Skip to main content

राजकीय

डॉक्टर की कंपाउंडर

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/08/2020 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल एका मुलाखतीत शिवसेनेचे सर्वात महत्वाचे तोंड ( म्हणजे प्रवक्ते) हे नक्की काय बोलतात हेच समजत नाहीत. ते बोलल्यामुळे शिवसेनेचे सरकार आले हे नक्की. त्यावेळेस संजय राऊत इतके बोलले की त्यामुळे शिवसेना फुटतेय की काय इतकी शंका आली होती पण त्यांनी आपला मुद्दा मागे घेतला नाही. आणि उद्धव ठाकरेंचे सरकार स्थापन झाले . हा खरे तर चमत्कारच होता. पण संजय राउतंनी त्या नंतर करोना आणि सुशांत सिंग या बाबतीत अनेक उलटसुलट उड्या मारल्या. त्यांच्या बोलण्यात कसलीही संगती नसते. पण सनसनाटी असते. राज्यसभेचे सदस्य असलेले संजय राउत त्यांचा शहाण्पणा विसरलेत की तो त्यांना अगोदरपासूनच नव्हता अशी शंका येतेय.

काश्मीरमध्ये नक्की काय चाललेय?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 05/08/2019 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी काश्मीर हे १९८७- ८८ पासुन नेहमीच धुमसत राहिले आहे. खरेतर १९४७ पासुन म्हणायला हवे. कारण राजा हरिसिंग यानी भारत स्वतंत्र झाला तेव्हा प्रथम स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला पण नंतर पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा शेवटी काश्मीर भारतात विलिन केले आणि भारतीय लष्कराची मदत घेतली. पाकिस्तानचा काश्मीर् वर नेहमीच डोळा राहिला आणि त्यातुन पुढे २ युद्धे झाली. पुढे थेट युद्धात जिंकणे अशक्य आहे हे कळल्याने अनेक छुपे हल्ले, अतिरेकी कारवाया, घुसखोरी वगैरे सुद्धा आजमावुन बघितली गेली आणि त्यातुन हळुहळु पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न उभा ठाकला.

आणीबाणीतले अनुभव

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 27/06/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आणीबाणी लागू केली त्या दिवसाला नुकतीच ४३ वर्षे पुर्ण झाल्या निमित्ताने अनेक व्यासपीठांवर आणीबाणीचा विषय , त्याबद्दलची मते ई चर्चिली जात आहेत.या चर्चांत भाग घेणारे एकतर नेते, पत्रकार वा विचारवंत आहेत. पण सामान्य जनतेच्या दृष्टीकोनातून आणीबाणी नेमकी कशी होती हे जाणून घेण्याकरिता मी हा धागा काढला आहे. माझा जन्म झालेला नव्हता त्यामुळे माझे स्वतःचे काही अनुभव नाही. माझ्या आई-वडीलांकडून तरी मी आणीबाणीच्या फारशा काही आठवणी ऐकल्या नाहीत (चांगल्या/वाईट कोणत्याही). तरी इतर मिपाकरांनी स्वतःच्या वा जवळील व्यक्तींच्या (त्यांच्याकडून थेट ऐकलेल्या) आणीबाणीसंबंधित आठवणी इथे मांडाव्या ही विनंती.

वारे निवडणुकी पुर्वीचे १९९०-२०००-२०१७

लेखक बरखा यांनी शनिवार, 31/12/2016 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
दशक १९९० - स्थळ- पुणे -वातावरण- निवडणुकी पुर्विचे माझ्या आठवणी नुसार, निवडणुका जवळ आल्या की वेग-वेगळे पक्ष आपला प्रचार करण्यास तयार व्हायचे.नेते लोक प्रत्येक घराला भेट द्यायचे. आपुलकीनी मत मागायचे. त्या वेळी फार मोठ्या ईमारती न्हवत्या. चाळिवजा घरे जास्त होती, त्यात वावर करण्याचा रस्ता मातीचा. मुख्य सडका फक्त डांबरी होत्या. निवड्णुका आल्या की नवीन डांबरी रस्ता करणे, चाळित मातीच्या रस्त्यावर फरश्या टाकणे, नळ कोन्ढाळी करुन देणे अश्या वेग-वेगळ्या कामांना वेग यायचा. त्या वेळेस बोटावर मोजण्या ईतकेच पक्ष होते. प्रभागही आताच्या मानाने लहान होते.

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 24/02/2016 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे. १. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार.