हि १९८८ सालची गोष्ट आहे. मी नौदलाच्या अश्विनी या ८२५ खाटा असलेल्या कुलाब्याच्या रुग्णालयात इंटर्नशिप करीत होतो. स्त्रीरोग शास्त्राच्या प्रभागात(वार्ड) मध्ये माझी नेमणूक होती. सर्वात लहान(कनिष्ठ) डॉक्टर असल्याने प्रभागातील हमाली कामे(रुग्णाला बेशुद्धीकरणा पूर्वीची तपासणी करून घेणे त्यासाठी लागणार्या सर्व तपासण्या करून घेणे रुग्णाकडून शस्त्रक्रिये पूर्वीची परवानगी लिखित घेणे ई.) हा वारसा हक्क माझ्याकडे होता.
एके दिवशी सकाळी आमचे विभागप्रमुख सर्जन कप्तान सुरंजन मुखर्जी यांनी मला एका अधिकार्याचा वीर्य तपासणी अहवाल प्रयोग शाळेतून आणण्यास सांगितले. मी आदेशाप्रमाणे तो अहवाल घेऊन आलो त्यात शुक्राणू नाहीत असा निर्वाळा होता. अर्थात याची पार्श्वभूमी मला माहित होती. ती अशी
वरील अधिकारी हा आपली नसबंदी ३ महिन्यांपूर्वी करून गेला होता. परंतु त्याची पत्नी गरोदर आहे असा तिचा मुत्र तपासणी अहवाल सांगत होता.नसबंदी केल्यावर पहिले ३ महिने पर्यंत स्त्रीसंबंध ठेवताना गर्भनिरोधक वापरणे गरजेचे असते कारण अगोदर तयार होऊन वीर्य नलीकेत शिल्लक राहिलेले शुक्राणू गर्भधारणा करू शकतात. आपले जाट भाई सैनिक अशी कोणतीही काळजी घेत नसत आणि बायका गरोदर झाल्या तर त्यांना मारहाण करून 'साफ सफाई" करण्यासाठी येत असत.पण हा सुशिक्षित अधिकारी होता आणि त्या अधिकार्याने अशी सर्व काळजी घेतली होती पण तरीही त्याची पत्नी गर्भार आहे हे पाहून तो तिला रुग्णालयात घेऊन आला होता.
आता हा अहवाल पाहून मुखर्जी सर( विभागप्रमुख) पण जरा चक्रावलेच. त्यांनी त्या स्त्रीला भेट देण्याच्या अगोदर स्त्रीरोग विभागातील आम्हा सर्व डॉक्टरना आपल्या खोलीत बोलावले आणि सांगितले कि मी आता जे करणार आहे ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तुम्ही ते करावे कि नाही हे सुद्धा मी सांगू शकत नाही पण मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असे करीत आहे.त्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी मी कदाचित चुकीचे काम करणार आहे.पण मी हे पूर्ण सदभावमूलक मनोवृत्तीने (BONAFIDE INTENTION) करीत आहे तुमच्यावर असा प्रसंग आला तर तुम्ही तुम्हाला पटेल तसे करा.
यानंतर आम्ही अधिकार्यांच्या कौटुंबिक वार्ड राउंड ला गेलो तेंव्हा त्या स्त्री च्या कक्षात जाऊन तिला असे सांगितले कि "बेटी तू जे काही करते आहेस ते बरोबर कि चूक ते मला माहित नाही तू ते करावेस कि नाही हे सांगण्याचा माझा अधिकार नाही पण वयाच्या अनुभवाने मला असे वाटते कि तू जे करीत आहेस ते बरोबर नाही. आता तुझ्या यजमानांचा अहवाल शुक्राणू नाहीत असे दाखवीत आहे त्यावर काय करायचे आहे. ती काहीच बोलली नाही.त्यांनी असे सुचवले कि आत्ता तर गर्भपात करणे आवश्यक आहे.तो आपण करू त्याबरोबर तुझे गर्भनलिका बंद करण्याची शस्त्रक्रिया पण करू आणि या स्थितीत तू म्हणत असशील तर मी तुझ्या यजमानांना काहीच सांगत नाही.तुझे कौटुंबिक जीवन सुरळीत होण्याचा मला हा एकच उपाय दिसतो आहे यावर तिने होकार दिला.
यावर तिच्या नवऱ्याला असे कधी कधी होते त्याला सांगितले कि नसबंदी ची शस्त्रक्रिया कधीकधी फेल जाते(नीट होत नाही)आणि म्हणून एकाच बेशुद्धीकरणात आपण गर्भपात आणि नलीकाबंदी ची शस्त्रक्रिया करून टाकू. हे सांगून तिचा गर्भपात आणि गर्भनिरोधक शस्त्रक्रिया केली.
आजही हि गोष्ट मला वारंवार आठवते कारण सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन करताना एखादा रुग्ण कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात (stage) असलेला आढळतो. कर्करोगाच्या विभागात काम करीत असताना घेतलेल्या अनुभवातून माहित असते कि या रुग्णाचा रोग शस्त्रक्रियेच्या पलीकडे गेला आहे आणि याचे काही दिवस किंवा महिने शिल्लक आहेत. अशा रुग्णाला अहवाल सांगण्याची पाळी येते तेंव्हा मी अनेकदा असे सांगितले आहे कि तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही औषधाने उपाय होऊ शकतो.(हे करताना मी अनेकदा तोंड फिरवून डोळे पुसले आहेत)
शब्द हे फसवे असतात, हे बोलणे खोटे आहे हे मला पूर्ण माहित असते पण दुसरे काय करता येईल हे मला अजून तरी समजलेले नाही. रुग्णाला सत्य सांगितले कि आपले शेवटचे काही दिवस बाकी आहेत तर त्याला धक्का बसतो त्याचे शेवटचे दिवस कष्टात जातात.(अज्ञानात आनंद असतो).कर्करोगाच्या विभागात असे शेवटच्या टप्प्यातील अनेक रुग्णांनी मला विचारलेले आहे कि साहेब आम्ही या रुग्णालयातून घरी जाऊ शकू का? मी उत्साहात त्यांना नक्कीच म्हणून उत्तर हि दिले आहे.त्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने मला हात वर करून धन्यवाद दिले आहेत. पण पहिल्यांदा जेंव्हा हा प्रश्न आला तेंव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि आपण रोज या रुग्णालयात यतो पण आपण येथून कधीच जिवंत बाहेर पडणार नाही हा विचार किती भयानक आहे
माणूस म्हणून आपण किती तोकडे आहोत हि जाणीव वारंवार टोचत राहते.
माझ्या भावाच्या कंपनीतील एका वरिष्ठ व्यवस्थापकाच्या वडिलांना कर्करोग झाला होता तेंव्हा त्याने मला सांगितले कि तू वडिलांना काहीही सांगू नको. मी त्याला म्हटले कि मी सांगत नाही पण त्यांना ते समजून चुकेल.कालपर्यंत ते काही बोलत असताना तुम्ही पूर्ण लक्ष देत होतात असे नाही पण आज नंतर तू किंवा तुझी बहिण त्यांनी पाणी मागितले तर धावून धावून कराल.हे न कळण्या इतके ते मूढ नाहीत.
हि मानवी वृत्ती आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला किमत कळते जेंव्हा ती आपल्याकडे नसते किंवा ती नाहीशी/ गहाळ झाली.
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात (सत्य बोला प्रिय बोला कटू सत्य बोलू नका )
वाचने
53014
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही पटले
नाही पटले
In reply to नाही पटले by बंडा मामा
अहो अधिराज मी रुग्णाचे
In reply to नाही पटले by अधिराज
उद्या एखाद्या व्यक्तिच्या
उद्या एखाद्या व्यक्तिच्या हाताचे ठसे एका चोरीच्या संदर्भात तपासण्यास पोलिस घेऊन आले तर ठसे तपासणार्या व्यक्तिने ते ठसे तपासुन काय तो निकाल देणे आवश्यक असते. उगाच ठसे तर जुळत आहेत पण त्याने ह्याच्यावर चोरीचा गुन्हा सिद्ध होऊन ह्याच्या कुटुंबाची वाट लागेल, त्याचा संसार वाचवण्यासाठी मला खोटे बोलणे भाग आहे म्हणून नाही जुळले ठसे असे सांगणे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का?चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही, इथे तो थोडे दिवस जेर्ल मध्ये गेल्याने त्याचा संसार कसा काय उधळला जाइलचुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही
In reply to उद्या एखाद्या व्यक्तिच्या by श्री गावसेना प्रमुख
कदाचित नवर्याने समजुतदारपणा
In reply to चुकीचे उदाहरण दिले राव तुम्ही by बंडा मामा
कदाचित नवर्याने समजुतदारपणा दाखवुन एक चूक पोटात घातलीही असतीचुक नवरा ह्या कॅटेगरीतल्या लोकांची मानसीकताच अशी असते की मी बाहेर कुठेही तोंड मारीन पण बायको चरित्रवान हवी,हे माझ म्हणने समस्त पुरुष जातीला लागु पडत असाव.नवरा ह्या कॅटेगरीतल्या
In reply to कदाचित नवर्याने समजुतदारपणा by श्री गावसेना प्रमुख
वरील उदाहरणातही त्या
In reply to नवरा ह्या कॅटेगरीतल्या by बंडा मामा
वरील उदाहरणातही त्या व्यक्तिचा संसार धोक्यात आहे असे माझे मत आहे त्यावर आधारीत मी निर्णय पोलिसांना कळवला तर तुम्हाला तो मान्य आहे का?बिनधास्त कळवालग्नाआधी गरोदर असणं चोरी करणं
In reply to उद्या एखाद्या व्यक्तिच्या by श्री गावसेना प्रमुख
या क्षणी समाजरचना अशीच आहे!
In reply to लग्नाआधी गरोदर असणं चोरी करणं by यशोधरा
>>या क्षणी समाजरचना अशीच आहे
In reply to या क्षणी समाजरचना अशीच आहे! by कवितानागेश
समाजरचना अशीच आहे, त्याला काय
In reply to >>या क्षणी समाजरचना अशीच आहे by यशोधरा
पण ती सहजासहजी बदलणार नाही हे
In reply to समाजरचना अशीच आहे, त्याला काय by कवितानागेश
शिकतोय..
In reply to पण ती सहजासहजी बदलणार नाही हे by यशोधरा
>>यशोधराताई, जर समाजसुधारणेला
In reply to शिकतोय.. by उपास
हं..
In reply to >>यशोधराताई, जर समाजसुधारणेला by यशोधरा
उह्ह..
In reply to हं.. by उपास
उपास, मला वाटलेच की हे विधान
In reply to हं.. by उपास
हं..
In reply to उपास, मला वाटलेच की हे विधान by यशोधरा
मुद्दा समजला, मी वादासाठी वाद
In reply to हं.. by उपास
वैद्यकशास्त्र इतके प्रगत
In reply to मुद्दा समजला, मी वादासाठी वाद by यशोधरा
वैद्यकशास्त्र इतके प्रगत
In reply to मुद्दा समजला, मी वादासाठी वाद by यशोधरा
....कदाचित माणसे हळूहळू
In reply to >>या क्षणी समाजरचना अशीच आहे by यशोधरा
आधी प्रतिसाद नीट पूर्ण वाचावा
In reply to ....कदाचित माणसे हळूहळू by बंडा मामा
श्री. सुबोध खरे, आपल्या
वॉव...
In reply to श्री. सुबोध खरे, आपल्या by शुचि
शुचिजी ह्यात दिलगिरी व्यक्त
In reply to श्री. सुबोध खरे, आपल्या by शुचि
"डिसगस्टींग" हा फार स्ट्राँग
In reply to शुचिजी ह्यात दिलगिरी व्यक्त by बंडा मामा
एखाद्याच्या ज्ञानाचा वयाचा
In reply to शुचिजी ह्यात दिलगिरी व्यक्त by बंडा मामा
भावविवश
In reply to श्री. सुबोध खरे, आपल्या by शुचि
मित्रहो
हे उत्तम
In reply to मित्रहो by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब तुमच्याशी असहमत
In reply to मित्रहो by सुबोध खरे
एक खुलासा: * हे चिन्ह काढून
In reply to डॉक्टरसाहेब तुमच्याशी असहमत by बंडा मामा
मामासाहेब
In reply to डॉक्टरसाहेब तुमच्याशी असहमत by बंडा मामा
त्यांनी recommended हा शब्द
In reply to मामासाहेब by सुबोध खरे
अवांतर
In reply to मामासाहेब by सुबोध खरे
बर
काय राव, तुम्हाला अजून नाही कळलं?
In reply to बर by स्पा
वेगळा
मला एकच वाटत कि नैसर्गिक
चूक कि बरोबर?
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्....
धन्यवाद काळे साहेब,
In reply to सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्.... by सुधीर काळे