वीर सावरकर
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत.
सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते. भारतीची फाळणी त्यांना कधीच मान्य नव्हती.
त्यांनी कायम अखंड भारताचं स्वप्न बघितलं होतं. गांधींच्या खुनामधे त्याचा सहभाग होता की काय याची पुढे अनेक वर्र्षे शहानिशा चालली. पण निश्पन्न काहीच झाल नाही. सावरकरांना स्वातंत्र्यप्रात्पी नंतरसुद्धा भाषणबंदी होती.
स्वातंत्र्यप्राप्तीचा पहिला लढा, कमला, काळे पाणी ही त्यांनी लिहीलेली काही गाजलेली पुस्तके.
जयोस्तुते आणि सागरा प्राण तळमळला या कवितांचे कवी देखील सावरकरच होत.
अशा या स्वातंत्र्यवीराला कोटी कोटी प्रणाम.
_/\_
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्वातंत्र्यवीरांना विनम्र आदरांजली...
विनम्र अभिवादन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना
शिवभक्त?
शिवभक्त म्हणजे शिवाजी
स्वातंत्र्यवीर सावरकर: एक आठवण, एक विनंती
पुरंदरे