Skip to main content

जिल्हा - पालघर

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 01/08/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे. Palghar District
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5094
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

आपला विकास होवो अशाच सुविधा मिळोत अशी साईचरणी प्रार्थना करतो. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता तो धागा पुन्हा टाकाल काय, मला असे अनुभव वाचायला आवडतात. - दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला ही हा धागा वाचायचा होता. कुठे गेलाय तो आता?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागाकर्तीची क्षमा मागून. साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होता स्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?

In reply to by आतिवास

हलवला नव्हता मिटवला होता आणि अनहीतामधे प्रकाशित केला होता.

In reply to by कविता१९७८

साईपदयात्रेचा धागा टाका लोकांना काय बोलायचं ते बोलू दया तुम्हाला म्हणून सांगतो या रविवारी माझ्या गावाहून पाचशे मुलं साईपदयात्रेला जातायेत यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा पदयात्रेचा धागा तुम्हाला आवडला हे ऐकुन खुप बरे वाटले. धागा पुन्हा प्रकाशित केलाय.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यांना कोणती ओढ़ असते ते मला समजुन घ्यायचं आहे
असंच म्हणते. काय अशी प्रेरणा असते की वारीचे लोक किंवा या ताई सांगतायेत ती पदयात्रा करतात लोकं न थकता आणि दर वर्षी मला पण जाणून घ्यायचं आहे. मी एवढा कधी हि स्वतःला त्रास करून आज पर्यंत देवासाठी काही केलेलं नाहीये. मी उपास पण करत नाही यात च आलं सगळं. आणि मी हे धागे सगळे वाचले अनाहिता मध्ये. छान लिहिलंय , एवढं आठवतंय याचं पण कौतुक च वाटलं मला.

In reply to by स्रुजा

मी स्वतः उपास तापास किंवा गुरुवार , सोमवार , शनिवार असे वार देखील पाळत नाही . पण मी साईबाबांना खुप मानते पण म्हणुन पदयात्रा केल्याने पुण्य वैगरे मिळतं असंही माझं मत नाही. एक वेगळाच चेंज मिळतो ,फ्रेश होते मी

पालघर जिल्हा झाला हे उत्तमच झालं. सोबतच पुण्यातून बारामती, अहमदनगरमधून श्रीरामपुर, यवतमाळ मधून पुसद व अमरावतीतून अचलपुर हे वेगळे झाले पाहिजेत.

In reply to by एस

अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण दक्षिण रायगडवासियांसाठी दूर आणि गैरसोयीचे पडत असल्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण रायगडचा वेगळा माणगांव जिल्हा होणार आहे हे गेली दहा वर्ष ऐकतोय. :)

In reply to by धन्या

रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा आहे. म्हणजे आम्हा राजापूर वाल्यांना रत्नागिरी खूप लांब पडते.

पालघरकरांना शुभेच्छा. एकदिलाने कामाला लागा व जिल्ह्याला सम्रुद्ध करा.

छान