शिळी जिलेबी - १
१
धीर गंभीर गाज सागराची
सोबतीला आहे बोचरा वारा
हरवून गेल्या दिशा सार्या
अन मी शोधतो आहे किनारा
२
किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले
३
डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर होते टोकणार्या वेदनांचे साचलेले
४
तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं
५
काळ वेळ कधी तशी नसतेच तशी
गुलमोहर फुलांनी बहरून यायला
मनाचंही थोडंसं असंच असतं
पुरते एक जाणीव, मोहरून जायला
६
चांगलं वाईट तसं काहीच नसतं
हा सारा खेळ आपल्या मनाचा
दुखात हसत असे कुणी येथे अन्
कुणी सुखात आसरा घेई वनाचा
७
आपला परका आभास सारे
इथे कुणीच कुणाचं नसतं
प्रत्येक क्षण सापेक्ष इथला
तरीही मन जाळ्यात फसतं
८
भावनेचा ओलावा शोधताना
मी मलाच हरवून गेलो
शिकलो मात्र बरंच काही
अन् वृत्तीने नीर्विकार झालो
९
जाणिवेनेनीवेच्या पलीकडे
एक अस्वस्थ जग असतं
साथ आपलीच आपल्याला
तिथेही कुणी आपलं नसतं
१०
विसरायचं आता सारं अस
मी पुन्हा पुन्हा ठरवतो
क्षण दोन क्षण जातात अन्
मी पुन्हा स्वत:ला हरवतो
धन्या.. एकदम हळुवार रे.. मस्त
विसरायचं आता सारं अस
झक्कास्स्स्स्स्स...भावनेचा
अभिव्यक्ती ताजी असताना शिळे
आयला
मिपाला अजुन एक कवि लाभला..
कोण
अहो काय हे??
+१
अगदी अगदी. ते कसं विसरेन म्या
धनाजीराव
५, ६ आणि ७ मस्त आहेत.
माहित नाहि का ते... तसा आपला माझा परिचयही नाही....
तुम्ही म्हणताय ते खरं आहे.
शेवटी ४ सिक्सर टपाटप बसलेल्या
अप्रतिम.
+१
सुंदर कविता... मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे.+१खरंय....
कविता छान रे.
विसरायचं आता सारं अस
मस्त लिहिलंस धन्या!
+१ मस्त आहे, लिहित रहा
धनाजीराव जिंदाबाद!
भारी आहेत एकदम
आयला धन्या ५ वर्षापुर्वी
दोन -तीनदा अगदी वर आलेला धागा
हो ना...
जिलब्या अजिबात शिळ्या वाटल्या नाहीत...
सुखद धक्का
धनाजीराव, लैच जबरा लिहित होता