Skip to main content

आरसा हरवेल तेव्हा ये ..

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 22/01/2016 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरसा हरवेल तेव्हा ये (चेहरा गवसेल तेव्हा ये) केवढी गर्दी तुझ्याभवती.. एकटे वाटेल तेव्हा ये पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये दाह सोसावा कसा तुजला हा ऋतू बदलेल तेव्हा ये वाहती आहेच ही दुनिया पण कधी आटेल तेव्हा ये.. डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7509
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

छान कविता. (रच्याकने, यावरून 'धागा उडेल तेव्हा ये, डुआयडी मिळेल तेव्हा ये' असे काहीतरी बनवता येईल का? ;-) )

In reply to by एस

(डॉ अहिरराव यांची क्षमा मागून) . पासवर्ड हरवेल तेव्हा ये (ड्वायडी गवसेल तेव्हा ये) केवढे +१ तुझ्या धागी.. कंपू कमी वाटेल तेव्हा ये "अप्रकाशित" आहे जसे येथे हे तिथे होईल तेव्हा ये बॅन सोसावा कसा तुजला 'संमुडी' बदलेल तेव्हा ये वाहते आहेच हे मिपा चेपु लाइक्स आटेल तेव्हा ये..

@प्रचेतस, माहितगार, नीलमोहर, संदीप चंदने, प्राची अश्विनी , मित्रहो, मयुर, पालीचा खंडोबा, पैसा, बोका ए आझम ,अनुप ढेरे, आनंद कांबीकर, अजया , एस सर्व मित्रांचे मनापासून आभार !

In reply to by drsunilahirrao

डॉ. साहेब तेवढं ते "चंदने" च्या ऐवजी "चांदणे" अस पाहिजे आहे! :) धन्यवाद, Sandy

दिल ही दुखाने के लिये आ... छान लिहीलीये! दुसर्या ओळीत कंस का वापरला आहे? सुरेश भट यांच्या गझलेतदेखील हे पाहीले आहे. कारण कळत नाही पण...

In reply to by शब्दबम्बाळ

कंसामुळे काही सूक्ष्म भाव (जे आपल्या सहजपणे लक्षात येत नाहीत. आणि जे अधिक स्पष्ट करुन शब्दांतून सांगणे शक्य नसते ते ) अधिक स्पष्ट -परिणामकारक होतात, असे मला वाटते !