Skip to main content

क्षितीज

लेखक शाल्मलि यांनी रविवार, 04/01/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची, असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची; मात्र तो असतो फक्त एक अभास तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?
लेखनविषय:

वाचने 2634
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कवितेतले आम्हाला काय विशेष कळत नाहि , आम्हाला या कवितेत फक्त 'मनत' आणी 'मनला' हे जे शब्द आले आहेत त्या जागी 'मनात' आणी 'मनाला' असे शब्द हवे होते येव्हडेच कळाले !! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

कळ्ल! व्याकरण फार चा॑गलय ते..... पहीलाच प्रयत्न तो आमचा.... =))

कविता अंमळ डोक्यावरूनच गेली..! शाल्मली, कविता वगैरे तुझा प्रान्त नव्हे. तू आपली मिपावर छान छान पाकृच देत जा.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शाल्मलि आणि शाल्मली वेगळ्या आहेत वाटते. - झुरळ मारणारा क्षत्रिय.

In reply to by प्राजु

ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक. येस्स..! घोटाळा झाला खरा.. तरीच म्हटलं भरली भेंडी करणारी शाल्मली कविता केव्हापासून करायला लागली?! :) आता उलगडा झाला.. आपला, (र्‍हस्व-दीर्घात फसलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुद्धलेखनाला फाट्यावर मारलं की असं होतं बॉ! शाल्मलि आणि शाल्मली सारख्याच दिसू लागतात. ;) ह. घ्या.

झुमाक्ष, प्राजु आणि प्रियालीताई, खुलाश्याबद्दल आभार. ही शाल्मलि मी नाही. नावाच्या र्‍हस्व दीर्घातला हा लहानसा फरक पटकन कळत नाही हे खरेच आहे. पुढे सुद्धा असा गोंधळ होउ शकतो. --शाल्मली.