Skip to main content

वडा पाव रे........!!!

लेखक गोल्या यांनी मंगळवार, 09/06/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
ती म्हणे : प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळावा तो म्हणे : देवा , नविन चॉइस तरी कळावा.....!! ती म्हणे : बरा असतो एकच एक गडी माहीत होऊन गेलेल्या सार्या त्याच्या खोडी .....!! तो म्हणे : चांगली असे अंबाड्या ची भाजी तरीही खावी वाटे कधी तरी कांदाभजी ....!! नाठाळाला वठणी वर आणावयाचा त्रास हरेक जन्मात वाचेल बाई आमचा तो ख़ास....!! ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! जायचे तर जा नाथा नाजुक धागे तोडून हात तिने जोडले डोळे आले भरुन ....!! इथेच मग या गोष्टीचा सुखद अंत होतो,अन गरीब बिचार्या पुरुषाचा नेहमी बळी जातो .....!!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5057
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

"वडा पाव रे" हे शिर्षक वाचून मला तर टपरीजवळ उभा असलेला एक मित्र दुसर्‍याशी बोलत असावा असे वाटले ;) शप्पत, खरंच :)

सदर जिलबी टाकण्याचे वकुब पाहता, घाबरत घाबरत तांब्या फ़िरवलेला आहे. हे निदर्शनास येत आहे. असा नीर् वाळा देऊन मी माझे न मोजलेले शब्द संपवितो!

In reply to by गोल्या

त्यांना त्यांच्या क्षेत्रात घुसखोरी केलेली आवडत नाही. तुम्ही ती केली आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवू या. ही मिपाकरांची नवसदस्याची स्वागत करण्याची अलिखित पद्धत आहे. तुम्ही लिहित राहा. तुम्ही रुळलात की तुम्हीही असेच खेळीमेळीने नवसदस्याचे स्वागत कराल.

In reply to by सतिश गावडे

तसं नाही . आपलं काय ठरलय की नवीन सदस्यांन्ना ब्रीदींग पीरीयड द्यायचा . त्यांच्यावर टीका करुन त्यांन्ना हतोस्हित करणार्‍यांवर संपादक मंडळ कारवाई करेल . आता बघु इथे किती जणांवर कारवाई होते ते !

In reply to by गोल्या

@ कवितेबद्दल बोला की भाऊ>> तसाच बोलून दिलाय मी प्रति सादात खाऊ! ;-) समांतर:- भावना ओं को समझो यार! अती समांतर:- आत्मुस जिलबी प्रसारक मंडळात आपले स्वागत आहे! ;-)

In reply to by टवाळ कार्टा

@ आत्मुस म्हणजे कथानायक ना????>>> कथानायकाचे नाव आत्माराम आहे, आत्मुस नव्हे! आत्मुस हे माझ्या पहिल्या "अत्रुप्त आत्मा" या नावातिल इथल्या लोकांनी वेगळे करून ठेवलेले निक नेम आहे. धन्यवाद! :)

नया है वह! लिहित रहा हो!सुरुवातीला चालतंच असं!

ताटाखालचे मांजर मी होणार असेल तर होवू दे प्रत्येक जन्मात देवा ताट तरी नविन दे ....!! वा... ;) { भिक्षा "प्रेमी" } ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur

काहीही हां श्री..!! ... हा कू-विख्यात डायलोग आठवला..... बाकी शिर्षक अने कविता खरच वडा झाला.