✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Fri, 01/30/2015 - 10:41
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!

जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!

कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!

                                  - गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------


प्रतिक्रिया द्या
14142 वाचन

💬 प्रतिसाद (56)

कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल

संदीप डांगे
Wed, 02/11/2015 - 18:56 नवीन
कवीच्या शब्दस्वातंत्र्याबद्दल कुठलाही आक्षेप नाही. जो शब्द ज्या कारणासाठी आणि ज्या भावनेने वापरला आहे ते योग्यच आहे. माझ्या मते त्या कारणाचा पाठपुरावा न करता कवीने घोळघोळ उत्तर देऊन 'आपल्या ते अपेक्षित नव्हते, मला तसे म्हणायचे नव्हते' वैगेरे छाप पलायन करू नये. कवी पेक्षा इतर सदस्यांनी योग्यप्रकारे त्या शब्दाची पाठराखण केली आहे जे अतिशय स्तुत्य आहे. माझा आक्षेप कवीच्या स्पष्टीकरणावर होता. त्यांनी ठामच राहायला हवे आपल्या कल्पनेवर आणि शब्दांच्या निवडीवर. कुणाचा आक्षेप आला म्हणून गुळमुळीत उत्तरे देऊन टाळू नये. बाकी माझे काही चुकले असल्यास दुरुस्त करावे…
  • Log in or register to post comments

तरी अजून मुंटे साहेबांनी

संदीप डांगे
Wed, 02/11/2015 - 18:59 नवीन
तरी अजून मुंटे साहेबांनी आपल्या स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे या वाक्याबद्दल आपले मत स्पष्ट केले नाही.
  • Log in or register to post comments

द्ये ना सोडून भौ

कपिलमुनी
Wed, 02/11/2015 - 19:07 नवीन
काह्याला तरास करून घ्याचां !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

असं कसं असं कसं

संदीप डांगे
Wed, 02/11/2015 - 20:54 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कायच्या काय !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/11/2015 - 22:41 नवीन
कायच्या काय ! बायल्या हा शब्द कवितेत वापरला आहे त्याच अर्थाने कितीतरी काळापासून वापरला जातोय ! मुख्य म्हणजे काही हुच्च शहरी लोक सोडून शहरांत आणि सर्व खेड्यांत तो त्याच अर्थाने (सत्य परिस्थितीचे नाम अथवा भित्र्या वागणूकीचे विशेषण या अर्थाने) आजही वापरला जातोय... आणि त्यांना त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. ही कविता खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याला उद्देशून असल्याने त्याला चिडवून त्याच्या अंगात विरश्रीचा संचार घडवून आणण्यासाठी अश्या खोचक आणि काहिश्या मानहानीकारक शब्दाची योजना हे केवळ कवीने घेतलेली सूट नसून कवितेची मूलभूत गरज होती. असे असताना त्या शब्दावर इतका गदारोळ आश्चर्यकारक वाटला !!!
  • Log in or register to post comments

+१ अगदी अगदी.

हाडक्या
Wed, 02/18/2015 - 18:16 नवीन
+१ अगदी अगदी. कविता सुचल्यावर आता त्यांनी १० लोकांना दाखवली, त्या लोकांनी हो सगळे आहे ठिक म्हतल्यावर त्यांनी इथे टाकली. तरीपण खुसपट निघालेच. अजून पब्लिक करतील तर लोकांच्या भावना दुखावून त्यांच्या घरावर मोर्चेपण निघतील असं वाटंतय. ;) (जिथे तिथे सामाजिक सेंसॉरशिपचा वैताग आलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा