✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

ध
धर्मराजमुटके यांनी
Tue, 08/20/2013 - 09:48  ·  लेख
लेख
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
52214 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 14:59 नवीन
नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर व्यक्तिमत्व होतं.>> थोडीशी सुधारणा सुचवतो. माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं. इतर कुठल्याही हत्येनंतर यावी तशीच प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा. आणि मोठं करायला किंवा ग्लोरिफाय करायला फार काही करावं लागत नाही. अहो मिडियाने हर्षद मेहतालाही मोठं केलं होतं. अर्थातच हर्षद मेहता हे शेअर मार्केटच्या क्षेत्रातलं थोर व्यक्तिमत्व होतंच म्हणा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

जोशी साहेब,

प्यारे१
Wed, 08/20/2014 - 15:02 नवीन
जोशी साहेब, अगदीच चुकीच्या तुलना करु नका. असे केल्याने आपल्या बुद्धीच्या मर्यादा उघड होतात. नरेंद्र दाभोलकर जे काम करत होते ते प्रामाणिक होतं. त्या कामामध्ये दुसर्‍या कुणालाही गोत्यात आणण्याची काही गरज/ इच्छा/ हेतू नव्हते. त्यामुळे असोच्च!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

त्या कामामध्ये दुसर्‍या

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:08 नवीन
त्या कामामध्ये दुसर्‍या कुणालाही गोत्यात आणण्याची काही गरज/ इच्छा/ हेतू नव्हते.>> तुमच्या बुद्धीच्या मर्यादा हे खरं मानून चालण्यात आहेत. हिंदूधर्म निर्मूलन समिती असं नाव ठवलं नाहीतर तेच करायचं बाकी होतं फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हिंदू धर्म असा संपणार नाही

प्यारे१
Wed, 08/20/2014 - 15:23 नवीन
हिंदू धर्म असा संपणार नाही त्यामुळं त्याबद्दल काळजी करु नये. ८०% हिंदूंच्या देशात ८०% अंधश्रद्धा असतात वगैरे गणित दाभोलकरांनी मांडलेलं होतं. मी दाभोलकर समर्थक नाही मात्र हर्षद मेहताबरोबर तुलना अगदीच चुकीची होती हे आपण देखील मान्य करायला हरकत नाही. बाकी काही लोकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न नक्की झाला. अर्थात कायदा केल्यानं सगळ्या गोष्टी संपतात वगैरे भोळेपणा आपण कराल असं वाटत नाही. उलट कायदा केल्यानं त्या कायद्याच्या विरोधी गोष्टी करणारांना अधिक फायदा होण्याची शक्यता जास्त वाटते. (सोनोग्राफीचं उदाहरण आहेच) मुळात कायद्याची अम्मलबजावणी बर्‍याचदा होत नसल्यानं तर अजिबातच काळजीचं कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

बरं.

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:25 नवीन
बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लोक डॉ. दाभोलकरांबद्दल चांगलं

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:03 नवीन
लोक डॉ. दाभोलकरांबद्दल चांगलं बोलत आहेत तर तुमचा एव्हढा जळफळाट का होत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

माझा कुठे जळफळाट होतोय?

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:09 नवीन
माझा कुठे जळफळाट होतोय? लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा आहे फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मग कशात घालवावा? बुवा बाबा

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:12 नवीन
मग कशात घालवावा? बुवा बाबा बापूंच्या नादी लागावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

ते तुमचे तुम्ही ठरवा. मी काय

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:24 नवीन
ते तुमचे तुम्ही ठरवा. मी काय सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हो ना?

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:28 नवीन
मग लोक जर एखादया मृत व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या मनातील गरळही ओकू नका. अगदीच लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा असेल तर डॉ. दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती, त्याने समाजाचे कसे नुकसान झाले हे लिहा. नुसते कळफलक बडवून अंदाज व्यक्त करण्यापेक्षा हे करुन दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

मग लोक जर एखादया मृत

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:33 नवीन
मग लोक जर एखादया मृत व्यक्तीबद्दल चांगलं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या मनातील गरळही ओकू नका.>> कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही ;) अगदीच लोकांनी असल्या गोष्टींवर वेळ फुकट घालवू नये इतकीच इच्छा असेल तर डॉ. दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती, त्याने समाजाचे कसे नुकसान झाले हे लिहा. नुसते कळफलक बडवून अंदाज व्यक्त करण्यापेक्षा हे करुन दाखवा. >> अंदाज व्यक्त करु नको? का म्हणून? मात्र हा सल्ला चांगला आहे. कधीकाळी रिकामटेकडा झालो तर दाभोलकरांची विचारधारा कशी चुकीची होती हे नक्की लिहेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कृपया वय्यक्तिक बोलू कहा.

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:36 नवीन
कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाही
गिरे तो भी टांग उपर. चालू दया तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

तुमच्या टांगांची काळजी करा.

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:37 नवीन
तुमच्या टांगांची काळजी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हेहे. त्याची कल्जी नसावी.

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:39 नवीन
हेहे. त्याची कल्जी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

बरं

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:44 नवीन
बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

लढ

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 15:53 नवीन
धन्या/मंद्या लढ तु !! *BRAVO*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

औचित्यभंग!!संपादक मंडळावर

असंका
Wed, 08/20/2014 - 15:52 नवीन
औचित्यभंग!!संपादक मंडळावर विसंबून मी आपल्याला खालील उत्तर देऊ इच्छितो-
माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं.
माझ्या माहितीतल्या अनेकांना तसे ते होते. आम्हाला स्वतःला होते. आणि आपल्या वाक्यावरून असे वाटते, की आपल्या माहितीतीलही काही जणांना या गोष्टीचे सोयरसूतक होते. पण मुळात या वाक्याचे महत्त्व ठरेल ते याने, की आपल्या माहितीत कोण लोक येतात. इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी, की सहसा आपण आपल्या समविचारी लोकांमध्ये रहाणे प्रीफर करतो. त्यामुळे जेव्हा आपण म्हणता की माझ्या माहितीतील अनेकांना, तेव्हा त्याचा खरा अर्थ हा की आपल्या स्वतःला (-त्याचे काही सोयरसूतक नव्हते). आता हा वैयक्तिक विषय झाला. आपल्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण आमच्यासारखे आपण दु:खी नाहीत.
त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा.
"त्यांच्या क्षेत्रात" हे वेगळे म्हणावे लागत नाही. काही क्षेत्रे सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतात. त्यांचे कार्य अशा स्वरूपाचे होते. आणि आपण मिडीयाचा उल्लेख वर प्रथमच केला आहेत. इतका वेळ तुम्ही इथल्या सदस्यांना सांगत होतात त्यांना ग्लोरीफाय करू नका म्हणून. माझा प्रतिसाद त्या अनुषंगाने होता. रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का? हर्षद मेहेताचा उद्देश होता की व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या आहेत तोवर स्वतःचा फायदा करून घेणे. त्याच्या जवळ जे गेले ते सर्व पस्तावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

माझ्या ऑफिसमधे सगळे समविचारी

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:57 नवीन
माझ्या ऑफिसमधे सगळे समविचारी नाहीत. तिथे तर कुणाला काहीच पडलेली नव्हती. "काय चाल्लंय पुण्यात कठीणे" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली. म्हणजे गटारात पडून एखादा सायकलस्वार मेल्यावर जशी प्रतिक्रिया येईल तशीच. रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का?>> त्याच्या क्षेत्रात थोर. दाभोलकर कसे त्यांच्या कंपूत थोर होते. तसाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

आपल्या ऑफीसमध्ये सगळे

असंका
Wed, 08/20/2014 - 16:14 नवीन
आपल्या ऑफीसमध्ये सगळे समविचारी नाहीत हे ऐकून वाईट वाटले. अशा संस्था , आणि नैसर्गिक रीत्या तिथे काम करणारे लोक नावारूपाला येणे जरा अवघड असते. सहसा लोक आपल्यासंबंधीच्या अशा गोष्टींना अपमानास्पद मानून चारचौघात सांगणे टाळतात, म्हणजे तार्कीक दृष्ट्या वागणारे. दाभोळकरांच्या संघटन कौशल्याला आपण कंपूबाजी म्हणत आहात? गटारीत पडून सायकलस्वार मेला असे आपण कधी स्वत: पाहिले आहे का? हे तर्कसंगत वाटत नाही! आपल्याला तर्कसंगत न वागता केवळ चिखलफेक करायची आहे का? श्रद्धांजलीच्या धाग्यावर येऊन हे सगळे बोलणे हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

आपल्या ऑफीसमध्ये सगळे

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 16:28 नवीन
आपल्या ऑफीसमध्ये सगळे समविचारी नाहीत हे ऐकून वाईट वाटले. अशा संस्था , आणि नैसर्गिक रीत्या तिथे काम करणारे लोक नावारूपाला येणे जरा अवघड असते. >> काय पण समज आहे हो तुम्हाला. भन्नाटच. काम करणार्‍यांकडे कामाच्याबाबतीत लागणारी हुशारी आणि टीमवर्क, तसेच कंपनीच्या भल्याचा विचार असणे असणे महत्वाचे असते. तुमच्या माहितीसाठी...आमचे ऑफिस दिवसागणिक प्रगती करत असून अस्मादिकांना नुकतीच पदोन्नती मिळालेली आहे. तेव्हा काळजी नसावी. सहसा लोक आपल्यासंबंधीच्या अशा गोष्टींना अपमानास्पद मानून चारचौघात सांगणे टाळतात, म्हणजे तार्कीक दृष्ट्या वागणारे.>> वरची कमेंट वाचा. तुमची वैचारिक दिवाळखोरी समजेल. दाभोळकरांच्या संघटन कौशल्याला आपण कंपूबाजी म्हणत आहात? >> हो. गटारीत पडून सायकलस्वार मेला असे आपण कधी स्वत: पाहिले आहे का? हे तर्कसंगत वाटत नाही! >> पेपर वाचत चला. याहून अतार्किक पण सत्य बातम्या असतात. नुसता संध्यानंद वाचत असणार तुम्ही. आपल्याला तर्कसंगत न वागता केवळ चिखलफेक करायची आहे का?>> चिखलफेक आणि सत्यकथन यातला फरक सम्जून घ्या. मी सत्य बोलत आहे. सांगितलेना, श्रद्धांजलीच्या धाग्यावर येऊन हे सगळे बोलणे हे आपल्या दृष्टीने योग्य आहे का?>> योग्य-अयोग्यचा प्रश्नच नाही इथे. सत्य कथन करणे हे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वैचारीक दिवाळखोरी हा आपला

असंका
Wed, 08/20/2014 - 17:01 नवीन
वैचारीक दिवाळखोरी हा आपला माझ्यावरचा वैयक्तिक हल्ला होता. मीही अनवधानाने वैयक्तिक बोललो होतो. त्याबद्दल माफी मागून एवढीच विनंती करतो, की कृपया माझे जे चुकेल ते तसेच दाखवा, जशास तसे करत बसलो, तर सगळेच आंधळे होऊ. पदोन्न्ती बद्द्ल हार्दिक अभिनंदन. दाभोळकरांच्या संघटनेचा संघर्ष हा विशेष भाग होता. त्यांचे कामच प्रस्थापित विचाराविरूद्ध निर्भिडपणे जाऊ शकणार्‍यांना एकत्र आणायचे असे होते. त्यांनी असे लोक एकत्र आणले. त्यांना बळ दिले. धाडस दिले. साधा मनातल्या मनात विचार करून बघा, दाभोळकर म्हणून तर जाऊच दे, एक कार्यकर्ता होणं पण किती अवघड आहे. आणि असे अगणित लोक, त्यांनी बांधले. कंपू म्हणालात म्ह्णून त्यांची किंमत कमी नाही होत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

मी पण वैय्यक्तिक

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 17:04 नवीन
मी पण वैय्यक्तिक प्रतिटिप्पणीबद्दल दिलगीरी व्यक्त करुन थांबतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

मी ही दिलगीरी व्यक्त करतो.

धन्या
Wed, 08/20/2014 - 17:17 नवीन
मी ही दिलगीरी व्यक्त करतो. शब्दाला शब्द वाढत गेला. माझंही म्हणणं एव्हढंच होतं की मृत व्यक्तीच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर त्या व्यक्तीबद्दल नकारात्मक चर्चा नको. डॉ. दाभोलकरांचे विचार सार्‍यांनाच पटतील किंवा पटायला हवेत असं काही नाही. मात्र ती चर्चा वेगळ्या धाग्यावर करता येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

मी ही दिलगीरी व्यक्त करतो.

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 17:23 नवीन
मी ही दिलगीरी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मी ही दिलगीरी व्यक्त करतो.

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 08/24/2014 - 12:59 नवीन
मी ही दिलगीरी व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी ही आता दिलगीरी व्यक्त करूनच टाकतो.

दादा कोंडके
Sun, 08/24/2014 - 13:30 नवीन
मी ही आता दिलगीरी व्यक्त करूनच टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 15:10 नवीन
डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.
१०८ % सहमत!!!! दाभोळकरांची हत्या ही नक्कीच त्यांच्या कार्यामुळे घडलेली नाही. "अंनिस" मधल्या आर्थिक भानगडी आणि "एका" प्रॉपर्टीचे वाद त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेले आहेत!!! काही राजकीय व्यक्तींचा देखील यात हात असू शकतो. तसेच त्यांचा खुनी सापडू नये.. व "मूळ" कर्त्या'चे नाव समोर येऊ नये.. म्हणून सर्वांचीच धडपड चालू आहे. अर्थात या हत्येचा फायदा मात्र 'अ‍ॅक्ट' पास होण्यासाठी मात्र पुरेपूर करवून घेता आला. खर्‍या खुन्याविषयी अज्ञान असणार्‍या आणि दाभोळकरांवर श्रद्धा असणार्‍या लोकांनी बोम्बा मारू नये म्हणून लगेच "पद्मश्री" पण बहाल केला गेला. पण याचा अर्थ दाभोळकरांना "शहीद" किंवा "महात्मा" अश्या पदव्या देण्याची गरज आहे, असे वाटत नाही. काही वर्षांपूर्वी हिन्दु- धर्माच्या नावाने आणि परंपरांच्या नावाने खडे फोडणार्‍या दाभोळकरांना मात्र शेवटी हिन्दु धर्मानुसार "अग्नी" देण्यात आला. रूढी-परम्परांविषयी प्रचन्ड चीड असणार्‍या दाभोळकरांना अंनिस'वाल्यांनी आणि कुटुम्बियांनी शेवटी अग्नि देण्यापेक्षा पारशी धर्मानुसार एखाद्या विहिरीत टाकून किमान भूतदया तरी दाखवायला हवी होती... किंवा रूढीविरुद्ध मुलाचे नाव "हमीद" ठेवून आपल्या पाखंडी'पणाचे गोडवे लोकांना गायला लावणार्या दाभोलकरांना "हमीद"ने एखाद्या कबरीत तरी दफन करायला हवे होते. कदाचित दाभोळकरांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणार्‍यांना हे खूप आततायी वाटू शकतं. पण या फक्त "होऊ शकलं असतं" अश्या शक्यता वर्तवल्या आहेत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:14 नवीन
जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे. ग्रेट. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 15:24 नवीन
जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे. ग्रेट. Smile
हाहाहा हं .. हं.. .. धन्या.. असं तुम्हाला वाटतंय.. पण तसं नाहीये... "खरा खुनी" कोण आहे... हे पोलिस आणि सीबीआय या खात्यांपैकी काही जणांना माहित आहे. परन्तु दुर्दैवाने ते ओपन करण्याची मुभा त्यांना नाही. "प्लॅन्चेट" या प्रकाराबद्दल पॉझिटीव्हली बोलल्यावर डॉ. विजय भटकरांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली गेली.. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नन्तर आपले शब्द फिरवावे लागले. तीच गोष्ट "मृत्यूनन्तरचा प्रवास" यावर पी.एच डी. केलेल्या पुण्यातील वक्त्या- "मेधा खाजगीवाले" यांची. हं हं... शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जपून रहा गो तू पण. कल्जी घेने

प्यारे१
Wed, 08/20/2014 - 15:27 नवीन
जपून रहा गो तू पण. कल्जी घेने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

प्यारे.... तूच माझा खरा मित्र

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 15:32 नवीन
प्यारे.... तूच माझा खरा मित्र!!!.. :) .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

या गंभीर धाग्यावर पण हसवलंत

असंका
Wed, 08/20/2014 - 16:01 नवीन
या गंभीर धाग्यावर पण हसवलंत राव!! भलतेच हजरजबाबी आहात!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:34 नवीन
शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!!
जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात लोक कळत नाही. जीव जातो म्हणजे आत्मा फक्त शरीराचा त्याग करतो असंच म्हटलंय ना धर्मशास्त्रांमध्ये? एव्हढं कशाला घाबरतात लोक मग? ते आत्मा, मृत्यूनंतरचे जग वगैरे व्याख्याने देण्यापुरतंच असतं असं दिसतंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 15:41 नवीन
जीवाचं काय एव्हढं घेऊन बसतात लोक कळत नाही. जीव जातो म्हणजे आत्मा फक्त शरीराचा त्याग करतो असंच म्हटलंय ना धर्मशास्त्रांमध्ये? एव्हढं कशाला घाबरतात लोक मग? ते आत्मा, मृत्यूनंतरचे जग वगैरे व्याख्याने देण्यापुरतंच असतं असं दिसतंय.
धन्या.. हा धड जोक'ही नाहीये.. किंवा कुठला "सटायर" मारलाये.. असंही वाटत नाहीये.. किंवा नॉर्मल पटण्याजोगं स्टेटमेन्टही नाहीये... असो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ते उपहासात्मक वाक्य होतं. एका

धन्या
Wed, 08/20/2014 - 16:05 नवीन
ते उपहासात्मक वाक्य होतं. एका बाजूला "आत्मा नष्ट होत नाही" हे वाक्य आणि दुसर्‍या बाजूला "शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की" हे वाक्य, केव्हढा विरोधाभास आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

ते उपहासात्मक वाक्य होतं. एका

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 16:33 नवीन
ते उपहासात्मक वाक्य होतं. एका बाजूला "आत्मा नष्ट होत नाही" हे वाक्य आणि दुसर्‍या बाजूला "शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की" हे वाक्य, केव्हढा विरोधाभास आहे हा.
:) आत्मा जेव्हा शरीरात असतो.. तेव्हा तो "जीव" असतो. त्याच्यामुळे शरीर "स-जीव" बनते. नॉर्मल केसेस'मध्ये जेव्हा वृद्धपणी आत्म्याला त्याने धारण केलेले शरीर आता सोडून जायची वेळ आली आहे.. याची जाणीव होते.. तेव्हा हळूहळू त्यास विरक्ती येऊ लागते.. व स्व-शरीराबाबतची आसक्ती कमी होऊ लागते. जेव्हा मृत्यू येतो.. तेव्हा "आत्मा" शरीर सोडून जातो. व त्याने धारण केलेले शरीर "नि-र्जीव" बनते. जेव्हा हा "जीव" उर्फ "आत्मा" जेव्हा शरीरात असतो..तेव्हा चुकीच्या वेळेस शरीर सोडून जाण्याची त्याची इच्छा नसते. पण काही कारणास्तव "त्या" आत्म्याने धारण केलेल्या शरीराद्वारे केलेल्या कृत्यामुळे दुसर्‍या कुणाची तरी इच्छा ही "त्या" आत्म्याचे शरीर नष्ट करण्याची असेल.. तेव्हा त्या आत्म्यास त्याचे स्व-शरीर नष्ट होईल.. असे भय वाटते...व त्यासाठी- म्हणजे आत्म्याने ईश्वरी संकेतानुसार धारण केलेल्या आपल्या शरीर-माध्यमातून आत्मा आपले शरीर वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पर्यायाने त्या "आत्म्याला" त्या "शरीरात" अजून काही दिवस / महिने / वर्षे राहण्याची इच्छा असते. आणि असे प्रयत्न तो जेव्हा करतो.. तेव्हा त्यास "जीव वाचवणे" असे म्हणतात. नॉर्मली शरीराच्या आत असलेल्या आत्म्याला "जीव" किंवा "प्राण" असे म्हणतात. आणि आत्म्याला कोणतेही कार्य करण्यासाठी एका माध्यमाची- शरीराची आवश्यकता असते. आणि धारण केलेल्या शरीरावर आत्म्याचे बायडिफॉल्ट प्रेमही असते. पण शरीर जर्जर झाल्यावर किंवा काही कारणास्तव छिन्न-विछिन्न झाल्यावर आत्मा त्यात राहू शकत नाही. आत्मा अमरच असतो.. शाश्वतच असतो.... तो फक्त धारण करतो- ती शरीरे नश्वर असतात. आणि आत्म्याने पुन्हा नवीन शरीर धारण करण्याच्या क्रियेला "पुन्हा जन्म घेणे " असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

असं असतं होय. धन्यवाद.

धन्या
Wed, 08/20/2014 - 16:36 नवीन
असं असतं होय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

पुस्तकाचे नाव "आत्म्याचा

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 16:09 नवीन
पुस्तकाचे नाव "आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन" असे आहे आणि ते इथे मिळू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हर हर !!

बबन ताम्बे
Wed, 08/20/2014 - 15:19 नवीन
आपण नक्की फुले, शाहु, आगरकरांच्या महाराष्ट्रात रहातोय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आपण नक्की फुले, शाहु,

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 15:51 नवीन
आपण नक्की फुले, शाहु, आगरकरांच्या महाराष्ट्रात रहातोय का?
आगरकर नाही हो ...आंबेडकर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

त्यांना आगरकरच म्हणायचे असेल

धन्या
Wed, 08/20/2014 - 15:52 नवीन
त्यांना आगरकरच म्हणायचे असेल तर? आगरकरही सुधारकच होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

थांबा

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 15:54 नवीन
आगरकरही सुधारकच होते.
थांबा , आधी नेफळे , पोटे आणि माईसाहेबांचे मत विचारुयात *acute*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मला आगरकरच म्हणायचेय.

बबन ताम्बे
Wed, 08/20/2014 - 16:21 नवीन
मला थोर सुधारक आगरकरच म्हणायचेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

शाबास मृ. असं स्पष्ट बोलता

मंदार दिलीप जोशी
Wed, 08/20/2014 - 15:35 नवीन
शाबास मृ. असं स्पष्ट बोलता आले पाहीजे. शाब्बास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हसावे की रडावे कळत नाही! ज्या

मनिष
Wed, 08/20/2014 - 15:57 नवीन
हसावे की रडावे कळत नाही! ज्या माणसाच्या पाठीशी उभे रहायला पाहिजे त्याच्या प्रथम स्मृतीदिनी त्याच्याच विषयी इतके गरळ? खरेच काही माहित आहे का दाभोळकरांबाबत किंवा त्यांच्या कामाबद्द्ल? काहीही बोलायचे का? आणि भलामण कोणाची? तर त्या बुआबाजी करणार्‍या बाबा/बुवा/बापू यांची? उद्वेग आलाय अगदी!! :(
  • Log in or register to post comments

एक लक्षात घ्या :

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 16:03 नवीन
एक लक्षात घ्या : दाभोळकर कधीच जगन्मान्य वक्तिमत्व नव्हते , ते , त्यांची मते , त्यांची संस्था कायमच वादग्रस्त होते . दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन ते ग्लोरीफाय झाले हे विवादस्पद का होईना पण सत्य आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन

धन्या
Wed, 08/20/2014 - 16:08 नवीन
दाभोळकरांचा खुन झाला म्हणुन ते ग्लोरीफाय झाले हे विवादस्पद का होईना पण सत्य आहे .
हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न पटणार्‍यांनी लावलेला आहे. माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना हे माहिती आहे की डॉ. दाभोलकर हे एक अतिशय साधे आणि समाजाच्या भल्याची कळकळ असनारे व्यक्तिमत्व होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 16:16 नवीन
हा शोध डॉ. दाभोलकरांची मते न पटणार्‍यांनी लावलेला आहे.
ह्यावरुनच कळते की दाभोळकरांची मते न पटणारा एक मोठ्ठा वर्ग अस्तित्वात होता / आहे ! मी वरच म्हणालो की दाभोळकर हे कधीच जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते ! . क्यु.ई.डी खुन झाल्यामुळेच अंनिस वाल्यांना टी आर पी मिळालाय ... नॅचरल डेथ मधे आत्ता पर्यंत विसरुनही गेले असते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मी वरच म्हणालो की दाभोळकर हे

धन्या
Wed, 08/20/2014 - 16:25 नवीन
मी वरच म्हणालो की दाभोळकर हे कधीच जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते !
मान्य आहे की ते जगन्मान्य व्यक्तिमत्व नव्हते. मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय वाटेल ते बरळणे कितपत योग्य आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मान्य

प्रसाद गोडबोले
Wed, 08/20/2014 - 16:47 नवीन
मात्र त्यांच्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर काय वाटेल ते बरळणे कितपत योग्य आहे?
हे मात्र मान्य ! अगदी १००% सहमत ! मरणान्तिनि वैराणि !मतभेद जिथल्या तिथे ! दाभोळकरांच्या भ्याड हत्येचा अन कोणताही पुरावा नसताना त्याचे खापर हिंदुत्वावादी संस्थांच्या माथ्यावर फोडणार्यांचा ह्या इथे जाहीर निषेध करुन मी माझे चार शब्द संपवतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा