Skip to main content

गणपतीला जानवे कोणी घातले ?

लेखक शरद यांनी गुरुवार, 14/03/2013 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय? शरद .

वाचने 71587
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

ुर्ती बिर्ती ज्या आहेत त्या आपण आपल्या अंडर्स्टॅन्डिंग साठी बनवलेली साधने आहेत ... सही रे सही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर , आत्ता दासबोध ऐकता ऐकता एक रेफरन्स सापडला हा खास तुमच्या साठी धातु पाषाण मृत्तिका | चित्रलेप काष्ठदेखा | तेथे देव कैचा मुर्खा | भ्रान्ति पडली || श्रीराम || हे आपुली कल्पना | प्राप्ता ऐसी फळे जाणा | परी त्या देवाचिय्र खुणा | वेगळ्याचि || श्रीराम || - समर्थ रामदास दासबोध दशक सहावा देवशोधन समास सहावा सृष्टीकथन ||

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तुकाराम वाणी चालेल? ;) 'केला मातीचा पशुपती' नावाचा अभंग आहे तुकाराम गाथ्या मध्ये. त्यात माती मातीत, सोने सोन्यात, दगड दगडात मिसळते/तो नि पूजा देवापाशी पोचते असे चरण आहेत. म्हणा तुकाराम महाराज की जय! अभंग वाचणं सोडणार नाही, जयजयकार करणं सोडणार नाही , सांगितलं तसं चुक्कून वागणार नाही . ;)

In reply to by प्यारे१

तुकाराम वाणी चालेल? वाण्यांच्यात पण मुंज होते म्हणे आणि तसंही जानवं घालणारे कोणीही जानवं न घालणार्‍यांच्या दृष्टीने बामणांत मोडतात. त्यामुळे वाणी चालायचा नाही. ;)

In reply to by सूड

देहबुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा तुम्हीं । देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥ उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्या भक्तानें देव ग्रासिला ॥३॥ चोखा म्हणे नागवें उघडें झालें एक । सहज मीपण देख मावळलें ॥४॥ दगडामातीत देव नाही ....ती केवळ आपली भावना आहे हे प्रत्येक साधु संताने म्हणुन ठेवले आहे .. (अवांतर : ह्यालाही हरकत असेल तर शेख महंमद किंव्वा कबीर ह्यांचे साहित्य धुंडाळायला घेतो ....कसें ! =)) )

In reply to by प्यारे१

केला मातीचा पशुपती । परि मातीसी काय महंती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ।।१।। तैसे पूजती आम्हा संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ।।२।। केला पाषाणाचा विष्णू । परी पाषाण नव्हे विष्णू । विष्णुपूजा विष्णूसी अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपे ।।३।। केली कांशाची जगदंबा । परी कासें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणे । कांसे राहे कांसेपणे ।।४।। ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केले कांजी । ज्याची पूजा तेणेची घेणे । आम्हा पाषाणरूप राहणे ।।५।। असो . साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ||श्रीराम ||

बाली मधील हिंदू मंदिरांत (जी मुख्यतः शिवमंदिरे आहेत) गणपतीचे स्थान मंदिराबाहेरील द्वारपालाचे आहे. त्याला मंदिरात स्थान नाही...  ..........

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाली सहल माझ्या संस्मरणीय सहलींपैकी एक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मग लवकर धागा सुरु करा कि राव !

In reply to by मालोजीराव

सध्या जरा... "रात्र थोडी, सोंगं फार" चालू आहे. पण बालीचा धागा नक्की टाकणार.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसे आपल्याकडेही मुख्य प्रवेशद्वारावर गणेशपट्टी अगदी जुन्या देवळांतूनही असते की!

In reply to by पैसा

मुख्य फरक असा की बालीतील गणपतिच्या मूर्ती मंदिराच्या द्वारपालाच्या जागी दरवाज्याच्या दोन्ही बाजूला अथवा एका बाजूला गणपती व दुसर्‍या बाजूला राक्षसासारखी तामसी मुद्रा असलेली मुर्ती असते. दोघांच्याही हातात साधारण गदेसारखा सोटा असतो.

In reply to by पैसा

अगदी जुन्या नाही. यादवकाळापासून गणेशपट्टी कोरायला सुरुवात झाली. राष्ट्रकूट/शिलाहार/चालुक्य काळात देवी, शिवपिंड किंवा नुकतीच नक्षी प्रवेशद्वारावर कोरलेली दिसते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्याचप्रमाणे वेरूळला हिंदू लेण्यांमध्ये शंकर पार्वती सारीपाट खेळतानाचा प्रसंग जवळ जवळ ५-६ ठिकाणी कोरलेला आहे, पण त्यापैकी एकाही शिल्पात गणपती दिसत नाही पण त्याचबरोबर कार्तिकेय मात्र दिसतो! कदाचित बाप्पा त्यावेळी पाहूणचार झोडायला महाराष्ट्रात आला असावा.

In reply to by किसन शिंदे

कदाचित बाप्पा त्यावेळी पाहूणचार झोडायला महाराष्ट्रात आला असावा.
गणपती होता की सप्तमातृकांच्या रांगेत. बहुधा ही लेणी खोदेपर्यंत गणपती शंकराचा मुलगा झाला नसावा. शिवपरीवारात त्याला मागाहून समाविष्ट केले असावे, त्याचं महत्व वाढल्यानंतर.

हिंदू टिळा / कुंकू का लावतात...?? उत्तर - हिंदु अध्यात्म ची खरी ओळख टिळा(तिलक) ने होते. टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. हिंदु धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो. उदा. हळदी,कुंकू,केशर,भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे. पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...?? पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि,संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे.आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे.जे अपार शक्ती चे भांडार आहे. यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो,तिथे आज्ञाचक्र असतो. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या १) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण म्हणतात. हे गुरु स्थान आहे.इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण आहे.याला मनाचे घर पण म्हणतात.यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.टिळा काही खास प्रयोजना साठी पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनी ने,धनप्राप्ती हेतू मध्यमा नी आणि शांती प्राप्ती साठी अनामिका नि टिळा लावला जातो. साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो. तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते.म्हणून प्रत्येक हिंदूने टिळा जरूर लावावा.हिंदु प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे. टिळा हिंदु संस्कृती ची ओळख आहे.टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.

In reply to by नेहरिन

अहो हे मिपा आहे. सनातनच्या वेबसाईटवरचे चोप्यपस्ते कशाला उगीच इथे आँ? आणि तसेही उपक्रमवर हा बाष्कळ धागा कोणीतरी आधीच टाकलेला आहे. हा पहा. http://mr.upakram.org/node/3936 विना रेफ्रन्स चोप्यपस्तेची लाज नै आणि चिकित्सेची इच्छा नै. त्यामुळे तुमच्यासारखे लोक उगीच फालतू मजकूर का पेष्टतात? असा एक नवीन काकू सुरू करावा म्हणतोय.

In reply to by नेहरिन

टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.
या प्रयोगांबद्दल वाचायला आवडेल. कुणी केले होते हे प्रयोग? कधी केले होते? काय निष्कर्ष निघाले?

In reply to by धन्या

@ कुणी केले होते हे प्रयोग? कधी केले होते? काय निष्कर्ष निघाले?>>>हरं..हरं काय हा अ धर्म...! धर्माच्या मागे लागता काय रे चोरांन्नो??? इतर सर्व क्षेत्रात प्रत्येक गोष्ट अशीच प्रयोग करून वापरात आलेली आहे,हे तु मला दाखवून देण्यासाठी त्य त्या प्रॉडक्टच्या फ्याकट्रीत ... ने ... मगच मी तुझ्यापुढे ... हरिन http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-569.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे बाकी जबरं काम केलंत बगा आत्मूस. त्वांडच बंद केलं. काय लोकहो, मिळाले का उत्तर आता? काकू बंद करून दुसरा उघडा बघू पटापट?

In reply to by गणपा

मार्च आला गणपा....उकडायलंय. अजून स्वेटर घालून ठिवलाय काय? बाकी अपर्णा तै सारखंच... आईच्यान म्या नाय घाटलं गनपतीला जानवं! 'त्वं देहत्रयातितः, काल त्रयातित:,अवस्थात्रयातित:' म्हणजे काय कुणास ठाऊक! जो देहांच्या, काळाच्या, अवस्थाच्या पलिकडला तो कुणाच्या कुळात जन्मला, त्याची जात कुठली, धर्म कुठला याबद्दल कुणाला माहिती आहे काय? @धन्या, कोण नाय सापडत म्हणून देवाला वेठीला धरा आता! हे भारीये. भगवान ह्या शब्दाचा अर्थ ज्याच्या कडे यश, श्री, किर्ती, औदार्य, ऐश्वर्य असं सगळं (भग) अपरिमित प्रमाणात आहे तो. हे सगळे ऐश्वर्य त्याचंच आहे. सोनं आलं कुठून? जमीन, पृथ्वी मधून. सोनं आपल्यासाठी मौल्यवान. त्याच्यासाठी काय? त्यानं काय पिक्चर मध्ये दाखवतात तसं चोरांना डांबायला पाहिजे होतं का? डिस्क्लेमरः इथून पुढे लिहीलेलं कैच्याकै वाटणार आहे पण बेस्ट ऑप्शन हे असं आहे हे मानणं हाच आहे. ह्यालाच श्रद्धा म्हणतात. दुसर्‍या कुणालाही त्रास न होऊ देता जे झालं जसं झालं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा चोरानं एकाला मारलं म्हणून चोराच्या घरच्यांना मारणं असं सूडचक्र सुरु होईल. जन्माला येतो तो मरतो हे खरं ना? ज्याचं त्याचं आयुष्य किती असावं हे त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार (त्यानं केलेल्या कर्माच्या आता मिळणार्‍या फळानुसार) ठरतं. उदाहरणार्थ : एखादा कैदी किती दिवस कैदेत राहावा ह्यासाठी त्यानं काय गुन्हा केलाय, त्याची तीव्रता किती हे माहिती असणं आवश्यक असतं. त्याची कैद संपली की तो मोकळा. एखादा कैद्याला कैद संपण्यापूर्वी पळून जायला मदत करतो, मुद्दाम हून बाहेर काढतो तेव्हा दोघांनाही आणखी शिक्षा ही होतेच. हे सगळं 'गणित' आपल्याला माहिती न होता होत असल्यानं आपल्याला अतर्क्य वाटतं. इथे असा अर्थ नाही की खून करणार्‍याचं काही नाही करायचं का? मोकळं सोडायचं का तर नाही. आज ज्या देशात आपण आहोत त्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायाची वाट पहायची. हसायला आलं ना? हे कायद्याच्या अंमलबजावणी करणार्‍या लोकांचं अपयश आहे. ते यशापयश लोकांनी ठरवावं. चोरी करणार्‍या लोकांनी देवाच्या प्रॉपर्टीत त्यालाच पळवून नेला म्हणून आक्षेप आहे असं असेल तर देव म्हणजे नेमकं काय हे नीट माहिती करुन घ्यावं लागेल! सर्वांभूत परमेश्वर ही संकल्पना लक्षात घेतली गेली पाहिजे. (चोराच्या आत देखील देव आहेच.) त्यानं चोरांना मारुन लगेच न्याय करावा अशी अपेक्षा आहे का? मूर्ती मध्ये देव आहे पण फक्त मूर्ती म्हणजे देव नव्हे आणि देव रखवालदार नाही रे बाबांनो! बाकी सुरक्षारक्षक काय करत होते? त्यांच्याकडे बंदूक नव्हती का? त्यांना स्वतःची सुरक्षा करता आली नाही का? असे प्रश्न गेलेल्या व्यक्तीबाबत संपूर्ण सहानुभूति नि आदर ठेवून विचारावेसे वाटतात.

In reply to by प्यारे१

प्रारब्धवाद हा भारतीयांनी लावलेला एक अफलातून शोध आहे. एकदा तो स्विकारला की ब्रम्हदेवाच्या बापालाही वाद घालण्यासाठी एखादी फट त्यात शोधता येणार नाही. बाकी चालू द्या. :)

In reply to by धन्या

प्रारब्धवाद म्हणजे काय ? हे जाणुन घ्यायला आवडेल ... माझ्या मते भारतीयांनी माणसाच्या एकुणच अनुभवाचे मॉडेल असे बनवेले आहे आयुष्य = ब० + ब१ * प्रारब्ध कर्म +ब२ * संचित कर्म + ब३ * क्रियामाण कर्म ( error =० ) =)) ब्रम्हदेवाच्या बापालाही >>>> ब्रह्मदेवाचे बाप कोण हे ही सांगा ?

मुळात जानवे घालण्याची प्रथा का निर्माण झालेली असावी असा प्रश्न मनात येतो. एका विचारसरणीनुसार मध्य आशियातले लोक खोरासान,ईरान वगैरे भागात स्थिर झाले. हे अग्निपूजक होते आणि त्यांच्यात झरतुस्त्र हा पुरुष निर्माण झाला. त्याने सांगितलेला धर्म आचरणार्‍या लोकांना सद्रा आणि कश्ती (कोश्ती) परिधान करणे आवश्यक होते. ही कश्ती म्हणजे बहात्तर धागे असलेला एक दोरा असतो आणि तो कमरेभोवती विशिष्ट पद्धतीने बांधायचा असतो .हे लिहायचे कारण म्हणजे वैदिक संस्कृती आणि ही प्राचीन पारसी संस्कृती यात काही समान संकल्पना तज्ञांना आढळल्या आणि हे दोन्ही संस्कृतिगट विलग होण्यापूर्वीच्या काळातल्या एका अतिप्राचीन समान (कॉमन्)संस्कृतीत त्यांची बीजे असावीत असे मत या तज्ञांनी मांडले,जे तज्ञांमधले बहुमत आहे. म्हणजे शरीरावर दोरा धारण करण्याची पद्धत इतकी प्राचीन आहे. बौद्धांमध्ये ही प्रथा आहे तशीच ती अ‍ॅपाचे इंडियन्स मध्येही होती. आपण लहान मुलांच्या कमरेस कडदोरा बांधतो. आणखी एक स्वनिरीक्षण आहे की दुर्गम भागातले आदिवासी लोक कमरेला एक जाडजूड रस्सी बांधत. तीत कोयता,घुंगूर आणि आणखी एखादी वस्तू अडकवण्यासाठी लूप विणलेले असत.याला(ठाणे जिल्ह्यात जाखवण म्हणत) आदिम समाज रानावनात हिंडत असताना ही शस्त्रे उपयोगी पडत. काथ्याऐवजी वेलींचे दोरही पाहिलेले आहेत.(आजही मुंजीमध्ये गवताचा दोरा बांधला जातो) आणि आदिवासीच नव्हेत तर पूर्वास्पृश्य (महार इ.) लोकांनाही फक्त ही रस्सी आणि लंगोटी (कधी कधी तीही नसे) घालून वावरताना पाहिले आहे. म्हणजे जेव्हा वस्त्रे नव्हती तेव्हा कुठल्याही स्वरूपातला दोरखंड, रज्जू, पट्टा ही सतत जवळ बाळगण्याची एक आवश्यक गोष्ट होती, आजच्या सेलफोनसारखी. ती हातात धरण्यापेक्षा अंगावर घातली की हात मोकळे रहातात. जसजशी संस्कृती विकसन पावली तसतशी या आदिम गॅजेटची गरज राहिली नाही आणि केवल प्रतीकरूपाने ती उरली असावी. जसे खगोलशास्त्रामध्ये अतिप्राचीन विश्वासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी अतिदूरच्या तार्‍यांचा वेध घेतला जातो कारण त्या योगे तितक्या प्रकाशवर्षांपूर्वीचे विश्व आपण अंदाजू शकतो, तसेच आदिवासींचे निरीक्षण करताना आपल्याला खूप जुन्या संस्कृतीच्या-जी संस्कृती निर्भेळपणे फक्त या आदिवासींमध्येच टिकून राहिली आहे-खाणाखुणा पटतात.

In reply to by राही

"मुळात जानवे घालण्याची प्रथा का निर्माण झालेली असावी असा प्रश्न मनात येतो." जेव्हा तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली, तेव्हापासून जानवे घालण्याची प्रथा सुरू झाली असावी (किल्ली अडकविण्याकरिता). जेव्हा माणसे धनसंचय करू लागली तेव्हा ते तिजोरीत ठेवू लागली व ते चोरांपासून वाचविण्यासाठी तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली. माणसे जेव्हा रोजचे देण्याघेण्याचे व्यवहार बार्टर पद्धतीऐवजी धन, मुद्रा, सोने इ. देऊन्/घेऊन करू लागली, तेव्हा माणसे धनसंचय करू लागली. . . . ही यादी बरीच वाढविता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

जेव्हा तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली, तेव्हापासून जानवे घालण्याची प्रथा सुरू झाली असावी (किल्ली अडकविण्याकरिता).
मग किल्ली भिजूनये म्हणून जानवं कानाला अडकव(ता)त का? :))

शीख पुरुष त्यांचे किर्पण एका कापडी पट्ट्यामध्ये बाळगतात (गर्ता) जो खांद्यावरून जानव्यासारखा लटकत असतो. मला वाटतं हे जानव्याचच क्षत्रिय रुपांतर असावं.

राही यांनी काही चांगले मुद्दे मांडलेले आहेत. त्यातल्या दोरखंड/ रज्जू / पट्टा या मुद्द्याशी सहमत. अँन्थ्रॉपॉलॉजी च्या काही पुस्तकात असे निरिक्षण व त्यावर भाष्य आहे असेही कुठेसे वाचल्याचे स्मरते. त्यामुळे ह्या मुद्द्याशी काहीशी सहमत. मात्र 'आपण लहान मुलांच्या कमरेस करदोडा बांधतो' ह्या वाक्याबद्दल ( मला जो अर्थ लागला ) काहीशी साशंक. अवांतर : शरद यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर; जानवे कुणी घातले माहित नाही, पण आता गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच :D

गणपतीला जानवे कोणी घातले या विषयावरचा लेख वाचला. नेहमी प्रमाणे शरद यांचा लेख छान आहे आणि बुद्धीला चालना देणारा आहे.प्रतिसादही भारीभक्कम म्हणजे आत्तापर्यंत ९2 आहेत . लेखात सुचवल्या प्रमाणे मी गुगल वर- ancient गणेश idols - यासाठी शोध केला असता बरेच धागे समोर आले.त्यापैकी एक धागा तपासला. त्यात बर्याच गणेश मूर्तींची चित्रे आहेत. तो धागा खाली देत आहे. त्या धाग्यामधील पहिल्या दोन मुर्तींविषयी माहिती आधी पाहिली. प्रत्येक मूर्तीचा फोटो मोठा करून पाहिला असता मूर्तीच्या उजव्या हाताला पानाला भेट द्या असा संदेश येतो. तो पहिला असता या दोन्ही मूर्ती आंध्र प्रदेशच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील आहेत व १००० आणि ११४० वर्षाच्या जुन्या आहेत असे लिहिले आहे. दोन्ही मूर्तींच्या गळ्यात जानवे दिसते. इतर मूर्तींच्या फोटोंचा शोध घेतल्यास आणखी उदाहरणे सापडतील असे वाटते. .https://www.google.co.in/search?q=ancient+ganesh+idols&hl=en&tbm=isch&t…

यज्ञोपवीत/जानवे हे बहुतांश देव-देवतांच्या मुर्तीवर पहता येते. पण काही योगी/ तपस्वी /ऋषींनीही धारण न केल्याचे अढळते. काही शिल्पांत देवींनाही (स्त्रि देवतांना) जानवे दखवले आहे. (उदा: महिषासुर मर्दीनी महाबलीपुरम) यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते, याच प्रमाणे विष्णुच्या पशू रुपास जानवे नाही (मत्स्य-कुर्म) पण वराह, नरसिंह आणि वामनावतार पुढे जानवे दिसते, सगळीकडे रावणानेही जानवे घातलेले दिसेल. तंजावुर - ब्रहदिश्वर मंदिर (इ.स.१०००)गणपतीच्या काही शिल्पांत/चित्रात काहीत गणपतीला जानवे नाही तर काहीत आहे. पण यात शंकराला जानवे नक्की आहे. हम्पीलाही एकाच्या गळ्यात आहे तर दुसर्‍या गणपतीच्या नाही. इतरदेवांविषयी - १) हळीबेड-बेल्लूर - (११०० ते १२०० शतक) मंदिर समुह -ब्रह्मा-विष्णू-महेश-सुर्य-इंद्र इत्यादी देव-देवतांच्या तसेच धर्मपाल / न्यायपाल (जज्ज) मुर्तीवर जानवे स्पष्ट पणे कोरलेली आहेत. २) मदुरै - गोपुरांवरच्या लोकांनी जानवे घातल्याचेही देसते (इ,पु ३५०) ३) महाबलीपुरम (६०० ते ७०० शतक) - अर्जुनाची तपश्चर्या (गंगावतरण शिल्प राजा-हरीश्चचंद्र) या शिल्पातल्या अनेक देवांनी /लोकांनीही जानवे घातले आहे. ४) सुब्रमण्यम स्वामी (सु-ब्राह्मण्यम) अर्थात कार्तिकेयाच्य मुर्तीवरही जानवे आहे. अन्य मंदिर गोपुरे - तिरुपती - बालाजीच्या मुर्तीवर्ही जानवे आहे. ५) तिरुपती बालाजीही जानवे घालतो. आर्य (बेंगळूरु / मुंबई)

In reply to by आर्य

@काही शिल्पांत देवींनाही (स्त्रि देवतांना) जानवे दखवले आहे. (उदा: महिषासुर मर्दीनी महाबलीपुरम) यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते, >http://mimarathi.net/smile/dash1.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

श्री. आठवले, आर्य व अतृप्त आत्मा यांना मनापासून धन्यवाद. आजपर्यंत इतकी शिल्पे पाहूनही या एका दृष्टीतून कधी शोधले नव्हते. गणपतीच्या अनेक मूर्तीत जानवे आढळत नाही हे खरेच पण आता काही मूर्तीत ते आढळते हेही मान्य. स्त्रियांच्या मूर्तीत जानवे दिसले किंवा तसा दागिना आढळतो हे पाहिल्यावर गंमत म्हणजे बुद्धाच्या मूर्तीतेत तो दिसला. शरद

In reply to by अत्रुप्त आत्मा

यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते
अगदी बरोबर.. मग याच प्रमाणे गणपती बाप्पाला ( आणि इतर पुरुषांना ) मंगळसूत्र का घालता येऊ नये? बायका किंवा पुरुषांनी ( ज्याला जे ) हवे असेल ते घालावे.. जानवे / मंगळसूत्र :) :) --ओरिजिनल मुद्दा न सोडणारी --सुता अवांतर : उग्गाच काहीतरी 'अचरट विनोद' वगैरे म्हणत बसतात झालं...

In reply to by आर्य

गोव्यातील महालसा (म्हाळसा नव्हे) देवीनेही यद्नोपवीत धारण केलेले आहे.

In reply to by मृत्युन्जय

महिषासुरमर्दिनी. फोटो कुठले आहेत रे?

In reply to by मृत्युन्जय

जानवे कुठेच नाही पण महिषासुरमर्दिनी, महिष आणि दोघांमध्ये खालच्या बाजूस असलेली चामुंडा अप्रतिम कोरलीय रे. धागा टाक की.

In reply to by प्रचेतस

दोघांमध्ये खालच्या बाजूस असलेली चामुंडा
वल्ली, बाळबोध प्रश्न विचारते की ते चामुंडेचे शिल्प आहे हे तुम्ही कसे ठरवले? उलगडून सांगा.

In reply to by यशोधरा

चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी अस्थीपंजर. गळ्यांत किंवा पोटात विंचू कोरलेला, काही वेळा चेहरा कवटीसदृश तर काहीवेळा स्त्रीरूपी. शस्त्र खङग. इथे पोटातल्या बरगड्या स्पष्ट दिसताहेत.

In reply to by प्रचेतस

अच्छा! सह्ही आहे हे. धन्यवाद. असं काही उलगडून दाखवणारं लिहा एकेक शिल्प घेऊन ही विनंती.

In reply to by प्रचेतस

वाल्लीशेठ, हे असलं सगळं ज्ञान पुस्तक रुपाने संग्रहित करून ठेवा. हे सहसा कुठे सापडत नाही आणि दुर्लक्षीत होऊन नष्ट होऊ राहिलंय.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद यशोधरा आणि इस्पिकचा एक्का तसंही लेखांमध्ये शिल्पांच्या अनुषंगाने लिहित असतोच पण त्यावर एखादा स्वतंत्र लेख कधीतरी लिहिनच. तोवर ही पहा चामुंडेची वेगवेगळी रूपे पिंपरी दुमाला a भुलेश्वर a खिद्रापूर a

In reply to by प्रचेतस

वल्ली शेठ, आता या अस्थीपंजर स्त्रीरुपावर, पोटावरच्या विंचवावर पण थोडा प्रकाश टाका कि :) नेमकं काय इंडीकेट करायचं आहे शिल्पकाराला? काहि स्टोरी आहे का त्या मागे? कुठली तत्कालीन सामजीक प्रथा वगैरे?? अर्धवटराव