Skip to main content

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 24/02/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे. १. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा. २. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या. ३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा. ४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. ५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं. ६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात. ७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला. ८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी. १०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं. ११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला. १२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती. १३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली. १४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले. या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.

वाचने 29170
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

In reply to by पगला गजोधर

भारत देशाविषयी बोलताय का? कारण तसं असेल तर ११ वा मुद्दा "विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण" मला कुठेही दिसत नाहीये. उलट या युनिव्हर्सिटीज ना जास्तच स्वातंत्रय दिलं गेलंय. एखादा माणूस जवळच्या नाक्यावर अशा घोषणा देत असेल तर त्याचं काय होईल ते सांगायला नकोच. पण युनिव्हर्सिटीज मध्ये पोलीस पण जावू शकत नाहीत हा स्वातंत्र्याचा किती अतिरेक! बाकी हे विचारवंतच होते ना, पारितोषिकं परत करून मग परत घेणारे? त्यांना आत्तापर्यंतच्या गोष्टी दिसल्या नाहीत आणि मोदी सरकारचं एक वर्ष झाल्याबरोबर त्यांना असहिष्णुतेचा दृष्टांत झाला! तेव्हा सुडो-सेक्युलरांच्या कृत्याच्या मानानं अजून त्यांना बरेच फटके मिळायचे बाकी आहेत. त्यांना बोंबलायचंच असेल तर फटके पडल्यावर ते करायची मुभा आहेच.

In reply to by काळा पहाड

मालक त्यांनी मोदी किंवा भारतीय सरकार असे नावही घेतले नाहीये कुठेच! कश्याला भित्यापाठी ब्रह्मराक्षस करून मोदीजी अन त्यांच्या स्तुत्य कार्याला कमीपणा आणावा म्हणतो मी??

In reply to by नाना स्कॉच

समजा एखाद्याने कुठे, "Will all great Neptune's ocean wash this blood clean from my hand? No, this my hand will rather the multitudinous seas incarnadine, making the green one red" Macbeth Quote (Act II, Sc. II). असा मॅक्बेथ मधला संवाद उधृत केला, की लगेच धावत येवून विचारतात, की आमच्या लाडक्या नेत्याला उद्देशूनच म्हटला का संवाद ?

In reply to by पगला गजोधर

सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, तसंच हे समजा. बाकी "आज कुठेतरी हळूहळू" चा दुसरा काही मतितार्थ असेल तर मज पामरास समजावण्याची कृपा करावी.

In reply to by मोदक

हा हा. माध्यमांनी तयार केलेली प्रतिमा आणि सत्य ह्यात जमिन आस्मानचा फरक आहे मोदकराव. तुम्ही हा विडियो टाकून लोक किती बालिश विचार करतात, त्यांना कसे भडकवल्याजाऊ शकते ह्याचा प्रत्यय दिलात. काळापहाड म्हणतात तसे जर पोलिस डोळे बारिक करुन दाढीधार्‍यांकडे बघायला लागले तर झाला हो दहशतवादाचा नायनाट. ff ff ff ff

In reply to by तर्राट जोकर

असेल ब्वा.. दहशतवादी मार्गाने का होईना पण शांततेचा प्रसार होतो आहे हे तरी तुम्हाला समाधानकारक वाटत आहे ना?

In reply to by काळा पहाड

आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ ff ff dd On 29 September 2008, three bombs exploded in Modasa, Gujarat and Malegaon, Maharashtra killing eight persons, and injuring 80. Several unexploded bombs were found in Ahmedabad, Gujarat. Hemant Karkare, as the chief of the state Anti-Terror Squad, led the investigation into the 2008 Malegaon blasts. In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu, including a former ABVP student leader Sadhvi Pragya Singh Thakur, Swami Amritananda alias Dayanand Pandey, a retired Major Ramesh Upadhyay and a serving Army officer Lt. Col. Prasad Shrikant Purohit. Most of the accused belonged to a radical Hindutva group called Abhinav Bharat with prior links to Sangh Parivar organisations. Karkare's ATS identified, for the first time, Hindutva organisations as being responsible for terrorism in India, and political commentators began to call it Hindutva terror or Saffron terror.

In reply to by तर्राट जोकर

७ वर्षे हे लोक जामिनाशिवाय तुरुंगात आहेत. ह्या बातमीतही suspects असा शब्द वापरलेला आहे. ही बातमी इथे देण्यामागे नक्की काय कारण आहे?

In reply to by बोका-ए-आझम

सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, >> सस्पेक्ट चा उगम इथे आहे. बाकी जामिनाशिवाय त्या लोकांना आत ठेवलंय तरी त्यांचे साथीदार, त्यांच्या संघटना, हिंदूत्ववादी काहीच करत नाहीत हे आश्चर्य जनक नाही काय? काय कारण असावे ब्रे?

In reply to by बोका-ए-आझम

संशयितांना कुठलेही आरोप निश्चित नसतांना इतकी वर्षे तुरुंगात खितपत ठेवने ह्याविरूद्ध काहीच न्यायालयीन मार्ग नाही का? हा प्रश्न मी एक न्युट्रल सिटीझन म्हणून विचारत आहे. अशाने तर कुणासही संशयित म्हनुन बेमुदत तुरुंगात डांबून ठेवता येते असे दिसते. हे घटनाविरोधी नाही काय?

In reply to by तर्राट जोकर

नाही.. त्यांच्यावर मोक्का लावला आहे. जोपर्यंत मोक्का काढला जात नाही तोपर्यंत ते जामीनपात्र होत नाहीत. मध्यंतरी सीबीआयने बहुधा मोक्का काढण्याची तयारी सुरू केल्यावर सगळी माध्यमे पेटून उठली होती. पुढे काय झाले हे माहीत नाही. बाकी पुरावे नाही मिळाले तर ते सुटतील लवकरच. तसेही सरकारला हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्याची सध्या तरी गरज नाही.

In reply to by आनन्दा

सीबीआयने बहुधा मोक्का काढण्याची तयारी सुरू केल्यावर सगळी माध्यमे पेटून उठली होती. पुढे काय झाले हे माहीत नाही. >> हे चिंताजनक व विचारात पाडणारे आहे. असे होत असेल तर न्युट्रली विचार करता सामान्य नागरिकांसाठी घातक आहे.

In reply to by तर्राट जोकर

म्हनुन माझा कि बोर्ड चोरल्याबद्दल निषेध काही काही गोस्घ्ती आमचे राखीव कुरण असू द्या मालक

In reply to by तर्राट जोकर

विमान अपहरण, खेळाडूंची हत्या, बाँबस्फोट वगैरे अपेक्षित आहे का? त्यांच्या साथीदारांचे मार्ग वेगळे आहेत, इतिहास अभ्यासलात तरी चालेल.

In reply to by तर्राट जोकर

In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu, हे दुसर्या कुठल्या धर्माचे असते तर अशाच अक्षरात लिहिले असते का हो? आरोपींचा धर्म शोधून त्यांना न्याय देण्याची व्यवस्था आपल्या देशात तरी नाहीये. एखाद्याच्या हातातला झेंडा भगवा असो, निळा असो, हिरवा असो वा आणि कोणता असो जर कोणी देश विघातक कृत्य करत असेल तर त्या कृत्याला अनुसरून शिक्षा झाली पाहिजे! आणि हल्ली भगव्याला विरोध हि फ्याशन झालीये असे वाटत!

In reply to by शब्दबम्बाळ

सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, >> ही फ्याशन आहे हल्ली. काळा पहाड म्हणतात तसं. तुम्हाला नाय वाटत काय? असो. आम्ही इथंच थांबतो. धाग्यातल्या मूळ विषयावर चर्चा होऊ द्या.

तर बाकी सगळे सोविएत रशियाला लागू पडतात. ९वा मुद्दा बाकी सगळ्यांसकट चीनला लागू पडतो. पण तरीही त्यांना फॅसिस्ट म्हटलं जात नाही. डाव्यांची जी Holier than Thou अशी मनोवृत्ती आहे ती अत्यंत स्पष्टपणे यात दिसते आहे. यात ज्या राजवटींचा अभ्यास लाॅरेन्स ब्रिट यांनी केलेला आहे, त्या जुलमी होत्या यात वादच नाही. पण स्टॅलिन, माओ, पाॅल पाॅट, किम (उत्तर कोरियाचा शासक. पूर्ण नावात नेहमी गोंधळ होतो म्हणून फक्त नाव देतोय) यांच्या राजवटी त्यातून वगळणं हे जर हेतुपुरस्सर असेल तर लेखक biased आहे आणि जर नसेल तर त्याचा अभ्यास कमी आहे असं म्हणावं लागतंय. त्यामुळे एक अभिनिवेशाने लिहिलेला typical JNU style लेख याशिवाय दुसरं मत व्यक्त करता येत नाही. ( हा अभिप्राय मूळ लेखाला आहे. अनुवाद छानच आहे आणि राजेश घासकडवी यांच्या लिखाणाचा मी फॅन आहे. गैरसमज नसावा म्हणून हे लिहितोय.)

In reply to by बोका-ए-आझम

जुना रशिया, चीन, उत्तर कोरिया यासारखे अतिडाव्या किंवा फॅसिस्ट राजवटीसारखी,जुलमी राजवट, या लोकशाही देशात कधी येवू नये, किंवा आल्यास रुजू नये, अशीच सदिच्छा मी व्यक्त करतो

In reply to by बोका-ए-आझम

+१ शिवाय, काही मुद्दे कालपरत्वे (काही कालखंडांत) लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते म्हटले जाणार्‍या / दावा केला जाणार्‍या देशांबाबतीतही खरे ठरले आहेत. प्रत्येक मुद्दा आपल्याला सोईच्या चष्म्यातून पाहिले म्हणजे त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ काढायला (आपल्या विरोधकाला चिकटवायला) आपण मोकळे असतो... यालाच राजकारण * असेही म्हणतात. :) ;) ****** * संशयाचा फायदा द्यायचा असल्यास त्याला अतिसुलभिकरण असेही म्हणू शकतो :)

उगाच फाफटपसारा नसणारा अन विषयानुरुप नेमकी मांडणी असणारा लेख आवडला. अनुवाद खूपच चांगला जमला आहे.

नुकतीच डॉ.एस.एल.भैरप्पांची "तंतु" कादंबरी हातावेगळी केली.त्याची आठवण आली.

चालता येईना डाव्या कडेने अन धुता येईना उजव्या हाताने.

एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित सगळी लक्षणे कॉम्ग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसचे सरकार फॅसिस्ट होते की काय असे वाटु लागले आहे, बरे झाले ब्वो फॅसिस्टांच्या तावडीतुन सुटलो.

In reply to by मृत्युन्जय

हा प्रतिसाद आहे का ट्रैप!! :D :D आजकाल काही भरोसा नाही कोणाचा! इतके नोंदवून पास घेतो

In reply to by मृत्युन्जय

१२ वा आणि शेवटचा हे मुद्दे लागू होत नाहीत. गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत. गुलाग किंवा मृत्यूछावण्याही बनवलेल्या नाहीयेत.शेवटचा मुद्दा - staged निवडणुकींचा तर अजिबातच नाही. इंदिरा गांधींना पायउतार करणारी १९७७ ची, भाजपच्या इंडिया शायनिंगचा फुगा फोडणारी २००४ ची, जगातलं पहिलं लोकनियुक्त कम्युनिस्ट सरकार आणणारी केरळातली १९५७ ची या staged निवडणुका नव्हत्या. बाकी मुद्दे आहेत. आणीबाणीच्या काळात जर त्याचा प्रतिकार झाला नसता तर देश कदाचित फॅसिझमच्या वाटेने गेला असता कारण एका हुकूमशाही राज्यकर्त्याचे सगळे गुण इंदिरा गांधींमध्ये होते. पण १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.

In reply to by बोका-ए-आझम

दंडवत!! ह्याला म्हणतात टाकलेल्या काडेपेटीच्या जळत्या काड़ी वर तर्काचा अन सदसद्विवेकबुद्धीचा टैंकर उपडा करणे!! मानाचा मुजरा घ्या बोका-ए-आज़म साहेब! खुप कमी उरले आहेत आजकाल तुमच्यासारखे लोक

In reply to by बोका-ए-आझम

आणीबाणीच्या काळात जर त्याचा प्रतिकार झाला नसता तर देश कदाचित फॅसिझमच्या वाटेने गेला असता १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.
१९७७ मध्ये काँग्रेसला पाडून, जनतेने या देशातील लोकशाही वाचवली. सहमत

In reply to by मोदक

या हुकूमशाही वृत्तीच्या होत्या हे त्यांच्या चरित्रकारांनीही म्हटलेलं आहेच.(हे जाहीररीत्या बोलल्यावर काँग्रेसवाले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ते मान्य करतील का हा एक रोचक मुद्दा आहे.)संजय गांधींना त्यांनी दिलेली मोकळीक, विरोधी पक्षनेत्यांना आणीबाणीत झालेली अटक, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्यांना मिळालेली वागणूक, मारुती इंडस्ट्रीजसारखे गैरव्यवहार, जबरदस्तीने केलेल्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया - हा सगळा घडून गेलेला इतिहास आहे. पण हुकूमशाही वृत्ती असणं आणि खरोखर हुकूमशहा बनणं यातला फरक १९७७ च्या निवडणुकीने दाखवून दिला. पुढे जरी जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कर्माने आलेली सत्ता घालवली असली तरी त्यानंतर आणीबाणी आणण्याची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षाने दाखवलेली नाही.जर १९७७ मध्ये काँग्रेसच जिंकली असती तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर. इंदिरा गांधी व संजय गांधी हुकूमशाही प्रवृत्तीचे होते हे कोणीही मान्य करेल. शिवाय इंदिरा गांधी या राजकीय भ्रष्टाचाराच्या जननी आहेत असे माझे वाचीव माहितीवर मत झाले आहे. असे लोक पाहिल्यावर एखाद्या देशात व्यक्तिपूजा कमी होईल असे एखाद्याला वाटणे स्वाभाविक आहे पण तसे अजून तरी दिसत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत. बोकाजी.. तुम्हाला गुन्हेगार म्हणजे नक्की कोणता प्रकार अभिप्रेत आहे?

In reply to by मोदक

जाणूनबुजून, हेतुपुरस्सर आणि वैयक्तिक फायद्यासाठी कायदेभंग करणारा/री अशी गुन्हेगाराची व्याख्या करता येईल. या लेखाच्या अनुषंगाने म्हणत असाल तर फॅसिस्ट देशांमध्ये एखाद्या धर्मात जन्माला येणं (उदाहरणार्थ नाझी जर्मनीतील ज्यू) हाही गुन्हा अाहे. ख्मेर रुजच्या अंमलाखाली असलेल्या कंबोडियामध्ये सुशिक्षित आणि बुद्धिजीवी असणं हा गुन्हा होता. आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत. खैरलांजी किंवा बिहारमधील बाथे लक्ष्मणपूर यासारखी हत्याकांडं ही सरकारी यंत्रणेने घडवलेली नाहीत आणि कसाब किंवा अफझल गुरु किंवा याकूब मेमन यांना show trial न करता सर्व कायदेशीर पर्याय देऊन मग long drop hanging या तुलनेने वेदनारहित आणि म्हणूनच अमानुष न मानल्या जाणाऱ्या पद्धतीने फाशी दिलं - या लोकांनी या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेलं असूनसुद्धा. हा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यामुळे मृत्युंजयभौंच्या काँग्रेसची राजवट ही फॅसिस्ट होती या मताशी मी असहमत आहे. ती भ्रष्ट असेल, एका ठराविक धर्माचं लांगुलचालन करणारीही असेल पण फॅसिस्ट नक्कीच नव्हती.

In reply to by बोका-ए-आझम

आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत. (वादासाठी वाद म्हणून) १९८४ सालचे शीख हत्याकांड किंवा संजय गांधींनी राबवलेले कुटुंबनियोजनाचे अतिरेकी प्रकार किंवा मारूती उद्योगासाठी केलेली एकंदर दडपशाही ही सगळी लक्षणे फॅसिझमचीच होती असे म्हटले तरी चूक होईल का? तुमचा मुद्दा लक्षात आला, काँग्रेसची राजवट ही १००% फॅसिस्ट होती हे माझेही मत नाही आणि बहुदा मृत्युंजयचेही नसेल. या धाग्यामध्ये किंवा सर्वत्रच सध्या ज्या पद्धतीने देशात जाणीवपूर्वक असहिष्णुतेचा बागुलबुवा पसरवला जात आहे, विकले गेलेले पत्रकार "मुद्दा असेल/नसेल पण दोष सध्याच्या सरकारचाच" अशा पद्धतीने बुद्धीभेद करत आहेत, आधीचे काँग्रेसचे राज्य म्हणजे रामराज्य आणि आता हुकुमशाहीचा उगम झाला अशा पद्धतीचे प्रतिसाद येत आहेत त्याला वैतागून मीही मृत्युंजयसारखाच प्रतिसाद दिला असता हे ही खरेच.! बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..!

In reply to by मोदक

युनियन कार्बाईड सीईओ वाॅरन अँडरसनला भोपाळ दुर्घटनेनंतर भारताबाहेर जाऊ देणं या गोष्टी टाकायला विसरलो. बाकीचे मुद्दे लिहिले आहेतच. So मुद्दा हा आहे की जर मतदारांचा, विरोधी पक्षांचा आणि प्रसारमाध्यमांचा वचक नसेल तर एखादी राजवट फॅसिझमच्या दिशेने वाटचाल करु लागते. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने (ज्यात काँग्रेस, भाजप, आआप, सपा, बसपा, वगैरे सगळे आले)लोकांना गृहीत धरु नये. त्यामुळे भारतात मतदारांनी एखाद्या पक्षाला फॅसिझम आणू दिला नाही असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल. पक्षाला असलेलं श्रेय मर्यादित आहे. म्हणजे निवडणुकीत पराभव झाल्यावर तो मान्य करुन जिंकणाऱ्याचं अभिनंदन करुन पुढे जाणं या आणि याच गोष्टीसाठी.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत. काही पक्षसमर्थकांचा देशाच्या जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास नाही, इथे जनताच सार्वभौम आहे यावर विश्वास नाही. सांप्रत सरकार ने धिरूभाईंचा आदर्श ठेवला तर जास्त बरे होईल. 'वो जितना हमारे खिलाफ लिखे, उतना हमारे टर्नओवरके विग्यापन बढाओ'. खैर. धिरुभाईंकडे तरक्कीचा दणदणीत पुरावा होता तरी. इकडे तो आहे का नाही ह्याचा काहीच मागमूस लागत नाही.

In reply to by मोदक

बोकासाहेब निष्पक्ष लिहित आहेत तर ते वेळ घालवणे वाटतंय होय. भाजप, संघाच्या आरत्या ओवाळल्या असत्या तर तेव्हा असा प्रतिसाद आला नसता.

In reply to by तर्राट जोकर

न्हाई ब्वा.. आम्ही भक्त नाही. पण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना उठवण्यात त्यांचा वेळ जाऊ नये असे वाटते.

In reply to by मोदक

बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..! हे तर दिसुनच येतय...

In reply to by बोका-ए-आझम

पण १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली. याचा अर्थ एवढाच की जनता घाऊकपणे फॅसिस्ट विचारांची नाही . पण सरकार पण नव्हते हे सिद्ध करा. काँग्रेस फॅसिस्ट विचरांची होती किंवा आहे असे मी म्हणत नाही आहे पण सगळी लक्षणे तर वेळोवेळच्या कॉम्ग्रेस सरकारांमध्ये दिसत आहेतच की. ही लक्षणे असणारी सरकारे फॅसिस्ट असतात असा लेखकाचा (म्हणजे गुर्जी नव्हे. त्यांनी तर फक्त जनकल्याणार्थ अनुवाद केला आहे) समज आहे . म्हणुन मी फक्त प्रश्न विचारला की मग कॉम्ग्रेस फॅसिस्ट होते काय?

In reply to by मृत्युन्जय

विदा द्या.. अन्यथा रिव्हर्स ट्रोलींग बंद करा. (बरेच दिवसांपूर्वी भाळी आलेला आळ पुढे सरकवल्याने निश्चिंत झालेला) मोदक.

In reply to by मोदक

विदा काय द्यायचा त्यात? इतकी ढळढळीत उदाहरणे आहेत की. आता डोळ्यांवर कातडे ओढुन बसायचे असेल तर गोष्ट वेगळी. आणि हे रिव्हर्स ट्रोलिंग म्हणजे काय असते आणि माझ्या प्रश्नात तुम्हाला ते कसे म्हणे दिसले?

लक्षण क्र. २, ४, ७, १० व १२ ही क्रूर आहेतच यात वाद नाही. पण बाकीची लक्षणेही absolute आहेत का रिलेटिव? तूर्तास इतकेच.

उत्तम अनुवाद. (आपल्याकडे आज फॅसीझम नाही हे कळल्यामुळे जीव भांड्यात पडलेला)सुमीत भातखंडे

In reply to by जयंत कुलकर्णी

+१ नक्की लिहा. खरेखुरे वाचक स्वागत करतील आणि डुआयडी हिंदू धर्म, भाजपा, संघ यांवर पुराव्याशिवाय आरोप करत बसतील* *पुरव्याशिवाय आरोप करणारे सगळेच डुआयडी आहेत असे म्हणायचे नाहीये. "दहशवाद्यांना धर्म नसतो मात्र सगळेच दहशतवादी एकाच धर्माचे..." असे काहीसे वाक्य आहे. समजून घ्यावे.

आत्तापर्यंतची चर्चा वाचली. ऐसीवर गविंनी लिहिलेलं आहे की
कोणताही उद्देश न प्रकट करता सहजच या लेखाचा अनुवाद सध्या टाकणं म्हणजे साधारणपणे दादरी प्रकरणाच्या आसपास सहजच आपला "हिंदू धर्मातील गायीचे महत्व" असा लेख निरागसपणे टाकण्यासारखं आहे.
तर ताकाला जाऊन भांडं लपवणं, किंवा काहीतरी वैचारिक काडी टाकून कसं पेटलं हे बघत बसण्याचा माझा हेतू नाही. मांडणी मुद्दामच सर्वसाधारण केली होती, पण तरीही या सगळ्या लक्षणांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हावा हाच उद्देश होता. त्यामुळे माझी त्याबाबतची मतं मांडतो. सर्वप्रथम, इथे अनेकांनी फॅसिस्ट आणि डावी अत्याचारी सरकारं असा भेदभाव केलेला आहे. जणू काही फॅसिस्ट प्रवृत्ती ही केवळ उजव्यांची मक्तेदारी असते. अनेकांनी ही लक्षणं अनेक डाव्या राजवटींना लागू पडतात हे दाखवून दिलेलं आहे. तेही योग्यच आहे. पण पुन्हा तेच, फॅसिस्ट प्रवृत्ती या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या पलिकडे जातात. म्हणजे वरच्या उदाहरणांत जिथे 'धर्म' म्हटलं आहे तिथे 'कम्युनिस्ट विचारसरणी' असं लिहिलं तर तोच मुद्दा स्टालिनलाही लागू पडतो. (कदाचित 'पोथीनिष्ठता' हा शब्दप्रयोग जास्त व्यापक ठरेल.) तुलना करायची तर डावे की उजवे अशी न होता फॅसिस्ट राजवट विरुद्ध लोकशाही अशी व्हायला हवी. आणि सर्वसाधारण आदर्श लोकशाहीपासून दूर एकाधिकारशाहीच्या दिशेने किती जवळ जात आहोत याचा अंदाज या लक्षणांवरून यायला हवा. याचा अर्थ कधीकाळी आदर्श लोकशाही होती असा दावा नाही. किंबहुना सर्वच जगात, जिथे लोकशाही ठीकठाक चालू आहे तिथेही सरकारं या सर्व मार्गांचा थोड्या प्रमाणात वापर करतातच. त्यामुळे शून्य फॅसिझम - संपूर्ण लोकशाही असं जगात कुठेच नसावं. भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'. आणि ही पावलं मला आधीच लोकशाहीपासून दूर असलेल्या भारतीय व्यवस्थेला अजून दूर नेणारी वाटतात. मात्र इटली, जर्मनीमध्ये त्याकाळी झालं तसं, तितक्या तीव्र आणि हिंस्र प्रमाणात भारतात फॅसिझम पसरेल असं वाटत नाही. तो काळ वसाहतवादाचा होता, आणि या राष्ट्रांना नवीन वसाहती हव्या होत्या, आणि त्या इतर राष्ट्रांकडून लुटायच्या होत्या. भारत त्यामानाने फारच प्रचंड मोठा देश आहे, आणि आसपासचं वातावरणही तिथे होतं तसं नाही. त्यामुळे भारताची घटना फेकली जाऊन हुकुमशाही येईल, भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, किंवा मुसलमानांसाठी छळछावण्या उघडल्या जातील वगैरे मला बिलकुल वाटत नाही. मात्र आदर्श लोकशाहीच्या जवळ जाण्याऐवजी दूर नेण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि त्यांना यश मिळतं आहे हे मला काळजी करण्याजोगं वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

तीव्र असहमत.
'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'.
सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.

In reply to by अर्धवटराव

सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.
तीव्र असहमतीस तीव्र सहमती :)

मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)' याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.. एखादा तुलनात्मक विदायुक्त लेख.

In reply to by मोदक

दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही. एक सर्वसामान्य वाचक, नागरिक म्हणून जे कानावर येतं, पेपरात आणि इंटरनेटवर वाचायला मिळतं त्यातून तयार झालेली ही मतं आहेत. त्यामुळे त्यांना तितकंच वजन आहे. त्यामुळे जर कोणी अभ्यासू व्यक्तीने असा लेख लिहिला तर तो वाचून मी माझी मतं बदलायला तयार आहे. याचा अर्थ असा नाही की माझं म्हणणं चूक सिद्ध करण्याची जबाबदारी इतर कोणाचीतरी आहे. मला म्हणायचं आहे की माझी मतं भक्कम पायावर असण्यापेक्षा सर्वसाधारण निरीक्षणं यावर आधारलेली असल्यामुळे ती संपूर्णपणे बरोबर नसण्याची शक्यता आहे हे मी मान्य करतो. काही मुद्द्यांसाठी मला दिसलेली कारणं देऊ शकतो. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण हे पद्धतशीरपणे चालू आहे. एफटीआयआय प्रकरण, जेएनयू प्रकरण, इतर शैक्षणिक संस्थांवर सरकारी पकड घट्ट करण्याचा प्रयत्न, विचारजंत-फेक्युलर-फुरोगामी या शब्दांत हिणवणं, आपल्या धर्मात/समाजात काय त्रुटी आहेत हे दाखवणारांवर होणारी पद्धतशीर घणाघाती टीका, वगैरे गोष्टी त्यात येतात. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं धार्मिक भावनांना हात घालणं, बीफबंदी, सर्वच माहौलचं भगवीकरण, वगैरे गोष्टी समाजात घडताना दिसतात. यात प्रत्येक वेळी राजवट प्रत्यक्षपणे त्यात असतेच असं नाही. पण तसंही फॅसिस्ट राजवटींमध्ये काही प्रमाणात जनताही सामील असते/केली गेलेली असते. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं हेही होताना दिसतं आहे ते मुख्यत्वेकरून मुसलमान समाजाला ज्या पद्धतीने स्टिग्मटाइज केलं जातं आहे त्यावरून. पाकिस्तानात चालते व्हा असं जागोजागी ऐकू येतं. पुन्हा, सरकार हे सगळं करतं असं नाही, तर समाजातल्या फॅसिस्ट प्रवृत्ती बळावल्याचं ते लक्षण आहे. तीव्र लिंगभेद सरकारी धोरणांतून हा दिसत नसला, तरी मत्र्यांकडून येणारी विधानं, सरकारी पक्षातल्या लोकांकडून आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांकडून येणारी विधानं ही पितृसत्ताक पद्धतीचा परिपोष करणारी असतात. हिंदूंनी पाच किंवा दहा पोरं काढावीत असं सहज ऐकू येतं. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार/विचार मूळ लेखात याला प्रीऑक्युपेशन विथ क्राइम अॅंड पनिशमेंट असं म्हटलेलं आहे. रस्त्यावर दिसणाऱ्याला तिथल्या तिथे ठोकून काढलं पाहिजे असं कौतुकाने म्हटलं जातं. कोर्टाच्या आवारात कायदा हातात घेणारे काळे डगलेवाले राजरोस मिरवतात आणि शाबासकी मिळवतात. देशद्रोही हा शब्द पाकीटमारसारख्या सहजतेने वापरला जातो. असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे.

In reply to by राजेश घासकडवी

विचारजंत-फेक्युलर-फुरोगामी या शब्दांत हिणवणं, या वरून हा हलका फुलका विनोद आठवला... कृपाया यात कोणी कुणाला हिणवते आहे असे समजू नये. ;) Joke