मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एस. एस. सी., सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई.

वारा · · जनातलं, मनातलं
पिल्लु ला शाळेत अ‍ॅड्मिशन घेतोय. पण सध्या असलेल्या बर्याच ऑप्शन मधे कन्फ्युज झालोय. १) एस. एस. सी - ट्रेडीशनल अभ्यासक्रम, स्वतः शिकल्यामुळे पुर्ण माहीती आहे. फायदे - ट्युशन आहेत , पुस्तके महीतीतील, गाईड मिळतात, प्रश्नसंच मिळतात, मराठी मिडीयम फी कमी. तोटे - स्पर्धा परीक्षा साठी पुरेसा अभ्यासक्रम नाही, महाराष्ट्राबाहेर अभ्यासक्रम नाही, ईंग्लीश मिडीयम फी जास्त. अ‍ॅड्मीशन प्रोसेस लॉटरी पद्धतीने , कमी जागा विद्यार्थी जास्त. २) सी. बी. एस. ई - दिल्ली बोर्ड , माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम , भारतभर सर्व मोठ्या शहरात शाळा. तोटे - टुशन मिळत नाहीत, फी जास्त, पुर्ण हिंदी व ईंग्रजी अभ्यासक्रम मराठी विषय नाही, ऑब्जेक्टीव्ह पेपर असतात(एकीव माहीती). ३) आय. सी. एस. ई. - दिल्ली बेस्ड नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था, पण ईंटर्नॅशनल रेक्ग्नेशन्. शिकवायची पद्धत वेगळी. माहीतीतील जवळपास कोणी नाही. फायदे - स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम, ईंग्लीश विषय(समजणे) चांगला केला जातो. फी वरील दोहोंच्या मधे. तोटे - नॉन ग्व्हर्न्मेंट संस्था त्यामुळे भविश्यातील नुकसान माहीत नाही. आजकाल बरेच लोक (६० ते ८० टक्के %) सि. बी. एस. ई. कडे पळतायत, कारण माहीत नाही. क्रुपया तज्ञांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद ईन अ‍ॅडव्हान्स. अवांतर : अभ्यासक्रम तपासतोय पण बरच वेळखाउ काम आहे. सि.बी. एस. ई. ला ९वी मधेच ११वीच गणीत दिसतय.

वाचने 41683 वाचनखूण प्रतिक्रिया 120

माझ्या जिव्हाळ्याच्या विषयावर धागा.. हीच माहिती सध्या मी सुद्धा शोधत आहे. SSC - मला हा अभ्यासक्रम पुरेसा वाटत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी खरं तर CBSE हवा. पण मुळात आपला मुलगा डॉक्टर / इंजिनिअरच बनेल ह्याची काय खात्री? समजा सेफ साईड तसं धरलं तरी तो अभ्यास आपणही घरी करुन घेऊ शकतो असं मला वाटतय. मला कितीही इच्छा असली तरी चांगली CBSE जवळपास न सापडल्याने मी ह्या पर्यायाचा विचार करतेय. शिवाय माझ्या घराजवळ जुन्या प्रसिद्ध अनेक SSC च्या शाळा आहेत. शाळा घराजवळ असणे हा मुद्दा अत्यंत मह्त्वाचा असल्याने मी त्या शाळांचा विचार करतेय. ह्यांच्याही फीस तोडीस तोड आहेत. ICSE - हे ऐकायला छान वाटतं.. पण मला स्वतःला अजुन ह्या ब्यासक्रामातुन पास आउट झालेलं कुणीही माहिती नाही. त्यामुळे ह्या अभ्यासक्रामातुन बाहेर पडून सामान्य मुलां सोबत बारावी - ग्रॅजुएशन केलं तर नक्की त्याचे फायदे तोटे काय हे मला माहिती नाहीत. ह्या अभ्यासक्रामात खुप सार्‍या माहितीपेक्षा प्रॅक्टिकलवर भर दिल्या जातो. अनेक विषय असतात (सहावीलाच म्हणे १२-१३ विषय असतात).. काही पालक म्हणतात की आजकालची मुलं जास्त हुषार आहेत.. त्यांच्या बुद्धिला एवढं खाद्य लागतंच.. ह्या शाळांच्या फीस पण भरपुर आहेत. मायबोलीवर ह्यावर पुष्कळ चर्चा झाल्याचं आठवतय पण दोन दिवस झाले मलाही लिंक सापडलेली नाही. तिथे कुणी तरी ह्या ३ अभ्यासक्रमांवर सविस्तर लिहिलं होतं. तोवर ही एक लिंक पहा - http://www.thinkvidya.com/a/cbse-vs-icse-the-pros-and-cons-of-each-educational-board

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

In reply to by पिलीयन रायडर

सर्वोत्तम शिक्षण हे मातृ भाषेतुनच असते. आपल्या मुलाला मराठी माध्यामाच्या शाळेत घाला आणी रोज थोडा वेळ देऊन त्याला ईतर गोष्टी शिकवा. नुसता मुलाला वेळ दिला तरी पुष़्अळ आहे. एसेस्सीलाच टाका तेही मराट्।ई माध्यमातुन. मी अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेते नोकरीसाठी त्यातुन मला असे आढळले नाही अश्या अभ्यासक्रामामुळे लोक जास्त चांगले होतात. उत्तम आई वडील असले तरच मुलं चांगली होतात.

hitesh 12/01/2015 - 14:25
इंग्लिश मेडियम स्टेट किंवा फार्फार तर कॉन्वेंट फायनल केले आहे

सी.बी.एस.सी. चा विचार करा. एस.एस.सी. पॅटर्न बर्‍यापैकी औटडेटेड झालाय. १० वी-१२वी नंतर स्पर्धेमधे टिकायचं असेल तर अपडेटेड ज्ञान असणं आवश्यक आहे. आय.सी.ए.सी विषयी फार माहिती नाही त्यामुळे बोलतं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

SSC मध्ये गणित विज्ञानाचा काहितरी घोळ घातलाय म्हणे... पुस्तक बदलली आहेत की २ -२ पुस्तकं केली आहेत (म्हणजे NCRTE ची सुद्धा आणली आहेत) असं काय काय ऐकायला मिळतय... कुणाला काही माहिती आहे का?

In reply to by पिलीयन रायडर

हो गणिताचे आमच्या वेळी होतं तसं गणित आणि सामान्य गणित असे दोन इलेक्टिव्ह्ज ठेवलेत. ज्यांना पुढे करिअर मधे मॅथेमॅटिक्स अ‍ॅप्टीट्युडची विशेष आवश्यकता नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. खरं तर वेडेपणाचा निर्णय आहे. आर्टस, कॉमर्स आणि सायन्स तिन्हीचा ह्या ना त्या प्रकारानी गणोबाशी संबंध येतोचं. काठिण्य पातळी आणि वापरामधे फरक असु शकतो. पण त्याला सामान्य गणित ही पळवाट अयोग्य आहे. दहावी मधे सामान्य गणित घेतलेला विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी पदविका आणि पदवीकडे वळु शकत नाही.

रायनची आई 12/01/2015 - 16:42
आमच्या कडे गेल्या वर्षी माझ्या मुलाच्या एड्मिशन च्या वेळी हेच प्रश्न पडले होते..आमचा पहिला प्रेफरेन्स शाळा जवळ असण्याला होता..आणि आमच्या घराजवळ सगळ्या शाळा एस. एस. सी. बोर्ड च्याच आहेत..म्हणून आम्ही सगळा विचार करून त्याला घराजवळच्याच एका चांगल्या शाळेत त्याला घातल..अभ्यास तर काय आपण घरी पण करून घेऊ शकतो, आणि नंतर कॉलेज सगळ्यांची एकच असणार आहेत..

सस्नेह 12/01/2015 - 16:50
CBSE बेस्ट ! पण खात्री करून घ्या की शाळेमध्ये फक्त CBSE अभ्यासक्रमच नाही तर टोटल CBSE Curriculum घेतला जातो. कारण CBSE बोर्डाची परीक्षा म्हणजे स्पेशल स्किल्स, अवेअरनेस, जनरल इंटरप्रिटेशन आणि बरंच काही असतं. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास सहजपणे होतो. ट्युशन मिळत नसेल तर एस. चांद यांची रेफरन्स बुक्स घ्या आणि स्वत: वाचून शिकवा मुलांना. तुम्हाला वाचायलासुद्धा इंटरेस्ट वाटेल. पुस्तकांच्या किमतीपण भरपूर आहेत.

अजया 12/01/2015 - 17:06
माझा मुलगा ज्यु केजी ते दहावी सीबीएसईमध्ये शिकला आहे.सुरुवातीपासुन घेतल्यास सिबिएसई चांगला पर्याय आहे.एकतर विचारपूर्वक तयार केलेला अभ्यासक्रम,मनाला येईल ते मंत्री नियम काढणार बदलणार असे काही फारसे नाही.मराठीचा पर्याय माझ्या मुलाने आठवीपर्यंत वापरला.नववी दहावी दोनच भाषा आहेत.त्यामुळे हिंदी द्वितीय भाषा घेतली आहे.मात्र सिबिएसई शाळेला त्यात प्रशिक्षित अनुभवी शिक्षकवर्ग हवा.नवशिक्या शिक्षकांचे ते काम नाही. आॅब्जेक्टिव्ह पेपर नसतात.पेपरातला काही भाग जास्त पर्यायातला एक निवडा असा असतो. मराठी पर्याय महाराष्ट्रातल्या शाळेत तर मिळतोच .बहारिनच्या सिबिएसई शाळेत पण होता. दहावीपर्यंत ग्रेड पध्दत आहे.दहावीचा रिझल्ट एकत्रित ग्रेड पाॅइंट अॅवरेज असा दहापैकी गुण मिळतो. टप्प्याटप्प्याने अभ्यासाची तीव्रता वाढत जाते.त्याची सवय हळूहळू मुलाना होत जाते.त्याप्रमाणेच अगदी तिसरीपासुनचे पेपर पॅटर्न्स असतात. मुलांना रोज अभ्यास फक्त टेक्स्टबुकमधुन केलेला पुरतो.आपण लक्ष घालणे जरुरी आहे.ट्युशनची आवश्यकता आम्हाला फक्त दहावीच्या गणिताला लागली.रोज अभ्यास करण्याला पर्याय नाही.फक्त शाळेवर अवलंबुन राहणेही नाही चालु शकत.मी बरेच पालक शाळेला,अभ्यासक्रमाला मुलांच्या अपयशाचे कारण मानताना पाहिले आहे.पण ते सोयिस्कर स्वतःच्या असहभागाबद्दल बोलत नाहीत. ५०%शाळेचा आणि तेवढाच पालकांचा सहभाग हवा. शाळेत एका वर्गात ४० मुलं आणि तुमचा एकच तुमच्यासमोर.मुलांना काय येतं येत नाही का येत नाही हे सर्व आपण जाणून घेऊ शकतो. अकरावी बारावी देखिल आम्ही सिबिएसईलाच कंटिन्यु करणार आहोत.इतका आम्हाला हा अभ्यासक्रम आवडतो! आम्ही म्हणजे आम्ही आणि आमचा मुलगा!नुसते आम्ही नाही!!

In reply to by अजया

म्हणुनच मला CBSE हवं होतं.. पण जवळ २-३ च शाळा आहेत. पैकी २ भिकार आहेत. (त्या चक्क अपार्ट्मेंट टाईप एका बिल्डिंगच्या शाळा आहेत.. आणि त्यांना मैदानच नाही... मैदान नसलेली शाळा अजिबात नको...) आणि १ उरते ती भयानक महाग आहे. १ लाख फीस मी ३ वर्षाच्या मुलासाठी भरु शकत नाही. (१० वीला मी काय फीस भरत असेन ह्या विचारानेच मला फेफरं आलं..) आता पर्याय फक्त २ च आहेत.. SSC and ICSE... तर ICSE बद्दल थोडी माहिती कुणी देऊ शकेल का?

In reply to by काळा पहाड

खेडूत 12/01/2015 - 21:22
बहुधा नाही. त्यांची साठ हजारच्या आसपास आहे., त्यात फी शिवाय न्याहारी जेवण व संध्याकाळचे दूध पण देतात . घरचा डबा नेण्यास मुभा नाही

In reply to by खेडूत

मिलेनियमच.. आम्ही चौकशी केली तेव्हा "या वर्षी ७९ हजार आहे.. १०% वाढेल असं धरुन चाला" असं म्हणाले. त्यांचे फोर्म्स जस्ट ५-६ जानेवारीला भरायचे होते, काही कारणाने तेव्हा नाही भरता आले, त्यामुळे नक्की फीस किती आहे ते कळाले नाही. मला इतक्या लहान मुलांना शाळेनी जेवण देणं आवडत नाही. माझ्या मुलाला मी जितकं उत्तम करुन देऊ शकते ते कुणीच १००-२०० मुलांच एकदम जेवण बनवणारा आचारी देऊ शकत नाही. दुसरं असं की त्या शाळेत मुल असणारे पालक भेटले, त्यांनी सुद्धा अशीच ८०-९० हजार फिस सांगितली आणि शिवाय "फाटक सर गेल्यापासुन पुर्वी सारखं वातावरण राहिलं नाही" असंही म्हणाले. तिसरा मुद्दा असा की बुकलेस शाळा आहे. त्यामुळे घरी मुलं काही होमवर्क वगैरे करत नाहीत, अनेक पालकांना अशावेळी नक्की मुलाला काय कळतय काय नाही हे समजत नाही. अशा अनेक आक्षेपांमुळे लाखभर फीस भरायचे धाडस माझ्यात तरी नाही..

In reply to by पिलीयन रायडर

आजानुकर्ण 12/01/2015 - 21:30
होमवर्क नसतो. मग परीक्षा असतात का? हल्ली १०वीपर्यंत परीक्षा नसतात असं ऐकलंय. मग मुलाला शिकवलेलं समजतंय की नाही हे कसं कळतं?

In reply to by आजानुकर्ण

प्रत्येक आठवड्याच्या शीट्स असतात. त्यावरुन काय ते समजुन घ्या आणि करुन घ्या मुलाचा अभ्यास... परीक्षांचं माहिती नाही. पण मुलाला कळतय की नाही ह्याचा आई वडीलांना अंदाज येत नाही हे २-३ जणांनी सांगितलं...

In reply to by पिलीयन रायडर

खेडूत 12/01/2015 - 22:21
आमचं इथे पाहिलंच वर्ष चाललंय. सध्या तरी ठीक-ठीक . परीक्षा यथातथाच असतात. आपण भरपूर वेळ द्यावा लागतो. वर्षाच्या अधेमधे भारतात परतल्यामुळे जी मिळेल ती शाळा घेणे भाग होते. पण पूर्वी अनेक वाईट शाळा पाहिल्यात त्या तुलनेत ही ओक्के वाटते . प्रत्येक शाळेत काहीतरी उणीवा आहेतच. शाळेतले जेवण आम्हालाही पटत नाही पण ते बिल्ट-इन फीचर आहे ! :( पुढे बाहेर रहायची वेळ येईल तेव्हां अशी सवय असल्याने जड जाणार नाही अशी समजूत करून घेणारे पालक पाहिलेत.

अजयाशी सहमत! त्यातल्या त्यात CBSE चा अभ्यासक्रम उत्तम, पण अर्थातच पालकांची पाल्याबरोबर त्यात्या इयत्तेचा अभ्यास करण्याची तयारी हवी. यात जबरदस्तीने करावं लागण्यापेक्षा त्यांनाही (म्हणजे पालकांना) आनंद वाटायला हवा. थोड्या अवांतराबद्दल क्षमस्व - CBSE ची 9 वी आणि 10 वीची Democratic Politics ची पुस्तके सर्वानीच जरूर वाचावीत अशी आहेत.

माझा मुलगा सीबीएसइ मधे शिकतोय. पण त्याच्या शिक्षकांवर त्याचा परफॉर्म्स ठरतोय. अनुभवी शिक्षक नसल्यामुळे त्याची जरा गोची होत आहे. मुळात त्या शिक्षिकेलाचा सीबीएसइ चा अभ्यासक्रम अजून नीट समजलेला नाही. मुलाला गणिताची ट्युशन लावली तो पर्यंत बरं चाललं होतं. ट्युशनवाला शिक्षकही कुठे तरी निघुन गेला याचं गणित पुन्हा खालावलं. मी त्या म्याथवाल्या शिक्षिकेला भेटलोय, आमचं ऐकुन घ्यायच्या ऐवजी तिचच सुरु असतं आम्ही कशी विद्यार्थ्यांची काळजी घेतो, अभ्यासक्रम तसा टफच असतो पण मुलांचा परफॉर्म्स आता सुधारु लागला आहे, मी व्यक्तिगत लक्ष घालते असं म्हणुन ती माझी बोळवण करते आहे, मला माझ्या गावी तीच एक शाळा बरी असल्यामुळे काही दुसरा पर्याय नाही. -दिलीप बिरुटे

आजानुकर्ण 12/01/2015 - 21:25
आयला बरंच अवघड झालंय... जास्त पर्याय असल्याने फायदा होतो की नुकसान असा प्रश्न पडतो. एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले. माझे एकदोन चुलत नातेवाईक सीबीएससी बोर्डातले आहेत. सीबीएससी बोर्डाचा नोकरी/पुढील शिक्षणात प्रवेश वगैरे मिळवताना विशेष फायदा होत असल्याचे ऐकले नाही. नक्की काय परिस्थिती आहे?

In reply to by आजानुकर्ण

सतिश गावडे 12/01/2015 - 21:43
एसएससी बोर्डाच्या शिक्षणाची नक्की काय मर्यादा आहे बॉ? माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
अगदी हेच म्हणायचं आहे.

In reply to by खटपट्या

नाखु 13/01/2015 - 15:20
माझा ल्येक एस्.एस्.सी. वाले त्याने काही मोठा फरक जाणवेल काय? कारण मी घरापासून फक्त ५ मिनिटाचे अंतरावरील (जाहीरातीप्रमाणे नाही खरोखर चालत) शाळेत पुढे खेळायला/अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून दाखल केले आहे लेक आणि लेकीला. जाणकारांनी जरा इकडे प्रकाश टाकावा.

In reply to by आजानुकर्ण

खेडूत 12/01/2015 - 22:51
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही. सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात. याला सरकारी कारण म्हणजे विविध कर्मचारी नोकरीनिमित्य गावं बदलत असल्याने त्यांची मुलं सी बी एस ई / केंद्रीय शाळेत असतात. त्यासाठी सरकारी बाबुनीच हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे भविष्यातल्या सुविधेसाठी अनेक पालक इतर शाळातून काढून पाल्याला सी बी एस ई शाळेत घालताना दिसतात. हा प्रकार गेल्या चारपाच वर्षातला आहे. आय सी एस सी अभ्यासक्रम घासू मुलं तयार करतो. पाठांतरावर बराच भर असतो. मात्र इथून मधेच परदेशात जायचं असेल तर तिकडे सहज प्रवेश मिळतो. हा माझा अनुभव आहे. त्यांचे इंग्रजी उच्चार (व्याकरण नाही ) चांगले असतात. इतर वाचन भरपूर असते जे व्यवहारात कामाला येते. फार थोड्या चांगल्या शाळा प्रत्येक महानगरात असतील. पण प्रतिष्ठेपायी ही शाळा काढणाऱ्या भल्याभल्यांच्या तोंडाला फेस येतो कारण या अभ्यासक्रमाचे शिक्षक मिळणे कठीण असते. ग्रामीण भागात एस एस सी ला पर्याय नाही. अत्यंत लहान गांवातल्या आणि अतिसामान्य मुलाना समोर ठेवून हा अभ्यासक्रम केला असल्याने त्यातून पुढे येणारी मुले उर्वरित प्रकारातल्या मुलांच्या मानाने मागे असल्यासारखी फक्त वाटतात. मात्र चांगल्या एस एस सी शाळेत कमालीची चमकदार मुलं असतात ! आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.

In reply to by खेडूत

सतिश गावडे 12/01/2015 - 23:25
सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश चाचण्या सुरु झाल्यात. ज्या पूर्वी नसल्याने आपल्याला काही फरक पडला नाही.
माझी बारावी ज्या वर्षी झाली त्याच्या एक वर्ष आधी मेडीकल सीईटी चालू झाली होती. मी ही दिली होती आणि बी ए एम एसला प्रवेश मिळत होता. माझा ओढा इंजिनीयरींगकडे असल्याने मी ती सीट घेतली नाही. इंजिनीयरींगची सीईटी पुढे एक दोन वर्षांनी सुरु झाली. समजा माझ्या वेळीही इंजिनीयरींगला सीईटी असती तर मी ती नक्कीच उत्तीर्ण झालो असतो.
सी ई टी चे पेपर्स 'सी बी एस ई ' अभ्यासक्रमाच्या आधारे काढले जातात.
हा गोड गैरसमज आहे. बारावी नंतरच्या इंजिनीयरींग/मेडिकलच्या सीईटीला मुल शिकायला लागल्यापासून ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो. :) बाकी माहितीशी सहमत.
आपल्या पाल्याने काय करावे हे नर्सरीतच ठरवणाऱ्या पालकांना, मुलाना कुठच्याही अभ्यास क्रमात घातले तरी असुरक्षित वाटत रहाते.
खरा मुद्दा हा आहे. तीन वर्षांच्या बाळाला शाळा असं काय शिकवतात की ज्यासाठी त्या साठ पासष्ठ हजार फी घेतात?

In reply to by आजानुकर्ण

मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्ड (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. एस.एस.सी. बोर्ड वाईट नाही हे मान्यं. पण जर तुम्ही अगदी आजचा एस.एस.सी. बोर्डचा अभ्यासक्रम आणि सी.बी.एस.सी. चा अभ्यासक्रम अशी तुलना केलीत तर तुम्हाला लगेचं समजेल का सी.बी.एस.सी. म्हणतोय ते. सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे. अश्या पद्धतीचा अभ्यासक्रम बाकी क्षेत्रात माहित नाही पण अभियांत्रिकीमधे तरी नक्की उपयोगी पडतो. हुच्च शिक्षणासाठी त्या त्या प्रवेश समित्या परसेंटाईल वापरुन समसमान गुण करतात आणि त्यानुसार आणि कास्ट वगैरे गृहित धरुन मिळतो त्यामुळे सी.बी.एस.सी. चा थेट फायदा होत नाही हे मान्य.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सस्नेह 13/01/2015 - 12:19
SSC Board वाईट होते असे मुळीच नाही. पण आधुनिक काळाच्या गरजेप्रमाणे त्यात सुधारणा करून CBSE बनवले तर ते poreferable नाही का ? तुलना थोडी बादरायण आहे, पण मारुती 800 कार अजूनही चांगलीच आहेच पण म्हणून होंडा किंवा वोक्सवॅगन (परवडत असेल तर ) वापरणे नाकारावे का ?

In reply to by सस्नेह

आदूबाळ 13/01/2015 - 15:22
ध्येय काय आहे? अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच. तद्वत - एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल, तर कोणतंही बोर्ड का असेना - काय फरक पडतो? आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.

In reply to by आदूबाळ

सस्नेह 13/01/2015 - 16:59
अ ठिकाणाहून ब ठिकाणी जाणं हे ध्येय असेल, तर मारूती ८०० वापरली काय आणि होंडा सिटी वापरली काय, सारखंच.
वा वा ! प्रवास कसा झाला याला काहीच महत्व नाही का ?
एका विशिष्ट पातळीचं शिक्षण बारावीपर्यंत होणे हे ध्येय असेल
कदाचित मार्क तितकेच पडतील आणि मुलाला/मुलीला त्याच कॉलेजात प्रवेश मिळेल. पण त्या मुलाच्या व्यक्तीमत्वात आणि ग्रहणक्षमतेत, जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जो फरक पडेल, त्याला माझ्या दृष्टीने तरी फार महत्व आहे. शिक्षण हे त्याच्यासाठी रट्टा मारायची गोष्ट न राहता काहीतरी खरोखर शिकण्याची, करून दाखवायची गोष्ट होईल. शैक्षणिक जीवनातला प्रत्येक क्षण तो डोळसपणे ‘जगायला’ शिकेल, हीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट असेल.
आज सीबीएसई भारी आहे (असं सगळ्या प्रतिसादांवरून वाटतं आहे). त्याप्रमाणे पाल्याला सीबीएसई शाळेत घातलं. उद्या काही जास्त भारी निघालं, तर आपण शाळा/बोर्ड बदलणार आहोत का? माझ्याबाबतीत तरी उत्तर नाही असं आहे.
पसंद अपनी अपनी.. माझ्या बाबतीत उत्तर 'हो' असे राहील. माझ्या मुलाला सातवीपासून SSC बोर्ड बदलून CBSE ला घातले आहे. आणि त्याचे खूप चांगले परिणाम (मार्क्स व्यतिरिक्त ) मिळाले आहेत ! *smile*

In reply to by सस्नेह

असंका 13/01/2015 - 17:21
हा फार चांगला मुद्दा आहे... कृपया थोडा अधिक विस्तार करू शकाल का? मीही निर्णय घेणार आहे पुढील काही दिवसात...आणि आपण दोन्ही प्रकारचा अनुभव घेतलेला दिसतो आहे. तेव्हा आपल्या इतकं चांगलं कोणी सांगु शकेल असं वाटत नाही?

In reply to by असंका

सस्नेह 13/01/2015 - 17:41
माझा मुलगा सहावीपर्यंत SSC बोर्ड शाळेत होता. तेव्हा पठडीबाहेरच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हता. कॉम्पुटर विषय होता पण फक्त पुस्तकात. प्रत्यक्ष हाताळायला पंधरा मिनिटे मिळे तेपण ग्रुपमध्ये. सहामाही परिक्षा होईपर्यंत त्याचे प्रॅक्टिकलच्या बॅचमधे नावच नव्हते आणि हाईट म्हणजे विषय-शिक्षिकेला याचा पत्ताच नव्हता ! हे सगळे पाहून मी सातवीला त्याला CBSE शाळेत घातले. फी थोडीशी जास्त म्हंजे वर्षाला ३५०००. यात युनिफॉर्म, नाष्टा, जेवण वह्या पुस्तके आणि ट्रान्स्पोर्ट हे सगळे आले. वेगळी ट्युशन बंद केली. फारच चांगले परिणाम सहाच महिन्यात दिसले. वर्षाअखेर मुलगा प्रत्येक विषयात स्वत:हून रस घेऊ लागला. मार्क्स तर सुधारलेच, जनरल अवेअरनेस पण सुधारला. कॉम्प्यूटर माझ्यापेक्षाही लीलया हाताळू लागला. तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे आणि

In reply to by सस्नेह

संदीप डांगे 13/01/2015 - 21:25
तिथे त्यांना रोज एक न्यूज स्वत: सर्वांपुढे सांगावी लागे. वर्गातले लाईट, पंखे इ. बाहेर जाताना बंद करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्याची. लहान इयात्तेतल्या मुलांना सांभाळून लाईन करून ग्राउंडवर नेणे, आणणे , त्यांच्याकडून बागकाम इ. करून घेणे आणि त्यांना शिकवणे अशा अनेक गोष्टी जबाबदारी सोपवून करून घेतल्या जात. महिन्यातून एक दिवस स्पेशल स्कील असणारे पालक शाळेत जाऊन एखादा तास मुलांना ते शिकवत. खूपच विधायक शिक्षणपद्धत अनुभवायला मिळाली. पुन्हा मार्क्स हे केवळ लिखाणावर अवलंबून नसता एकूण परफॉर्मन्स आणि सुसंस्कृतपणा यावर अवलंबून असत. पूर्वी शाय असणारा मुलगा आता खूपच कॉन्फिडंट झाला आहे
> अगदी हेच माझ्या मुलाला नाशिक च्या आनंदनिकेतन ह्या १००% मराठी शाळेत मिळत आहे. तेही फक्त रु.५,५०० वार्षिक. गणवेश, खाणे आणि ने-आण पालकांकडे. इतर कुठलाही छुपा खर्च नाही. आता माझा मुलगा बालवाडी २ मध्ये जाईल पण त्याची मागील दोन वर्षातली प्रगती अतिशय समाधानकारक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या इतर मुलांच्या तुलनेत माझ्या मुलाची शाळेत जायची इच्छा व उत्साह यात खूपच फरक दिसतो. पाहुण्यांसमोर उगाच इंग्रजीतल्या कविता म्हणून दाखवण्यापेक्षा त्याचा व्यवस्थितपणा, टापटीप आणि समजूतदारपणा मला महत्वाचा वाटत आलेला आहे. दहावीपर्यंतच्या मुलांचा एकंदर अंदाज घेतला असता मुले कुठेही बुजरी किंवा कालबाह्य वाटली नाहीत.त्यामुळे कुठलाही अभ्यासक्रम अथवा पद्धतीपेक्षा शाळेची गुणवत्ता फार महत्वाची आहे असे मला वाटते. शाळेची एकूण विचारधारा आणि शिक्षकवृंद ह्यांचा मुलांवर जास्त परिणाम होतो.

In reply to by सस्नेह

मी CBSE च्याच बाजुने आहे.. पण स्नेहाताई असं नाही का वाटत की तू जे मुद्दे मांडले आहेत ते शाळेशी निगडीत आहेत, अभ्यासक्रमाशी नाही...? SSC बोर्डाची पण अशाच जबाबदारीने मुलांना सांभाळणारी शाळा (मितानच्या मुलीची आहे तशी) असती तरी तुझ्या मुलात हाच फरक दिसल असता.. अर्थात CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम जास्त चांगला आहे ज्यानी मुलांना १०-१२ ला निश्चित फायदा होत असणार..

In reply to by पिलीयन रायडर

सस्नेह 14/01/2015 - 11:03
CBSE अभ्यासक्रमात या सर्व गोष्टीना मार्क्स असतात, त्यामुळे कंपल्सरी ऑब्झर्व्ह केल्या जातात. इतर शाळांमधे एखादीच शाळा हे सर्व ऑब्झर्व्ह करेल. CBSE मध्ये मुलांना त्यांचा कल पाहून डेव्हलप करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले आहे तसे SSC मध्ये नाही. SSC मार्क्स हे पूर्णत: मुलाच्या लिखित performance वरच अवलंबून असतात. तसेच CBSE अभ्यासक्रम SSC पेक्षा फार वेगळ्या पद्धतीवर आधारित आहे. इथे मुले उत्तरे लिहू शकतात का यापेक्षा त्यांना ते समजले आहे का यावर जास्त भर असतो. understanding हा कन्सेप्ट ssc बोर्डाच्या पुस्तकातच नाही. CBSE परीक्षापद्धतसुद्धा understandingवरच आधारित असते. पुस्तके पाहिली असता हे समजेल आणि CBSE बोर्डाच्या प्रश्नपेत्रिका पाहिल्यावर तर पूर्ण क्लिअर होईल. आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत. आठवतील तशा लिहिते.

In reply to by आजानुकर्ण

मिहिर 12/01/2015 - 23:37
माझे शिक्षण एसएससी बोर्डात झाले.
माझेही. स्पर्धा परीक्षांचा इतका बाऊ का करताहेत ते कळले नाही. फक्त इंजिनिअरिंगचा जरी विचार केला, तरी राज्यात शिकण्यासाठी लागणारी सीईटी ही एसेस्सीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असते. जेईईसारख्या परीक्षांचा विचार केला, तर त्या परीक्षा देणारा तसाही त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार असतोच, मग बोर्ड कुठले आहे त्याने कितीसा फरक पडतो! बाकी मराठी माध्यमाचा कोणी विचारही न करताना पाहून वाईट वाटले.

अजया 12/01/2015 - 22:15
CBSE अभ्यासक्रम मुलाच्या पुढच्या शिक्षणाची तयारी चांगली करुन घेतो ,सायन्स आर्ट्स कॉमर्स कोणत्याही साइडला मुलं गेली तरी त्या विषयांबद्दल माहिती त्यांना पॉलिटिक्स्,इकॉनॉमिक्स्,सायन्स च्या त्या अनुषंगाने तयार केलेल्या अभ्यासक्रमाने मिळते.जे मला एसेस्सी मध्ये नाही आढळ्ले. हल्लीच्या एन्ट्रन्स टेस्ट सिबिएस्सी च्या अभ्यासक्रमानुसार होतात.त्यामुळेही सुरुवातीपासून हा अभ्यासक्रम असणे सोयीचे पडते. सर्व नॅशनल लेव्हल परिक्षांसाठी हाच अभ्यासक्रम लागतो. मी स्वतः एसेस्सीबोर्डात शिकले आहे.पण डेंटल कॉलेजला गेल्यावर आमच्यातला आणि त्यावेळी दिल्ली बोर्ड म्हणायचे यांच्या कॉन्सेप्ट समजण्यातला फरक लक्षात आला.माझ्या बोर्डात ज्या विषयांची तोंडओळख होती त्याची व्यवस्थित समज आणि उमज त्या मुलांना होती.अजुनही हा मुख्य फरक किंवा मर्यादा एसएससी बोर्डात आहे. मात्र चांगले अनुभवी शिक्षक असणारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष देउ शकणारी शाळा जर एसएससी बोर्डाची आहे तर नाकारू नयेच.

कोऽहम् 13/01/2015 - 12:10
सी.बी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाचा भर नुसत्या रट्टा मारुन पास होण्यापेक्षा मुलांच्या मनामधे संकल्पना रुजतील अश्या रितीनी बनवलेला आहे -> ह्या शिक्षण पद्धतीमुळे मुले स्वतःच विचार करायला लागतात आणि कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करूनच निर्णय घेण्याची सवय लागते. आमच्या निकटवर्तीय आय. आय. टी प्राध्यापकांचे असे मत आहे की, सी.बि.एस.ई. चे विद्यार्थी विषयाचा गाभा/मूळ संकल्पना माहित असल्यामुळे नवीन /प्रगत कल्पना फार लवकर आत्मसात करतात आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचे कौशल्य ह्या विद्यार्थ्यांमधे तुलनेने जास्त असते (हे मत माझे स्वतःचे नाही, आणि ह्याद्वारे इतर अभ्यासक्रमांचा वा विद्यार्थांच्या उणीवा दाखवण्याचा हेतू नाही. )

ह्याच विषयाचा गेले तीन महिने सतत विचार करून डोक्याचा पार भुगा झाल्यावर गेल्याच आठवडयात मुलीकरता एस.एस.सी. बोर्ड शाळेत प्रवेश घेतला आहे कारण नर्सरी करता १ लाख ४० हजार आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी १०% फी वाढ हे गणित आम्हाला तरी जमणारे नाही (भविष्यातील सर्वच गोष्टींचा विचार करून). सी. बी. एस. ई, आय. सी. एस. ई., आय. बी., सी. आय. ई. सर्वांचीच फी लाख-दीड लाखाच्या आसपासच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अजया 13/01/2015 - 22:30
नाही हो.माझ्या मुलाची cbse ची नामवंत शाळा असूनही त्याची दहाविची वार्षिक फी ट्रान्सपोर्टसह तीस हजार पण नाही.दिड हजाराची पुस्तकं.ती शाळेतच मिळतात.बाहेर नाही. मोठ्या शहरांत ही लूटमार चालत असावी.

In reply to by अजया

हल्ली त्या इंटरनॅशनल शाळांनी धुमाकुळ घातलाय ना. त्यामधे आहेत एवढ्या फिया. भाचीच्या अ‍ॅडमिशनसाठी सहज हा इंटरनॅशल प्रकार काय आहे हे पहायला गेलेलो. कपाळावर (माझ्याचं) हात मारुन घेतला. कोप्रापासुन नमस्कार केला आणि घरी आलो. ए.सी. क्लासरुम कशाला पाहिजे पिंपरी-चिंचवडमधे? मुंबई वगैरे दमट ठिकाणी ठिक आहे. म्हणे आम्ही इंटरनॅशनल पद्धतीनी मॅनर्स आणि एटीकेट्स वगैरे शिकवतो म्हणे. शाळेचे गुर्जी-गुर्जीणी कधी इंटरनॅशनल सोडा कधी महाराष्ट्राबाहेर गेले असतील का नाही ही शंका. त्या गुर्जीणीला गेल्या गेल्या गुडमॉर्निंग घातला तर साधं हसली सुद्धा नाही, परतफेड सोडा. जाताना शिस्तीत मराठीत धन्यवाद म्हणुन बाहेर आलो.

In reply to by वैदेही बेलवलकर

आजानुकर्ण 13/01/2015 - 22:21
एका मुलाची फी १ लाख ४० हजार? वर्गात ५० मुले पकडली तर फक्त एका वर्गाचे उत्पन्न ७० लाख. मैदानेही नसलेल्या या शाळा असं नक्की काय शिकवतात. बहुतेक शिक्षक तर शिक्षण सेवक व तत्सम प्रकल्पाखाली तासिका बेसिसवर पाचदहा हजार रुपड्यांवर नोकऱ्या करतात.

In reply to by आजानुकर्ण

सस्नेह 13/01/2015 - 22:47
मला वाटतं फी चा आणि CBSE pattern चा काही संबंध नसावा. एसेस्सीच्या काही शाळांच्या फीज आणि डोनेशन्स लाखावर असलेल्या माहिती आहेत. झी स्कूल सीरिजच्या शाळा देशभरात वाजवी फीमधे चांगले शिक्षण देताहेत. उद्या लिंक शोधून देते.

In reply to by सस्नेह

तुझे एक एक प्रतिसाद वाचुन अजुनच त्रास होतोय.. कारण एकतर चांगली CBSE शाळा जवळ नाही. आणि ज्या आह्ते त्या खरच भिकार आहेत ग.. तू म्हणतेस त्या पद्धतीने अजिबात काहि होत नसणार तिथे.. स्टाफच तेवढा "महान" आहे... आता कसं व्हावं आमचं?

पदम 13/01/2015 - 12:18
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलोय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन.

In reply to by पदम

यसवायजी 13/01/2015 - 22:33
मी स्वतःसुद्धा एस.एस.एल.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी+कन्नड मिडियम) मधुन शिकलोय. आणी तेही फुक्कट सातवीपर्यन्त त्यानन्तर १४० रू.वार्षीक फी भरुन खाजगि शालेतुन. (चला.. त्या निमित्ताने मी SSLC पास आहे हे सांगून घेतो.) ;)

अगदी भाबडा विचार... CBSE अर्थात स्टेट बोर्डापेक्षा चांगलं आहे.. पण आता नाही आमच्या घराजवळ ती शाळा... अशा केस मध्ये आपण घरी CBSE ची पुस्तकं आणुन मुलांना घरी समजावु शकतो ना.. शाळा जरी घोकंपट्टी करुन घेत असली तरी तीच गोष्ट कळेल अशा पद्धतीने, प्रयोगांमधुन, उदाहरणांमधुन आपण मुलांना सांगु शकतोच.. अजुन एक.. होमी भाभा सारख्या परीक्षांना बसल्यामुळे तसाही मुलं गणित आणि विज्ञानाचा खोलात जाऊन अभ्यास करतात ना? मग स्टेट बोर्डाच्या मुलांना तोही एक पर्याय आहे...

श्रीगुरुजी 13/01/2015 - 12:58
सीबीएसई व एसएससी च्या ८ वी, ९ वी व १० वी च्या गणित व शास्त्राच्या पुस्तकांची तुलना करा व स्वतःच ठरवा कोणता अभ्यासक्रम जास अवघड व आव्हानात्मक आहे ते. बादवे, सीबीएसई च्या अभ्यासक्रमात हिंदी व इतिहास-भूगोल हे विषय भयंकर अवघड आहेत. हिंदीतले बरेचसे शब्द कळतच नाहीत. संदर्भाने अर्थ लावावा लागतो.

In reply to by श्रीगुरुजी

अजया 13/01/2015 - 14:21
भयंकर अवघड असं काहीही नाही.मी स्वतः मुलाचा अभ्यास घेते त्यावरुन सांगू शकते.अशी दोन सायन्सच्या पुस्तकांची तुलना करुन ठरवणे चुकीचे आहे.सुरुवातीपासुन एक अभ्यासक्रम असला की मुलांना बरोबर लिंक लागते.अापण अभ्यास घेत असतानाही सलग वाचत गेले की व्यवस्थित कळते.ही मुलं सुरुवातीपासुन हिंदी शिकत असतात.हिंदी हा अवघड विषय मुलाना वाटत नाही.एकतर फक्त पुस्तकावर आधारित पेपर नसतात.त्यात तेवढ्याच मार्काचा भाग व्याकरण, वाचन,उतारे असं सर्व असतं.शाळांमध्ये आठवीपर्यंत झालेले व्याकरण नंतर परत असते.त्यामुळे अवघड जात नाही. मला स्वतःला त्यांची इतिहास भूगोल पाॅलिटिक्स ही पुस्तकं तसंच फिजिक्स आणि बायोलाॅजीचीही अावडतात वाचायला.

वारा 13/01/2015 - 13:45
सर्व सदस्यांचे मनापासुन धन्यवाद. खाली CBSE च्या अभ्यासक्रमाची लिंक आहे. http://www.cbseguess.com/syllabus/2015/

In reply to by असंका

वारा 14/01/2015 - 12:19
२ शाळांमधे फॉर्म भरलेत. पहीली एस एस सी वाली आहे. पण ८० सिट आणि बरेच फॉर्म आहेत. लॉटरी लागली तर लागली. दुसरी सी. बी. एस. सी. अ‍ॅडमीशन मिळेल अस वाटतय. सी. बी. एस. सी.वाल्या बर्याच शाळांचे फॉर्म भरायच्या तारखा संपल्यात. एस. एस. सी. अजुन काही शाळा चालुच झाल्या नाहीत. एका शाळेत ४० % रिसर्व ४०% भाउबंध आणि राहीलेल्या सिट ईतर लोकांना. म्हणजे सरळ आहे, अ‍ॅड्मिशन नो गॅरंटी. परत रांगेत उभे रहा रात्री पासुन. आय सी एस सी वाले म्हणतात कधीही या अ‍ॅड्मिशन देतो. पण शाळा प्रपोस्ड आय सी एस सी. बाकी ज्या शाळेत अ‍ॅड्मिशन मिळतय ती या वर्शा पासुन सी. बी. एस. सी. झालीय, म्हणजे आधीच्या बॅच एस. एस. सी. झाल्यात. असो प्रोसेस चालु आहे.

In reply to by वारा

असंका 14/01/2015 - 12:47
शुभेच्छा!! पटकन निर्णय घेतलात हे बेष्ट!! (... पण शेवटी काय? एस एस सी चांगलं की सी बी एस ई? की शाळा चांगली असणं जास्त महत्त्वाचं? )

In reply to by वारा

डिट्टो!!!!! अगदी हेच झालं आहे.. आम्ही कुठेही फॉर्म भरलेला नाही. बहुदा SSC साठीच भरु. कारण जुन्या शाळांमध्ये शिक्षक चांगले असतात.

पदम 13/01/2015 - 14:36
मी स्वतःसुद्धा एस.एस.सी. बोर्डातुन (शुद्ध मराठी मिडियम) मधुन शिकलेय. आणी ते हि महानगर पालिकेतुन सातवीपर्यन्त त्यानन्तर खाजगि शालेतुन. शाळा मुलुन्डची मराठि विद्यालय.

चिगो 13/01/2015 - 15:31
५वी नंतर नवोदयच्या परीक्षेला बसवा.. क्लियर झाली तर बारावीपर्यंत पोर सी.बी.एस.ई.त शिकेल. ते पण फुकट.. हाकानाका.. फक्त पोरापासून सात वर्षं दुर रहायला लागेल. दर आठवड्याअखेर भेटू शकता म्हणा.. (नवोदयचा माजी विद्यार्थी) चिगो

शिद 13/01/2015 - 20:30
चांगली चर्चा चालू आहे. सगळ्यांच्या अनुभवांवरून चांगलं मार्गदर्शन मिळतंय. आम्हाला पण लवकरच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.

मितान 13/01/2015 - 22:21
मुलीला शाळेत घालताना शाळा घराजवळ असणे, मैदान व इतर भौतिक सुविधा चांगल्या असाव्यात, अभ्यासेतर गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण असावे या किमान अटी होत्या. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून याचा आग्रह होता. सुदैवाने घरापासून १ कि मी अंतरावर अशीच शाळा आहे. त्या शाळेशी मी गेली १२ वर्षे जोडलेली असल्याने अंतर्गत व्यवस्थापन व शिक्षक माहितीतले आहेत. शाळेत झाडाला निळा जांभळा रंग दिलेला, कधीतरी स्वतःच स्वतःचा गृहपाठ ठरवून करण्याचा इथपासून अनेक नवे प्रयोग व मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते.५ वीपासून सेमी इंग्लिश आहे. मुक्तांगण विज्ञानशोधिका, भास्कराचार्य साठी गणित तयारी, समाज अभ्यासासाठी ७ वीपासून पुढे अभ्याससहली व शिबिरे, पोहणे,जिम्नास्टिक्,अ‍ॅथलेटिक्स, खेळ लायब्रेरी, गायनवादननृत्यचित्र इ स्वतंत्र शिकण्याची सोय, परदेशी भाषा व स्पोकन इंग्लिश लहान वयापासून शिकण्याची सोय हे सगळं असणारी शाळा कोणत्या बोर्डाची हा सवालच नव्हता. स्टेट बोर्ड मराठी माध्यमात मुलगी आणि आम्ही दोघे समाधानी आहोत. दुसरी इयत्तेच्या मानाने प्रगती खूप चांगली आहे. नवे शिकायला आवडते. शाळा खूप आवडते. राहिला इंग्रजीचा मुद्दा. इंग्रजी भाषा म्हणून आवडत असल्याने आम्ही तिला इंग्रजीतूनही गोष्टी वाचून दाखवतो. कार्टून्स ती हिंदी न बघता इंग्रजीतून बघते. अनेक शब्द विचारते. हे सगळं तिला समजतं आणि ती उपयोगातही आणते. हा आत्मविश्वास येण्यात शाळेच्या वातावरणाचा आणि शिक्षकांचा नक्कीच मोठा सहभाग आहे. हे सगळं करताना तिच्या शिक्षणात आमचा सक्रीय सहभाग आम्ही गृहित धरलाय आणि प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक चार गोष्टी नियमीत करत आहोत. फायदे - शाळा ७ ते १२ असल्याने बाकीचा दिवस हातात आहे. शाळा जवळ आहे. कधीमधी चालत जातो. पुढे तिची ती सायकलवर जाऊ शकेल. घरातले आणि शाळेतले सांस्कृतिक सामाजिक वातावरण फार वेगवेगळे नाही. समविचारी पालक भेटल्यामुळे छान पिअर ग्रुप तयार झालाय. त्यामुळे अभ्यासेतर गोष्टी मिळून करायला मजा येते. मुलांना या वयात शिकायला आवडलं पाहिजे.ती भूक वाढली पाहिजे. स्पर्धा आवाक्यातली वाटली पाहिजे. हे सगळं होतंय. तोटे - शालाबाह्य गटात आम्ही एकटेच एसेसी मराठी वाले असल्याने ही काय बोलते ते तिच्या बरोबरीच्या मुलांना कळत नाही. हिला मात्र आंग्लाळलेलं हिंदाळलेलं मराठी छान समजतं. मग ही त्या भाषेत बोलते. हे पिअर प्रेशर. स्टेट बोर्डाच्या व सी बी एस सी च्या सुट्या वेगवेगळ्या असल्याने इतरांसोबत सुट्टी प्लान करता येत नाही. बराच विस्कळीत झालाय प्रतिसाद. पण हे शेअर करावं वाटलं. एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही. कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये.

In reply to by मितान

"एक सल्ला - तुम्हाला आणि तुमच्या मुलाला काय झेपेल आवडेल पटेल तेच करा. ज्या शाळेत मूल किमान १२ वर्ष जाणार आहे ते त्याला बॅटलफील्ड न वाटता कम्फर्ट झोन वाटला पाहिजे. ही गोष्ट आपण पालकांनी पिअर प्रेशर घेऊन करण्याची नाही." "कोणतेही बोर्ड असले तरी मुलाच्या विश्वात तुमचा किती प्रभाव आहे, सहभाग आहे यावर मुलांचे व्यक्तिमत्व क्से असेल हे ठरणार आहे. अ‍ॅकॅडमीक हा त्याचा केवळ एक भाग झाला. त्याला संपूर्ण समजण्याची चूक करू नये." १००% सहमत...

In reply to by मितान

काळा पहाड 14/01/2015 - 01:36
फारसं सहमत नाहीये. १० वी पर्यंत सगळी टर्मिनॉलॉजी ही मराठीतून असेल आणि ११ पासून इंग्लिश मधून. अर्थात सेमी इंग्लिश हा काय प्रकार आहे ते माहीत नाही. पण जर गणित/सायन्स मराठी मधून शिकवणार असतील तर पुढे प्रॉब्लेम होवू शकतो.

In reply to by काळा पहाड

खटपट्या 14/01/2015 - 03:16
सेमी ईंग्लीश म्हणजे ५वी किंवा ८वी पासुन गणित आणि विज्ञान हे विषय ईंग्रजीमधून शिकवले जातात. काही शाळात ५वी पासून तर काही शाळात ८वी पासून असे करतात.

In reply to by खटपट्या

काळा पहाड 14/01/2015 - 10:33
असं असलं तरी उदाहरणार्थ युपीएससी ला जाणार्‍या विद्यार्थ्यांना बर्‍याच संज्ञा नव्याने शिकाव्या लागणार. त्यामुळे एकूणच हा प्रकार मर्यादित प्रमाणातच यशस्वी होणार. असे प्रयोग करण्यापेक्षा शिक्षणाचं प्रमाणीकरण करणं इतकं का अवघड आहे हे कुणी सांगेल? देशभर एकच अभ्यासक्रम आणि एकच गुणवत्ता प्रमाण हे ध्येय असायला काय हरकत आहे?