Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 10:37
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
  • Log in or register to post comments
  • 47965 views

प्रतिक्रिया

Submitted by मृत्युन्जय on Wed, 06/17/2015 - 10:45

Permalink

हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर

हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर नव्हता?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 11:07

In reply to हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर by मृत्युन्जय

Permalink

शक्यता नाकारता येत नाही :)

शक्यता नाकारता येत नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 06/17/2015 - 10:47

Permalink

छ्या

काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला आणि भेंडीची भाजी मिळाली. कसं होणार "ताव-ताव" प्रतिसादींचे. माफ करा ताई तुम्ही सनसनी निर्माण करण्यात लै कमी पडल्या.(रेशीपी पुन्हा लिहून काढा) "ताव-ताव्"=पानभर आणि त्वेशाने दोन्ही अर्थानी पाहिजे तो घ्या.(जय लोक्शाही,जय मिपा,जय मिपाकर) याचकांची पत्रे मधून नाखुस लाह्या-फुटाणे
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 10:52

In reply to छ्या by नाखु

Permalink

हॅ:

अजून काही नावं लिहायची होती. पण नसत्या भानगडीत सापडायला नक्को म्हणून गप बसले. चुरचुरीत, अचाट, अतर्क्य ते सगळं लोकांनी लिहायचं आहे. हम बोलेगा तो...
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 06/21/2015 - 00:06

In reply to हॅ: by पैसा

Permalink

...

असे वर्तमानपत्री धागे काढणे हा काही जणांचा हुप्प्यासिद्ध हक्क आहे पण तोही हिरावलात त्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 06/17/2015 - 13:16

In reply to छ्या by नाखु

Permalink

काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट

काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला नायतर काय राव. पॉपकान आन कोल्डरिन आर्डर करुन आलो व्हतो, आता आर्डर केन्सल करावी लागनार राव :)
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 06/17/2015 - 13:24

In reply to काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट by विशाल कुलकर्णी

Permalink

ऱ्हांउंद्या. ठिवा जरा.

ऱ्हांउंद्या. ठिवा जरा. वाट बगा वाईच. आजून धागे यतायत मागनं !
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 06/17/2015 - 10:52

Permalink

ललित मोदींना माणुसकी म्हणून

ललित मोदींना माणुसकी म्हणून मदत केल्या गेली आहे!ते ब्रिटनमध्ये दिवाळखोरी जाहिर करुन गरीब असल्याने स्वतःच्या जेटने पत्नीचं आॅपरेशन नाही झालं मग आहे विमान हाताशी म्हणून जीवाचे पोर्तुगाल करत आहेत.असे कुजकट धागे काढुन गरीब बिचार्या मोदींना,सुष्माबैंना मिपावर टार्गेट केल्याने एक मिपाकर म्हणून शरम वाटल्या गेली आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 06/17/2015 - 11:00

Permalink

पैतै यूटू? बरं झालं, आता मीही

पैतै यूटू? बरं झालं, आता मीही लवकरच तुझ्या पावलावर पाऊल ठेवून अगदी अस्सेच धागे काढीन! =))
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/17/2015 - 11:01

Permalink

कालच्या लोकत्तेत , अन्वयार्थ सदरात,

"करूणासिंधू शुषमाजी" ह्या नावाच्या, लेखाची लिंक देत आहे. http://epaper.loksatta.com/522154/indian-express/16-06-2015#page/7/1 "(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )" ह्या बाबत असहमत. शतकी धाग्यांचा तुम्हाला सोस नाही आणि तुम्ही पळपुटेपणा करणार नाही, हे खर्‍या मिपाकरांना ठावूक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 06/17/2015 - 11:02

Permalink

संपादकांनीतरी असं करू नये.

संपादकांनीतरी असं करू नये. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 11:07

In reply to संपादकांनीतरी असं करू नये. by एस

Permalink

नो हार्म इंटेंडेड

आता गंभीरपणे सांगते. जे काही चालू आहे ते मला एक नागरिक म्हणून अजिबात आवडलेलं नाही. मिपावर सामान्य सदस्य म्हणून चर्चा करायचा मला हक्क आहेच. एका बाजूला झुकलेलं लिखाण वाटू नये म्हणून थोडं विनोदी पद्धतीने लिहिलं. पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/17/2015 - 11:15

In reply to नो हार्म इंटेंडेड by पैसा

Permalink

पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.

ह्या विषयावर गंभीरपणे काय बोलणार? प्रत्येक पक्षांत अशा काही व्यक्ती असतातच. भाजपाची "ब्रेन टँक/ थिंक टँक" ह्या विषयावर "सुषमा स्वराज" ह्यांना पाठीशी घालते / की त्यांना पक्ष सोडायला भाग पाडते? हे बघणे रोचक ठरेल. स्वच्छ कारभार करायला, स्वच्छ पदाधिकारीच ह्वेत, त्याशिवाय "अच्छे दिन" येणार नाहीत, असे वाटते. बाद्वे, सोत्रिं बरोबर, चावडीवरच्या गप्पा मारायला जायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 11:27

In reply to पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे. by मुक्त विहारि

Permalink

मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक

मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक यावर उत्तर देतीलच याची खात्री वाटते रच्याकने - मी असा प्रतिसाद लिल्हा याचा अर्थ मी कोणत्या दुस्र्या पक्षाला समर्थन देतो असा घेउ नये (कै दिवस आलेत...मिपावर सुध्धा असे वाक्य लिहायला लाग्ते तर जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/17/2015 - 11:31

In reply to मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक by टवाळ कार्टा

Permalink

जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार?

शिक्षणापेक्षा आणि पैशांपेक्षा, सुसंस्कार महत्वाचे. (धाग्याने शंभरी गाठावी, ह्या साठी दर १०-१५ मिनिटांनी, प्रतिसाद / उप-प्रतिसाद, टंकणारा) मुवि.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 06/17/2015 - 11:41

In reply to जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार? by मुक्त विहारि

Permalink

मुवी

तुम्ही चावडीवर जाऊ नका सध्या भुजांमध्ले "बळ" ओसरल्याने लेखण्या गंजल्यात (तश्याही त्या काकांवर कधीच चालवाव्या वाटल्या नाहीत्च). इथेच थांबा गुरुजी आले की उंदीर येतीलच मग काय १०० ची हमी तो पर्यंत डांगे साहेब आणि क्लिंटन ना आवतान धाडा. पानभर प्रतीसादाचे हक्क त्यांचेकडेच आहेत. धागा सजवायचाय, फक्त दांडीया नकोय पै ताईंना. पिटातील प्रेक्षक नाखु पन्नाशीकर
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 06/17/2015 - 14:27

In reply to जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार? by मुक्त विहारि

Permalink

ह्यावरून

आगरकर - टिळक ह्यांमध्ये झालेला वाद आठवला … आगरकर म्हणायचे की आधी समाज सुधारावा मग स्वराज्य! टिळक उलटे …. आधी स्वराज्य मग समाज सुधारणा … धाग्याच्या शंभरी मध्ये आम्चेपण योगदान
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 14:32

In reply to ह्यावरून by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

मी आगरकरांच्या बाजूने

मी आगरकरांच्या बाजूने
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 06/17/2015 - 14:46

In reply to ह्यावरून by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

''आगरकर - टिळक आज असते तर काय

''आगरकर - टिळक आज असते तर काय म्हणाले असते?'' यावर एक धागा काढा असे सुचवतो!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 06/17/2015 - 16:16

In reply to ''आगरकर - टिळक आज असते तर काय by खेडूत

Permalink

त्यासाठी

वाचावे लागेल आगरकर आणि टिळक! तेवढा वेळ काढावा लागल्यास सरकार बदलून जायचं :D
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 06/17/2015 - 19:42

In reply to त्यासाठी by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

अगदी!

अगदी!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 06/18/2015 - 12:38

In reply to त्यासाठी by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

राजकिय (अथवा कुठल्याही)

राजकिय (अथवा कुठल्याही) विषयाबद्दल मिपावर धागा टाकण्यासाठी वाचावेच लागते हे कोणी सांगितले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 06/17/2015 - 11:38

In reply to मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक by टवाळ कार्टा

Permalink

अरे टक्या..मिपावरचे (आंधळे)

अरे टक्या..मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक ही द्विरुक्ती झाली (जसं पिवळा पितांबर, वटवृक्षाच्या झाडाखाली !). भाजप समर्थक म्हणजे आंधळेच हा ठराव मिपावर (किंवा अन्य कोठेही) न मांडताच पास झाला असल्याचं काहींनी जाहीर केले आहे. तेंव्हा फक्त भाजप समर्थक म्हटले तरी चालेल.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 07/02/2015 - 11:02

In reply to अरे टक्या..मिपावरचे (आंधळे) by चिनार

Permalink

मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप

मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप कींवा कोणाचेहि समर्थक हे अंधच असतात. न्यायीपणाचा जो काही असतो तो फक्त 'तोरा'. :) त्यामुळे नुसतं समर्थक म्हणण्यास अनुमोदन.
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्यनागरिक on Tue, 08/18/2015 - 00:06

In reply to मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप by llपुण्याचे पेशवेll

Permalink

सांभाळुन रहा !

जरा सांभाळुन रहा. मिपावर कोणी बजरंगदलाचे कार्यकर्ते नाहीत याची खात्री करून घ्या. तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मोटर सायकलवर एकटे फिरत जाऊ नका(कोणी रमेश कदम मागे असू शकतो).
  • Log in or register to post comments

Submitted by वॉल्टर व्हाईट on गुरुवार, 06/18/2015 - 00:38

In reply to नो हार्म इंटेंडेड by पैसा

Permalink

सदाहरित

चर्चा छान झाली आहे, काही प्रतिसाद माहितीपुर्ण आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. हा धागा असा वेगळा काढण्याऐवजी 'सदाहरित बातम्या' प्रकारच्या धाग्यात चालला असता असे वाटले. आता फक्त शिर्षक बदलले तरी जमेल.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 11:07

In reply to संपादकांनीतरी असं करू नये. by एस

Permalink

असं करू नये म्हणजे कसं करू

असं करू नये म्हणजे कसं करू नये?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 06/17/2015 - 11:09

Permalink

कुणी? कुणी काढला हा धागा???

कुणी? कुणी काढला हा धागा??? हा भाजपचा lowकशाही'चा अपमाण आहे. असे धागे काढणार्‍यांना स हार च्या वाळवंटात पाच पाच मिनिटे बांधुन ठेवले पाहिजे. हा आमच्या राष्ट्रीय अस्मितेचा अपमाण आहे.. .......हा आमच्या ...........ह्याचा अपमाण आहे.. ..............हा आमच्या ...........त्याचा अपमाण आहे.. हा आमच्या ........................................................... आहे... .............हा आमच्या ........................................................... आहे... ...........................हा आमच्या ........................................................... आहे... ........................................हा आमच्या ........................................................... आहे... ..........................................................हा आमच्या ........................................................... आहे... .................................... वरिल जागा प्रतिसादांच्या संख्येकडे डोळा ठेऊन योग्यवेळी - भरल्या जातील. जय हिंद!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 06/17/2015 - 11:16

Permalink

या संबंधी काही बातम्या :

या संबंधी काही बातम्या :- पतीच्या कबुलीनं सुषमा स्वराज यांना आणखीन एक धक्का ललित मोदी प्रकरणी वसुंधरा राजे अडचणीत, लंडनमध्ये साक्षीदार राहिल्याचा दावा स्वराज-मोदींची मागील वर्षी लंडनच्या हॉटेलमध्ये भेट झाली होती : सूत्र मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aao Raja... ;):-Gabbar Is Back
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 06/17/2015 - 11:20

Permalink

विरस झाला.

कांही अभ्यासपूर्ण लेख असणार म्हणून मोठ्या विश्वासाने लेख उघडला आणि सपशेल तोंडघशी पडलो. आता प्रतिसादातून कांही निश्पन्न होते का पाहावे लागणार.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 11:31

In reply to विरस झाला. by प्रभाकर पेठकर

Permalink

समजू शकते

पण अशा बाबतीत उघडपणे आपण काही बोलू शकत नाही. मुळात अर्णव गोस्वामीकडे या खाजगी ईमेल्स कशा पोचल्या हा गंभीर प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 12:49

In reply to समजू शकते by पैसा

Permalink

पोचल्या का पोहचवल्या गेल्या??

पोचल्या का पोहचवल्या गेल्या?? कैपण होउ शकते
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 06/17/2015 - 14:26

In reply to समजू शकते by पैसा

Permalink

अर्णव हा एक नीच माणूस आहे हे

अर्णव हा एक नीच माणूस आहे हे यातून सिद्ध होतेय. ६५ वर्षात प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री देशाला लाभला असताना असली कृत्ये म्हणजे देशद्रोहच नव्हे काय ? आमचा देशच करंट्यांचा आहे झालं. (इथे स्वराज यांची एका वर्षातील परराष्ट्र मंत्री म्हणून वेगवेगळ्या देशातील कामगिरी आणि त्याचे वर्णन कल्पावे. आणि हे इथून पुढच्या प्रत्येक प्रतिसादात तुम्हाला सहन करावे लागणार आहे हे आधीच सांगतो. )
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 06/17/2015 - 14:34

In reply to अर्णव हा एक नीच माणूस आहे हे by हाडक्या

Permalink

मी ट्विटर वरून आधीच टाईम्स

मी ट्विटर वरून आधीच टाईम्स नाऊ ला अनफॉलो केलेलं आहे आणि आता ते चॅनेल पण काढून टाकतोय. आता तो धागडधिंगा अती झालाय.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 06/17/2015 - 15:08

In reply to अर्णव हा एक नीच माणूस आहे हे by हाडक्या

Permalink

प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री ??

ही यादी बघा, https://en.wikipedia.org/wiki/Minister_of_External_Affairs_(India) पूर्वी हे पद लाल बहादूर शास्त्री , अटल बिहारी वाजपेयी, यशवंत राव चव्हाण यांनी भूषविले आहे. त्या कर्तबगार आहेतच पण प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री म्हणण्याचे प्रयोजन कळाले नाही. ( पैसा तै, १०० झाली की पार्टी ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/17/2015 - 23:17

In reply to प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री ?? by कपिलमुनी

Permalink

सहमत.

सहमत. या यादीत जसवंत सिंग यांचे देखील नाव हवे. प्रथमच म्हणजे गेल्या १० वर्षात प्रथमच असे त्यांना म्हणायचे असावे, कारण युपीए च्या काळात सुरवातीला नटवरसिंग, नंतर एस एम कृष्णा व नंतर सलमान खुर्शिद हे परराष्ट्रमंत्री होते. 'ऑईल फॉर फूड' या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने नटवरसिंगांना जावे लागले, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका परीषदेत भाषण करताना कृष्णांनी स्वत:च्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचे भाषण वाचून दाखवायला सुरूवात केली होती. सलमान खुर्शिद दिग्विजयप्रमाणेच वाचाळतेबद्दलच प्रसिद्ध होते. यांच्या तुलनेत सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Wed, 06/17/2015 - 23:21

In reply to सहमत. by श्रीगुरुजी

Permalink

सुषमा स्वराज नक्कीच उजव्या

सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात ?????
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/17/2015 - 23:33

In reply to सुषमा स्वराज नक्कीच उजव्या by खटासि खट

Permalink

तशाही त्या उजव्या (उजव्या

तशाही त्या उजव्या (उजव्या विचारांच्या पक्षात) आहेतच.
  • Log in or register to post comments

Submitted by रॉजरमूर on Wed, 06/24/2015 - 00:48

In reply to सहमत. by श्रीगुरुजी

Permalink

जसवंत सिंग आणि कर्तबगार ?

जसवंत सिंग आणि कर्तबगार ? Image removed. आणि यांची कर्तबगारी काय अझर मसूद आणि त्याच्या साथीदारांना कंधार ला पोचवणे ?
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 06/17/2015 - 11:20

Permalink

वरकरणी या प्रकरणाविषयी

वरकरणी या प्रकरणाविषयी कळल्यावर हा मिडीयाचा धिंगाणा आहे असे वाटले होते. पण आता वाटते आहे की ही सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनातली मोठी चूक आहे. मानवता असो किंवा काही असो, ललित मोदीसारख्याला मदत करणे निषेधार्ह आहे. सुषमा ताई तुम्ही असे करायला नको होते. सुषमा स्वराज या माझ्या अत्यंत आवडत्या नेत्या आहेत ! थोडसं अवांतर , आयपीऐल घोटाळा उघडकीस आल्यावर ललित मोदी यांना परदेशात जाऊ का दिले असेल ? ऐकीव माहितीनुसार, या घोटाळ्यात सामील असलेल्या सगळ्या मोठ्या लोकांविरुद्ध ललित मोदी जवळ पुरावे होते. मोठ्या लोकांमध्ये सर्वपक्षीय नेते आणि काही मोठे उद्योगपती सामील होते. ललित मोदीन्नी स्पष्ट शब्दात ,"मला हात लावाल तर याद राखा, सगळ्यांना अडकवेल" असं धमकी दिली होती. म्हणूनच त्यांना परदेशी पाठवले. अर्थात ही सगळी ऐकीव माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 06/17/2015 - 11:26

In reply to वरकरणी या प्रकरणाविषयी by चिनार

Permalink

आय.पी.एल.

म्हणजे सगळा पैशाचा खेळ. (शंभरी गाठायला (धाग्याने), हा जाणीवपुर्वक दिलेला उप-प्रतिसाद.)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 07/02/2015 - 11:07

In reply to वरकरणी या प्रकरणाविषयी by चिनार

Permalink

स्वराज कौशल हे मोदींच्या १०

स्वराज कौशल हे मोदींच्या १० पैकि ७ कंपन्यांचे लीगल अ‍ॅडवायजर आहेत ही गोष्ट अगदीच नवीण नाही. वकिली वर्तुळात ही गोष्ट लोकांना ठावूक होती. बर आयपीएल घोटाळ्यात एकटा ललित मोदी दोषी आणि बाकी धुतले तांदूळ होते का हे ही पाहणे महत्वाचे. टाइम्स नाऊ ची सेटलमेंट कशावर होते ते पाहणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Wed, 06/17/2015 - 11:26

Permalink

बा द वे भाजप सत्तेत नसताना

बा द वे भाजप सत्तेत नसताना स्वराजबाईंनी ललित मोदींना नक्की काय आणि कशी मदत केली??
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 11:32

In reply to बा द वे भाजप सत्तेत नसताना by बाळ सप्रे

Permalink

हे नंतरचं आहे

काल समजले त्याप्रमाणे जुलै ऑगस्ट २०१४.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 06/17/2015 - 11:39

Permalink

ललित मोदी अजून एका

ललित मोदी अजून एका परराष्ट्रमंत्र्याला घेऊन बुडणार आहेत. थरूर झाले आता स्वराज. अस्संगाशी संग खुर्चीशी गाठ.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 11:43

In reply to ललित मोदी अजून एका by अनुप ढेरे

Permalink

नाही बुडत

सुनंदा पुष्करचे काय झाले? आय पी एलमधले खरे गड्डे आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळे कधी पोचू शकेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 06/17/2015 - 11:55

In reply to नाही बुडत by पैसा

Permalink

पैसा ताई - धाग्याने शंभरी

पैसा ताई - धाग्याने शंभरी गाठावी ( आणि तशी इच्छा आधीच सांगणे ) म्हणुन प्रत्येक प्रतिसादावर प्रतिसाद देण्याची तुमची आयडीया कौतुकास्पद आहे. मी पण नक्की मदत करीन
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 12:03

In reply to पैसा ताई - धाग्याने शंभरी by प्रसाद१९७१

Permalink

स्पष्टीकरण वर दिले आहे

धाग्यात सगळेच मुद्दे लिहिणे शक्य नव्हते. जसे मुद्दे येतील तशी चर्चा होईलच.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 06/17/2015 - 12:12

In reply to नाही बुडत by पैसा

Permalink

थरूरांची खुर्ची तर गेलीच.

थरूरांची खुर्ची तर गेलीच. आयपीएल टीमही गेली. राजकीय कारकिर्द ५-१० वर्ष मागे गेली. आणि सुनंदा पुष्करची टांगती तलवार कायम डोक्यावर रहाणार... हा बराच मोठा फटका आहे. याबाबतीत स्वराज यांनी केलेली मदत हा नॉन इशु आहे असं वाटतय. आणि याचा परिणामही काही झालेला नाहिये. परिस्थिती जैसे थे आहे. फक्त ललित मोदी पोर्तुगालला जाउन आले. पण त्यांची मुलगी मोदींची वकील असणं, राजेंच यात ओढलं जाणं यामुळे लोकांचा संशय बळावतोय. बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्‍यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 06/17/2015 - 13:26

In reply to थरूरांची खुर्ची तर गेलीच. by अनुप ढेरे

Permalink

कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;)

बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्‍यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.
लोकसत्तेतल्या लेखातले काही वाक्ये इथे टंकतो : या परराष्ट्रमंत्र्यांनी - ज्यांचे सरकारच मुळात भ्रष्टाचार काळा पैसा खणून काढण्याची शपथ घेत सत्तेवर आले आहे - त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. हा प्रश्न खरे तर भाजप व संघानेच विचारायला हवा. परंतू ते काँग्रेसच्या भ्रष्ट आचाराकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेसने जे खाल्ले तेच तुम्हीही खाणार असाल, तर मग फर्क काय तुमच्यात आणि त्यांच्यात? या सवालावर कट्टर अतिराष्ट्रवादी पांघरूण घालणे शक्य आहे...
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com