Skip to main content

गोपिनाथ मुंडे

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/06/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
Munde भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले. स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25429
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

खूप धक्कादायक बातमी... त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... असेच म्हणतो. मनापासून आदरांजली.

राजकारणा पलिकडे समयोचीत समाजकारण अंगिकारणार्या "महाराष्ट्र" सुपुत्रास विनम्र श्रद्धांजली..

मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच महाराष्ट्रातल्या राजकारणाचे नुकसान झाले आहे. पवारबाजीला वेसण घालण्याची ताकद मुंडेंमधे होती. मुंडेसाहेब तुमची आज देशाला, महाराष्ट्राला फार गरज होती. का गेलात इतक्या तडकाफडकी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

त्या पवारांना नडायची धमक दाखवणारा एकटाच नेता ..! आता उरलेत ते सगळे त्यांचे बगलबच्चे!ं छ्या ..देवा खुप चुकीचं केलंस तु ,,. :(

केंद्रीय ग्रामविकास मंत्री खा.गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक. मराठवाड्याचा एक मोठा लोकनेता, सामान्य माणसाशी संपर्क असलेला असा एक मोठा माणुस निघून गेला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना... -दिलीप बिरुटे

एका झुंजार नेत्याचा अकाली अंत ! ओम शांती शांती शांती !!!

अगदी धक्कादायक आहे ! :( आत्ताच काही वेळा पूर्वी ही वाईट बातमी कळाली... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मुंडेसाहेबांच्या मृत्यूमध्येही आता काही लोकं राजकारण करू पाहत आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपवर त्यासंबंधीच्या अफवा पसरण्यास सुरूवातही झाली आहे. या दुर्दैवी घटनेतही राजकारण करू पाहणार्‍या लोकांच्या मनाचा कोतेपणा कधी जायचा?? :(

In reply to by किसन शिंदे

धन्यवाद किसनराव स्पष्ट केल्याबद्दल... आपण सर्वच हे लक्षात ठेवून कुठल्याही माध्यमातून असले मेसेजेस दुर्लक्षित करूया आणि फॉरवर्ड करण्याचे पूर्णपणे टाळूयात...

@स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...>>> +++१११ एक खरा लोकनेता हरपला! :(

एनडीटिव्हीवर सांगितल्याप्रमाणे: एका गाडीने ट्रॅफिक सिग्नल लाल झाला तरी तो सिग्नल तोडून पुढे आली, जेंव्हा मुंडे यांची गाडी हिरव्या दिव्यामुळे पुढे आली होती. त्या गाडीला बाजूने (काटकोनात) जोरात धक्का मारला. थोडक्यात ही हानी होण्याचे कारण केवळ लाल सिग्नल तोडणे हे होते... डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे: त्यांना आणले तेंव्हाच त्यांचे श्वसन बंद होते आणि हृदयक्रीया बंद होती. जवळपास ५० मिनिटे त्यांना रिवाइव करण्याचा प्रयत्न केला गेला. एक नाकावर किंचित जखम सोडल्यास वरकरणी काहीच लागलेले नाही. अंतर्गत जखमा झाल्या होत्या का ते शवविच्छेदनानंतरच समजेल असे म्हणले जात आहे.

धक्कादायक बातमी!!! महाराष्ट्राचे एक झुंजार नेतृत्व हरपलं!!!! महाराष्ट्राला त्यांची उणीव सदैव भासेल!!! मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!

फार वाईट वाटले. असे व्हायला नको होते. नवी खासदारकी, नवे मंत्रीपद, कर्तृत्वाला आवाहन करणारी नवी क्षितिजे उघडत असताना दैवाने डाव साधला. माझी श्री मुंडे यांना श्रद्धांजली.

अत्यंत धक्कादायक आणि दु:खद बातमी. कठोर संघर्ष करीत नावारुपाला आलेल्या धडाडीच्या नेत्याला केंद्रात मानाचे मंत्रीपद मिळाले असताना अचानक काळाने घाला घातला.

श्रद्धांजली चांगला लोकनेता हरपला. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे.

अत्यंत धक्कादायक बातमी. मराठवाड्यात वाढलेल्या माझ्यासारख्या असंख्यांच्या बालपणावर प्रमोद महाजन्,विलासराव देशमूख आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावाचे ठसे उमटलेले आहेत. माहेरचा कर्तबगार माणूस गेल्याचं फीलिंग येतंय :( सतत संघर्ष, अनेक यशापयश, कौटुंबिक आणि पक्षीय बंडाळी या सर्वांना पुरून उरलेला हा माणूस एका अपघातात गेला यावर विश्वासच बसत नाही. श्रद्धांजली !

मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....

आयुष्यभर एक ध्यास घेऊन अखंड झटत राहायचं... कष्टांना नुकतीच कुठं फळं येऊ लागली असताना अपघाती मृत्यू व्हावा... अगदी हळहळ वाटण्यासारखं आणि सुन्न करून टाकणारं आहे हे!गोपीनाथ मुंडेंच्या अविरत कष्टांना सलाम व भावपूर्ण श्रध्दांजली...!

ज्यासाठी इतकी वर्षे लढा दिला ते करून दाखवायची संधी समोर असताना असं व्हावं हे प्रचंड दुर्दैव. सगळ्यांचंच. मुंडेसाहेबांना श्रद्धांजली. मात्र प्रमोद महाजनांना भावाने गोळ्या घातल्यावर एकट्याने उचलून हॉस्पिटलमधे नेणारा माणूस शॉकमधे जाऊन हार्ट अटॅक येऊन गेला यावर विश्वास बसत नाहीये. टीव्हीवर गाडी दाखवताहेत तिलाही फार धक्का बसल्याचं जाणवत नाहीये.

भाजप वैभवाच्या शिखरावर असताना आणि गोपिनाथजींना त्यांच्या दिर्घ पक्षनिष्ठेचे योग्य ते फळ मिळालेले असताना ते फळ चाखण्यापूर्वीच त्यांचे असे निधन व्हावे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. मुंडेसाहेबांची लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला नेत्रदिपक यश मिळवुन देण्याची महत्वाकांक्षा अधुरी राहीली. मा. श्री गोपिनाथ मुंडे यांना सादर श्रद्धांजली

महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते व मराठवाड्याचा बुलंद आवाज मा.खा.गोपिनाथ मुंडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली

अत्यंत धक्कादायक बातमी!! भावपुर्ण श्रध्दांजली........ *sad*

काही नेते नुकतेच नावापुरते नेते असतात. मात्र गोपीनाथ मुंडे हे खरेच लोकनेते होते. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! अशा अकाली निधनाच्या बातम्या वाचल्यावर उरात धडकी भरते. जन पळभर म्ह्णतील हाय हाय ! मी जाता राहिल कार्य काय ! रामकृष्ण ही आले गेले त्या विना जग का ओसची पडीले ! ही भा. रा. तांबेंची कविता आठवते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्‍यांचे काय होईल हा विचार मनात सारखा सारखा येत असतो. इतर वेळेस मस्त मजेत जगताना असे प्रसंग मुळापासून हादरवतात. त्यामुळे कल करे सो आज कर ! आज करे सो अब ! पल मे प्रलय होएगी , बहुरि करेगा कब ? हेच खरे !

अतिशय वाइट वाटले. उमदे व्यक्तिमत्व . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

मराठवाड्याचा वाघ हरवला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना. -मित्रहो

गोपीनाथरावांना विनम्र श्रध्दांजली..!!! अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते.

In reply to by स्पार्टाकस

अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते. अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

"संघर्षानंतर मिळणाऱ्या विजयाचा आनंद हा सामान्य विजयानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आणि आनंददायी असतो" असे म्हणून आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे समर्थन करणाऱ्या एका लढवय्या नेतृत्वाला आज महाराष्ट्र मुकला. स्व. विलासराव देशमुख, स्व. प्रमोद महाजन यांच्यानंतर दिल्लीमध्ये मराठी आवाज उठवणारा एक नेता हरपला. महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान नेत्याला मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

दैवगति अविचारी असते. माणसांचे व तिचे हिशेबच वेगवेगळे असतात. महाजन मुंडे यांच्या कुटुंबांवर जे आघात झाले ते शत्रूवरही होउ नयेत असे होते.काहीसे मिश्कील तर बरेचसे गंभीर असे मुडे अजून खूप जगायला हवे होते.बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमूख यांच्या निधनानंतर मुंडे यांच्या निधनाने मराठी मन पोरके होते की काय असे वाटू लागले आहे.

आज दिवस उजाडला तो ही वाईट बातमी घेऊनच. एक उमदे आणि धडाडीचे व्यक्तिमत्व हरपले.महाराष्ट्राची आणि देशाची मोठी हानि आहे. महाराष्ट्रातली राजकीय समीकरणे बदलू शकतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

मुंडेजी लोकनेते तसेच भावी मुख्य मंञी सुद्धा होते फक्त क्षुल्लक अपघात होऊन त्यांचे जाणे मनास पटत नाही इंडिका गाडी नक्की कुणाची? ड्रायव्हर ताब्यात आहे तर ही चूक जाणूनबूजून की मुद्दम हे काही कऴले नाही

In reply to by निलरंजन

चोप्य पस्ते करुन अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.

श्रद्धांजली. महाराष्ट्राने फार मोठा नेता गमावला आहे.

फार वाईट झालं.. एक झुंजार राजकीय नेता गेला. मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

आणि दु:खद बातमी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. दोन वर्षांपूर्वी लोकसत्तेच्या 'आयडिया एक्स्चेंज'मध्ये झालेली त्यांची मुलाखत वाचली. त्यातला हा भाग वाचून पहा -
गिरीश कुबेर - सत्तेने भाजपला शांत केलेय का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा अत्यंत अस्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ दाखविण्यापुरता विरोध आणि बाकी सगळे एकत्र असे वातावरण असून यात भाजपचा नक्की वाटा काय? मुंडे- अविवाहितांना विवाहितांच्या समस्या समजू शकत नाहीत. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा अनेक गोष्टी मांडल्या. असं करू, तसं करू.. मात्र सत्ता आल्यानंतर कळते ही या गोष्टी करणे पॉसिबल नाही. एकेकाळी विरोधी पक्षाने सत्तेचा लवलेशही पाहिला नव्हता. तेव्हा आम्ही बोलत होतो त्याला धार होती. पण केंद्रात सत्तेवर आलो. महाराष्ट्रात सत्तेवर येऊन गेलोय, काही राज्यांत सत्तेत आहोत. पण सत्तेत जाऊन आले की विरोधाची धार थोडी कमी होते. आम्ही सरकार चालवून बघितलेले आहे. म्हणून आम्ही त्या काळात काही भूमिका मांडल्या होत्या, त्या आता मांडत नाही. आता कोकणात जैतापूरला विजेचा प्रकल्प येतोय. त्याला भाजप विरोध करीत नाही. ही प्रगल्भता आता सत्तेत जाऊन आली आहे. सत्तेत नसताना आपण अनेक गोष्टी मांडतो पण सत्तेत गेल्यावर त्या गोष्टी करता येत नाहीत याची अनुभूती येते. त्यांनाही आता विरोधकात राहून विरोधकांच्या अडचणी काय असतात हे कळले आहे. दिनेश गुणे- त्यावेळी एन्रॉनला विरोध केला, त्याबद्दल आज तुम्हाला काय वाटते? मुंडे- एन्रॉनला विरोध केला तो आजही योग्यच वाटतो. विरोधाचे कारण वीज नको हे नव्हते. तर एन्रॉनच्या कराराला विरोध होता. एन्रॉनचा करार हा निविदा न काढता दोघांनी सामंजस्याने केला होता. एन्रॉनची कॅपिटल कॉस्ट ही ९ हजार ८० कोटींेची होती. कोणत्याही प्रकल्पाची कॅपिटल कॉस्टच जेवढी जास्त असते तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्तच असतो. ती कमी करा हीच माझी मागणी होती. माझी मागणी एन्रॉन रद्द करा अशी नव्हती तर एन्रॉनचा दर घोषित करा अशी मागणी होती. पण आम्ही म्हटले की फेकून द्या एन्रॉनला अरबी समुद्रात. पण हे मी जर बोललो नसतो तर आम्ही निवडणूक जिंकून सत्तेत आलो नसतो.