पूर्वपिठिका:
नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले...
नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा.
याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे.
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.
२. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो.
सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते.
पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील.
३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही.
सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत.
वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही.
४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे.
जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते.
वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील.
या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्याचा डबा दाखवणे आवश्यक आहे...
कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१.
वाचने
55900
प्रतिक्रिया
218
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हंजे काय ?
In reply to आयुश्यात ९०% लफडी कोण काय by प्यारे१
बरेच मुद्दे सारखे असूनही
In reply to म्हंजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
बरोबर आहे... पण सांगण्याच्या
In reply to बरेच मुद्दे सारखे असूनही by प्यारे१
चालायचं.
In reply to बरोबर आहे... पण सांगण्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
झालं, केलं एक रुपक "ऑन द
In reply to चालायचं. by प्यारे१
>>> छानसे कारकून राहून
In reply to झालं, केलं एक रुपक "ऑन द by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम.
>>> सगळे प्रतिसाद वाचून आणि
In reply to उत्तम. by विटेकर
धन्यवाद !
In reply to >>> सगळे प्रतिसाद वाचून आणि by श्रीगुरुजी
चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !!याला कोणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न नाहीच. प्रामाणिक माणूस हे सत्यही जाणून असेल की अप्रामाणिक/चरित्रहीन माणसे त्यांला आपणहून त्याचा हक्क ताटात वाढून त्यांच्यापूढे ठेवणार नाहीत... कारण तो प्रामाणिक माणसांचा गुणधर्मच नाही, किंबहुना ते तसे करत नाहीत म्हणूनच त्यांना अप्रामाणिक/चरित्रहीन म्हटले जाते. तसेच, आपल्या हक्कांकरिता संघर्ष करायला मागे राहण्याला काय म्हणतात हे प्रमाणिक माणसाला सांगण्याची गरज नाही. तेव्हा, अगदी सर्वस्व पणाला नाही लावले तरी प्रामाणिकपणे, आपली अक्कलहुशारी कामाला लाउन आपल्या हक्कांचे जमेल तेवढे रक्षण करावे... आणि अपयश आले तर त्याला भ्रामक वचनांच्या मागे लपवू नये... कारण तो अप्रामाणिकपणा होईल ! त्यापेक्षा अपयश का आले हे प्रामाणिकपणे समजावून घेउन, यशासाठी भविष्यात काय सुधारणा करायला पाहिजे हा विचार करावा. कारण, अप्रामाणिकपणापुढे हार मानणे आणि वरवर "मी मनातून आनंदी आहे" असे म्हणणे यापेक्षा दुसरा अप्रामाणिकपणा विरळा आहे.अर्थातच चांगल्या कर्माचे
In reply to >>> सगळे प्रतिसाद वाचून आणि by श्रीगुरुजी
मग
सत्याचा
तुमच्या सारखाच एखादा शहाणा
In reply to सत्याचा by विटेकर
तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते !उत्तम ! लेखाचा मतितार्थ हाच आहे की "माणसाने विचार करणारा, आपल्या चुका जाणणारा आणि त्यावरून काही शिकणारा शहाणा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा" ! बस इतकेच बरेच काही करून जाईल !! :)सूर्य पूर्वेला उगवतो हे
In reply to सत्याचा by विटेकर
मी उत्तर धृवावर गेलो आणि
In reply to सूर्य पूर्वेला उगवतो हे by विजुभाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!लेखावरची चर्चा पाहून लेखातले
संक्षींचा विजय झाला नाही असे
In reply to लेखावरची चर्चा पाहून लेखातले by राजेश घासकडवी
हार जीत तो आदमी की होती है
In reply to संक्षींचा विजय झाला नाही असे by विश्वनाथ मेहेंदळे
हं
In reply to हार जीत तो आदमी की होती है by प्यारे१
त्यांना मोठं व्हायला सांगूया काय?कुणाला ? कुणाला? व्य नि केला तरी चालेले.नावाच्या यादीत स्वतःचे नाव
In reply to लेखावरची चर्चा पाहून लेखातले by राजेश घासकडवी
हल्ली इन्फ्लुएन्शल पिपल पण
In reply to नावाच्या यादीत स्वतःचे नाव by डॉ सुहास म्हात्रे
तिसरा पर्याय
या तिसर्या पर्यायात जीत
In reply to तिसरा पर्याय by विटेकर
या तिसर्या पर्यायात जीत नेहमी माझीच असते !हे तुमचं मत झालं. पण...सगळ्या पर्यायांत जीत नेहमी माझीच असते !हे संक्षींचं मतही तुम्हाला मान्य आहे काय हे पण जाणून घ्यायला आवडेल ! :)या धाग्यावर विजयी पावलेल्या
छान
In reply to या धाग्यावर विजयी पावलेल्या by कवितानागेश
ह्म्म
या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य
In reply to ह्म्म by विटेकर
या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी
In reply to या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य by धन्या
वल्लीने सांगितलेला अर्थ बरोबर
In reply to या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी by विटेकर
____/\____
In reply to या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य by धन्या
ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं
In reply to ____/\____ by प्यारे१
हा प्रतिसाद सीरियस असल्यास
In reply to ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं by धन्या
अर्थ
In reply to हा प्रतिसाद सीरियस असल्यास by प्यारे१
वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ
In reply to अर्थ by प्रचेतस
(No subject)
In reply to वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ by प्यारे१
हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत
In reply to ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं by धन्या
हा हा हा ..
In reply to हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत by डॉ सुहास म्हात्रे
अवांतराबद्दल क्षमस्व...
In reply to हा हा हा .. by हाडक्या
तसं मला काही आठवत नाही. पण मी
In reply to हा हा हा .. by हाडक्या
अहो, बॅ. पी. जी. पाटिल आता
In reply to तसं मला काही आठवत नाही. पण मी by डॉ सुहास म्हात्रे
विप्र बोले तो विनायक प्रभु
In reply to ह्म्म by विटेकर
छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय
आयला!
In reply to छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय by नगरीनिरंजन
प्रामाणिकपणे श्रीमंत होता येत
In reply to आयला! by संजय क्षीरसागर
प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात
In reply to छान लेख! लेखात यशस्वी म्हटलंय by नगरीनिरंजन
प्रामाणिकपणे श्रीमंत व्हायला
In reply to प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात by डॉ सुहास म्हात्रे
देवा रे !
विरोधाभासांची महाकथा...
In reply to गाढवाच्या गाण्याला कोणकोण दाद देतायंत ते बघितलं की झालं! by संजय क्षीरसागर
माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात.===================== इतर विचारी माणसांच्या ध्यानात यातल्या "विचारांची गल्लत" घ्यानात येईलच. तुम्ही ते ध्यानात येण्यापलिकडे गेला आहात हे दिसत आहेच. एक प्रतिसाद लिहून झाला की तो विसरून जाऊन नविन अगदी विरुद्ध प्रतिसाद लिहीणे हे तुमचे सम्यक लक्षण दाखवणारी अनेक उदाहरणे मिपावर विख्रून पडलेली आहेत. ती एकत्र लिहीणे काही कठीण नाही. पण तरीही ती उदाहरणे पाहून तुम्हाला "सोईस्कर अंधत्व" येऊन ते लिखाण न दिसता भलतेच काही "दिसू" लागेल आणि त्याबाबत भरपूर नविन असंबद्ध लिहाल याची खात्री आहेच्च ! भाग २ चे उत्तर लिहीणे विसरणे हे पण त्यातलेच ! शिवाय जसजश्या स्वतःच्या चुका लपविणे अशक्य होत जाते तसतसा भाषेवरचा ताबा सुटत जातो हे ही नविन नाही (आता "आत्मज्ञान झाल्याचा दावा करण्यार्याला हे शोभत नाही"... पण असो !) तेव्हा, ह्या "खुदके मनके साथ बातां" करत "जितं मया" म्हणणे चालू ठेवा (आम्ही कोण सांगणार ? तुम्ही चालू ठेवणारच म्हणा) ! ज्याने सगळ्या जगाला शहाणे करून सोडावे असा महात्मा असल्याचा भ्रम आम्हाला तरी झालेला नाही. मी पुरेसा प्रयत्न केला हे समाधान घेऊन तुम्हाला तुमच्याच भरवशावर सोडतो आहे ! सांभाळून रहा !! शुभेच्छा !!! :)@संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी,
In reply to विरोधाभासांची महाकथा... by डॉ सुहास म्हात्रे
हाडक्याजी
In reply to @संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी, by हाडक्या
(तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!)या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ?(संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा)संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...हा हा हा..
In reply to हाडक्याजी by विटेकर
विचारांची गल्लत?
In reply to विरोधाभासांची महाकथा... by डॉ सुहास म्हात्रे
वाचनमात्र !
वा वा काय दणकून बोळे मोकळे
किती ते अवांतर!
मूळ विषय काय होता?आठवी ते
In reply to किती ते अवांतर! by कवितानागेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!आणि दोन लघुत्तरी 'प्रश्ण' जे
In reply to मूळ विषय काय होता?आठवी ते by मदनबाण
२००
सुंदर प्रतिसाद.
In reply to २०० by कवितानागेश
ह्येच बोलतो
In reply to २०० by कवितानागेश
अर्थाचा विपर्यास करून कै च्या कै लेख लिहिलेला वाटला!
In reply to ह्येच बोलतो by स्पा
@माऊ ताई - तुम्ही दिलेल्या
In reply to २०० by कवितानागेश
होय. तशीही उदाहरणं पाहण्यात
In reply to @माऊ ताई - तुम्ही दिलेल्या by प्रसाद१९७१
पुर्वी मिपावर धाग्याचा
ही काय भानगड आहे
टोळांना खाऊ घालू नका
आपला एकच सल्ला
२००!
वा, वा ! अनेकांच्या धाग्याला
In reply to २००! by बॅटमॅन
द्विशतकी धाग्याबद्दल अभिनंदन!
In reply to वा, वा ! अनेकांच्या धाग्याला by डॉ सुहास म्हात्रे