कथेची सुरवात आवडली, पण शेवट नाय पटला....
आँ!! नाही म्हणजे काहीतरी नुसतं नजरेस पडलं....
तेही मुद्दाम प्रयत्न करून नव्हे तर अपघाताने, योगायोगाने....
म्हणून एकदम जीव दिला?
आमच्या हितल्या बीचवर गेला असता म्हातारा तर! काय झालं असतं त्याचं?:)
सडेतोड,
पिवळा डांबिस
(लग्नापूर्वी ही लुक्ड...... सो लुक्डा!!!)
आमच्या हितल्या बीचवर गेला असता म्हातारा तर! काय झालं असतं त्याचं?
पण त्याला अपराधी नसतं ना वाटलं ... आमच्या इथं क्लबात आला असतां तर काय झालं असतं ? तिथंच गार झाले असते राव साहेब,,,, असो ...
कथा आवडली ..
पिडां ... हे काय ... मी कालच हे वाक्य चोरुन सिग्नेचर मध्ये टाकले होते ....
आता परत बदला .....
- चिखलू
लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
दूधवाले दूधाचे कॅन घेऊन त्यांच्या दूधावाला स्पेशल एम ए टी गाडीवरून निघाले होते.
हा हा हा .. हे लैच्च आवाडलं ... गवळ्यांकडे येझदी पण असते ... :)
बाकी कल्लास कथा .. आपण खल्लास .. रावसाहेबांसारखा मी ही व्याकूळ होउन वाचत होतो. वर्णनाकलेला तोड नाही तुझ्या.
गद्य आणि पद्य विभागात उत्तम लेखण ...
पण मला हे कळलंच नाही
समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं.
कलेवर म्हणजे "पार्थिव" हे नक्की ना ?
(हळवा) टारूबाळ
शीर्षक ही छान! या कथेत रावसाहेबांचे अचानक परतणे, सुमनचे त्या तशा स्थितीत असणे आणि कथेच्या शेवटी त्यांचा अकस्मात शेवट - सारेच अगदी अकल्पित! आणि अगदी आटोपशीर. आवश्यक तिथे वर्णनही अगदी ठाशीव रेखाटले आहे. मजा आली.
सकाळी उठल्यापासून डोक्यात विषय घोळत होता. सगळी कामं करता करता हीच कथा आकार घेत होती डोक्यात. आणि वेळ मिळाल्या मिळाल्या बसले लिहायला आणि पूर्णच केली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
दोनच शेवट होऊ शकत होते. सुमनावर बलात्कार आणि तिची आत्महत्या किंवा रावसाहेबांची अपराधी भावना आणि त्यांची आत्महत्या. दूसरी घटना तशी विपरित पण हृदयस्पर्शी. पण शेवट अजून जरा खुलवायला हवा होता, असे वाटते.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
अकल्पित शेवट. माफी मागून प्रकरण मिटेल असे वाटले होते. पण ते न होता रावसाहेब अपराधी भावना सहन न झाल्याने स्वतःचा अंत करुन घेतात हे धक्कातंत्र कथेचा विषय प्रभावीरित्या मांडून जाते.
डिप्लॉयमेंट हा शब्द वकिली व्यवसायासंदर्भातील आहे का?
http://kalekapil.blogspot.com/
डिप्लॉयमेंट हा शब्द सुशांतच्या संदर्भात आहे. आणि तो माझ्या माहितीप्रमाणे सॉफ्टवेअर प्रोफेशन संदर्भात आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हटक्या विषयावरची आटोपशीर कथा आवडली. कथाविषय तर लै भारी
शेवट मात्र काहिसा कैच्या कै वाटला. तोच शेवट असा अचानक न होता रावसाहेबांच्या मनातील बोच अधिक गहिरी होत- त्यांचे विचार उलगडत- झाला असता तर सहज तरीही धक्कादायक वाटला असता..
-(कथाप्रेमी) ऋषिकेश
प्रसंगांचे वर्णन आणि भावनांची आंदोलने पकडण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे.
संवेदनशील व्यक्तीच्या हातून अजाणतेपणे घडलेल्या गोष्टीची किती टोकाची बोच लागून राहते आणि त्याचे प्रायश्चित्त झाल्याखेरीज त्यातून त्याच्या अंतरात्म्याला स्वस्थता कशी लाभत नाही असा मोठा आवाका असलेलं कथाबीज आहे.
वर पेठकरकाका म्हणतात तसे दोनच शेवट असू शकतात. हा शेवटही पटला पण ती अस्वस्थता आणखी वाढत वाढत असह्य झालेली दाखवायला हवी होतीस.
कथा पूर्ण करायला थोडी घाई केलीस असे वाटते. लोणच्यासारखे कथाबीज मुरवत ठेऊन कथेचा उत्तरार्ध नीट खुलवला असतास तर कथा एकदम वेगळ्याच उंचीवर गेली असती.
पु.ले.शु.
चतुरंग
फक्त दोनच शेवट असं का म्हणता?
उदा.
१. सून मुलाला घटस्फोट देते आणि रावसाहेबांशी पाट लावते..
२. रावसाहेब हिमालयात जातात.
३. रावसाहेब स्वतःच्या वासनांवर मुक्ती मिळवण्यासाठी (अ) मोठ्ठा यज्ञ घालतात (ब) गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करतात (क) गांधीजींचे तंत्र अवलंबतात (ड) समुपदेशनाचे वर्ग उघडतात.
४. मुलाला हे सहन होत नाही म्हणून तो रावसाहेबांचा खून करतो
आणखीही अनेक आहेत..
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
१. सून मुलाला घटस्फोट देते आणि रावसाहेबांशी पाट लावते.. : लेखक : चंद्रकांत काकोडकर
२. रावसाहेब हिमालयात जातात. : लेखक : शरच्चंद्र चटर्जी
३. रावसाहेब स्वतःच्या वासनांवर मुक्ती मिळवण्यासाठी
(अ) मोठ्ठा यज्ञ घालतात : लेखक : पु ना ओक
(ब) गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करतात लेखक : दासगणू
(क) गांधीजींचे तंत्र अवलंबतात लेखक : स्वामी शिवानंद ( ब्रह्मचर्य हेच जीवन वाले)
(ड) समुपदेशनाचे वर्ग उघडतात. लेखक : टेक अ वाईल्ड गेस !
४. मुलाला हे सहन होत नाही म्हणून तो रावसाहेबांचा खून करतो : लेखक : बाबा कदम
सर्वसामान्यपणे हे दोनच शेवट असू शकतात असे माझे मत होते पण कथा फझी लॉजिकच्या साडग्यातून काढलीत म्हणता कथेला कलाटणी देणारे नव्हे, तर कोलांटी मारायला लावणारे हे शेवटही अशक्यप्राय नाहीत! ;)
चतुरंग
कोलांटी मारायला लावणारे हे शेवटही अशक्यप्राय नाहीत!
विशेषतः कथेचे नाव "अकल्पित" असल्याने, काहीही अशक्यप्राय नाही.
- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
कथा चांगली आहे ... ती वाचत असताना याचा शेवट काय असेल ही उत्सुकता होती .
... आणि अगदी अकल्पित शेवट .
रावसाहेबांना अपराधी वाटणं अगदी स्वाभाविक आहे.... पण म्हणून आत्महत्या ..?
कथा आवडली.. अपराधी वाटणे हे समजलं पण म्हणुन आत्महत्या हे नही पट्या..
अप्सरांसमोर ॠषी मुनींचे तप टिकत नाही,, तर रावसाहेब म्हणजे सामान्य माणुस !!
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
सामान्य कथाबीज...... जीएं च्या बद्दल मिपावर चर्चा चालु असल्यामुळे ह्या कथेत जीए अधुनमधुन डोकावतात.अपघाताने घडलेल्या प्रसंगातुन म्हातारा इतका बिथरतो जरा पटणे अवघड जाते.तिच्या देहाबद्दल त्याच्या मनात आसक्ती निर्माण झाली नसतान देखिल आत्महत्या.त्यामुळे ही कथा सामान्य ठरते.जर का म्हातारबुवानी तिच्याशी नकळत लगट केली असती व त्या पश्चातापात आत्महत्या केली असती तर ठीक.परंतु तसे न होता ते सरळ आत्महत्या पटत नाही.कथालेखन प्रयत्न मात्र उत्तम. पुढच्या लेखनास शुभेच्छा.
वेताळ
जयेश माधव
कथा खुपच छान आहे,पण शेवट असा व्हायला नको होता
रावसाहेबा॑नी सुमनला अश्या अवस्थेत पहाणे आणि त्या॑चा शेवट
त्या॑च्या मरणाने होणे,कथा एकदम स॑पल्यासारखी वाटते.
बाकी झकास!!
जयेश माधव.
कथा चांगली आहे. :)
रावसाहेबानी आत्महत्या केली ह्याचाच अर्थ त्याना चुकुन अर्धवस्त्रांमधे दिसलेली सुमना ह्यापेक्षा आपल्या मनात ते पाहुन नंतर वासनेचे विचार आले ही टोचणी जास्त असेल.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कथा चांगली आहे पण शेवट पटला नाहि. हेच कधिकाळी ब्रम्हदेवाच्या सुद्धा बाबतीत घडले होते असा दाखला आपली पुराणे देतात. वकिली क्षेत्रातील माणुस सर्व थरातुन वावरलेला असतो, असा माणुस भावनेच्या भरात आयुष्य संपवतो हे थोडे अवघड वाटत आहे पटायला येव्हडेच. राग नसावा :)
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
हम्म! कथा बरी वाटली...
काही शंका -
१) रावसाहेब, झोपेतल्या झोपेत जातात?
२) की आपलं अपराधी थोबाड पुन्हा सुनबाईला दाखवायला नको म्हणून आत्महत्या करतात? :)
"काल पर्यंत तर सगळं नीट होतं गं.. आज एकदम काय झालं हे" सुशांत रडत होता..
बिचार्याला आपल्या बापाचे धंदे माहीतच नाहीत! :)
पण चालायचंच! मला विचाराल तर एखाद्याला असा मोह होऊ शकतो..त्यात काही फारसं अनैसर्गिक आहे असं मला वाटत नाही..परंतु..
रावसाहेब स्वयंपाकघरात आले.. "सुमना.......... आज सकाळी फाईल विसरली आहे हे लक्षात आल्यावर मी लगेचच आलो होतो घरी......................"
"बाबा.............................." सुमना तिथल्या तिथे थिजली. रावसाहेबांच्या वागण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला होता.
या वर्णनावरून रावसाहेब सुनबाईच्या अंगचटीला गेले असावेत ते मात्र अंमळ धक्कादायक आहे.. :)
एरवी,
नुकती अंघोळ करून आलेली.. केस पुसत.. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर पाठमोरी उभी... .. फक्त टॉवेलमध्ये. ती तिच्याच नादांत गुणगुणत्..घरात कोणीही नाही या समजूतीने बिनधास्त होती. तिचे नितळ पाय.. तिची ओली पाठ.. ओले केस..
मरून रंगाचा स्लिवलेस सल्वार कमिझ आणि त्यावर काळि ओढणी.. केस ओलेच होते अजून.. रावसाहेबांना आज सुमना किती रेखिव आहे हे जाणवलं. त्यांना आज ती विलक्षण सुंदर दिसत होती. ते तिच्याकडे पहातच राहिले.
प्राजूने वर्णन केलेली सुमना, रावसाहेबांनाच काय, मला सुद्धा आवडली! बेट्या सुशांतची एकंदरीत मज्जा आहे बुवा! ;)
असो, एखाद्या चालू मामंजीला त्याची सुनबाई लागू असणं ह्याची प्रत्यक्ष आयुष्यातली एखाद-दोन उदाहरण माझ्या माहितीतली आहेत.. कशी ते विचारू नका..;)
असो, वर म्हटल्याप्रमाणे एकूणात कथा बरी वाटली...
आपला,
(चालू मामंजी) तात्या. :)
प्रतिक्रिया
छान लिहिले आहेस.
छान...
असेच म्हणते
कथा आवडली
?
टाळ्या
अरेरे
बेष्ट .. बेष्ट .. बेष्ट
;)
छान लिहिले
+१
अकल्पित!
कथा आवडली.
हो..
अपेक्षित....
छान कथा .
एकदमच छान
शीर्षकाप्रमाणेच
कथा नीट वाचा..
म्हणजे मला शब्द खरोखरच माहित नव्हता
लोळतोय....
ख्.व.
नाव
आटोपशीर कथा
कथेची मध्यवर्ती कल्पना छान आहे!
अनेक शेवट असू शकतात
हाहा
आता मात्र खरंच !!
हा हा हा!! प्रचंड हा हा हा!!
वाईल्ड गेस
+१
हा हा हा!
अशक्यप्राय
शेवट अकल्पित..
सहमत !!
कथा आवडली..
कथा आवडली ..
कथा..
(विषय दिलेला नाही)
छान कथा !
मस्त
सुरुवात उत्सुकता वाढवतो पण.......
जयेश
अकल्पित
कथा चांगली
मस्त !
कथा चांगली
हम्म! कथा
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
आवडली