वडा पाव रे........!!!
ती म्हणे : प्रत्येक जन्मी
हाच नवरा मिळावा
तो म्हणे : देवा ,
नविन चॉइस तरी कळावा.....!!
ती म्हणे : बरा असतो
एकच एक गडी
माहीत होऊन गेलेल्या
सार्या त्याच्या खोडी .....!!
तो म्हणे : चांगली असे
अंबाड्या ची भाजी
तरीही खावी वाटे
कधी तरी कांदाभजी ....!!
नाठाळाला वठणी वर
आणावयाचा त्रास
हरेक जन्मात वाचेल बाई
आमचा तो ख़ास....!!
ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!
जायचे तर जा नाथा
नाजुक धागे तोडून
हात तिने जोडले
डोळे आले भरुन ....!!
इथेच मग या गोष्टीचा
सुखद अंत होतो,अन
गरीब बिचार्या पुरुषाचा
नेहमी बळी जातो .....!!!!
अडीच दिवस या वयाच्या मानाने..
वरील पाकृ अंडे न घालता कशी
अंडे न घालता नुसता सूडाग्नी
नको, वडा आणि पाव दोन्ही
"वडा पाव रे" हे शिर्षक वाचून
मला तर दगाबाज रे गाणे आठवले.
:)
कांदाभजी खाउ कि वडापाव रे
आयला आमच्या शीर्षकावर एवढी
सदर जिलबी टाकण्याचे वकुब
कवितेबद्दल बोला की भाऊ .. की
त्यांना त्यांच्या क्षेत्रात
तसं नाही .
@ कवितेबद्दल बोला की भाऊ>>
थान्कू
आत्मुस म्हणजे कथानायक ना????
उत्तर मिळाले की आपण त्याला जर
@ आत्मुस म्हणजे कथानायक ना???
नया है वह!
ताटाखालचे मांजर मी
धन्यवाद
मला वाटलं, याच जन्मात रोज
काहीही हां स्ने...!!!
स्ने????????
नया हय वह.
श्री...!
गरजू वाले बरसुल का