Skip to main content

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 26/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 41094
प्रतिक्रिया 169

प्रतिक्रिया

पाच! मुलं झाली आणि एकाही पांडवाचे प्रेम मिळाले नाही,ते कसं?
मुले होणे म्हणजे प्रेम मिळाले असा होत नाही. पाच जणात एक बायको असल्यावर कोणाचे प्रेम मिळेल. अर्जुनाने द्रोपदीला स्वयंवरात जिंकले पण द्रोपदीचे सोंदर्य पाहुन युद्धिष्टराचे चित्त ढळले व द्रोपदी विषयी अभिलाषा निर्माण झाली. युद्धिष्टर ज्ञानी होता पण पराक्रमी नव्हता. जेष्ठपणाचा युक्तीवाद केला. व्यास व नारदांनी दैवी दाखले देऊन द्रोपदीला पाच पांडवा बरोबर विवाह करण्यास राजी केले. (द्युष्टद्युम्नाने विरोध केला होता)

In reply to by हेमंत लाटकर

वाचन वाढवा लट्टुकाका. द्रौपदी इनिशिअली फक्तं अर्जुनाची बायको होती. तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं. त्याकाळी जेष्ठांच्या आज्ञा पाळल्या जात असल्याने आणि सर्व पांडव मातेच्या वचनामधे असल्याने त्यांना द्रौपदीशी विवाह कराव लागला. दुसरं म्हणजे हे वाक्यं.
युद्धिष्टर ज्ञानी होता पण पराक्रमी नव्हता
असं कोणं म्हणालं? पांडवांपैकी प्रत्येक जणं एकेका प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येमधे निपुण होता जसं की अर्जुन= धनुष्य बाण भीम= गदा, नकुल किंवा सहदेवांपैकी एकजण= खड्ग अर्थात तलवार ई.ई.. माझ्या माहितीप्रमाणे युधिष्ठिरानेही कौ.पां. युद्धात प्रचंड पराक्रम गाजवलेला होता. उगीचं वाटेल ती माहिती पसरवु नका.

In reply to by हेमंत लाटकर

पांडवांमध्ये, अर्जुनाला > अभिमन्यु, भीमाला > घटत्कोच अशी संततीचा उल्लेख आढळतो, परंतु युधिष्ठीराच्या पुत्र / कन्या ची नावं /नांवे काय ? युधिष्ठीराला संतती होती का ? याचे उत्तर जर ''नाही'' असेल, तर आमच्या शालेयजिवनातील शिक्षक डॉ चाफेकरांनी, युधिष्ठीराच्या पौरुषत्वा-संधर्भात विधान केलेले (सन १९९२ मधे) , ते मी सांगू शकेन. (आणि जर युधिष्ठीराच्यासंततीचा अस्सल उल्लेख असेल, तर त्यामुळे चाफेकर सरांच विधान मी इथे देणार नाही, त्यांच्या तर्कानुसार द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी म्हणून ठेवण्याच्या मागे, पांडव व कुंतीचे पूर्वनियोजित कृत्य असल्याची मीमांसा, मी इथे देणार नाही )

लेख व लेखकाचे आतापर्यंतचे दोन्ही बाजूंनी दिलेले प्रतिसाद पाहता, हे विचार मनात आले... १. रामायण व महाभारत यांना महा/काव्य असे संबोधले जाते. म्हणजे त्यांचे लेखक कवी झाले. कवींना काव्यात वस्तुस्थितीपासून दूर जाण्याची सूट (पोएटिक लिबर्टी) असते असे म्हणतात. या लिखाणाच्या लेखकांपैकी कोणीही "ही जशी घडली तशीच लिहीलेली सत्यकथा आहे" असे कुठेच लिहून ठेवल्याचे ऐकिवात नाही (जाणकारांनी खुलासा करावा). २. रामायण व महाभारत यांना बर्‍याच भारतियांच्या मनात बरेच आदराचे व आस्थेचे स्थान असले तरी, त्या लेखनातील संदर्भ आजच्या जीवनात वापरा असे सांगितले तर त्यातले बरेच जण "वेडे झालेत काय? हे आजच्या काळात चालणार नाही" असे सांगून आपल्याला वेड्यात काढतील अशीच परिस्थिती आहे. तेव्हा आता "हे असे कसे" असे म्हणण्याचे फारसे प्रयोजन उरले नाही ही वस्तुस्थिती आहे. ३. जगातील प्रत्येक अर्वाचीन/मध्ययुगीन/प्राचीन लेखनात सर्वांना सर्वकाळ पटेल असे कधीच काही नव्हते/नाही/असणार नाही. त्यामुळे, कोणत्याही लेखनातील शास्त्रिय कसोट्यांवर "न उतरणार्‍या / न पटणार्‍या" गोष्टी जोपर्यंत सर्वांवर लादल्या जात नाहीत किंवा त्यांचा इतरांना उपद्रव होत नाही, तोपर्यंत त्यांचा उगाच बाऊ करणे असहिष्णूपणा होईल. तसा बाऊ न करण्याला अर्वाचीन कालात विचारस्वातंत्र्याचा मानवी अधिकार असे म्हणतात. ४. लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता लेखकाकडे उत्तम लिखाण करण्याची ताकद आहे असा अंदाज आहे. तेव्हा त्याने, असला चावून चोथा झालेला आणि चर्चेचे शून्य फलित असलेले विषय सोडून इतर काही वैचारिक / रोचक / लालित्यपूर्ण लिहीले तर नक्कीच आवडेल. हे लेखक व मिपासभासद दोघांसाठी सकारात्मक होईल. शिवाय, चांगले लिहीले तर मिपाकर भरभरून प्रतिसाद देतातच... त्याकरिता वादग्रस्त मुद्दे असायलाच हवेत असे नाही. हे माझे व्यक्तिगत मनोगत झाले. बाकी मिपाकर (यात लेखकमहाशयही आलेच) आपापले योग्य निर्णय घेण्याइतके सुज्ञ आहेतच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता लेखकाकडे उत्तम लिखाण करण्याची ताकद आहे असा अंदाज आहे.
डाॅक्टर म्हात्रे हे कौतुक आहे की पुणेरी खोचकपणा आहे. :)

In reply to by हेमंत लाटकर

मी जे लिहायचे ते स्पष्ट लिहीतो. त्यामागे वेगळा अर्थ नसतो. :) तुमची विषय मांडण्याची आणि विषद करण्याची पद्धत चांगली आहे. तर्कही चांगले करता/वापरता. यामुळे तुम्ही चांगले लिहू शकाल असा माझा अंदाज आहे. वादग्रस्त विषय निवडू नये असे माझे मत अजिबात नाही... पण ज्या विषयावर केवळ वादच होणार, काहीच सकारत्मक होणार नाही, हे नक्की आहे, त्या विषयाला परत परत उकरून काढणे कोणाच्याच फायद्याचे नाही असे माझे मत आहे. आपण मांडलेला विषय व त्यावरची चर्चा फलदायी झाल्यास त्या लिखाणापासून लेखकाला जास्त सकारात्मक समाधान मिळते, असा माझा अनुभव आहे.

In reply to by चित्रगुप्त

वरील प्रतीसादास दोन्ही हातांनी बाक वाजवून अनुमोदन आणि काकांचे अभिनंदन !!!!

तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं.
हे बरोबर नाही. कुंतीला व व्यासाला 100% माहित होते स्वयंवरात अर्जुनच जिंकणार. माते आम्ही भिक्षा आणली असे युद्धिष्टर म्हणाला. म्हणून न पाहता कुंती वाटून घ्या असे म्हणाली. द्रोपदीचे सोंदर्य पाहून युद्घिष्टराच्या मनात द्रोपदीविषयी अभिलाषा निर्माण झाली होती. सुरवातीला द्रोपदी, द्रुपद, द्युष्टद्युम्न यांनी विरोध केला. पण व्यासाने दैवी दाखले देवून पाच पांडवाशी द्रोपदीचा विवाह करण्यासाठी राजी केले. मी महाभारताची बरीच पुस्तके वाचली आहेत नावे आता आठवत नाही.

द्रोपदीला अर्जुनाने स्वयंवरात जिंकले तरी विवाह पाच पांडवा बरोबर करावा लागला. अर्जुन तर युद्धामुळे बाहेरच असायचा. व्यासाने सांगितले एखाद्या पांडवाकडे द्रोपदी असताना दुसर्या पांडवाने जर व्यत्तय आणला तर त्याला 12 वर्ष वनवास. एकदा गायी सोडवून आणण्यासाठी शस्त्रे पाहिजे म्हणून युद्धिष्टर द्रोपदी बरोबर असताना अर्जुनाने व्यत्तय आणल्यामुळे त्याला 12 वर्ष वनवास भोगावा लागला व द्रोपदी 12 वर्ष युद्धिष्टरा बरोबर राहिली. 12 वर्षाच्या वनवास काळात उलुपी, चित्रागंदा व सुभद्रा यांच्या बरोबर अर्जुनाने विवाह केला. सुभद्रा अर्जुना बरोबर राहिली. बाकी दोघीनी पुत्र झाल्यावर जायची परवानगी दिली. युद्धिष्टरच जेष्ठ असल्यामुळे द्रोपदी बरोबर जास्त राहिला. (द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता युद्धिष्टराची मात्र मजा झाली)

In reply to by हेमंत लाटकर

(द्रोपदीला स्वयंवरात न जिंकता युद्धिष्टराची मात्र मजा झाली)
अत्यंत चीप प्रतिसाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मिपावरच्या सग्ळ्यात मोठ्ठ्या कंपूने यावर काहिही आक्षेप घेतला नाही...त्यामुळे त्या प्रतिसादात वैट्ट काही नसावे (इतरवेळी मात्र खफवर मिपावर पुरुष आयडी स्त्रीयांबद्दल वैट्ट लिहितात असा आरोप केला जातो)

माफ करा जोकर साहेब, माझा संदर्भ थोडा वेगळा आहे. उगाच वाईट वाटून घेऊ नका. ज्यांना समजायचा त्यांना समजेल.

@ बाहुबली पराक्षर सत्यवतीच्या सबंधातून व्यासाचा जन्म झाला. पराक्षर ने सांगितले तुझे कोमार्य पुर्वीसारखे झाले. ते पाहण्यासाठी इ.स. पुर्व 3000 मध्ये सोनीग्राफी होती का? वीर्य शोषून घेईपर्यंत शुक्रजंतू थांबणार आहेत का? @ ऋतराज आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे.>>> इ.स. पुर्व 3000 ला हे तंत्र होते का? @चिमणराव तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं.>>> स्वयंवराला जाताना पांडव कुंतीला सांगूनच गेले होते. कुंतीला अर्जुनाच्या पराक्रमाची खात्री होती की स्वयंवरात अर्जुनच जिंकणार. कुंतीने जाणूनबुजून वाटून घ्या असे म्हणले होते. द्रोपदीचे साेेंदर्य बघून बाकी चार पांडवाच्या मनात द्रोपदीविषयी अभिलाषा निर्माण झाली. व्यासाने दैवी दाखले दिले व द्रोपदीला पाच पांडवाशी लग्न करण्यास भाग पाडले. कोणती स्त्री पाच पुरषाशी लग्न करायला तयार होईल.

In reply to by हेमंत लाटकर

म्याचफिक्सिंग झालेलं का? कर्ण सर्वार्थानी अर्जुनाएवढाचं लायक उमेदवार होता. आणि जेष्ठ पांडव असुनही त्याचा सुतपुत्र म्हणुन हिणवलं जाउन त्याला स्पर्धेमधुन थेट बाहेर काढलं गेलं. त्याकाळी एकपतीव्रत वगैरे प्रकार नसावा.

कर्ण हा कुंतीला लग्नाआधी झालेला होता. (बहुतेक वसिष्ठापासून झालेला असेल) कुमारी मातेला समाजाने मान्यता दिली नसती. पाच पांडव हे कुंतीला व माद्रीला पान्डुच्या संमतीने झाली. "मनस्मृती" या हिन्दु धर्मशाश्त्रात नियोगाने जन्मलेले पाच पांडवाचे आई वडिल पान्डु, कुंती व माद्री हेच होते. अर्जुन कर्णापेक्षा जास्त धर्नुधारी होता. विराट राजाच्या गाय़ी सोडून आणण्याच्या वेळी अर्जुनाशी युद्ध करताना कर्णाला रणांगणातून पळावे लागले. युद्धाच्या वेळी कुंतीने तु पांडव आहेस व द्रोपदी तुझी सुद्धा पत्नि आहे हे सांगणे म्हणजे कर्णाचे मन खच्ची करणे होते. ही कृष्णनीती होती.

In reply to by हेमंत लाटकर

कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर साहेब. तुम्ही आपलं ट्यालेंट असल्या विषयात वाया घालवु नये असं माझं वैयक्तीक मत आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कर्ण सुर्यपुत्र होता लाटकर साहेब.
महाभारतकथेमध्य दंतकथा काहीही असेल, तुला खरंच असं वाटतं का? :)

In reply to by काळा पहाड

निघाला दुर्वासांच्या जागी वसीष्ठांचा पत्ता. पुढच्या वेळी नीट पिसतील ते !!! ५-३-२ वाला नाखु

In reply to by काळा पहाड

या वेळी तरी नक्की का?
100% नक्की. रामायण महाभारत मध्ये कन्फ्युज झाले. वसिष्ठ दशरथाचे राजपुरोहित व रामाचे गुरू होते.

चांगली सेवा केल्यामुळे दुर्वास ऋषीने तिला मंत्रदिक्षा दिली व कोणत्याही देवाला आवाहन केले की तो देव प्रगट होईल ही कवीकल्पना आहे. प्राचीन काळी निसर्गातील प्रत्येक गोष्टीला देव मानत. उदा. सुर्य,चंद्र,पर्वत,समुद्र,वारा,आग, वीज,पाऊस,वृक्ष,नदी. अंबिका,अंबालिका व दासीला जसे नियोगाने व्यासापासून धृतराष्ट,पान्डु,विदुर झाले. तसेच कुंतीला व माद्रीला हिमालयीन भागातील ऋषीं पासून पाच पांडवे नियोगाने झाली.

In reply to by हेमंत लाटकर

दुर्वास ऋषींचा संदर्भ आला की पुराणात भयानक घटनाच घडलेल्या दिसतात. त्यांच्या रागामुळे त्यांच्याबरोबर सहवास करणे अवघड वाटे. म्हण्युन दुर्वास नाव मिळाले म्हणे.

In reply to by हेमंत लाटकर

कर्ण हा दुर्वासांनपासून झालेला असणार,आणि बाकिचे पाच पांडव इतर निरनिराळ्या ऋषींपासून. नंतर यांनी युद्धात पराक्रम दाखवला म्हणून ते देवांपासून प्राप्त झालेत अशी फोडणी टाकली गेली असणार. . . . . . आणि कुठे काही अडचण आलीच तर कथेचे निर्माते(व्यास) प्रकट होऊन ती अडचण पूर्ण करतात.