वेड्या आठ्वणी
लेखनप्रकार
अक्का,
आपली माणसं चटका लाऊन जातात,तशी तूं गेलीस.आपली माणसं जातात पण त्यांच्या आठवणी येतात."आठवणी येतात",असे आपण म्हणतो कारण आठवणी कधी जात नाहीत.काही आठवणी वेड्या असतात म्हणून त्या सारख्या येत असतात.
तूं बारा एक वर्षाची होतीस.मी सहा वर्षाचा होतो.तुझ्या डाव्या हाताच्या मुठीत माझं बोट धरून तुझ्या बरोबर चालत असताना तिन वर्षाचा सुधाकर तुझ्या कमरेवर,माझ्या हातात फुलाची परडी,असे आपण तिघं मागच्या परड्यात जास्वंदीची फुलं काढायला जात असूं.ही आठवण जेव्हां तूं गम्भीर आजारी झालीस तेव्हां प्रकर्षाने आठवली.
आठवतं का तुला?
तूं पंधरा सोळा वर्षाची असावीस,आपण सर्व दादरला इंदीरा निवास मधे रहात असूं.त्याच मजल्यावर दहा नंबरच्या फ़्ल्याट मधे प्रसीद्ध मराठी ऍक्टर चन्द्रकान्त(मांढरे) रहात असे.तूं सुन्दर दिसायचीस, तुझं अक्षर पण किती सुन्दर,चन्द्रकान्तने इंदीरा निवासच्या सार्वजनीक गणपतीच्या कार्यक्रमात,"शारदा" नाटक बसवलं होतं.त्यात तुला "शारदेची " मुख्य भुमीका दिली होती."मुर्तीमंत भिती उभी मज समोर राहीली"हे गाणं आणि "म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान"हे सुन्दर गाणं सुरात गाऊन तूं टाळ्या घेतल्यास,आणि वन्समोअर पण घेतलेस
आठवतं का तुला?
म्याट्रीक पर्यंत तूं दादरच्या गर्ल्स स्कूल मधे शिकत होतीस.महात्मा गांधी एकदा मुंबईला आले होते,त्यांची जाहिर सभा शिवाजी पार्कवर झाली होती.त्यांच्या सन्मानासाठी देशाच्या गौरवासाठी आणि त्याना खूप आवडणारं गाणं "वैष्ण्व जन तो तेणे कही रे जो पिडपराई जाणे रे"हे गाणं गाण्यासाठी तुला तुझ्या शाळेमधून निवडलं होतं.स्टेज वरच्या तुम्हा सर्व मुलींची
स्वत:हून महात्माजीनी पाठ थोपटली,
हे तूं आम्हाला अभिमानाने सांगायचीस.
आठवतं का तुला?
अण्णा आजारी झाले तेव्हां आपण सर्व वेंगुर्ल्याला रहायला गेलो.तिकडे तूं रेशनींग ऒफ़ीस मधे नोकरी करायचीस.सुट्टी दिवशी तूं,मी,सुधा आणि तुझ्या मैत्रीणी मिळून आपण सर्व वेंगुर्ल्याच्या "क्यांप"मधे फ़िरायला जात असूं."बाब्ल्याच्या "कोळड्रीन्क हाउस "मधे तूं आम्हा सर्वाना दुध कोळ्ड्रीन्क मधे आईसक्रीम घालून मिळणारं रंगीबेरंगी ड्रिन्क पोटभर देत
असायचीस.
आठवतं का तुला?
मला आठवतं एकावन,बावनच्या दर्म्यान तुझं लग्नं झालं.मी कॊलेजला दुसरया वर्गात शिकत होतो.तुझं लग्न मुंबईत (गिरगावांत) झालं.अण्णा आजारी असल्याने अण्णा आणि आई दोघही तुझ्या लग्नाला येऊं शकली नाहीत.तुझ्या सासरी जाताना त्यांची आठवण काढून तूं खूप रडलीस.मी पण तुला जवळ घेऊन तुझे अश्रु पुसत म्हणालो"रडू नकोस हे ही दिवस
जातील"आपण आई अण्णाना "आराम नगर" मधे आणलं.त्रेपन्न मधे तूला विरेन झाला.
आठवतं का तुला?
प्रत्येक भाऊबिजे दिवशी तूं माझ्याकडे यायचीस,किती आनंद व्हायचा त्या दिवशी?बोट धरून फुलांची परडी घेऊन देवपुजेला फुले आणण्यासाठी संगत देणारी तूं संगत देत राहीलीस.
"आठवतं का तुला?"
असं आतां मी कसं म्हणूं?
परलोकीच्या प्रवासाल निघालेली तूं आता अण्णा,आईला भेटशील,आणि या इहलोकात राहून तुझ्या फ़क्त वेड्या आठवणी देशील.
श्रीकृष्ण सामंत
वाचने
3474
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
नि:शब्द....
In reply to नि:शब्द.... by शिवा जमदाडे
आभार
नि:शब्द
In reply to नि:शब्द by प्रकाश घाटपांडे
आभार
किती
In reply to किती by आनंदयात्री
आभार
डोळे पाणावले...
In reply to डोळे पाणावले... by प्रभाकर पेठकर
खासगी आणि सार्वजनीक
सुरेख.
In reply to सुरेख. by नारायणी
आभार