मी कालच पाहिला. आजवर आमिरखानचा सर्वात सुंदर चित्रपट मला वाटला. या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन !
मास्टर कार्ड च्या जाहिरातींसारखे लिहायचे तरः
तिकिटांची किंमतः ४० डॉ.
पॉपकॉर्न आणि कोकः १५ डॉ
जाणे-येणे: ६ डॉ.
चित्रपटाच्या शेवटी मुलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू: अमूल्य !
- सर्किट
या वर्षी ऑस्करसाठी भारताने हा चित्रपट पाठवला नाही, तर माझे (टोपण)नाव बदलेन !
चित्रपट पाहिल्या पाहिल्या असेच वाटले, लगानच्या वेळेस फार काही आशा नव्हत्या, या वेळेस मात्र वाटतेय.
(एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्यांपैकी मी एक!:))
आम्ही मात्र चित्रपटसॄष्टीचे देणे लागत असल्यासारखे चित्रपट प्रदर्शित झाल्याझाल्या थेटरावर हजर, मग तो "तारे जमिन पे" असो अथवा "सावरियाँ". जे भोग असतात ते ईथेच भोगून संपवावे लागतात, हा त्यातलाच एक प्रकार.....
पण दररोज प्रयत्न करून सुध्धा अजूनही "तारे जमिन पे" ची काही तिकिटे मिळाली नाहीत. पण ठरवले आहे, चित्रपट बघायचा तो थेटरातच..... आपल्या लेखामुळे मनाला थोडे धैर्य मिळाले कारण आमच्याकडे एक चित्रपटाचा खर्च एकट्या माणसासाठी ३०० रूपये येतो.....
काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती......
चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ?????
<<<काही लोक डीव्हीडीवर बघायचा म्हणतात त्यांना माझी हा चित्रपट थेटरात बघण्याची विनंती......
माझीपण!
<<<चांगल्या लोकांच्या कष्टाचे कौतुक आपण नाही तर कोण करणार ?????
अगदी खरंय.
-वर्षा
कालच पाहिला. सगळ्याच आघाड्यांवर नितांतसुंदर चित्रपट. प्रत्येकाने पहावाच, शाळाशाळांत दाखवावा असा चित्रपट
(प्रचंड प्रभवित आणि खात्रीचा रिपिट ऑडियन्स) ऋषिकेश
एक कुसळ: गाणी तितकीशी आवडली नाहित. या आशयगर्भ चित्रपटाला सुंदर गाण्यांनी वेगळचं परिमाण लाभलं असतं असं मात्र वाटून गेलं
ऋषिकेशजी,
ह्या चित्रपटात गाणी केवळ पार्श्वसंगीत म्हणुन आहेत. परंतु ती सुश्राव्य आहेत.
मुलाची व मातेची तटातुट होते तेव्हाचे गाणे भावनावश करणारे आहे.
शं.ए.लॉ., हे आजच्या काळातले शास्त्रीय संगीतावर आधारित सुन्दर गाणी देणारे संगीतकार आहेत.
त्यांचे जॉनी गद्दार मधील "डुब जा मेरे प्यार मे" ऐका.
संजय अभ्यंकर
मान्य की हे एक ताटातूटवालं गाणं चित्रपटाच्या फ्लो मधे इतर गाण्यांप्रमाणे बसलं तर आहेच, पण परिणामकारकही ठरलं आहे. पण इतरही गाणी केवळ सुश्राव्य यापेक्षा अतिशय सुंदर संगित व आशयगर्भ असती तर चित्रपटाची मजा आहे त्यापेक्षाही कैक पटीने वाढली असती (हे सुद्धा कारण ही गाणी चित्रपटात आहेत, ती नसती तरी चित्रपटाला फार धक्का लागला असता असे नाही)
अर्थात हा चित्रपट ज्या ताकदीने उतरला आहे त्यात हे एक अंग "किंचित" कमी पडलं असेल तर बाऊ करण्यात अर्थ नाहि असे समजतो.
अवांतरः
हे मत शं.ए.लॉय यांच्या एकुण संगीतावर नसुन, केवळ या चित्रपटातील गाण्यांवर आहे, इतर पार्श्वसंगीत भन्नाटच आहे
चित्रपट संपल्या नंतरचे टायटल साँगही अतिशय सुरेख आहे.
(चिकित्सक) ऋषिकेश
आता हा चित्रपट पाहिलाच पाहिजे,पण आमच्याकडे कुठे थिएटर मध्ये लागणार? तेव्हा डीवीडी उपलब्ध झाल्या की दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणते.(नाहीतर जर्मनमध्ये डब होईपर्यंत वाट पहावी लागेल)
स्वाती
कथानक उघडले असेल म्हणून मी लेख वाचला नाही. पण येथील प्रतिक्रिया व इतर ठिकाणीही (वृतपत्रे, संकेतस्थळे, मित्रांचे म्हणणे) चांगले सांगितल्याने हा सिनेमा पाहण्याचा मोह वाढत चालला आहे.
अलिकडे बॉलीवूडमधील तारे 'जामिन'पर च्या नाट्यप्रसंगांमुळे बॉलीवूडचा उबग आला होता.पण आमिर सारख्या गुणी कलावंतांमुळे बॉलीवूडमधील कलात्मकता अजून जिवंत असल्यासारखे वाटते.
त्याच्या इतर 'पंख्या'प्रमाणे मीही त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतो,मंगल पांडे मधील 'कलात्मक दंगल' पाहिल्यामुळे जरा निराशा झाली,पण यावेळी मात्र 'आमिर'ने बाजी मारली.
जय आमिर बाबा की...
(तुमच्यात 'मिसळ'लेला) विनोबा
प्रतिक्रिया
धन्यवाद
हेच,
हा चित्रपट
ऑस्कर
अतिशय उत्तम समिक्षा ....
आभारी आहे
धन्यवाद
एवढे सगळे
कालच
गाणी तितकीशी आवडली नाहित. या आशयगर्भ चित्रपटाला सुंदर गाण्यांनी
मान्य पण
हं...
कथानक
तारे 'जामिन'पर
पाहिला...फा