मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

विद्यार्थी · · काथ्याकूट
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

वाचने 50274 वाचनखूण प्रतिक्रिया 277

In reply to by जडभरत

विकास Fri, 07/31/2015 - 21:55
खालील बातमी वाचून या उपचर्चेतील आयडी कुणाचे आहेत असा प्रश्न पडला. ;) ओवेसींच्या 'त्या' मताशी शिवसेना सहमत ( अर्थात ";)" या चिन्हाचा अर्थ ह.घ्या/हलकेच घ्या/take it easy असा आहे. )

In reply to by श्रीगुरुजी

वॉल्टर व्हाईट Fri, 07/31/2015 - 01:44
धन्यवाद.
हाच नियम ज्यांच्याकडे चोरी झालेली आहे, ज्यांच्यावर बलात्कार झालेला आहे, ज्यांची फसवणूक झालेली आहे ... अशा इतरांना सुद्धा लावला तर योग्य होईल का?
नाही.
ज्याप्रमाणे खुन्याला फाशी देऊन गेलेली व्यक्ती परत जिवंत होणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या बलात्कार्‍याला शिक्षा देऊन पिडीतेची अब्रू परत येणार नाही. मग कशाला बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची?
बलात्कार्‍याला देण्यात येणारी शिक्षा मृत्युदंड नसते त्यामुळे हे उदाहरण इथे गैरलागू आहे. मी शिक्षा ही व्यवस्था अमान्य करतोय असे नाही. बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

सुबोध खरे Fri, 07/31/2015 - 09:10
वॉल्टर व्हाईट साहेब आपल्या विधानांमध्ये वैचारिक गोंधळ दिसतो आहे बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. या साठी त्याला जन्मठेपेची काय गरज आहे त्याला लिंग विच्छेदची (CASTRATION) शिक्षा द्या कि म्हणजे तो परत धजावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्याय हा नुसता करून उपयोगी नाही तर तो दृश्य सुद्धा असला पाहिजे( justice should not only be done but be seen to be done गुगलून पहा) हे कायद्याचे मौलिक तत्व आहे. याचे कारण त्यातून धडा घेऊन इतर माणसे सुद्धा तो गुन्हा करायला धजावू नयेत हा त्यातील मुद्दा आहे. दहशतवाद्याला फाशी देणे यात हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्यथा बलात्काराला जन्मठेप आणी दोनशे माणसाना उलट्या काळजाने उडवून देणे यालाही जन्मठेप असेल तर त्या गुन्ह्याच्या भयानकतेत फरक कसा करणार? सुडोसेक्युलर लोकांना कोणा मुसलमानाला फाशी दिले कि च कसा कळवळा येतो ते समजत नाही. याकुब फाशी गेला आता सहा महिन्यांनी फाशीची शिक्षा हवी कि नको यावर वादसंवाद करा. यांचे बोलाविते धनी वेगळे आहेत. (गुन्हेगारी पाताळ जगात)

In reply to by वॉल्टर व्हाईट

श्रीगुरुजी Sat, 08/01/2015 - 13:27
>>> बलात्कार्‍याला देण्यात येणारी शिक्षा मृत्युदंड नसते त्यामुळे हे उदाहरण इथे गैरलागू आहे. मी शिक्षा ही व्यवस्था अमान्य करतोय असे नाही. बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे. गुन्ह्याची तीव्रता जितकी मोठी, शिक्षा त्या प्रमाणातच असते. >>> बलात्कार्‍याला शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे बरोबर. तसेच खुन्याला, दहशतवाद्याला सुद्धा शिक्षा द्यायची गरज आहेच, कारण पिडीत व्यक्तीला त्याने न्याय मिळणार आहे. आणि पिडीत व्यक्ती म्हणजे केवळ मृत व्यक्ती नसून त्या व्यक्तीचे नातेवाईक आणि खुनी/दहशतवाद्यामुळे कायमचे जायबंदी/जखमी झालेल्या व्यक्ती सुद्धा असतात. >>> आणि बलात्कार करणारा जेव्हा सुटेल तेव्हा भोगलेल्या शिक्षेच्या अनुभवाने तो पुन्हा गुन्हा करायला धजावणार नाही. असे काही नाही. बलात्काराची शिक्षा भोगून सुटल्यावर पुन्हा बलात्कार केल्याची उदाहरणे आहेत. >>> प्रश्न फक्त मृत्युदंडाबाबत आहे. दहशतवादी/खुन्याला मृत्युदंड दिल्याने तो परत असा गुन्हा करूच शकणार नाही. म्हणूनच मृत्युदंड आवश्यक आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 10:22
विजय तेंडूलकर हे लेखक म्हणून उच्च दर्ज्याचे आहेत हे वादातीत आहे परंतु या लेखामध्ये नाटकीपणा फार जाणवतो.जसे काही मरणाला समोर जाणारा माणूस पाहणारे ते एकटेच आहेत. जेंव्हापासून त्यांनी विचारवंताचा मुखवटा धरण केला तेंव्हापासून त्यांच्या बद्दलचा आदर दुणावायच्या ऐवजी उणावला. बहुसंख्य डॉक्टरना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. शेवटची घटका मोजणारा रुग्ण पहायची वेळ कित्येक वेळा येते. आणि हा रुग्ण गुन्हेगार नसून तुमच्या आमच्यातील सामान्य आणि निष्पाप माणूस असतो आणि प्ररीस्थिती समोर अगतिक असतो. डॉक्टर सर्व समजूनही काहीही करू शकत नाहीत आणि ते सुद्धा तितकेच अगतिक असतात. कालच माझ्या वाहिनीची मैत्रीण आली होती. तिच्या वडिलांना बद्धकोष्ठ आणि दम लागत होता म्हणून त्यांची तपासणी केली असता त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग आढळला आणि तो यकृतात आणि फुप्फुसात पसरला आहे, त्यांच्या जवळ फार तर ३-४ महिने आहेत. हा निर्दोष आणि निष्पाप माणूस आहे आणि त्याचे मरण पाहणे हि शिक्षा डोक्तार्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नियतीने दिलेली आहे. याचे कणाकणाने वर्णन एखादा डॉक्टर आणि लेखक करेल तर ते जास्त भावेल( मी लेखक नाही आणि ते मला जमणारे नाही) तेंव्हा एखाद्याने दहशतवादासारख्या मानवतेविरुद्ध केलेल्या गुन्ह्यात असे भावनाविवश लिखाण नंने हि गोष्ट चुकीची आहे. जाता जाता -- एखाद्या गरीब मुसलमान माणसाने आपल्या मुलीवर होणारा बलात्कार टाळण्यासाठी जर दोन खून केले तर त्याला हे विचारवंत एवढी कायद्यातील पळवाटा काढायला मदत करतील का? यात सर्व राजकारण आणि पैसा याची घाण येते आहे. अल्पसंख्यांक म्हणून सलमान खान रस्त्यावरील लोकांना मारून आजही बाहेरच आहे मग अलीस्तीर परेरा अल्पसंख्यांक नव्ह्ता का? कि ख्रिश्चन लोक कमी पातळीचे आहेत. http://www.huffingtonpost.in/2015/05/06/alistair-pereira-sanjeev-nanda_n_7220000.html या सुडोसेक्युलर लोकांच्या दुटप्पीपणाचा संताप येतो. पैसा किंवा राजकीय लाभ असेल तेंव्हा त्यांना मानवतावादाचा कळवळा येतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2015 - 07:52
याकुबला फाशी दिल्या गेली समाधान वाटलं. विषय संपला. फाशी देऊ नये, तो मुस्लिम म्हणून फाशी दिल्या गेली असे विधानं करणा-यांवर गुन्हे दाखल करून यांना उठता येणार नाही असे फटके देणा-या पोलिसांच्या ताब्यात देता येईल अशी काही कायद्यात तरतुद हवी असे वाटते. -दिलीप बिरुटे

dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 10:11
जातीय दंग्ल , धार्मिक दंगल यासाठी फाशेचीच्शिक्षा योग्य आहे.

अद्द्या गुरुवार, 07/30/2015 - 10:50
फाशी कायम . बाकी कोणी कितीही काहीही म्हणोत . हवं तर आसुरी आनंद म्हणा . पण खूप बरं वाटलं . आता फक्त ते फाशी रद्द करायला सह्या दिलेले लोक आणि टीवी वर येउन ओकलेले लोक . यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून केस चालवा कोणी तरी. माजलेत साले

भिंगरी गुरुवार, 07/30/2015 - 10:52
कलाम सरांच्या जाण्याचे दु;ख तर आहेच पण त्यांच्या सारख्या निस्सीम देश भक्ताच्या अंतिम यात्रेच्या दिवशी आम्हाला एका कट्टर देशद्रोह्याच्या मृत्युच्या बातम्याच जास्त पाहाव्या लागल्या याचे दु;ख जास्त झाले. सकाळपासून फक्त 'तो' आणि 'तोच' . एका माजी राष्ट्रपतीपेक्षा 'तो' महत्वाचा होता का? भले त्याच्या विषयीच्या बातम्या देणे गरजेचे असेल पण त्या फिरत्या पट्टीवर दाखवून कलाम साहेबांचे (जसे आता दाखवत आहेत)अंतिम दर्शन दाखवले असते तर 'त्याला' अवास्तव महत्व मिळाले नसते.

In reply to by भिंगरी

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 11:18
भिंगरी ताई दोघेही धर्माने मुसलमानच एकाचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून लष्करी अधिकारी अभिमानाने खांद्यावर घेऊन वायुसेनेच्या विमानाने नेतात दुसर्याचे पार्थिव चोरासारखे काळ्या कापडात गुंडाळून न्यावे लागते. एकाच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागते. दुसर्याचे पार्थिव येणार म्हणून हजारो पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतो. एकाच्या मृत्यूमुळे आदराने डोके झुकते दुसर्याच्या फाशीमुळे शरमेने मन खाली जाते. एकाच्या मृत्यूमुळे आपल्या कुटुंबातील एक व्यक्ति( आपलेच आजोबा) गेल्या इतके दुःख होते दुसरा हरामखोर मेल्याने सुटकेचा निः श्वास सोडला जातो. एक आयुष्यभरासाठी हृदयात मखर करून बसेल दुसरा उद्या -कोण? म्हणून विचारावे लागेल कोणते मरण सार्थक आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2015 - 10:52
पहाटे चार पर्यन्त कोर्टात युक्तिवाद चालले, भारतात गुन्हेगाराला वाचविण्यासाठी असा प्रकार पहिल्यांदाच झाला असे वाटते, गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी असे रात्रं दिवस कोर्ट चालले असते तर असे विस विस वर्ष गुन्हेगारांना पोसावं लागलं नसत ""भाई ये कैसा मजाक चल रहा अपने देश में। ये कोर्ट है या चौक के बाबा जी की पान की दूकान ? की जब मर्जी अधी रात को शटर खुलवा के 2 गोल्ड फ्लेक ले लिये" -दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 10:58
या सुडोसेक्युलर लोकांच्या हट्टापायी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीश( अगोदर सरन्यायाधीश आणि त्यांच्या आदेशाने तीन न्यायाधीशांचे पूर्णपीठ ) आणि महा अधिवक्ता ( Attorney General) यांनी मध्य रात्री अडीच वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडून न्यायदान केले. अशी सुविधा एखाद्या गरिबासाठी हे बोकड (सुडोसेक्युलर) उपलब्ध करून देतील काय? http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/yakub-memon-execution-time-line-of-last-ditch-efforts-of-1993-mumbai-blasts-convict/articleshow/48275900.cms

vikramaditya गुरुवार, 07/30/2015 - 11:03
These blood thirsty people will hang him tomorrow. If so called legal pundits say so - what else can you expect from fanatics and opportunists?

dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 11:27
१९९३ चे बॉम्बस्फोट ही दंगलीनंतरची 'रिअॅक्शन' होती. त्यामुळे 'रिअॅक्शन'ला शिक्षा होते मग 'अॅक्शन'ला शिक्षा का नाही?, असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी याकूब मेमनच्या फाशीनंतर केला आहे. दाऊद असोत नाहीतर याकूब मेमन. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून निष्पापांचे प्राण घेणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी मात्र संपूर्ण परिस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्याआधी जातीय दंगल उसळली होती. या दंगलीत २५०० बळी गेले होते. या दंगलीची 'रिअॅक्शन' म्हणून बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. आज याकूबच्या फाशीने बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा दिली गेली आहे. मात्र ज्यांनी दंगल घडवून जातीय तणावाची ठिणगी टाकली त्यांचे काय?, त्यांना अशी शिक्षा का नाही?, असा सवाल आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केला

In reply to by dadadarekar

खटपट्या गुरुवार, 07/30/2015 - 11:58
दादा दरेकर, अबू आझमी आणि ओवेसी सारखे मुर्ख लोक असे बरळत असतात. खेदाची गोष्ट ही आहे की तुमच्या सारखी शिकली सवरलेली माणसे त्यांच्या वक्तव्यांना महत्व देतात. आता जनताही ओवेसी आणि अबू आझमीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करते. म्हणतात की शिक्षण माणसाला शहाणं बनवते. पण खेदाने म्हणावेसे वाटते की चार्टर्ड अकांउंट सारखे शिक्षण घेतलेला तरूण ज्याने आपल्या कुटूंबाला दीशा द्यायला पाहीजे तो अशा देशविघातक क्रुत्यांमधे गुंतला. कोणाच्या वक्तव्याला किती महत्व द्यायचे ते आपण ठरवुया..

In reply to by अनुप ढेरे

प्यारे१ Fri, 07/31/2015 - 12:57
बाबरी ढाँचा मध्ये मशिदीमध्ये चालतात तशा प्रकारची कुठली सत्कृत्ये होत होती? ती कधीपर्यंत सुरु होती? कधी कोर्ट केस सुरु झाली? ती संपली का? संपली नसल्यास निकालापूर्वी तिथलं कुलुप कोणी उघडलं? का उघडलं? मुंबई दंगल कशी सुरु झाली? राधाबाई चाळ नाव ऐकलंय का? तिला आग कशी लागली? किती लोक मेले? कुठल्या धर्माचे लोक मेले? बाबरी ढांचा पाडताना किती आणि कुठल्या धर्माचे लोक मेले? नंतरच्या दंगलीमध्ये किती आणि कुठल्या धर्माचे लोक मेले ? मुंबई दंगली आधी किती धार्मिक दंगली वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या? त्यातले आंकड़े काय सांगतात? बाबरी ढांचा पडला तोवर भारतात किती मशिदी पडल्या आणि त्या बरोबर किती देवळं पाडली गेली?

In reply to by प्यारे१

अनुप ढेरे Fri, 07/31/2015 - 13:41
बाबरी पाडणं => मुंबै दंगली => मुंबै बॉम्बस्फोट हा घटनाक्रम आहे. नंतरच्याचा घटनांचा पहिल्याशी संबंध नाही हे धादांत खोटं आहे. खरोखर बदला होता वा बॉम्ब फोडायला कारण मिळालं. पण बाबरी पाडल्याने हे सगळं ट्रिगर झालं हे नक्की.

In reply to by अनुप ढेरे

प्यारे१ Fri, 07/31/2015 - 13:52
बाबरी पाडण्यापूर्वी कधी दंगली झाल्या नाहीत? मुळात हिन्दू उत्तर देऊ शकतो हे बाबरी पाडण्यातून सिद्ध झालं. तोवर मार खाणं किंवा मरणं हेच मुख्यत्वे नशिबी होतं. नंतर दंगली केल्या गेल्या तेव्हाही रोखठोक उत्तर मिळालं. या सगळ्या घटनांमुळं सैरभैर झालेल्या लोकांनी चिरडीला येऊन बॉम्ब स्फोट घडवले. 93 साठी बाबरी हे मान्य करु एक वेळ. 2006 ला मुंबई ट्रेन ब्लास्ट साठी काय कारण होतं हो???

In reply to by प्यारे१

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 14:13
>>> 2006 ला मुंबई ट्रेन ब्लास्ट साठी काय कारण होतं हो??? १९८४ आणि १९६९ मधील मुम्बईतील दंगली; १९६८, १९७४ आणि १९८८ मधील पुण्यातील दंगली इ. दंगली बाबरी प्रकरणापूर्वीच झालेल्या होत्या. दंगल ही पूर्वनियोजित असते. कोणते तरी निमित्त वापरून पुर्वनियोजित दंगल केली जाते. १९९२-९३ मधील दंगल अशीच पूर्वनियोजित होती. बाबरी केवळ निमित्तमात्र. बाबरी प्रकरण झाले नसते तरी दंगल झालीच असती. तसेच बॉम्बस्फोट देखील झाले असते. १९८० च्या दशकात माफियांनी व दंगलखोरांनी पारंपारिक शस्त्रांच्या बरोबरीने बॉम्ब वापरायला सुरूवात केली. त्याचा पुढे अधिकाधिक व सफाईने वापर होत गेला.

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 14:02
>>> पण बाबरी पाडल्याने हे सगळं ट्रिगर झालं हे नक्की. बाबरी मुद्दा चर्चेत सुद्धा नव्हता (म्हणजे १९८६ च्या आधीच) त्याच्या आधीपासून मुम्बई व देशात इतरत्र असंख्य भीषण दंगली झालेल्या होत्या आणि बॉम्बस्फोट देखील झालेले होते. बाबरी पडली नसती तरी दंगली, बॉम्बस्फोट झालेच असते.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे Fri, 07/31/2015 - 14:10
या स्केलचे कुठले स्फोट आधी झाले होते? आणि बॉम्ब लावणार्‍यांपैकी एकाने हे सांगितलय की बाबरी आणि दंगली याचा बदला घेण्यासाठी बॉम्ब लावले.

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 14:17
>>> या स्केलचे कुठले स्फोट आधी झाले होते? दिल्लीत १९८४ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या ट्रान्झिस्टर बॉम्बच्या स्फोटात ७० हून अधिक नागरीक मृत्युमुखी पडले होते. >>> आणि बॉम्ब लावणार्‍यांपैकी एकाने हे सांगितलय की बाबरी आणि दंगली याचा बदला घेण्यासाठी बॉम्ब लावले. दंगल करणारे आणि बॉम्बस्फोट करणारे आपल्या कृत्यांच्या समर्थनार्थ वेगवेगळी कारणे शोधत असतातच. त्यांना १९९२ पर्यंत काश्मिरचा मुद्दा हे कारण पुरलं. १९९२ ते २००२ पर्यंत ते बाबरी हे कारण वापरत होते. २००२ पासून गुजरात हे कारण वापरात आहे. भविष्यात वेगळे कारण वापरणे सुरू होईल.

In reply to by श्रीगुरुजी

मदनबाण Fri, 07/31/2015 - 14:22
गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि "अमर जवान" स्मारक तोडण्या मागचे कारण काय हो ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

In reply to by मदनबाण

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 14:38
>>> गुरुजी, आझाद मैदान हिंसा आणि "अमर जवान" स्मारक तोडण्या मागचे कारण काय हो ? देशात इतरत्र झालेल्या दंगली व बॉम्बस्फोट व त्यातून झालेली वित्त व मनुष्य हानी या तुलनेत आझाद मैदान हिंसा/"अमर जवान" हे प्रकरण अगदीच शुल्लक होते. यामागचे कारण म्यानमारच्या सैनिकांनी म्यानमारमध्ये राहणार्‍या निर्वासित बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांची केलेली हत्या हे कारण होते.

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 13:02
>>> मुंबई बॉम्बस्फोट हे बाबरी पाडल्याची आणि नंतरच्या दंगलीची रिअ‍ॅक्षन होती हे चूक आहे काय? होय. हे चूक आहे.

In reply to by अनुप ढेरे

आनन्दा Mon, 08/03/2015 - 16:27
अनुप सर, अभ्यास वाढवा अशी नम्र विनंती. बाँबस्फोटातले आरडीएक्स हे बाबरी ढाचा पाडला जाण्याच्या अगोदर २ महिने अलिबागच्या किनार्‍यावर उतरले गेले होते. आता ते टायगर मेनन वगैरे अंतर्ज्ञानी होते असे म्हणायचे असेल तर भाग वेगळा.

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 11:50
ओ हितेस राव त्या अबू आझमीचं कसला कौतुक सांगताय? जोड्याने मारण्याच्या पण लायकीचा माणूस नाही. देश के कितनेभी तुकडे हो जाये हम किसीको अपने मजहब से खिल्वाद करणे नाही देंगे म्हणणारा देशद्रोही माणूस हा. तुम्ही त्याच्या तोंडाला तोंड कशाला लावताय?

In reply to by dadadarekar

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 12:24
म टा मध्ये राशिभविष्यात कौटुंबिक कारणासाठी अनावश्यक खर्च होणार आहे आणि वायफळ बोलणे टाळा हे पण लिहिले आहे. खरुज नायटा आणि गजकर्ण वर बी टेक्स मलम वापरा हेही लिहिले आहे. बरं मग?

सामान्यनागरिक गुरुवार, 07/30/2015 - 11:59
१. पहिली गोष्ट म्हणजे याकुब मेमन विषयी एव्हढी चर्चा कशाला ?समाजातचं ते एक विकृत अंग आहे. उशीरा का होईना व्यवस्थीत कायदे प्रक्रिया राबवुन ते समाजातुन काढुन टाकलं जातंय. त्यात समाधान मानुन शांत रहायला हवे. २. आपण सगळ्ञांनी जर अशीच चर्चा करत राहिलो तर एका विकृतीला महत्व दिल्यासारखे होईल. जेव्ह्ढी चर्चा जास्त तेव्हढेच असेप्रयत्नं चालु रहातील. ३. जे पत्र राष्ट्रपतींना दिले गेले आहे ज्याची एव्हढी चर्चा होतेय, त्यावर फक्त मुस्लीम आमदार, खासदारांच्या सह्या मुस्लीम लोक आपल्या धर्माच्या माणसाला वाचवण्यासांठी हे असं करणारंच.त्यात नवल ते काय ? त्यांना बकी कशाहीपेक्षा धर्म जास्ती प्यारा असते ही गोष्ट सर्वश्रुत आहे. ४. त्याही उपर अश्या लोकांना जाणवु द्यायचे असेल की त्यांचे कृत्य असमर्थनीय आहे तर या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांना कुठल्याही सामजिक समारंभांना बोलावु नका. च्यानेलांवर चर्चेस बोलावु नकस, कुठल्याही घडामोडींवर त्यांची प्रतिक्रीया दाखवु नका. थोडक्यात त्यांच्यावर राजकीय, सामाजिक अंधार येईल असे करा. ५. उद्यापासून ही चर्चा थांबवा कारण सकाळी सातनंतर याकुन अस्तित्वात नसेल. उगीचच वाढवण्यात काही अर्थ नाही.

तुडतुडी गुरुवार, 07/30/2015 - 12:54
@dadadarekar या दंगलीत २५०० बळी गेले होते??? काय टिंग्या सोडताय हो ? कोणी सांगितलं तुम्हाला ? दंगलीत ९०० बळी गेले होते . आणि दंगलीची सुरवात त्या लोकांनी केली होती मशीद पाडल्यानंतर . 'रिअॅक्शन' बद्दलच बोलायचं असेल तर बाबरी मशीद पडणं हि सुधा रिअॅक्शनच होती . इस्लामी धर्मांधतेला , त्या लोकांनी मांडलेल्या उच्छादाला दिलेलं उत्तर होतं ते . आज सुधा अबू आझमी , ओवेसी आणि इतर धर्मांध मुस्लिम ज्या प्रकारे वागतात बोलतात त्यावर हिंदू सुधा रिअॅक्शन देवू शकतात . मग पुन्हा दंगल झाली कि पुन्हा दहशतवादी हल्ला . मग पुन्हा तुम्ही 'रिअॅक्शन' म्हणून गळे काढायला मोकळे . भिंगरी तै चा प्रतिसाद योग्य अहे. आता हि चर्चा बास करावी . त्याच्या फाशीची इतकी publicity करायची गरज नाही असं वाटतंय

In reply to by तुडतुडी

dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 13:45
९०० बली गेले असे दिले aàhe. विकि. Dead – 900 (575 Muslims, 275 Hindus, 45 and 5 others). The causes for the deaths are police firing (356), stabbing (347), arson (91), mob action (80), private firing (22) and other causes (4).

होबासराव गुरुवार, 07/30/2015 - 13:25
असदुद्दिन औवेसि, मिपा वरील काहि सिरिया रीटर्न माकड आणि ह्यांचेच काहि उतावळे इलेक्ट्रॉनिक मिडियातले जातभाइ (मर्कट ह्या नात्याने) ह्यांच्या मर्कट लिलाना काय उधाण आलय, आता ज्या विमानातुन त्याचे पार्थिव नेले त्याचि सुद्धा शुटींग, त्याच्या नातेवाईंकाचे चेहर्यावर काय हाव्-भाव आहेत ते सुद्ध कॅमेराबध्द. ह्या मीडियावाल्याना म्हणुनच नेपाळ्मधुन पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलण्यात आले होते.

dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 13:38
The Gujarat government has refused permission to the Supreme Court-appointed SIT to file an appeal in a higher court seeking death penalty for former minister Maya Kodnani in the Naroda Patiya riot case. This was decided on the basis of advocate general Kamal Trivedi's opinion that there was "no direct evidence" against her. Maya Kodnani and Bajrang Dal activist Babu Bajrangi, along with 30 others, were sentenced to life imprisonment in the 2002 post-Godhra Naroda Patiya riot case, in which 96 people were killed. http://m.timesofindia.com/india/Gujarat-govt-asks-SIT-not-to-seek-death-penalty-for-Maya-Kodnani-in-2002-Naroda-Patiya-massacre-case/articleshow/22604162.cms?from=mdr

In reply to by dadadarekar

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 20:22
ओ हितेस बुवा धार्मिक दंगल करणे आणी देशाविरुद्ध (परदेशातून मदत घेऊन) युद्ध पुकारणे(WAGING WAR) हे दोन वेगवेगळे अपराध आहेत आणी ते एकाच तागडीत तोलताय याचा अर्थ साधा सरळ आहे आपल्याला कायदा नीट माहित नाही. पहिल्यांदा अभ्यास वाढवा.

In reply to by सुबोध खरे

dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 23:42
परदेशाच्या मदतीने देशाविरुद्ध युद्ध याला फाशीच असते. ...द्।धार्मिक दंगल .... यालाही फाशीच हवी.

राहून राहून नवल वाटले अनेक सेलेब्स लोकांनी फाशी विरोधात मत मांडली, तो प्रसिद्धी चरितार्थाचा भाग असेल मात्र फाशीच्या समर्थन करणारा एकही सेलेब्स भारतात होऊ नये एरवी संजय सोबत काम करणार नाही म्हणणारा नाना सुध्धा काही बोलला नाही ,सामान्य जनता फाशीच्या बाजूने होती त्यांच्या मुखातील बोल एखाद्या सेलेब्स कडून ऐकायला बरे वाटले असते. कराची ची दहशत बॉलीवूड मध्ये अजून आहे हेच दिसून येते .

In reply to by निनाद मुक्काम …

चिरोटा गुरुवार, 07/30/2015 - 14:36
कराची ची दहशत बॉलीवूड मध्ये अजून आहे हेच दिसून येते
मंत्री,अनेक आय.पी.एस.अधिकारी,कस्टम अधिकारी दाऊदच्या पे-रोलवर तेव्हाही होते व अजूनही आहेत. हे लोक काहीच करणार नाहीत ह्याची खात्री असल्याने ती दहशत आहे.

होबासराव गुरुवार, 07/30/2015 - 14:07
१९९३ चे बॉम्बस्फोट ही दंगलीनंतरची 'रिअॅक्शन' होती. त्यामुळे 'रिअॅक्शन'ला शिक्षा होते मग 'अॅक्शन'ला शिक्षा का नाही?, जर हि रिअ‍ॅक्शन होति तर मग गुजरात मधल्या आफ्टर गोध्रा रीअ‍ॅक्शन बद्दल तुमचे किंवा जे तुम्हाला मेंढरा सारखे सतत चरवत असतात आणि तुम्हि चरत असता त्यांचे काय म्हणणे आहे ? कारण ह्या न्यायाने मग ति रीअ‍ॅक्शन सुध्दा जस्टीफाय होते. आमच्या साठि तर ह्या दोन्हि घटना तुम्हि त्याला 'अ‍ॅक्शन' म्हणा कि 'रीअ‍ॅक्शन' दुखद होत्या. पण तुम्हा लोकांचि हिच मेंटॅलिटि राहिलि तर तुम्हि पुन्हा एक गोध्रा कराल पुन्हा त्याला एक रीअ‍ॅक्शन येइल्..पण ह्यावेळेस भारतच सोडावा लागेल जसा तेव्हा गुजरात मधुन पळाव लागल होत. ईश्वर तुम्हाला सदबुध्द्दि देवो.

In reply to by होबासराव

dadadarekar गुरुवार, 07/30/2015 - 15:35
पिवळे केलेल वाक्य mahaaràshTra टाइम्समधले आहे. ते वाक्य माझे नाही. http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48276592&section=mumbai वीनाकारण माझ्यावर टीका करु नये.

कपिलमुनी गुरुवार, 07/30/2015 - 14:54
एक शोकान्त उन्माद आजच्या लोकसत्ता मध्ये वेगळी बाजू मांडण्यचा प्रयत्न केला आहे. गिरीश कुबेर सध्याच्या संपादकांमध्ये सर्वात चांगले लिहितात त्यामुळे एकदा वाचायला हरकत नाही

In reply to by कपिलमुनी

अत्रन्गि पाउस गुरुवार, 07/30/2015 - 16:45
काही मुद्दे खटकले ...
  • याकूब यास फाशी देणे म्हणजे देशप्रेम सिद्ध करणे असा जो उन्माद वातावरणात दिसतो, तो दूर करून याचा विचार करावा लागेल
  • टायगरच्या या पाताळयंत्री उद्योगाची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना नव्हती
  • त्यास फासावर लटकावल्यास आपली न्यायव्यवस्था शासकीय तालावर नाचते, असे चित्र निर्माण होऊ शकते.

In reply to by अत्रन्गि पाउस

गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/30/2015 - 17:12
गिरीश कुबेर यांचा अग्रलेख आवडला नाही. अग्रलेखातील एक वाक्य---
तो स्वत:हून शरण आला की आपण त्यास पकडले याबाबत संदिग्धता असली तरी एक बाब निर्वविाद सत्य आहे. ती म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. याचा अर्थ याकूब हा माफीचा साक्षीदार होता आणि आहे.
बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात होता हे भारत सरकारला याकूब मेमनला पकडण्यापूर्वी माहित नव्हते आणि ते याकूब मेमनने दिलेल्या माहितीतून सिध्द झाले हे निखालस खोटे आहे. गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी २१ एप्रिल १९९३ रोजी लोकसभेत दिलेल्या निवेदनात बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा सहभाग कसा होता याची इत्थंभूत माहिती दिली आहे. सगळ्या जगाला उपदेश करणार्‍या लोकसत्ताच्या संपादकांना ही गोष्ट माहिती नसावी याचे आश्चर्य वाटते.

In reply to by कपिलमुनी

सव्यसाची गुरुवार, 07/30/2015 - 20:19
याकुब मेमन 'माफीचा साक्षीदार' होता???? मला वाटते लेखातील चुकांची सुरुवात इथूनच करावी लागेल. माफीचा साक्षीदार होण्यासाठी गुन्हा कबुल करावा लागतो. याकुब मेमनने गुन्हा कबुल केला होता का? माफीच्या साक्षीदाराची मदत घेऊन तुम्ही मुख्य गुन्हेगाराला पकडता. मुख्य गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने धनुर्धारी - बाण (archer - arrow) अशी उपमा दिली आहे .

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे गुरुवार, 07/30/2015 - 20:49
@कपिलमुनी हे बॉम्बस्फोट हे भारतावर लादलेले युद्धच होते, हे युद्ध छुपे होते आणि पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेने ते लादले होते, हेही निश्चितच मान्य. त्यास जबाबदार असणाऱ्यांना, निरपराधांचे प्राण घेणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे हे तत्त्वदेखील मान्य. आता प्रश्न असा येतो कि भारताच्या संघराज्याच्या विरुद्ध युद्ध पुकारले हे तुम्ही मान्य करता आणी तरीही त्याला फाशी द्यायला नको होती असे म्हणता. याकूब या कुटुंबाचा सनदी लेखापाल. त्यासही आपला थोरला भाऊ नक्की कोणत्या उद्योगात मग्न आहे, हे माहीत नव्हते. म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. आपल्या सरकारने( म्हणजे कुणी? तेंव्हा असलेल्या कॉंग्रेसच्या गृह मंत्र्यांनी?) त्यांना अभय देण्याचे वचन दिले. हे याकुब ने यांच्या कानात येऊन सांगितले का? परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की मुख्य आरोपीचा भाऊ आहे आणि मुख्य आरोपी हाती लागणे शक्य नसल्याने जो कोणी हाती लागला त्यास फासावर लटकावले जावे. या अर्थाकडे आपल्या व्यवस्थेने पूर्ण दुर्लक्ष केले. यात टाडा न्यायालयदेखील आले. या न्यायालयाने तांत्रिक बाबींची पूर्तता न करताच याकूब यास फाशी देण्याचा निर्णय दिला. टा डा न्यायालयापासून उच्च न्यायालय आणी सर्वोच्च न्यायालय हे सर्व लोक बधीर आहेत आणी सरकारचे बाहुले आहेत. त्यानी या सर्व गोष्टी पहिल्याच नाहीत किंवा त्यांना पुनर्विचार याचिकेत सुद्धा याकुब्ने सांगितले नाही फक्त कुबेर साहेबांच्या कानात सांगितले ( ते सुद्धा कॉंग्रेस च्या राजवटीत UPA १ आणी २). कारण मोदी साहेब एक वर्ष पूर्वीच आले आहेत. सरकार आणि अन्य या संदर्भात इतके उतावीळ होते की याकूबची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे हे माहीत असतानाही त्यास फासावर लटकावण्याचा निर्णय झाला. सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी कायम केली त्यानंतर राष्ट्रपतीनि त्याचा दयेचा अर्ज फेटाळला त्यानंतर पुनर्विचार याचिकाही फेटाळली त्यावर ची दुरुस्ती याचिकाही फेटाळली. यावर त्याने परत राज्यपाल आणी राष्ट्रपतींकडे दयेचे अर्ज केले तेही फेटाळले गेल्यावर रात्री ३ वाजता तीन न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय उघडून त्याच्या याचिकेवर विचार करतात आणी ती फेटाळतात असे असूनही कुबेर बेताल वक्तव्ये करतात हे पाहून त्यांची लाज वाटली. त्यांचे वक्तव्य ओवैसिपेक्षाही लाजिरवाणे आहे. त्यास फासावर लटकावल्यास आपली न्यायव्यवस्था शासकीय तालावर नाचते, असे चित्र निर्माण होऊ शकते.हे सर्व कॉंग्रेस च्या राजवटीत UPA १ आणी २) झालेले असताना केवळ भाजप च्या राज्यावर शिंतोडे उडवण्यासाठी गिरीश कुबेर अशी बेफाट विधाने लिहीताहेत याचा अर्थ त्यांचा बोलविता धनी दुसराच आहे. गिरीश कुबेर यांची पातळी सुमार केतकर यांच्यापेक्षाहि खाली गेली. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरायला पाहिजे. काही वेळेस श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे मत पटते "आपल्याला लोकशाही नको ठोकशाहीच पाहिजे" मुनिवर डोळे उघडून वाचत चला

In reply to by सुबोध खरे

मदनबाण गुरुवार, 07/30/2015 - 22:57
गिरीश कुबेर यांची पातळी सुमार केतकर यांच्यापेक्षाहि खाली गेली. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरायला पाहिजे. १००% सहमत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aao Huzoor Tumko... :- KISMAT

In reply to by सुबोध खरे

गॅरी ट्रुमन Fri, 07/31/2015 - 11:08
गिरीश कुबेर यांची पातळी सुमार केतकर यांच्यापेक्षाहि खाली गेली.
गेल्या काही महिन्यांमधले गिरीश कुबेर यांचे अग्रलेख वाचून डॉक्टरसाहेबांच्या या मताशी नक्कीच सहमत आहे. विशेषतः कालचा अग्रलेख अगदीच सुमार होता.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी Fri, 07/31/2015 - 15:34
लेखामध्ये वेगळी बाजू मांडण्यचा प्रयत्न केला आहे
मी माझ्या प्रतिसादामध्ये कुठेही संपादकीय लेखाचा समर्थन केला नाहीये. किंवा याकूबाचा समर्थन केला नाही किंवा फाशीला विरोध केला नाही . चर्चा होताना वर्तमान पत्रामधला एक संदर्भ दिला जेणेकरून काही लोकांची भावना काय आहे त्याचा परामर्श घेता यावा . ते लिहिलेले मला मान्य आहे असा अर्थ कसा काय काढलात ? माझ्यावर का बरसता ??

In reply to by कपिलमुनी

अत्रन्गि पाउस Fri, 07/31/2015 - 20:54
कायप्पा वर आलेला मंदार जोशी नामक व्यक्तीचा प्रतिसाद.... इथे मंदार जोशी काही डू आयडी ने असल्यास आणि त्यांना हे इथे असे टाकणे मान्य नसल्यास किंवा आणखी काही कारणाने काही तांत्रिक झोल असल्यास हा प्रतिसाद उडवावा ------------------------------------------------------------------- आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानिर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री गिरीश कुबेर साहेब, कोपरापासून नमस्कार. लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्‍या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होता, पण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध. फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहे. तो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रामन साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की पाकिस्तानच्या आय.एस.आय. या गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबियांनी याकूबला 'भारतात परतणे कितपत श्रेयस्कर' याचा आढावा घ्यायला नेपाळमधे असलेल्या त्याच्या नातेवाईकाशी व एका वकीलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं. या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलीसांनी त्याला ओळखला, आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रामन यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता. पण विमानतळावर त्याला पकडणार्‍या नेपाळी पोलीस अधिकार्‍याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहीण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच. मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्पदच आहे अशी माहिती 'उघड' करण्यास कारणीभूत ठरणारा असा वेडगळ आणि तद्दन निरुपयोगी करार भारत सरकारने कसा काय केला असेल असे मज पामराच्या बुद्धीलाही पडणारे प्रश्न तुम्हाला पडले नसतील असे आम्ही कसे मानावे? वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्‍यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे? पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्‍यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब! तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्‍या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे काय? मग तुमच्याकडे तुमच्या "वस्तुस्थिती" व "निर्विवाद सत्य" या शब्दांपलिकडे जाऊन तीन न्यायालयात, ज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकुबचे म्हणणे ऐकून घेणार्‍या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हांस जाणीव आहे काय? हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लोकपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षित, अडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोत, लेखापरिक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे याची कल्पना नव्हती असे "अधिकृत वस्तुस्थिती"च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी. त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता "त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबियांस ठाऊक होते" आणि मग लगेच "परंतू त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते". हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरीवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावूक नसे अशी एखादी सुरस कथा कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता. तसेच, एकीकडे याकुबला 'काही म्हणजे काही माहित नव्हतं हो' असा टाहो फोडतानाच "तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही." असेही म्हणून जाता. कुबेर साहेब, एक पे रेहेना, एक तो काही माहित नै बोलना नैतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांट्याउड्या मत मारना. पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगं. हे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच. आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे? आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेच. भारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे न समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत. संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद व टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत व आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकुब फासावर गेलाय तो ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा 'उचलला याकुब, लटकवला फासावर' हे वाक्य 'उचलली जीभ लावली टाळ्याला' शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम. आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्या, आणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्ती विषयी जरा उमाळा येऊ द्या. गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. मला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा. ती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत. माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता, त्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्‍या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही. तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्याच्या आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि तुमच्या या संपादकीयावरुन पुन्हा सिध्द झालेले आहे की तुमची नियतही साफ नाही. तेव्हा लवकर सुधारा. नाहीतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधे रस्त्यावरच्या मवाल्यागत वागून थोतरीत खाणारा राजदीप आणि अनेकांनी तोंडात शेण घातलं तरी रोज न चुकता बरळणारा निखिल वागळे यांच्या रांगेत लोक तुम्हाला कधी नेऊन बसवतील तुम्हालाच पत्ता लागावयाचा नाही. पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता व तुमचा तीव्र निषेध. आपला नम्र मंदार दिलीप जोशी

तिमा गुरुवार, 07/30/2015 - 17:33
याकुबला फाशी दिल्याचे अजिबात दु:ख नाही. पण आज सकाळपासून चॅनेलवाल्यांनी जी रनिंग कॉमेंटरी चालू केली होती ती उद्वेगजनक होती. आचरट मिडिया अशावेळेस दोन्ही बाजूने तेढ वाढवण्याचा प्रयत्न करते. त्याचे देशांत काय परिणाम होतील, त्याची त्यांना पर्वाच नाही.

होबासराव गुरुवार, 07/30/2015 - 17:37
मि माझ्या सकाळच्या प्रतिसदात तेच लिहिले होते "म्हणुनच ह्याना नेपाळ्मधुन हाकलले होते"

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/30/2015 - 18:30
झालं ... संपलं ... गेला याकुब ! जन्नत मधे ७२ व्हर्जिन्स मधे खुष असेल तो ! मिपावर जातीवादी आणि व्यक्तिद्वेषी एकांगी आणि प्रचारकी वादविवाद बंद करा . आता बस्स करा . वातावरण निवळु द्या !

श्रीगुरुजी गुरुवार, 07/30/2015 - 22:52
लोकसत्ताच्या गिरीश कुबेरांच्या अग्रलेखातील खालील परिच्छेद वाचून धन्य झालो. विशेषतः मेमन बंधूंच्या वडीलांनी मेमनला चोपले हा जावईशोध वाचून कुबेरांचे पूर्वाश्रमी केतकर यांच्या एका त्रिखंडात गाजलेल्या परखड अग्रलेखातील खालील वाक्य आठविले. १९८४ साली दिल्लीत शिखांविरूद्ध दंगल उसळलेली असताना राजीव गांधी जीवाची पर्वा न करता दंगल शमविण्यासाठी गल्लीबोळातून हिंडत होते. http://www.loksatta.com/sampadkiya-news/death-penalty-to-yakub-memon-1127350/
अधिकृत वस्तुस्थिती अशी आहे की टायगरच्या या पाताळयंत्री उद्योगाची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. याकूब या कुटुंबाचा सनदी लेखापाल. त्यासही आपला थोरला भाऊ नक्की कोणत्या उद्योगात मग्न आहे, हे माहीत नव्हते. त्याचे चोरटे व्यापार कुटुंबीयास ठाऊक होते. परंतु त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे, हे कुटुंबास ज्ञात नव्हते. त्याचमुळे बॉम्बस्फोट चौकशीत जेव्हा टायगर मेमन याचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आयएसआयच्या कचाटय़ात असलेल्या मेमन बंधूंच्या वडिलांनी कुटुंबात सर्वादेखत टायगरला चोपले. त्याच वेळी आपली कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी आणि टायगर वगळता अन्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यात पुढाकार होता थोरले मेमन आणि याकूब याचा. परंतु तसे करणे धोक्याचे होते. कारण ही सर्व मंडळी आयएसआयच्या तावडीत होती. आयएसआयने त्यांची अेाळख पुसून टाकली होती आणि त्यांना बनावट पारपत्रेदेखील देण्यात आली होती. तरीही भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांचा छडा लावून त्यांच्याशी संधान बांधले. यातही पुढाकार होता याकूबचाच. काठमांडू येथून पाकिस्तानात परतण्याच्या प्रयत्नात असताना याकूब अलगदपणे भारतीय गुप्तचरांच्या हाती लागला. काहींच्या मते तो अपघात होता तर एका वर्गाच्या मते याकूबने पत्करलेली ती शरणागती होती. तो पाकिस्तानात परतला असता तर आयएसआयने टायगरप्रमाणेच त्याच्याही मुसक्या आवळल्या असत्या, हे उघड आहे. त्यामुळे तो योग्य वेळी भारताच्या हाती लागला. तो स्वत:हून शरण आला की आपण त्यास पकडले याबाबत संदिग्धता असली तरी एक बाब निर्वविाद सत्य आहे. ती म्हणजे आपल्या सरकारने त्यास त्या वेळी अभय देण्याचे वचन दिले आणि त्या बदल्यात त्याने बॉम्बस्फोटातील पाकिस्तानी सहभाग उघड करावा, असा हा करार होता. याचा अर्थ याकूब हा माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही. परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की मुख्य आरोपीचा भाऊ आहे आणि मुख्य आरोपी हाती लागणे शक्य नसल्याने जो कोणी हाती लागला त्यास फासावर लटकावले जावे.

पाटीलअमित गुरुवार, 07/30/2015 - 22:57
whatsapp वर एक नोंद फिरत आहे जशी च्या तशी भाषांतर करून देत आहे ,पदरचे काही नाही कसाबला बाळासाहेब घेऊन गेले याकुब ला कलाम आता फक्त दावूद ला परत आण पवार साहेब वाट पहात आहे तसेच माझे ह्या घडा मोडी वरचे लेखन नक्की बघाच

In reply to by पाटीलअमित

जडभरत Fri, 07/31/2015 - 10:30
घडा मोडी हा शब्द असा का लिहिलाय? एकदम वाचलं तर घोडा घोडी दिसतंय. हे साहेब शुद्धलेखनासाठी प्रसिद्ध होणार बहुतेक! याकुब आणि दावूद ही नवीन बारशी!!! गंमतीत घ्या...

जॅक द रिपर गुरुवार, 07/30/2015 - 23:53
गेल्या बावीस वर्षांत एकदा तरी याकूब मेमन किंवा त्याच्या कुटुंबियांनी बाँबस्फोटात मरण पावलेल्यांबद्दल चकार शब्द काढला आहे का? पश्चात्तापाचा एक शब्द फाशी जातानाही याकूबच्या तोंडून आला का?

शब्दबम्बाळ Fri, 07/31/2015 - 00:15
हा कोणी महात्मा होता का? याला गाडायला इतके सगळे लोक? आता याच्या कबरीला धार्मिक रंग दिले नाहीत म्हणजे मिळवली! बाकी, धर्मांध पक्षांनी त्यांचा डाव साधलेला आहे, याकुबला सहानुभूती मिळवून देऊन! आता त्यांना पाठींबा देणारे अजून काही लोक पैदा होतील! वोट बँक अजून मजबूत होईल! हे असले वातावरण परकीय शक्तींना फायदा देणारेच होणार आहे, फक्त काडी टाकायची गरज कि इथले लोक आपापसात भिडतील! वाईट वाटत जे काही चालू आहे ते पाहून... burial

In reply to by शब्दबम्बाळ

पाटीलअमित Fri, 07/31/2015 - 00:24
ह्याला नागपूर मधेच गाडणार होते ,पण मुंबईला खास इंडिगो चे विमान करून आणले काही गरज नसताना ==================================== आजची स्वाक्षरी रावणाचे उदाती कारण

In reply to by शब्दबम्बाळ

पिलीयन रायडर Fri, 07/31/2015 - 00:43
मला कुणी सांगेल अक हा काय प्रकार आहे. कसाबला जसा पुरुन टाकला. कुणालाही काहीही पत्ता नव्हता की कुठे, केव्हा, कसा... मग ह्याचा असा "सोहळा" काय करत आहेत? याकुब शहीद असल्या सारखं काय वागत आहेत हे लोक. एका अत्यंत गंभीर गुन्ह्यासाठी त्याला अत्यंत दुर्मिळ अशी फाशीची शिक्षा झाली. तो मेला. विषय संपला. आता काय चादरी वाहुन औरंगजेबाप्रमाणे त्यालाही "पीर" का काय म्हणतात ते बनवणार की काय हे लोक?

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Fri, 07/31/2015 - 00:59
यामागे नक्की काहीतरी मोठं शिजताना जाणवतंय.... अजून चित्र स्पष्ट होत नाही मात्र नक्कीच काहीतरी मोठी उलथापालथ घडेल असा अंदाज आहे. बिहार निवडणुक जवळ आहे पण या परिस्थितीत लोकमत लालू नितीश कड़े झुकेल. अर्थात तसंच ठरलेलं असेल तर तसंही.... हे नैसर्गिक/उत्स्फूर्त किंवा सरळसोट नाहीये एवढं खात्रीशीर!

In reply to by पिलीयन रायडर

विकास Fri, 07/31/2015 - 02:53
ज्या प्रकारे कसाब आणि अफझल गुरूची शिक्षा अंमलात आणली त्यानंतर कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आणि त्यानुसार आधी जाहीर करून शिक्षा द्यावी लागली. म्हणून नंतरचा तमाशा तथाकथीत मानवतावादी करू शकले आणि एक दिवस का होईना सुप्रिम कोर्टाच्या न्यायाधिशांची अक्षरशः झोप लांबवू शकले... फाशी नंतर अंत्यसंस्कार कुठे करायचे हे ठरवायचा हक्क त्या तुरूंगातील पोलीसप्रमुखाला असतो. त्याच्याकडे नातेवाईकांनी केलेली विनंती तो अमान्य करू शकतो. येथे त्यांनी दिली पण काही अटींवर की जास्त गाजवाजा करायचा नाही तसेच नंतर त्याच्या कबरीची समाधी करायची नाही. मला खात्री आहे, तसे केले गेले तर ते अधिकृतपणे तात्काळ पाडले जाईल. त्याचबरोबर त्याचे पार्थिव परत कुटूंबियांना देण्यात काही गैर नाही. किंबहूना त्यामुळे तथाकथीत मानवतावाद्यांच्या अजून एक बोंब मारण्याच्या संधीस बूच बसले.

In reply to by विकास

dadadarekar Fri, 07/31/2015 - 06:55
म्हणजे त्याच्यावर थडगे बांधायचे नाही. दफनविधी किमान आवश्यक तितकाच करणे , मृतदेहाचे फोटो न घेणे , अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी न जमवणे इ इ अटी आहेत.

In reply to by शब्दबम्बाळ

मदनबाण Fri, 07/31/2015 - 13:37
हा कोणी महात्मा होता का? याला गाडायला इतके सगळे लोक? लांड्यांचा तथाकथित "इमान" हा त्यांच्या धर्माशी असतो, देशास ते महत्व देत नाहीत. { याला फारच कमी मुसलमान अपवाद आहेत ज्यांचा इमान या मातीशीच होता आणि आहे,सर्वच मुसलमानांना मी द्रोशद्रोही पारड्यात टाकणार नाही, पण ही संख्या कमीच ! } ही सर्व मंडळी या देशात राहण्याच्या लायकीची नाहीत ! अगदी काश्मिरातही दहशदवाद्यांच्या जनाजा उठल्यावर तर अख्खा गाव लोटतो ! या लोकांनी उच्च शिक्षण जरी घेतले तरी यांचा माथेफेरुपणा आणि कट्टरता त्या शिक्षणा पेक्षा वरचढ ठरते हे याकुबच्या उदाहरणातुन स्पष्ट होते....इथे काही दिड शाहणे "बाबरी ढाचा" पाडला त्याची रिअ‍ॅक्शन च्या डिंग्या मारत आहेत पण हजारो वर्ष हिंदूची देवळे पाडली गेली त्यांची संपती, बायका भोगल्या त्याची परतफेड हिंदूंनी करावयाची ठरवल्यास काय होइल ? हिंदुस्थानात "माज" करणार्‍या लांड्यांनी जरा पाकिस्तानातल्या त्यांच्या जातभाईंकडे पहावे म्हणजे आपण किती सुखात आहोत याची जाणिव त्यांना होइल. ही लांड्यांची जमात हिंदूस्थानात कुठेही हिंदूंशी मिळुन मिसळुन राहिल्याचे दिसुन येणार नाही ! यांचे "हिरवे" मोहल्ले कायमच वेगळे असतात ! बोकडदाढी ठेवुन आणि टोप्या घालुन आपण कस्से सच्चे आणि कट्टर मुसलमिन आहोत हे दाखवण्या पलिकडे आणि डझनभर पोर पैदा करण्या पलिकडे यांचे इतर कुठलेही जिवीत उद्देश्य नसावे असेच वाटते ! बारा महिने १३ काळ यांचा "इस्लाम " खतरे में... अरे तुमच्या वर्तनामुळे जगभरात "इस्लाम" बदमनाम झाला आणि होतो आहे याची काळजी करा... पण नाही हे असेच देशद्रोही व्यक्तींच्या जनाज्याला गर्दी करतील आणि ढुंगण वर करुन अल्लाहु अकबरची बांग देतील ! वरच्या फोटोतील गर्दीतुन या समाजाची "खरी" मानसिकता कळुन येते. एक वाचनिय दुवा :- अशिक्षितपणा परवडला, चुकीचं शिक्षण नको! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-Chandan Sa Badan... :- Saraswatichandra

In reply to by अलक निरन्जन

dadadarekar Fri, 07/31/2015 - 06:57
मुलीच्या करियरचा प्रश्न आहे ! सलमानचे पोस्टर फाडणार्‍या एकानेही शत्रुघ्न सिन्हा व जेठमलानीचा निषेध केलेला नाही. हेदेखील गंभीरच आहे.

In reply to by सुबोध खरे

dadadarekar Fri, 07/31/2015 - 10:31
मुलगी षिनिमावाली आहे. दाउदचे पाय चाटले नाहीत तर तिचे करियर मरेल की !

चिनार Fri, 07/31/2015 - 10:47
काल चेपुवर फिरणारा एक मेसेज.. "धर्मासाठी जिहाद करा ,मेल्यावर जन्नत भेटेल" अश्या विचाराने प्रवृत्त झालेले लोकं फाशीची शिक्षा झाल्यावर दयेचा अर्ज का करतात ?

In reply to by चिनार

dadadarekar Fri, 07/31/2015 - 11:47
युद्ध्हात मेलास तर स्वर्ग मिळेल असे भगवानानी उवाच करूनही अर्जुन इहलोकीच्या राज्यासाठी का लढला ? डायरेक्ट मर्रुन स्वर्गातच का नाही गेला ?

In reply to by dadadarekar

चिनार Fri, 07/31/2015 - 12:55
दादा, प्रश्न कळला नसेल तर तसं सांगा ..मी समजावून सांगतो..उत्तरादाखल संबंध नसलेले प्रश्न विचारू नका.. राहिला प्रश्न तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचा.. अर्जुन ईहलोकाच्या 'राज्यासाठी' युद्ध लढला नाही. ते युद्ध धर्म आणि अधर्म यांच्यातलं होतं. आता धर्म कुठला आणि अधर्म कुठला याबाबतीत तुमचे विचार मला ऐकवू नका. फक्त एका गोष्टीचा विचार करता आला तर करा.भगवंताने केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्याच घरातल्या आणि आपल्याच धर्मातल्या अधर्मी लोकांविरुद्ध्ह तो लढला. "आपल्या धर्माबाहेरचे सगळे काफिर" अशी सरळसोट व्याख्या त्याने केली नाही. अर्जुन इहलोकीच्या राज्यासाठी का लढला ? डायरेक्ट मर्रुन स्वर्गातच का नाही गेला ? आता युद्धात त्याला कोणी मारू शकले नाही म्हणून त्याने युद्ध संपल्यावर आत्महत्या करायला हवी होती असे तुमचे मत असेल तर तुमची बुद्धी कीव करण्याचाही लायकीची नाही. एक अवांतर, रामगोपाल वर्माच्या मुंबई हल्ल्यावर आलेल्या सिनेमात एक शेवटचा प्रसंग आहे. 'जिहाद के लिये मरोगे तो जन्नत मिलेगी' असं कसाबला त्याच्या गुरूने सांगितले असते. पोलिस कमिशनर नाना पाटेकर त्याला त्याच्या मित्रांचे मृतदेह दाखवायला शवागृहात नेतो आणि सांगतो.. "जन्नत की बात छोड..जहन्नुम का दरवाजा भी खट्खटाया होगा ना इन दरिन्दोने , तो वाह बैठे दरबान ने भी इनके **** पे लाथ मारी होगी"

संदीप डांगे Fri, 07/31/2015 - 14:33
संपादकांना नम्र विनंती हा धागा उडवावा, अप्रकाशित करावा किंवा मागे ढकलावा किंवा किमान नाव तरी बदलावे. बास की... किती वेळा ते याकुब याकुब करायचं. च्यामारी.

माफ़ करा खालील पत्र हे इंग्रजीत आहे व् त्याचे मराठी भाषांतर होऊ शकते (कार्यबाहुल्यामुळे मी करू शकलो नाही) तरीही त्याचा अपेक्षित परिणाम हा इंग्रजीत साधला जाऊ शकतो हे मात्र मनापासून वाटले An Open Letter By A Cop To Those Opposing Death Penalty To Yakub Memon. Dear “Intelligentsia” of India, I am not a TV panelist. I am not a “human rights” activist. I am not a lawyer. I am not a political commentator. I am not a best-selling author. I am not the son or grandson of a famous man. I am an aam aadmi. More than an aam aadmi, I am an officer in the Indian Police force. And I am writing this letter to all of you, after seeing your robust defence of a terrorist. Why I mention who I am is important because unlike all of you, I don’t sit in plush AC offices and write editorials seeking clemency for a murderer. Nor do I visit TV studios and shout myself hoarse. Instead I meet such killers every single day. But I don’t meet them for cocktail parties or at press conferences (like some of you do). I meet them on the road, in the streets, with weapons in their arms and hate in their eyes. I have been in situations with them where they would not hesitate a single moment before pulling the trigger on me, but I have to consider all the ramifications like “human rights”, “due process” and “fake encounter” before I save my life and of the innocent people around me. Given the above I believe I am in a far better position to comment on a mass murderer like Yakub Memon than any of you are. To defend this criminal, multitudes of arguments have been put forth by what are now called “Adarsh Liberals” in our society. Luckily, almost no one has pleaded that he is innocent. The situation is such that Indians have to be grateful to our “Intelligentsia” for such small mercies. But one common hypothesis put forward by many is that Yakub Memon surrendered to the Indian authorities, and then cooperated with the investigations. Plain lies. Late B Raman, one of India’s finest intelligence officers wrote this in his article: "He had come to Kathmandu secretly from Karachi to consult a relative and a lawyer on the advisability of some members of the Memon family, including himself, who felt uncomfortable with Pakistan’s Inter-Services Intelligence, returning to India and surrendering to the Mumbai police. The relative and the lawyer advised him against surrender due to a fear that justice might not be done to them. They advised Yakub to go back to Karachi. Before he could board the flight to Karachi, he was picked up by the Nepal police on suspicion, identified and rapidly moved to India." This was yesterday confirmed on some news channels when they interviewed the Nepali police officer. He re-iterated that there was no deal and Yakub was fleeing to Karachi. Then why are our “Intelligentsia” hell bent on stating otherwise? Let me put it another way: I know there is a rat in my house, and I place a laddoo in a trap. The rat gets caught and then pleads for mercy saying that he had come to “surrender” because I had offered him a “laddoo” (deal). Do I let him live? The second common argument is “but we are against death penalty. It is barbaric and does not serve as deterant , it has not reduced the no. of murders" This argument is as rediculous as telling a Soldier on the border 'Plz don't shoot the enemy..bcoz killing an enemies has not reduced the number of wars in the worId' or as absurd as saying that 'Scrap IPC, bcoz IPC has not helped us to reduce the no. of crimes.' Just because we are from the police force doesn’t mean we do not value human life. But in the case of a terrorist, what choice do we have? Do we preserve him hoping heh will reform? Can terrorists who come with guns in their hands and an unshakable belief that what they are doing (killing innocent people) is right, be ever reformed? Forget reformation, keeping such a dastardly mind alive is a big security risk too. Every time he is shifted from jails we have to be our toes to see if any attempt will be made by his gang members to either kill him, so that he is silenced or rescue him, so that he can continue his activities. And there is always the risk that one fine day his friends will hold some innocent civilians hostage and demand his release, so that we can put our lives at risk all over again to re-capture him. You want to abolish death penalty? Go ahead, but not for terrorists. Some of our “intelligentsia” have been crying that “due processes of law” have not been followed in this case. It is a shame that a case which is going for 2 decades, which has been debated at multiple levels of the judiciary, even at the highest level, is still subjected to scrutiny by mis-informed, half-read, cretins sitting in AC cabins and reading op-eds. If you did have a problem with the process, why did you not raise your voice in 2013 when he was sentenced to death? Why now when his death is imminent? Are these delaying tactics? Where do your loyalties lie dear “Intelligentsia”? I sincerely hope all these people are tried for contempt of court.Terrorists and criminals today are abusing our liberal process of Justice by resorting to D2...Delay and Derail... And finally there are some utter lowlifes who have given this entire thing a political, communal and even casteist colour. How can one party whichever it may be, be held responsible for a Supreme Court verdict, which has taken 2 decades and during which time multiple political parties have fought in courts against Yakub Memon? Do you have even an iota of conscience and rationality left in you when you make such absurdly illogical statements to defend a terrorist? In the aftermath of the Gurdaspur attacks, it has been reported that now India may be a j of the ISIS. In such situations Indians must unite and fight such a huge demon. But given how our “Intelligentsia” are hell bent in sowing seeds of discord among us, I fear we will be easy targets for such groups. While we keep shouting Hindu-Muslim, Brahmin-Dalit, BJP-Congress, I fear these terrorists will rip my poor country apart. – A “thulla”

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिरोटा Fri, 07/31/2015 - 14:58
वाचनीय पण ह्या वाक्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे-
He had come to Kathmandu secretly from Karachi to consult a relative and a lawyer on the advisability of some members of the Memon family, including himself, who felt uncomfortable with Pakistan’s Inter-Services Intelligence, returning to India and surrendering to the Mumbai police. The relative and the lawyer advised him against surrender due to a fear that justice might not be done to them
कोणताही अट्टल गुन्हेगार व्हिडियो शुटींग्,खोटे पास्पोर्ट्स घेऊन दुसर्या देशात जाईल्?आय.एस.आय किंवा टायगरने त्याला असे जाऊ कसे दिले?तेही नेपाळला? सी.बी.आय.चे शंतनु सेन म्हणतात-we induced him. त्यावेळी पोलिस खात्यातल्याच एका कडून (खरी-खोटी माहित नाही) खालील माहिती मिळाली होती. १)टायगर मेमन हा दाउदच्या अनेक ऑपरेटर्सपैकी एक होता. २)पोलिसांच्या व स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्यावरच दाउद आपले साम्राज्य चालवायचा व अजूनही चालवतो. ३)दाउदने टायगरला मदत केल्याचे स्पष्ट झाल्यावर रॉ ने वरील मुद्द्याचा फायदा उठवला.म्हणजे थोडक्यात 'मेमन कुटूंबियांपैकी एकाला तरी भारतात पाठव नाहीतर तुझे येथील साम्राज्य उद्धव्स्त करू." अशी तंबी दाउदला दिली. ४)शेवटी याकुब तयार (स्वेच्छेने वा नाईलाजाने)झाला. त्याला नुसता पकडायचा नव्हता तर पाकिस्तानचा हात ह्यामागे आहे हेही दाखवायचे होते.म्हणून मग तेथील व्हिडियो शूटिंग्,पाकिस्तानी पास्पोर्ट्स वगैरे हा माल त्याच्या बॅगेत भरून त्याला पाठवले गेले.(कोणताही सराईत गुन्हेगार नकली पास्पोर्ट्स व व्हिडियो शूटिंग घेऊन परक्या देशात जात नाही. त्या देशाने काही ठोस आश्वासन दिले तरच तो जाईल.) याकुबला तसे आश्वासन रॉ ने दिले होते.म्हणूनच 'याकुबला फाशी देता कामा नये' असे मत हे सर्व ऑपरेशन करणारे रॉ चे बी.रमण ह्यांचे होते. अर्थात न्यायालयच्या/कायद्याच्या दृष्टिकोनातून अशा बॅक-डोअर आश्वासनांना अर्थ नसतो. २००६ साली ह्याचा अंदाज याकुबला आला. व नंतर आता फाशी अटळ आहे हे कळून चुकले.

In reply to by चिरोटा

फक्त दोन महत्वाच्या गोष्टी... १. आंतरराष्ट्रिय स्तरावर पोलिसांना हवे असलेले सराईत गुन्हेगार त्यांच्या खर्‍या नावांनी आणि खर्‍या पासपोर्टवर हिंडत असते तर किती छान झाले असते... त्यांना पकडायला पोलिसांना काहीच त्रास झाला नसता. त्यांची ओळख पटविण्याचे काम तर इमिग्रेशनच्या काँप्युटरनेच केले असते ! आणि अश्या गुन्हेगारांना अनेक खोटे पासपोर्ट बाळगायची गरज पडली नसती. सत्य हे आहे ही गुन्हेगारी जगत छुपी कामे, फसवेगिरी आणि इतरांच्या डोळ्यात धूळफेक करणे यावरच चालू शकते... चालते. २. बी. रमण यांचे रॉ मधले आणि शासनातले स्थान इतके मोठे नव्हते की ते आंतरराष्ट्रिय गुन्हेगाराला फाशी पासून संरक्षण देण्याचे वच॑न देवू शकतील. असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च दर्जाचा शासकीय अधिकारी (पंतप्रधान अथवा कमीतकमी मध्यवर्ती मंत्रीमंडळातला संबंधीत कॅबिनेट मंत्री) अथवा (आ) लोकसभा, घेवू शकते. उदा. अबू सालेम प्रकरण. ३. अगदी कोणी जबाबदारीच्या बाहेर जाऊन खाजगी / शाब्दिक वचन दिले असले तरी ते सरकार आणि न्यायव्यवस्थेवर बंधनकारक असू शकत नाही. अनितीच्या चिखलात लोळणार्‍या गुन्हेगारांना असे अमिष दाखवून उंदरासारखे त्यांच्या बिळाबाहेर काढून सापळ्यात पकडले आणि न्यायपूर्ण निवाड्यानंतर देहांत शासन दिले तर त्यात फार अनितीकारक आहे असे वाटू नये... कारण अश्या एका गुन्हेगाराला पकडून शिक्षा केल्याने भविष्यात शेकडो निरपराध नागरिकांचा जीव वाचू शकतो. उदाहरणार्थ, मसूद अझर (लोकसभेवरचा हल्लेखोर), अहमद ओमर सईद आणि मुश्ताक अहमद झरगर यांच्या सारखे दहशतवादी भारताच्या ताब्यात असताना त्यांना खटले चालवून देहांताची शिक्षा झाली असती तर त्यांची सुटका होऊ शकली नसती आणि त्यांच्या पुढच्या अतिरेकी कारवाया न झाल्यामुळे किती तरी निष्पाप जीव वाचले असते. तसे न झाल्याने आजही भारतातील आणि विशेषतः काश्मीरमधील कित्येक निरपराध मरत आहेत... मरत राहतील. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असा निर्णय केवळ (अ) अत्युच्च दर्जाचा शासकीय अधिकारी (पंतप्रधान अथवा कमीतकमी मध्यवर्ती मंत्रीमंडळातला संबंधीत कॅबिनेट मंत्री) अथवा (आ) लोकसभा, घेवू शकते. ईए काका, एक तांत्रिक मुद्दा सांगतो, विथ योर परमिशन अझ्युम्ड , रॉ चा फूल फॉर्म आहे "रिसर्च एंड एनालिसिस विंग" अर्थात हे खाते पुर्णपणे स्वतंत्र असे "खाते" नसते अन्यथा त्याचे सगळे प्रोसीडिंग्स अन एक्टिविटी ह्या पार्लियामेंट मधे डिस्कस कराव्या लागल्या असत्या, हे बाह्यगुप्तचर खाते प्राइम मिनिस्टर्स ऑफिस उर्फ़ पीएमओ च एक "विंग" म्हणुन काम करते अर्थात त्याला संवैधानिक अस्तित्व नाही , इंटेलिजेंस ब्यूरो सुद्धा असाच एक कांस्टिटूशनलिटी नसलेला विभाग आहे, इंटेलिजेंस ब्यूरो ची सर्वोच्च अथॉरिटी म्हणजे गृहमंत्री/ प्रधानमंत्री असतात पण रॉ ही फ़क्त न फ़क्त प्रधानमंत्री साहेबांसच रिपोर्ट करते त्यामुळे रामन ह्यांनी त्याला ओढायला हा वादा केला असेल ही गृहीत शक्यता अतिशय रास्त ठरते

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिरोटा Fri, 07/31/2015 - 17:41
रामन हे तेव्हा रॉ मध्ये पाकिस्तान डेस्क प्रमुख होते. याकुबची १९९४ मध्ये मधु त्रिहानने दीर्घ मुलाखत घेतली आहे जी यु.ट्युबवर आहे.सहसा तपास यंत्रणा गुन्हेगाराला तपास पूर्ण झाल्याशिवाय मुलाखती द्यायला परवानगी कधीही देत नाहीत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सहमत. माझा मुद्दा हाच होता की न्यायसंस्थेवरचे एखाद्या शिक्षेच्या प्रकाराबद्दलचे बंधन हा अत्युच्च स्तराचा "राजकिय" "निर्णय" असतो, तो दोन राष्ट्रांत घेतला जातो, तो डिआयबी/सेक्रेटरी स्तराचा अधिकारी घेऊ शकत नाही. (तेन्ला पावर नस्ते ;) ) म्हणून कोणत्याही गुप्तचर संस्थेच्या, कोणत्याही अधिकार्‍याला, कोणत्याही गुन्हेगाराच्या शिक्षेच्या स्वरुपाबद्दल कोणतीही खात्री देता येत नाही. फारतर प्रशासनातर्फे तुझ्या बाजूने कमी शिक्षेसाठी रदबदली करण्याचा प्रयत्न करेन इतके मोघम आणि "अंतीम निर्णयासंबंधी कोणतीही जबाबदारी नसलेले आश्वासन" देता येते, खात्री (प्रॉमिस) नाही. रामन यांच्या दाव्यामागे... (अ) तुम्ही म्हणता तसा राजकीय डाव असू शकतो, किंवा (आ) आपण दिलेल्या शब्द प्रत्यक्षात येणार नाही यामुळे लागलेली रुखरुख / अहंकाराला (इगो) बसलेला धक्का असावा आणि पुस्तकातील विधाने म्हणजे संबंधिताना "मी माझा शब्द पाळण्यासाठी माझ्या परीने शक्य ते सगळे केले" असा पडद्याआडून दिलेला संदेश असावा.

बाबरी पाडल्यानंतर या देशात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या हे सत्य नाकारन्यामागे हिंदुत्ववाद्यांचा स्वार्थ लपला आहे.भारतातले हिंदू मुस्लिम सौख्य अस्थिर करुन लोकसभेतला आपला चार टाळक्यांचा पक्ष कसा वाढेल याच्या खटपटीत संघ परिवार होता.त्यासाठी पद्धतशीरपणे रथयात्र काढल्या गेल्या,लोकांची माथी भडकवण्यात आली व नव्वदच्या दशकात हे लोक झटपट सत्तेपर्यंत पोचले. सत्तालालसेपोटी स्वजनांना(हिंदूना) दहशतीच्या आणी अस्थिरेच्या खाईत लोटणारे हिंदुत्ववादी हे याकुब मेमन जास्त गुन्हेगार आहेत.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 15:09
>>> बाबरी पाडल्यानंतर या देशात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या हे सत्य नाकारन्यामागे हिंदुत्ववाद्यांचा स्वार्थ लपला आहे. बाबरी पडण्यापूर्वी या देशात दहशतवादी कारवाया सुरू नव्हत्या हा जावईशोध लावल्याबद्दल फुलबॉटल डबियस यांचे अभिनंदन! माईंना असले संशोधक 'हे' मिळाल्याबद्दल माईंचे देखील अभिनंदन!

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

dadadarekar Fri, 07/31/2015 - 15:30
बाबरी पाडायला चिथावणी देणारे लोक आज ती जबाबदारी नाकारतात . कारण ते फाशीला घाबरतात. आणि गंमत म्हणजे भाजपाप्रेमी लोक , जिहादासाठी मरायला तयार असणारा याकूब दयेचा अर्ज का करतो ? असा प्रश्नही विचारतात ! फाशीची भीती फक्त भाजपाच्या नेत्यानाच वाटते का ? स्फोटात करोडोची संपत्ती गेली म्हणे. मंदिराच्या नावाने १४०० कोट रु गोळा करुन काखा वर करण्यासमोर हे नुकसान किरकोळच !

लोकसत्ता च्या अग्र लेखावर लोकसत्ता फेसबुक पेजवर आलेली प्रतिक्रिया - प्रात: स्मरणीय, आदरणीय, विवेक वादी श्री. रा.रा. कुबेरजींच्या चरणांस सर्वप्रथम वंदन! खुपच सुंदर अग्रलेख आहे. मेमनच्या वडीलांनी त्यांना मुलांनी काय केलय हे कळल्यावर कानाखाली मारल वगैरे वर्णन वाचुन थेट 'शामची आई' या धर्तीवर 'टायगरचे बाबा' अस काही प्रकरण वाचत आहोत असच वाटलं! ........याकुब हा कुटुंबाचा 'केवळ सनदी लेखापाल होता' अस म्हणत आपण दाखविलेले शब्द भांडाराच ऐश्वर्य पाहता आपणास शंकरशेठ का काय कसलीशी सगळ्यात भारी शिष्यवृत्ती द्यावी वाटते.... संजय दत्त च्या केसचा ऊल्लेख करत आपण काय साधु इच्छिता हे सुद्न्यांना समजलेच आहे..... आपण २२ वर्षे न्याय व्यवस्थेने काथ्याकुट करुन निकाल दिल्यावरही त्याची समीक्षा करता हा आपला अधिकार पाहता 'लोकसत्तास' भारतीय लोकशाहीचा पाचवा स्तंभ भविष्यात मानले जाईलसा भरवसा वाटतो..... असो. एक शेवटची विनंती. उद्या गुरू पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपणाकडून विवेकाची दीक्षा हवी आहे. आपले चरण पुजण्यासाठी कोठे येवुन भेटावे? सोयीस्कर वेळ सांगावी ही प्रार्थना.

एम आय एमचे खासदार जनाब असौद्दीन ओविसी यांचे म्हणने मला अतिशय योग्य वाटते,जर याकुब मेमनला फाशी दिली आहे तर तोच न्याय गुजरात दंगलीतील आरोपि कोदनानी व ईतरांनाही लावला पाहिजे.त्याच बरोबर मालेगावात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुस्लिमांचा जिव घेणार्या क्रुरकर्मा जनरल पुरोहीत ,साध्वी(?)प्रज्ञा सिंग यांच्या वरील केस त्वरीत संपवावी व त्यांना फासावर द्यावे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 18:49
>>> एम आय एमचे खासदार जनाब असौद्दीन ओविसी यांचे म्हणने मला अतिशय योग्य वाटते, अभिनंदन नानासाहेब! >>> जर याकुब मेमनला फाशी दिली आहे तर तोच न्याय गुजरात दंगलीतील आरोपि कोदनानी व ईतरांनाही लावला पाहिजे. बरोब्बर! नानासाहेब तुम्ही या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करा. प्रशांत भूषण, काटजू, इंदिरा जयसिंग इ. नामवंत वकील तुमच्या याचिकेसाठी लढतील. तुम्ही निधर्मांधांचे नीलाक्षतनय व्हाल हा अजून एक फायदा! >>> त्याच बरोबर मालेगावात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुस्लिमांचा जिव घेणार्या क्रुरकर्मा जनरल पुरोहीत ,साध्वी(?)प्रज्ञा सिंग यांच्या वरील केस त्वरीत संपवावी व त्यांना फासावर द्यावे. सैन्यात 'जनरल' हे फार मोठे पद आहे (उदा. जनरल वैद्य). पुरोहित हे जनरल नसून कर्नल आहेत. तस्मात, वाचन आणि ज्ञान वाढवा. तो खटला अजून सुरू झालेला नाही आणि त्यांना जवळपास ७ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबूनसुद्धा अजून आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही. तरी सुद्धा कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह इ. मंडळींनीच मालेगावात बॉम्बस्फोट घडविले अशी तुमची खात्री दिसते. ही खात्री असेल तर खटला सुरूच तरी कशाला करायचा? त्यांना खटला न चालविताच थेट फाशी द्यावे यासाठी तुम्ही अजून एक जनहित याचिका दाखल करा. एकंदरीत नानासाहेबांची 'टॉपगिअर'मध्ये वेगात जात असलेली 'फिलॉसॉफी' आणि 'ग्रेट थुंकिंग' पाहून आम्ही धन्य झालो

In reply to by श्रीगुरुजी

विकास Fri, 07/31/2015 - 19:18
तो खटला अजून सुरू झालेला नाही आणि त्यांना जवळपास ७ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबूनसुद्धा अजून आरोपपत्र सुद्धा दाखल झालेले नाही. खरं की काय? असे विनाजामीन, विना खटला (आणि आरोप सिद्ध न करता) डांबल्याबद्दल मग ते स्वाक्षरीवाले ४० जण आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आता आपल्या सरकारला धारेवर धरणार तर! ;) मोदी सरकारचे आता काही खरे नाही!

In reply to by विकास

श्रीगुरुजी Fri, 07/31/2015 - 21:18
ऑक्टोबर २००८ मध्ये या सर्वांना अटक करून मोक्का लावण्यात आला. मोक्का (हे टाडा/पोटा कायद्याचे महाराष्ट्रीय रूप) कायद्यान्वये अटक केलेल्यांना जामीन मिळत नाही. काही महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपास केला. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचा विषय येण्याची शक्यता होती तेव्हा तेव्हा हा तपास विविध तपाससंस्थांकडे पाठवून 'अजून तपास सुरू आहे आणि काही नवीन माहिती बाहेर येण्याची शक्यता असल्याने तपास पूर्ण झालेला नाही व त्यामुळे तपास पूर्ण झाल्यावरच आरोपपत्र दाखल करता येईल" असा युक्तीवाद करून आरोपपत्र दाखल केले गेले नाही. सुरवातीला महाराष्ट्र पोलिस खाते, काही महिन्यांनी महाराष्ट्र एटीएस, नंतर एक एसआयटी, नंतर सीबीआय, नंतर अजून एक एसआयटी, नंतर एनआयए अशा विविध संस्थांकडे तपास वर्ग करण्यात आला. आजतगायत कोणताही पुरावा मिळाल्याचे ऐकिवात नाही. दरम्यान आरोपी तुरूंगात सडत होते. साध्वी, पुरोहित व इतरांचा कबुलीजबाबासाठी तुरूंगात प्रचंड छ्ळ करण्यात आला, साध्वीला जेवणात मांसाहार देणे, अश्लील चित्रे/मासिके देणे, तिला कर्करोग झाला असतानासुद्धा उपचारासाठी जामिनाला विरोध करणे अशा कृत्यांमधून युपीएने आपली हिंदूविरोधी मानसिकता दाखवून दिली. काही वर्षांपूर्वी साध्वीच्या वडिलांचे निधन झाल्यावर अंतिम दर्शनासाठी फक्त २ तास तुरूंगाबाहेर काढायला सुद्धा सरकारी वकीलाने विरोध करून तिला वडीलांचे अंतिम दर्शन घेऊन दिले नाही. ऑक्टोबर २००८ पासून हे सर्वजण तुरूंगात आहेत. आजवर कणभरही पुरावा मिळालेला नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर जाहीर खोटे आरोप केले गेले. एका पत्रकार परीषदेत सीबीआय ने सांगितले की लष्कराने कर्नल पुरोहितांना ६ टन आरडीएक्स पुण्याहून काश्मिरला पोहोचविण्यासाठी दिले होते. ते आरडीक्स पुरोहितांनी काश्मिरला न पोचविता त्याचा वापर मालेगाव बॉम्बस्फोटात केला. हे ऐकल्यावर दुसर्‍याच दिवशी लष्करातील प्रमुख अधिकार्‍यांनी पत्रकार परीषद घेऊन हे खोटे असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार लष्करात आरडीक्स सारखा स्फोटक पदार्थ एकट्यादुकट्या व्यक्तीच्या हवाली केला जात नाही. तसेच लष्करात प्रत्येक गोळीचा देखील हिशेब ठेवलेला असतो. अशा परिस्थितीत कर्नल पुरोहितांना लष्कर आरडीक्स देणे अशक्य आहे आणि समजा दिले असले तर ते बेपत्ता झाल्याचे लष्कराला न समजणे अशक्य आहे. हे ऐकल्यावर सीबीआयने आपले आरोप मागे घेतले. सर्व आरोपींची आतापर्यंत कमीतकमी ४ वेळा नार्को टेस्ट घेतलेली आहे. एकापेक्षा जास्त वेळा नार्को टेस्ट घेतलेले हे पहिलेच प्रकरण असावे. नार्को टेस्टमधूनही काही मिळाले नाही. एका नार्को टेस्ट नंतर स्वामी दयानंद नावाचा आरोपी १२ तासांहून अधिक काळ बेशुद्ध होता तेव्हा तपासयंत्रणांचे धाबे दणाणले होते. नंतर एनआयने असे उठविले की स्वामी असीमानंदांना तुरूंगात सेवेसाठी एक मुस्लिम सेवेकरी दिला होता. हा मुस्लिम आरोपी याच बाम्बस्फोटात आधी पकडलेल्या १०-१२ मुस्लिमांपैकी होता. त्याच्या सेवेने स्वामी असीमानंदांचे मन विरघळले आणि आपल्यामुळे या मुस्लिमावर खोटा आरोप झाला आहे असे वाटून ते व्यथित झाले आणि त्यांनी बॉम्बस्फोटातील आपल्या सहभागाची कबुली दिली. हे प्रसिद्ध झाल्यावर दुसर्‍या दिवशी असीमानंदांनी सांगितले की असा कोणताही सेवेकरी तुरूंगात आपल्याला दिलेला नव्हता आणि आपण अशी कोणतीही कबुली आपण दिलेली नाही. तुरूंगात असलेल्या कोणत्याही आरोपीला दुसरा आरोपी सेवेसाठी दिलेला नसतो. त्यामुळे तपास यंत्रणांची ही थापही लगेच उघडकीला आली. या सर्वांवर मोक्का लागू होतो का नाही याची सुनावणी गेली साडेचार वर्षे सुरू आहे. युपीएने अर्थातच ही सुनावणी जास्तीत जास्त लांबविण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये सरकार बदलल्यावर काहीसा वेग आला. २-३ महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की उच्च न्यायालयाने मोक्काचा विचार न करता नवीन न्यायाधीश नेमून जामिनावर विचार करावा. त्यावर विचार सुरू झाला आहे. सध्या प्रकरण इथपर्यंत आले आहे. युपीएच्या काळात या सर्वांना समझोता एक्स्प्रेस, हैदराबादेतील मक्का मशिदीबाहेरील बॉम्बस्फोट, अजमेर येथील बॉम्बस्फोट इ. प्रकरणातही अडकविण्याचा प्रयत्न झाला. युपीएच्या काळात या सर्वांना इतक्या खोलवर आणि घट्ट अडकविलेले आहे की त्यातून सुटण्यास खूप कालावधी लागणार आहे. तोपर्यंत यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले असेल.

कधी नव्हे ते कधी जिओ बद्दल म्हणवेसे वाटते जियो मेरे जियो कुठलेही तिखट मीठ न लावता पाकिस्तान मध्ये याकुब बद्दल दिलेली बातमी पाहून आपल्या डेली सोप प्रेरित मिडिया ची भणंगगिरी पाहून डोके फिरते.

dadadarekar Sat, 08/01/2015 - 09:47
बाबरी , अदवानी , सध्वीची स्कूटर , मंदिराचे चौदाशे कोटी .... यावर चर्चा येताच देशभक्त लोक गायब झाले.

In reply to by dadadarekar

अर्धवटराव Sat, 08/01/2015 - 10:12
केवळ गायब नाहि झाले... जन्नतला गेलेल्या मसिहाच्या बिदाईनिमीत्त आयोजीत प्रसाद भोजनाला गेलेत.

In reply to by dadadarekar

Piyush Sat, 08/01/2015 - 11:11
देशभक्त लोक गायब ? आणि तुम्ही कोण देशद्रोही ?

अर्धवटराव Sat, 08/01/2015 - 10:17
प्रशांत भूषणला चोपलं श्रीरामसेनेच्या माणसाने. अशा घटनेचा निव्वळ निषेध करुन भागणार नाहि. जन्माची अद्दल घडावी अशी शिक्षा झाली पाहिजे. आज हे वकिलांवर हात उगारणार. उद्या कोर्टाचा घास घ्यायला बघणार. यांना वेळीच आवरायला हवं.