Skip to main content

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

लेखक वारा यांनी सोमवार, 12/01/2015 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा. तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती). ३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे. तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही. आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के %) सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही. क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स. अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.

वाचने 41781
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर धागा.. हीच माहिती सध्या मी सुद्धा शोधत आहे. SSC - मला हा अभ्यासक्रम पुरेसा वाटत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी खरं तर CBSE हवा. पण मुळात आपला मुलगा डॉक्टर / इंजिनिअरच बनेल ह्याची काय खात्री? समजा सेफ साईड तसं धरलं तरी तो अभ्यास आपणही घरी करुन घेऊ शकतो असं मला वाटतय. मला कितीही इच्छा असली तरी चांगली CBSE जवळपास न सापडल्याने मी ह्या पर्यायाचा विचार करतेय. शिवाय माझ्या घराजवळ जुन्या प्रसिद्ध अनेक SSC च्या शाळा आहेत. शाळा घराजवळ असणे हा मुद्दा अत्यंत मह्त्वाचा असल्याने मी त्या शाळांचा विचार करतेय. ह्यांच्याही फीस तोडीस तोड आहेत. ICSE - हे ऐकायला छान वाटतं.. पण मला स्वतःला अजुन ह्या ब्यासक्रामातुन पास आउट झालेलं कुणीही माहिती नाही. त्यामुळे ह्या अभ्यासक्रामातुन बाहेर पडून सामान्य मुलां सोबत बारावी - ग्रॅजुएशन केलं तर नक्की त्याचे फायदे तोटे काय हे मला माहिती नाहीत. ह्या अभ्यासक्रामात खुप सार्‍या माहितीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिल्या जातो. अनेक विषय असतात (सहावीलाच म्हणे १२-१३ विषय असतात).. काही पालक म्हणतात की आजकालची मुलं जास्त हुषार आहेत.. त्यांच्या बुद्धिला एवढं खाद्य लागतंच.. ह्या शाळांच्या फीस पण भरपुर आहेत. मायबोलीवर ह्यावर पुष्कळ चर्चा झाल्याचं आठवतय पण दोन दिवस झाले मलाही लिंक सापडलेली नाही. तिथे कुणी तरी ह्या ३ अभ्यासक्रमांवर सविस्तर लिहिलं होतं. तोवर ही एक लिंक पहा - http://www.thinkvidya.com/a/cbse-vs-icse-the-pros-and-cons-of-each-educ…

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

धन्यवाद....मिळेल ती माहीती चेक करतोय. साईट वर CBSE अभ्यासक्रम २०१४ - २०१५ अस का लिहीत आहेत? म्हणजे CBSE चा सिल्याबस दरवर्शी बदलतो काय?

इंग्लिश मेडियम स्टेट किंवा फार्फार तर कॉन्वेंट फायनल केले आहे

सी.बी.एस.सी. चा विचार करा. एस.एस.सी. पॅटर्न बर्‍यापैकी औटडेटेड झालाय. १० वी-१२वी नंतर स्पर्धेमधे टिकायचं असेल तर अपडेटेड ज्ञान असणं आवश्यक आहे. आय.सी.ए.सी विषयी फार माहिती नाही त्यामुळे बोलतं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

SSC मध्ये गणित विज्ञानाचा काहितरी घोळ घातलाय म्हणे... पुस्तक बदलली आहेत की २ -२ पुस्तकं केली आहेत (म्हणजे NCRTE ची सुद्धा आणली आहेत) असं काय काय ऐकायला मिळतय... कुणाला काही माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

हो गणिताचे आमच्या वेळी होतं तसं गणित आणि सामान्य गणित असे दोन इलेक्टिव्ह्ज ठेवलेत. ज्यांना पुढे करिअर मधे मॅथेमॅटिक्स अ‍ॅप्टीट्युडची विशेष आवश्यकता नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. खरं तर वेडेपणाचा निर्णय आहे. आर्टस, कॉमर्स आणि सायन्स तिन्हीचा ह्या ना त्या प्रकारानी गणोबाशी संबंध येतोचं. काठिण्य पातळी आणि वापरामधे फरक असु शकतो. पण त्याला सामान्य गणित ही पळवाट अयोग्य आहे. दहावी मधे सामान्य गणित घेतलेला विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी पदविका आणि पदवीकडे वळु शकत नाही.

मी माज्या मुलासाठि कॉन्वेंटच पसन्त केलि. त्याच्या वेळी मलापण खूप प्रश्न पडले होते.

आमच्या कडे गेल्या वर्षी माझ्या मुलाच्या एड्मिशन च्या वेळी हेच प्रश्न पडले होते..आमचा पहिला प्रेफरेन्स शाळा जवळ असण्याला होता..आणि आमच्या घराजवळ सगळ्या शाळा एस. एस. सी. बोर्ड च्याच आहेत..म्हणून आम्ही सगळा विचार करून त्याला घराजवळच्याच एका चांगल्या शाळेत त्याला घातल..अभ्यास तर काय आपण घरी पण करून घेऊ शकतो, आणि नंतर कॉलेज सगळ्यांची एकच असणार आहेत..

CBSE बेस्ट ! पण खात्री करून घ्या की शाळेमध्ये फक्त CBSE अभ्यासक्रमच नाही तर टोटल CBSE Curriculum घेतला जातो. कारण CBSE बोर्डाची परीक्षा म्हणजे स्पेशल स्किल्स, अवेअरनेस, जनरल इंटरप्रिटेशन आणि बरंच काही असतं. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सहजपणे होतो. ट्युशन मिळत नसेल तर एस. चांद यांची रेफरन्स बुक्स घ्या आणि स्वत: वाचून शिकवा मुलांना. तुम्हाला वाचायलासुद्धा इंटरेस्ट वाटेल. पुस्तकांच्या किमतीपण भरपूर आहेत.

माझा मुलगा ज्यु केजी ते दहावी सीबीएसईमध्ये शिकला आहे.सुरुवातीपासुन घेतल्यास सिबिएसई चांगला पर्याय आहे.एकतर विचारपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम,मनाला येईल ते मंत्री नियम काढणार बदलणार असे काही फारसे नाही.मराठीचा पर्याय माझ्या मुलाने आठवीपर्यंत वापरला.नववी दहावी दोनच भाषा आहेत.त्यामुळे हिंदी द्वितीय भाषा घेतली आहे.मात्र सिबिएसई शाळेला त्यात प्रशिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग हवा.नवशिक्या शिक्षकांचे ते काम नाही. आॅब्जेक्टिव्ह पेपर नसतात.पेपरातला काही भाग जास्त पर्यायातला एक निवडा असा असतो. मराठी पर्याय महाराष्ट्रातल्या शाळेत तर मिळतोच .बहारिनच्या सिबिएसई शाळेत पण होता. दहावीपर्यंत ग्रेड पध्दत आहे.दहावीचा रिझल्ट एकत्रित ग्रेड पाॅइंट अॅवरेज असा दहापैकी गुण मिळतो. टप्प्याटप्प्याने अभ्यासाची तीव्रता वाढत जाते.त्याची सवय हळूहळू मुलाना होत जाते.त्याप्रमाणेच अगदी तिसरीपासुनचे पेपर पॅटर्न्स असतात. मुलांना रोज अभ्यास फक्त टेक्स्टबुकमधुन केलेला पुरतो.आपण लक्ष घालणे जरुरी आहे.ट्युशनची आवश्यकता आम्हाला फक्त दहावीच्या गणिताला लागली.रोज अभ्यास करण्याला पर्याय नाही.फक्त शाळेवर अवलंबुन राहणेही नाही चालु शकत.मी बरेच पालक शाळेला,अभ्यासक्रमाला मुलांच्या अपयशाचे कारण मानताना पाहिले आहे.पण ते सोयिस्कर स्वतःच्या असहभागाबद्दल बोलत नाहीत. ५०%शाळेचा आणि तेवढाच पालकांचा सहभाग हवा. शाळेत एका वर्गात ४० मुलं आणि तुमचा एकच तुमच्यासमोर.मुलांना काय येतं येत नाही का येत नाही हे सर्व आपण जाणून घेऊ शकतो. अकरावी बारावी देखिल आम्ही सिबिएसईलाच कंटिन्यु करणार आहोत.इतका आम्हाला हा अभ्यासक्रम आवडतो! आम्ही म्हणजे आम्ही आणि आमचा मुलगा!नुसते आम्ही नाही!!

In reply to by अजया

म्हणुनच मला CBSE हवं होतं.. पण जवळ २-३ च शाळा आहेत. पैकी २ भिकार आहेत. (त्या चक्क अपार्ट्मेंट टाईप एका बिल्डिंगच्या शाळा आहेत.. आणि त्यांना मैदानच नाही... मैदान नसलेली शाळा अजिबात नको...) आणि १ उरते ती भयानक महाग आहे. १ लाख फीस मी ३ वर्षाच्या मुलासाठी भरु शकत नाही. (१० वीला मी काय फीस भरत असेन ह्या विचारानेच मला फेफरं आलं..) आता पर्याय फक्त २ च आहेत.. SSC and ICSE... तर ICSE बद्दल थोडी माहिती कुणी देऊ शकेल का?

In reply to by काळा पहाड

बहुधा नाही. त्यांची साठ हजारच्या आसपास आहे., त्यात फी शिवाय न्याहारी जेवण व संध्याकाळचे दूध पण देतात . घरचा डबा नेण्यास मुभा नाही

In reply to by खेडूत

मिलेनियमच.. आम्ही चौकशी केली तेव्हा "या वर्षी ७९ हजार आहे.. १०% वाढेल असं धरुन चाला" असं म्हणाले. त्यांचे फोर्म्स जस्ट ५-६ जानेवारीला भरायचे होते, काही कारणाने तेव्हा नाही भरता आले, त्यामुळे नक्की फीस किती आहे ते कळाले नाही. मला इतक्या लहान मुलांना शाळेनी जेवण देणं आवडत नाही. माझ्या मुलाला मी जितकं उत्तम करुन देऊ शकते ते कुणीच १००-२०० मुलांच एकदम जेवण बनवणारा आचारी देऊ शकत नाही. दुसरं असं की त्या शाळेत मुल असणारे पालक भेटले, त्यांनी सुद्धा अशीच ८०-९० हजार फिस सांगितली आणि शिवाय "फाटक सर गेल्यापासुन पुर्वी सारखं वातावरण राहिलं नाही" असंही म्हणाले. तिसरा मुद्दा असा की बुकलेस शाळा आहे. त्यामुळे घरी मुलं काही होमवर्क वगैरे करत नाहीत, अनेक पालकांना अशावेळी नक्की मुलाला काय कळतय काय नाही हे समजत नाही. अशा अनेक आक्षेपांमुळे लाखभर फीस भरायचे धाडस माझ्यात तरी नाही..

In reply to by पिलीयन रायडर

होमवर्क नसतो. मग परीक्षा असतात का? हल्ली १०वीपर्यंत परीक्षा नसतात असं ऐकलंय. मग मुलाला शिकवलेलं समजतंय की नाही हे कसं कळतं?

In reply to by आजानुकर्ण

प्रत्येक आठवड्याच्या शीट्स असतात. त्यावरुन काय ते समजुन घ्या आणि करुन घ्या मुलाचा अभ्यास... परीक्षांचं माहिती नाही. पण मुलाला कळतय की नाही ह्याचा आई वडीलांना अंदाज येत नाही हे २-३ जणांनी सांगितलं...

In reply to by पिलीयन रायडर

आमचं इथे पाहिलंच वर्ष चाललंय. सध्या तरी ठीक-ठीक . परीक्षा यथातथाच असतात. आपण भरपूर वेळ द्यावा लागतो. वर्षाच्या अधेमधे भारतात परतल्यामुळे जी मिळेल ती शाळा घेणे भाग होते. पण पूर्वी अनेक वाईट शाळा पाहिल्यात त्या तुलनेत ही ओक्के वाटते . प्रत्येक शाळेत काहीतरी उणीवा आहेतच. शाळेतले जेवण आम्हालाही पटत नाही पण ते बिल्ट-इन फीचर आहे ! :( पुढे बाहेर रहायची वेळ येईल तेव्हां अशी सवय असल्याने जड जाणार नाही अशी समजूत करून घेणारे पालक पाहिलेत.

म्हणजे SSC सोडून CBSE कडे वळणे योग्य का? जर पाल्य अजून पहिलीत जायचा असेल तर?

अजयाशी सहमत! त्यातल्या त्यात CBSE चा अभ्यासक्रम उत्तम, पण अर्थातच पालकांची पाल्याबरोबर त्यात्या इयत्तेचा अभ्यास करण्याची तयारी हवी. यात जबरदस्तीने करावं लागण्यापेक्षा त्यांनाही (म्हणजे पालकांना) आनंद वाटायला हवा. थोड्या अवांतराबद्दल क्षमस्व - CBSE ची 9 वी आणि 10 वीची Democratic Politics ची पुस्तके सर्वानीच जरूर वाचावीत अशी आहेत.

माझा मुलगा सीबीएसइ मधे शिकतोय. पण त्याच्या शिक्षकांवर त्याचा परफॉर्म्स ठरतोय. अनुभवी शिक्षक नसल्यामुळे त्याची जरा गोची होत आहे. मुळात त्या शिक्षिकेलाचा सीबीएसइ चा अभ्यासक्रम अजून नीट समजलेला नाही. मुलाला गणिताची ट्युशन लावली तो पर्यंत बरं चाललं होतं. ट्युशनवाला शिक्षकही कुठे तरी निघुन गेला याचं गणित पुन्हा खालावलं. मी त्या म्याथवाल्या शिक्षिकेला भेटलोय, आमचं ऐकुन घ्यायच्या ऐवजी तिचच सुरु असतं आम्ही कशी विद्यार्थ्यांची काळजी घेतो, अभ्यासक्रम तसा टफच असतो पण मुलांचा परफॉर्म्स आता सुधारु लागला आहे, मी व्यक्तिगत लक्ष घालते असं म्हणुन ती माझी बोळवण करते आहे, मला माझ्या गावी तीच एक शाळा बरी असल्यामुळे काही दुसरा पर्याय नाही. -दिलीप बिरुटे

आयला बरंच अवघड झालंय... जास्त पर्याय असल्याने फायदा होतो की नुकसान असा प्रश्न पडतो. एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले. माझे एकदोन चुलत नातेवाईक सीबीएससी बोर्डातले आहेत. सीबीएससी बोर्डाचा नोकरी/पुढील शिक्षणात प्रवेश वगैरे मिळवताना विशेष फायदा होत असल्याचे ऐकले नाही. नक्की काय परिस्थिती आहे?

In reply to by आजानुकर्ण

एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
अगदी हेच म्हणायचं आहे.

In reply to by खटपट्या

माझा ल्येक एस्.एस्.सी. वाले त्याने काही मोठा फरक जाणवेल काय? कारण मी घरापासून फक्त ५ मिनिटाचे अंतरावरील (जाहीरातीप्रमाणे नाही खरोखर चालत) शाळेत पुढे खेळायला/अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून दाखल केले आहे लेक आणि लेकीला. जाणकारांनी जरा इकडे प्रकाश टाकावा.

In reply to by आजानुकर्ण

सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही. सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात. याला सरकारी कारण म्हणजे विविध कर्मचारी नोकरीनिमित्य गावं बदलत असल्याने त्यांची मुलं सी बी एस ई / केंद्रीय शाळेत असतात. त्यासाठी सरकारी बाबुनीच हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे भविष्यातल्या सुविधेसाठी अनेक पालक इतर शाळातून काढून पाल्याला सी बी एस ई शाळेत घालताना दिसतात. हा प्रकार गेल्या चारपाच वर्षातला आहे. आय सी एस सी अभ्यासक्रम घासू मुलं तयार करतो. पाठांतरावर बराच भर असतो. मात्र इथून मधेच परदेशात जायचं असेल तर तिकडे सहज प्रवेश मिळतो. हा माझा अनुभव आहे. त्यांचे इंग्रजी उच्चार (व्याकरण नाही ) चांगले असतात. इतर वाचन भरपूर असते जे व्यवहारात कामाला येते. फार थोड्या चांगल्या शाळा प्रत्येक महानगरात असतील. पण प्रतिष्ठेपायी ही शाळा काढणाऱ्या भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो कारण या अभ्यासक्रमाचे शिक्षक मिळणे कठीण असते. ग्रामीण भागात एस एस सी ला पर्याय नाही. अत्यंत लहान गांवातल्या आणि अतिसामान्य मुलाना समोर ठेवून हा अभ्यासक्रम केला असल्याने त्यातून पुढे येणारी मुले उर्वरित प्रकारातल्या मुलांच्या मानाने मागे असल्यासारखी फक्त वाटतात. मात्र चांगल्या एस एस सी शाळेत कमालीची चमकदार मुलं असतात ! आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.

In reply to by खेडूत

सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही.
माझी बारावी ज्या वर्षी झाली त्याच्या एक वर्ष आधी मेडीकल सीईटी चालू झाली होती. मी ही दिली होती आणि बी ए एम एसला प्रवेश मिळत होता. माझा ओढा इंजिनीयरींगकडे असल्याने मी ती सीट घेतली नाही. इंजिनीयरींगची सीईटी पुढे एक दोन वर्षांनी सुरु झाली. समजा माझ्या वेळीही इंजिनीयरींगला सीईटी असती तर मी ती नक्कीच उत्तीर्ण झालो असतो.
सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात.
हा गोड गैरसमज आहे. बारावी नंतरच्या इंजिनीयरींग/मेडिकलच्या सीईटीला मुल शिकायला लागल्यापासून ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो. :) बाकी माहितीशी सहमत.
आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.
खरा मुद्दा हा आहे. तीन वर्षांच्या बाळाला शाळा असं काय शिकवतात की ज्यासाठी त्या साठ पासष्ठ हजार फी घेतात?

In reply to by आजानुकर्ण

मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्ड (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. एस.एस.सी. बोर्ड वाईट नाही हे मान्यं. पण जर तुम्ही अगदी आजचा एस.एस.सी. बोर्डचा अभ्यासक्रम आणि सी.बी.एस.सी. चा अभ्यासक्रम अशी तुलना केलीत तर तुम्हाला लगेचं समजेल का सी.बी.एस.सी. म्हणतोय ते. सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे. अश्या पद्धतीचा अभ्यासक्रम बाकी क्षेत्रात माहित नाही पण अभियांत्रिकीमधे तरी नक्की उपयोगी पडतो. हुच्च शिक्षणासाठी त्या त्या प्रवेश समित्या परसेंटाईल वापरुन समसमान गुण करतात आणि त्यानुसार आणि कास्ट वगैरे गृहित धरुन मिळतो त्यामुळे सी.बी.एस.सी. चा थेट फायदा होत नाही हे मान्य.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

SSC Board वाईट होते असे मुळीच नाही. पण आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे त्यात सुधारणा करून CBSE बनवले तर ते poreferable नाही का ? तुलना थोडी बादरायण आहे, पण मारुती 800 कार अजूनही चांगलीच आहेच पण म्हणून होंडा किंवा वोक्सवॅगन (परवडत असेल तर ) वापरणे नाकारावे का ?

In reply to by सस्नेह

ध्येय काय आहे? अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच. तद्वत - एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल, तर कोणतंही बोर्ड का असेना - काय फरक पडतो? आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.

In reply to by आदूबाळ

अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच.
वा वा ! प्रवास कसा झाला याला काहीच महत्व नाही का ?
एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल
कदाचित मार्क तितकेच पडतील आणि मुलाला/मुलीला त्याच कॉलेजात प्रवेश मिळेल. पण त्या मुलाच्या व्यक्तीमत्वात आणि ग्रहणक्षमतेत, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जो फरक पडेल, त्याला माझ्या दृष्टीने तरी फार महत्व आहे. शिक्षण हे त्याच्यासाठी रट्टा मारायची गोष्ट न राहता काहीतरी खरोखर शिकण्याची, करून दाखवायची गोष्ट होईल. शैक्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण तो डोळसपणे ‘जगायला’ शिकेल, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असेल.
आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.
पसंद अपनी अपनी.. माझ्या बाबतीत उत्तर 'हो' असे राहील. माझ्या मुलाला सातवीपासून SSC बोर्ड बदलून CBSE ला घातले आहे. आणि त्याचे खूप चांगले परिणाम (मार्क्स व्यतिरिक्त ) मिळाले आहेत ! *smile*

In reply to by सस्नेह

हा फार चांगला मुद्दा आहे... कृपया थोडा अधिक विस्तार करू शकाल का? मीही निर्णय घेणार आहे पुढील काही दिवसात...आणि आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतलेला दिसतो आहे. तेव्हा आपल्या इतकं चांगलं कोणी सांगु शकेल असं वाटत नाही?

In reply to by असंका

माझा मुलगा सहावीपर्यंत SSC बोर्ड शाळेत होता. तेव्हा पठडीबाहेरच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हता. कॉम्पुटर विषय होता पण फक्त पुस्तकात. प्रत्यक्ष हाताळायला पंधरा मिनिटे मिळे तेपण ग्रुपमध्ये. सहामाही परिक्षा होईपर्यंत त्याचे प्रॅक्टिकलच्या बॅचमधे नावच नव्हते आणि हाईट म्हणजे विषय-शिक्षिकेला याचा पत्ताच नव्हता ! हे सगळे पाहून मी सातवीला त्याला CBSE शाळेत घातले. फी थोडीशी जास्त म्हंजे वर्षाला ३५०००. यात युनिफॉर्म, नाष्टा, जेवण वह्या पुस्तके आणि ट्रान्स्पोर्ट हे सगळे आले. वेगळी ट्युशन बंद केली. फारच चांगले परिणाम सहाच महिन्यात दिसले. वर्षाअखेर मुलगा प्रत्येक विषयात स्वत:हून रस घेऊ लागला. मार्क्स तर सुधारलेच, जनरल अवेअरनेस पण सुधारला. कॉम्प्यूटर माझ्यापेक्षाही लीलया हाताळू लागला. तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे आणि

In reply to by सस्नेह

प्रतिसाद आवडला. विचारात पाडलंत... (दिल्ली दूर आहे अजून, पण उघडपणे दिसतंय की मला या विषयावर जास्त अभ्यास करायला पाहिजे.)

In reply to by सस्नेह

तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे
> अगदी हेच माझ्या मुलाला नाशिक च्या आनंदनिकेतन ह्या १००% मराठी शाळेत मिळत आहे. तेही फक्त रु.५,५०० वार्षिक. गणवेश, खाणे आणि ने-आण पालकांकडे. इतर कुठलाही छुपा खर्च नाही. आता माझा मुलगा बालवाडी २ मध्ये जाईल पण त्याची मागील दोन वर्षातली प्रगती अतिशय समाधानकारक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या इतर मुलांच्या तुलनेत माझ्या मुलाची शाळेत जायची इच्छा व उत्साह यात खूपच फरक दिसतो. पाहुण्यांसमोर उगाच इंग्रजीतल्या कविता म्हणून दाखवण्यापेक्षा त्याचा व्यवस्थितपणा, टापटीप आणि समजूतदारपणा मला महत्वाचा वाटत आलेला आहे. दहावीपर्यंतच्या मुलांचा एकंदर अंदाज घेतला असता मुले कुठेही बुजरी किंवा कालबाह्य वाटली नाहीत.त्यामुळे कुठलाही अभ्यासक्रम अथवा पद्धतीपेक्षा शाळेची गुणवत्ता फार महत्वाची आहे असे मला वाटते. शाळेची एकूण विचारधारा आणि शिक्षकवृंद ह्यांचा मुलांवर जास्त परिणाम होतो.

In reply to by सस्नेह

मी CBSE च्याच बाजुने आहे.. पण स्नेहाताई असं नाही का वाटत की तू जे मुद्दे मांडले आहेत ते शाळेशी निगडीत आहेत, अभ्यासक्रमाशी नाही...? SSC बोर्डाची पण अशाच जबाबदारीने मुलांना सांभाळणारी शाळा (मितानच्या मुलीची आहे तशी) असती तरी तुझ्या मुलात हाच फरक दिसल असता.. अर्थात CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम जास्त चांगला आहे ज्यानी मुलांना १०-१२ ला निश्चित फायदा होत असणार..

In reply to by पिलीयन रायडर

CBSE अभ्यासक्रमात या सर्व गोष्टीना मार्क्स असतात, त्यामुळे कंपल्सरी ऑब्झर्व्ह केल्या जातात. इतर शाळांमधे एखादीच शाळा हे सर्व ऑब्झर्व्ह करेल. CBSE मध्ये मुलांना त्यांचा कल पाहून डेव्हलप करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले आहे तसे SSC मध्ये नाही. SSC मार्क्स हे पूर्णत: मुलाच्या लिखित performance वरच अवलंबून असतात. तसेच CBSE अभ्यासक्रम SSC पेक्षा फार वेगळ्या पद्धतीवर आधारित आहे. इथे मुले उत्तरे लिहू शकतात का यापेक्षा त्यांना ते समजले आहे का यावर जास्त भर असतो. understanding हा कन्सेप्ट ssc बोर्डाच्या पुस्तकातच नाही. CBSE परीक्षापद्धतसुद्धा understandingवरच आधारित असते. पुस्तके पाहिली असता हे समजेल आणि CBSE बोर्डाच्या प्रश्नपेत्रिका पाहिल्यावर तर पूर्ण क्लिअर होईल. आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. आठवतील तशा लिहिते.

In reply to by सस्नेह

धन्यवाद... ही शाळा कोल्हापुरात तर नाही ना?

In reply to by आजानुकर्ण

माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
माझेही. स्पर्धा परीक्षांचा इतका बाऊ का करताहेत ते कळले नाही. फक्त इंजिनिअरिंगचा जरी विचार केला, तरी राज्यात शिकण्यासाठी लागणारी सीईटी ही एसेस्सीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. जेईईसारख्या परीक्षांचा विचार केला, तर त्या परीक्षा देणारा तसाही त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार असतोच, मग बोर्ड कुठले आहे त्याने कितीसा फरक पडतो! बाकी मराठी माध्यमाचा कोणी विचारही न करताना पाहून वाईट वाटले.

CBSE अभ्यासक्रम मुलाच्या पुढच्या शिक्षणाची तयारी चांगली करुन घेतो ,सायन्स आर्ट्स कॉमर्स कोणत्याही साइडला मुलं गेली तरी त्या विषयांबद्दल माहिती त्यांना पॉलिटिक्स्,इकॉनॉमिक्स्,सायन्स च्या त्या अनुषंगाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाने मिळते.जे मला एसेस्सी मध्ये नाही आढळ्ले. हल्लीच्या एन्ट्रन्स टेस्ट सिबिएस्सी च्या अभ्यासक्रमानुसार होतात.त्यामुळेही सुरुवातीपासून हा अभ्यासक्रम असणे सोयीचे पडते. सर्व नॅशनल लेव्हल परिक्षांसाठी हाच अभ्यासक्रम लागतो. मी स्वतः एसेस्सीबोर्डात शिकले आहे.पण डेंटल कॉलेजला गेल्यावर आमच्यातला आणि त्यावेळी दिल्ली बोर्ड म्हणायचे यांच्या कॉन्सेप्ट समजण्यातला फरक लक्षात आला.माझ्या बोर्डात ज्या विषयांची तोंडओळख होती त्याची व्यवस्थित समज आणि उमज त्या मुलांना होती.अजुनही हा मुख्य फरक किंवा मर्यादा एसएससी बोर्डात आहे. मात्र चांगले अनुभवी शिक्षक असणारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष देउ शकणारी शाळा जर एसएससी बोर्डाची आहे तर नाकारू नयेच.

सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे -> ह्या शिक्षण पद्धतीमुळे मुले स्वतःच विचार करायला लागतात आणि कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करूनच निर्णय घेण्याची सवय लागते. आमच्या निकटवर्तीय आय. आय. टी प्राध्यापकांचे असे मत आहे की, सी.बि.एस.ई. चे विद्यार्थी विषयाचा गाभा/मूळ संकल्पना माहित असल्यामुळे नवीन /प्रगत कल्पना फार लवकर आत्मसात करतात आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य ह्या विद्यार्थ्यांमधे तुलनेने जास्त असते (हे मत माझे स्वतःचे नाही, आणि ह्याद्वारे इतर अभ्यासक्रमांचा वा विद्यार्थांच्या उणीवा दाखवण्याचा हेतू नाही. )

ह्याच विषयाचा गेले तीन महिने सतत विचार करून डोक्याचा पार भुगा झाल्यावर गेल्याच आठवडयात मुलीकरता एस.एस.सी. बोर्ड शाळेत प्रवेश घेतला आहे कारण नर्सरी करता १ लाख ४० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी १०% फी वाढ हे गणित आम्हाला तरी जमणारे नाही (भविष्यातील सर्वच गोष्टींचा विचार करून). सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई., आय. बी., सी. आय. ई. सर्वांचीच फी लाख-दीड लाखाच्या आसपासच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही हो.माझ्या मुलाची cbse ची नामवंत शाळा असूनही त्याची दहाविची वार्षिक फी ट्रान्सपोर्टसह तीस हजार पण नाही.दिड हजाराची पुस्तकं.ती शाळेतच मिळतात.बाहेर नाही. मोठ्या शहरांत ही लूटमार चालत असावी.

In reply to by अजया

हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी धुमाकुळ घातलाय ना. त्यामधे आहेत एवढ्या फिया. भाचीच्या अ‍ॅडमिशनसाठी सहज हा इंटरनॅशल प्रकार काय आहे हे पहायला गेलेलो. कपाळावर (माझ्याचं) हात मारुन घेतला. कोप्रापासुन नमस्कार केला आणि घरी आलो. ए.सी. क्लासरुम कशाला पाहिजे पिंपरी-चिंचवडमधे? मुंबई वगैरे दमट ठिकाणी ठिक आहे. म्हणे आम्ही इंटरनॅशनल पद्धतीनी मॅनर्स आणि एटीकेट्स वगैरे शिकवतो म्हणे. शाळेचे गुर्जी-गुर्जीणी कधी इंटरनॅशनल सोडा कधी महाराष्ट्राबाहेर गेले असतील का नाही ही शंका. त्या गुर्जीणीला गेल्या गेल्या गुडमॉर्निंग घातला तर साधं हसली सुद्धा नाही, परतफेड सोडा. जाताना शिस्तीत मराठीत धन्यवाद म्हणुन बाहेर आलो.

In reply to by वैदेही बेलवलकर

एका मुलाची फी १ लाख ४० हजार? वर्गात ५० मुले पकडली तर फक्त एका वर्गाचे उत्पन्न ७० लाख. मैदानेही नसलेल्या या शाळा असं नक्की काय शिकवतात. बहुतेक शिक्षक तर शिक्षण सेवक व तत्सम प्रकल्पाखाली तासिका बेसिसवर पाचदहा हजार रुपड्यांवर नोकऱ्या करतात.

In reply to by आजानुकर्ण

मला वाटतं फी चा आणि CBSE pattern चा काही संबंध नसावा. एसेस्सीच्या काही शाळांच्या फीज आणि डोनेशन्स लाखावर असलेल्या माहिती आहेत. झी स्कूल सीरिजच्या शाळा देशभरात वाजवी फीमधे चांगले शिक्षण देताहेत. उद्या लिंक शोधून देते.

In reply to by सस्नेह

तुझे एक एक प्रतिसाद वाचुन अजुनच त्रास होतोय.. कारण एकतर चांगली CBSE शाळा जवळ नाही. आणि ज्या आह्ते त्या खरच भिकार आहेत ग.. तू म्हणतेस त्या पद्धतीने अजिबात काहि होत नसणार तिथे.. स्टाफच तेवढा "महान" आहे... आता कसं व्हावं आमचं?

In reply to by पिलीयन रायडर

अगं पुण्यात बाणेरला एक शाळा आहे असं ऐकलय. नक्की माहिती घेऊन व्यनि करते तुला दोन दिवसात.

मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन.

In reply to by टवाळ कार्टा

मलाहि हेच वाटलं होतं.. की तुम्हाला अनाहितामध्ये यायचय.. तुम्ही तसा प्रतिसादही कुठे तरी दिला होतात...

In reply to by पदम

मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी+कन्नड मिडियम) मधुन शिकलोय. आणी तेही फुक्कट सातवीपर्यन्त त्यानन्तर १४० रू.वार्षीक फी भरुन खाजगि शालेतुन. (चला.. त्या निमित्ताने मी SSLC पास आहे हे सांगून घेतो.) ;)