते आहे. द्वेषाची निर्मिती त्यांनी काढलेल्या अबकड निष्कर्षामुळे होत असू शकते. त्यासाठी त्यांनी काढलेल्या निष्कर्षातील तार्कीक उणीवांकडे बोट दाखवावयास हवे त्यांचे मुद्दे खोडावयास हवेत. व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन घालणे हा उपाय नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावरच्या बंधनांची मागणी वाढवली की तुम्ही असहिष्णूतेच्या आरोपास पात्र होण्याची शक्यता निर्माण होते हा एक भाग झाला. त्याही पेक्षा हिंदू धर्माची सगळी दारोमदारच व्यक्तिस्वातंत्र्यावर आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यास ठेच पोहोचवली की तुमच्या स्वतःच्या धार्मीक स्वातंत्र्याच्या तत्वास आधी ठेच पोहोचते त्यामुळे हिदूत्ववाद्यांनी कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर टिका करण्यापुर्वी किमान दहा वेळा तरी विचार करणे हिंदूंच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.

In reply to by माहितगार

चिमणा , यनावाला किंवा कुणीही काय म्हणावे, त्यांची मते काय असावी हे तुमच्या, माझ्या किंवा कुणाच्या हातात नाही. तुम्हाला जर त्यांची मते चुकीची वाटतात तर तुम्हाला ती खोडुन काढण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्यांनी इतर धर्मांची पण चिकित्सा करावी आमचीच का वगैरे म्हणण्यात काय अर्थ ? वर माहीतगार पण हेच म्हणत आहेत माझ्या मते.
विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे

इरसाल 25/03/2016 - 10:15
सगळीकडे जर विद्वानच असले तर ते विद्वान आहेत हे कसे सिद्ध होणार मग त्यासाठी स्टँडर्ड म्हणुन एक तरी चिमणीरुपी मुर्ख हवाच ना (काय पण ते ध्यान दिसतं, थो. पाहिलय काय कधी आरशात म्हणा)

माहितगार 25/03/2016 - 10:45
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१) यात हिंदू असण्याचा काय संबंध ? आमेरीकेचे अथवा फिजीचे नागरीक असलेल्या हिंदूं "भारत माताकी जय" का म्हणतील ते "माता आमेरीका की जय" म्हणतील आणि कदाचित "बाबा आमेरीका की जय " म्हणणार नाहीत. "बाबा आमेरीका की जय " न म्हणता "माता आमेरीका की जय" म्हटल्याने त्यांचे आमेरीका प्रेम कमी होईल का अशा पद्धतीचा युक्तीवाद केला जातो आहे आणि केवळ "बाबा आमेरीका की जय " असेच म्हणा म्हणण्याचा आग्रह त्यांच्या लेखी असहिष्णूता असेल. अशा युक्तीवादास तुमचे उत्तर काय असेल ? बेसिकली चर्चा चघळत ठेवण्याचा ट्रॅप आहे का ? बाबा म्हणा की माता म्हणा की गुलशन म्हणा तुमची तुम्ही नागरीक असलेल्या देशाशी बेसीक लेव्हलची काही रचनात्मक केले नाहीतरी किमान डिस्ट्रक्टीव्ह काही न करण्याची आणि डिस्ट्रक्टीव्ह टेंडंन्सीचे समर्थन न करण्याची कमिटमेंट आहे का ? हा आणि एवढाच प्रश्न असावयास हवा आहे का ? २) "भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनैय्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. तुमचे वाक्य "आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न बहुसंख्य भारतीयांना का पडला नाही? " असे लिहिल्यास विरुद्ध बाजू डिफेन्सीव्हवर जाते पण जिथेतिथे हिंदूत्व सिद्धकरण्याच्या घाईत घोटाळा होत असेल का. ३) वंदे मातरम अथवा भारत माता की जय यांचा हिंदूत्ववादाशी संबंध लावण्याच्या आग्रहातली अथवा शिर्क ठरवण्याच्या तर्कातली (दुसर्‍या बाजूची) तर्कविसंगती मी दुसर्‍या धागा लेखातील या प्रतिसादां मधून खोडून काढली आहे. तेव्हा त्याची या प्रतिसादात पुर्नौक्ती करणे तुर्तास टाळतो.

In reply to by अत्रे

माहितगार 25/03/2016 - 11:05
http://www.misalpav.com/comment/818409#comment-818409 आणि त्यानंतरचे उपप्रतिसादातील चर्चा

In reply to by माहितगार

"भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनै य्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. >>>>>>>> कण्हैयाने आपण हिंदू अथवा हिंदुत्ववादी असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही! तो डाव्या विचारांचा आहे! मात्र ओवेसी गावभर आपण मुस्लिम असल्याचा प्रचार करत हिंडत असतो!

In reply to by DEADPOOL

इथे विरुद्ध बाजूच्या भुमिकेचा आपला अभ्यास कमी पडत असण्याची शक्यता असू शकते का ? त्या शिवाय आमेरीका आणि फिजीची केलेली काल्पनीक तुलनाही आपल्याला लक्षात येणार नाही.
उद्या उठून भारतातील यमुना गंगा या हिंदूंच्या पवित्र नद्या आहेत असे म्हणून कुणी मी राष्ट्रगित म्हणणार नाही हे चालेल का?

In reply to by DEADPOOL

माहितगार 25/03/2016 - 11:33
:) हा कसा तर्कसुसंगत मुद्दा आला याला जरा अजून एक्स्टेंड करुन तुमच्या इश्वराचे नाव हिंदूसाठीही पवित्र असेल तर तुम्ही तुमच्या इश्वराच्या नावाचा जयजयकार करणे सोडाल का ? एखादी गोष्ट हिंदूंसाठी पवित्र आहे म्हणून नाकारणे हा नकारात्म्क भाग झाला हिंदू हाताला पवित्र मानतात म्हणून तुम्ही तुमचे हात वापरणार नाही का ? हिंदू कपडे घालण्यास पवित्र मनतात पुढे ..?

In reply to by DEADPOOL

अत्रे 25/03/2016 - 12:14
हे चालेल का?
कोणाला राष्ट्रगीत म्हणायचे नसेल तर ते खेदजनकच आहे . पण आपल्याला तसे करायचेही स्वातंत्र्य आहे, त्यामुळे चालेल का याचं उत्तर "हो" असं द्यावं लगेल. फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे . समजा तुम्ही फेसबुक वर स्टेटस टाकला - सगळ्यांनी माझ्या status वर "भारतमाता की जय" अशी comment करा. आणि फक्त १० लोकांनी ती केली, तर बाकीच्या लोकांना तुम्ही काय कराल?

In reply to by अत्रे

माहितगार 25/03/2016 - 12:21
फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे .
चर्चा शब्दाच्या आधी 'तर्कसुसंगत' हा शब्द तेवढा जोडण्याचे सुचवतो
हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. उद्या कोणी चर्चमधून मेन्बत्ती लावण्यावर तोंडसुख घेतले त्याचेही समर्थन कराल कारण मेन्बत्ती लावण्यावर तोंडसूख घेऊ नये अशी ख्रिस्ती धर्माची परंपरा नाही. परवा कुराणातील पाने फाड़ली तर त्याचे समर्थन कारण पाने फाड़न्यावर तोंडसूख घेऊ नये अशी इस्लामिक धर्माची परंपरा नाही.

In reply to by DEADPOOL

माहितगार 25/03/2016 - 11:51
कोणत्याही म्हणजे अगदी कोणत्याही तोंडसुखाला तर्कसुसंगत उत्तरपक्ष मांडणे हाच उपाय असू शकतो व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी नव्हेच आणि खासकरुन व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीत हिंदूधर्मीयाम्चेच अधिक नुकसान असल्यामुळे त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपी करण्याच्या मागण्या टाळणे उलटपक्षी व्यक्तिस्वातंत्र्याचा डांगोरा पिटणे हे हिंदू धर्मीयांच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.

नाना स्कॉच 25/03/2016 - 12:13
प्रश्न थेट आहेत अन त्याला काही थेट उत्तरे प्रतिप्रश्न सुद्धा आहेत (आमच्या डोक्यात) फ़क्त धागा लेखक मुद्द्यावर बोलतील ह्याची गारंटी असली तर बोलून उपयोग! नाहीतर ज़रा अपचन झाले की समोरच्या आयडी च ओरिजिनालिटी ते अस्तित्व खंगाळत बसणे होणार असेल तर बोलून उपयोग नाही!!. अशी हमी अन निकोप चर्चेचा विश्वास मिळाला तर बरेच काही बोलता येईल!! तोवर आमचा पास! :)

In reply to by DEADPOOL

नाना स्कॉच 25/03/2016 - 12:28
आम्ही ओरिजिनलच आहोत हो! फ़क्त मुद्दे सोडुन दरवेळी तेच ते तुम्ही कोण कुठले काय नाव गाव वस्तु प्राणी खेळायला नकोसे होते म्हणूनच तर आधी विचारले! चर्चा उपयुक्त मेंदूस खाद्य अन व्यायाम असणार असेल तर आम्हाला आवडेल चर्चा! बघा काय ठरते ते तसे सांगा! :) -शुभेच्छा.

In reply to by DEADPOOL

तुमचे काम प्रतिपक्षाचा मुद्दा खोडण्याचे आहे, आयडी कुणाचा आहे आणि कुणाचा नाही याच्याशी सहसा देणेघेणे असण्याचे कारण असावयास नको. अमुक तमुक आयडीने मुद्दा मांडला म्हणून बरोबर होतो असे नसावे. प्रतिपक्षाचे मुद्दे व्यक्तिगत टिका न करता खोडता येणे शक्य नसेल तर अशा चर्चा चालू करणे आणि/अथ्वा सहभाग स्पृहणीय असतील का ? व्यक्तिगत टिका अथवा आक्रस्ताळेपणा करुन स्वपक्षीयांचीच बाजू दुबळी करण्यात कुणालाही हशील नसावे. हे लिहिण्याचे कारण मोदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाचाळविरता करुन ट्रॅप मध्ये न जाण्याचे सुचवले आहे याचे स्मरण.

माहितगार 25/03/2016 - 12:16
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
नग्नता हे हिंदू धर्मातील कुणाच्याही पावित्र्याच्या मोजणीचे माप नसावे. हिंदू धर्म तुम्हाला तुमचे मन पवित्र ठेवण्यास सांगतो. त्यामुळे या बाबतीत आक्षेप घेणार्‍यांनी स्वतःचे मन शुद्ध करुन मग आक्षेप नोंदवणे श्रेयस्कर असावे किंवा कसे. एम.एफ. हुसैन एकांगी वागला हे नक्की म्हणून त्याला शिक्षा देण्याची भूमिका मनात येणे स्पृहणीय ठरत नसावे उलटपक्षी बघा तुम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे आता तुमच्या धर्माबद्दल तेच काम करुन दाखवा तसे स्वातंत्र्य तुम्हाला इतर धर्मात मिळत नाही तेव्हा अधिकत्म स्वातंत्र्य देणारा आमचा धर्म श्रेष्ठ ठरतो अशा प्रकारच्या भूमिकेची मांडणी यावयास हवी पण अशी मांडणी करण्यात हिंदू धर्मीय कमी पडतात कारण स्वधर्माच्या अभ्यासातच ते कमी पडतात असे असेल का ? तुम्हाला सरळ आवाहन घ्यायचे नसले तरी प्रेषित अशाच वाळवंटात फिरला असू शकतो म्हणून वाळवंटातील मार्गांची चित्रे काढा आणि उपलब्ध कक्षेत आवाहन द्या. हाकानाका

In reply to by माहितगार

भंकस बाबा 26/03/2016 - 08:42
हुसैनने हिन्दू देवतांची नग्न चित्रे काढली याला आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो या देवतांची आक्षेपार्ह चित्रे काढली याला! यातील एक हनुमान व् सितेचे चित्र जे अत्यंत हिडिस् स्वरुपात हुसैननें ( या हरामखोरचा उल्लेख एकेरी करत आहे कोणाला आक्षेप असल्यास गेले उड़त) दाखवले होते यासाठी त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते. आमच्या सेकुलरवाद्यानि काय केले,जे हिडिस् दाखवले होते त्याला कलाकृति म्हणुन संबोधले व् सैटनिक व्हर्सेस(सलमान रश्दी) जे भारतात वाचले देखिल गेले नव्हते त्यावर बंदी आणली. आता या लेखकाचे काही साहित्य वाचनात आले होते,माझे प्रांजल मत असे आहे की एका टुकार लेखकाला ब्रिटिशानि आश्रय देऊन सेलेब्रिटी बनवले.

In reply to by भंकस बाबा

त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते.
ही "आवडलं नाही की मार त्याला" ची व्रुत्ती माणसात कशी निर्माण होत असेल? शाळेत/घरी झालेल्या "संस्कारांचा" हा परिणाम असेल का?

In reply to by अत्रे

उगा काहितरीच 26/03/2016 - 13:02
नाही आवडलं की वहानेने मारणं परवडलं हो कुठेतरी तर म्हणे नाही आवडलं की कॉलश्निकोव्हने (तिच ती AK-47) मारतात म्हणे. रच्याकने तोंड फोडायची नुसती धमकी की AK-47 काय परवडते पहा.

In reply to by तर्राट जोकर

उगा काहितरीच 26/03/2016 - 13:31
ओक्के टीजे ! आमच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल... (फक्त उदाहरण म्हणून देतोय हघ्या) म्हणजे मी तुम्हाला वहानाने मारलं अन् तुम्ही मला AK -47 ने मारलं तर तुमच्या लेखी हिशेब बरोबर ना ?

In reply to by उगा काहितरीच

उगा काहितरीच 26/03/2016 - 13:37
हा प्रतिसाद असा हवा... ओक्के टीजे , धन्यवाद !आमच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल... (फक्त उदाहरण म्हणून देतोय हघ्या) म्हणजे मी तुम्हाला वहानाने मारलं अन् तुम्ही मला AK -47 ने मारलं तर तुमच्या लेखी हिशेब बरोबर ना ?

In reply to by उगा काहितरीच

तर्राट जोकर 26/03/2016 - 14:07
अस्सं नाही मांडाय्चं दादा. दोघांकडेही एक-४७ आणि वहाणा दोन्ही आहेत, कोण कशाने कशासाठी मारतो हे बघून हिशोब करायचे की नाही? शार्ली हेब्दो आणि दादरी दोन घटना ठेवा उदाहरण म्हणून समोर. मारण्याच्या उर्मीला साधनांची आवश्यकता नसते. मूळ प्रश्न हुसैनचा. तो हुसैन आहे म्हणुन सगळा तळतळाट. अन्यथा नग्न देवी देवता चितारनारे हिंदुस्थानात लै होऊन गेलेत.

In reply to by अत्रे

उगा काहितरीच 26/03/2016 - 14:21
अहो साहेब , AK-47 हे उदाहरण आहे. थोडं समजून घ्याना . नसेल AK उपलब्ध मग काय घरातील चाकू, सुरी, वगैरे वगैरे बरेचसे जबरदस्त आघात करणारे शस्त्र उपलब्ध असतातच की! उपयोग केला का कुणी त्यांचा त्या चित्रकार महोदयाविरूद्ध. ते महोदय वयाच्या ९५ व्या वर्षी वारले नैसर्गिक कारणांमुळे . पण चार्ली हेब्दो चे चित्रकार अनैसर्गिक रित्या मारल्या गेले. असो , डोळे बंद करून रात्रच आहे असा विश्वास बाळगणार्यांना मी बापूडा काय समजावणार ? या विषयावर , या लेखावर हा माझा शेवटचा प्रतिसाद .

In reply to by उगा काहितरीच

तर्राट जोकर 26/03/2016 - 14:36
मी शार्ली हेब्दोचे अजिबात समर्थन करत नाही पण तुम्ही तेच उदाहरण वापरुन हिंदु कसे सहिस्नु आहेत ह्याची मांडणी करत आहात. दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे दोन घटनेत. तेवढ्यावरुन तुम्ही स्वर्ग गाठत आहात. शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.

In reply to by तर्राट जोकर

शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.
हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला ही एक लोणकढी अफवा निधर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली आहे. हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने हुसेनने देश सोडला असे ही मंडळी वारंवार सांगून हिंदुत्ववाद्यांची बदमानी करीत आहेत. हुसेनच्या चित्रांविरूद्ध न्यायालयात खटले दाखल होण्यापूर्वीच व वादंग निर्माण होण्यापूर्वीच हुसेनने भारत सोडला होता. दस्तुरखुद्द हुसेननेच आपल्या मुलाखतीत काय सांगितले आहे ते वाचा. I have not fled India, said MF Husain in his last interview _________________________________________________ In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. "I am not in self-exile", the artist, who was one of the pioneers of modern art in India, had said firmly. He said: "I left India in 2005; then nothing of this (protests by Hindu activists) had happened. I wanted to do three major projects that I could not do in India, because I needed sponsors. I still deny it, I am not in exile". http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-not-fled-India-said-MF-Husain-in-his-last-interview/articleshow/8791202.cms

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 26/03/2016 - 17:29
हुसेनची एनडीटीव्ही च्या बरखा दत्त ने घेतलेली अजून एक मुलाखत - http://www.ndtv.com/india-news/full-transcript-of-mf-husains-interview-411979 या मुलाखतीत हुसेन वारंवार सांगतो आहे की मला ३ वेगळे प्रोजेक्ट्स करायचे होते व त्याला भारतात स्पॉन्सर नव्हता. त्याला भारताबाहेर स्पॉन्सर मिळाल्यामुळे त्याने भारत सोडला. परंतु बरखा दत्त त्याला वारंवार हेच विचारत आहे की त्याच्या चित्रांमुळे झालेल्या वादंगामुळे देश सोडला का. किंबहुना याच चुकीच्या गृहितकावर विसंबून वारंवार त्याच संबंधी प्रश्न विचारले गेले. बरखा दत्त च्या दुर्दैवाने हुसेनने एकदाही तिला पाहिजे तसे उत्तर दिले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 17:38
एम एफ हुसैन प्रकरणाची टाइमलाईन काय आहे हो गुरुजी? त्याने भारत सोडल्यानंतर प्रोटेस्ट सुरु झालेत का? पेंटींग्स तर १९७० पासून बनवलेली आहेत. http://www.frontline.in/static/html/fl1510/15100210.htm ही बातमी १९९८ ची आहे. His paintings allegedly hurt the religious sentiments of Hindu nationalist groups, which beginning in the 1990s mounted a campaign of protest against him. The paintings in question were created in 1970, but did not become an issue until 1996, when they were printed in Vichar Mimansa, a Hindi monthly magazine, which published them in an article headlined "M.F. Husain: A Painter or Butcher". In response, eight criminal complaints were filed against him. In 2004, Delhi High Court dismissed these complaints of "promoting enmity between different groups ... by painting Hindu goddesses – Durga and Sarswati, that was later compromised by Hindu fundamentalist groups." In 1998 Husain's house was attacked by Hindu fundamentalist groups like Bajrang Dal and art works were vandalised. The leadership of another fundamentalist political party Shiv Sena endorsed the attack. Twenty-six Bajrang Dal activists were arrested by the police. Protests against Husain also led to the closure of an exhibition in England. आता तो म्हणतोय २००५ ला भारत सोडला तेव्हा काही वादग्रस्त नव्हते. पण फॅक्ट्स तर फॅक्ट्स आहेत. त्या काय वेगळंच सांगत आहेत.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 26/03/2016 - 17:46
फ्रंटलाईन हे कोणत्या विचारसरणीच्या लोकांचे प्रकाशन आहे हे माहित असले तर असले प्रश्न पडणार नाहीत. दस्तुरखुद्द हुसेनने दोन वेगवेगळ्या मुलाखतीत (एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये व दुसरी एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत व या दोन्ही वृत्तसंस्था कोणत्या विचारसरणीच्या आहेत हे माहित असेलच) एकच गोष्ट सांगितली आहे. बरखा दत्तने वारंवार हुसेनच्या तोंडून हे वदवायचा प्रयत्न केला की हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने त्याने देश सोडला. परंतु हुसेनने एकदाही तसे सूचित न करता त्याला जे पाहिजे आहे तेच सांगितले. इथे दसुरखुद्द हुसेन कतारमध्ये बसून वस्तुस्थिती सांगतो आहे आणि ते सोडून फ्रंटलाईनवर विश्वास ठेवायचा?

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 18:09
साहेब, हुसैन काय बोलला, का बोलला ते नंतर पाहु. आधी एवढंच सांगा, हुसैनच्या पेंटींगबद्दलचा वाद त्याने भारत सोडल्यावर सुरु झाला का? २००५ च्या नंतर सुरु झाला काय? आणि बजरंग दल च्या हुसैनच्या घरावरिल हल्ल्याची बातमी खोटी आहे काय? पोलिसांनी सव्वीस कार्यकर्त्यांना अटक केली ते खोटे आहे काय? १९९६ मधे ही पेंटींग्स विचार मिमांसामधे M.F. Husain: A Painter or Butcher ह्या टायटलसह छापुन आली ते खोटे आहे काय? तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली. http://www.ndtv.com/india-news/interesting-trivia-on-m-f-husain-411618?site=full

In reply to by तर्राट जोकर

हुसेनच्या चित्रांबद्दलचा वाद त्याने २००५ मध्ये भारत सोडण्यापूर्वी बरीच वर्षे म्हणजे १९९६ मध्ये सुरू झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करून काही चित्रांची नासधूस केली होती. परंतु हा हल्ला हुसेनवर नसून त्या चित्रांवर होता. या हल्ल्यानंतरही अनेक वर्षे हुसेन भारतात होता. २००५ मध्ये भारत सोडण्याचे कारण दस्तुरखुद्द हुसेनने २ वेगवेगळ्या मुलाखतीत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. १९९६ मधील घरावरील हल्ला किंवा सुरू असलेले खटले हे त्यामागचे कारण नव्हतेच. तुमचा मूळ मुद्दा "हुसेनचे जीवाच्या भीतिने देश सोडला" हा पूर्ण चुकीचा होता. दस्तुरखुद्द हुसेननेच हे स्पष्ट केले आहे. बरखा दत्तने अनेकवेळा खोदूनखोदून एकसारखे प्रश्न विचारून त्याच्या तोंडून हे वदवून घ्यायचा प्रयत्न केला की देश सोडण्यामागे हिंदुत्ववादी हे कारण होते. परंतु हुसेनने आपली भूमिका सोडली नाही की देश सोडण्यामागे पूर्ण वेगळे कारण होते. बरखा दत्त ने घेतलेली मुलाखत वाचून मला समझोता एक्स्प्रेस बाँबस्फोटाची आठवण झाली. बाँबस्फोटानंतर पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली होती. प्रत्यक्ष पाकिस्तानच्या एका मंत्र्याने त्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानमधील संघटना आहे असे अधिकृत निवेदन केले होते. पण युपीएवाले म्हणत राहिले की बॉम्बस्फोट तुम्ही नाही केला. तुम्ही निर्दोष आहात. तो आमच्याच देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी केला. अशी भूमिका घेऊन पाकिस्तानला क्लीन चिट देऊन विनाकारण काही हिंदुत्ववाद्यांना त्या खटल्यात युपीए सरकारने अडकविले. या अत्यंत चुकीच्या भूमिकेचे परीणाम भारत आजही भोगत आहे. गंमत अशी की हुसेनच्या मुलाखतीत हुसेनने अनेकवेळा स्पष्ट करूनसुद्धा बरखा दत्त चा गोबेल्सरूपी प्रचार कायम राहिला. हुसेनच्या मृत्युनंतर केलेल्या ट्वीटमध्ये तिने खालील वाक्ये लिहिली होती. Such shame that an artist who put India on the global stage spent his last years in exile. Atleast in his death give Husain a sense of home, tweeted NDTV editor Barkha Dutt. हुसेनच्या बाबतीत असेच घडले. दस्तुरखुद्द हुसेन सांगतोय की मी माझ्या प्रोजे़क्टसाठी व स्पॉन्सर मिळविण्यासाठी भारत सोडला. देश सोडण्यामागे हिंदुत्ववाद्यांचा काहीही संबंध नव्हता. पण निधर्मांध मात्र हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करताहेत की देश सोडला तो हिंदुत्ववाद्यांमुळे.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 21:22
काय तुम्ही बरखा दत्तला घेउन बसता होत सारखे सारखे. हुसैन ला जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळाल्या नव्हत्या का?

In reply to by तर्राट जोकर

हुसेनला जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळालेल्या नव्हत्या. तुमचा मूळ मुद्दा - "हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला", पूर्णपणे असत्य आहे हे दस्तुरखुद्द हुसेनच्या २ मुलाखतीतून केव्हाच स्पष्ट झाले आहे.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 27/03/2016 - 16:01
तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली.
एनडीटीव्ही च्या बातम्या अत्यंत पक्षपाती असतात. मी दोन लिंक्स दिल्या आहेत. एक टाईम्सची व दुसरी एनडीटीव्हीची. दोन्हीमध्ये बातमी नसून हुसेनच्या मुलाखती आहेत. हुसेनने आपण २००५ मध्ये भारत का सोडला हे अत्यंत स्पष्टपणे व वारंवार सांगूनसुद्धा हुसेनने जीवाच्या भीतिने भारत सोडला हे असत्य एनडीटीव्ही गोबेल्स तंत्राने वारंवार सांगत आहे. शक्य असतं तर एनडीटीव्ही ने हुसेनची मुलाखत सुद्धा एडीट करून त्यात आपल्याला हवी ती वाक्ये टाकली असती.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 28/03/2016 - 16:58
His detractors questioned whether he would ever paint his own mother in the nude as he had painted India. “Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded. Later, they became more violent, and that led me to move to the United Arab Emirates, but I continue making my work.” http://artasiapacific.com/Magazine/70/MFHusainFacedWithPromiseAndProtest

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 28/03/2016 - 20:48
"artasiapacific" हे चित्रकलेला वाहिलेले मासिक दिसते. संपूर्ण लेखात हुसेनचे कौतुक आहे व ज्या चित्रांमुळे वाद निर्माण झाले त्यावर हिंदू संघटनाच दोषी आहेत असा लेखात कल दिसतो. मी वर दिलेल्या टाइम्स ऑफ ईंडिया च्या मुलाखतीत हुसेनचे स्पष्टपणे खालील वाक्ये सांगितली आहेत. In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. या मुलाखतीची चित्रफीत सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे हुसेन जे बोलला ते ऐकता व बघता येते. वरील मासिकात तपशीलाच्या चुका आहेत. हुसेनने २००६ मध्ये भारत सोडला असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात आपण २००५ मध्येच भारत सोडला असे हुसेन स्वतःच सांगतो. वरील मासिक आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी चालविलेले दिसते. भारतात कशी असहिष्णुता आहे हे सांगण्यात ही मंडळी पुढे असतातच. हुसेनच्या वरील मुलाखतीचे संपूर्ण टेक्स्ट दिलेले नाही. मुलाखतीची चित्रफीतही दिलेली नाही. यात हुसेनच्या तोंडात टाकलेल्या वाक्यांवर कितपत विश्वास ठेवायचा ? याउलट टाईम्सच्या मुलाखतीचे संपूर्ण टेक्स्ट व चित्रफीत उपलब्ध आहे व त्यात त्याने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की माझ्या चित्रांवर झालेल्या वादामुळे मी भारत सोडलेला नसून माझ्या प्रोजेक्टसाठी भारत सोडलेला आहे. याचाच पुनरूच्चार त्याने एनडीटीव्ही ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत केलेला आहे. जर या मासिकात हुसेनने सांगितलेले खरे असेल तर तो बाकीच्या दोन सविस्तर मुलाखतीत खोटे बोलला असे दिसते.

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी 28/03/2016 - 20:53
“Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded.
"I never responded" हे देखील खरे नाही. हुसेनने नंतर भारतमातेचे नग्न चित्र काढल्याबद्दल माफी मागून चित्र मागे घेतले होते. कतार, लंडन व दुबईत रहात असताना व भारतात परतण्याची अजिबात शक्यता नसताना व त्यामुळे हिंदू संघटनांच्या तथाकथित धमक्यांची अजिबात भीति नसताना हुसेनने हे चित्र मागे का घेतले? एकंदरीत या मासिकात हुसेनच्या तोंडात ही टाकलेली वाक्ये खरी दिसत नाहीत. हुसेन जे बोललाच नाही ते त्याच्या तोंडी टाकलेले दिसते.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर 26/03/2016 - 18:15
अजून एक दुवा. Communalising art Ruckus over a 20-year-old work by the painter raises questions about artistic freedom. Madhu Jain October 31, 1996 | UPDATED 11:47 IST http://indiatoday.intoday.in/story/m-f-husain-20-year-old-painting-of-nude-deity-raises-questions-about-artistic-freedom/1/282509.html

In reply to by तर्राट जोकर

टाइमलाइन ला महत्व प्रत्येक वेळी असतेच असे नाही. समजा तुम्ही घरात २५ वर्षापासून बेकायदेशीर बंदुका लपवून ठेवल्या आहेत आणि जर त्या आज सापडल्या तर तोंड वर करून न्यायालयात 'जरा टाइमलाइन बघा की' असं म्हणणार का?

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 28/03/2016 - 16:36
टाइमलाईन बघणे आपल्या सोयीनुसार नसते. तुमच्या प्रतिसादात तुम्ही इतके लाचार दिसत आहात त्यावरुन स्पष्ट आहे की तुम्हाला तुमचे मत हेच तुम्हाला सत्य मानायचे आहे. टाइमलाईनला महत्त्व प्रत्येकवेळी असतेच असे नाही असं म्हणताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा महत्त्व, तुमचे मुद्दे फसत असतील तेव्हा नाही. गुड. मग गुजरात दंगलीला गोध्रा हे कारण का दिले जाते, साहेब? जावा, काहीतरी चांगले पाइंट घेउन यावा.

In reply to by तर्राट जोकर

प्रतिसादात तुम्ही इतके लाचार दिसत आहात >>>>>>> जेव्हा आपल्या मनाविरुद्ध प्रतिसाद येतो तेव्हा ही भाषा वापरली जाते.!

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 29/03/2016 - 15:19
तुमच्या प्रतिसादात भुमिका तशीच दिसते आहे. की बॉ, 'मी काहीच्या काही लिहिन तुम्ही असं सम्जुन घ्या की मुद्दा खोडला गेलाय'. ह्याला तुमच्याकडे दुसरा काही शब्द असेल तर तो वापरा.

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर 29/03/2016 - 16:43
समजा तुम्ही घरात २५ वर्षापासून बेकायदेशीर बंदुका लपवून ठेवल्या आहेत आणि जर त्या आज सापडल्या तर तोंड वर करून न्यायालयात 'जरा टाइमलाइन बघा की' असं म्हणणार का? ही काय भाषा आहे? ह्यात मुद्दा तरी काय आहे? मी कोणता वैयक्तिक हल्ला केला? असो.

In reply to by तर्राट जोकर

दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>>> म्हणजे तुम्हाला कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे

In reply to by तर्राट जोकर

दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>>> म्हणजे तुम्हाला समजा कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे

In reply to by तर्राट जोकर

म्हणजे तुम्हाला समजा कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>> यावर आपले उत्तर ऐकण्यास आवडेल!

In reply to by उगा काहितरीच

मान्य आहे, पण माझा रोख याकडे होता की आपल्या (as in our) भाषेत आपण हिंसेचा वापर किती सहजतेने करतो. असा भारत पाहिजे की लेखक, चित्रकार, विद्यार्थी यांना चप्पल काय, चापट सुद्धा मारण्याचा विचार मनात नाही आला पाहिजे. आपला standard सौदी अरेबिया वरुन का म्हणून ठरवायचा?

In reply to by अत्रे

असा भारत पाहिजे की लेखक, चित्रकार, विद्यार्थी यांना चप्पल काय, चापट सुद्धा मारण्याचा विचार मनात नाही आला पाहिजे.>>>>>>> आणि त्यात कलाकारांनी आपल्या धर्माचाच मान न ठेवता दुसऱ्या धर्माचासुद्धा मान ठेवला पाहिजे. आणि मान ठेवता येत नसेल तर अपमान तरी करू नये!

In reply to by DEADPOOL

नाही बाकी तुमची खात्री वगैरे बद्दल आदर आहेच, फ़क्त कुठलाही धर्म लॉजिकल नसतो हे मी म्हणतो, अन सिद्ध ही करू शकतो, पण बघा असहिष्णुता कायम होती हे मी मांडले स्वतः, आता मान आपला, तुम्ही तुमचा तर्क मांडा (ज्याच्यामुळे तुम्हाला हिंदूधर्म लॉजिकल वाटतो), मी त्याला खंडन म्हणून माझ्या तर्काची उदाहरणे देतो, lets enjoy the good art of debating ! जर आपली इच्छा असेल तर बॉटम लाइन :- 1 मी जेव्हा कुठलाच धर्म लॉजिकल नसतो असे म्हणतो तेव्हा मला कुठल्याच एका धर्माचा अधिक्षेपही करायचा नसतो अन कुठल्या एकाच्या नावं उदोउदो सुद्धा नाही 2 धर्म लॉजिकल नाहीत हे मी काळ सुसंगत उदाहरणे देऊन सिद्ध करू शकतो 3 धर्मं लॉजिकल नसतात असे विधान केल्यामुळे अहमहमिका लावुन माझ्यावर शिक्के मारले जाऊ नयेत , माझे आव्हान खुल्या वादाचे आहे अन मी माझ्याकडून सभाशास्त्राचे नियम पाळले जाण्याची ग्वाही देतो , बाकी प्रत्येकाचा अभ्यास वकुब वगैरे

In reply to by नाना स्कॉच

DEADPOOL 02/04/2016 - 10:48
नाही हो आहे मी! हिंदू धर्मात काही इल्लोजीकल गोष्टी होत्या, पण काळानुसार त्यांवर त्यांनी मात केली उदा सती प्रथा, केशवपन ई. आणि मुख्य म्हणजे धर्माने धर्मसुधारकांचे विचार मान्य केले, लगेच शरियत शरियत करून डोके नाही उडविले! आजची ताजी बातमी सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयांचा आदर करून शनि शिंगनापुर देवस्थानाच्या विश्वासतांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणार नाही असे सांगितले!