Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by एस

लग्न मोडीत काढा असे मी म्हणत नाही. पण त्या गोष्टीस वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन आपल्या आणि इतरांच्याही आयुष्याचे मूल्यमापन त्याभोवती मर्यादित ठेऊ नका. समाजाच्या भुवयांना स्वतःच्या आयुष्याची होकायंत्रे बनू देऊ नका.
हा अख्खा प्रतिसादच सुंदर आहे. मला वाटत नाही, मी एवढ्या साक्षेपात मांडू शकलो असतो. :) जर सगळी वाक्ये तुमचीच असतील तर आमचा सलाम.

In reply to by एस

वसंतोत्सव हा पुरुषांच्या दृष्टीने अतिशय सोयीचा आहे परंतु त्यातून गरोदर झालेल्या स्त्रियांचे काय? मानवी आयुष्यात लहानपण हे सर्वात लांब असते. मुल पूर्णपणे स्वावलंबी व्हायला आदिवासींमध्ये सुद्धा १५ वर्षे जायला लागतात. मांजर बिबळे, वाघ किंवा चित्ते यांच्यात मादी हि पूर्ण पाने पिल्लाला एकटी वाढवते. तिचा गर्भधारणेचा काळ ८०-९० दिवस असतो. या काळात सुद्धा ती शिकार करून आपले पोट भरत असते. मानवी स्त्रीला २८० दिवस गर्भारपण असते यातील १०० दिवस ती पूर्ण स्वावलंबी नसते यानंतर १५० दिवस (५ महिने पूल पूर्णपणे तिच्या वर अवलंबून असते या काळात स्त्री हि पूर्ण स्वावलंबी नसते. निर्माण होणार्या संततीने आदिवासिंसारखे भटके जीवन जगायचे असेल तर वेगळे परंतु जर स्थिर जीवन जागून शिक्षण घ्यायचे असेल तर हा वसंतोत्सव स्त्रियांच्या कोणत्याही कामाचा नाही. क्षणाची मजा आणी आयुष्यभराची सजा हि स्थिती स्त्रियांच्या आणी पर्यायाने समाजाच्या हिताची नाही यामुळेच जगभरातील सर्व संस्कृती मध्ये लग्न हि संस्था उदयास आली. यात एका संस्कृतीचा दुसरीशी काहीही संबंध नसताना सगळीकडे थोड्याफार प्रमाणात सारखीच लग्नसंस्था का विकसित झाली याचा मुद्दाम विचार करा. भटक्या जमातीत फक्त मुक्त सेक्स आहे कारण होणार्या संततीला देण्यास पुरुषाकडे काहीच नसते. जेंव्हा मानव स्थिर जीवन जगायला लागला आणी आपली संपत्ती निर्माण करू लागला तेंव्हा हि संपत्ती आपल्याच संततीला जावी हा नैसर्गिक विचार त्याच्या मनात आला. त्याचबरोबर वृद्धावस्थेत आपली काळजी फक्त आपलीच संतती घेईल हा स्वार्थी विचारही त्यात होता. वसंतोत्सवात होणारी संतती माहित नसलेल्या पित्याची का काळजी घेईल. ( वाघ सिंह ई प्राणी आपली नसलेली संतती सरळ मारून टाकतात). यातून पत्नी हि केवल आपलीच असावी या हेतूने लग्न हि संस्था अस्तित्वात आली म्हणजे होणारी संतती आपलीच असावी हा हेतू साध्य करता आला. लग्न संस्था हि परिपूर्ण नाहीच पण त्याला सशक्त पर्याय अजूनतरी उपलब्ध नाही. आदिवासींचे उदाहरण फक्त त्यांच्या उन्मुक्त सेक्स पुरते देणे ठीक आहे पण नैसर्गिक आपत्तीत त्यांची होणारी परवड या बद्दल कोणी बोलत नाहीत. समजा पुण्यात ५० मुलामुलींचा गट उन्मुक्त जीवन जगत आहे आणी त्यातील १५ मुली पुढच्या ३ महिन्यात गरोदर झाल्या तर त्यांचे पुढे काय होणार हे सरळच दिसते. यावेळेस मग आपल्याला आधुनिक वैद्यक शास्त्राचा आधार घ्यावा लागेल. अन्यथा त्या मुलांचे आयुष्य अनाथालयात( यासाठी पण तुम्हाला समाजाची गरज पडतेच) कसे जाईल किंवा त्या कुमारी मतांचे आयुष्य कसे असेल याचा विचार करून पहा. आदिवासी सेक्स जीवनाबद्दल आकर्षण तेवढ्यापुरते ठीक आहे. सध्या इतकेच

In reply to by सुबोध खरे

सिलेक्टिव्ह रीडिंगचे उदाहरण. माझा प्रतिसाद वसंतोत्सवाबद्दल नसून समाजातील वाढत जाणार्‍या मोकळेपणाच्या अपरिहार्यतेबद्दल होता. असो.

अजून नाना-माई आले नाहित...त्यांचे अनुभव घेउन अवांतर - का आधीच येउन गेले...दुसर्या रुपात ;)

In reply to by टवाळ कार्टा

हे असं होतं टका भौ.. जे आहेत किंवा जे कधी नव्हे ते आलेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि जे नाही आलेत (संक्षी, नाना, माई) त्यांचा धोसरा काढून उंबर्‍याबाहेर बघत बसायचे. असं कसं चालायचं हो ?

इतके विचार वाचले पण पटतो एकच !..
अरे संसार संसार, दोन जिवांचा विचार ! देतो सुखाला नकार, आणि दु:खाला होकार
..मग तो संसार आणि विचार लग्नाचा असो नाहीतर 'बिन'लग्नाचा !

७००

सगळ्यांचं समाधान झालं का? खरडफळ्याच्या पुढची अवस्था येण्यापूर्वी थांबूया आता!

In reply to by पैसा

७०० झालेत. एकदाच फक्त १००० होऊद्या. मग बूच लावा कायमचं. आम्ही पुन्हा कध्धी कध्धी हट्ट धरणार नाही. शपथ!

In reply to by बॅटमॅन

अगदी अगदी...माझी पण प्रतिसादांची सेंच्युरी होईल ;) (पण मी टिमस्पिरीटने ब्याटींग करतो ;) )

In reply to by टवाळ कार्टा

आम्ही पण हेच म्हणतो. बाकी संमं ला बूच लावायची एवढी का घाई असते ? खरच विचारतोय, म्हणजे मिपावर लोड येतो का ५०० वगैरे प्रतिसाद झाल्यावर ? कारण कदाचित एखाद्याला एखादा मुद्दा नंतर आठवेल मग हा धागा बंद ( आणि बंद का तर ५०० + झालेत ) म्हणून नवाच काढावा लागेल .

In reply to by टवाळ कार्टा

ही हौशी साईट असल्याने, अजून पण इथे बरेचसे बग्स आहेत. उदा. १. दुसर्‍या पानापासून नविन प्रतिसाद दिसत नाहीत. २. आपल्या पीसी किंवा मोबाईल वरून फोटो टाकता न येणे.आधी गुगल मध्ये टाका आणि मग इथे लिंक द्या, असला द्राविडी प्राणायाम करायला लागतो. ३. खरड-वहीत आलेली खरड दिसत नाही. त्यामुळे प्रतिसादांचे लोड-टेस्टींग पण झालेले नसावे.

In reply to by मुक्त विहारि

*मोबाइल व्ह्यू पर्याय ठेवलेला असला तर खरडवहीतली नोंद उघडूनच येते *इमेजिज ऑफ (/सिलेक्ट बैंडविड्थ=लो Low)ठेवूनच मोठे धागे पटकन उघडले जातात) .

In reply to by पैसा

आपण सर्वज्ञ - आपलं ते संपादक आहात. काय तो साक्षेपाने निर्णय घ्या! :-) संपादकांनी आठवावे स्वरुप । संपादकांनी आठवावा साक्षेप । संपादकांनी आठवावा प्रताप । मिपावरी ॥

मिपावर hall of fame वगैरे प्रकार आहे का? सर्वात जास्त प्रतिक्रियेचा धागा, सर्वात जास्त वाचनाचा धागा वगैरे वगैरे? याचे statics कुणाकडे आहे का?

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला कळत कसे नाही. माझा एक एक प्रतिसाद धाग्याला इंचाइंचाने १००० कडे नेउन इतिहासाचे पुनर्लेखन करायला भाग पाडत आहे.

धाग्याची सप्तपदी झाली म्हणायची.. हाभिणंडण मु.वि. काका...

अर्रे हो.. इथे अवांतर असेल पण समलिंगी व्यक्तींच्या विवाहविषयक अपेक्षा वगैरे बद्दल कोणीच कसे काही बोलले नाही अजून ?

In reply to by टवाळ कार्टा

अगदी अगदी.. टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू.. आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून .. ;) ) पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांच्यात पण घरात "नवरा"(एक प्रकारे कर्ती व्यक्ती/dominance अशा अर्थाने) हा रोल कोणाचा यावर छुपा संघर्ष चालू असतो, अर्थात फार कमी असेल पण जास्त विदा नाही ब्वा आपल्याकडे. :)

In reply to by हाडक्या

टका म्हणतोय तसे सूडभौ, तुमचे मत लिहा पाहू..
असं म्हणता? बरं!! मी आधीच एका प्रतिसादात म्हटलंय, दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
आमच्या माहितीतले सगळे समलैंगिक इंग्रज पब्लिक प्रेम विवाह केलेले आहेत आणि जास्त काही विचारता येत नाही त्यांना (आणि भारतीय कोणी माहीत नाहीत अजून ..
तुम्हाला परदेशात तरी असलं काही पाहायला मिळालं!! आमचं परदेशगमन शिंचं जेमतेम सात दिवसाचं होतं. त्यामुळे आता याहून मोठ्ठं मतप्रदर्शन हवं असेल तर मला हिरव्या देशात जायला मिळावं म्हणून नवस करा अंबाबाईला!! तिकडे कोणी सापडलंच माहितीत तर मुलाखती घेऊन लेखच पाडतो. ;)

In reply to by सूड

दोन व्यक्ती परस्परसंमतीने काही करत असतील आणि त्या गोष्टीचा मला जोवर पर्सनली काही इम्पॅक्ट होत नाही तोवर मला त्याच्याशी शष्प घेणं देणं नसतं. तोच नियम इथेही!! आमच्या कॉलेजात आलेल्या काऊंन्सेलरने समलिंगी संबंध नैसर्गिक असतात असं सांगितलं होतं, त्यामुळे ज्यांना पटत असतील आणि त्यातून जे होईल ते निस्तरायची (सगळ्याच प्रकारची मानसिक, शारीरिक इ.) तयारी असेल त्यांनी ते खुशाल ठेवावेत असं माझं मत आहे.
+११११११११११११११११११११११११

धाग्याच्या आशयाशी सहमत आहेच. पण माझ्या निरिक्षणाप्रमाणे पत्रिका या प्रकारामुळे अनेकदा अपेक्षा जुळत असूनही चांगल्या जोड्या बनता बनता राहतात अन एकमेकांशी जुळवून न घेता येणार्‍या जोड्यांचे प्रमाण वाढते. हे पत्रिकेचे जोखड संपूर्ण समाज दूर करेल तो सुदिन.

In reply to by श्रीरंग_जोशी

पत्रिका हवीच पण ती आधुनिक... आता ह्या पत्रिकेवर पण एखादा धागा कुटायला घेवू या.

In reply to by श्रीरंग_जोशी

मला एक कुतूहल आहे कि माझी आणि माझ्या बायकोच पत्रिका जुळते कि नाही? पण एक भीती पण वाटते कि समजा पत्रिका जुळत नसेल तर "आता" (२२ वर्षांनी) आपसात पटणार नाही. असे झाले तर काय घ्या. या पत्रिकांचे काही सांगता येत नाही.

बायको :- माझ्या मनाचा मोठेपणा बघा... मी तुम्हाला न बघताच लग्न केलं. नवरा :- माझा मोठेपणा बघ... मी तुला बघुन पण तुझ्याशीच लग्न केलं ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

७८६ ७८६ वा प्रतिसाद टंकण्यासाठी जागा पकडुन बसलोय . -- धर्मनिरपेक्ष प्रगो

In reply to by प्रसाद गोडबोले

ओ, इथे धर्माच्या नाय लगिनाच्या गोष्टी चाल्ल्यात ! :) (काय नंबर मारलाय्त !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो धर्माचा आणि लग्नाचा गंभीर संबंध आहे , आपणास ठाऊक नाही काय ? बहुतेक ठाउक आहेच पण तुम्हीही कदाचित सहस्त्रकासाठी हातभार लावत आहात =)) --

muvi हा ७८६ नं चा पर्तिसाद हाय. खास अंक काढला हाय. मधले आणि नंतर कीती बी टाका. :) बादवे मुवि हाबिणंड्ण बर्का. (गोड्बोल्याला थांकू ही खुर्ची मला दिल्याबद्दल ;) )

In reply to by अभ्या..

भारी पोस्टर.... बाद्वे, एक ४-५ दिवसांपुर्वीच मुलाने पल्सर घेतली. किंबहूना पल्सरच्या चाक-गुणांमुळे ७८६ आकडा पार झाला...

अश्या प्रकारे धाग्यात फायनली संपादकांना काम मिळालेले है!! कपिलमुनिंनी टाकलेला शांती मंदीरा बेदीचा फोटो उडाल्येला आहे!!!!!! =))