तपोवन / झुरळे / प्रभु धावुनी आले
माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे.
प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता. जालना स्टेशनवर तपोवन मधे सहकुटुंब चढलो ते मुंबइच्या परतीच्या प्रवासासाठी,आरक्षित केलेल्या जागी काही मंडळी आधीच ठाण मांडुन बसली होती ! त्यांना उठवण्याचे अवघड सोपस्कार सुरु करावे लागले,आमची आसन व्यवस्था दरवाजाला लागुन असलेल्या बर्थपासुनच होती, त्यामुळे आमच्या मागुन चढणार्यांचा देखील खोलंबा होत चालला होता. एक बाई मोबल्यावर बोलत होती,आम्ही तिला ही आमची आरक्षित जागा आहे ते वारंवार सांगुन देखील ती बाई फोनवर बिजी होती, शेवटी एकदाची ती तोंड वाकडं करुन हलली. पण त्या नंतर जो प्रकार पाहिला आणि अनुभवला तो किळसवाणा आणि घाण वाटणारा होता. आमच्या सिटवर आणि आजुबाजुच्या सीटवर मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी झुरळे फिरुन होती ! एखाध्या मुंगांच्या वारुळात काडी फिरवुन ते विस्कटावे व त्यानंतर चवताळलेल्या मुंग्या जश्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्याच प्रमाणे अनेक झुरळे तिथे फिरत होती,फक्त ती आरामात फिरत होती हाच काय तो फरक असावा !
आमच्या आधी आमच्या आरक्षित बर्थवर लोक या अवस्थेत कसे काय बसुन होते ? याचे मला नवल वाटले आणि किळस सुद्धा....
मग मी, माझे तिर्थरुप कसे बसे आधीच्या लोकांना उठवुन सामान ठेवुन तिथे बसावे कसे या विवंचनेत पडलो... सामान लावे पर्यंत मी हातात चप्पल घालुन किमान १०-१२ झुरळे तरी मारली असावीत. मी, माझे तिर्थरुप, माझी बायडी मिळुन बर्थवर बसता यावे म्हणुन झुरळे मारत होतो आणि बोगीतली माणंस हा चाललेला तमाशा आवडीने पाहत होती. क्षणभर असे वाटले की झालं आता एक पण झुरळ यायचे नाही म्हणुन बर्थवर बसलो... काही क्षणातच माझी नजर माझ्या पिल्लाकडे गेली, तर तिच्या कानात झुरळ जाईल इतपत ते तिच्या अंगावर चढले,तर तेव्हढ्यात माझ्या मातोश्रींच्या साडीवर ही एक मिशीदार प्राणी वळवळ करताना दिसला आणि माझा संताप ! संताप ! झाला... आता पुढचा प्रवास कसा करावा ? काय करावे ? स्वतःच्याच आरक्षित बर्थ असुन त्यावर बुड टेकवण्याचे सुद्धा वांदे झाले होते !
तेव्हढ्यात माझ्या तिर्थरुपांना आधी प्रवास केलेल्या ट्रेन मधली कुठलीशी जाहिरात आठवली, जिच्यावर कुठलासा नंबर लिहिला होता...इथे ट्रेन धावर होती पण आम्हाला आमच्याच सीटवर बसता येइना, वडिलांना तो त्यांनी पाहिलेला नंबर आठवेना ! शेवटी मी मोबल्यावरुन माहिती शोधण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला.
http://www.coms.indianrailways.gov.in/criscm/common/complaint_registration.seam
ही लिंक सापडली आणि त्यावर विचारलेली माहिती दिली आणि फॉर्म सेव्ह केला.अजुन काय करता येइल ? असे विचार करुन चालत्या ट्रेन मधे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा सुद्धा भरवसा नव्हता, तिथे अजुन हाती काही लागते का ? याचा शोध सुरु ठेवला... आणि 8121281212 हा नंबर जालावर सापडला , मग मी माझ्या मोबाईलवरुन आणि तिर्थरुपांच्या मोबाईल वरुन या नंबरवर मेसेज केला. एका ओळीत कसा बसा त्या गर्दीत उभे राहुन मेसेज केला आणि हा घटनाक्रम कायअप्पावर ग्रुप मध्ये कळवला, मला काही घडेल याची काडीमात्र अपेक्षा नव्हती. माज्या मेसेजचा रिप्लाय म्हणुन इन इनव्हिस्टीगेशन असा रिप्लाय आला जो बउधा ऑटोमेटेड असावा. पण काही वेळातच माझ्या मोबाईलवर कॉल आला आणि तो रेल्वेकडुनच होता. नक्की काय झाल असा दाक्षिणात्य टोन मधुन हिंदीतुन विचारणा केली गेली, मी जमेल तसे सांगितले...माझ्या पिल्लाच्या कानात जाईल इतपर झुरळे आहेत असे सांगितल्यावर अय्ययो असा काळजी युक्त स्वर ऐकायला मला मिळाला. { या बाईचे नाव मी विचारले होते, पण आता विसरलो आहे.} माझे नाव इतर माहिती आणि पुढे औरंगाबाद { संभाजीनगर } येणार आहे असे तिला कळवले. ठीक आहे माणसे येतील असे तिने मला कळवले आणि कोण आले नाही तर याच नंबरवर कॉल करा { ज्या नंबर वरुन मला फोन आला होता त्या} असे त्या महिलेने सांगितले. काही काळाने औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन आले,आणि गाणी थांबताच आमच्या खिडकी समोर माणुस उभा ठाकला !
चौकशी केली नक्की काय झाले ते विचारले
विचार करु लागला...
मग...
स्प्रे मारला तर चालेला का ? वास येइल आणि थोडा त्रास देखील होउ शकेल असे म्हणाला... मी त्याला आधी गाडीत चढुन काय स्थिती आहे ते पहा असे सागितले... ती परिस्थीती त्यानी पाहिली आणि कार्यास लागला.
स्प्रे मारुन झाल्यावरच आमची ट्रेन तिथुन हलली... दरवाज्याच्या जवळ आमची जागा असल्याने तो स्प्रेचा गंध पटकन निघुन गेला आणि झुरळांचा त्रास आणि त्यांचा वावर अंदाजे ४५ मिनीटांनी जवळपास पूर्णपणे थांबला ! आम्ही सीटवर निदान बसु शकु अशी स्थिती झाली एकदाची... हा सगळा प्रकार बोगीतले लोक, स्त्रिया पाहत होत्या आणि माझ्या सकट सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण जालना ते औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन यात अंदाजे रेल्वेने १ तासाचे अंतर असावे या वेळेत रेल्वेची यंत्रणा हालुन चक्क मदत मिळाली होती ! { हे सर्व्ह मी लाईव्ह पोस्ट केले आहे त्यामुळे कायअप्पा ग्रुप मधली मंडळी अचूक वेळ सांगु शकतील.} प्रभु कॄपेने रेल्वेतल्या बाळाला ट्वीट करताच दुध मिळाले आणि अश्या प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या पण मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. काही काळाने माझ्या तिर्थरुपांच्या मोबाईलवर रेल्वेकडुन फोन आला, जो मीच उचलला आणि झुरळांचा उपद्रव कमी झाला आहे, परंतु माझी तक्रार अटेंड केल्या बद्धल मी त्यांचे आभार मानले !
-
-
-
-
-
-
काही वेळाने मी हात धुण्यासाठी उठलो...पण लोक बसुन असल्याने मला तिथे जाताच येइना,ही लोकं पुढच्या डब्यात का जात नाही असा विचार मनात आला आणि मी पुढच्या डब्यात डोकावले तेव्हा कळले की तो पॅंट्रीचा डब्बा आहे. मी या आधी कधीही तो डब्बा कसा असतो ? ते पाहिलेही नव्हते आणि त्या डब्ब्यात शिरलो देखील नव्हतो. सहज म्हणुन मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जे पाहिले ते मोबल्याच्या कॅमॅर्याने कैद केले !
हा सगळा अस्वच्छपणा पाहिल्यावर आणि फोटो काढल्यावर अचानक कोणाला तरी तिकडे कुणकुण लागली आणि त्या पॅट्री व्हॅनचा मॅनजर तिकडे हजर झाला ! तो मला म्हणाला काढलेले फोटो डिलीट कर...तू कोण आहेस ? तुला कोणी परवानगी दिली ? तू इनस्पेक्षन करणारा आहेस का ? नंतर मला टिसीकडे चल म्हणाला, मी त्याच्या बरोबर गेलो, तर तो तिकडेच होता, आणि त्याने मला ओळखले कारण तो आमच्या बोगीत टिकीट चेक करुन गेला होता. शेवटी त्या पॅन्ट्री मॅनेजरचे काही चालले नाही आणि मी माझ्या जागेवर येउन बसलो....
रेल्वे प्रभुजींच्या कारभाराखाली बदलते आहे याचा अनुभव मी घेतला, पण जी माणसे त्यांना नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर रेल्वेने देखील दयामाया दाखवता कामा नये अशी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन आणि रेल्वेचा प्रवासी म्हणुन सांगावे वाटते...
संदर्भ धागे :-
सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस
माझी रेल्वे यात्रा
चौकशी केली नक्की काय झाले ते विचारले
विचार करु लागला...
मग...
स्प्रे मारला तर चालेला का ? वास येइल आणि थोडा त्रास देखील होउ शकेल असे म्हणाला... मी त्याला आधी गाडीत चढुन काय स्थिती आहे ते पहा असे सागितले... ती परिस्थीती त्यानी पाहिली आणि कार्यास लागला.
स्प्रे मारुन झाल्यावरच आमची ट्रेन तिथुन हलली... दरवाज्याच्या जवळ आमची जागा असल्याने तो स्प्रेचा गंध पटकन निघुन गेला आणि झुरळांचा त्रास आणि त्यांचा वावर अंदाजे ४५ मिनीटांनी जवळपास पूर्णपणे थांबला ! आम्ही सीटवर निदान बसु शकु अशी स्थिती झाली एकदाची... हा सगळा प्रकार बोगीतले लोक, स्त्रिया पाहत होत्या आणि माझ्या सकट सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण जालना ते औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन यात अंदाजे रेल्वेने १ तासाचे अंतर असावे या वेळेत रेल्वेची यंत्रणा हालुन चक्क मदत मिळाली होती ! { हे सर्व्ह मी लाईव्ह पोस्ट केले आहे त्यामुळे कायअप्पा ग्रुप मधली मंडळी अचूक वेळ सांगु शकतील.} प्रभु कॄपेने रेल्वेतल्या बाळाला ट्वीट करताच दुध मिळाले आणि अश्या प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या पण मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. काही काळाने माझ्या तिर्थरुपांच्या मोबाईलवर रेल्वेकडुन फोन आला, जो मीच उचलला आणि झुरळांचा उपद्रव कमी झाला आहे, परंतु माझी तक्रार अटेंड केल्या बद्धल मी त्यांचे आभार मानले !
-
-
-
-
-
-
काही वेळाने मी हात धुण्यासाठी उठलो...पण लोक बसुन असल्याने मला तिथे जाताच येइना,ही लोकं पुढच्या डब्यात का जात नाही असा विचार मनात आला आणि मी पुढच्या डब्यात डोकावले तेव्हा कळले की तो पॅंट्रीचा डब्बा आहे. मी या आधी कधीही तो डब्बा कसा असतो ? ते पाहिलेही नव्हते आणि त्या डब्ब्यात शिरलो देखील नव्हतो. सहज म्हणुन मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जे पाहिले ते मोबल्याच्या कॅमॅर्याने कैद केले !
हा सगळा अस्वच्छपणा पाहिल्यावर आणि फोटो काढल्यावर अचानक कोणाला तरी तिकडे कुणकुण लागली आणि त्या पॅट्री व्हॅनचा मॅनजर तिकडे हजर झाला ! तो मला म्हणाला काढलेले फोटो डिलीट कर...तू कोण आहेस ? तुला कोणी परवानगी दिली ? तू इनस्पेक्षन करणारा आहेस का ? नंतर मला टिसीकडे चल म्हणाला, मी त्याच्या बरोबर गेलो, तर तो तिकडेच होता, आणि त्याने मला ओळखले कारण तो आमच्या बोगीत टिकीट चेक करुन गेला होता. शेवटी त्या पॅन्ट्री मॅनेजरचे काही चालले नाही आणि मी माझ्या जागेवर येउन बसलो....
रेल्वे प्रभुजींच्या कारभाराखाली बदलते आहे याचा अनुभव मी घेतला, पण जी माणसे त्यांना नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर रेल्वेने देखील दयामाया दाखवता कामा नये अशी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन आणि रेल्वेचा प्रवासी म्हणुन सांगावे वाटते...
संदर्भ धागे :-
सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस
माझी रेल्वे यात्रा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओ मालक,
@ मार्मिक गोडसे आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाहाच धागा
एक अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाबाण राव
बाण राव त्या प्यांट्री बद्दल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाअर्धशतकाबद्दल झुरळ निर्दालक
छान
खूप चांगला अनुभव बाणराव !!
सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत
बोरिवली स्टेशनबद्दल विशेष
हो.. आमचे होम ग्राउंड ;-)
काय मस्त दिसतय. मजा आली.
पुणे स्टेशनवरपण असच केलय.
हे करणा-या संघटनेशी मी संपर्क
वा वा!
सक्रिय लोकशाही
माध्यमांना अश्या बर्याचश्या
नक्कीच छान अनुभव.शेअर करावा
आश्वासक अनुभव
छान वाटलं वाचून . धन्यवाद इथे
छान अनुभव. शेअर केल्याबदद्ल
हा अनुभव आम्ही चेपूवर शेयर
छान अनुभव.
फारच छान.
लेख आणि प्रतिसाद बघून मस्त
@ असंका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पास वो आने लगे जरा जरा... :- Main Khiladi Tu Anariछान वाटल वाचून
बेहद्द आवडलं. __/\__ अपुनबी
स्पृहणिय काम !
नियमित ग्राहक