Skip to main content

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

लेखक पैसा यांनी बुधवार, 17/06/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )

वाचने 48131
प्रतिक्रिया 289

प्रतिक्रिया

काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला आणि भेंडीची भाजी मिळाली. कसं होणार "ताव-ताव" प्रतिसादींचे. माफ करा ताई तुम्ही सनसनी निर्माण करण्यात लै कमी पडल्या.(रेशीपी पुन्हा लिहून काढा) "ताव-ताव्"=पानभर आणि त्वेशाने दोन्ही अर्थानी पाहिजे तो घ्या.(जय लोक्शाही,जय मिपा,जय मिपाकर) याचकांची पत्रे मधून नाखुस लाह्या-फुटाणे

In reply to by नाखु

अजून काही नावं लिहायची होती. पण नसत्या भानगडीत सापडायला नक्को म्हणून गप बसले. चुरचुरीत, अचाट, अतर्क्य ते सगळं लोकांनी लिहायचं आहे. हम बोलेगा तो...

In reply to by पैसा

असे वर्तमानपत्री धागे काढणे हा काही जणांचा हुप्प्यासिद्ध हक्क आहे पण तोही हिरावलात त्याबद्दल धन्यवाद !

In reply to by नाखु

काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला नायतर काय राव. पॉपकान आन कोल्डरिन आर्डर करुन आलो व्हतो, आता आर्डर केन्सल करावी लागनार राव :)

ललित मोदींना माणुसकी म्हणून मदत केल्या गेली आहे!ते ब्रिटनमध्ये दिवाळखोरी जाहिर करुन गरीब असल्याने स्वतःच्या जेटने पत्नीचं आॅपरेशन नाही झालं मग आहे विमान हाताशी म्हणून जीवाचे पोर्तुगाल करत आहेत.असे कुजकट धागे काढुन गरीब बिचार्या मोदींना,सुष्माबैंना मिपावर टार्गेट केल्याने एक मिपाकर म्हणून शरम वाटल्या गेली आहे!

"करूणासिंधू शुषमाजी" ह्या नावाच्या, लेखाची लिंक देत आहे. http://epaper.loksatta.com/522154/indian-express/16-06-2015#page/7/1 "(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )" ह्या बाबत असहमत. शतकी धाग्यांचा तुम्हाला सोस नाही आणि तुम्ही पळपुटेपणा करणार नाही, हे खर्‍या मिपाकरांना ठावूक आहे.

In reply to by एस

आता गंभीरपणे सांगते. जे काही चालू आहे ते मला एक नागरिक म्हणून अजिबात आवडलेलं नाही. मिपावर सामान्य सदस्य म्हणून चर्चा करायचा मला हक्क आहेच. एका बाजूला झुकलेलं लिखाण वाटू नये म्हणून थोडं विनोदी पद्धतीने लिहिलं. पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.

In reply to by पैसा

ह्या विषयावर गंभीरपणे काय बोलणार? प्रत्येक पक्षांत अशा काही व्यक्ती असतातच. भाजपाची "ब्रेन टँक/ थिंक टँक" ह्या विषयावर "सुषमा स्वराज" ह्यांना पाठीशी घालते / की त्यांना पक्ष सोडायला भाग पाडते? हे बघणे रोचक ठरेल. स्वच्छ कारभार करायला, स्वच्छ पदाधिकारीच ह्वेत, त्याशिवाय "अच्छे दिन" येणार नाहीत, असे वाटते. बाद्वे, सोत्रिं बरोबर, चावडीवरच्या गप्पा मारायला जायला हवे.

In reply to by मुक्त विहारि

मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक यावर उत्तर देतीलच याची खात्री वाटते रच्याकने - मी असा प्रतिसाद लिल्हा याचा अर्थ मी कोणत्या दुस्र्या पक्षाला समर्थन देतो असा घेउ नये (कै दिवस आलेत...मिपावर सुध्धा असे वाक्य लिहायला लाग्ते तर जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार)

In reply to by टवाळ कार्टा

शिक्षणापेक्षा आणि पैशांपेक्षा, सुसंस्कार महत्वाचे. (धाग्याने शंभरी गाठावी, ह्या साठी दर १०-१५ मिनिटांनी, प्रतिसाद / उप-प्रतिसाद, टंकणारा) मुवि.

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही चावडीवर जाऊ नका सध्या भुजांमध्ले "बळ" ओसरल्याने लेखण्या गंजल्यात (तश्याही त्या काकांवर कधीच चालवाव्या वाटल्या नाहीत्च). इथेच थांबा गुरुजी आले की उंदीर येतीलच मग काय १०० ची हमी तो पर्यंत डांगे साहेब आणि क्लिंटन ना आवतान धाडा. पानभर प्रतीसादाचे हक्क त्यांचेकडेच आहेत. धागा सजवायचाय, फक्त दांडीया नकोय पै ताईंना. पिटातील प्रेक्षक नाखु पन्नाशीकर

In reply to by मुक्त विहारि

आगरकर - टिळक ह्यांमध्ये झालेला वाद आठवला … आगरकर म्हणायचे की आधी समाज सुधारावा मग स्वराज्य! टिळक उलटे …. आधी स्वराज्य मग समाज सुधारणा … धाग्याच्या शंभरी मध्ये आम्चेपण योगदान

In reply to by टवाळ कार्टा

अरे टक्या..मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक ही द्विरुक्ती झाली (जसं पिवळा पितांबर, वटवृक्षाच्या झाडाखाली !). भाजप समर्थक म्हणजे आंधळेच हा ठराव मिपावर (किंवा अन्य कोठेही) न मांडताच पास झाला असल्याचं काहींनी जाहीर केले आहे. तेंव्हा फक्त भाजप समर्थक म्हटले तरी चालेल.

In reply to by चिनार

मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप कींवा कोणाचेहि समर्थक हे अंधच असतात. न्यायीपणाचा जो काही असतो तो फक्त 'तोरा'. :) त्यामुळे नुसतं समर्थक म्हणण्यास अनुमोदन.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जरा सांभाळुन रहा. मिपावर कोणी बजरंगदलाचे कार्यकर्ते नाहीत याची खात्री करून घ्या. तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मोटर सायकलवर एकटे फिरत जाऊ नका(कोणी रमेश कदम मागे असू शकतो).

In reply to by पैसा

चर्चा छान झाली आहे, काही प्रतिसाद माहितीपुर्ण आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. हा धागा असा वेगळा काढण्याऐवजी 'सदाहरित बातम्या' प्रकारच्या धाग्यात चालला असता असे वाटले. आता फक्त शिर्षक बदलले तरी जमेल.

कुणी? कुणी काढला हा धागा??? हा भाजपचा lowकशाही'चा अपमाण आहे. असे धागे काढणार्‍यांना स हार च्या वाळवंटात पाच पाच मिनिटे बांधुन ठेवले पाहिजे. हा आमच्या राष्ट्रीय अस्मितेचा अपमाण आहे.. .......हा आमच्या ...........ह्याचा अपमाण आहे.. ..............हा आमच्या ...........त्याचा अपमाण आहे.. हा आमच्या ........................................................... आहे... .............हा आमच्या ........................................................... आहे... ...........................हा आमच्या ........................................................... आहे... ........................................हा आमच्या ........................................................... आहे... ..........................................................हा आमच्या ........................................................... आहे... .................................... वरिल जागा प्रतिसादांच्या संख्येकडे डोळा ठेऊन योग्यवेळी - भरल्या जातील. जय हिंद!

कांही अभ्यासपूर्ण लेख असणार म्हणून मोठ्या विश्वासाने लेख उघडला आणि सपशेल तोंडघशी पडलो. आता प्रतिसादातून कांही निश्पन्न होते का पाहावे लागणार.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण अशा बाबतीत उघडपणे आपण काही बोलू शकत नाही. मुळात अर्णव गोस्वामीकडे या खाजगी ईमेल्स कशा पोचल्या हा गंभीर प्रश्न आहे.

In reply to by पैसा

अर्णव हा एक नीच माणूस आहे हे यातून सिद्ध होतेय. ६५ वर्षात प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री देशाला लाभला असताना असली कृत्ये म्हणजे देशद्रोहच नव्हे काय ? आमचा देशच करंट्यांचा आहे झालं. (इथे स्वराज यांची एका वर्षातील परराष्ट्र मंत्री म्हणून वेगवेगळ्या देशातील कामगिरी आणि त्याचे वर्णन कल्पावे. आणि हे इथून पुढच्या प्रत्येक प्रतिसादात तुम्हाला सहन करावे लागणार आहे हे आधीच सांगतो. )

In reply to by हाडक्या

मी ट्विटर वरून आधीच टाईम्स नाऊ ला अनफॉलो केलेलं आहे आणि आता ते चॅनेल पण काढून टाकतोय. आता तो धागडधिंगा अती झालाय.

In reply to by हाडक्या

ही यादी बघा, https://en.wikipedia.org/wiki/Minister_of_External_Affairs_(India) पूर्वी हे पद लाल बहादूर शास्त्री , अटल बिहारी वाजपेयी, यशवंत राव चव्हाण यांनी भूषविले आहे. त्या कर्तबगार आहेतच पण प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री म्हणण्याचे प्रयोजन कळाले नाही. ( पैसा तै, १०० झाली की पार्टी ;) )

In reply to by कपिलमुनी

सहमत. या यादीत जसवंत सिंग यांचे देखील नाव हवे. प्रथमच म्हणजे गेल्या १० वर्षात प्रथमच असे त्यांना म्हणायचे असावे, कारण युपीए च्या काळात सुरवातीला नटवरसिंग, नंतर एस एम कृष्णा व नंतर सलमान खुर्शिद हे परराष्ट्रमंत्री होते. 'ऑईल फॉर फूड' या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने नटवरसिंगांना जावे लागले, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका परीषदेत भाषण करताना कृष्णांनी स्वत:च्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचे भाषण वाचून दाखवायला सुरूवात केली होती. सलमान खुर्शिद दिग्विजयप्रमाणेच वाचाळतेबद्दलच प्रसिद्ध होते. यांच्या तुलनेत सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात.

In reply to by श्रीगुरुजी

जसवंत सिंग आणि कर्तबगार ? Smiling tooth आणि यांची कर्तबगारी काय अझर मसूद आणि त्याच्या साथीदारांना कंधार ला पोचवणे ?

वरकरणी या प्रकरणाविषयी कळल्यावर हा मिडीयाचा धिंगाणा आहे असे वाटले होते. पण आता वाटते आहे की ही सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनातली मोठी चूक आहे. मानवता असो किंवा काही असो, ललित मोदीसारख्याला मदत करणे निषेधार्ह आहे. सुषमा ताई तुम्ही असे करायला नको होते. सुषमा स्वराज या माझ्या अत्यंत आवडत्या नेत्या आहेत ! थोडसं अवांतर , आयपीऐल घोटाळा उघडकीस आल्यावर ललित मोदी यांना परदेशात जाऊ का दिले असेल ? ऐकीव माहितीनुसार, या घोटाळ्यात सामील असलेल्या सगळ्या मोठ्या लोकांविरुद्ध ललित मोदी जवळ पुरावे होते. मोठ्या लोकांमध्ये सर्वपक्षीय नेते आणि काही मोठे उद्योगपती सामील होते. ललित मोदीन्नी स्पष्ट शब्दात ,"मला हात लावाल तर याद राखा, सगळ्यांना अडकवेल" असं धमकी दिली होती. म्हणूनच त्यांना परदेशी पाठवले. अर्थात ही सगळी ऐकीव माहिती आहे.

In reply to by चिनार

स्वराज कौशल हे मोदींच्या १० पैकि ७ कंपन्यांचे लीगल अ‍ॅडवायजर आहेत ही गोष्ट अगदीच नवीण नाही. वकिली वर्तुळात ही गोष्ट लोकांना ठावूक होती. बर आयपीएल घोटाळ्यात एकटा ललित मोदी दोषी आणि बाकी धुतले तांदूळ होते का हे ही पाहणे महत्वाचे. टाइम्स नाऊ ची सेटलमेंट कशावर होते ते पाहणे महत्वाचे.

ललित मोदी अजून एका परराष्ट्रमंत्र्याला घेऊन बुडणार आहेत. थरूर झाले आता स्वराज. अस्संगाशी संग खुर्चीशी गाठ.

In reply to by अनुप ढेरे

सुनंदा पुष्करचे काय झाले? आय पी एलमधले खरे गड्डे आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळे कधी पोचू शकेल असे वाटत नाही.

In reply to by पैसा

पैसा ताई - धाग्याने शंभरी गाठावी ( आणि तशी इच्छा आधीच सांगणे ) म्हणुन प्रत्येक प्रतिसादावर प्रतिसाद देण्याची तुमची आयडीया कौतुकास्पद आहे. मी पण नक्की मदत करीन

In reply to by पैसा

थरूरांची खुर्ची तर गेलीच. आयपीएल टीमही गेली. राजकीय कारकिर्द ५-१० वर्ष मागे गेली. आणि सुनंदा पुष्करची टांगती तलवार कायम डोक्यावर रहाणार... हा बराच मोठा फटका आहे. याबाबतीत स्वराज यांनी केलेली मदत हा नॉन इशु आहे असं वाटतय. आणि याचा परिणामही काही झालेला नाहिये. परिस्थिती जैसे थे आहे. फक्त ललित मोदी पोर्तुगालला जाउन आले. पण त्यांची मुलगी मोदींची वकील असणं, राजेंच यात ओढलं जाणं यामुळे लोकांचा संशय बळावतोय. बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्‍यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.

In reply to by अनुप ढेरे

बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्‍यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.
लोकसत्तेतल्या लेखातले काही वाक्ये इथे टंकतो : या परराष्ट्रमंत्र्यांनी - ज्यांचे सरकारच मुळात भ्रष्टाचार काळा पैसा खणून काढण्याची शपथ घेत सत्तेवर आले आहे - त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. हा प्रश्न खरे तर भाजप व संघानेच विचारायला हवा. परंतू ते काँग्रेसच्या भ्रष्ट आचाराकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेसने जे खाल्ले तेच तुम्हीही खाणार असाल, तर मग फर्क काय तुमच्यात आणि त्यांच्यात? या सवालावर कट्टर अतिराष्ट्रवादी पांघरूण घालणे शक्य आहे...

In reply to by आनंदी गोपाळ

ललित मोदीला इंग्लंडातून पोर्तुगालला जौ द्या असं सांगणे आणि गुन्हेगाराला भारतातून पळून जायला मदत करणे हे सारखं आहे असं म्हणत असाल तर अवघड आहे. यात नक्की काय तोटा झाला भारताचा किंवा कोणावर काय अन्याय झाला हे थोडं विस्कटून सांगणार का?

In reply to by आनंदी गोपाळ

>>> त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. नक्की कोणते धोरण बदलले? आधी कोणते धोरण होते आणि आता त्यात काय बदल झाला? आधीच्या धोरणामुळे देशाचा नक्की कोणता व किती फायदा होत होता? या बदलामुळे देशाचे नक्की कोणते व किती नुकसान झाले?

In reply to by श्रीगुरुजी

एका गुन्हेगाराला मदत करत असताना , किंवा एका गुन्हेगाराची विनंती आली असताना देशाच्या परराष्ट्र खात्यास कळविणे औचित्यपूर्ण ठरले असते. "एखाद्या गुन्हेगाराला परस्पर मदत करणे आणि ते लपवून ठेवणे" हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे . बाकी औचित्याचे काय? ह्याला तुम्ही पुन्हा एकदा बगल दिली आहे.

In reply to by कपिलमुनी

>>> एका गुन्हेगाराला मदत करत असताना , किंवा एका गुन्हेगाराची विनंती आली असताना देशाच्या परराष्ट्र खात्यास कळविणे औचित्यपूर्ण ठरले असते. त्या स्वतःच परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांनी काय स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का? >>> "एखाद्या गुन्हेगाराला परस्पर मदत करणे आणि ते लपवून ठेवणे" हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे . मोदीला नक्की कोणती मदत केली? मोदीला इंग्लंडने प्रवासासाठी कागदपत्रे देण्याबद्दल कोणताही निर्णय घेतला तरी त्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होणार नाही असे सांगणे म्हणजे गुन्हेगाराला मदत होते का? केवळ एका व्यक्तीवर दोन देशांमधील संबंध अवलंबून असतात का? पूर्वी इंग्लंडने भारतात वाँटेड असलेल्या अनेक अतिरेक्यांना व गुन्हेगारांना आश्रय देऊन भारताची प्रत्यार्पणाची मागणी धुडकावून लावली होती. त्यावळी द्विपक्षीय संबंधांवर किती परीणाम झाला होता? मोदीला प्रवासाची कागदपत्रे दिल्यास द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होईल अशी भूमिका घेणे हे अत्यंत हास्यास्पद होते. सुषमा स्वराजांनी फक्त ही हास्यास्पद भूमिका खोडून काढली इतकेच. असे होण्यात मोदीला कणभरही मदत झालेली नाही. मोदी अजूनही भारतात वाँटेड आहे, त्याच्यावरील गुन्हे कायम आहेत आणि इंग्लंड कोणत्याही परिस्थितीत त्याला भारताच्या हवाली करणार नाही हे नक्की. >>> बाकी औचित्याचे काय? ह्याला तुम्ही पुन्हा एकदा बगल दिली आहे. जे झाले त्याच्यात काहीही अनुचित झालेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एकट्या सुषमा स्वराज्य म्हणजे सर्व परराष्ट्र खात आहे का ? या मधे सचिव असतात अधिकारी असतात त्याना अंधारात का ठेवले ? आणि सदर मनुष्य गुन्हेगार असताना , एक गुन्हेगार आपणासोबत संपर्क ठेवुन आहे तर त्याची माहिते गृह आणि अर्थ खात्यास द्यायला हवी. यूपीए सरकारने जर ट्रॅव्हल डॉक्युमेंट देण्यास मनाई केली असेल आणि ती स्वराज यांनी त्यांच्या अधिकारामध्ये ( त्यांना नक्कीच तो आहे ) कॅन्सल केली असेल तर त्याचे डॉक्युमेंटेशन हवे. जर "हास्यास्पद भूमिका खोडून काढली" तर तसे जाहीर करायला हवे जेणे करून अधिकार्‍यांनाही कळेल इतर खात्यानांही कळेल . चुपके चुपके कारभार कशाला??

In reply to by कपिलमुनी

सुषमा स्वराज म्हणजे संपूर्ण परराष्ट्र खाते नव्हे. परंतु परराष्ट्र खात्याचे सचिव आणि अधिकारी यांना त्यांनी अंधारात ठेवले होते याची खात्री आहे का? मुळात हा इश्यूच नाही. मोदीला परदेशी जायची इंग्लंडने परवानगी द्यावी अशी कोणतीही शिफारस केलेली नाही सुषमा स्वराजांनी केलेली नाही. इंग्लंडने नियम व कायद्यानुसार त्याच्या अर्जाचा विचार करावा व निर्णय घ्यावा. जो काही निर्णय असेल त्यामुळे द्विपक्षीय संबंधात फरक पडणार नाही असेच त्यांनी लिहिले होते. समजा त्यांनी सचिवांना व अधिकार्‍यांना अंधारात ठेवले होते असे क्षणभर गृहीत धरू या. पण ही गोष्ट इतकी किरकोळ व बिनमहत्त्वाची आहे की ती सचिवांना/अधिकार्‍यांना समजून्/न समजून काहीही फरक पडला असता असे वाटत नाही. मुळात मोदीच्या बाबतीत असे नक्की काय घडले होते ज्यामुळे मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देऊ नका अन्यथा आपल्या संबंधांवर परीणाम होईल असा इशारा युपीए सरकारला द्यावासा वाटला? युपीए सरकारने या इशार्‍यामागची कारणमीमांसा जनतेला कधीच सांगितलेली नाही. मोदी हा अमानुल्ला खान किंवा जगजितसिंग चौहान किंवा लिट्टे संघटनेपेक्षा खतरनाक गुन्हेगार होता का? ललित मोदी या एका व्यक्तीवर दोन देशातील संबंध अवलंबून असतात का? >>> आणि सदर मनुष्य गुन्हेगार असताना , एक गुन्हेगार आपणासोबत संपर्क ठेवुन आहे तर त्याची माहिते गृह आणि अर्थ खात्यास द्यायला हवी. तशी ती दिली असेल सुद्धा. नक्की कोणाला यबद्दल खात्रीशीर माहिती आहे का? >>> चुपके चुपके कारभार कशाला?? यात कोणताही कायदा मोडलेला नाही किंवा आऊट ऑफ वे जाऊन, नियम मोडून मदत केलेली नाही. मुळात ही गोष्टच इतकी किरकोळ व बिनमहत्त्वाची आहे की जगाला हे सर्व ओरडून सांगण्याची त्यांना गरज वाटली नसावी. २-३ दिवसांपूर्वी पहिल्यांदा याविषयी वाहिन्यांवर बातम्या येत होत्या तेव्हा इतक्या फालतू गोष्टीला इतके कव्हरेज मिळाल्याचे पाहून आश्चर्य वाटत होते.

In reply to by अनुप ढेरे

पण त्यांची मुलगी मोदींची वकील असणं
मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं कुणाचं वकीलपत्र घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये असणार्‍या नात्यामुळं एका व्यक्तीच्या कार्यांबद्दल दुसर्‍या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही. कायद्यानं नाही, औचित्यानं सुद्धा नाही. किंबहुना सुषमा स्वराज यांनी जरी त्यांचं वकीलपत्र घेतलं असतं (त्या मंत्री नसताना) आणि नंतर जर त्या मंत्री झाल्या असत्या तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. हां, मंत्री असताना वकीलपत्र घेता येत नाहीच.
राजेंच यात ओढलं जाणं
मोदींची पत्नी राजेंची ३० वर्षांपासून मैत्रीण आहे. तिला राजेंनीच ऑपरेशन साठी दाखल केलं होतं. हा कसा गुन्हा होवू शकतो? ललीत मोदींची पत्नी = ललीत मोदी असं तर नाहीये ना?

In reply to by काळा पहाड

मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं कुणाचं वकीलपत्र घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये असणार्‍या नात्यामुळं एका व्यक्तीच्या कार्यांबद्दल दुसर्‍या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही. कायद्यानं नाही, औचित्यानं सुद्धा नाही. किंबहुना सुषमा स्वराज यांनी जरी त्यांचं वकीलपत्र घेतलं असतं (त्या मंत्री नसताना) आणि नंतर जर त्या मंत्री झाल्या असत्या तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही.
हाच न्याय कसाबचे वकिलपत्र घेणार्याला अथवा अतिरेक्यांची वकिलपत्रे घेणार्यांना सुध्धा लागू होतो का?

In reply to by टवाळ कार्टा

एकतर मला ह्या खाप पंचायत वाल्या प्रकाराबद्दल माहिती नाही. पण भारतीय कायद्या नुसार एखाद्याचं वकीलपत्र घेता येत नाही असा नियम नाही. प्रत्येकाला वकीलाचा अधिकार आहेच. भारतीय कायद्यानुसार दावूद इब्राहीमला / लख्वीला सुद्धा वकील घेण्याचा व एखाद्या वकीलाला त्याचं वकीलपत्र घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला याच्यात आश्चर्य कशाचं वाटतंय? टीपः हां याचा अर्थ सगळ्याच गुन्हेगारांना (आणि खासकरून देशद्रोही अतिरेक्यांना) कोर्टापर्यंत पोचू द्यावं असा होत नाही. पण ते अलाहिदा.

In reply to by टवाळ कार्टा

हाच न्याय कसाबचे वकिलपत्र घेणार्याला अथवा अतिरेक्यांची वकिलपत्रे घेणार्यांना सुध्धा लागू होतो का?
याचे उत्तर होच असेल, फक्त मग आपल्याकडचे "काही" लोक, त्यांना (पक्षी: वकिलांना) भर चौकात हाल हाल करुन मारु इच्छित असतील इतकेच (संधी मिळाली तर करतील का कै म्हैत).

In reply to by टवाळ कार्टा

पूर्वी राम जेठमलानींनी इंदिरा गांधी खून खटल्यातील आरोपी, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, संजय दत्त इ. चे वकीलपत्र घेतले होते. कपिल सिब्बलांनी चंदिगड उच्च न्यायालयातील भ्रष्ट न्यायाधीश रामस्वामी, गोव्यातील कुख्यात तस्कर चर्चिल आलेमाव, बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन इ. चे वकीलपत्र घेतले होते. पूर्वी जेटलींनी चिंदंबरमचे वकीलपत्र घेतले होते.

In reply to by काळा पहाड

यात गुन्हा घडला आहे असं मी म्हणत नाहीच्चे. या सबंधांमुळे इथे काहितरी पाणी मुरतय असा संशय कोणालाही येईल आणि तो अस्थानी नसेल. सज्ञान वकील वगैरे केवळ तांत्रिक बाबी आहे. आई परराष्ट्र मंत्री असताना एखाद्या वकिलाने इमिगेशनच्या केसेस घेणं यात कॉन्फ्लिक्ट ऑफ ईटरेस्ट ची शंका येणं स्वाभाविक आहे. (पण बहुधा वकील फक्त ऑगस्ट २०१४ पर्यंत होत्या त्या)